Wednesday, March 22, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2172

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

anil jaisinghani police custody, अनिल-अनिक्षाची होणार समोरासमोर चौकशी, त्या चिठ्ठ्यांमधील मजकूर ‘डिकोड’ करण्याचा प्रयत्न – bookie anil jaisinghani and cousin sent to police custody

0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना एक कोटी रुपयांची ऑफर आणि त्यानंतर दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा यांना समोरासमोर बसवून पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. मंगळवारी न्यायालयाने अनिल आणि त्याचा नातेवाईक निर्मल यांना २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर अनिक्षा हिच्या पोलिस कोठडीत २४ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली. अनिक्षा ही चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सांगत, चार दिवसांत बऱ्याच गोष्टींचा तपास झाला असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

अनिक्षा हिची पोलिस कोठडी संपत असल्याने आणि अनिल, तसेच निर्मल यांना या गुन्ह्यात नव्याने अटक करण्यात आल्याने तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य सरकारी वकील जयसिंह देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांच्या तपासांत प्रगती आहे, आरोपींविरोधात अधिकचे पुरावे सापडले आहेत. आरोपीचे सीडीआर तपासण्यात आले असून, डोंगलच्या माध्यमातून इंटरनेट आणि व्हॉट्सअप कॉलवर ती सतत मुख्य आरोपीच्या संपर्कात होती. त्याचा ठावठिकाणा तिला माहिती होता. डोंगल हस्तगत करण्यात आला असून, तिने सुमारे शंभर जीबी डेटा वापरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांसह आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या मोबाइलमधील डेटा मिळवण्याचे काम सुरू आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी अनिक्षाची कोठडी वाढवून मागितली.

अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या वकिलाने अनिलला १९ तारखेच्या संध्याकाळी अटक होऊनही उशिरा न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी वकिलांनी हा आरोप फेटाळला. गुजरातहून आरोपींना केवळ ताब्यात घेतले होते. त्याची रिसतर स्थानिक पोलिसांना माहिती देऊन प्रक्रिया पूर्ण केली होती. अनिलला इथे आणले, ओळख पटवली आणि मगच कायदेशीर अटक करण्यात आली. अनिल जयसिघांनी आणि निर्मल जयसिंघानीला १९ मार्चच्या मध्यरात्री २ वाजता ताब्यात घेतले त्यानंतर सोमवारी संध्याकाळी मुंबईत आणल्यावर ५ वाजता अटक दाखवली. या दोघांकरता सरकारी वकिलांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. १० कोटींची खंडणी मागितल्याचे मोबाइल संदेश आढळले. मात्र, ज्या मोबाइलमधून हे मेसेज पाठवलेत तो अद्याप हस्तगत झालेला नाही. तो मिळवणे गरजेचे आहे, त्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक आहे, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अनिक्षा हिच्या पोलिस कोठडीत २४ मार्चपर्यंत वाढ केली, तर अनिल जयसिंघानी आणि निर्मल जयसिंघानी या दोघांना २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई पोलिसांचे ऑपरेशन जयसिघांनी; गुजरातमध्ये रात्रभर चालला थरारक पाठलाग, असा अडकला जाळ्यात
चिठ्ठ्यांमधील मजकूर ‘डिकोड’ करण्याचा प्रयत्न

आरोपी अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना बंद लिफाफ्यात काही चिठ्ठ्या पाठविल्या आहे. या चिठ्ठ्यांमधील मजकूर हा सांकेतिक भाषेत असून, तो समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. हस्ताक्षर तज्ज्ञाच्या मदतीने चिठ्ठीतील हस्ताक्षर हे अनिक्षाचेच असल्याचे तपासले जात असल्याचीही माहिती न्यायालयात देण्यात आली.

