नवी दिल्ली: दिल्लीतील पालममध्ये एका कुटुंबातील चार जणांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी केशवला अटक केली आहे. केशवनं त्याच्या आई, वडिलांची, बहिणीची आणि आजीची निर्घृणपणे हत्या केली. केशवनं वडिलांवर चाकूनं २० सपासप वार केले. बुधवारी सकाळी कौटुंबिक वाद झाला. यामुळे संतापलेल्या केशवनं चौघांना संपवलं. केशव काही महिन्यांपूर्वीच नशामुक्ती केंद्रातून घरी परतला होता.

बुधवारी सकाळी केशवच्या कुटुंबात वाद झाला. केशवचे वडील त्याला ओरडले होते. यानंतर केशव भडकला. त्यानं स्वत:चे वडील, आई, बहिण आणि आजीची हत्या केली. बुधवारी संध्याकाळी केशवनं आजीचा खून केला. त्यावेळी घरी कोणीच नव्हतं. केशवनं आजीकडे पैसे मागितले होते. मात्र आजीनं पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे केशवनं आजीला संपवलं. यानंतर त्यानं वडील, आई आणि बहिणीची हत्या केली. केशवनं घरातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.
आईनं लेकाला मायेपोटी घरी आणलं; नशामुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलानं संपूर्ण कुटुंबाला संपवलं
बुधवारी सकाळी केशव उशिरा उठला. त्यामुळे वडील जवळपास २० मिनिटं त्याला ओरडले. तुझ्याकडे नोकरी नाही. कुटुंबावर ओझं आहेस, अशा शब्दांत वडिलांनी केशवची कानउघाडणी केली. यामुळे केशव नाराज झाला आणि घरातून बाहेर निघून गेला. पोलीस चौकशीत केशव अतिशय थंडपणे उत्तरं देत आहे. आपल्याला कृत्याबद्दल कोणताच पश्चाताप नाही. यामध्ये चूक कुटुंबाचीच असल्याचं केशवनं पोलिसांना सांगितलं.
जंगलात शरीर संबंध ठेवायला लावले, मग फेविक्वीक टाकून संपवले; आता मांत्रिक पोलिसांना म्हणतो…
कुटुंबाला संपवायचं केशवनं मनात ठरवलं होतं. सगळ्यांना विशेषत: वडिलांना निर्घृणपणे संपवायचं ठरवलं होतं असं केशवनं पोलिसांना सांगितलं. वर्षभरापूर्वी माझं प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे मी पूर्णपणे कोलमडलो. त्या दरम्यान कुटुंबातील कोणीही मला आधार दिला नाही. उलट वडील मला ओरडले, अशी माहिती केशवनं पोलिसांना दिली. केशवनं वडिलांना २० वेळा चाकूनं भोसकलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here