हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे. हे शक्य नाही. बाजीप्रभुंची शिवाजी महाराजांप्रती किती मोठी निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंविषयी किती आदर होता हे इतिहासात आहे, सर्वांना माहिती आहे. जेधे-बांदल हे प्रामाणिक देशमुख होते. त्यांच्यात वाद दाखवण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली, असा आक्षेप जितेंद्र आव्हाड यांनी नोंदवला आहे.

हायलाइट्स:
- हर हर महादेव चित्रपटाच्या वादाचं प्रकरण
- बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाच विरोध
- आता राज ठाकरेंची भूमिका काय? आव्हाडांचा सवाल
हर हर महादेव या चित्रपट कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही, असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का? तसेच ज्यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे ते आता हा चित्रपट दाखवू नका, अशी मागणी करतील का? आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना विचारलाय.
जितेंद्र आव्हाड यांचे चित्रपटावर आक्षेप काय??
हरहर महादेव चित्रपटात पहिली विकृती म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना अरेतुरे बोलताना दाखवण्यात आले आहे. हे शक्य नाही. बाजीप्रभुंची शिवाजी महाराजांप्रती किती मोठी निष्ठा होती आणि शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंविषयी किती आदर होता हे इतिहासात आहे, सर्वांना माहिती आहे. जेधे-बांदल हे प्रामाणिक देशमुख होते. त्यांच्यात वाद दाखवण्यात आला. त्यांची बदनामी करण्यात आली. तसेच शिरवळला बायकांचा बाजार भरत असत. हा बाजार कुठे भरवला जात होता, मराठा समाजाचे लोक कधी बाजार भरवत होते हे दाखवलेलं नाही, असं सांगतानाच शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या बखरी आणि नोंदींच्या उलटी बाजू सिनेमात दाखवण्यात आल्याचं आव्हाड म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.