अमृता फडणवीस यांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं नेमकं काय घडलं

जयसिंघानीला २५ वर्षे सरकारी सुरक्षा

अनिल जयसिंघानीला तब्बल २५ वर्षे राज्य सरकारने सुरक्षा पुरवली होती. १९८४ पासून त्याने त्याच्याकडची गोपनीय माहिती तपास यंत्रणेला पुरवली. ज्याचा इतर अनेक प्रकरणांत पोलिसांना फायदाच झाला. अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

starbucks ceo, कोण आहेत लक्ष्मण नरसिंहन? ही कंपनी देते १४४ कोटींचा पगार तर इन्सेंटिव आणि बोनस वेगळा – who is laxman narasimhan starbucks new indian-origin ceo assumes office

0

नवी दिल्ली : लोकप्रिय कॉफीहाऊस चेन स्टारबक्सचे नवे सीईओ म्हणून लक्ष्मण नरसिंहन यांनी पदभार स्वीकारला आहे. भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची स्टारबक्सच्या सीईओ पदी गेल्या वर्षीच घोषणा करण्यात आली होती. लक्ष्मण नरसिंहन हे हॉवर्ड शुल्ट्झ यांची जागा घेतील. ५५ वर्षीय नरसिंहन यांच्याकडे कंपनीचा विस्तार आणि उलाढाल वाढवणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा विश्वास बळकट करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. नरसिंहन यांना जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी ते एमएनसी रेकिटचे सीईओ होते.

कोण आहेत लक्ष्मण नरसिंहन?
१५ एप्रिल १९६७ रोजी पुण्यात जन्मलेल्या नरसिंहन यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेले. तेथून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते २०१९ मध्ये रेकिटमध्ये रुजू झाला. कंपनीत दीर्घकाळ काम केले. कंपनीच्या वाढीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

टाटा ट्रस्टमधील खांदेपालट! सिद्धार्थ शर्मा नवीन CEO, देशाच्या राष्ट्रपतींचे होते आर्थिक सल्लागार
कोटी रुपये पगार
नरसिंहन हे गेल्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा त्यांचा पगार उघड झाला होता. द गार्डियनमधील एका अहवालानुसार, स्टारबक्सचे सीईओ म्हणून त्यांचा पगार १७.५ दशलक्ष डाॅलर म्हणजेच १४४ कोटी रुपये असेल. त्यांचा मूळ पगार १.३ दशलक्ष डाॅलरअसेल तर यासोबतच त्यांना पगाराच्या २००% इतके वार्षिक इन्सेंटिव दिले जाईल. इतकेच नाही तर त्यांना १२.७४ कोटी रुपये बोनस म्हणून मिळतील. जुनी कंपनी सोडल्यामुळे होणारे नुकसान भरपाई त्यांना मिळेल. याशिवाय, रेकिटचा बोनस सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून ९.३ दशलक्ष डाॅलर किमतीचे शेअर्स मिळतील. त्यांचा पगार रेकिटपेक्षा अडीच पट अधिक आहे. तिथे त्यांना सीईओ म्हणून ५५ कोटी रुपये वार्षिक पगार मिळत होता.

मुकेश अंबानींचे तीन व्याही, तिघांकडेही गडगंज संपत्ती… पाहा कोण आहे सर्वात श्रीमंत
मोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्व
नरसिंहन यांना रेकिट, पेप्सिको, मॅकिन्से अँड कंपनी यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव आहे. २०१२ ते २०१९ पर्यंत त्यांनी पेप्सिकोमध्ये मुख्य जागतिक वित्तीय अधिकारी म्हणून काम केले. त्याच वेळी मॅकिन्से अँड कंपनीत काम करताना अमेरिका, आशियामध्ये कंपनीच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना ई कॉमर्समध्ये काम करण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

मधुमेह-हाय बी. पी. साठी एकच गोळी; सावर्डे फार्मसी कॉलेजच्या अश्विनी पाटील यांनी मिळविले पेटंट

