Friday, March 31, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2212

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

182

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Mobile Phone, तुला काय करायचे ते कर, मी मोबाईलचे हप्ते भरत नाही जा, असे म्हणत तिघांचे धक्कादायक कृत्य – police have arrested two people in connection with the attack on one person in maval in pune

0

मावळ : कोण कोणत्या गोष्टीचा राग कसा काढेल याचा विचार देखील आपण करू शकत नाही. असाच एक प्रकार तळेगाव दाभाडे येथून समोर आला आहे. मोबाईलचे हप्ते का भरत नाहीस असे विचारल्याने तिघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या तिघांनी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर येथे हा प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.मयूर अंकुश मते ( वय २१), स्वप्नील उर्फ मोन्या आनंद जाधव ( वय ), गणेश ऊर्फ सौरभ आनंद जाधव ( वय २२) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून या प्रकरणी. विशाल नंदकिशोर खंदारे ( वय २४) यांनी फिर्याद दिली आहे. यातील मयूर मते आणि गणेश जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेलमध्ये खळबळ! शिवकर गावातील १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला, गमावला जीव
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मयूर मते याने फिर्यादी खंदारे यांच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेतला. मात्र मयूर याने मोबाईलचे हप्ते भरले नाहीत. तू हप्ते का भरले नाहीस असे फिर्यादी याने मयूर याला विचारले. या गोष्टीचा मयूर याला राग आला. तो राग मनात ठेवून मयूर याने आपल्या दोन साथीदारासह फिर्यादीला शिवीगाळ केली. मी हप्ते भरणार नाही, तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फिर्यादी जखमी होऊन खाली पडले असताना देखील आरोपीने कोयत्याच्या मागच्या बाजूने पुन्हा वार केले . त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने नागरिकांत काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ

Panvel crime, पनवेलमध्ये खळबळ! शिवकर गावातील १९ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला, गमावला जीव – a 19 year old youth from panvel lost his life in a fatal attack

0

नवी मुंबई : पनवेलमधील शिवकर गावात राहणाऱ्या तरुणावर अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विनय बाबूराव पाटील (वय १९) याच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.विनय पाटील हा बुधवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता गावालगतच्या मोर्म्युला तलावाच्या गणपती घाटाजवळ गेला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या बहिणीला जाग आल्यानंतर तो घरामध्ये नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन विनयची शोधाशोध केली.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
काही वेळानंतर त्याचा मृतदेह मोर्म्युला तलावाच्या गणपती घाटाजवळ आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनयची हत्या कुणी व कशासाठी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ
विनय पाटील यांचे परिसरातील सर्वांसोबत चांगले संबंध होते त्याची कोणासोबत दुश्मनी नव्हती अशी प्रतिक्रिया परिसरातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याला घरातून एका अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या अंधारात घरातून बाहेर काढत काही समजण्याच्या आतच त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विनोद हा झाडावरून नारळ काढणे, झाडे तोडणे अशी छोटी मोठी कामे करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे त्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येबाबत पोलिसांच्या तपासाकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

railway crime, मुंबईहून युवक झारखंडला निघालेला, रेल्वेत बसल्यावर नको ते घडलं,कल्याणला उतरावं लागलं, तीन आरोपींचा शोध सुरु – central railway three vendors in railway theft two thousand five hundred rupees of jharkhand youth

0

ठाणे : छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावडा मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची पुंजी घेऊन फेरीवाले चोरटे फरार झाले. कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटीमुळे लोकल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. लोकल, मेल एक्सप्रेसमधील काही फेरीवाले हे चोरीचे प्रकार करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उपनगरीय महिला प्रवासी रेल्वे महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी लोकल, मेल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही रेल्वे अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वे प्रवासातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बाबत पोलिसांनी सांगितले की, झारखंड राज्यातील गिरिडोह जिल्हयातील बजटो गावातील रहिवासी अजय सिंह सुतार म्हणून काम करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री तो हावडा मेलने गावी जाण्यासाठी निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १७ वरुन रात्री सव्वा दहाची मेल सुटली. सामान्य डब्यातून अजय प्रवास करत होता. मेल सुटून पुन्हा रेल्वे स्थानका बाहेर थांबली. त्यावेळी एअरफोन विकणारे दोन फेरीवाले आणि त्यांचा एक साथीदार डब्यात चढले. अजय यांच्या शेजारील एका प्रवाशाने ५०० रुपयांची नोट देऊन दीडशे रुपयांना फोन खरेदी केला. फेरीवाल्याने परत कलेले उर्वरित ३०० रुपये खरेदीदाराच्या हातात होते. ५० रुपये नंतर देतो असे फेरीवाला म्हणाला. त्याचवेळी तेथे दुसरा एक व्यक्ती आला. त्याने खरेदीदाराला ‘तु कोणाचे पैसे चोरलेस. तुझ्या हातामधील पैसे कोणाचे आहेत,’ असा प्रश्न करुन त्याला चोर समजून दटावणी केली. अजयने दटावणी करणाऱ्याला त्याने एअरफोन खरेदी केला आहे. ५०० रुपयांमधून जी रक्कम परत मिळाली त्यामधील रक्कम त्याच्या हातात आहे असे सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तीनं अजयला ‘तु मध्ये बोलू नकोस. तुला आम्ही बघतो’ अशी धमकी दिली.

