परभणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतलेले या निर्णयामुळे चालक व वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने चालक व वाहकाला कर्तव्यावर बोलावल्यानंतर कोणत्याही कारणाने त्यांची गैरहजेरी न घेता त्या दिवसाचा पगार देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर अखेर आता सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या मागणीची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सकारात्मक दखल घेतली आहे.

यापुढे चालक व वाहकाला कर्तव्यावर बोलावल्यानंतर कामगिरी न दिल्यास यापुढे त्यांना सदरील दिवसाची रजा न घेता वेतन दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. यापुढे ज्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य मिळाले नाही त्या दिवसाचे वेतन द्यावे अशा सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रण महाव्यवस्थापक अजीत गायकवाड यांनी दिल्या आहेत.

अंघोळीसाठी गिझर चालू केला पण झाली मोठी चूक, गर्भवती असलेल्या जनरल मॅनेजरचं क्षणात आयुष्य संपलं
विभाग नियंत्रकांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या आगारात चालविण्यात येणाऱ्या आवश्यकतेप्रमाणे समय वेतनश्रेणी तसेच रोजंदारी गट १ व २ चालक व वाहक तसेच चालक तथा वाहक यांचा वापर करावा. त्याप्रमाणे गाड्या उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून कर्मचाऱ्यांची गाड्या अभावी नियोजित कामगिरी रद्द होणार नाही. याची दक्षता घ्यावी. अगर व्यवस्थापक यांनी देखील नियतनाच्या आधारे दैनंदिन कामकाजाचा तक्ता लावतान कायम वेतनश्रेणी वरील कर्मचाऱ्यांना कर्तव्य लावने बंधनकारक असल्याने त्यांना प्रथम कामगिरी लावावी.

रोजंदारी गट क्रमांक दोन मधील चालक, वाहक आणि चालक तथा वाहक यांना गाड्या अभावी अथवा अन्य कारणा अभावी कामगिरी रद्द करण्यात आली असल्यास अथवा सदर दिवशी अन्य कामगिरी दिली नसल्यास मोटर वाहतूक अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार १२ तास आगारात हजर राहूनदेखील कामगिरी देता आली नाहीतर त्या दिवशी रजेचा अर्ज घेऊ नये सदरील दिवशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमाप्रमाणे नोंदवून त्याला वेतन देण्यात यावे. कोणत्या कारणामुळे कर्मचाऱ्याला कामगिरी देता आली नाही याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.

चंद्रग्रहणापासून घरात सतत लागतेय आग, कुटुंबीय घाबरले; पोलिसांनाही रहस्य उलगडेना
समयवेतनश्रेणी, रोजंदारी गट क्रमांक दोन चालक, वाहक उपलब्ध असल्यास त्यांना वगळून रोजंदारी गट क्रमांक एकच्या चालक, वाहक कामगिरी दिल्यस याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापकांनी तपासणीच्या वेळी वाहतूक नियंत्रण कक्षातील नोंदवहीची तपासणी करून आढावा घ्यावा. ज्या गाड्या आगारातून गाड्या वेळेत मार्गस्थ न होता उशिरा मार्गस्थ होत असल्यामुळे एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या धावत असल्यामुळे पर्यायाने उत्पन्न कमी मिळते यासाठी कोण जबाबदार आहे. त्याची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करावी अशा सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी दिले आहेत.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढणार, ‘या’ भागांना हवामान खात्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here