नोकरदरांनी समजून घ्या की जेव्हा तुम्ही व्हीआरएस घेता, तेव्हा तुम्हाला गेल्या १८ महिन्यांत जो काही पगार मिळाला आहे, त्याचा ५० टक्के तुम्हाला नोकरीच्या उर्वरित कालावधीसाठी दिला जातो. समजा तुम्हाला दरमहा एक लाख रुपये पगार मिळत असेल, तर उर्वरित पाच वर्षांच्या सेवेसाठी तुम्हाला ३० लाख रुपये दिले जातील. यासोबतच ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी सारखे फायदेही दिले जातील. याशिवाय, सर्व कंपन्यांमध्ये सेवानिवृत्तीनंतरचे वैद्यकीय कव्हर उपलब्ध आहे, जर ते तुमच्या कंपनीत असेल, तर व्हीआरएसनंतर तुम्ही त्यासाठी पात्र आहेत.
पहिले परिस्थितीचे मूल्यांकन करा
व्हीआरएसचा निर्णय घेण्यापूर्वी निवृत्तीच्या वेळी आणि व्हीआरएसच्या वेळी तुम्हाला कोणते फायदे मिळतील याचे मूल्यमापन केले पाहिजे. जर तुम्ही व्हीआरएस घेतला नाही तर तुम्हाला किती बोनस, इन्क्रीमेंट वगैरे मिळेल हे समजून घ्या. यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही व्हीआरएस घ्यायचे की नाही. तुमच्या नोकरीच्या कालावधीत फक्त ५ किंवा 3 वर्षे उरली असतील, तर तुम्ही ती पूर्ण करून योग्य रिटायरमेंट घेणे एक चांगला पर्याय आहे.
भविष्याचे नियोजन करा
लक्षात घ्या की व्हीआरएस घेतल्यानंतर तुमचे उत्पन्न थांबू शकते. व्हीआरएस दरम्यान तुम्हाला, जे पैसे मिळाले आहेत, त्यानेच तुम्हाला तुमचे काम चालवावे लागेल. आपण या परिस्थितीचा ॲडव्हान्स विचार देखील केला पाहिजे. म्हणून, आर्थिक समस्येला तोंड देण्यासाठी, एकतर आधीच दुसरी नोकरी शोधा किंवा व्यवसाय सुरू करा, जेणेकरून तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
गुंतवणुकीसाठी योजना
व्हीआरएस घेण्यापूर्वी तुम्ही इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे कारण उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे किमान १२ महिन्यासाठी पुरेसा निधी असायला हवा जेणेकरून ईएमआय, प्रीमियम इत्यादी तुमचे आवश्यक खर्च भरून निघेल. व्हीआरएस दरम्यान तुम्हाला मिळणारी एकरकमी रक्कम तुम्ही गुंतवू शकता, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्ही एसआयपी, राष्ट्रीय पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस टाइम ठेव, बँक एफडी इत्यादीसारख्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.