Monday, March 27, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2182

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

178

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

TV actress Nyrra Banerjee spotted partying with SRK’s son Aaryan Khan, see pics

0

TV stars Nyrra Banerjee and Roshni Walia were spotted at a party attended by Shah Rukh Khan‘s son Aaryan Khan. Nyrra shared an Instagram video of Aaryan taking pictures with those who were present. Aryan was dressed casually for a party.
Nyrra shared the video to congratulate Aaryan Khan. It was uncertain what party it was as of yet, it was hosted by Shaza Morani, and the attendees seemed to have had a good time. Check out the video.

Nyrra was last seen in the show Pishachini playing the lead role in the show. The actress gained popularity with her show Divya Drishti which starred Sana Sayad and Adhvik Mahajan in lead roles. The party also had Tara from Satara actress Roshni Walia, looking at her recent pictures, the actress underwent an impressive transformation.
Earlier in an exclusive conversation with ETimes TV, Nyrra had opened up about why she doesn’t fear getting typecast anymore. She said, “Earlier I was scared of being typecast when I was doing Telugu films and in every scene, I was shown as the ‘Ghar ki bahu.’ Down South, they do not imagine me in anything but a saree, which is very traditional. In Bollywood, they’ve always seen me as this glamorous and pretty-looking, hot, who can just be dolled up. I have stopped bothering about being typecast. My first show had all the traits. I was a biker chick, a college chick, and an Indian. I was elegant wearing sarees, and salwar suits, I had all of it.”

She further added, “I’m so grateful for Divya Drishti that I can play any kind of character in any attire. I don’t think they will typecast me. But, in Excuse Me Madam, this role is about the boss. Now, she’s not going to wear a saree in the office. But, I will have scenes outside, where I will wear a saree or salwar or something else. The main focus should be on doing your art well and not getting typecast.”

jayant patil, अधिवेशन संपताच जयंत पाटील पक्ष बांधणीच्या कामाला, राष्ट्रवादीचा पुन्हा परिवर्तनाचा निर्धार – ncp jayant patil campign north maharashtra after maharashtra budget session 2023

0

नंदुरबार : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…’ या दौऱ्याला सुरुवात केली. अधिवेशन संपताच जयंत पाटील पक्ष बांधणीच्या कामाला लागले.

राज्यात परिवर्तनाचा निर्धार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरेंचा सैनिक गेला, पैशाविना मृतदेह रुग्णालयात पडून, CMO मधून फोन, क्षणात सूत्रं फिरली
सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपने राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारले, अजितदादा खवळले, सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापले!
दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली. शहादा येथे घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rathi Murder Case In Pune Supreme Court Orders Release Of Death Row Convict After Finding He Was Child At Time Of Crime 28 Years After Murder 

0

नवी दिल्ली: पुण्यातील गाजलेल्या राठी मर्डर केसमध्ये (Rathi Murder Case Pune) एक मोठी अपडेट आली आहे. गुन्हा ज्यावेळी घडला होता त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता हे सिद्ध झाल्यानं न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी असं या आरोपीचं नाव असून त्याने 28 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. आज त्या आरोपीला सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी नारायण चेतनराम चौधरी हा या गुन्ह्याच्या वेळी केवळ 12 वर्षांचा असल्याने त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आरोपी हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा योग्य असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर सोमवारी आरोपीला सोडण्याचे आदेश दिले.

नारायण चेतनराम चौधरी याने या प्रकरणात 28 वर्षे शिक्षा भोगली आहे. 1994 साली पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका गर्भवती स्त्रीचा समावेश होता. 

