Tuesday, March 28, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2185

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

179

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

IPL 2023 Match 1: Gujarat Titans vs Chennai Super Kings – Everything you need to know | Cricket News

0

The 16th edition of the IPL will kick off with a clash between two captains who are also great friends off the field. As is tradition, the defending champions will start the season and match 1 of IPL 2023 will see the reigning champions Gujarat Titans take on 4 time champions the Chennai Super Kings in Ahmedabad.
There will be an opening ceremony ahead of the first match as well.
TimesofIndia.com here takes a close look at the two teams which will be going toe to toe on March 31st as they aim to start their respective campaigns with a a big win:
What: IPL 2023 Season Opener
Teams: Gujarat Titans and Chennai Super Kings
Seasons Played: Gujarat Titans – 1; Chennai Super Kings – 13
Titles won: Gujarat Titans – 1; Chennai Super Kings – 4
Captains: Gujarat Titans – Hardik Pandya; Chennai Super Kings – MS Dhoni
Head Coaches: Gujarat Titans – Gary Kirsten; Chennai Super Kings – Stephen Fleming
Head to Head: Played – 2; Won by GT – 2; Won by CSK – 0
Results so far: April 17, 2022 – GT beat CSK by 3 wickets (1 ball to spare) —- May 15, 2022 – GT won by 7 wickets (5 balls to spare)

1

Moeen Ali and Ravindra Jadeja. (Pic Courtesy – CSK Twitter handle)
Full Squads:
Gujarat Titans:Hardik Pandya (captain), Shubman Gill, David Miller, Kane Williamson, Abhinav Manohar, Sai Sudharsan, Wriddhiman Saha, Mohit Sharma, KS Bharat, Matthew Wade, Rashid Khan, Odean Smith, Rahul Tewatia, Vijay Shankar, Mohammed Shami, Alzarri Joseph, Yash Dayal, Pradeep Sangwan, Darshan Nalkande, Jayant Yadav, R. Sai Kishore, Noor Ahmad, Shivam Mavi, Urvil Patel, Joshua Little.

2

Ben Stokes. (Pic Courtesy – CSK Twitter handle)
Chennai Super Kings: MS Dhoni (captain), Ravindra Jadeja, Ben Stokes, Ruturaj Gaikwad, Ajinkya Rahane, Deepak Chahar, Ambati Rayudu, Subhranshu Senapati, Moeen Ali, Matheesha Pathirana, Shivam Dube, Rajvardhan Hangargekar, Dwaine Pretorius, Mitchell Santner, Devon Conway, Tushar Deshpande, Mukesh Chowdhary, Simarjeet Singh, Prashant Solanki, Maheesh Theekshana, Shaik Rasheed, Nishant Sindhu, Sisanda Magala, Ajay Mandal, Bhagath Varma.
Top performers in IPL 2022:
Gujarat Titans:
Most Runs:
1. Hardik Pandya – 487 runs in 15 matches – 4 fifties; HS – 87*
2. Shubman Gill – 483 runs in 16 matches – 4 fifties; HS – 96
3. David Miller – 481 runs in 16 matches – 2 fifties; HS – 94*
Most Wickets:
1. Mohammed Shami – 20 wickets in 16 matches; Best – 3/25
2. Rashid Khan – 19 wickets in 16 matches; Best – 4/24
3. Lockie Ferguson – 12 wickets in 13 matches; Best – 4/28

3

(Pic Courtesy – Gujarat Titans Twitter handle)
Chennai Super Kings:
Most Runs:
1. Ruturaj Gaikwad – 368 runs in 14 matches – 3 fifties; HS – 99
2. Shivam Dube – 289 runs in 11 matches – 2 fifties; HS: 95*
3. Ambati Rayudu – 274 runs in 13 matches – 1 fifty; HS – 78
Most Wickets:
1. Dwayne Bravo – 16 wickets in 10 matches; Best – 3/20
2. Mukesh Choudhary – 16 wickets in 13 matches; Best – 4/46
3. Maheesh Theekshana – 12 wickets in 9 matches; Best – 4/33

4

Most expensive buy in the last auction:
Gujarat Titans: Kane Williamson (New Zealand) – Rs 2 Cr
Chennai Super Kings: Ben Stokes (England) – Rs 16.25 Cr

credit card emi, क्रेडिट कार्डाचं कर्ज तुम्हाला कंगाल करतंय? ‘या’ सोप्प्या ट्रिक्स फॉलो कर अन् कर्ज मुक्त व्हा! – know how to convert credit card dues into emis to avoid fine interest rates

