Uddhav Thackeray, गोमांस-मॉब लिंचिंग आणि अत्याचारींचा सत्कार, हे आमचे हिंदुत्व नाही: उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा – uddhav thackeray indirectly criticizes bjp and modi government over hindutva concept saying this is not our hindutva
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. निमित्त होतं प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा. यावेळी त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या धार्मिक सुधारणेचा धागा पकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रकाश टाकला. यावेळी एखाद्या ठिकाणी गोमांस आढळल्यास तेथे मॉब लिचिंग केले जाते, मात्र एखाद्या महिलेवर बलात्कार झाल्यास त्या गुन्हेगारांना सोडले जाते आणि त्यांचा सत्कार देखील केला जातो, हे आमचे हिंदुत्व नक्कीच नाही असे वक्तव्य करत ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. (uddhav thackeray indirectly criticizes bjp and modi government)
उद्धव ठाकरे म्हणाले की, हल्ली गोमास सापडले तर मॉब लिंचिंग होतं, माणसांना मारलं जातं. पण त्याच वेळेला एका महिलेवर अत्यातर केले गेल्यानंतर, तिच्या डोळ्यादेखत तिच्या मुलीला मारल्यानंतर त्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांना सोडलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो आणि त्यांना उमेदवारही केलं जातं हे आमचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही… अजिबात नाही. आता भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद, सूर्यकुमार यादवची ऐतिहासिक कामगिरी… वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन ठाकरे म्हणाले, आज स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. हे स्वातंत्र्य आबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत. बाहेर गुलामगिरी आहे, हुकुमशाही आलेली आहे आणि आपण आत मोठ्या गोष्टी करतो आणि बाहेर शेपूट घालून चालतोय…काय उपयोग आहे त्याचा?
ठाकरे पुढे म्हणाले की, घटनेमध्ये राज्य आणि केंद्राच्या संबधांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. राज्य हे काय केंद्राचे गुलाम नाही. होऊच शकत नाही. कारण आपला देश हा एक संघराज्य आहे. बाबासाहेबांना देखील एक प्रश्न स्पष्ट विचारण्यात आला होता की राज्ये ही केंद्राची गुलाम होतील का? तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही, राज्यांना देखील केंद्राएवढेच समान अधिकार आहेत.
आज तसं दिसतंय का… प्रत्येक गोष्ट मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, घे… पण घेतल्यानंतर का पाहिजे याचं उत्तर तुझ्याकडे आहे का? सत्ता पाहिजे सगळ्यांनाच सत्ता पाहिजे, पण वाट्टेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, लोकशाही पायदळी तुडवून सत्ता पाहिजे, घटनेची कलमं पायदळी तुडवून सत्ता पाहिजे ही माणसं सत्ताधारी म्हणून देशाला लायक नाहीत, यांना पहिल्यांदा खाली खेचायला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले.