Sunday, June 4, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2544

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

31

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

35

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

27

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

24

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

26

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

25

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

29

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Pankaja Munde: पराभव होऊनही अनेकांना मंत्रिपदं मिळाली, पंकजा मुंडेंची खंत; आता थेट अमित शाहांना भेटणार

0

म. टा. प्रतिनिधी बीड: माझे राजकारण केवळ लोकांसाठी आहे. त्यामुळे कायम लोकांच्या हिताची भूमिका घ्यायची ही लोकनेते मुंडे साहेबांची शिकवण आहे अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी शनिवारी गोपीनाथ गडावर जाहीर केली.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी गोपीनाथ गडावर रामायणाचार्य ढोक महाराज यांचे कीर्तन आणि विविध कार्यक्रम झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठी गर्दी उसळली होती. व्यासपीठावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशःश्री मुंडे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे हे कुटुंब आणि खासदार सुजय विखे, महादेव जानकर, पाशा पटेल, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, नरेंद्र पवार, राधाताई सानप, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, रमेश आडसकर आदी उपस्थित होते.

पंकजा म्हणाल्या, की आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. या दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी या वेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडे साहेबांवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे.

बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी… पंकजांनी सांगितली हृदयस्पर्शी आठवण

दरम्यान, स्मृतिदिनानिमित्त गडावर रक्तदान शिबिर तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाउंडेशनतर्फे कन्हेरवाडी व कौठळी याठिकाणी नाला खोलीकरण कामाला पंकजा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरवात करण्यात आली. अपघातमुक्त परळी अभियानांतर्गत चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टरही बसविण्यात आले.

अमित शहा यांच्याशी बोलणार: पंकजा मुंडे

गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला, पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे जी परिस्थिती आणि संभ्रम निर्माण झाला तो माझ्यामुळे निर्माण केलेला नाही. आता वरिष्ठ नेत्यांशी मनमोकळी चर्चा करणार असून अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. कुणाच्या, तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याएवढे खांदे अजून तरी मला मिळाले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.

Pankaja Munde : राज्याचं लक्ष लागलेली भेट झाली, पंकजा मुंडे एकनाथ खडसेंची बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

एकनाथ खडसेंबरोबर चर्चा

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे, त्यांची कन्या रोहिणी खडसे गोपीनाथ गडावर दाखल झाले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Ajinkya Rahane Statement On Comeback Before WTC Final India Australia; अजिंक्य रहाणेनं WTC फायनलचं प्लॅनिंग सांगितलं, ते रेकॉर्ड वाढवणार ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे दीड वर्षानंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे; मात्र याचा विचार करण्यास किंवा त्यापूर्वीच्या कामगिरीचा, अपयशाचा विचार करण्यास तो तयार नाही. आयपीएलप्रमाणेच सकारात्मक आणि आक्रमक विचार ठेवून कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीस सामोरे जाण्याचे त्याने ठरवले आहे. काय झाले याचा विचार न करता पूर्णपणे नव्याने सुरुवात करणार असल्याचे त्याने सांगितले.

रहाणेचा अनुभव आणि कौशल्य या अंतिम लढतीत मोलाचे ठरेल. दडपणाखाली दीर्घ खेळी करण्याची त्याची क्षमता आहे. त्याच्या समावेशामुळे भारतीय फलंदाजीस जास्त स्थैर्य येईल, असा विचार करण्यात आला आहे. ‘जवळपास १८-१९ महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करीत आहे. यापूर्वी जे काही चांगले-वाईट घडले, त्याचा विचार मी करणार नाही. मी पूर्णपणे नव्याने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जे काही करीत आलो तेच करीत राहणार आहे,’ असे रहाणेने सांगितले. रहाणेने भारतीय संघांसह पोर्ट्समाउथ येथे सराव सुरू केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळताना मी फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला. या मोसमात माझी फलंदाजी चांगली झाली. त्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही सातत्याने धावा केल्या होत्या. संघातील हे पुनरागमनामुळे काहीसा भावनाविवश झालो होतो, असे त्याने सांगितले.