0

नवी दिल्ली : आजच्या डिजिटल काळात अनेक लोक क्रेडिट कार्डाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डने पैसे भरण्याचे अनेक फायदे आहेत. जर क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने केला तर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. अनेक लोक क्रेडिट कार्डद्वारे जास्त खरेदी करतात आणि त्यांना थकीत रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जातो. अशा स्थितीत अनेक वेळा लोकांचा खर्च हाताबाहेर जातो. याशिवाय असे अनेक क्रेडिट कार्ड वापरकर्ते आहेत जे त्यांच्या क्रेडिटचे पैसे वेळेत भारत नाही. त्यामुळे उशीरा भरल्याचा दंड आणि थकबाकीची रक्कम वाढते. म्हणूनच तज्ञ सर्व क्रेडिट कार्ड कर्जे देय तारखेपूर्वी फेडण्याची शिफारस करतात.

याचे कारण म्हणजे क्रेडिट कार्डचे व्याजदर वार्षिक ३६% पर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे जर तुमच्या कार्डची थकबाकी जास्त असेल आणि तुम्ही ते एकाच वेळी भरू शकत नसाल, तर तुम्ही सुलभ मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे ईएमआयद्वारे देखील परतफेड करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेतील कस्टमर केअरशी बोलावे लागेल. तुम्ही ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे थकबाकीचे EMI मध्ये रूपांतर देखील करू शकता.

जबरदस्त! आरबीआयचा नवीन नियम, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एकदा वाचाच
क्रेडिट कार्ड EMI कशी लाभदायक
क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीची परतफेड तुम्ही EMI मध्ये रूपांतरित करू शकता. मात्र, ईएमआयची गणना करताना व्याज दर, तुम्ही निवडलेला कालावधी आणि तुम्हाला करावे लागणारे डाउन पेमेंट विचारात घेतले जाईल. दरम्यान, क्रेडिट कार्ड वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्हाला प्रत्येक क्रेडिट कार्डवर ईएमआयचा पर्याय मिळत नाही. ईएमआयवर खरेदी केल्याने कार्डची मर्यादा कमी होऊ शकते. तसेच तुम्ही तुमचे सर्व पेमेंट वेळेवर केले पाहिजेत आणि वेळेची मर्यादा पालखी नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.

आता RuPay क्रेडिट कार्डवर बिनधास्त करता येणार पेमेंट, ग्राहकांसाठी आली आनंदाची बातमी
दुसऱ्या क्रेडिट कार्डाने बिल भरा
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसमोर कधी कधी पैशांची कमतरता जाणवते. अशा स्थितीत तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दंडही बसणार नाही. तसेच अनेक बँका निवडक क्रेडिट कार्डांवर बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय देतात, ज्याद्वारे तुम्ही एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्डवर शिल्लक ट्रान्सफर करू शकता पण बँका कार्डमधून बॅलन्स ट्रान्सफर पैसे घेतात.

बँक तुमच्याकडून जीएसटी आणि प्रक्रिया शुल्क देखील आकारते. पण यामुळे लोकांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ मिळतो. तुम्ही ई-वॉलेटद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट देखील करू शकता. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे जोडू शकता आणि ते परत बँक खात्यात हस्तांतरित करू शकता.

gunaratna sadavarte, आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही! – bar council has recommended the cancellation of gunaratna sadavarte charter for 2 years

0

मुंबई : वकिली गणवेशात आंदोलन करणं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी सदावर्तेंची वकिली सनद रद्द करण्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे सदावर्तेंना आता पुढची २ वर्ष वकिली करता येणार नाहीये. बार कौन्सिलने दिलेला निर्णय सदावर्तेंना मोठा झटका मानण्यात येतोय.

गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती. अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मंचरकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात वकिली प्रॅक्टिस करता येणार नाही.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
वकिसांसाठी एक आचारसंहिता असते. तिचं उल्लंघन करु नये, अशी अट सनद देताना बार कौन्सिल घालत असते. मात्र याचं अटींचं उल्लंघन केल्याने बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर २ वर्षांसाठी सनद रद्द करण्याची कारवाई केलीये. शिस्तभंगाची कारवाई केली आहे, असं बार कौन्सिलच्या वतीने सांगण्यात आलंय.