0








चिपळूण : समीर जाधव : अलीकडे मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. माणसाच्या आरोग्याच्या समस्येत हे दोन आजार मोठी अडचण ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले असून, या औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे. आजपर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारचे दोन्ही आजारांसाठी एकच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना एकच गोळी तयार होणार असून, औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणार आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर चांगले आरोग्य लाभावे म्हणून या दिवशी कडूलिंबाचा रस घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर मुधमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी हे पेटंट लाभदायक ठरणार आहे. या बाबत गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे येथील महाविद्यालयात केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा. अश्विनी पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.
हेे संशोधन हे औषध निर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध एक संजीवनी ठरणार आहे. अनेक औषधे रक्तात जात नाहीत तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम मिळत नाही. याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला असून त्यावर उपाय म्हणून हे औषध तयार करताना नॅचरल पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या औषधाचा मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर परिणाम होतो, हे संशोधनात तपासण्यात आले आहे. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचे इमिडीएट रिलीज तसेच मेटफॉरमीन नावाच्या ब्लड शुगर कंट्रोल करणार्‍या औषधाचे सस्टेन रिलीज लेयर असणारी एक बायलेअर टॅबलेट बनवण्यात आली असून तिच्या ड्रग रिलीजचा अभ्यास करण्यात आला. आजपर्यंत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा दुष्परिणाम किडणीवर देखील होतो. साईडइफेक्टस् वाढतात. याशिवाय रुग्णांना दोन प्रकारची औषधे घेणे खर्चिक पडते. पण नव्या संशोधनामुळे भविष्यात या दोन्ही आजारांसाठी एकच गोळी मिळणे शक्य होणार आहे. भारत सरकारने या औषधासाठी आपल्याला पेटंट दिले आहे. मात्र, ही गोळी बाजारात येण्यास अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. परंतु मधुमेही आणि उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांसाठी हे औषध महत्त्वाचे ठरेल असा विश्वास प्रा. पाटील यांनी ’पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

सिंथेटिक पोलिमर पेक्षा नैसर्गिक पॉलिमर्सचा औषधांच्या रिलीज प्रोफाइलवर कश्या पद्धतीने चांगला परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. तसेच नैसर्गिक पॉलिमरच्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनचा औषधाच्या रिलीजवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आलेला असून जो मेटफार्मिंनसारख्या कमी बसॉपशन विंडो असणार्‍या औषधांच्या सस्टेन रिलीज साठी खूप महत्त्वाचा आहे.

या संशोधनात प्रा. पाटील यांच्यासोबत प्रा. श्री मदन पोमाजे,अखिल काणेकर व श्वेता शिरोडकर यांचाही सहभाग होता. या संशोधनाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर निकम, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, सचिव महेश महाडिक आदींनी अभिनंदन केले आहे.

आजपर्यंत मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना बाजारात स्वतंत्र औषधे उपलब्ध आहेत. परंतु, जर या दोन्ही आजारांच्या रुग्णांसाठी एकच गोळी निर्माण झाली, तर औषध निर्माण क्षेत्रात ती क्रांती ठरेल. या गोळीमुळे मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही. रुग्णांना कमी औषधे द्यावी लागल्याने त्याचे जास्त साईडइफेक्ट होणार नाहीत. किडणीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच खर्चाच्या द़ृष्टीनेही ही गोळी परवडणारी ठरेल व त्यातून रुग्णांचे पैसे वाचतील. अशी गोळी बाजारात आल्यास मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ती वरदान ठरेल.
– डॉ. सुनील कोतकुंडे









India to have a billion air travellers by 2040 & Navi Mumbai Airport phase-1 by next Dec: Adani Airports CEO Bansal

0

NEW DELHI: The Adani Group — India’s largest private airport operator (in terms of number of airports in its portfolio) that currently manages seven operational airports including Mumbai’s CSMIA and is building the upcoming hub at Navi Mumbai — expects India to have a billion air travellers by 2040, with passenger traffic growing by an average 8.5% over the next 20 years. Adani Airport Holdings Limited (AAHL) CEO Arun Bansal made this forecast at a CAPA summit in Delhi on Wednesday, while adding the group will bid for more airports in the future. The focus is also on city-side development because India an average three people come to recover or see off every passenger.
The existing Mumbai Airport is running to capacity and all eyes are on the upcoming Navi Mumbai International Airport (NMIA) to cater to the megapolis’ growing air connectivity requirement. Bansal says NMIA is being developed with an ultimate capacity to handle 9 crore (both domestic plus international) passengers and 2.5 million MT of cargo per annum.