हा खटला सुरू असताना आरोपी नारायण चेतनराम चौधरी याचं वय 20 ते 22 असल्याचं नोंद करण्यात आलं होतं. त्या खटल्यात आरोपी चौधरी आणि त्याच्या दोन साथिदारांपैकी एक साथिदार जितेंद्र गेहलोत याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. जितेंद्र गेहलोतची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलण्यात आली. नारायण चौधरीने आपला दयेचा अर्ज मागे घेतला आणि गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली.

news reels reels

नारायण चौधरीचे राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्मदाखल्याची नोंद तपासण्यात आली. त्यामध्ये तो अल्पवयीन होता हे सिद्ध झालं. पण तो त्याचे वय सिद्ध करू शकला नाही कारण हा गुन्हा महाराष्ट्रात घडला होता आणि महाराष्ट्रात त्याने केवळ दीड वर्षे शिक्षण घेतलं होतं.

जानेवारी 2019 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना चौधरी याचे वय तपासण्याचे निर्देश दिले. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अहवाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आरोपी गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याचं सांगत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. 

ही बातमी वाचा :

latur accident, लग्नासाठी पुण्याला गेले, माघारी येताना भरधाव वेगानं घात, कारवरील नियंत्रण सुटलं, चिमुकल्यांसह चार जण ठार – latur car accident due to extra speed and driver lost control four died three injured

0

लातूर : जिल्ह्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. लातूरमधील औसा निलंगा मार्गावर कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मेहुण्याच्या लग्नाला गेल्या कुटंबावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. यामधे नवरदेवाच्या भावासह तीन भाच्यांचा समावेश आहे. हा अपघात निलंगा जवळ घडला.

निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर यांच्या मेहुण्याचे पुण्याला लग्न होते. त्यासाठी ते सहकुटुंब पुण्याला गेले होते. आज सकाळी ते पुण्याहून कारने घरी परत येत असताना निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ कारचा भीषण अपघात झाला. कारच्या भरधाव वेगामुळे सचिन बडूरकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात चालक सचिन बडूरकर यांचे दोन मुले एक पुतण्या आणि नवरदेवाचा सख्खा भाऊ ( सचिन बडूरकर यांचा मेहुणा) घटनास्थळीच ठार झाले. तर त्यांची मुलगी तसेच पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार करण्यात येत आहेत. सचिन बडूरकर आणि त्यांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! अदानी समूहात गुंतलाय तुमच्या कष्टाचा पैसा, जाणून घ्या तपशील

घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर निलंगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची किल्लारी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले

आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील औसा – निलंगा रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं आहे. अपघातातील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले. बडूरकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना! करत असल्याचं ट्विट धीरज देशमुख यांनी केलं.

बाळासाहेबांचा तो फोटो दाखवत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज; सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरलं!

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले – in jalgaon a family was cheated of 22 lakhs by luring them with a job in mantralaya and railway

0

जळगाव : मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार, २६ मार्च रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यादरम्यान संबंधितांनी नोकरीच्या ऑर्डरही दिल्या, मात्र त्या बनावट असल्याचे समोर आले आहे.रामानंदनगर पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. दिघोळे हे युनायटेड इंन्शुरन्स कंपनीत नोकरीला आहेत. धुळे येथे राहणारा त्याचा मित्र चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी त्यांची १५ वर्षापासून ओळख आहे. त्यानुसार प्रविणचंद दिघोळे यांचा मुलगा राजकुमार दिघोळे याला मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी लावून देतो. आमची मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांशी ओळख असे सांगून ओसवाल भावडांनी दिघोळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार सुरुवातीला मंत्रालयात मोठ्या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत ओसवाल भावडांनी २२ लाख रुपये द्यावे लागतील असे प्रवीणचंद दिघोळे यांना सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी सुरुवातीला १० मे २०१८ रोजी शिवकॉलनी येथे घरी ९ लाख रूपये दिले.

परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू
मंत्रालयातील नोकरीची बनावट ऑर्डर दिली

यावेळी ओसवाल भावडांनी उर्वरित पैसे लवकर द्यायला सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी २७ मे २०१८ रोजी पुन्हा ७ लाख रूपये दिले. दरम्यान, नोकरीसाठी जॉईनिंग ऑर्डरची दिली नाही म्हणून ओसवाल बंधुंना फोन केला असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होते. याप्रकारे त्यांनी तब्बल दोन वर्षे टाळाटाळ केली. यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा दिघोळे यांच्या घरी आला. त्याने मंत्रालय मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जावू व जॉईनिंग करु असे सांगितले. त्यानुसार दिघोळे दाम्पत्य मुंबईला गेले. मात्र याठिकाणी साहेब आजारी असल्याचे सांगत ओसवाल यांनी साहेबांशी भेट घडवून आणली नाहीय. त्यामुळे दिघोळे पुन्हा घरी आले.

बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक
नोकरी न लागल्याने पैशांची मागणी केली, चेक दिलेही, मात्र ते वटलेच नाहीत

त्यानंतर मुंबईला चंद्रभान ओसवाल आणि त्याचा मित्र हरताली प्रसाद रोहिदास यांनी मुलाला रेल्वे ज्युनीयर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देतो, असे सांगत यासाठी आणखी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी हरताली प्रसाद यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रक्कम ट्रान्सफर केली. अशा पध्दतीने ज्युनीयर इंजिनिअर पदाचीही खोटी ऑर्डर संबंधितांनी दिली.

अशा पध्दतीने दिघोळे यांनी वेळोवेळी ओसवाल भावंड व हरताली प्रसाद रोहिदास या दोघांना एकूण २२ लाख रुपये दिले. प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. दिघोळे यांनी संबंधितांनी आम्हाला आमचे पैसे परत करा अन्यथा नोकरीची ऑर्डर द्या असे सांगितले. चंद्रभान ओसवाल याने वेगवेगळ्या रकमांचे चेक दिले. मात्र हे चेक वटले नाहीत. चेकचा अनादर झाला.

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
शेवटी ओसवाल भावंडे व हरताली या तिघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर प्रविणचंद दिघोळे यांनी रविवार, २६ मार्च रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पेालीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चंद्रभान जवरीलाल ओसवाल, अनिल जवरीलाल ओसवाल आणि हरताली प्रसाद रोहिदास (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

SC notice to Centre, Gujarat govt on Bilkis Bano’s plea against remission to convicts | India News

0

NEW DELHI: The Supreme Court on Monday issued a notice to Centre and Gujarat government on a plea filed by Bilkis Bano challenging the remission of the sentence of 11 convicts in the gang-rape case.
The apex court directed the Gujarat government to be ready on April 18 with relevant files. During the hearing, the bench of Justices K M Joseph and B V Nagarathna observed that it would not be overwhelmed by emotions in the case and would only go by the law.
Last week, Chief Justice D Y Chandrachud had agreed to constitute a new bench to hear the pleas.

Bano was 21 years old and was five months pregnant when she was gang-raped and her three-year-old daughter was among the seven of family members who were murdered. The petitions against the release of convicts was earlier taken on January 4 by a bench of Justices Ajay Rastogi and Bela M Trivedi but Justice Trivedi recused from hearing the case, following which the CJI had to assign the case to a new bench.
A batch of petition was filed in the apex court by social activists and politicians soon after all the 11 convicts were granted remission by the Gujarat government, and were released on August 15 last year.
The pleas were filed by the National Federation of Indian Women, whose general secretary is Annie Raja, CPM MP Subhashini Ali, journalist Revati Laul, social activist and professor Roop Rekha Verma and TMC MP Mahua Moitra. Bano too moved the apex court in November, challenging their release.

ceo dies in accident, सीफेसवर जॉगिंग करताना CEOचा अपघाती मृत्यू; आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला; महत्त्वाची माहिती उघड – mumbai joggers road accident blood reports of accused show alcohol content

0

mumbai joggers road accident: मुंबईच्या वरळीत जाँगिग करतेवेळी चेक कंपनीच्या सीईओचा अपघाती मृत्यू झाला. कारच्या धडकेत सीईओचं निधन झालं. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