भारतीय संघाबाहेर गेल्यावर खूपच निराश झालो होतो. त्या वेळी पुन्हा भारतीय संघांकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी कुटुंबीयांनी भक्कम साथ दिली. भारतीय संघात परतण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली. देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीकडे लक्ष दिले. संघातील पुनरागमनासाठी केलेल्या प्रयत्नाचा मी पुरेपूर आनंद घेतला. यशाने हुरळलो नाही, अपयशाने निराश झालो नाही. मुंबई संघातील प्रत्येक खेळाडूकडून शिकलो. क्रिकेटपटूस प्रत्येक दिवशी शिकावे लागते. हे शिकणे कधीही थांबणार नाही, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

– अजिंक्य रहाणे

पाचव्यांदा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई संघाच्या यशात रहाणेचा मोलाचा वाटा होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेकांना खूश केले. त्याचा स्ट्राइक रेटही जबरदस्त होता. त्याने मुंबई इंडियन्सला २७ चेंडूंतच ६१ धावांचा चोप दिला होता. ‘आयपीएलमध्ये मी सकारात्मक होतो. एक लक्ष्य ठेवून फलंदाजी करीत होतो. हेच मी रणजी स्पर्धेतही केले होते. मी कसोटी खेळत आहे, की टी-२० याचा विचार न करता फलंदाजी करणार आहे. हा विचार करून विचारांची गुंतागुंत करण्याची माझी तयार नाही. काही गोष्टी सोप्या असणे हेच चांगले असते,’ असे तो म्हणाला.

दहावीचा निकाल लागताच दोन विद्यार्थिनींच्या निर्णयानं नागपूर सुन्न, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही टोकाचं पाऊल

रहाणेला ८२ कसोटींचा अनुभव आहे. त्यात त्याने ४ हजार ९३१ धावा केल्या आहेत. भारताने २०२०-२१ च्या मोसमात ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. त्यात रहाणेचा मोलाचा वाटा होता. त्या वेळी रहाणेच्या नेतृत्वाखाली रोहित खेळला होता. आता रोहित कर्णधार आहे. ‘संघातील वातावरण खूपच चांगले आहे. रोहित संघाला चांगल्या प्रकारे हाताळत आहे. राहुल भाईही हे चांगल्या प्रकारे करतात. प्रत्येक जण खेळाचा आनंद घेत आहे, त्याच वेळी सहकाऱ्यांच्या यशात अपयशात सहभागी होत आहे,’ असे तो म्हणाला.

Pune News: पुण्यात मोठा प्रकल्प येणार, बड्या कंपनीचा शिंदे-फडणवीस सरकारसोबत कंपनीचा करार, नोकऱ्यांची संधी

इंग्लंडमधील आव्हान

– कणखरपणे परिस्थितीस सामोरे जाणे महत्त्वाचे

– इंग्लंडमधील यशासाठी परिस्थितीचा अभ्यास मोलाचा असतो.

– एकावेळी फार तर एका सत्राबाबतच विचार करता येतो

– खेळपट्टी कशी रंग बदलत आहे हे लक्षात घेताना हवामानातील बदलाकडेही लक्ष द्यावे लागते.

– सत्तर धावा झाल्यावरही आता जम बसला, सर्व काही जाणले असे गृहीत धरून चालत नाही

बृजभूषण सिंह यांना वाचवण्याची केंद्राची धडपड, चर्चेच्या प्रस्तावाची तयारी, सरकारचं टेन्शन वाढवणारी अपडेट समोर

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 04 June 2023

0

Top Headlines

31 May, 08:44 AM (IST)

TOP Headlines ABP Majha 7 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 31 मे 2023

Baramati Vadgaon Nimbalkar Police Humiliated Woman; नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

0

बारामती, पुणे : एका नातेवाईकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे, या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाईट वागणूक देण्यात आली. ‘समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला लावतो मग तुमची तक्रार घेतो’, अशी तंबीही दिली गेली. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या स्वीय सहायकाने सांगितल्यावरच तक्रारीचे दोन तासांचे दिव्य पार पडले.

अत्यंत गरीब घरातील महिलेने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार कथन केला. ‘त्यांच्या शेजारी नातेवाईक राहतो. गेली काही वर्ष तो वाईट पद्धतीने डोळा ठेवून आहे. तो शरीरसुखाची मागणी करत आहे. त्याचं ऐकत नसल्याने मुलांवर वेगवेगळ्या केसेस करण्याची धमकी देत आहे’, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, महिलेने पडदे बांधून तयार केलेले बाथरूम व पक्के शौचालय ज्या दिशेला आहे त्याच दिशेला नातेवाईकाने जाणूनबुजून दरवाजा तयार केला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत तात्पुरता अर्ज दिला आणि ठाणेप्रमुखांना फोन केल्यावर दोन पोलीस तातडीने पाहणीसाठी आले. पण ‘त्यांचे घर आहे कुठेही दरवाजा पाडतील तुम्हाला काय करायचे आहे?’ अशी उलटी समज पोलिसांनी दिल्याचं सदर महिलेनं सांगतिलं.

नको राजेशाही थाट, लग्नाच्या अनावश्यक खर्चाला काट, दौंडच्या नवदाम्पत्याचा आदर्श निर्णय
मग महिलेनं दुपारी तीन-सव्वातीनच्या दरम्यान मुलासह पोलीस ठाणे गाठलं आणि ठाणे अंमलदारांना अर्ज दिला. ‘तुमची तक्रार घेतली जाईल. काही काळजी करू नका’, असा दिलासा त्यांनी दिला. मात्र त्यानंतर वस्तीवर पाहणीला गेलेले दोन पोलीस आले आणि नूर बदलला. एकजण म्हणाला, ‘तो विषय संपला ना मघाशीच. कशाला आलाय परत?’ त्यावर महिला आणि तिच्या मुलाने ‘तक्रार नोंदवून तर घ्या साहेब’ अशी आर्जव केली. ‘थांबा पुढच्या पार्टीला पण बोलवतो आणि तुमच्यावर केस करायला लावतो’ असं त्यावर पोलिसांनी, सुनावलं. यावर महिला व मुलाशी पोलिसांची दहा मिनिटे हुज्जत झाली. मग मुलाने रजेवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना फोन केला. त्यांनी समाधानकारक प्रतिसाद दिला आणि लगेचच ठाण्यात फोनही फिरवला. पोलिसांनी घेतो तक्रार असं सांगितलं, पण घेतली नाही.

पुण्यात १०४ वर्षांच्या आजीसह ५१ जणांचा वाढदिवस एकत्रित साजरा, अख्ख्या गावाची हजेरी

अखेर मुलाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनिलकुमार मुसळे यांना फोन केला. मुसळेंनी गांभीर्य ओळखून ‘पोलिसांकडे फोन द्या’ असं सुचवलं. पण पोलिसांनी फोन घेण्यास मात्र नकार दिला. मग मुसळे यांनीच ‘स्पीकरवर फोन टाका मी बोलतो’ असं सांगितलं. फोन स्पीकरवर टाकून पोलिसांपुढे टेबलावर ठेवला. मग पोलीस मुसळे यांच्यासमोर ‘साहेब, तक्रार घेतलीय. त्यांना बसा म्हणालोय’, असं सरळ झाले.

पण यानंतरही पोलिसाने बाहेर येत ‘तुम्ही कशाला वर फोन करत चाललाय’ असा ढोस मुलाला दिला. मुलाने ‘आमच्या नेत्याकडे नाही तर कुठे जाणार’ असं उत्तर दिलं. दोन तासांच्या या नाट्यानंतर मुलांना बाहेर काढलं आणि संबंधित महिलेला एकटीला आत बोलवलं. महिला पोलिसांच्या समक्ष तक्रार घेतली. यानंतरही दोन-अडीच तास थांबा, असं सुनावलं. मात्र महिला परतली.

