Thane News : कौटुंबिक वादातून सून घर सोडून गेली आणि त्याबाबत मुलाला दोषी धरत त्याला सतत टोमणे मारणे अंबरनाथमधील एका वडिलांच्या जिवावर बेतले आहे. वडिलांच्या सततच्या टोमण्यांमुळे राग अनावर झालेल्या अंबरनाथ येथील एका तरुणाने वडिलांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

कौटुंबिक हिंसेतून झालेल्या हत्येची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देविदास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी प्रकाशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार ते रामदास कदम, मातोश्रीवर टीका करणाऱ्या नेत्यांना अंधारेंनी सुनावलं
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.