 

ceo dies
मुंबई: वरळी सीफेसवर सकाळी जॉगिंग करण्यासाठी गेलेल्या सीईओचा अपघाती मृत्यू झाला. १९ मार्चला ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सुमेर धर्मेश मर्चंटला अटक केली. सीईओ राजलक्ष्मी रामकृष्णन यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. अपघातावेळी कार चालवत असलेला मर्चंट मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती तपासातून उघडकीस आली आहे. मर्चंटनं दादरमधील दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अपघातानंतर पोलिसांनी मर्चंटच्या रक्ताचे नमुने घेतले. अपघातावेळी मर्चंट दारुच्या अमलाखाली होता हे नमुन्यांच्या चाचणीतून स्पष्ट झालं. ‘अमेरिकेतून परतल्यामुळे जेट लॅग होता. झोप पूर्ण झाली नव्हती. अपघात होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच मी अमेरिकेहून आलो होतो,’ असं मर्चंटनं पोलिसांना सांगितलं आहे. अमेरिकेतून परतल्यानंतर मर्चंटनं शनिवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत ताडदेवच्या घरी पार्टी केली. रात्रभर पार्टी सुरू असल्यानं मर्चंट झोपला नव्हता, असा जबाब पोलिसांकडे आहे. मर्चंटच्या कारनं पुढच्याच दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी राजलक्ष्मी रामकृष्णन यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
यातूनही वाचलास तर फास लाव! प्रियकराला विष देऊन प्रेयसीचा कॉल; तो अखेरच्या घटका मोजत राहिला
‘आम्ही मर्चंटला अपघाताच्या दिवशीच नायर रुग्णालयात नेलं. त्यानं मद्यपान केलं होतं का ही गोष्ट तपासून पाहण्यात आली. मात्र त्यावेळचा रिझल्ट निगेटिव्ह होता. त्याची देहबोली सामान्य वाटत होती. त्याच्या बोलण्यातूनही काहीचं वावगं जाणवत नव्हतं. कदाचित त्यानं अपघाताच्या बऱ्याच तासांपूर्वी मद्यसेवन केलं असावं. त्यामुळेच ब्रेथलायझर चाचणीत मद्यसेवनाची माहिती दिसली नसावी,’ असं वरळी पोलीस दलातील सुत्रांनी सांगितलं.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

मर्चंटच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने जे जे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल शनिवारी रात्री आला. मर्चंटच्या रक्तात मद्याचं प्रमाण जास्त असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं. ‘आरोपी अपघातावेळी दारुच्या अमलाखाली नसेल, पण त्याच्या शरीरात मद्याचं प्रमाण आढळून आलं आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध उभा राहणारा खटला मजबूत असेल,’ अशी माहिती सुत्रांनी दिली. अमेरिकेतून परतल्यानंतर झोप पूर्ण न झाल्यानं आणि जेट लॅगमुळे अपघात झाल्याचं मर्चंट वारंवार सांगत असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

best 5g smartphone, 5G स्मार्टफोन कसा असावा?, फक्त या १० पॉइंट्समधून समजून घ्या – buy best 5g smartphone know 10 points deatils here

0

तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे फोन ५जी असायला हवा. परंतु, ५जी फोनच्या नावाने कोणताही फोन खरेदी करणे योग्य नाही. आज बाजारात बजेट सेगमेंट मध्ये ५जी फोन आले आहेत. परंतु, त्यात बेस्ट ५जी फोन कोणता आहे, असा प्रश्न उपस्थित राहतो. अनेक जण बेस्ट 5G फोन असल्याचा दावा करीत आहेत. परंतु, त्यात खरा 5G फोन कोणता आहे. असा प्रश्न पडतो. तुम्हाला जर ५जी फोन संबंधी जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणी १० पॉइंट्स देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