Nagpur Two Girl Students Ends Life After SSC Result; दहावीचा निकाल लागला अन् दोन विद्यार्थिनींच्या निर्णयानं नागपूर सुन्न,प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही टोकाचं पाऊल

0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीतील दहावीच्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून, शैक्षणिक वर्तुळ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीने अनुत्तीर्ण झाल्याने तर दुसरीने प्रथम श्रेणीत येऊनही जीवन संपविले. वाडी व सक्करदरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत या हृदयद्रावक घटना घडल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाडीतील सोनगानगर येथे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पहिली घटना घडली. रामदुलारी पंचम झारीया (वय १७) ही दहावीत अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे ती तणावात होती. तिची आई गीता या खासगी काम करतात. शुक्रवारी त्या कामावर गेल्या. सायंकाळी भाऊ घराबाहेर खेळत होता. याचदरम्यान पंख्याला साडी बांधून रामदुलारीने गळफास घेतला. काही वेळाने निकाल विचारण्यासाठी नातेवाईक घरी आले. त्यांना रामदुलारी गळफास घेतलेली दिसली. गीता यांना माहिती देत नातेवाइकांनी फास काढून रामदुलारीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

दुसरी घटना सक्करदरा पोलिस स्टेशन हद्दीतील बहादुरा येथील शशिकांत सोसायटी येथे उघडकीस आली. चेतना भोजराज भोयर (वय १६) हिला दहावीत ७१ टक्के गुण मिळाले. प्रथम श्रेणीत येऊनही कमी गुण मिळाल्याचा समज तिने करून घेतला. त्यामुळे ती तणावात होती. दुपारी चेतनाने खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. काही वेळाने तिचे वडील भोजराज खोलीत गेले. चेतना गळफास घेतलेली दिसली. फास काढून भोजराज यांनी चेतनाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. चेतनाचे वडील वृत्तपत्र विक्रेते असून, मोठी मुलगी पुण्यातील कंपनीत कार्यरत आहे. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Mumbai News: ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा, लाडू बनवण्याचा अनधिकृत कारखाना; सिद्धिविनायक मंदिराला नोटीस

शवविच्छेदनापूर्वीच होणार होते अंत्यसंस्कार

गळफास काढून नातेवाइकांनी चेतनाला तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॉक्टरांनी चेतनाला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कायद्याची माहिती नसल्याने चेतनाचा मृतदेह नतोवाइकांनी घरी नेला. शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी चेतनाचे पार्थिव दिघोरी घाट येथे आणण्यात आले. आत्महत्या केलेल्या मुलीचे शवविच्छेदन न करताच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी चेतनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, अशी माहिती सक्करदरा पोलिसांनी दिली.

नागपूरच्या गिर्यारोहकांनी सर केलं १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर

भारतातील प्रेमाचा आवाज दबणार नाही, विरोधकही एकत्र येतील, राहुल गांधींनी सांगितलं कारण

अवास्तव अपेक्षा कारणीभूत?

पालक, आप्त व आसपासच्या लोकांच्या अवास्तव अपेक्षा अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतात काय, असा प्रश्न या दोन्ही घटनांनी निर्माण झाला आहे. अनुत्तीर्ण होणे म्हणजे पुढच्या संधी संपल्या असे अजिबात नाही. शिवाय, प्रथम श्रेणीत येऊनही गुण कमी वाटणे, यामागे याच अतिअपेक्षा असाव्यात. अशावेळी पालक तसेच समाजातील नागरिकांनी या विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे, असा मतप्रवाह यानिमित्ताने पुढे आला.
जागेला सोन्याचा भाव असणाऱ्या गिरगावात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप; इमारतीचा अख्खा तळमजलाच विकला

Sanjay Raut Explanation On Spitting Controversy At Nashik Maharashtra; स्वातंत्र्यवीर सावरकरही गद्दारांवर थुंकले होते, गद्दारांवर थुंकणे हा संस्कृतीचा भाग: संजय राऊत| Maharashtra Times

0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे भर न्यायालयात एका गद्दारावर थुंकल्याची इतिहासात नोंद आहे. मी सावरकरांचा भक्त आहे. पण मी कोणावरही थुंकलेलो नाही, गद्दारांवर थुंकणे हा तर हिंदू संस्कृतीचा भाग आहे’, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले.