India emerging aviation power? Air India deal, new airports to usher golden time

11:22

India emerging aviation power? Air India deal, new airports to usher golden time

“After completion of phase one in December 2024, the remaining phases will be implemented over the next 15 years subject to growing passenger volume and external connectivity. The commissioning of NMIA’s Terminal 1 will cater to 2 crore passengers annually along with 0.8 million tonne of cargo handling capacity. The combined impact along with the existing airport under a single ownership structure will see the clawback of Mumbai as a significant national hub and a return of growth…. aid in further capacity and cross-leveraged development of other airports under the Adani portfolio,” Bansal said. Adani is working on ensuring transportation between the upcoming Navi Mumbai Airport and CSMIA so that they can operate as one airport with five terminals ecosystem.
While air travel is almost back to pre-Covid levels, new airports getting operational and over 30 cities getting dual hubs will see the billion mark by 2040 — up from current 20 crore (domestic plus international). “Apart from business travel, spurt in tourism is bringing passengers back to the airports. (In the last one year) our seven airports together saw an increase of 133% and 92% in international and domestic travellers, respectively,” Bansal said. He said AAHL is using technology to speed up airport processes for passengers. “We monitor service level and quality of experience provided at our airports. Our teams drive audits to ensure service levels are maintained and subpar service is rectified.”

He gave the example of Mumbai’s Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) newly-introduced terminal transfer facility as a case in point. “Travellers with domestic flight connections at CSMIA can now easily transfer with reduced transit time. With rising passenger footfall for domestic as well as international travel, this new domestic-to-domestic (DTD) transfer offerings will further make the airport experience much smoother,” Bansal added. “This dedicated space has pre-embarkation security checks and will considerably cut down the minimum connection time (MCT) for transfer passengers and crew members. Airlines will now be able to accommodate passengers with a lesser time interval between their connecting flights. This enhancement will make the journey seamless for our passengers who otherwise would earlier exit & re-enter the terminal and further wait for their onward flight will now be able to reach domestic departure concourse without undergoing the process of re-entering the terminal building,” he said.

AAHL says it aims to be a green airport operator. The focus on carbon neutrality will see it transition from traditional fossil fuel energy consumption to green energy for emission reduction. CSMIA has achieved the highest-level 4+ ‘Transition” of Airport Carbon Accreditation (ACA) programme of Airport Council International due to its carbon footprint management that Bansal says includes taking steps like: entirely switched to green sources for its energy consumption needs, making CSMIA one of India’s 100% sustainable airports; onsite renewal power generation plant augmented to 4.65 MW capacity; installing unique vertical axis wind turbine & solar PV system of capacity 10KWp in March 22, with 4 additional units to be installed in FY 23 and conversion of higher global warming potential (GWP) refrigerant in AC’s and chillers to lower GWP refrigerant and using 45 electric vehicles. The upcoming NMIA will also have a number of sustainable projects. These include solar energy generation on airside; roof-top solar panels for all buildings and EVs on airside and landside.

tejas thackeray, Gudi Padwa: गिरगावच्या शोभायात्रेत आदित्य दादापेक्षा तेजस ठाकरेंचीच चर्चा, राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण – gudi padwa 2023 uddhav thackeray son tejas thackeray may join maharashtra politics banners in girgaon mumbai

0

मुंबई: तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील आगमनाची चाहूल चाहूल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लागली आहे. गिरगाव येथे गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त तेजस ठाकरे यांचे बॅनर लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र आदित्य ठाकरे हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. पण या सगळ्यापासून कोसो दूर असलेले तेजस ठाकरे हेदेखील राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा अधुनमधून होत असतात. सध्याचा काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी अत्यंत कसोटीचा आणि बिकट आहे. या संकटाच्या काळात वडिलांना साथ देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा गिरगावातील बॅनर्समुळे रंगली आहे.

मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील तेजस यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या परिसरात आकर्षक मिरवणुका निघत असतात. गिरगावातील शोभायात्रेसाठी आलेल्या लोकांचे स्वागत करतानाचे तेजस ठाकरे यांचे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. गिरगावातील शोभायात्रेत आज आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीपेक्षा गिरगावात तेजस ठाकरे यांच्या बॅनर्सची जास्त चर्चा रंगली होती.

तेजस ठाकरेंच्या लाँचिंगवर ‘आदित्य दादा’ची प्रतिक्रिया, उत्तर देताना ठाकरे स्टाईल पंच मारलाच
तेजस ठाकरे यांना वन्यजीवन आणि प्राणीशास्त्रात गती आहे. एरवी ते जंगलातील प्राण्यांचा अभ्यास आणि संशोधनात रमलेले असतात. परंतु, ठाकरेंवर एकापाठोपाठ आलेल्या संकटानंतर तेजस ठाकरे यांच्या राजकीय एन्ट्रीची वारंवार चर्चा होताना दिसत आहे. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी गेल्य वर्षी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात दिली होती. तेव्हापासूनच तेजस हे राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Tejas Thackeray: तेजस ठाकरे जंगलात पाल-सरडे शोधायचे, त्यांना राजकारणाचा काडीचा अनुभव नाही: निलेश राणे

यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावेळीही तेजस ठाकरे यांचे राजकीय लॉचिंग होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर दहीहंडी उत्सवाच्या काळातही गिरगावात तेजस ठाकरे यांचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ असा करण्यात आला होता. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्या हातात युवासेनेची सूत्रे दिली जातील, असा अंदाज अनेकांना वर्तविला होता. मात्र, अद्यापपर्यंत तेजस ठाकरे यांनी स्वत:हून राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही.

मधुमेह-हाय बी. पी. साठी एकच गोळी; सावर्डे फार्मसी कॉलेजच्या अश्विनी पाटील यांनी मिळविले पेटंट

0








चिपळूण : समीर जाधव : अलीकडे मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. माणसाच्या आरोग्याच्या समस्येत हे दोन आजार मोठी अडचण ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. अश्विनी भाऊसाहेब पाटील यांनी मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी एकच औषध तयार केले असून, या औषधाला भारत सरकारने पेटंट बहाल केले आहे. आजपर्यंत बाजारपेठेत अशाप्रकारचे दोन्ही आजारांसाठी एकच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना एकच गोळी तयार होणार असून, औषध निर्माण क्षेत्रात हे संशोधन क्रांती करणार आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडूलिंबाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर चांगले आरोग्य लाभावे म्हणून या दिवशी कडूलिंबाचा रस घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर मुधमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांसाठी हे पेटंट लाभदायक ठरणार आहे. या बाबत गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे येथील महाविद्यालयात केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा. अश्विनी पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन अँड मेटफॉरमीन युसिंग नॅचरल पॉलिमर्स या संशोधन कार्यास पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे.
हेे संशोधन हे औषध निर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे औषध एक संजीवनी ठरणार आहे. अनेक औषधे रक्तात जात नाहीत तोपर्यंत त्याचा योग्य परिणाम मिळत नाही. याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला असून त्यावर उपाय म्हणून हे औषध तयार करताना नॅचरल पॉलिमरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या औषधाचा मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर परिणाम होतो, हे संशोधनात तपासण्यात आले आहे. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचे इमिडीएट रिलीज तसेच मेटफॉरमीन नावाच्या ब्लड शुगर कंट्रोल करणार्‍या औषधाचे सस्टेन रिलीज लेयर असणारी एक बायलेअर टॅबलेट बनवण्यात आली असून तिच्या ड्रग रिलीजचा अभ्यास करण्यात आला. आजपर्यंत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घ्याव्या लागतात. याचा दुष्परिणाम किडणीवर देखील होतो. साईडइफेक्टस् वाढतात. याशिवाय रुग्णांना दोन प्रकारची औषधे घेणे खर्चिक पडते. पण नव्या संशोधनामुळे भविष्यात या दोन्ही आजारांसाठी एकच गोळी मिळणे शक्य होणार आहे. भारत सरकारने या औषधासाठी आपल्याला पेटंट दिले आहे. मात्र, ही गोळी बाजारात येण्यास अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. परंतु मधुमेही आणि उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांसाठी हे औषध महत्त्वाचे ठरेल असा विश्वास प्रा. पाटील यांनी ’पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

