Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2559

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

26

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

30

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

क्रिकेटचा खेळ, चेंडूचा वाद; तरुणाला कोयता आणि लोखंडी गजाने मारहाण

0

पुणे: क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात तरुणाला पाच जणांनी कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ४ जून रोजी ही घटना घडली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

हर्षवर्धन नवनाथ गावडे (वय १९)असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने बारामती पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भूषण संजय गावडे, निखिल संजय गावडे, दीपक ऊर्फ भैय्या अनिल वायसे, अण्णा गोरख हारे आणि विनोद पोपटराव गावडे (सर्वजण रा.गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीचा वाद, न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, लेकाला बघताच आईचा आक्रोश; बारामतीत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षवर्धन गावडे आणि मारहाण करणारे आरोपी हे एकाच गावातील आहेत. सर्वजण जिल्हा परिषद शाळेजवळ क्रिकेट खेळत होते. या वेळी हर्षवर्धनचा इतर पाच जणांशी बॉल टाकण्यावरून शाब्दिक वाद झाला. या वादात भूषणने त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, असे हर्षवर्धन म्हणाला आणि त्याला मारहाण केली.

Pune Crime: तू परत रस्त्यावर दिसली…; बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर गाडी घातली
‘तुझे बऱ्याचदा झाले आहे. तुला चांगलाच हिसका दाखवतो,’असे म्हणत भूषणने घरी जात कोयता आणला. निखिल लोखंडी गज घेऊन आला. भूषणने कोयत्याने डाव्या बाजूस कपाळावर मारले, तर निखिलने डोक्यात गज मारला. अन्य तिघांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच’तुला जिवंत सोडणार नाही,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी हर्षवर्धनला रात्री बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारांनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

Mumbai crime news today Borivali husband murdered wife’s boyfriend; मुंबईत पत्नीच्या प्रियकराची हत्या, बोरीवलीत पतीला अटक

0

मुंबई : पत्नीच्या ३८ वर्षीय प्रियकराची हत्या करुन ठाणे जिल्ह्यातील जंगलात त्याचा मृतदेह पुरला. एक जून रोजी घडलेली ही घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी तरुणाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयत दिनेश प्रजापतीचे आरोपी सुरेश कुमार कुमावत याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे.

कुमावत दाम्पत्य आणि महिलेचा प्रियकर हे मुंबईतील बोरिवलीच्या राजेंद्र नगरमध्ये राहत होते. आरोपी पती सुरेश कुमार कुमावतने दिनेश प्रजापतीला आपल्या बायकोपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता, परंतु त्याने आरोपीला गांभीर्याने घेतले नाही” असे समता नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एक जून रोजी सुरेशने दिनेशला त्यांच्या वस्तीत बोलावून भांडण उकरुन काढले. वाद सुरु असताना सुरेशने दिनेशवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

CCTV : मेट्रो येताना दिसली, नवऱ्याने बायकोला उचललं आणि रुळांवर झोकून दिलं, क्षणार्धातच…
सुरेशने दिनेशच्या डोक्यावर हातोड्याने अनेक वेळा वार केले. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दिनेशचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवर नेला. तिथे त्याने तो जंगलात पुरला,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाच्याने अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलिंगमुळे मामीने जीवन संपवलं; भाचा म्हणतो, तीच मला…
दिनेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना, बोरिवली पोलिसांना दिनेश त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसला, तर आरोपी त्याच्या स्कूटरवर एका पोत्यातून काहीतरी घेऊन जाताना पाहायला मिळाला.

मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

पोलिसांनी सुरेशची कसून चौकशी केली असता त्याने दिनेशचा खून केल्याची कबुली दिली. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह पुरला होता, त्याबद्दलही आरोपीने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेतला.

मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?
आरोपीला अटक करण्यात आली असून कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Moeen Ali returns to England squad; अॅशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली परतला

0

सप्टेंबर २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आता पुन्हा संघात परतला आहे. पहिल्या दोन कसोटींसाठी तो अ‍ॅशेस संघात सामील झाला आहे, असे देशाच्या क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी सांगितले आहे. दरम्यान फिरकी गोलंदाज जॅक लीचला मालिकेतून वगळण्यात आले आहे. ३५ वर्षीय मोईन अलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खेळाच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपापासून दूर पाऊल टाकले होते. परंतु कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि ईसीबीचे पुरुष व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला आहे.