दरम्यान, बार कौन्सिलच्या निर्देशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. याआधीही बार कौन्सिलच्या निर्णयाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सध्या गुणरत्न सदावर्ते राजधानी नवी दिल्लीत आहेत. यावर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘मटा ऑनलाईन’शी बोलताना दिलीये.

ठाकरेंचा सैनिक गेला, पैशाविना मृतदेह रुग्णालयात पडून, CMO मधून फोन, क्षणात सूत्रं फिरली
गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्ग अंतर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली.

ॲड सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.

एसटीच्या आंदोलनातही सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्यांची हाटकोर्टात भूमिका मांडली. याच आंदोलनात ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. तत्कालिन ठाकरे सरकारविरोधात त्यांनी रान उठवलं. मविआ सरकारविरोधी त्यांनी त्वेषाने लढा दिला. यावेळी सदावर्ते भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला.

Several Sabarimala pilgrims injured as bus falls in pit in Kerala’s Pathanamthitta district | Kochi News

0

KOTTAYAM: Several Sabarimala pilgrims were injured after the bus they were travelling fell into a deep pit at Ilavunkal in Kerala’s Pathanamthitta district on Tuesday.
Around 64 pilgrims, including nine children, were injured.
The pilgrims were from Mayiladuthurai district in Tamil Nadu.
They were returning after Sabarimala darshan.
The driver lost control of the bus while negotiating a turn and the vehicle fell into the deep pit on the other side of the road.
According to initial reports, the injury of the driver is serious.
The injured were admitted to Kottayam Medical College and Pathanamthitta General Hospital.

onion subsidy, कांद्याचं ३५० रुपयांचं अनुदान कसं मिळवायचं, शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या प्रक्रिया – maharashtra government issue gr for onion subsidy of 350 rupees for farmers application process

0

मुंबई : कांद्याचे दर घसरल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. विरोधकांनी राज्य सरकारकडे कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपयांचं अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. राज्य सरकारनं कांदा उत्पादकांना ३५० रुपयांचं अनुदान देण्यासाठी प्रक्रिया जाहीर केलं आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याला २०० क्विंटल कांद्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

मदत कुणाला मिळणार?

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नेमक्या अटी काय?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विटल आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केली असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. ३५० रुपयांचं अनुदान थेट बँक हस्तांतरणद्वारे शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कांद्यासाठी देण्यात येणारं अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत वितरित करण्यात येणार आहे.

अर्ज कुठं करायचा?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, ७/१२ चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.

बाजार समित्यांवर जबाबदारी

शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीवर असेल. हे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीला पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवलाय, माथेफिरूचा धमकीचा फोन, पोलिसांनी केली अटक

या योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, तालुका सहाय्यक, उपनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील.

हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार

ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटूंबीयाच्या नावे आहे आणि ७/१२ उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने ७/१२ उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल.

माझ्या आईचा २०-२५ वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये संपणारा नव्हता; कुणाल टिळकांचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

PAN-Aadhaar linking deadline extended to June 30 | India News

0

NEW DELHI: The government on Tuesday extended the deadline for linking PAN card with Aadhaar to June 30, 2023 from March 31, 2023.
The Central Board of Direct Taxes (CBDT) said that the date for linking PAN and Aadhaar has been extended to provide some more time to the taxpayers.
Earlier, the last day to link PAN with Aadhaar was March 31, 2023. According to the income tax department, failure to do so would have led to the unlinked PAN becoming inoperative.
The Aadhaar-PAN linking was free before March 31, 2022. A fee of Rs 500 was imposed from April 1, 2022 and was later increased to Rs 1,000 from July 1, 2022.

