मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद राज्यात गेल्या काही दिवसांपासून उमटत आहेत. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आघाडी उघडल्याने राज्याचे राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. अनेकांनी तर राज्यपालांना पदावरून हटविण्याचीही मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोश्यारी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना धोतर असं संबोधलं. ते म्हणाले, ‘त्या दिवशी ते आमचं धोतर बोललं नाही का… कोश्यारी. वय काय, बोलतोय काय, काय चाललंय. राज्यपाल पदावर बसला आहेस म्हणून मान राखतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही.’

राज ठाकरे हे मुंबई आयोजित मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. राज्यपाल कोश्यांरींच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, ते काय बोलून गेले महिन्याभरापूर्वी… म्हणे इथले जर गुजराती आणि मारवाडी जर परत गेले, तर इथे काय होईल. कोश्यारीजी, पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?. तुम्ही उद्योपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना… मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केलात?, का नाही उद्योग थाटलेत? याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापर करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती.’

धक्कादायक! मुंबईत काही हॉटेलांमध्ये विकले जाते कबुतरांचे मांस, निवृत्त आर्मी कॅप्टनने काढले फोटो
महाराष्ट्राचा गौरव करताना राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा… अहो, महाराष्ट्र मोठाच होता हो. मोठाच आहे. हा जेव्हा देश नव्हता तेव्हा या देशाला, या भागाला हिंद प्रांत म्हणत. पर्शिया म्हणजेच नंतरचा इराण, ते लोक या भागाला हिंद प्रांत म्हणत. या हिंद प्रांतावर आजपर्यंत आक्रमणं झाली. त्यात मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले. मोगल तर किती वर्षे होते, ब्रिटिश तर किती वर्षे होते. पण या हिंद प्रांतावर जर खऱ्या अर्थाने कोणी सव्वाशे वर्षे राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहीने केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच ओ. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून नाही ऐकायचे आहे.’

गुजरातमध्ये निवडणूक ड्यूटीवर असलेल्या CRPF जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार, २ जवान शहीद, दोन जखमी
गुजराती, मारवाडी महाराष्ट्र सोडून परत जातील का?- राज ठाकरे

ठाकरे पुढे म्हणाले, ‘… आणि आज जर आपण त्याच गुजराती आणि मारवाडी समाजाला जर सांगितलं की बाबांनो ठीक आहे जा परत, आणि आपापल्या राज्यामध्ये धंदा करा, व्यवसाय करा. ते जातील का? कारण हे जे सभोवतालचं जे वातावरण आहे ना, कारण काही लोकं खराब करत आहेत, केलंही आहे, पण जे सभोवतालचं वातावरण आहे, उद्योगधंद्यासाठीचं जे वातावरण आहे, आजही परदेशातील कोणताही प्रकल्प त्यांना आणायचा असेल तर तो पहिला प्रेफरन्स हा महाराष्ट्र असतो. म्हणून आपण म्हणतो ना की इकडचा प्रकल्प तिकडे गेला. कारण तो इथे आलेला असतो. याचं कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटायचा असतो.’

तुम्हाला गोळ्या घालीन…; सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांचा सिद्धेश्वरच्या संचालकांवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here