Authored by प्रसाद रानडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Nov 2022, 5:27 pm

Ratnagiri local news in Marathi | या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये याची लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

Dam
खेड तळवट धरण

हायलाइट्स:

  • खेड तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
  • पाणी साठयावर परिणाम
  • पाटबंधारे विभागाकडून पोलिसांना पत्र
रत्नागिरी: खेड तालुक्यातील तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याने सध्या धरणातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पाटबांधारे विभाग खडबडून जागा झाला असुन यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या या धरणाच्या दरवाजे उडघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते व धरणाचे दरवाजे अर्धवट उघडण्यात आले होते.

सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड पोलीस स्थानकामध्ये याची लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाणी नेमकं कोण सोडते, यामागचे गौडबंगाल काय आहे या सगळ्याचा शोध घेण्याचे आव्हान खेड पोलिसांसमोर आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रत्नागिरी-बेळगाव बसला अपघात; काच फोडत प्रवासी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला
या धरणावर सुरक्षारक्षकच नेमलेला नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले. कुलूप तुटल्यामुळे धरणातील लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. धरणासारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं दिसतंय. पुढे काही दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here