मोईनने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हल येथे भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. त्याने ६४ कसोटींमध्ये २८.२९ च्या सरासरीने २,९१४ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या ऑफ स्पिनने १९५ विकेट्स घेतल्या आहेत. ”आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीला मोईन अलीशी संपर्क साधला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी काही दिवसांचा विचार करून, मोईन अली संघात सामील होण्यासाठी आणि पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे,” असे रॉब की म्हणाले.
WTC Final: सिराजने अशी केली ख्वाजाची शिकार, विराट कोहली आनंदाने मैदानात धावू लागला, पाहा व्हिडिओ

त्याच्या अष्टपैलू क्षमतेसह त्याच्या अफाट अनुभवाचा आमच्या अ‍ॅशेसमोहिमेला फायदा होईल. इंग्लंडच्या सराव कसोटीत आयर्लंडविरुद्धच्या विजयात चार विकेट घेणार्‍या लीचच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आले आहे. त्याची दुखापत हा इंग्लंडच्या गोलंदाजी विभागाला मालिकेतील सर्वात मोठा धक्का आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही संघातून बाहेर काढण्यात आले आहे. १६ जूनपासून एजबॅस्टन येथे अ‍ॅशेसला सुरुवात होणार आहे.

अ‍ॅशेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ:

बेन स्टोक्स (क), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन , जो रूट, जोश टोंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Odisha: Goods train runs over four in Jajpur; four others hurt | Bhubaneswar News

0

BHUBANESWAR: Rakes of a stationary goods train without engine ran over four people killing them on the spot and injured four others at Jajpur Road station on Wednesday evening.
The tragic incident occurred involving a group of labourers who sought shelter beneath the rakes during a sudden rain and thunderstorm. Regrettably, they were unaware of its unexpected movement and got crushed under it.
An official from the East Coast Railway said that for the past few months, a set of rakes without an engine had been stationed on that line. These rakes consist of approximately 30 reserve carriages designated for monsoon emergencies, specifically carrying sand and crushed stone to be used in case of washouts during heavy rains.
Unfortunately, there was a mishap as the rakes unexpectedly rolled down a short distance from their original position probably triggered by a storm, he said.

Viral Video Of Bride Dance Brothers Pour Out A Sack Full Of Notes In Marriage; लग्नात बहिणीच्या डोक्यावर नोटांनी भरलेलं अख्खं पोतं रिकामं केलं

0

शिमला: जेव्हा घरातील मुलीचं किंवा मुलाचं लग्न असतं, तेव्हा कुटुंबीय त्यावर अमाप पैसा खर्च करतात. कुठे शाही लग्न सोहळा आयोजित केला जातो तर कुठे भेटवस्तू म्हणून कोट्यवधींची संपत्ती दिली जाते. लग्नात नवरदेव नवरीवर नोटा उधळताना अनेकांना पाहिलं असेल. पण, काय तुम्ही कधी नवरीवर नोटांनी भरलेलं पोतं उलटवताना पाहिलं आहे का. कदाचित नाही. पण, अशी घटना हिमाचल प्रदेशात घडली आहे.

नववधूच्या डोक्यावर नोटांनी भरलेलं पोतं उलटलं

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरीपार परिसरात लग्नसोहळ्यादरम्यान असा काही प्रकार घडला की, उपस्थित लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथे शटाड गावात नवरदेव-नवरी नाचत असताना नववधूच्या भावांनी नोटांनी भरलेलं पोतं वधूवर उलटवलं. नाटी या विधीच्या वेळी गाव, कुटुंब आणि नातेवाईकांकडून नवविवाहित जोडप्याला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, अशा प्रकारे नवरीवर नोटांचा वर्षाव व्हावा, असा प्रकार येथे पहिल्यांदाच घडला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात लोक कमेंट करत आहेत.

Mumbai Crime: मुंबईत वसतिगृहातील खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, सुरक्षारक्षकाची ट्रेनसमोर उडी
पाहा व्हिडिओ –

सिरमौर जिल्ह्यातील गिरिपार हाटी परिसर हा समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. यासोबतच तेथील प्रथा-परंपराही चर्चिल्या जातात. गिरीपार परिसरात हुंडा देण्याची पद्धत नाही. कोणत्याही प्रकारचा रोख व्यवहार येथे कोणत्याही परिस्थितीत वैध मानला जात नाही. त्यामुळे नववधूवर अशा प्रकारे नोटांचा वर्षाव करणे हा चर्चेचा विषय बनला आहे.