सिंथेटिक पोलिमर पेक्षा नैसर्गिक पॉलिमर्सचा औषधांच्या रिलीज प्रोफाइलवर कश्या पद्धतीने चांगला परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. तसेच नैसर्गिक पॉलिमरच्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनचा औषधाच्या रिलीजवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आलेला असून जो मेटफार्मिंनसारख्या कमी बसॉपशन विंडो असणार्‍या औषधांच्या सस्टेन रिलीज साठी खूप महत्त्वाचा आहे.

या संशोधनात प्रा. पाटील यांच्यासोबत प्रा. श्री मदन पोमाजे,अखिल काणेकर व श्वेता शिरोडकर यांचाही सहभाग होता. या संशोधनाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर निकम, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, सचिव महेश महाडिक आदींनी अभिनंदन केले आहे.

आजपर्यंत मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना बाजारात स्वतंत्र औषधे उपलब्ध आहेत. परंतु, जर या दोन्ही आजारांच्या रुग्णांसाठी एकच गोळी निर्माण झाली, तर औषध निर्माण क्षेत्रात ती क्रांती ठरेल. या गोळीमुळे मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेगवेगळ्या गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही. रुग्णांना कमी औषधे द्यावी लागल्याने त्याचे जास्त साईडइफेक्ट होणार नाहीत. किडणीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच खर्चाच्या द़ृष्टीनेही ही गोळी परवडणारी ठरेल व त्यातून रुग्णांचे पैसे वाचतील. अशी गोळी बाजारात आल्यास मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ती वरदान ठरेल.
– डॉ. सुनील कोतकुंडे









Ramila Latpate Celebrated Gudi Padwa with PM Modi; जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटेला PM मोदी म्हणाले,’काही अडचण आल्यास थेट मला फोन कर’

0

पुणे: महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.

वर्ल्डकप ६ महिन्यांवर असताना द्रविड यांनी डायरेक्ट पत्ते उघड केले; संघात यांना मिळणार संधी

Ramila latpate with pm

रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथून सुरु झालेला प्रवास आज १५७२ किलोमीटर मोटरसायकल चालवत दिल्ली मध्ये पोहचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि भेट झाली.

Ramila latpate with pm

महेश मांजरेकरांसह सगळेच कलाकार जमिनीवर बसून जेवले; ‘वेडात मराठे…’च्या टीमचा व्हिडीओ व्हायरल

संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तर माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली. लटपटे यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

IND vs AUS: निर्णायक वनडेत कसे असेल पिच, हवामान आणि प्लेइंग ११; ‘एक्स फॅक्टर’ मात्र एकच…
धाडसी प्रवास, धाडसी निर्णय
सामाजित कार्यकर्त्या असलेल्या रमिला यांचा या प्रवासामागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती सोबत राज्यातील सर्व खास वैशिष्ट्ये जगासमोर आणणे होय. रमिला इंडियन कल्चरला प्रमोट करण्यासाठी हा धाडसी प्रवास करणार आहे. या प्रवासात त्या जवळपास १ लाख किलोमीटरचा बाइक्सचा प्रवास करणार आहे. या वर्षभरात ३० हून जास्त देशात जाणार आहेत. या प्रवासाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे रमिला हा संपूर्ण प्रवास साडी नेसून करणार आहेत.

private travels give 50 percent discount for women, गुढीपाडव्याला डबल आनंद; ST पाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सूट – good news 50 percent discount for women traveling by private travels followed by st

