Tuesday, March 21, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2168

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

IND vs AUS 3rd ODI: Mitchell Starc threat looms large as India face Australia in ODI series finale | Cricket News

0

CHENNAI: Scores of 39/4 and 49/5 after 10 overs aren’t quite what one is used to seeing in ODIs on Indian belters, especially when the home team is batting. But that’s exactly how things panned out in Mumbai and Vizag against Australia. Though the situation could be managed at the Wankhede, things spiralled out of control in the second ODI.
India’s colossal collapse on Sunday has set the stage up for a ‘final’ at the Chepauk on Wednesday and the chief architect behind this dramatic denouement is Aussie tearaway Mitchell Starc.
India’s much-vaunted top-order has been unable to deal with the pace and swing he has generated. With figures of 3/49 and 5/53, he has shaped up into a serious headache for India ahead of the midweek blockbuster.
The Chepauk pitch, which will be the home for Chennai Super Kings in the IPL starting later this month, is likely to be a traditional made-to-order slow track, primarily prepared with the franchise in mind. But Starc has the ability to take the pitch out of the equation with his pace and swing. And with the humidity and sea breeze around, there is every chance he will make the ball talk yet again on Wednesday.

Embed-GFX1-2103

“Starc has the ability to bring the ball back at the right-hander at a pace of 145 kmph. His action is also round-arm and pacers like that — be it Mitchell Johnson, Lasith Malinga or Waqar Younis — have always been successful against India,” former India pacer L Balaji told TOI.

While the incoming ball has been a huge problem for the likes of Virat Kohli and Suryakumar Yadav — who has got two back-to-back golden ducks — Starc also has the ability to take one away from the right-hander as a surprise delivery. Rohit Sharma mentioned about that delivery after India’s loss in Vizag and it’s his opening partner Shubman Gill, who has fallen to that trap in both the games.
The talented opener has looked to play the expansive drive away from the body and has ended up giving catches in the gully region.
“The only way to deal with a pacer like that is to play him late. Let the ball do whatever it wants to do and then play the shot,” Balaji said.

Embed-GFX2-2103

The other option, as pointed out by Sunil Gavaskar during an analysis after the second ODI, is to try and play Starc as straight as possible, especially in the first few overs.
“The tendency to play across the line against that kind of pace so early can cause a few problems,” Gavaskar said.
Balaji, with all his experience of playing at the Chepauk, feels India can just try and be cautious against Starc in the first few overs.

India’s top 5 lowest scores

“It’s a matter of two or three overs. If the top-order can go through that period, Starc can leak runs because the ball won’t do that much when the pacer tries to pitch it up, because that’s his natural style. Later in the innings, reverse swing can come into the equation but by then the runs should be on the board,” Balaji said.
The Indian think-tank, too, would be trying to find ways to deal with this threat before it turns into a menace, especially with the teams slotted to meet each other for a bigger prize in June. And who knows, even in November as well!

Cricket Batsmen.

salman khan, याला म्हणतात विश्वास! सलमानचा कडक सुरक्षेवर आक्षेप, म्हणाला- जेव्हा जे होईल तेव्हा होईल – salman khan reaction on threats received and actor security

0

मुंबई- अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वी ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. सलमानच्या घराबाहेर अनेक पोलीस कर्मचारी तैनात होते. पण सलमानच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, अभिनेत्याला इतक्या कडक सुरक्षेवर आक्षेप आहे. जवळचे कुटुंब, मित्र आणि चाहते अभिनेत्यासाठी चिंतेत असताना, सलमान मात्र या धमक्यांना अजिबात घाबरलेला नाही.

सलमान आणि त्याच्या कुटुंबाच्या एका जवळच्या मित्राने ई-टाइम्सला सांगितले की सलमान एकतर ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे किंवा त्याच्या कुटुंबाने अजून चिंता करू नये म्हणून सामान्य असल्याचे भासवत आहे. कौटुंबिक दबावामुळे सलमानने बाहेरचे सर्व प्लॅन रद्द केले आहेत. शूटिंग आणि प्रमोशनही थांबवले आहे.

