Thursday, March 23, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2174

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

174

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Earthquake Insurance, भूकंपात मालमत्तेचे झाले नुकसान, विमा कंपनी क्लेम देते का, भारतात याबाबत काय नियम? जाणून घ्या – earthquake damage to property will insurance company pays claims what are the rules in india know

0

मुंबई : अनेक वर्षांच्या कमाईतून एक-एक पैसा वाचवून लोक त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करतात. आपलं घर हे आपल्याला फक्त निवारच देत नाही तर भावनिक आणि आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करते. पण नैसर्गिक आपत्तीत तुमचे घर उद्ध्वस्त झाले तर? भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे हजारो-लाखो लोक क्षणार्धात बेघर होतात आणि क्षणार्धात रस्त्यावर येतात, हे तुम्ही पाहिले असेलच. नैसर्गिक आपत्ती आपण टाळू शकत नसलो तरी स्वतःला बेघर होण्यापासून टाळण्याचा एक उपाय आहेत आणि आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.

गृह विम्याचे फायदे

आजच्या काळात अनेक विमा कंपन्या घर आणि दुकानाचा विमा यासारखी उत्पादने घेऊन आल्या आहेत. हा विमा तुमच्या घरासाठी आणि दुकानासाठी संरक्षक कवच बनतो. तर घराचे किंवा घरातील साहित्याचे नुकसान झाल्यास तुम्हाला होणारा आर्थिक धक्का यामुळे कमी होतो. तसेच पूर, भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा चोरी, डकैती, दंगली यासारख्या कारणांमुळे घराचे नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत विमा कंपनी तुमच्या नुकसानीची भरपाई करते. गृह विमा तुमच्या घराला सुरक्षा कवच देऊन तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत करतो.

प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहित्येय का? जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
गृह विम्यामध्ये काय समाविष्ट असते?
सामान्यतः दोन प्रकारचे गृह विमा असतात. पहिला घराचा विमा आणि दुसरा म्हणजे घरातील वस्तूंचा विमा. घरातील वस्तूंच्या विम्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादने, फर्निचर, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होतो, ज्याला कंटेंट इन्शुरन्स म्हणतात. तर या उलट दुसऱ्या प्रकारच्या विम्यात घराचे म्हणजेच इमारतीचे झालेले नुकसान कव्हर केले जाते. याला संरचना विमा संरक्षण म्हणतात. याव्यतिरिक्त, सर्वसमावेशक गृह विम्याचा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये घर आणि घरातील वस्तूंचा समावेश होतो.

आता जीवन विमाही तुमचा खिसा कापणार! बजेटमध्ये मोठी घोषणा, काय-काय बदलले घ्या जाणून
गृह विमा तुम्ही घ्यावा का?
सध्या जगभरात अनेक प्रकारचे बदल होत आहेत. तुर्कीमधील जीवघेण्या भूकंपानंतर जगातील अनेक ठिकाणी भूकंप तर कुठे भूस्खलनाची समस्या सतावत आहे. नुकतेच जोशीमठचे अनेक लोक बेघर झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. अशा स्थितीत घरासाठी योग्य विमा करून घेणे योग्य निर्णय ठरू शकतो. ठिकाण लक्षात घेऊन विमा घेणे आवश्यक आहे. स्ट्रक्चर पॉलिसी जितकी महत्त्वाची आहे, तितकेच घरातील वस्तूंचा विमा घेणेही महत्त्वाचे आहे. अनेक धोरणांमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांव्यतिरिक्त दहशतवादी घटनांमुळे होणारे नुकसान देखील समाविष्ट केले जाते.

विमा पॉलिसी घ्यायचीये? IRDAI ने लागू केलीय नवीन नियमावली, घ्या जाणून एका क्लिकवर
गृह विम्याचा प्रीमियम
गृह विमा पॉलिसी तुमच्या घराला आणि त्यातील वस्तूंना परवडणाऱ्या प्रीमियममध्ये संरक्षण देतात. भारताचे गृह संरक्षण धोरण हे एक मानक धोरण असून विविध विमा कंपन्या हा विमा देतात. यात घर आणि घरगुती दोन्ही वस्तूंचा समावेश होतो. तर त्याचा प्रीमियम २,५०० ते ५,००० रुपयांपर्यंत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करून तुम्ही सर्वात योग्य विमा खरेदी करू शकता. तसेच तुम्ही एक किंवा अधिक वर्षांसाठी गृह विमा खरेदी करू शकता. तर घर खरेदी करताना तुम्हाला दीर्घकालीन विमा घेण्याचाही सल्ला दिला जातो.

