श्रीकांत सावंत । :
क्षेत्रातील लॉकडाऊनचा कालावधी आज, रविवारी संपत असताना शनिवारी रात्री ठाण्याचे आयुक्त यांनी शहरातील २७ हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश जाहीर केला. परंतु, उर्वरीत शहरासाठीचे निर्बंध शिथील करण्यात आले असून, सम-विषम पद्धतीने दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. ( )

वाचा:

ठाणे जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन लांबत असल्याने सर्वच स्तरांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. उद्योजक, व्यापारी, रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार, नोकरदार, नागरिक आणि राजकीय पक्षही याविरोधात आक्रमक झाले होते. राज्यातील सत्तेतील भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही ठाण्यात लॉकडाऊनकाळात वाढ नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या दृकश्राव्य बैठकीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची तयारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने चालवली होती. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी २७ हॉटस्पॉट निश्चित केले. या भागांत लॉकडाऊन काम राहणार आहे.

वाचा:

ठाण्यातील हॉटस्पॉट

कळव्यातील गावदेवी मैदान, शिवाजी नगर, विटावा, मुंब्रा येथील महावीर नगर, शैलेश नगर, संतोष नगर, अमृतनगर, नौपाडा-कोपरीतील चेंदणी कोळीवाडा, पारसीवाडी वरची, आनंदनगर, दादोजी कोंडदेव स्टेडिअम परिसराचा हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे. वागळे प्रभागातील अंबिकानगर, रामनगर, शांतिनगर, किसननगर, वागळे इस्टेट, पडवळनगर, शिवाजी नगर, किसन नगर, रत्नाबाई कम्पाऊंड भागही बंद राहतील. लोकमान्य-सावरकर नगरातील अंबेवाडी, इंदिरानगर, हनुमाननगर, उथळसरमधील राबोडी, आझादनगर, वर्धमान, गोकुळनगर, लक्ष्मी-चिरागनगर या परिसराचाही हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे.

डोंबिवलीत असहकार्याची भूमिका

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यामुळे आणखी लॉकडाऊन वाढवण्यास व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. यापुढील लॉकडाऊनला सहकार्य न करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली असून, तसे निवेदन डोंबिवलीतील ग्रेन अँड प्रॉव्हिजन मर्चंट्स असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांसह, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांना धाडण्यात आले आहे.

वाचा:

नवी मुंबईतील व्यापारीही आक्रमक

लॉकडाऊनचा शेवटचा दिवस उजाडला तरी याबाबत महापालिकेने कोणतीही भूमिका घेतलेली नाही व व्यापाऱ्यांना चर्चेसाठी बोलविले नाही. याबाबत नवी मुंबई व्यापारी संघाचे महासचिव प्रमोद जोशी म्हणाले, ‘महापालिकेने २० जुलैनंतर शहरात लॉकडाऊन लागू केल्यास व्यापारी आपले व्यवसाय सुरूच ठेवतील. महापालिकेने आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले तरी चालेल. परंतु आमचा निर्णय आम्ही मागे घेणार नाही.’

कल्याण-डोंबिवलीबाबत आज निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊनची मुदत आज, रविवारी संध्याकाळी पाच वाजता संपत असल्याने आजच त्याविषयीचा निर्णय होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नवी मुंबईतही लॉकडाऊनविषयी कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. अंबरनाथ, बदलापूर व ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांविषयीही आजच निर्णय होणार आहे.

वाचा:

मिरा-भाईंदरमध्येही ठाण्यासारखा निर्णय

मिरा-भाईंदर महापालिकेने ११ हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये ३१ जुलै पर्यत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटस्पॉट वगळता इतरत्र सर्व दुकाने सकाळी ९ वाजल्या पासून सायकांळी ५ वाजेपर्यंत सम विषम पद्धतीने सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील मॉल सुरू करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here