Friday, June 2, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2539

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

29

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

31

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

24

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

22

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

24

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

23

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

27

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

260

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Mumbai Airport Fake Bomb News by Woman Passenger for Free Excess of Luggage; माझ्याकडे बॉम्ब आहे, मुंबई एअरपोर्टवर महिलेने सगळ्यांना घाम फोडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0

मुंबई : मुंबई विमानतळावर महिलेच्या बॅगेत बॉम्ब असल्याची एकच अफवा सगळीकडे पसरली असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर महिलेने माझ्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितलं. यामुळे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पण या घटनेमागचं नेमकं कारण समोर येताच सगळे हादरले.मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात पोहोचल्यानंतर महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचं पोलिसांना सांगितलं. ही महिला मूळची कोलकाता इथली रहिवासी असून तिच्या या अफवेनंतर सीआयएसएफने तात्काळ तिला ताब्यात घेतलं. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.

Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस
पोलिसांच्या सांगण्यानुसार, आयपीसी कलम ३३६(इतरांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता असलेलं कृत्य करणं), ५०५-२ (व्यक्तींमध्ये द्वेष, वैर निर्माण होण्याची शक्यता असलेली विधानं करणं) या अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची चौकशी केली असता २९ मे रोजी संध्याकाळी रुची दीपक शर्मा या २९ वर्षीय महिला मुंबई विमानतळावरून कोलकात्याला जाणारी फ्लाइट पकडणार होत्या. त्यांनी स्पाइस जेट बुक केलं होतं. पण बोर्डिंग पास घेण्यासाठी त्या काउंटरवर पोहोचताच त्याच्याकडे एकूण २२.०५ किलो सामान असल्याचं सांगण्यात आले, तर नियमानुसार फक्त १५ किलोच सामान मोफत नेलं जाऊ शकतं.

यानुसार, महिलेकडे एकूण दोन बॅगा होत्या. सर्व सामान नेण्यासाठी त्यांना जादा पैसे द्यावे लागणार होते. पण यासाठी त्या तयार नव्हत्या. त्यामुळे स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची हाणामारीही झाली. मराठी नसलेल्या लोकांचा अशा प्रकारे छळ केला जातो, असा आरोप महिलेने केला असून यानंतर त्यांनी अचानक बॅगेत बॉम्ब असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच सीआयएसएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. तपासादरम्यान महिलेच्या बॅगेत काहीही संशयास्पद आढळलं नाही.

Shahbad Dairy Case: साक्षी मर्डर केसमध्ये मोठी लीड, साहिलच्या क्ररतेचा सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…

IPL 2023 Final Orange Cap and IPL Trophy Record History; IPL 2023च्या फायनलमधील गुजरातचा पराभव आधीच ठरला होता; कारण जो खेळाडू…

0

मुंबई: आयपीएल २०२३ मध्ये महेंद्र सिंह धोनी नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. अंतिम लढतीत थरारक अशा सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचवे विजेतपद मिळवले. या संपूर्ण हंगामात अनेक खेळाडू होते ज्यांनी दमदार कामगिरी केली. पण एक असा फलंदाज होतो ज्याने सर्व गोलंदाजांची धुलाई केली.

गुजरात टायटन्सचा सलमीवीर शुभमन गिलने १७ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ८९० धाा केल्या. या हंगामात त्याच्या नावावर ३ षटक आणि ४ अर्धशतक आहेत. लीगमध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप त्याने मिळवली. पण या कामगिरीनंतर देखील गुजरातला विजेतेपद मिळू शकले नाही.

MS Dhoni: धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळत असता; IPLच्या एका नियमामुळे MSD चेन्नईचा झाला
आयपीएलच्या इतिहासात एक अजब योगायोग आहे. जो खेळाडू ऑरेंज कॅप जिंकतो त्याचा संघ शक्यतो विजेता होत नाही. आतापर्यंत झालेल्या हंगामात १६ पैकी फक्त २ वेळा असे झाले आहे की ज्या खेळाडूने ऑरेंज कॅप मिळवली त्याच्या संघाने विजेतेपद मिळवले. अन्य १४ हंगामात ऑरेंज कॅप मिळवणाऱ्याला विजेतेपद मिळू शकले नाही. यामुळे असे ही म्हटले जाते की, आयपीएलमधील ऑरेंज कॅप लकी नाही. शुभमन गिलसोबत यावेळी असेच काही झाले. संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरातचा संघ फायनलमध्ये पराभूत झाला.

