नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईच्या घाऊक बाजारात सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. एरवी कडाडणारे टोमॅटो आणि कांद्याचे दर आता अगदीच आवाक्यात आले असून घाऊक बाजारात आठ ते १० रुपयांत किलोभर टोमॅटो मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोची २० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

आवक वाढल्याने दरांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात आले. सध्या घाऊक बाजारात टॉमेटोच्या ४० ते ४५ गाड्यांची आवक होत आहे. मुंबई आणि उपनगरांतील टोमॅटोची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आवक पुरेशी आहे. त्यामुळे दरवाढीवर नियंत्रण आले आहे. सध्या सातारा, पुणे, नाशिकमधून टोमॅटोची आवक होत आहेच, शिवाय बेंगळुरू येथूनही लालबुंद टोमॅटो बाजारात येत आहेत. मात्र हवा तसा उठाव नसल्याने दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai Water News : अर्ध्या मुंबईतील पाणीपुरवठा आज-उद्या विस्कळीत होणार, कारण…

मागील महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ४० रुपये किलोपर्यंत स्थिरावले होते. मात्र हे दर आठ ते १० रुपये किलोवर आल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकखर्च निघत नसल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here