Nitin Gadkari Letter to CM Eknath Shinde about the Transfer of Medical Education Secretary; वैद्यकीय शिक्षण सचिवांची बदली करा, गडकरींचे CM शिंदेंना पत्र; पत्नी सल्लागार असल्याने निर्माण झाला वाद

0

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून नितीन गडकरी यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीची मागणी केली आहे. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (CPS) च्या कामकाजाबाबत डॉ. अश्विनी जोशी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. CPSमध्ये हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाला राजकीय रंग मिळाल्याने आता काही अधिकारी यावर उघडपणे बोलत आहेत. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (CPS) च्या कामकाजातील विसंगती उघड करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केली आहे. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी या CPSशी संलग्न असलेल्या संस्थांच्या नवीन संघटनेच्या सल्लागार असल्याचे उघड करणारे कागदपत्रे समोर आली आहेत.

गडकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना दोन पत्रे लिहून जोशी सीपीएसच्या जवळपास १,१०० जागांचे प्रवेश रखडत असल्याचा आरोप केला. यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षणात दाखवलेल्या रुचीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘या खुलाशामुळे CPS वादाचे निराकरण करण्यात मंत्र्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे’, असे एका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी नितीन गडकरींच्या कार्यालयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे समोरासमोर आले, हसतखेळत गप्पा मारत विधिमंडळात, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
गडकरींनी ९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात जोशी यांच्यावर टीका केली आहे. वैद्यकी शिक्षण विभागाच्या सुरळीत सुरू असलेल्या कामात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप गडकरींनी केला होता. सीपीएसमध्ये २ वर्षांचा वैद्यकीय डिप्लोमा आणि ३ वर्षांचा वैद्यकीय फेलोशिप कोर्स चालवण्यात येतो. दरम्यान, या प्रकरणात ‘डॉ. अश्विनी जोशी यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे आणि लगेच काही करता येणार नाही’, असे सूत्रांनी सांगितले.

सीपीएसचा अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये गंभीर उणीवा असल्याचे पत्र नुकतेच वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्राला लिहिले होते. तसंच नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी या सीपीएसशी संबंधित संघटनेच्या सल्लागार मंडळावर सल्लागार आहेत, अशी माहिती संघटनेच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी दिली. त्या आमच्यासोबत सल्लागार म्हणून काम करतात. एका राजकीय नेत्याची पत्नी असल्याने त्यांना नाकारता येणार नाही. सार्वजनिक जीवन त्यांचीही एक पत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष बकुल पारेख यांनी म्हटले. सीपीएसचा अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्याबाबत नितीन गडकरींनी ९ मार्चला लिहिल्या पत्रावरही परेख यांनी माहिती दिली. यासंबंधी संघटना मंत्र्यांकडे गेली नव्हती. सीपीएसच्या व्यवस्थापनाने यासंबंधी मंत्र्यांशी संपर्क केला असण्याची दाट शक्यता आहे, असे पारेख यांनी स्पष्ट केले. गडकरी हे प्रतिष्ठीत आणि एक सकारात्मक व्यक्ती आहेत, असे त्यांनी म्हटले.