चेन्नईला मोठा धक्का, धोनीच्या दुखापतीबाबत आली आता मोठी अपडेट, खेळणार की नाही पाहा…

मेल सुरू झाल्यानंतर एअरफोन विकणारे दोन जण अजयच्या जवळ आले. त्यांन अजयला हिरो समजतोस का,असं बोलून शिवीगाळ, दगड खडीने मारहाण सुरू केली. त्यांना आणखी एका व्यक्तीनं साथ दिली. तिघांनी अजयला मारहाण करत त्याच्या खिशातील दोन हजार पाचशे रुपयांची रक्कम काढून घेतली. हा प्रकार सुरू असतानाच पुन्हा मेल सीएसएमटी-मशीद स्थानकांच्या दरम्यान थांबली. या संधीचा गैरफायदा घेत तिन्ही चोरटे पळून गेले.

वसंत मोरे पुन्हा भडकले: पुण्यातील मनसे नेत्यांविरुद्ध बंड; ‘राज’दरबारी न्याय मागणार

अजयने तात्काळ रेल्वेच्या मदत संपर्क क्रमांकावर संपर्क केला. तात्काळ रेल्वे सुरक्षा यंत्रणा जागी झाली. कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता हावडा मेल येताच, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अजयला मेलमधून उतरविले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याच्या तक्रारीवरुन तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

corona in maharashtra, काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ – coronavirus see latest updates maharashtra registered 694 new cases in a day with 184 patients recovered

0

मुंबई : राज्यात करोनाचा धोका वाढू लागला असून आज एकाच दिवशी राज्यात ६९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज एकूण १८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच आज एकाही करोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.राज्यात आतापर्यंत एकूण ७९ लाख ९२ हजार २२९ करोनाचे रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हे पाहता राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के इतके झाले आहे. तर राज्यात मृत्यूचा दर १.८२ टक्के इतका आहे.

आज राज्यात एकूण ३ हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर दुसऱ्या स्थानी ठाणे आणि तिसऱ्या स्थानी पुणे आहे.

नागपुरात खळबळ! धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
देशात XBB. 1.16 व्हेरिएंटचा वाढता धोका

देशात XBB. 1.16 या व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात XBB. 1.16 या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. देशात रुग्णवाढीचं कारण हा XBB. 1.16 व्हेरिएंट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. INSACOG च्या माहितीनुसार, XBB. 1.16 या व्हेरिएंटचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहेत. महाराष्ट्राच XBB. 1.16 सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यात एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. या व्हेरिएंटचा तुलनेने झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला मोठा धक्का
दरम्यान, काल राज्यात ४८३ नवे रुग्ण आढळले होते. राज्यात मुंबईनंतर पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण फक्त मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहेत.

देशात कोरोनाची स्थिती

देशात सध्या कोरोनाचे १३ हजार ५०९ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ३२१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत देशात ५ लाख ३० हजार ८६२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

vasant more mns, वसंत मोरे पुन्हा भडकले: पुण्यातील मनसे नेत्यांविरुद्ध बंड; ‘राज’दरबारी न्याय मागणार – pune mns leader vasant more is angry with the party leaders for not having his name on the ram navami program leaflet

0

पुणे : मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे आणि मनसेच्या पुण्यातील इतर स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विस्तव देखील जात नसल्याचं चित्र आहे. आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून जाणूनबुजून सातत्याने डावलले जात आरोप वसंत मोरे नेहमीच करत असतात. आता पुन्हा एकदा रामनवमीच्या एका कार्यक्रमानिमित्त पुणे मनसेत नाराजीनाट्य उफाळून आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच कसबा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने सामूहिक रामरक्षा पठण आणि श्रीराम आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम पत्रिकेत वसंत मोरे वगळता शहरातील इतर सर्वच बड्या पदाधिकाऱ्यांची नावं असल्याने वसंत मोरे कमालीचे नाराज झाले आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राम रक्षा पठण मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि आरएसएसचे प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. तर प्रभू श्रीरामांची आरती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे आणि गणेश सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे.