IPLच्या विक्रमी विजेतेपदानंतर धोनीच्या हातात श्री भगवद्‌गीता; चेहऱ्यावरील चमक सांगून जाते…
आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी जिंकणारे खेळाडू दोन होते. सर्वात पहिला खेळाडू म्हणजे रॉबिन उथप्पा होय. ज्याने २०१४च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ६६० धावा केल्या होत्या. तेव्हा केकेआरने विजेतेपद देखील मिळवले होते. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने अशी कामगिरी केली. ऋतुराजने २०२१च्या हंगामात चेन्नईकडून ६३५ धावा केल्या आणि त्याच वर्षी सीएसकेने विजेतेपद देखील मिळवले होते. ऑरेंज कॅप आणि आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम या दोघांच्या नावावर आहे.

WTC फायनलमध्ये भारताविरुद्ध आमचा पराभव होईल; ओव्हलवर दाणादाण उडेल, ऑस्ट्रेलियाला वाटते भीती
फक्त ऑरेंज कॅप नाही तर स्पर्धेच्या इतिहासात असे देखील झाले आहे की जो संघ क्वॉलिफायर १ ची मॅच जिंकतो त्याच संघाने १२ पैकी ९ वेळा विजेतेपद मिळवले आहे. इतक नाही तर धोनीबाबत असा एक योगायोग आहे की, जेव्हा जेव्हा फायनल किंवा नॉकआउट मॅचमध्ये पाऊस पडतो तेव्हा तेव्हा धोनीने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली.

आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक १२ शतकं झळकावण्यात आली. स्पर्धेच्या इतिहासात आजवर एका हंगामात इतकी शतक कधीच झाली नव्हती. यातील ३ शतक गिलच्या बॅटमधून आलीत.

आरसीबीसारखे संघ एका विजयासाठी गुडघे टेकतात तिथे १० फायनल आणि ५ ट्रॉफी जिंकतो त्याला धोनी म्हणतात !

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Bhagwat Karad Help Vitthalrao Patil to Search Ravindra Patil; सैन्यदलातील मुलगा १३ वर्ष घरी आलाच नाही, आई वडिलांनी उपोषण केलं,भागवत कराडांनी सूत्र फिरवताच नवी माहिती समोर

0

छत्रपती संभाजीनगर: सैन्यदलात कार्यरत असलेल्या मुलाचा तपास लागत नसल्याने हवालदिल असलेल्या वृद्ध दाम्पत्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी भेट घेतली. भागवत कराड यांनी तातडीने सूत्रे हलविली संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांना बेपत्ता सैनिकाची माहिती देण्यात यावी, असे सांगितले. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांचे सचिव पी.के.सुरेश कुमार,अर्थ राज्यमंत्री डॉ कराड यांचे सचिव आनंद जोशी, माजी सैनिक अशोक हंगे, कृष्णा राठोड, बालाजी कोडगिरे, सुनील कुमार ,मृत सैनिकाचे भाऊ संतोष पाटील यांच्याशी चर्चा केली. सात वर्षापेक्षा जास्त काळ बेपत्ता असलेला जवान मृत असल्याचे सांगितले,सदर सैनिकी कुटुंबास २४ नोव्हेंबर २०२२ पासून पेन्शन लागू करण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बेपत्ता सैनिकाच्या बाबतीत तातडीने लक्ष घातल्याने आई वडिलांना माहिती मिळाली.

सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंपरी, येथील भागवत विठ्ठलराव पाटील आणि त्यांच्या पत्नी बेबीताई , सैन्यदलातील मुलगा रवींद्र भागवत पाटील गेल्या १३ वर्षापासून सैन्य दलात जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर कार्यरत असताना बेपत्ता झाला होता. तेव्हा पासून सैनिकाची कोणतीही माहिती आम्हाला नसल्याचं सांगितलं.

मुंबईतील म्हाडाच्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; या भागातील इमारतींचा समावेश
सैनिक मुलाच्या शोधासाठी सैन्यदल प्रशासन यांच्याकडे वारंवार विनंती करूनही या वृद्ध दाम्पत्यास कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.बेपत्ता मुलाचा शोध लावावा यासाठी भागवत विठ्ठलराव पाटील आणि त्यांच्या पत्नी बेबीताई उपोषण बसले होते. डॉ. कराड यांनी भेट देऊन सैनिकी मुलाचा तपास करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी तातडीने सैनिकाचे नातेवाईक आणि माजी सैनिक अशोक हंगे यांना दिल्लीत बोलवले होते.