हसत मुखाने चर्चा, विधानभवनात उद्धव ठाकरे अन् फडणवीसांची एकत्र एंट्री

गडकरींच्या कार्यालयाने चार दिवसांपूर्वी दुसरे पत्र पाठवले होते

वैद्यकीय शिक्षण विभागाने समुपदेशन सुरू न केल्यामुळे सीपीएसच्या १,१०० जागांचे प्रवेश रखडले आहेत. या प्रकरणी संस्थांमधील उणीवांबाबत सीपीएसकडून सविस्तर आणि समानधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने परिस्थिती जैसे थे राहिल, असे जोशी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. या प्रकरणी जोशी यांनी सीपीएसला १४ मार्चला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तसंच २१ मार्चपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर सीपीएसच्या प्रतिनिधींकडून विभागाकडे कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. सीपीएस व्यवस्थापनाला अधिक छाननीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सीपीएसचे रजिस्ट्रार डॉ. राजेश दराडे हे डॉ. अश्विनी जोशी यांनी बोलावलेल्या सुनावणीला हजर राहिले होते.

सीपीएसशी संबंधित सर्वच महाविद्यालयांची स्थिती वाईट नाही. यामुळे ११० वर्षे जुनी संस्था बंद करणं योग्य ठरणार नाही. सीपीएसमध्ये काम करणारे अनेक वैद्यकीय कर्मचारी हे उत्तम आणि पारदर्शकपणे काम करत आहेत, असे डॉ. बकुल पारेख यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या प्रकरणी जानेवारीमध्ये १२० संस्थांचे इन्स्पेक्शन करण्यात आले होते. त्यात २ बंद होत्या. ४२ संस्थांमध्ये गंभीर पुरेशा सुविधा नसल्याचे समोर आले होते.

Infosys announces Kiran Mazumdar-Shaw’s retirement from board; Sundaram named lead independent director

0

NEW DELHI: IT services major Infosys on Thursday announced the retirement of Kiran Mazumdar-Shaw as independent director of the board, effective March 22, 2023, upon completion of her tenure.
Infosys board has appointed D Sundaram as the lead independent director of the company, effective March 23, 2023 based on the recommendation of the Nomination and Remuneration Committee, according to a statement.
Kiran Mazumdar-Shaw was appointed to the Infosys board as an independent director in 2014, and as lead independent director in 2018.
She also served as the chairperson of the Nomination and Remuneration Committee and CSR Committee, and as a member of the Risk Management and ESG Committees of the board.
Infosys chairman Nandan Nilekani said, “We profusely thank Kiran for having been such an integral member of the Infosys family, providing valuable guidance and leadership to the board over the years.”
Nilekani added: “We also congratulate Sundaram on being appointed as lead independent director and look forward to his continued insight and steadfast support as Infosys continues its growth and transformation journey.”
Sundaram has been on the board of Infosys since 2017. With his expertise and vast experience in finance and strategy, he has been a crucial catalyst for the company to realise its vision for the future, the statement said.
Sundaram serves on the Audit Committee, Risk Management Committee, Stakeholders Relationship Committee, Nomination & Remuneration Committee and Cybersecurity Risk Sub-Committee.

लोकसभा निवडणुकीला १ वर्ष असताना भाजपनं भाकरी फिरवली, पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यांबाबत मोठा निर्णय

0

नवी दिल्ली : भाजपनं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या राज्यांमध्ये सत्ता नाही अशा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. राजस्थानमध्ये २०२३ च्या अखेरीस विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपनं राज्यातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलेल आहेत. राजस्थानमध्ये भाजपनं सतीष पुनिया यांच्याकडून जबाबदारी काढून घेतल सी.पी. जोशी यांना पक्षाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय बिहार, ओडिशा आणि दिल्लीमध्ये देखील प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या चार राज्यांमध्ये भाजप विरोधी बाकावर आहे. राजस्थानमध्ये सतीश पुनिया यांना हटवून सीपी जोशी यांना संधी देण्यात आली आहे. बिहारमध्ये संजय जयस्वाल यांना हटवून त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. तर, ओडिशामध्ये माजी कॅबिनेट मंत्री मनमोहन सामल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठ वीरेंद्र सचदेवा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.

सी पी जोशी यांच्यावर राजस्थानची जबाबदारी

राजस्थानमध्ये खासदार सी पी जोशी यांच्यावर पक्षानं जबाबदारी दिली आहे. पुनिया यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला होता. तरीदेखील पक्षानं त्यांना कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं प्रदेशाध्यक्ष बदलेल आहेत. चंद्र प्रकाश जोशी चितौडगड येथून खासदार असून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजयुमोचं अध्यक्षपद देखील भूषवलं आहे. बिहारचे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांनी राजद आणि जदयूमध्ये काम केलं आहे.