0

चंद्रपूर: एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसेस मध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याची चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने घोषणा केली आहे. काल संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयावर आजपासून म्हणजे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्यात. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आता महिला प्रवाशांना आनंदाचा डबल डोज मिळणार आहे. चंद्रपूर- गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने आपल्या बसेस मध्ये महिला प्रवश्याना ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली.मंगळवारला संघटनेची बैठक झाली. या बैठकीत ५०% सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या घोषणाची अमलबजावणी सुरू झालेली आहे. ट्रॅव्हल्स ने ये जा करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. संघटनेने घेतलेल्या या निर्णयावर महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमीला लटपटेला PM मोदी म्हणाले,’काही अडचण आल्यास थेट मला फोन कर’
का घेतला निर्णय…

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांनी स्वागत केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असे ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल यांनी सांगितले.

एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट; सरकारच्या निर्णयाचं महिलांकडून कौतुक


काय म्हणाल्या महिला प्रवासी…

आज महागाईनं टोक गाठल आहे. प्रवासही महागला आहे. प्रवासात ५० टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यासोबतच आता ट्रॅव्हल्स मालकांनी ५०% सूटच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महागाईच्या भार कमी होईल, असे महिला प्रवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारने एसटी बसच्या सवलती सोबतच महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे म्हटले होते.

watchman beaten to death, चौकीदाराला चोर समजून बेदम मारलं; उपस्थित लोक तमाशा पाहत राहिले; शेवट भयंकर झाला – gujarat migrant labour working as watchman beaten to death on suspicion of being thieves

0

गांधीनगर: गुजरातच्या अहमदाबादमध्ये नेपाळी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. मृत पावलेला तरुण सुरक्षारक्षक होता. मात्र टोळक्याला तो चोर वाटला. चोर समजून टोळक्यानं नेपाळी तरुणाला मारहाण केली. यावेळी बरीच गर्दी जमली होती. अनेकांनी मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद केली. मात्र कोणीही सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.

अहमदाबादच्या चांगोदरजवळ ही संपूर्ण घटना घडली. ३५ वर्षांचा कुलमन गगन चांगोदर औद्योगिक विभागात सुरक्षा रक्षकाचं काम करत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास गगन घरी जायला निघाला. तेव्हा स्थानिकांनी त्याला चोर समजून मारहाण केली. त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी गगनला निर्दयीपणे मारहाण केली. त्यावेळी आसपासचे लोक तमाशा पाहत होते. अनेकांनी मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद केली. मात्र कोणीही गगनच्या मदतीसाठी पुढे आलं नाही, असं चांगोदर पोलिसांनी सांगितलं.
रेल्वे स्टेशनच्या टीव्हीवर पॉर्न VIDEO; विषय इंटरनॅशनल ‘प्लॅटफॉर्म’वर; एडल्ट स्टार म्हणते..
घटनेची माहिती मिळताच चांगोदर पोलीस पोहोचले. तेव्हा पोलिसांना पाहून टोळक्यातील तरुणांना पळ काढला. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. गगनच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली. मारहाणीच्यााा व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

इश्वर कोळी (५१), संजय ठाकोर (१८), राहुल ठाकोर (१९), मनू कोळी (५५), आकाश ठाकोर (२२), चेतन साधू (२४), सुरेश ठाकोर (२४), नवघन ठाकोर (२८), राईजी पिंटू ठाकोर (२८) आणि राईजी विरू ठाकोर (३१) अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींची चौकशी सुरू आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बँकिंग संकट! मोठ्या बँका कशा बुडतात, तुमच्या पैशाचे काय? नुकसान कसं टाळायचं एका क्लिकवर – bank crisis explainer what is bank collapse and how much money safe if bank fails