पंकजा मुंडेंच्या ताकद असलेल्या बालेकिल्ल्यात फडणवीसांनी पुन्हा एकदा नवा चेहरा उतरवलाय

Loksabha Election 2024: कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला? या नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा
भागवत कराड यांनी संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्याशी संपर्क करून बेपत्ता सैनिकाविषयी माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रं फिरवण्यात आली. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांचे सचिव सचिव पी.के.कुमार संभाजीनगर येथील माजी सैनिक अशोक हंगे, कृष्णा राठोड, बालाजी कोडगिरे, सुनील कुमार कुरदे ,संतोष पाटील आणि सैनिकाचे भाऊ संतोष पाटील यांच्याशी चर्चा करून बेपत्ता होऊन सात वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्या सैनिकास मृत घोषित करण्यात आलं आहे, अशी माहिती दिली. सैनिकाची पत्नी छाया रवींद्र पाटील यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये पेन्शन सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
Maharashtra SSC Result 2023: फक्त ‘या’ ४ स्टेप्स…आणि पाहा तुमचा दहावीचा निकाल

Prime Minister Narendra Modi Speech On Occasion Of Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din Maharashtra Detail Marathi News

0

PM Modi Speech: संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार (Chhatrapati Shivaji Maharaj) आज 350 वा राज्याभिषेक दिन आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले आहे. सुरुवातीला त्यांनी या दिवासाचे महत्त्व स्पष्ट करत शिवाजी महाराजांना नमन केले आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी फार भाग्याचा दिवस असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, ‘शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणली. शिवाजी महाराजांनी भारताची एकता आणि अखंडता सर्वोतोपरी ठेवली. त्यामुळे आज एक भारत-श्रेष्ठ भारत या योजनेमध्ये शिवाजी महारांच्या विचारांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळेल.’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, “छत्रपती शिवाजी महारांचा राज्याभिषेक दिन हा नवी चेतना आणि नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महारांचा राज्याभिषेक सोहळा हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष सोहळा आहे. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्व होते.”  

शिवाजी महाराजांनी आत्मविश्वास निर्माण केला : पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी म्हटले की, “शेकडो वर्षांपूर्वी गुलामगिरीने आणि आक्रमणांनी देशातील लोकांचा आत्मविश्वास हिसकावून घेतला होता. शत्रूच्या शोषणाने आणि गरिबीने समाजाला कमकुवत केले होते. आपल्या सांस्कृतिक स्थळांवर हल्ला करुन लोकांचे खच्चीकरण केले होते. परंतु त्यावेळी जनतेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे कठीण कार्य शिवाजी महाराजांनी त्या काळात केले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचा सामना केलाच पण त्यांनी स्वराज्यस्थापनेचा विश्वास देखील जनतेमध्ये निर्माण केला. त्यांनी लोकांना राष्ट्रनिर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.”

news reels Reels

  

‘शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत’

पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, “या देशात अनेक शासक होऊन गेले परंतु त्यांचे शासन कमकुवत होतं. परंतु शिवाजी महारांजाचे व्यक्तिमत्त्व अद्भुत आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सुराज्याचे देखील घडवले. त्यांनी त्यांच्या शौर्याने आणि सुशासाने त्यांचा नावलौकिक मिळवला आहे. एक राजा म्हणून त्यांनी लोकांच्या मनात सुराज्याचे विचार निर्माण करुन सुशासन निर्माण केले. त्यांच्या विचारांमुळे ते इतिहासातील इतर राज्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांनी लोकांना आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्यामुळे शेतकरी विकास, महिला सशक्तीकरण यांसारख्या गोष्टींना त्यांनी प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू आहेत जे कोणत्यातरी रुपामध्ये ते आपल्या जीवनमध्ये प्रभाव निर्माण करण्यास प्रोत्साहन देतात.”

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

0

 Shivrajyabhishek Din 2023 :  शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेले रायगडचे खासदार सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा आहे. आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. 