नागपुरात खळबळ! धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील कृत्य, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दुसरीकडे याच कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मनसेच्या महिला शहराध्यक्ष वनिता वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, रणजित शिरोळे, प्रवक्ते योगेश खैरे, प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अमोल शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं या पत्रिकेत उल्लेख होता. त्यामुळे शहरातील सर्वच बडे पदाधिकारी या कार्यक्रमाला निमंत्रित असताना वसंत मोरे यांचं नाव नसल्याने मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना वसंत मोरे म्हणाले, ‘मला मुद्दाम डावलण्यात येत आहे. शहरातील जवळपास सर्वच सरचिटणीस यांची नावं या पत्रिकेत आहेत. मात्र माझं आणि अनिल शिदोरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. हे पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. यासंदर्भातील तक्रार मी आमचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे केली आहे. अनेक महिन्यांपासून शहर कार्यकारणी पक्षात मला टार्गेट करत आहे. मात्र आता खूप झालं. मी यासंदर्भात आता थेट राज दरबारी न्याय मागणार आहे. राज साहेब आल्यावर त्यांच्या नजरेसमोर या सर्व गोष्टी ठेवणार आहे,’ असं म्हणत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘माझ्याविरुद्ध पक्षातून षडयंत्र केलं जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावलण्यात येत आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. परंतु माझं नाव पत्रिकेत वगळलं जात आहे. मला आता ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे,’ असं वसंत मोरे म्हणाले.

मनसेला आमचा पाठिंबा; मुस्लीम कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

सिंधुदुर्ग : बांदा सटमट येथील सीमा तपासणी नाका १ एप्रिल पासून होणार सुरु

0








बांदा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा सीमेवरील बांदा सटमटवाडी येथील सिंधुदुर्ग आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका शनिवार १ एप्रिल पासून सुरु होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने टोलनाक्यात जय्यत तयारी सुरु आहे. याबाबत प्रशासनाकडून सर्व अधिकृत परवाने प्राप्त झाले आहेत मात्र याबाबत पत्रकारांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही .

बांदा – सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका साकारला आहे. स्थानिक शेतकर्‍यांशी संघर्ष करुन महसूल प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी चुकीचे अहवाल सादर करण्यात आले होते. बर्‍याच शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही.

सदर सीमा तपासणी नाक्यावर खासगी वाहनांची स्कॅन करुन तपासणी होणार आहे. तसेच व्यावसायिक वाहतुकीवर साडेसात मेट्रिक टन वजनाच्या वाहनासाठी ४७ रुपये २० पैसे,  मध्यम व्यावसायिक वाहने ज्यांचे वजन साडेबारा मेट्रिक टन असेल त्यांच्याकडून ९४ रुपये ४० पैसे टोल आकारला जाईल.

जड व अतिजड व्यावसायिक वाहन  वजन १२ मेट्रिक टनच्या पुढे  असेल त्यांच्याकडून १८८ रुपये ८० पैसे टोल आकारण्यात येणार आहे. कृषी मालाची वाहतूक तसेच संरक्षण विभागाच्या वाहनांना सवलत मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा :









Brahmos: MoD inks deals for next-gen vessels, radars, Akash and BrahMos missile batteries worth over Rs 32,000 crore | India News

0

NEW DELHI: In a flurry of deals a day before the ongoing fiscal ends, the defence ministry on Thursday inked major indigenous contracts worth over Rs 32,000 crore for six next-generation missile vessels, 11 offshore patrol vessels and two BrahMos missile coastal batteries for the Navy as well as two more Akash missile regiments and 12 weapon-locating radars for the Army.
The next-generation offshore patrol vessels will be built — seven at Goa Shipyard and four at Garden Reach Shipbuilders and Engineers in Kolkata – at a cost of Rs 9,781 crore.