वीरेंद्र सचदेवांवर दिल्लीची जबाबदारी

दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं आता वीरेंद्र सचदेवा यांची नियुक्ती केली आहे. १९९० पासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत.

मनमोहन सामल यांच्यावर ओडिशाची जबाबदारी

भाजपनं समीर मोहंती यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मनमोहन सामल यांच्यावर दिली आहे. मोहंती यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सामल यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

chiplun karad railway line, कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत, प्रकल्प गेला होता बासनात – chiplun karad railway line minister dada bhuse gives positive feedback in maharashtra budget session

0

रत्नागिरी : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कराड हा रेल्वे मार्ग आता पुन्हा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी याची घोषणा झाल्यानंतर हा प्रकल्प बासनात गुंडाळला गेला होता. पण या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला या अधिवेशनात मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिपळूण कराड रेल्वे वर्गाच्या अशा पल्लवी झाल्या आहेत.चिपळूण-कराड रेल्वेमार्ग प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, असे उत्तर मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिले आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम, पृथ्वीराज चव्हाण, योगेश सागर, नाना पटोले, डॉ. देवराव होळी यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती.

कराड-चिपळूण नवीन रेल्वे लाइन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. ७ मार्च २०१२च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी या प्रकल्पाची किंमत ९२८.१० कोटी रुपये होती. त्यानुसार राज्य सरकारची ५० टक्के हिश्श्याची रक्कम ४६४.०५ कोटी इतकी होती. तर केंद्राने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षांत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम ३१९६ कोटी झाली आहे, असे मंत्री दादा भुसे म्हणाले.

बारसू रिफायनरी परिसरात राजकीय नेते, अधिकारी, परप्रांतीयांची जमीन खरेदी; काँग्रेस नेत्याचेही नाव, खळबळजनक दावा
रेल्वे मंत्रालयाने सहभाग धोरण २०१२ अंतर्गत चिपळूण-कराड रेल्वेमार्गास संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांच्यादरम्यान प्रत्येकी २६ टक्के आणि ७४ टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने ८० टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

मात्र, राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली. यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नसल्याचे भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कराड-चिपळूण आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचा समावेश पिंकबुकमध्ये ड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी पुन्हा करण्यात आला आहे. कराड-1 केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही भुसे यांनी सांगितले.
BJP-Shivsena: बावनकुळेंच्या फॉर्म्युलामुळे युतीत ठिणगी, शिंदे गटाच्या आमदारकडून वेगळा विचार करण्याचा इशारा
या आधीच्या प्रस्तावात ‘कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून याचा प्रस्तावित खर्च ३१९५.६० कोटी रुपये होता. या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हार पेठ, नाडे, पाटण, येराड, कोयना रोड ही ठिकाणे येणार आहेत. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला हा मार्ग मिळणार आहे. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवासी, व्यापारी, उद्योग व्यावसायिकांना देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

Retirement Planning: निवृत्तीनंतर माझ्याकडे किती पैसे असायला हवेत? असा लावा हिशेब… – retirement planning tips how much fund will i require to manage my current lifestyle

0

नवी देखील : कमाई सुरु केल्यापासूनच बचत करण्याची सुरुवात केली पाहिजे असे म्हणतात. म्हणजेच, जेव्हा तुम्ही कमावता तेव्हा तुम्ही एकाच वेळी जास्तीत जास्त बचत करू शकता. कारण एकदा का कमाईचा मार्ग बंद झाला तर पैशाची बचत करणे अवघड होऊन बसते. अशा स्थितीत वाढत्या महागाईच्या काळात नोकरी सुरु करताच निवृत्तीचे नियोजन करणेही अत्यंत गरजेचे आहे. आणि जुनी पेन्शन पद्धत संपुष्टात आल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे. आणि हे नियोजन अशा प्रकारे असायला हवे की तुम्ही काम करत नसताना तुमचे घर चालवण्यासाठी किती पैसे लागतील हे तुम्हाला कळेल. या हिशोबात निवृत्तीच्या वेळी होणारा खर्च आणि महागाई यांचाही समावेश करावा लागेल. अशा अर्थाने तुम्ही निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे.

