चंद्रपूर : प्रत्येक गावात ग्रामदैवत असतं. या ग्रामदैवतेभोवती दंतकथांचे वलयही मोठं असतं. अशीच एक दंतकथा चंद्रपुरात प्रसिद्ध आहे. गावात चोरांनी शिरकाव केला की, गाववेशीवर असलेला नंदी ओरडून गावाला सूचना द्यायचा. नंदीमुळे चोर अपयशी व्हायचे. मग चोरांनी नंदीचं मुंडकंच छाटलं. मुंडकं नसलेलं नंदीचं शिल्प आजही गावात आहे. गावकरी त्याची पूजा अर्चा करतात. आजच्या विज्ञान युगात हे केवळ दंतकथा ठरेल. मात्र, पिढ्यान पिढ्यांपासून सुरू असलेली ही दंतकथा नव्या पिढीनेही आत्मसात केली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल असलेल्या कन्हारगाव इथे मुंडक नसलेला नंदी आजही बघायला मिळतो. गावाला चोरापासून वाचवणाऱ्या या नंदीची पूजा आजही ग्रामस्थ करतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव चारही बाजूने घनदाट जंगलांनी वेढा दिलेलं गाव. ब्रिटिशांचं आवडतं शिकारीचं स्थळ. याच गावाच्या नावावरून “कन्हारगाव अभयारण्य ” घोषित झाल आहे. वाघ, बिबट, अस्वल यासोबतच दुर्मिळ वन्यजीवांचा आवास इथं आहे. याच गावात चोरांची सूचना देणाऱ्या नंदीची दंतकथा प्रचलित आहे. ऐतिहासिक काळापासून इथ लोकवस्ती होती.

Shraddha Murder Case : आफताबची कुंडली, मर्डरचं स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग अन् श्रद्धाचा The End; दिल्ली क्राईममधील संपूर्ण घटनाक्रम

गाववेशीवर शिवलिंग, गणेश, नंदी, नाग शिल्प, शंकर-पार्वती शिल्प आहेत. यातील नंदीचे शिल्प मुंडक नसलेलं आहे. शीर विरहित असलेल्या या नंदी शिल्पाबाबत एक दंतकथा प्रचलित आहे. या गावात जेव्हा चोरांच्या शिरकाव व्हायचा, तेव्हा हा नंदी ओरडून गावाला सावधान करीत असे. नंदीमुळे चोरांना सारखं अपयश यायचं. यामुळे चोरांनी नंदीचा मुंडकं छाटलं. गावाच्या सुरक्षेसाठी ओरडणाऱ्या या नंदीची पूजा आजही केली जाते.

इतिहासकारांच्या नजरेतून….

शिर नसलेल्या नंदीच ज्या ठिकाणी शिल्प ठेवले आहे तिथे गणेश, शिवलिंग, नाग शिल्प आणि ग्रामदेवतेचं शिल्प आहे. गणेश, नाग शिल्पाची बनावट बघता ही शिल्पे भोसले काळातील असण्याची शक्यता इतिहासकारांनी वर्तवली आहे. अशा प्रकारची शिल्प चीवंडा जंगलात सुद्धा आढळून येतात.

वीज चोरीसाठी लढवली हायटेक शक्कल, तब्बल १ कोटी १२ लाखांचा गफला पाहून महाविरणही चक्रावलं
वनविभागाशी संघर्ष सुरू…

कन्हरगावात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. इथे वनविकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात काम सुरू असते. त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळत असते. इथे असणारे बहुतांश कुटुंब वनमजूर आहेत. आता मात्र हे वनक्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. यामुळे आपला रोजगार हिरावेल अशी भीती येथील नागरिकांना आहे. अभयारण्याचा विरोध या गावातील नागरीक करताना दिसतात तर काही नागरीक अभयारण्याचे समर्थनही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here