“Delivery of these ships will commence from September 2026. They will enable the Navy to maintain its combat capability and meet various operational requirements such as anti-piracy, counter-infiltration, anti-trafficking and protection of offshore assets etc,” an official said.
The six missile vessels, in turn, will be built by the Cochin Shipyard at a cost of Rs 9,805 crore, with the delivery to begin from March 2027. “These high-speed stealth vessels will be heavily armed. Their primary role will be to provide offensive capability against enemy warships, merchantmen and land targets. They will be a potent instrument of sea denial for enemy ships especially at choke points,” the official said.
Another contract for the Navy was the over Rs 1,700 crore one for two next-generation maritime mobile coastal batteries (long range) of the BrahMos supersonic cruise missiles. The batteries, equipped with missiles of 350-420-km range for “multi-directional strike capability”, will be delivered from 2027 onwards.

The biggest contract for the Army was for Rs 8,160 crore inked with Bharat Dynamics for two more Akash weapon system (AWS) regiments, with surface-to-air missiles capable of intercepting hostile aircraft, helicopters and drones at a 25-km range, to add to two existing ones already with the force.
These two “improved” AWS regiments will have better seeker technology, a reduced footprint, 360° engagement capability and improved environmental parameters for deployment in high-altitude areas along the frontier with China.
The 12 weapon locating radars Swathi (plains), in turn, will be procured from Bharat Electronics (BEL) for over Rs 990 crore. “These indigenous radars are capable of locating guns, mortars and rockets of enemy troops to facilitate their destruction through counter-bombardments. Their induction is planned to be completed in 24 months,” the official said.
Another Rs 1,700 crore contract was inked with BEL for procurement of 13 Lynx-U2 fire control systems for naval guns, which are capable of accurately tracking and engaging targets amidst the sea clutter as well as in the air. These 4th generation systems will be installed on the new-generation offshore patrol vessels.

Russia: ‘Leave Russia immediately’: US condemns arrest of WSJ journalist, issues advisory

0

WASHINGTON: US Secretary of State Antony Blinken said on Thursday he was “deeply concerned” by Russia’s arrest of an American journalist and denounced Moscow’s efforts to “punish” the media. He also advised US citizens living or traveling in Russia to “please leave immediately”.

“We are deeply concerned over Russia’s widely reported detention of a US citizen journalist,” Blinken said in a statement, referring to Wall Street Journal reporter Evan Gershkovich. The US generally avoids naming citizens arrested abroad without receiving formal permission from their families.
The US said it was seeking consular access in regards to the American journalist’s detention.
US officials said they were in touch with Gershkovich’s family as well as the newspaper and that the State Department had contacted Russia to seek consular access.
“The targeting of American citizens by the Russian government is unacceptable. We condemn the detention of Gershkovich in the strongest terms,” White House Press Secretary Karine Jean-Pierre said in a statement.
“I want to strongly reiterate that Americans should heed the US government’s warning to not travel to Russia. US citizens residing or traveling in Russia should depart immediately.”
President Joe Biden had been briefed on the detention, National Security Council spokesman John Kirby said.
Secretary of State Antony Blinken in a statement connected the detention to the crackdown on media in Russia, whose relations with Washington have nosedived since the invasion of Ukraine.
“In the strongest possible terms, we condemn the Kremlin’s continued attempts to intimidate, repress, and punish journalists and civil society voices,” Blinken said.

Banga: US candidate Ajay Banga the sole nominee to lead World Bank

0

WASHINGTON: Ajay Banga, the American pick to lead the World Bank, was the only candidate nominated for the position, the bank confirmed Thursday, paving the way for his likely appointment in the coming months.
“In accordance with established procedures, the Executive Directors will conduct a formal interview with the candidate in Washington D.C., and expect to conclude the Presidential selection in due course,” the bank said in a statement.

Biden’s mastercard_ Nominates Ajay Banga as World Bank chief.