खासदार राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, शिंदे गटासह अजित पवारांवरही निशाणा साधला. राऊत हे शुक्रवारी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनी संयमाने वागले पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला होता. त्यानंतर राऊत यांनी शनिवारी पवारांवर पलटवार केला. ‘बेईमान लोकांवर थुंकणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. संताप व्यक्त करण्यासाठी हिंदू लोक अशी कृती करतात. गद्दारांवर राग व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर भर न्यायालयात थुंकले, अशी इतिहासात नोंद आहे. मी कोणत्याही राजकीय नेत्यावर थुंकलेलो नाही. मी सावरकर यांचा भक्त आहे. मी गद्दारांवरच थुंकलो आहे. सावरकर यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करीत असतो. पत्रकार परिषदेत गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली. त्यामुळे मी खरे तर थुंकलो. मात्र गद्दारांना वाटते मी त्यांच्यावरच थुंकलो. हे खरे आहे की महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर थुंकत आहे. त्यामुळे सतत आपल्यावर कोणी ना कोणी थुंकत आहे, अशी भीती गद्दारांना वाटत आहे’, अशी टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंबाबत पत्रकारांचा प्रश्न अन् संजय राऊतांची भलतीच कृती; शिंदेंची शिवसेना संतापली

‘राऊतांनी तारतम्य ठेवून बोलावे’

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी प्रतिहल्ला करण्याचे टाळले. ‘महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे. ते मोठे व महान नेते आहेत. त्यांच्या बोलण्याने अंगाला छिद्र पडत नाही’, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र राऊतांवर हल्ला चढवला. ‘खासदार संजय राऊत यांनी कुवत पाहून बोलावे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांची माफी मागावी’, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.

Sanjay Raut: पंकजा मुंडेंचं ते वाक्य ऐकताच संजय राऊत उसळून म्हणाले, ‘ राजकारणात टिकायचं असेल तर’

अजितदादांना खोचक टोला

धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले, असा खोचक टोला शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला. आम्ही भोगूनही जमिनीवर आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. संकट आले म्हणून भाजपसोबत सूत जुळविण्याचा विचार आमच्या मनात येत नाही, असा चिमटाही राऊत यांनी घेतला. जोडे मारल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांच्या सुरक्षेत मोठी वाढ, थुंकण्याच्या कृतीमुळे अडचणीत

Rahul Gandhi Said Opposition Parties Will Come Together For Nation; विरोधी पक्ष एकत्र येतील, राहुल गांधींनी कारण सांगितलं

0

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : ‘भारतात सध्या दोन स्वतंत्र विचारधारांचा संघर्ष सुरू असून, देशाला पर्यायी दिशा दाखवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील,’ असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भारतीय अमेरिकी समुदायासमोर व्यक्त केला. वॉशिंग्टनमधील दोन दिवसांच्या भेटीची सांगता करताना राहुल यांनी या संवादाने केली. काँग्रेसेतर विरोधकांशी जेव्हा भेटी होतात, तेव्हा एकत्र येऊन लढण्याच्या आवश्यकतेवरच मी भर देतो, असे त्यांनी नमूद केले.

‘माध्यमांतील अनेक जण भाजप आणि संघाची प्रतिमा प्रत्यक्षाहून मोठी दाखवतात. मात्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील निकालाकडे पाहा. आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही काँग्रेसची लढण्याची आणि भाजपला पराभूत करण्याची क्षमता सिद्ध होईल,’ असे राहुल यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

सकारात्मक चर्चा

‘आम्ही नेहमी आम्ही एकत्र येण्याची भाषा करतो, पण प्रत्यक्षात पक्ष म्हणून स्वतंत्र लढतो. पण भारताला पर्यायी दिशा दाखवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्यावर विचार केला, तर फरक दिसेल. सध्या सर्व विरोधी पक्षांमध्ये मंथन सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चा प्रभावी आणि सकारात्मक आहेत,’ असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.
भाजपला लोकसभेला किती जागा मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यानं आकडा सांगितला, कारणही सांगितलं

