नाशिक : नाशिक शहरात कार चालकाने चार ते पाच जणांना उडवल्याची घटना दोन दिवसांआधी घडली होती. यामध्ये हा अपघात का झाला याची अजब माहिती समोर आली आहे. उपनगरवरुन लेखानगर आणि लेखानगरकडून मुंबई नाक्याकडे येत असताना हा प्रकार घडला. साहेबराव निकम असे कार चालकाचे नाव आहे. ते प्राध्यापक असल्याचं सांगितलं जात आहे.

साहेबराव निकम यांनी दारूचे सेवन केले होते. पण अपघात झाल्यानंतर तब्बल २ दिवस ते बेशुद्ध होते. त्यामुळे त्यांनी अशी कोणती नशा केली होती, ज्याने दोन दिवस शुद्ध आली नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. पण अखेर याचं उत्तर आज मिळालं. साहेबराव निकम यांनी नशेत केलेला कारनामा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत होता.

Pune Crime: गर्लफ्रेंडला नको होती बॉयफ्रेंडची बायको, कायमचं संपवण्यासाठी केलं भयंकर कृत्य
निकम यांना शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यामध्ये निकम यांनी दिलेलं कारण ऐकून पोलीसही थक्क झाले होते. निकम यांनी सर्दी झाल्यानंतर झालेला कफ लवकर बरा व्हावा यासाठी ब्रँडी घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना इतकी नशा झाल्याचं समोर आलं आहे. कधीही दारू न पिणारा सर्दीसाठी ब्रँडी पितो, यावर कुटुंबियांचाही विश्वास बसेना.

नाशिकमधील मुंबईनाका आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीत संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेत कारचे टायर फाटून गाडीची दुरवस्था झाली होती. गाडीचा वेग इतका प्रचंड होता, की पुढचे टायर फुटून निघाले, तरी मद्यधुंद कार चालकाला कार आवरता आली नाही.
मुंबईतून २० मिनिटांत नवी मुंबई गाठण्यासाठी थांबावं लागणार, ट्रान्सहार्बर लिंकला १३ महिने विलंब
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या निकम यांनी भरधाव वेगात वाहन चालवत नाशिकच्या अंबड आणि मुंबई नाका परिसरात तीन वाहनांना धडक दिलीय या घटनेत चार जण जखमी झाले. ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत होता. तो अतिशय भरधाव वेगाने कार अनेकांच्या लक्षात आले. या महामार्गावर त्याने काही वाहनांना धडक दिली. त्यामुळे काही जण जखमी झाले. त्यानंतर चांडक सर्कल परिसरात मोठा जमाव गोळा झाला. त्यावेळी तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले होते.

मुंबईकरांनो सावधान! बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही गोवरची लागण, गंभीर आहेत लक्षणं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here