Under an unwritten arrangement, the United States has historically held the presidency of the Washington-based development lender, while the International Monetary Fund has been run by a European.
Banga, 63, was born in India and is a naturalized US citizen.
President Joe Biden announced his nomination last month to succeed David Malpass, who is stepping away early from a presidency clouded by questions over his climate stance.
From Nestle to Mastercard
Ajaypal Singh Banga was born into a Sikh family in the Indian city of Pune in the state of Maharashtra.
Banga grew up in different parts of the country due to his father’s job as an army officer, before getting his start in business at the Indian subsidiary of Nestle in the early 1980s.
He went on to have a successful business career in India, and later relocated to the United States.
Banga ran the payments company Mastercard for more than a decade between 2010 and 2021, and has also served on the boards of the American Red Cross, Kraft Foods and Dow Inc.
He is currently vice chairman at private equity firm General Atlantic.
Private financing for global problems
In a statement supporting his nomination, Biden said Banga’s business career meant he was “uniquely equipped to lead the World Bank.”
He highlighted Banga’s “critical experience mobilizing public-private resources to tackle the most urgent challenges of our time, including climate change.”
Banga told reporters previously that he wanted to see greater private sector funding to help tackle financing for global problems.
“There is not enough money without the private sector,” he said.
Since his nomination, Banga has been on a US Treasury-backed “listening tour” of the bank’s 189 member countries to drum up support for his candidacy.
Treasury Secretary Janet Yellen told US congressional leaders earlier this week that she expects Banga to be confirmed as the bank’s next leader.
Board interviews
Although no other country had publicly declared a challenger to Banga, it was unclear before Thursday morning if any of the other member states had chosen to privately nominate a candidate for president.
No women were nominated for the post, despite the World Bank “strongly” encouraging applications.
All of the presidents approved by the organization since its inception in the 1940s have been men.
Despite being the sole nominee, Banga must still undergo a formal interview process in front of the World Bank’s board, according to Thursday’s notice.
An announcement is unlikely to come before May, according to two people familiar with the matter.
While the World Bank nominee has historically been an American citizen, a growing number of countries have challenged the unwritten arrangement in recent years.
The sole nomination of Banga suggests most countries still support US leadership of the development lender.

AAP Poster on Modi, दिल्लीचा ट्रेंड कोल्हापुरात, सगळीकडे त्या पोस्टर्सची चर्चा, अखेर ‘आप’नं जबाबदारी घेतली, म्हणाले.. – aap kolhapur unit put posters against narendra modi like delhi and said campaign will extend in next days

0

कोल्हापूर: दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे फलक लागल्याने, सोशल मीडिया सह राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू झाली होती. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या फलकांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचे जाहीर केले. हे बॅनर आम आदमी पार्टी कडून दिल्लीच्या धर्तीवर लावण्यात आले असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

शहरात मोदी हटावो देश बचावचे पोस्टर

मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटत असतानाच गेल्या एकदोन आठवड्यापुर्वी पासून दिल्ली शहरात आम आदमी पार्टीने ‘ मोदी हटाओ देश बचाओचे ‘ हजारो फलक लावल्याने खळबळ उडाली होती. तर असाच प्रकार आज कोल्हापूर शहरात ही दिसून येत असून रातोरात हे फलक लागले आहेत. शहरातील रंकाळा टॉवर,माऊली चौक,तलवार चौक,हाॅकी स्टेडियम आदी चौकात लाल रंगाच्या फलकांवर पांढऱ्या अक्षरात मोदी हटावो,देश बचावो अश्या आशयाचे फलक लागले आहेत. या फलकांची फोटो बघता बघता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत तसेच जोरदार चर्चा देखील सुरू झाली आहे.

शहरात लागलेले हे बॅनर्स आम आदमी पार्टीने लावले आहेत. ही मोहीम म्हणजे केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात फुंकलेले रणशिंग आहे, असं आप नेत्यांनी सांगितलं. देशाला आता शिकलेला पंतप्रधान अपेक्षित आहे. या मोहिमेला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.तर ही मोहीम सुरूच राहणार असून शहरभरात आणखी बॅनर-पोस्टर लावले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी खरी आहे का?, लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणिती चोप्राचा चेहरा खुलला

केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न, आपचा आरोप

ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे, असं आप नेत्यांनी म्हटलं. हिंडेनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कारकिर्दीत काही मोजक्या भांडवलदारांची ८ लाख कोटींची कर्जे माफ करण्यात आली आहेत.

भीषण! दुभाजक ओलांडून रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; उड्डाणपुलावरून महिला पडली, जोडप्याचा अंत

शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, परंतु शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत एका वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन देखील मोदी सरकारला त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही. ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला.

पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला मोठा धक्का

देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने देशभरात ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम देशभर सुरू केले असल्याचे संदीप देसाई यांनी सांगितले आहे. उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अमरजा पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे आदी यावेळी उपस्थित होते.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांमधला वाद चव्हाट्यावर, IPL पूर्वीच संघात ठिणगी

Latest posts