विचारसरणींची लढाई

‘सध्या भारतात दोन विचारधारांची, दृष्टीकोनांची लढाई सुरू आहे. त्यातील एक महात्मा गांधी यांनी दाखवलेला शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग आहे. धर्म, जाती, प्रांत, भाषेच्या भेदापलीकडे जाऊन आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये समान सहभाग नोंदवण्याचा हा विचार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःच्या भावना मांडण्याची मुक्तता असेल, असा तो दृष्टीकोन आहे. ‘दुसरीकडे अवैज्ञानिक आक्रमकतेवर आधारलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन आहे. ही लढाई नवी नाही. या विचारांतील लढाई हजारो वर्षांपासून सुरू असून, महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन यशस्वी होईल, हा विश्वास मला आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.
Pune News: पुण्यात मोठा प्रकल्प येणार, बड्या कंपनीचा शिंदे-फडणवीस सरकारसोबत कंपनीचा करार, नोकऱ्यांची संधी
भाजपने सर्व संस्था काबीज केल्या आहेत. माध्यमे त्यांच्या हातात आहेत. सर्व संस्थांवर ते दबाव आणत आहेत. लोकांना धमकावत आहेत. तरीही आपुलकी आणि विचारांचा आवाज दबला जाऊ शकत नाही. देशातील प्रेमाचा आवाज दबणार नाही. तो अत्यंत शक्तिशाली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Mumbai News: ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा, लाडू बनवण्याचा अनधिकृत कारखाना; सिद्धिविनायक मंदिराला नोटीस

WTC Final: Time to reformat for Team India | Cricket News

0

The endless grind of franchise T20s & international cricket is now reality, meaning India’s players have to stay fit & adjust quickly, in just a few nets sessions, to play a Test in England on the heels of the IPL
At the start of the year, there was a lengthy meeting at a five-star hotel in Mumbai where some BCCI office-bearers huddled with India captain Rohit Sharma, who was present virtually, head coach Rahul Dravid and National Cricket Academy chairman VVS Laxman.
Their topic of discussion? ‘Workload management,’ a term bandied about by the board in the media to give an impression that something is being done about it.

2

The BCCI, it seemed, was a bit concerned with the workload of the players in the light of 2023 being the year of the World Test Championship final and the ICC ODI World Cup in India in October-November.
The after-effects of a long tournament like the IPL were visible and certainly played a part in India’s dismal campaigns in the 2009 T20 World Cup in England, and in the Test series two years later, which the team lost 0-4.
Another IPL later, we still have no solution to this problem. There was no sign of any player’s workload being managed during the IPL.

1/11

WTC Final: India and Australia records at The Oval

Show Captions

In fact, the last batch of the four Indian players supposed to be playing in the WTC final at Oval – Ravindra Jadeja, Ajinkya Rahane (CSK), Shubman Gill (GT) and Mohammed Shami (GT) – were locked in a tense IPL final, which stretched to three days, just a week before the Test.
Someone like Mumbai Indians coach and former South African wicketkeeper Mark Boucher feels that a tournament like the IPL isn’t too much taxing because it involves playing just T20 cricket.
However, these are high-intensity T20 games in a short duration, with hardly any time left for the body to recover before the next match. Almost all the players carry some niggle or the other.

1/11

WTC Final: Acid test for Shubman Gill

Show Captions

At the start of the tournament, a report emerged that Rohit Sharma would rest for a few games, allowing Suryakumar Yadav to lead Mumbai Indians, but that happened in just one match. With MI’s qualification on the line, Rohit ended up playing almost every game in IPL 2023.
Not to forget, this was the first IPL post-Covid which involved the home and away format since 2019. It meant the players were on a usual ‘Bharat darshan’ trip, clocking thousands of air miles with its attendant hassles.
Add several matches which go deep into the night, and you have a situation where the body clock of the sleep-deprived cricketer goes for a six. A classic example was the reserve day of the IPL final, which saw the post-match ceremony finishing around 3.30 am!