Pune Crime: मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग…
पण, तिथल्या परंपरेनुसार नाटी या विधीदरम्यान कुटंब-नातेवाईक आणि गावातील लोक भेट म्हणून नवदाम्पत्याला पैसे देतात. शटाड गावातील नववधूवर नोटांनी भरलेलं पोतं उधळल्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

Unlocking job readiness: Key strategies to prepare students for career success

0

In today’s highly competitive market, students need to be equipped with the necessary skills and qualities to succeed in their careers. To make students future ready, there are several key insights to consider.
Firstly, practical experience is crucial. Training programs, job consultancy, and production development into the curriculum can provide students with valuable real-world exposure.
Secondly, designing an industry-relevant curriculum is essential. Staying updated with current industry trends and incorporating relevant topics and technologies into the coursework prepares students for the challenges they will face in the workplace. Collaboration with industry experts and professionals can provide valuable insights into industry expectations.
“In addition to building a standardised IT and training company for everyone. Educators, dedicated students, academic partnerships, skills, and industry partnerships have helped it become a center for aspect training.” said director admin of CETPA Vikas Kalra.
“Corporate training, technical Courses, HR Consultancy, help students understand the market and make informed career choices. Mentors can offer valuable insights, advice, and industry connections, enhancing students’ chances of securing suitable job opportunities,” said Vikas.
By implementing these strategies, educational institutions can play a significant role in making students ready for their success. Equipping students with practical experience, an industry-relevant curriculum, soft skills, career guidance,and a commitment to lifelong learning sets them on the path to success in their future careers.

अबोल स्वभाव, ना कोणाच्या अध्यात ना मध्यात; भावी डॉक्टरनं मरण जवळ केलं; बंद खोलीत काय घडलं?

0

हैदराबाद: तेलंगणाच्या खम्मममध्ये समुद्राला मनासा नावाच्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं आहे. ती बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होती. खम्मममधील ममता मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. कॉलेजच्या जवळ असलेल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मनासानं तिच्या खोलीत केली. अंगावर पेट्रोल टाकून तिनं स्वत:ला पेटवलं. हॉस्टेलमध्ये आग लागताच विद्यार्थी घाबरले. त्यांनी याची माहिती हॉस्टेल प्रशासनाला दिली.मनासा सहसा विद्यार्थ्यांमध्ये मिसळायची नाही. तिचा स्वभा अबोल होता. सोबत शिकणाऱ्या कोणासोबतच ती काहीही शेअर करायची नाही, असं तिच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. मनासाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हा प्रकार आत्महत्येचाच असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसानी परिसरात असलेले सीसीटीव्ही तपासले. एका फुटेजमध्ये मनासा जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल आणताना दिसत आहे. मनासाची खोलीदेखील आतून बंद होती. त्यावरुन हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मनासानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिसांना तिच्या रुममध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मनासानं स्वत:ला पेटवून घेतलं, त्यावेळी बाकीचे विद्यार्थी शेजारच्या खोलीत होते. मनासा स्वभावानं शांत होती. ती फारशी कोणाशीच बोलायची, कधी काही शेअर करायची नाही, असं तिच्यासोबत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. मनासानं आत्महत्या केली. यामध्ये संशय घेण्यासारखं काही नाही. तपासातून ही बाब स्पष्ट झाली आहे, असं खम्ममचे पोलीस आयुक्त विष्णू एस. वॉरियर यांनी सांगितलं. ‘तिनं स्वत:चं पेट्रोलची बाटली आणली. दार आतून लावलं. त्यावेळी तिची बॅग आणि मोबाईल खोलीतच होता. तिच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण, रॅगिंग किंवा अभ्यासाचा ताण अशा कोणत्याच गोष्टींमुळे तिनं आत्महत्या केल्याचं मोबाईलमधून डेटामधून समोर आलेलं नाही. तसा कोणताच पुरावा तिच्या मोबाईलमध्ये सापडलेला नाही,’ असं वॉरियर म्हणाले.

Mumbai Hostel Murder : मजल्यावर मुलगी एकटीच का? पीडितेच्या आईशी भेट, मिटकरी आक्रमक

0

मुंबई: मरीन ड्राइव्ह परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील २० वर्षीय मुलीचा खुन केल्याची घटना उघडकीस आली होती. मुलीचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आल्याने अतिप्रसंगाचा संशय व्यक्त करण्यात येत होता . या घटनेनंतर वसतीगृहाचा सुरक्षारक्षक गायब असल्याने त्याच्यावर मुलीच्या खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, चर्नी रोड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह मिळाल्याने या प्रकरणातील गूढ वाढले होते. पोलिसांच्या तपासणीनंतर तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.Crime: ट्रेनचं तिकीटही काढलं होतं, पण घरी जायची इच्छा अधुरीच, मुंबईच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची वॉचमनकडून हत्या
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या मुलीला एकटीलाच वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर का ठेवण्यात आले होते असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच जो पर्यंत वसतिगृहातील महिला अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुळीच मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शासकीय वसतिगृहातच खुनाची घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. महिला व बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसतिगृहाला भेट दिली.

