पुण्यात भीषण अपघात

या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यानंतर वित्तहानी आणि जीवितहानीच्या नुकसानीचा नेमका अंदाज मिळू शकेल.

नवले ब्रीजवर अपघात

सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे ४०ते५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान सुमारे पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

गाड्यांचा चेंदामेंदा

गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. सततचे अपघात रोखण्यासाठी नवले पुल हा वडगाव पुलाला जोडण्यासंदर्भातील प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा प्रस्ताव पुणे महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर प्रस्तावाचं गाडे फार पुढे सरकले नव्हते. अशातच आता हा भीषण अपघात झाल्याने नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आगामी काळात तरी प्रशासन काही निर्णायक पावले उचलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Pune Accident feature

pune-accident-feature

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, पीएमआरडीए चे अग्निशामक दल, रेस्यु वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिक लोकांनी गाड्यांमधील लोकांना बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केले आहेत. संपूर्ण महामार्गावर एकच गोंधळ उडाला असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. यावर आता पुणे महानगरपालिकेकडून काय माहिती दिली जाणार, हे पाहावे लागेल. (Major road Accident in Pune)

पुणे अपघात

अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.या अपघातात जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत सुमारे १२ ते १५ रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आल्या होत्या. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. (Major road Accident in Pune)

अपघातामुळे ब्रीजची दुरावस्था ऐरणवीर

नर्हे स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर असलेल्या ४७ वाहनांना जोरदार धडक दिली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४७ हून अधिक वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रेलर जाऊन थांबला. हा ट्रेलर सातारहून मुंबईच्या दिशेने जात होता.

अपघात नेमका कसा झाला?

वाहनांची गर्दी असल्यामुळे या भागात संथ गतीने वाहतूक सुरु होती. मात्र, रस्त्याच्या उतारावर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले आणि हा अनियंत्रित ट्रेलर गाड्यांना धडका देत पुढे जात राहिला. यामध्ये अनेक कार उलटल्याची माहिती आहे. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली. (Major Accident in Pune Navale Bridge)

कार उलटल्या

या अपघातानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिका नवले पुलाची अवस्था सुधारण्यासाठी काही प्रयत्न करणार का, हे पाहावे लागेल. मात्र, हे पाऊल उचलण्यासाठी प्रशासनाने इतका मोठा अपघात होण्याची वाट का पाहिली, असा प्रश्नही आता सामान्य नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह हेदेखील काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here