वाचा:
पहिल्या टप्यात कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी होते. पण मुंबई, पुणे आणि इतर रेडझोन भागातून लोक परतू लागल्याने संसर्ग वाढत गेला. गेल्या चार पाच दिवसांत तर करोना च्या आकडेवारीने कहरच केला. पूर्वी रोज पंधरा वीस करोना बाधित आढळत होते. पण चार दिवसात रोज दोनशे ते तीनशे रुग्ण आढळू लागले. त्यामुळे आठ दिवसांतच बाधितांच्या संख्यने दोन हजाराचा टप्पा पार केला. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्याची घोषणा केली. २० ते २६ जुलै या दरम्यान सात दिवस दूध व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार सोमवार पासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाचा:
कोल्हापुरात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींमुळे करोना संसर्ग वाढत आहे. त्याचा पुरावा शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड अशा तालुक्यात मिळाला. या भागात मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. यामुळे येत्या दोन आठवड्यात जिल्ह्यात कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी ई-पास दिले जातात. ते तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. आजपासूनच त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती कोल्हापूर क्षेत्रातील (आधारकार्ड पत्यानुसार) असेल तरच परवानगी देण्यात येईल. तसेच मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा देत असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट देण्यात येणार आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. यामुळे १५ दिवस परजिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला कोल्हापुरात येता येणार नाही.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times