एक सोफा आणि डायनिंग टेबलसह 1 BHK मध्ये राहतो सलमान खान, भाईजानची लाइफस्टाइल हैराण करणारी
मुलाच्या चिंतेत सलीम खान रात्रभर झोपू शकले नाहीत

सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितले की, अभिनेत्याला देण्यात आलेली ही कडक सुरक्षा अजिबात आवडली नाही. या कठीण काळात संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि कोणीही या कठीण काळात त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाखवून देत नाहीये. एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमानचे वडील सलीम खानदेखील खूप शांत दिसत आहेत. परंतु, ज्या दिवसापासून सलमानला धमकी मिळाली त्या दिवसापासून ते शांत झोपू शकले नाहीत हे तर साऱ्यांनाच माहीत आहे.

सलमानने सुरक्षेवर घेतला आक्षेप

सलमान या सुरक्षेच्या विरोधात होता आणि त्याला अजूनही या सर्व गोंष्टींवर आक्षेप आहे. मित्राने सांगितले की, ‘सलमानला असे वाटते की या धमकीकडे जितके लक्ष दिले जात आहे तितकेच आपण धमकी देणाऱ्या व्यक्तीलाही महत्त्व देत आहोत. यामुळे गुंडांना असे वाटेल की ते त्यांच्या योजनेत यशस्वी झाले. सलमान खूप बेधडक आहे आणि तो अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही. जेव्हा कोणती गोष्ट घडायची असेल तेव्हा ती घडेल, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र कौटुंबिक दबावामुळे सलमानने त्याचे सर्व बाहेरील कामं आणि इतर प्लॅन रद्द केले आहेत. त्याने ‘किसी का भाई किसी की जान’चे पोस्ट प्रॉडक्शन ठरल्यावेळीच होणार आहे. कारण त्याला उशीर करून चालणार नाही.

Salman Khan Death threats: सलमानच्या घराबाहेर तगडी सिक्युरिटी, प्रत्येक गोष्टीवर असेल नजर
सलमानला यापूर्वीही आल्या होत्या धमक्या

याआधीही सलमानला दोन ते तीनवेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं कळतं. २०१९ मध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती. काही महिन्यांपूर्वी सलमानला धमकीचे पत्र पाठवण्यात आल्याचेही समोर आले होते, जे त्याचे वडील सलीम खान यांना मिळाले होते. त्यात लिहिले होते की, सिद्धू मूसेवाला सारखीच अवस्था तुझी आणि सलीम खान यांची होणार आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले असून या प्रकरणात तो सध्या भटिंडा तुरुंगात आहे.

तर आम्ही शाहरुखलाच मारलं असतं, तुरुंगातून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिली पुन्हा धमकी
अलीकडेच बिश्नोईने तुरुंगातून एक मुलाखत दिली होती, ज्यात त्याने सलमानला काळवीट मारल्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असे सांगितले होते. ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान यांच्यावर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असल्याची माहिती आहे.

school bus accident, Ratnagiri : मुंबई-गोवा महामार्गावर स्कूल बसला मोठा अपघात, सुदैवाने १४ मुले बचावली – school bus accident on mumbai goa highway in chiplun ratnagiri

0

चिपळूण, रत्नागिरी : कोकणातील मुंबई-गोवा महामार्गवर अनेकदा अपघात घडले यामध्ये अनेक जणांचा जीवही गेला आहे. आता पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे स्कूल बसला अपघात झाला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून १४ विद्यार्थी बचावले आहेत.

कापसाळ येथे कार आणि स्कूल बसमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बचावले आहेत. चिपळूणमध्ये महामार्गावर झालेल्या या अपघातात विदर्भ कोकण बँकेची बोलेरो उलटली. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतर बोलेरो अक्षरशः उलट्या दिशेला फिरून उलटली.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता बंद ठेवून कामं केली जात आहेत. मात्र त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात यातूनच झाला. सोमवारी हा अपघात झाला.

बाईकसमोर बैल आडवा, तरुणाचा भीषण अपघात; नर्स पत्नीचे शर्थीचे प्रयत्न, पण काळापुढे हात टेकले
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा वाहनाचा चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडच्या दिशेने निघाला होता. कामथे येथे येताच स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच उलटली. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. यावेळी स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. अपघातात कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

mumbai rain updates, मुंबईकरांनो सावधान! वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस; हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट – mumbai rain thane panvel region thunderstorm accompanied with lightning gusty winds for next 3 4 hours imd alert for mumbai

0

Mumbai Rain updates | गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही जोरदार पाऊस बरसताना दिसत आहेत.