Updated: Jun 2, 2023, 12:16 PM IST

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

Shivrajyabhishek at Raigad : Sunil Tatkare is upset

Police Constable Dies Of Heart Attack Pune; सेवानिवृत्त होताच पोलिसाच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

5

पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सेवानिवृत्त झालेल्या हवालदाराचा दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक बातमीनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकाश अनंता यादव असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्रकाश यादव यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Pune News: भावाच्या वाढदिवसाला पुण्यात आल्या; मुंबईतील दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू
प्रकाश यादव हे बुधवारी (दि. ३१ मे) पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. पुणे पोलीस मुख्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील आणि पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुलावर चढून शोले स्टाइल आंदोलन

प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. प्रकाश यादव यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश यादव यांना पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तुमच्या नातेवाईकाचे आताच निधन झाले; फेसबुकवर असा मेसेज दिसल्यास चुकूनही क्लिक करू नका, अन्यथा…

Eknath Shinde Big Announcement From Raigad; शिवराज्याभिषेकाचं टायमिंग साधलं, एकनाथ शिंदेंच्या रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा, जाणून घ्या एका क्लिकवर

5

रायगड : किल्ले रायगडावर १ ते ६ जून या कालावधीत ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारनं आज तिथीप्रमाणं शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठी घोषणा केल्या.

एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरण निर्माण करण्याची घोषणा केली. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरण निर्माण करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे असतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी यानंतर मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली होती.
अद्भुत! फक्त ४६ मिनिटांत ह्रदय दक्षिण मुंबईतून बेलापुरात, ४० वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवदान
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली. रायगडच्या पायथ्याला ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस
मी शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सरकारनं जसं शिवाजी महाराज कष्टकरी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहायचं. आपल्या सरकारनं शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणं आपल्या राज्यसरकारनं देखील नमो शेतकरी सन्मान योजना ६ हजार रुपयांची आपण जोडली आहे. ही तरतूद देवेंद्र फडणवीस यांनी केलं, हे शेतकऱ्यांसाठी आहे. सिंचन वाढीसाठी आपल्या सरकारनं अनेक निर्णय घेतले. जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोर गरीब रयतेचं राज्य होतं. त्यांनी जातीभेद केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढं येण्याची संधी दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Maharashtra SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर, एकूण ९३.८३ % विद्यार्थी उत्तीर्ण

US averts first-ever default as Congress passes debt deal

0

WASHINGTON: US senators voted to suspend the federal debt limit on Thursday, eliminating the threat of a disastrous credit default just four days ahead of the deadline set by the Treasury.
The upper chamber of Congress rubber-stamped a bill passed a day earlier by the House of Representatives to extend the country’s borrowing authority through 2024 — staving off the next showdown until after the presidential election.
The compromise package negotiated between US President Joe Biden and House Speaker Kevin McCarthy leaves neither Republicans nor Democrats fully pleased with the outcome. But the result, after weeks of hard-fought budget negotiations, shelves the volatile debt ceiling issue that risked upending the US and global economy until 2025 after the next presidential election.
Approval in the Senate on a bipartisan vote, 63-36, reflected the overwhelming House tally the day before, relying on centrists in both parties to pull the Biden-McCarthy package to passage.
Senate Majority Leader Chuck Schumer said the bill’s passage means “America can breathe a sigh of relief.”
He said, “We are avoiding default.”
Fast action was vital if Washington hoped to meet next Monday’s deadline, when Treasury has said the US will start running short of cash to pay its bills, risking a devastating default. Raising the nation’s debt limit, now $31.4 trillion, would ensure Treasury could borrow to pay already incurred US debts.
In the end, the debt ceiling showdown was a familiar high-stakes battle in Congress, a fight taken on by McCarthy and powered by a hard-right House Republican majority confronting the Democratic president with a new era of divided government in Washington.
Biden hails debt deal as ‘big win’ for Americans
US President Joe Biden welcomed Thursday’s vote by the Senate to raise the national debt limit through 2024 and avert a first ever default as a “big win” for Americans.
“No one gets everything they want in a negotiation, but make no mistake: this bipartisan agreement is a big win for our economy and the American people,” he tweeted, adding that he would sign the bill “as soon as possible” and address the nation Friday.

Heart Brought From South Mumbai To Belapur Saved Life Of A 40 Year Old Man; अद्भुत! फक्त ४६ मिनिटांत ह्रदय दक्षिण मुंबईतून बेलापुरात, ४० वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवदान

5

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऍमिलॉइडोसिस नावाच्या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंजत असलेल्या बुलढाणा येथील रुग्णावर बेलापूर येथील अपोलो रुग्णालयाने यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली आहे. दोन वर्षे प्रतीक्षेत असलेल्या या रुग्णाला दक्षिण मुंबईच्या रुग्णालयातील एका ब्रेन-डेड झालेल्या व्यक्तीचे हृदय मिळणार होते. मुंबई आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने ग्रीन कॉरिडॉरद्वारे ४० किमीचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पार करून अपोलो रुग्णालयामध्ये हे हृदय आणण्यात आले. त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्याही गंभीर समस्येशिवाय यशस्वीपणे पार पडली. अपोलो रुग्णालयामध्ये आतापर्यंत झालेली हृदय प्रत्यारोपणाची ही आठवी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.

