Gujarat Assembly Election 2022 | या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. हे सर्वजण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले,आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. महाराष्ट्रातही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे

 

Aaditya Vs Shinde Fadnavis
आदित्य ठाकरेंची टीका

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रासाठी एक तास द्यायला पाहिजे होता
  • सर्वजण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त
मुंबई: आतापर्यंत महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर जाताना आपण पाहत होतो. परंतु, आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मंत्रिमंडळही महाराष्ट्राबाहेर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बुधवारची नियोजित बैठक रद्द झाली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे हे आज बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. बिहारला जाण्यापूर्वी त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची बातमी माझ्या कानावर आली. ही बैठक का रद्द झाली तर दुसऱ्या राज्यात प्रचार सुरु आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेली आहे. पण या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. हे सर्वजण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले,आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही. पण महाराष्ट्रातही महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. ओला दुष्काळ आहे, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं, अशी टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावर आता शिंदे-फडणवीस सरकारकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट कशासाठी?

राष्ट्रीय स्तरावर तिसरी आघाडी उभारण्याच्यादृष्टीने तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहात का, असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही. थर्ड फ्रंटवर काही विचार करू नका. त्यावर मोठे नेते बोलतील. तुम्ही खूप विष्लेशण करू नका. थर्ड फ्रंटचा विचार नाही. थर्ड फ्रंटवर काही विचार करू नका. त्यावर मोठे नेते बोलतील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

असा प्रकार पहिल्यांदाच पाहतोय: अजित पवार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले. शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून भरपगारी सुट्टी असे आदेश पहिल्यांदाच पाहिले आहेत, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. गुजरातमधील मतदानासाठी १ व ५ डिसेंबर अशा दोन दिवशी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here