 

Mumbai Rain updates
मुंबईत जोरदार पाऊस

हायलाइट्स:

  • मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस
  • आकाशात काळ्या ढगांची गर्दी
  • वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे
मुंबई: मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस लागून राहिला आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी आज सकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमन्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्स काही मिनिटांच्या विलंबाने धावत असल्या तरी अद्याप रेल्वे वाहतुकीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. सकाळी धावपळीच्या वेळेत चाकरम्यानांना छत्र्या घेऊन ऑफिस गाठण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल. यावेळी ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याचा जोरही राहील. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ३० ते ४० KMPH वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात पुढील काही तासांत पावसाची तीव्रता कायम राहील.

दरम्यान, आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाच्या सरी अधुनमधून बरसत आहेत. मात्र, पावसाचा जोर आणखी वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाच्या आणखी काही सरी बरसण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना ऐन मार्च महिन्यात पावसाळी ऋतुचा अनुभव येत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

| pune news Water Cut on thursday 23 March which areas will the water supply be shut off in marathi

0

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी…पुण्यातील (pune water supply news today) काही भागांमध्ये पाणी येणार नाही आहे. त्यामुळे आजपासून पाणी जपून वापरा. जाणून घ्या कधी आणि कुठल्या परिसरात पाणी कपात होणार आहे. (Pune News)


Updated: Mar 21, 2023, 07:47 AM IST

Pune News : पाणी जपून वापरा! पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

pune news Water Cut on thursday 23 March which areas will the water supply be shut off in marathi

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा आज अर्थसंकल्प; काय पडणार ठाणेकरांच्या पदरात? उत्सुकता शिगेला

0

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून सादर होणार असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. ठाणे शहरासाठी राज्याच्या तिजोरीतून सढळ हस्ते निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांच्या ठाण्या’च्या अर्थसंकल्पाबद्दल ठाणेकरांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. सध्या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेऐवजी आयुक्त थेट अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आयुक्त अभिजीत बांगर ठाणे महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचीही छाप अर्थसंकल्पावर दिसण्याची शक्यता आहे.सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिकेच्या आय़ुक्तपदाचा पदभार अभिजीत बांगर यांनी स्वीकारला. आयुक्त बांगर यांनी ठाणे शहरामध्ये आल्यापासून शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालये, खड्डे आणि रस्ते या घटकांवर सर्वाधिक लक्ष देऊन त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थसंकल्पातून भविष्यातील ठाणे शहराचे नियोजन करण्याची संधी आय़ुक्त अभिजीत बांगर यांच्या हाती असून त्याचा कसा उपयोग करतात ते आजच्या अर्थसंकल्पातून समोर येणार आहे.एक हजार कोटींची वाढ?ठाण्याचे नेते राज्याच्या सर्वोच्चपदी असल्यामुळे यंदा अर्थसंकल्पामध्ये एक हजार कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाचा अर्थसंकल्प चार हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या माध्यमातून निवडणुकांच्या दृष्टीने अनेक आकर्षक घोषणांची अपेक्षा ठाणेकरांना लागली आहे.अनुदान की कर्ज?ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च वाढला आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटी अनुदानातून हा खर्च भागवला जात असून त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे ठेकेदारांचे २८०० कोटींपर्यंतची देणी शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त अनुदानातूनच हा खर्च भागवणार की महापालिका यासाठी कर्ज घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या १३ वर्षातील अर्थसंकल्पांचा आढावाआर्थिक वर्ष तारीख आयुक्त मूळ अंदाजपत्रक२०१०-११ २० फेब्रुवारी २०१० नंदकुमार जंत्रे १३२९ कोटी२०११-१२ ११ फेब्रुवारी २०११ आर. ए. राजीव १७३६ कोटी२०१२-१३ २०१२ (निवडणूकीमुळे महासभेची मंजुरी) आर.ए.राजीव २१७५ कोटी२०१३-१४ १५ फेब्रुवारी २०१३ आर. ए. राजीव १९०४ कोटी२०१४-१५ १८ फेब्रुवारी २०१४ असीम गुप्ता २१६६ कोटी२०१५-१६ १८ फेब्रुवारी २०१५ संजीव जयस्वाल १९९८ कोटी२०१६-१७ १६ फेब्रुवारी २०१६ संजीव जयस्वाल २५४९ कोटी२०१७-१८ ३० मार्च २०१७ संजीव जयस्वाल ३३९० कोटी२०१८-१९ १९ मार्च २०१८ संजीव जयस्वाल ३६९५ कोटी२०१९-२० २० फेब्रुवारी २०१९ संजीव जयस्वाल ३८६१ कोटी२०२०-२१ ११ मार्च २०२० अतिरिक्त आयुक्त : राजेंद्र अहिवर ३७८० कोटी२०२१-२२ ५ फेब्रुवारी २०२१ डॉ. विपिन शर्मा २७५५ कोटी२०२२-२३ १० फेब्रुवारी २०२२ डॉ. विपिन शर्मा ३२९९ कोटी