Devendra Fadnavis Threat Call, देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवलाय, माथेफिरूचा धमकीचा फोन, पोलिसांनी केली अटक – caller arrested for placing bomb threat outside devendra fadnavis house in nagpur

0

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. आणि यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. आणि धमकीचा फोन करणाऱ्याला काही तासांत अटक केली आहे. नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटे दोनच्या सुमारास फोन आला. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर एका बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. यानंतर फोन कट झाला. त्यानंतर फडणवीस यांच्या घराकडे बॉम्ब शोधक पथक रवाना करण्यात आले. आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी फडणवीस यांच्या घराजवळील परिसराची कसून तपासणी केली. पण एकही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

प्राथमिक तपासात फेक कॉल उघड

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बॉम्ब ठेवल्याची माहिती नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटेच्या वेळी मिळाली होती. धमकीचा फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाला. मध्यरात्री १२ ते पहाटे १च्या दरम्यान पथकाने घराची तपासणी केली. त्यानंतर हा फेक कॉल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणी धमकीचा फोन कॉल करणाऱ्याला अटक केली आहे. लाइट गेल्यामुळे रागाच्या भरात पोलिसांना फोन करून फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती, असे अटकलेल्या संबंधिताने सांगितले.

नितीन गडकरींना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी, पुजारीला बेळगावात अटक, नागपुरात रवानगी
नितिन गडकरींनाही धमकीचे फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. कॉलवरून नितीन गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याला अटक करून नागपूरात अण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी युतीत, एकेरी उल्लेख करत बावनकुळेंची टीका

Show us some evidence that Amritpal Singh is in illegal custody, HC asks radical Sikh preacher’s lawyer | Chandigarh News

0

CHANDIGARH: The Punjab and Haryana high court on Tuesday asked the petitioner — who has alleged illegal detention of radical Sikh preacher Amritpal Singh — to show some evidence proving that he is in illegal custody of the state police.

SIKHS TAKE OUT BIKE RALLY OPPOSING AMRITPAL SINGH

02:24

SIKHS TAKE OUT BIKE RALLY OPPOSING AMRITPAL SINGH

Justice NS Shekhawat of the HC made these observations after the Punjab police informed the court that Amritpal is not in their custody, but they are close to him.
“Punjab police have been categorically denying the custody of Amritpal. You show us some evidence that he is in the illegal custody of Punjab police,” the judge said.

Amritpal Singh arrest: Who funds terror in Punjab?

02:35

Amritpal Singh arrest: Who funds terror in Punjab?

The judge said “a warrant officer” would raid the area to recover him.
“I will appoint a warrant officer or direct the concerned chief judicial magistrate to raid the area to recover him. You must show the court something to disapprove the stance of the state government,” the judge said.
The matter has now been adjourned for Wednesday for further hearing.
Justice NS Shekhawat of the HC had made these observations while hearing the habeas petition filed by Imaan Singh Khara, legal advisor of Waris-Punjab-De organization headed by Amritpal Singh.
The petitioner has been submitting that on March 18, Amritsar and Jalandhar police teams, along with central para military forces, had detained Amritpal Singh from the area of Shahkot in Punjab’s Jalandhar illegally and forcibly without disclosing any reason.
“As per the mandate of law, the police were required to disclose the reasons to the detenue prior to illegal arrest. The cops are intentionally not disclosing anything to the family of the detenue despite the fact that more than 24 hours have been since passed after the illegal detention of the detune,” the petitioner’s counsel had argued.

kunal tilak, माझ्या आईचा २०-२५ वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये संपणारा नव्हता; कुणाल टिळकांचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर – mukta tilak son kunal tilak son hits back over bjp chandrakant patil statement saying tilak family existence finishes in kasba peth

0

पुणे: माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही. माझ्या आईने भाजप पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा, अशा शब्दांत कुणाल टिळक यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एका कार्यक्रमात कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देण्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली होती. मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे दोन वर्षांच्या काळात कसब्यातील मतदारांशी असणारा त्यांचा संपर्क तुटला होता. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांना मुक्ताताईंच्या सेवेसाठी बराच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांचाही कसब्यातील राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. याच कारणामुळे आम्ही कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला कुणाल टिळक यांनी प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी ‘मटा ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार

मी एवढंच सांगेन की, माझ्या आईने गेली २०-२५ वर्षे कसब्यात काम केले. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क दोन वर्षांच्या आजारपणाच्या काळात नक्कीच कमी झाला नव्हता. त्यामुळे कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजप पक्ष मैदानात उतरला तेव्हा वेगळ्याप्रकारे झालेले मतदान दिसून आले. २०-२५ वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये कमी होत नसतो. माझी आई आजारी असतानाही कार्यक्रमांना जात होती. तिने कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणला होता, विकासकामेही सुरु होती. गिरीश बापट यांच्यानंतर माझ्या आईने कसबा मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे. माझ्या आईच्या कार्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही, असे कुणाल टिळक यांनी ठामपणे सांगितले.

