करोनाबाबतच्या दहा लाख लोकांमागे करण्यात आलेल्या चाचण्याचे प्रमाण पाहता राज्यात हे प्रमाण २५१ आहे. अन्य राज्यांपैकी तमिळनाडूमध्ये ५४९, आंध्रप्रदेशमध्ये ३९८, राजस्थानमध्ये ३०४ आणि दिल्लीत २३७ आहे. जिल्हानिहाय चाचण्यांमध्ये पुणे जिल्हा हा देशात पहिल्या स्थानावर आहे.
याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘दैनंदिन चाचण्यांमध्ये पुणे जिल्हा हा देशात प्रथम स्थानावर आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सुमारे ११ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मृत्यूदर हा सुमारे २.६ टक्के आहे. करोनाचे ६०० रुग्ण हे गंभीर आहेत’
‘राज्यात दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण पाहता पुण्यात ६५२, ठाण्यामध्ये ४९९ आणि मुंबईत ४४४ आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढलेली दिसते’ असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या संख्येचा एक हजाराचा टप्पा पार
पुणे शहर जिल्ह्यात रविवारी ६१ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची संख्या मानली जात आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला तर जिल्ह्यात मृतांची संख्या १३४७ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात २४५९ रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संख्येने ५१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठेआव्हान उभे राहिले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times