हा ४० वर्षीय रुग्ण अपोलो रुग्णालयामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून आला होता. त्याला छातीत तीव्र वेदना होऊन श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता. त्याच्या तपासणीनंतर ऍमिलॉइडोसिसमुळे त्याचे हृदय निकामी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याचे हृदय प्रत्यारोपण करणे हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे २०२१मध्ये त्याचे नाव हृदय प्रत्यारोपण प्रतीक्षायादीत टाकण्यात आले होते. तेव्हापासून नवीन हृदय मिळेपर्यंत अपोलो रुग्णालयाने या रुग्णाला मागील दोन वर्षे वैद्यकीय आणि आर्थिक पाठबळ दिले.

मोटरमॅन सेवानिवृत्त, आयुष्यातील शेवटची लोकल सोडली; टाळ्यांच्या गडगडाटात प्रवाशांच्या शुभेच्छा

Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस

४ एप्रिल २०२३ रोजी दक्षिण मुंबईच्या रुग्णालयात ब्रेन-डेड झालेल्या व्यक्तीची माहिती अपोलो रुग्णालयाला मिळाल्यानंतर अपोलोच्या तज्ज्ञ हृदय प्रत्यारोपण पथकाने त्वरित हृदय मिळावले आणि मुंबई आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने दात्याचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे ४० किमीचे अंतर अवघ्या ४६ मिनिटांत पार करून अपोलोमध्ये आणण्यात आले. त्यानंतर या रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणत्याही गंभीर समस्येशिवाय यशस्वीपणे पार पडली. अपोलो रुग्णालयाने या रुग्णाच्या उपचारासाठी ट्रस्ट फंडिंगद्वारे शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली. आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल या रुग्णाने सर्व डॉक्टरांसह पोलिसांचेही आभार मानले आहेत.

Manipur Violence Latest News: Unified Command Structure, New Police Chief For Manipur | Imphal News

0

IMPHAL/GUWAHATI: Union home minister Amit Shah wrapped up his four-day visit to Manipur with a key decision to put the state under an inter-agency unified command structure for “unbiased coordination” among different security forces. The move coincided with the governor’s order replacing the state police chief, IPS officer P Doungel, a Kuki, with CRPF IG Rajiv Singh, a 1993 Tripura cadre IPS officer, as the new director general of police (DGP) of the state.
Shah also squarely blamed Manipur high court for delivering a “hasty” order on ST status demand by Meities, saying it led to the mayhem. “Without any hesitation I can say that because of a hasty decision by Manipur high court on April 29, the ethnic clashes and violence between two groups started.”
Shah said a judicial commission will be set up under the chairmanship of retired Chief Justice of high court to investigate the Manipur violence and a separate investigation by a special team of CBI into five identified cases from all registered cases and one case of general conspiracy.
“The cause of the violence will be investigated without any bias and discrimination and strict action will be taken to punish the guilty to prevent such incidents,” Shah said.
Appealing to the people of Manipur not to pay heed to rumours and maintain peace, Shah said a peace committee would also be constituted under the chairmanship of the governor of Manipur, in which representatives of all sections would be included.
Speaking on the security arrangement in the state, Shah said, “In Manipur now, several agencies are working from the security point of view.”
He added, “For better and unbiased coordination among them an interagency unified command structure under the chairmanship of state security adviser and former CRPF DG, Kuldeip Singh, will come into force from today.”
To a query on demand by 10 Kuki legislators, which include seven from BJP, for a separate administrative unit for Kuki-inhabited hills of the state, Shah said, “The central government had cleared its stand on Manipur’s territorial integrity earlier. I don’t want to make any statement to sensationalise the issue and make headlines.” Shah also asked those with illegal weapons to surrender them to police immediately by Thursday “because from tomorrow the combing operations will be launched in search of these weapons”.
As the Meiteis point the finger at the Kuki militant groups in ceasefire behind the violence, Shah said any kind of violation of the Suspension of Operation Agreement will be dealt with strictly and treated as a breach of the agreement. On the largely unfenced porous Indo-Myanmar border that is seen as the easy way for militants and drugs and arms smugglers, Shah said, “The trial work on fencing of 10km along the Myanmar- Manipur border has been completed by the Centre, while the tendering process for 80 km fencing work is also completed and the survey for fencing on the remaining border area is under way.”
He said the biometric and eye impressions of people coming from neighbouring countries are also being taken.

Latest posts