mumbai traffic news update, मोठी बातमी : मरिन ड्राइव्हवरील ‘हा’ रस्ता बंद; दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वापरा पर्यायी ३ मार्ग – big news road closures on marine drive use these alternative 3 routes to reach south mumbai

0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये सागरी किनारा मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून मरिन ड्राइव्हवरील काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी ड्रेनेज आउटफॉलचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी हा रस्ता बंद करून त्याऐवजी समांतर असलेला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तुलनेने हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

सागरी किनारा बांधकाम एजन्सीने मरिन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला असून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याच्या बाजूने समांतर चालणाऱ्या सर्व्हिस रोडवरून सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र हा सर्व्हिस रोड अरुंद असल्याने ही वाहतूक संथ गतीने होण्याची शक्यता आहे.

क्षुल्लक कारणावरुन वाद, त्यानं धुणी धुण्याचा दगड उचलला अन् थेट बायकोच्या डोक्यात घातला…

हे आहेत पर्यायी मार्ग :

केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरीन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर कार्यालय, चर्चगेट जंक्शन, गोदरेज जंक्शन या मार्गे चर्चगेट तसेच दक्षिण मुंबई

पेडर रोड, आरटीआय जंक्शन, सेसिल जंक्शन, सुख सागर जंक्शन, (डावीकडे वळण) ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालय, चर्चगेट जंक्शन येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यास मार्ग.

वाळकेश्वर, बँडस्टँड, विल्सन कॉलेज, विनोली चौपाटी, (डावीकडे वळण), ऑपेरा हाउस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालयामार्गे दक्षिण मुंबई

मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे

Old Pension Scheme Strike The Convenors Of The Coordination Committee Betrayed Govt Employees By Calling Off Strike Alleged By Maharashtra State Old Pension Association

0

Maharashtra Government Staff Strike : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल, असं आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप (Maharashtra Government Staff Strike) काल (20 मार्च) मागे घेण्यात आला. परंतु राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला आहे. तसंच यापुढे समन्वय समितीसोबत कुठल्याही आंदोलनात सहभागी होणार नसल्याची भूमिकाही राज्य जुनी पेन्शन संघटनेने घेतली आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सात दिवसांनी मागे

राज्य सरकारी, निमसरकारी त्यासोबतच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बैठक झाली आणि जुन्या पेन्शन योजनेत संदर्भात चर्चा झाली. पूर्वलक्षी प्रभवाने जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन लेखी स्वरुपात सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीला देण्यात आल्यानंतर समन्वय समितीने सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला

“निर्णय न होताच संप मागे घेण्याची निमंत्रकांची भूमिका विश्वासघातकी”

ज्यावेळी संप पुकारला गेला त्यावेळी जोपर्यंत जुनी पेन्शन योजना संदर्भात निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत संप घेतला जाणार नाही अशी, भूमिका समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मांडली होती. मात्र कुठल्या प्रकारे निर्णय न होता संप मागे घेतल्याने निमंत्रकाची भूमिका ही विश्वासघातकी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनाच्या वतीने देण्यात आली आहे

समन्वय समितीसोबत कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही : राज्य जुनी पेन्शन संघटना