निवृत्तीचे नियोजन कसे करायचे?
निवृत्तीसाठी नियोजन करताना वय सर्वात महत्त्वाचा घटक असतो. तुमच्या निवृत्तीसाठी जितका जास्त वेळ असेल तितकी कमी गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरसाठी मोठा फंड उभा करू शकतात. म्हणजेच, तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तितका अधिक फंड तुमच्या हाती येईल. याशिवाय निवृत्तीसाठी नियोजन करताना भविष्यातील महागाईचा देखील विचार केला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा महागाई कितीतरी पटीने जास्त असेल. आणि त्या आधारावर तुम्हाला तुमच्या खर्चाची गणना करावी लागेल.

एअर इंडिया कर्मचाऱ्यांसाठी टाटांची VRS योजना, कोणाला होईल फायदा, जाणून घ्या
निवृत्ती नियोजनाचे सूत्र लक्षात घ्या…
या आधारे सेवानिवृत्ती निधीचे नियोजन करता येते. TOI मधील एका अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी वार्षिक १० लाख रुपयांची आवश्यकता असल्यास आणि त्याच्या निवृत्तीच्या २० वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यास ६% महागाई दराच्या आधारावर त्याला २.५० कोटी रुपयांचा निधी लागेल.

गुंतवणुकीसाठी या धोरणाचा अवलंब करा
कमी पैशात जास्त बचत करायची असेल तर गुंतवणुकीत वैविध्य आणणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नये आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा.

सरकारची सुपर डुपर योजना! दररोज २०० रुपयांची बचत करून चिंतामुक्त व्हा, महिना मिळेल ५० हजारांची पेन्शन
१. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस)
२. सोने
३. SIP
४. रिअल इस्टेट

या ठिकाणी गुंतवणुकीत जोखमीच्या आधारे विविधता आणता येते. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ञांचा सल्ला घ्या.

buldhana chikhli father molested daughter, बापाचा अत्याचार; बुलढाण्यात १६ वर्षीय मुलगी गरोदर, आई म्हणते, आमचं घरचं प्रकरण – buldhana chikhli 16 year old girl was molested by her father

0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार करत तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चिखलीपासून जवळ असलेल्या एका खेडेगावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला शहरातील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी पीडित अल्पवयीन मुलीची तपासणी केली असता ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे निदान समोर आले. ही बाब लक्षात येताच मुलगी आणि आई या दोघींनीही कुणालाच काही सांगण्यास नकार दिला. “मला फक्त माझ्या मुलीचा उपचार करायचा आहे. आमचे घरचे प्रकरण आहे, आम्ही घरातच मिटवणार आहोत”, असं सदर मुलीच्या आईने सांगितले.

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे समोरासमोर आले, हसतखेळत गप्पा मारत विधिमंडळात, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
त्यानंतर, डॉक्टरांनी “आम्हाला पोलिसांत माहिती द्यावीच लागते”, असं सांगत डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीची आणि तिच्या आईची चौकशी केली. त्या दोघींनीही तक्रार देण्यास नकार दिला. समाजात बदनामी होण्याच्या धाकाने या माय-लेकीनं हा सर्व प्रकार लपवला होता.

दरम्यान, तक्रार देण्यास कुणीच पुढे येत नसल्याने पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होत या प्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध कलम ३७६ आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीचे आयुष्य नासवले आहे. नात्याला काळीमा फासणारी आणि बाप या शब्दाला डाग लावणारी ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे.