सर्वात जास्त ५जी बँड सपोर्ट
प्रोसेसर फॅब्रिकेशन
हीट डिस्पेशन सिस्टम
UFS मेमरी
कमीत कमी 8GB रॅम
मोठी बॅटरी
हाय रिझॉल्यूशन स्क्रीन
90 किंवाा 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट
फास्ट चार्जिंग
डॉल्बी इंटीग्रेशन

​जास्तीत जास्त ५जी बँड सपोर्ट

​जास्तीत जास्त ५जी बँड सपोर्ट

भारतात 5G सर्विससाठी सध्या जिओ आणि एअरटेलने घोषणा केली आहे. जिओ आणि एअरटेलची ५जी सर्विस काही शहरात सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलकडे ५जी सर्विससाठी 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100 MHz (n1), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) बँड आहे. तर कंपनी ५ जी सर्विससाठी एन८ आणि एन ३ बँडचा उपयोग करीत आहे. तर Jio 5G bands कंपनीकडे 700 MHz (n28), 3300 MHz (n78) शिवाय, 26 GHz (n58) बँड आहे. कंपनी एन २८ आणि एन ७८ बँडचा वापर करीत आहे.

​वाचाः Airtel 5G : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं

​प्रोसेसर फॅब्रिकेशन

​प्रोसेसर फॅब्रिकेशन

आतापर्यंत तुम्हाला सांगितले जाते की, तुम्ही कोणत्या फोनची निवड करता त्यावर प्रोसेसर आणि स्पीड जास्त मिळते. परंतु, फोनची निवड अशी करा ज्याचा प्रोसेसर फॅब्रिकेशन जास्त आहे. आज बाजारात ४ नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसर वर तयार प्रोसेसर सोबत फोन येत आहेत. तुम्हाला जर फोनची निवड करायची असेल तर कमीत ७ नॅनोमीटर फॅब्रिकेशनचा फोन खरेदी करा. या ५ जी फोनमध्ये बऱ्यापैकी स्पीड मिळते.

​वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स

​हिट डिस्पेशन सिस्टम​

​हिट डिस्पेशन सिस्टम​

तुम्ही ५जी फोन खरेदी करायचा प्लान करीत असाल तर त्यावर इंटरनेट ब्राउजिंग सोबत ऑनलाइन गेमिंग आणि हेवी अॅप्सचा वापर कराल. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये हीट डिस्पेशन आणि वेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स असायला हवेत. यामुळे इंटरनेटचा वापर ऑनलाइन गेमिंग दरम्यान प्रोसेसर गरम होतो. हीट डिस्पेशन आणि वेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स तापमानाला मेंटेंन ठेवते व फोनचा परफॉर्मन्स कायम ठेवतात.

​वाचाः ठरलं! Nothing Phone (2) लवकरच भारतात लाँच होणार, पाहा संभावित फीचर्स

​UFS मेमरी

ufs-

फोनमध्ये फास्ट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जितकी गरजेचे प्रोसेसर आणि रॅम टेक्नोलॉजी आवश्यक आहे. तितकेच आवश्यक फ्लॅश मेमरी किंवा इंटरनल मेमरी टेक्नोलॉजी आवश्यक आहे. जर तुमच्या मेमरी मध्ये यूएफएस सपोर्ट असेल तर आणखी उत्तम. बाजारात ४.० यूएपएसचे फोन आहेत. परंतु, जर तुम्ही ३.० किंवा ३.१ यूएफएस फोन खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी ते चांगले आहे.

​वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

रॅम आणि बॅटरी

रॅम आणि बॅटरी

८ जीबी रॅम
तुमचा ५जी फोन कमीत कमी ८ जीबी रॅमचा असायला हवा. कारण, ५जी फोनमध्ये फास्ट नेटवर्क स्पीडला प्रोसेस करण्यासाठी जास्त मेमरीचा उपयोग होतो. त्यमुले ४जी आणि ६ जीबी सोबत समस्या येवू शकते. त्यामुळे ५जी फोन कमीत कमी ८ जीबी रॅमचा असायला हवा.