That brings us to the million-dollar question. Will the players be fatigued going into the World Test Championship final against Australia?
“No, fatigue is definitely not a factor for international players. These players’ workloads have been monitored continuously. They should be raring to go and be able to give their best,” former India left-arm spinner and ex-national selector Sunil Joshi told TOI.
Barring Cheteshwar Pujara, who was enjoying another dream season for Sussex, all the other Indian cricketers were involved deeply in this rigmarole. In contrast, the Aussies, with a view to win their first WTC title and the Ashes, were more focused on getting as used to the English conditions as possible.

Being left unsold in the IPL auction in December proved to be a boon in disguise for someone like Steve Smith, who revelled as Pujara’s teammate in Sussex, getting some useful runs and game time in the UK.
The Aussie pace battery is also fit and raring to go. Skipper Pat Cummins and Mitchell Starc decided to give the IPL a skip, while Josh Hazlewood played for RCB in just three games, in which he bowled 9 overs.
In a curious turn of events, the pacer flew back to Australia mid-way into the IPL due to an ‘injury,’ but was pronounced fit for WTC and the Ashes in a few days’ time.
The only Aussie players involved in both the IPL and the WTC final are allrounder Cameron Green, who had a stellar season for MI, and veteran opener David Warner, who captained a floundering Delhi Capitals campaign.

1/11

The turnaround in Ajinkya Rahane’s career

Show Captions

As they scamper to prepare for the big final while trying to put in a few meaningful practice sessions in the UK without even a warm-up game under their belt, India’s top cricketers are clearly in danger of being under-cooked for red-ball cricket.
Joshi, though feels that Team India “has had a good preparation”. “The fact that we are practicing at the Arundel Castle Cricket Club – a open ground where there’s a strong breeze – will help our cricketers immensely, as the ball will swing a lot there, and the bowlers will get an idea of bowling with and against the breeze.
“Form is important irrespective of format. If a pacer is hitting the hard lengths and a batsman is able to middle the ball, everything should be fine.”

CRICKET-AI-1

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 04 June 2023

0

Top Headlines

31 May, 08:44 AM (IST)

TOP Headlines ABP Majha 7 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 31 मे 2023

Mumbai News: ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा, लाडू बनवण्याचा अनधिकृत कारखाना; सिद्धिविनायक मंदिराला नोटीस

0

Edited by Rohit Dhamnaskar | | Updated: 4 Jun 2023, 7:49 am

Siddhivinayak temple: अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरा मुंबई महानगरपालिकेने नोटीस पाठवली आहे. मंदिरात लाडू तयार करण्याचा कारखाना

 

Siddhivinayak temple (2)
सिद्धिविनायक मंदिर

हायलाइट्स:

  • मंदिराच्या आवारात मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम सुरू
  • मंदिरामध्ये अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरू
  • मंदिराकडे आरोग्य आणि अग्निशमन दल व इतर सर्व प्रकारचे परवाने आहेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रतीक्षालय इमारतीच्या तळमजल्यावर तूप, तेल या ज्वलनशील पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. तसेच मंदिराच्या आवारात मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामाकरीता मोठा लोखंडी जिना उभारला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत पालिकेच्या दादर जी/उत्तर, इमारत व कारखाना विभागाने नोटीस बजावली आहे.

सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने इमारत व कारखाना विभागामार्फत १२ मे २०२३ रोजी मंदिराची स्थळपाहणी करण्यात आली. त्यावेळेस संबंधित बाबींबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही, असे या विभागाने नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत मंदिर न्यासाकडे विचारणा केली असता, मंदिराकडे आरोग्य आणि अग्निशमन दल व इतर सर्व प्रकारचे परवाने आहेत. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असून आवश्यक ती काळजी घेतली जाते. पालिकेने केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल. आवश्यक त्या परवान्यांची कागदपत्रे पालिकेला सुपूर्द केली जातील, असे न्यासाने स्पष्ट केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Latest posts