Kasba Bypoll: कसब्याच्या निवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का दिली नाही? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी कुणाल टिळक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कसब्यातून लढण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. कसबा पोटनिवडणुकीतही अनेक लोकांचा सेल्फ इंटरेस्ट नसतानाही कोथरूड, खडकवासला, शिवाजीनगर परिसरातील लोकं कसब्यात ठाण मांडून होती. पुढच्या निवडणुकीत कसब्यात बदल दिसतील, याची १०० टक्के खात्री आहे, असा विश्वासही यावेळी कुणाल टिळक यांनी व्यक्त केला.

blast in firecracker company, मजूर जेवण करायला बसले, अचानक मोठा स्फोट झाला, जाऊन पाहतात तर सहकारी रक्ताच्या थारोळ्यात – huge blast at firecracker factory in maharashtra’s akola, 1 died

0

अकोला: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बेलूरा ते तांदळी फाट्यावर असलेल्या बंदूकवाला फटाका केंद्र या फटाका फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये गोदामातील फटाके जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय या आगीत मोठी जीवितहानी झालेली आहे. या ब्लास्टची तीव्रता अधिक असल्याने भिंत तडे जाऊन कोसळली आहे. या अपघातात इथे काम करणाऱ्या ६ मजुरांपैकी एका मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी तर ४ जण किरकोळ जखमी आहेत. सद्यस्थित सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बेलूरा ते तांदळी फाट्यावर ताहीर अब्बाशी शकील अहमेद यांचं बंदूकला नावाने फटाका केंद्र म्हणजे फटाका फॅक्टरी आहे. या फटाका केंद्रामध्ये फटाके तयार करण्याचं काम सुरू होतं. या फटाका केंद्रात काम करण्यासाठी आज तब्बल ३५ मजुरांनी हजेरी लावली होती. यावेळी आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण खोली पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. या घटनेत फटाका केंद्रात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख रज्जाक शेख गुलाब (वय ७० वर्ष, लक्ष्मी नगर, अकोट फ़ैल.) असं मृत व्यक्तीच नाव आहे. तर पाच मजूर जखमी झाले आहे. यामधील एक मजूर सद्यस्थित गंभीर जखमी आहे. या सर्व जखमी मजुरांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची समजते.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेरील प्रवास महागला, चालकांना आता मोजावे लागणार इतके पैसे, वाचा सविस्तर
सुरेश नामदेव दामोदर (वय ५०, राहणार तांदळी), धम्मपाल सिताराम खंडेराव (वय ३६, राहणार तांदळी), महेश किसन खंडेराव (वय ३२, राहणार तांदळी), रीना मंगेश खंडेराव (वय ३०, राहणार तांदळी), असे फटाका फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या जखमी मजुरांची नावे आहे. दरम्यान फाटका कारखान्यात स्फोट वाढत्या उन्हामुळे झाला की निष्काळजीपणा मुळे? याचा तपास आता पातूर पोलीस घेत आहे. तरीही फाटका कारखान्यात झालेल्या ब्लास्टचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. या भीषण ब्लास्टमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके जळून खाक झाले असून, याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या बंब, तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनोमध्ये मृत्यू, साशाला झाला होता गंभीर आजार
आज नेहमीप्रमाणे फटाका फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी ३५ मजूर दाखल झाले होते. यातील काही मजूर म्हणजे २५ हून अधिक मजूर जेवण करण्यासाठी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फटाका फॅक्टरीपासून जवळपास ५०० मीटर अंतरावर गेले होते. मजूर जेवायला बसलेच तेवढ्यात या फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. या ब्लास्टची तीव्रता अधिक असल्याने भिंतीला तडे जाऊन पूर्ण खोली कोसळली आहे. अन् भिंतीचे तुकडे जवळपास दोनशे मीटर दुरवर उडाले. दरम्यान हे मजूर सदर फटाका फॅक्टरीपासून दूर जेवणासाठी गेल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्यासह त्यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटा दिल्या आणि घटनेचा पंचनामा केला आहे.

दरवर्षी पुराच्या गाळात बुजणारं महादेवाचं मंदिर; पिंडीला बाहेर काढण्यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी

Latest posts