Modi Surname Row: असं काय बोलले होते राहुल गांधी ज्यामुळे २ वर्षांची शिक्षा झाली; २०१९ मधील ते भाषण जसं आहे तसं

mahim illegal construction demolish, ​राज ठाकरेंचा एक इशारा, कलेक्टर कामाला लागले, २४ तासांत मजारीभोवतीचं बांधकाम जमीनदोस्त! – mumbai news after raj thackeray ultimatum mahim mazar mystery dargah illegal construction demolish

0

Mumbai Mahim Mazar News Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढपाडव्यानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी माहिम येथील समुद्रात अनधिकृत दर्ग्याची निर्मिती होत असल्याचे आरोप केले. त्यांनी या सभेत माहिम येथील एका मजारीचा फोटोही दाखवला होता. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत या मजारीच्या बाजूला उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्याचा इशारा दिला होता. बुधवारी गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मजारीबाबत इशारा दिल्यानंतर आज गुरुवारी मजारीच्या आजूबाजूचं बांधकाम पूर्णपणे पाडण्यात आलं आहे. २४ तासांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मजारीच्या सभोवतालचं पाडकाम करण्यात आलं.

माहिम मजार

माहिम मजार

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक माहिम येथील वादग्रस्त मजारीस्थळी दाखल झालं होतं. माहिमच्या समुद्रकिनारी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मजारीच्या सभोवतालचं पाडकाम सुरू करण्यात आलं. आता राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर २४ तासांच्या आत या मजारीच्या आजूबाजूचं पाडकाम करण्यात आलं आहे. मागील दोन वर्षांपासून मजारीच्या बाजूला अनधिकृतरित्या बांधकाम केलं जात होतं. आज केवळ मजारीच्या बाजूचं हे बांधकाम पाडण्यात आलं.

६०० वर्ष जुनी मजार

६०० वर्ष जुनी मजार

माहिमच्या समुद्रात ही मजार आहे. या मजारीबाबत माहिम दरगाह ट्रस्टने मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्ष जुनी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हजरत मकदूम अली शाह याच ठिकाणी बसून हजरत ख्वाजा खिज्र अली शाह यांच्याकडून शिक्षण घेत असत. हे ऐतिहासिक ठिकाण आहे. माहीम दर्गाचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांनी या ठिकाणी कोणताही दर्गा बांधण्याचा आमचा विचार नसल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत या मजारीबाबत बोलताना सांगतलं, की काही दिवसांपूर्वी इथे काहीही नव्हतं. आता अनधिकृतपणे मजारीच्या बाजूला बांधकाम करण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. माहिम पोलीस स्टेशन तेथून जवळ आहे. महापालिका कर्मचारी तिथे फिरतही असतात. सर्वजण झोपले आहेत. कोणालाही काही माहित नाही. मजारीच्या आजूबाजूला झालेलं काम हटवण्यासाठी एक महिन्याचा वेळ देतो अशा इशारा राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत केला होता.

समुद्रात दर्गा उभारण्यात येत असल्याचा आरोप

समुद्रात दर्गा उभारण्यात येत असल्याचा आरोप

राज ठाकरेंनी माहिम येथील समुद्रात मजारीच्या आजूबाजूला करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यासाठी शिंदे सरकारला अल्टीमेटम दिलं होतं. जर एका महिन्याच्या आत मजारीच्या बाजूला झालेलं अनधिकृत बांधकाम हटवलं गेलं नाही, तर मनसे कार्यकर्ते त्या मजारीच्या बाजूला गणपती मंदिर बांधतील असाही इशारा दिला होता. राज ठाकरेंनी मजारीला दर्ग्याचं रुप दिलं जात असल्याचा दावा करत एक व्हिडिओदेखील दाखवला. व्हिडिओमध्ये असं दिसतंय, की समुद्रात मधोमध एक कबर आहे. तिथे बांधकाम सुरू आहे. काही लोक तिथे प्रार्थना करत असल्याचंही दिसतं व्हिडिओमध्ये दिसत होतं.

कारवाई न झाल्यास मोठं गणपती मंदिर उभारू

कारवाई न झाल्यास मोठं गणपती मंदिर उभारू

राज ठाकरेंनी मजारीच्या आजूबाजूचं बांधकाम हटवण्याचा अल्टीमेटम देत असाही आरोप केला, की मागील दोन वर्षांपासून इथे दर्गा तयार केला जात आहे. आणखी एक हाजी अली दर्गा तयार होत असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरेंनी ड्रोनद्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ दाखवत हा दर्गा कोणाचा आहे असा सवाल केला होता. तसंच एका महिन्याच्या आत या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला मोठं गणपती मंदिर उभारु असा इशारा दिला.