जर कोणाला वाचविण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल:

विरोधकांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पीडितेच्या आई वडिलांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. ” जर राज्यातील शासकीय वसतिगृहातच मुली सुरक्षित नसतील तर राज्यतील शासन, प्रशासन नेमकं काय करतेय. तसेच मंत्री विस्ताराच्या नादाला लागलेले हे सरकार शासकीय वसतिगृहातच मुली सुरक्षित नसतील तर या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime : मुंबईत तरुणीची हत्या; एकुलती एक मुलगी होती, पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर, महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
मी पीडित मुलीच्या आई वडिलांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणे आहे की, मुलीने मला वसतिगृहाच्या चौथ्या माळ्यावर राहायचे नाही अशी वारंवार विनंती वसतिगृहाच्या वार्डनना केली होती. इथला सुरक्षारक्षक मला वारंवार त्रास देतोय अशी तक्रार देखील मुलीने केली होती. मात्र, आमच्या मुलीच्या कुठल्याही विनंतीची दखल शासकीय वसतिगृहात घेतली गेली नाही. त्यामुळेच आमच्या मुलीचा जीव गेला आहे, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांचा असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

या वसतिगृहाच्या वॉर्डन जे कोणी असतील, ज्यांना सरकारने पाठीशी घातलं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मिटकरींनी केली. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, तसेच आरोपीला कठोर शासन झाले पाहिजे या साठी आम्ही सर्वजण आवाज उठवणार आहोत. याबरोबरच आगामी अधिवेशनात याचे भक्कम मोठे परिणाम दिसून येतील, असे म्हणत मिटकरींनी सरकारला इशारा दिला आहे.

​Budget Tablets : कॉलिंगची सुविधा, दमदार फीचर्स आणि किंमत २० हजार पेक्षा कमी, पाहा ‘हे’ ८ बेस्ट टॅब्लेट्स – best budget tablets under 20 thousand rupees know details

0

​Lava Magnum XL Wi-Fi+4G Tablet (किंमत ९,९९९ रुपये)

lava-magnum-xl-wi-fi4g-tablet-

या यादीतील पहिला टॅब हा लावा कंपनीचा मॅग्नम XL टॅबलेट आहे, जो 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मेमरीसह येतो. मेमरी कार्डद्वारे 256 GB पर्यंत याची मेमरी वाढवता येते. तर १०.१ इंच HD स्क्रीनसह येणाऱ्या या टॅबचं डिस्प्ले रिझोल्यूशन 1280×800 पिक्सेल आहे. हा टॅब कॅमेरासह आहे, त्यापैकी फ्रंट कॅमेरा २ मेगा पिक्सेल आणि बॅक कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. यात 6100 mAh लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. हे Wi-Fi व्यतिरिक्त 4G नेटवर्कवर देखील हा काम करतो यामध्ये व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​Nokia T10 Android 12 Tablet (किंमत १२,४९९ रुपये)

nokia-t10-android-12-tablet-

​नोकिया कंपनीचा हा T10 टॅबलेट आहे. जो ८ इंच HD डिस्प्ले स्क्रीन सह येतो. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मेमरी आहे. हा Wi-Fi व्यतिरिक्त ४जी नेटवर्कवर देखील कार्य करते. यामध्ये व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. यात ८ मेगापिक्सलचा रेअर आणि २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

realme Pad Mini WiFi+4G Tablet (किंमत १३,९९९ रुपये)​

realme-pad-mini-wifi4g-tablet-

रिअलमी कंपनीचा Realme Mini WiFi+4G टॅबलेट या यादीत असून यामध्ये 4GB RAM सह 64GB मेमरी आहे. यात UNISOC T616 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा टॅब Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ८.७ इंचाची फुल एचडी डिस्प्ले स्क्रीन 1340×800 पिक्सेल रिझोल्यूशनसह देण्यात आली आहे. 6400mAh बॅटरी या टॅबमध्ये असून 8 MP प्रायमरी कॅमेरा आणि 5 MP सेल्फी कॅमेरा यात आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​Lenovo Tab K10 FHD (किंमत १५,४९९ रुपये)

lenovo-tab-k10-fhd-

हा लेनोवो कंपनीचा K10 टॅब आहे ज्यामध्ये वाय-फाय आणि 4जी कॉलिंग व्यतिरिक्त व्हॉईस कॉलिंग देखील आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मेमरी आहे. ज्याला 256 GB पर्यंत वाढवता येऊ शकतं. यात 400 nits ब्राइटनेससह १०.३ इंच फुल एचडी डिस्प्ले स्क्रीन आहे, ज्याचे रेझोल्यूशन 1920×1080 पिक्सल आहे. हे Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यातही बॅक कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