0

नवी दिल्ली : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेचं दिवाळं निघालं आहे. यानंतर युरोपमधील सर्वात मोठी बँक, क्रेडिट सुईस देखील कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या दोन आठवड्यांत अमेरिका आणि युरोपच्या बँकिंग क्षेत्रात सुनामी आली असून जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. आपल्या बँक बुडाली तर काय होईल, अशी भीती सर्वसामान्य बँक ग्राहकांना वाटतेय. भारतीय बँकाही अशा परिस्थितीतून गेल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी येस बँक देखील बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती मात्र, सरकार आणि रिझर्व्ह बँकेमुळे बँक तर वाचली, पण बँकेत जमा झालेल्या पैशाची चिंता लोकांना लागली होती. एवढ्या मोठ्या बँका दिवाळखोर कशा होतात, असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. बँकांचे अपयश म्हणजे काय? बँका रातोरात कशा बंद होतात? बँक बंद पडल्यास सर्वसामान्यांच्या खात्यातील पैशांचे काय होईल आणि त्यांचे नुकसान टाळण्याचा मार्ग काय आहे? या सर्व प्रश्नांबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.

जागतिक अर्थसंकटाच्या झळा! बँकिंग संकटाची झळ भारतातही; २० लाख कोटींचा व्यवसाय संकटात!
बँक कोसळते तेव्हा काय होते?
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही बँक बुडणे म्हणजे काय? बँकांचे डबघाईला निघणे म्हणजे बँक अशा परिस्थितीत पोहोचली की नियामकाला ती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, तर त्याला बँकेचे अपयश म्हणतात. बँकेच्या दिवाळखोरीच्या बाबतीत नियामक खातेदार आणि गुंतवणूकदारांच्या हितासाठी ती बंद करण्याचा निर्णय घेतो. कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे बँक बंद करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

बँक जेव्हा आपल्या ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही तसेच ते सुरू राहिल्यास बँकेच्या खातेदारांसाठी धोकादायक ठरू शकते हे पाहून नियामक बँक बंद करण्याचा निर्णय घेतो.

Bank Crisis: टेन्शन वाढले! जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’, मोजावी लागू शकते मोठी किंमत
बँक केव्हा डुबते?
जर एखाद्या बँकेकडे खातेदार आणि गुंतवणूकदारांना देण्यासाठी रोख रक्कम नसेल तर अशा परिस्थितीत बँकेला दिवाळखोर घोषित केले जाते. जेव्हा बँकेच्या मालमत्तेपेक्षा अधिक दायित्वे असते आणि गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू लागतात तेव्हा बँकेची आर्थिक स्थिती बिकट होते. बँकेकडे जेव्हा रोख रक्कम इतकी कमी होते की ती ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही, तेव्हा बँकेला दिवाळखोर घोषित केले जाते. दिवाळखोरी म्हणजे बँक डबघाईला निघणे. बँक कोलमडताच बँकेतील ठेवी काढण्यावर बंदी घातली जाते. एकूणच बँकेच्या सर्व सेवा बंद केला जातात.

अमेरिकेच्या दोन बँक दिवाळखोरीत, भारतीय बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे का? RBI गव्हर्नर म्हणतात…
बँक बुडाल्यास ग्राहकांच्या पैशाचे काय होणार?
बँक बंद पडल्यास भारतात यासाठी कायदा आहे. बँक कोलमडल्यावर बँक खाती गोठवली जातात, म्हणजे खात्यातून पैसे काढण्यास बंदी घातली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC, दिवाळखोर बँकेच्या खातेदारांना, सुरक्षित केलेली रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत परत केली जाते. म्हणजेच तुम्हाला तुमच्या खात्यातील जमा पाच लाख रुपये तुम्हाला मिळतील.

नुकसान टाळण्यासाठी काय करावे?
बँक बुडाल्यास तुमचे होणार नुकसान टाळण्यासाठी जर तुम्ही बँकेत ठेवलेली एकूण रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते एकाच बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करा. उदाहरणार्थ, तुम्ही १५ लाख रुपये तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये विभाजित करून जमा करा, जेणेकरून तुमचा एक रुपयाही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत बुडणार नाही.

Latest posts