After Raj Thackeray’s warning, encroached site of ‘dargah’ in Mumbai’s Mahim demolished | Mumbai News

0

MUMBAI: Lest than 24-hours after Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray‘s warning, the encroached site of ‘dargah’ off the coast of Mahim in Mumbai was demolished on Thursday morning.
On Wednesday, in his ‘Gudipadwa Melawa’, Raj Thackeray showed a small video clip and warned authorities that if the illegal structure is not removed within a month, they will construct Ganapati temple.
Following that, authorities swung into action and a ‘mazar’ like structure was removed by the district collectorate with the help of BMC and police personnel.
The “mazar’ and the structure around it had come up illegally on revenue department land. A six-member team was formed for its demolition with the help of personnel from the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and Mumbai police, PTI quoted Mumbai city resident collector Sadanand Jadhav, as saying.
The demolition procedure began after team set up by the collector had visited the site.
“Now there is a government that walks on the path of Balasaheb Thackeray. Raj Thackeray raised the issue which was earlier raised by Balasaheb Thackeray. Proceedings have been initiated under the Coastal Regulation Zone (CRZ) and if any kind of construction has to be done in the sea, then permission should be taken under the CRZ,” ANI quoted Maharashtra minister Deepak Kesarkar, as saying.
– With agency inputs.

uddhav thackeray, अजून काहीही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंना सभागृहातच ऑफर – uddhav thackeray we still have time think about it bjp leader sudhir mungantiwar offer to uddhav after meeting with devendra fadnavis

0

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे कलुषित झाले असताना गुरुवारी विधाभवनात घडलेला एका ‘योगायोग’ सगळ्यांच्याच नजरेत भरला. विधानभवनाच्या आवारात आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. गेल्या काही दिवसांत परस्परांविरुद्ध केलेल्या टीकेमुळे एकेकाळी मित्र असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये आता बरेच अंतर पडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आल्यानंतर काय घडणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, या दोन्ही नेत्यांनी आश्चर्यकारकरित्या एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस गप्पा मारतच सभागृहाच्या दिशेने गेले. हा प्रसंग पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोच सभागृहात आणखी एक सूचक प्रसंग घडला.

देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे समोरासमोर आले, हसतखेळत गप्पा मारत विधिमंडळात, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात गेल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानपरिषदेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुधीर मुनगंटीवार युती सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या वृक्षसंवर्धन मोहीमेविषयी बोलत होते. त्यांनी म्हटले की, मी २०१६ मध्ये या योजनेची सुरुवात केली तेव्हा राज्याचे सर्व प्रमुख नेते तेथे उपस्थि होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेदेखील झाडं लावण्यासाठी गेले होते, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर सभागृहात बसलेल्या उद्धव ठाकरेंनी शाब्दिक कोटी केली. तुम्ही लावलेल्या झाडांना फळं आलीच नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यावर प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘झाडाला फळं येतील, असं आम्ही तुम्हाला वारंवार भेटून सांगत होतो. पण तुम्ही झाडाशी नातं तोडलं, त्याला आम्ही काय करणार? मी व्यक्तिगत येऊन तुम्हाला भेटत होतो. कोणत्या झाडाला कोणतं खत दिलं पाहिजे, हे सांगत होतो. पण तुम्ही झाडांना दुसरेच खत टाकले, मग त्याला फळं कशी लागणार, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

त्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शाब्दिक कोटी केली. तुम्ही मला खताबद्दल सांगत होतात की निरमा पावडरबद्दल. त्यावर मुनगंटीवार यांनी तात्काळा प्रत्युत्तर देताना म्हटले की, ते खतंच होतं, फक्त निरमा पाकिटामध्ये आणले होते, त्यावर नाव दुसरं होतं. पण तुमचा गैरसमज झाला. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य करुन उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे पुन्हा सोबत येण्याची साद घातली आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांशी झालेली भेट हा केवळ योगायोग असल्याचा दावा केला. मात्र, विधाभवनात एकाच दिवशी घडलेल्या या दोन सूचक घटनांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

Latest posts