हा संप एका कर्मचारी संघटनेचा नव्हता तर समन्वय समितीमध्ये आपल्या सर्व संघटनांनी मिळून पुकारलेला होता. त्यामुळे नाईलाज असतो आपली इच्छा नसताना हा निर्णय मान्य करावा लागला असल्याचं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोणत्याच आंदोलनात किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये समन्वय ठेवणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. शिवाय येणाऱ्या काळात जुनी पेन्शन योजना मागणीसाठी लढाई करण्यासाठी तीव्र आंदोलन करुन जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहणार असल्याचा या संघटनेच्या वतीने भूमिका मांडताना सांगण्यात आलं आहे.

यवतमाळमधील कर्मचारी अजूनही संपावर ठाम

दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील कर्मचारी अजूनही संपावर ठाम असू सुकाणू समितीचे अधिकृत पत्र येत नाही तोपर्यंत त्यांनी संप सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. आमच्यापर्यंत अद्यापही कुठलेच परिपत्रक पोहोचले नाही. शासनासोबतच्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात कुठल्या पद्धतीची बोलणे झाले, केव्हापासून जुनी पेन्शन योजना लागू होणार? कशा पद्धतीने लागू होणार? याचा कुठला निर्णय शासनाने घेतला हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील कर्मचारी संपावर ठाम राहणार आहेत. अधिकृत माहिती येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या भ्रमात राहू नये तसेच आज (21 मार्च) सकाळी कर्मचाऱ्यांकडून महामोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे.

unseasonal rain lashes mumbai thane, मुंबई, ठाण्यात अवकाळी पावसाची तुफान बॅटींग; ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू – unseasonal rain lashes mumbai thane kalyan dombivli vasai virar start early morning

0

मुंबई : उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपलं आहे. आता या अवकाळी पावासाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईजवळ असलेल्या वसई-विरार पट्ट्यातही पाऊस पडतो आहे.

अवकाळी पावसाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला झोडपल्यानंतर आता राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अवकाळी पावसाचा फटका बसतो आहे. या पावसाचा फटका सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चारकरमान्यांना बसला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडली आहे. सध्यातरी उपनगरीय लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुंबईकरांनो, काळजी घ्या! करोना, इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढले; संसर्ग आणखी वेगाने वाढण्याचा धोका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हा अवकाळी पाऊस मुंबईत बरसत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये सकाळपासून सुरू आहे. आजची सकाळ पावसाने सुरू झाली असून अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे वातावरणात काहिसा गारवा निर्माण झाला आहे.

फक्त मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून संप मागे घेतला; सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया

आधीच मुंबईसह जवळपासच्या उपनगरांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

two youth drowned in kalamba sea, पर्यटनासाठी आलेले दोन तरुण कळंब समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश – two youth drowned in kalamba sea one rescued but one died

0

पालघर : पर्यटनासाठी वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर आलेले दोन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात जीवरक्षक व स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. तर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

नालासोपारा येथील दोन तरुण मित्र वसईतील कळंब समुद्र किनारी रविवारी पर्यटनासाठी आले होते. पर्यटनासाठी आलेले हे दोन मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पोहताना समुद्राच्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघेही तरुण समुद्रात बुडाले.

कासवे येतील का परतून? वाळूचोरी रोखण्याच्या आदेशानंतर पर्यावरणप्रेमींच्या आशेला धुमारे
समुद्रात बुडत असलेल्या दोन तरुणांपैकी खामकर नावाच्या एका तरुणाला वाचवण्यात जीवरक्षक व स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. मात्र समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. साहिल बावकर (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. साहिल बावकर हा तरुण समुद्रात बुडाल्यानंतर जीवरक्षक रविवारी रात्रीपासून सर्वत्र त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेही आढळून आला नाही.

VIDEO : चिंचणी बीचवर मद्यपींचा धिंगाणा, कारच्या टपावर बसून स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल
अखेर सोमवारी सकाळच्या सुमारास कळंब येथील रमेश किणी, अभिजित किणी यांना समुद्रात एका जाळ्यात मृतदेह अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. एका लहान बोटीच्या मदतीने हा मृतदेह भुईगांव समुद्र किनारी आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latest posts