Kalyan News : टिटवाळाला रेल्वे स्थानकात आज रेल्वे प्रवाशांनी सकाळीच आंदोलन केले. रोजच लोकल उशिरा येत असल्याने प्रवाशी संतप्त झाले होते.

मुंबईकडून येणाऱ्या लोकल गाड्या सतत उशिराने येत असल्याने प्रवाशांना कामावर जायलाही उशिर होत होतो. आजही तसाच प्रकार घडल्याने तब्बल १५ ते २० मिनिटं लोकल उशिराने येत असल्याने प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि ते थेट रेल्वे रुळांवर उतरले. प्रवासी १५ मिनिटांनी रेल्वे रुळावर होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या प्रवाशांना बाजूला करत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.