​​Oppo Pad Air Wi-Fi Only Tablet (किंमत १५,९९९ रुपये)

oppo-pad-air-wi-fi-only-tablet-

ओप्पोचा हा Oppo Pad Air Wi-Fi Only Tablet १०.३६ इंच स्क्रीनसह येणारा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मेमरीसह येतो. हा टॅब 2000×1200 पिक्सल रिझोल्यूशनसह येत असून स्नॅपड्रॅगन 680 8 कोर 6nm प्रोसेसर आणि 18W चार्जरसह 7100 mAh बॅटरीसह येतो. पण यात कॉलिंग सुविधा नसून फक्त वाय-फायचा पर्याय देण्यात आला आहे.

​वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

​Redmi Pad Wi-Fi (किंमत १६,९९९ रुपये)

redmi-pad-wi-fi-

रेडमी कंपनीता हा देखील फक्त वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह येणारा टॅब आहे. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मेमरी आहे. यात 2K रिझोल्यूशन (2000×1200 पिक्सेल) आणि 90Hz रिफ्रेश रेटसह १०.६१ इंच डिस्प्ले स्क्रीन आहे. यात MediaTek Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात 8000 mAh दीर्घकाळ चालणारी बॅटरी असून पुढे आणि मागे ८ मेगा पिक्सलचा कॅमेरा आहे.

​​वाचाः Samsung Galaxy F54 5G ची ९९९ रुपयात बुकिंग, थेट २ हजाराची सूट

​Motorola Tab (WiFi+LTE Calling) (किंमत १९,७९९ रुपये)

motorola-tab-wifilte-calling-

हा मोटोरोला टॅब आहे जो WiFi+LTE म्हणजेच कॉलिंग वैशिष्ट्य देखील आहे. यात MediaTek Helio G90T ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मेमरी आहे. यात 2000*1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह ११ इंच 2K FHD IPS डिस्प्ले आहे. यात 13 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसंच बॅटरी 7700 mAh इतकी असून साऊंडसाठी डॉल्बी अॅटमॉस फीचर आहे.
​वाचा : iOS 17 Update ने आयफोनचा चेहरामोहरा बदलणार, १० खास फीचर्सनी फोन होणार आणखी खास

​Samsung Galaxy Tab A8 Wi-Fi Tablet (किंमत १७,९९९ रुपये)

samsung-galaxy-tab-a8-wi-fi-tablet-

सॅमसंग कंपनीचा ​Samsung Galaxy Tab A8 Wi-Fi Tablet या यादीत असून हा देखील फक्त वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह येतो. यात १०.५ इंच डिस्प्ले स्क्रीन आहे, जिचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मेमरीसह येते. याची स्क्रीन रेझोल्यूशन 1920×1200 पिक्सेल आहे. याचा फ्रंट कॅमेरा ५ मेगा पिक्सेल आणि बॅक कॅमेरा ८ मेगा पिक्सेल आहे. यात 7040 mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टॅब वाय-फाय + एलटीई मॉडेलमध्ये समान मेमरी पर्यायासह देखील येतो. ज्याची किंमत थोडी जास्त आहे.

वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

Chief Ministers Swachh Mumbai WhatsApp Helpline launched; मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईनचा शुभारंभ

0

मुंबई: नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ (8169681697) चा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे बंदरे विकास व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हाटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रणालीसाठी महापालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबईकरांना अपेक्षित मुंबई करण्याचं काम आमच्या सरकारमार्फत केलं जात असून त्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्यामाध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे.

मुंबईत सुशोभिकरणाचे ११५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृष्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळिवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Kolhapur Curfew: देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले
नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महापालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाईन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रीज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

कोल्हापुरातील राड्याचा मास्टरमाईंड कोण?, छडा लागलाच पाहिजे; अजित पवारांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाईनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे. घनकचरा व डेब्रीज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाईनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ऍप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.

Latest posts