मोठी बॅटरी

५जी फोन मध्ये बॅटरी वेगाने कमी होते. ४५०० एमएएच क्षमते पेक्षा जास्त बॅटरी असायला हवी. ५००० एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम आहे.

​वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स

​फास्ट चार्जिंग​

​फास्ट चार्जिंग​

९० किंवा १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट
जर तुम्ही ५जी फोन खरेदी करीत असाल तर तुम्ही कमीत कमी ९० हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटचा फोन खरेदी करा. उलट १२० किंवा १४४ हर्ट्जचा रिफ्रेश रेट असेल तर आणखी उत्तम. फास्ट स्क्रॉलिंग तुम्हाला अडथला निर्माण करणार नाही.

फास्ट चार्जिंग
फोनमध्ये फास्ट चार्जिंग असणे सुद्धा गरजेचे आहे. ५जी फोनमध्ये बॅटरी वेगाने संपत असते. इंटरनेट चालवणे किंवा ऑनलाइन गेमिंग मध्ये बॅटरी कधी कमी होते कळत नाही. त्यामुळे फोनमध्ये फास्ट चार्जिंग आवश्यक आहे. ४४ वॉट किंवा त्यापेक्षा जास्त फास्ट चार्जिंग असेल तर चांगले आहे.

डॉल्बी इंटिग्रेशन
डॉल्बी खास करून साउंड टेक्नोलॉजीसाठी ओळखले जाते. जर ५जी फोन खरेदी करीत असाल तर मोठी डिस्प्ले आणि सुपर फास्ट इंटरनेट सोबत साउंट टेक्नोलॉजीवर लक्ष द्यायला हवे. फोनचा इंटरनेट मेंट किंवा ओटीटी आणि गेमिंगसाठी डॉल्बी इंटिग्रेशन आवश्यक आहे.

​वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

shikhar dhawan, वयाच्या १४-१५ वर्षीच HIV टेस्ट केली, खूप घाबरलो होतो; शिखर धवननं सांगितला ‘मनाली’चा किस्सा – shikhar dhawan took hiv test when he was 14 15 years old after manali trip

0

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज असलेल्या शिखर धवननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खेळापासून वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. लग्न, घटस्फोट अशा अनेक घडामोडींवर तो मनमोकळपणानं बोलला. १४-१५ वर्षांचा असताना एचआयव्ही टेस्ट केली होती, असंही त्यानं सांगितलं. या टेस्टमागचं कारणदेखील गब्बरनं सांगितलं. गब्बर नावानं प्रसिद्ध असलेल्या शिखर धवननं आज तक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी धवन त्याच्या टॅटू प्रेमावर भरभरून बोलला. ‘मी पहिला टॅटू पाठीवर काढला होता. त्यावेळी मी १४-१५ वर्षांचा होतो. मी मनालीला फिरायला गेलो होतो. घरच्यांना न सांगताच मी पाठीवर टॅचू काढून घेतला होता,’ अशी आठवण धवननं सांगितली.
सीफेसवर जॉगिंग करताना CEOचा अपघाती मृत्यू; आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला; महत्त्वाची माहिती उघड
‘मी जवळपास ३ ते ४ महिने कुटुंबातील कोणालाच टॅटूबद्दल सांगितलं नाही. माझ्या बाबांना टॅटूविषयी समजलं. त्यानंतर मला त्यांनी बेदम मारलं. टॅटू काढल्यानंतर मी घाबरलो होतो. टॅटू काढणाऱ्यानं त्या सुईचा वापर आणखी किती टॅटू काढण्यासाठी केला असेल याबद्दल मी अनभिज्ञ होतो. त्यामुळे मी एचआयव्ही चाचणी केली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह यावा अशी प्रार्थना मी करतो,’ असा किस्सा धवननं सांगितला.

धवननं त्याच्या पहिल्या टॅटूची कहाणी सांगितली. ‘मी पाठीवर विंचू काढला होता. काहीतरी वेगळं करायचं हाच विचार त्यावेळी माझ्या मनात होता. त्यानंतर मी त्याच्यावर डिझाईन काढली. पुढे मी हातावर भगवान शंकराचा टॅटू काढला. अर्जुनचाही टॅटू काढून घेतला,’ अशा आठवणी धवननं सांगितल्या.

गळ्यात रुद्राक्षाची माळ, सोवळं परिधान करुन विराटनं अनुष्कासह घेतलं महाकालेश्वराचं दर्शन

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं धवन म्हणाला. संघात परतण्याच्या आशा कायम आहेत. तसा विश्वास माझ्या मनात आहे. त्यासाठी कठोर मेहनत सुरू आहे. जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा त्या संधीचं सोनं करेन आणि उत्तम कामगिरी करून दाखवेन, असं शिखरनं सांगितलं. मी मेहनत सुरूच ठेवली. संघात पुनरागमन करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मला संधी मिळाली नाही, तरीही मला त्याबद्दल खंत नसेल. माझ्याकडून जितकं शक्य आहे, तितकं मी करत राहीन. मेहनत करणं माझ्या हातात आहे. त्यात मी कुठेच कमी पडणार नाही, असं शिखरनं म्हटलं.

cm eknath shinde, बाळासाहेबांचा तो फोटो दाखवत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज; सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरलं! – chief minister eknath shindeopen challenge to uddhav thackeray showing an old photo of balasaheb thackeray

0

मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, असं ते म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथील जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा मणिशंकर अय्यर यांच्यासोबतचा एक फोटो दाखवत उद्धव ठाकरेंना आव्हानही दिलं आहे.’कालच्या जाहीर सभेमध्ये ते म्हणाले की सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार, हे पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती. राहुल गांधी यांच्या थोबाडीत देऊन तुम्ही ती हिंमत दाखवणार का?’ असा खरपूस सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्रलढा आणि मराठी भाषेसह विविध क्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे. ते फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही, तर संपूर्ण देशाचं दैवत आहेत. हिंदुत्व, हिंदुत्व करणाऱ्या नेत्यांचे आमदार सावरकरांचा अपमान होत असताना अधिवेशन काळात सभागृहात मूग गिळून गप्प होते. यापेक्षा दुसरं दुर्दैवं काय असू शकतं? असा सवालही शिंदे यांनी केला आहे.

भाजपचं आठ नऊ वर्षातील प्रत्येक पाऊल ओबीसीविरोधी,त्यांच्याकडून ओबीसी प्रेमाची नौटंकी सुरु, हरी नरकेंचा आरोप

दरम्यान, ‘आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या भूमिका आहेत. याचा अर्थ तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, असं तुम्ही ठरवून करताय,’ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

‘सावरकर होण्याची तुमची लायकीही नाही’

एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी धिक्कार करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सर्वजण घेत आहोत. मात्र देशभक्तांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी जो त्याग केला त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. या कृत्याचा निषेध राज्यासह संपूर्ण देश करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानच्या ज्या तुरुंगात राहिले, तिथे राहुल गांधी यांनी एक दिवस राहून दाखवावं. राहुल गांधी हे वारंवार सांगतात की मी सावरकर नाही तर गांधी आहे. मात्र सावरकर होण्याची तुमची लायकीही नाही. सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो, देशाविषयी तुमच्या मनात प्रेम असावं लागतं. तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. तुम्ही लोकशाहीबद्दल बोलता, आपल्या पंतप्रधानांबद्दल बोलता. देशात बोलता ते ठीक आहे, मात्र परदेशात जाऊन तुम्ही जे बोलता त्याचा आम्ही निषेध करतो,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही प्रोफाईल फोटो म्हणून सावकरांचा फोटो लावला असून त्यावर आम्ही सारे सावरकर असं लिहिलं आहे.

Latest posts