Tuesday, May 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2528

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

26

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

28

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

21

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

20

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

20

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

24

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Tussle over portfolios forces revised allocation in Karnataka | India News

0

BENGALURU: Karnataka CM Siddaramaiah has retained IT and biotechnology (IT & BT) in addition to finance, according to a “revised” list released Monday following last-minute tussles for spots among his Congress ministerial colleagues that capped over a week of jockeying for berths after the May 20 swearing-in.
The revised list approved by governor Thaawar Chand Gehlot keeps the cabinet size at its maximum of 34 but the fresh allocations come after the CM’s tweaks and reshuffles of minor departments among disgruntled ministers eyeing plum portfolios.
MB Patil was originally entrusted with IT & BT, besides industries, but it went to Priyank Kharge in a subsequent revision, along with rural development. MB Patil is said to have chafed at this, saying he was keen on IT & BT. Eventually, Siddaramaiah decided to keep the portfolio. He may reallocate it later. As expected, deputy CM DK Shivakumar was handed water resources and Bengaluru development. Senior minister Ramalinga Reddy, upset over being given transport- which he had handled during the previous Siddaramaiah regime – was pacified with the additional responsibility of the Muzrai (shrine) department.

Karnataka cabinet expansion: 24 Legislators take oath as Ministers

01:45

Karnataka cabinet expansion: 24 Legislators take oath as Ministers

Shivakumar met Reddy Sunday and cajoled him into accepting the role. Sources say Reddy, an eight-time MLA, was upset mainly because his junior cabinet colleagues from Bengaluru – Krishna Byregowda, BZ Zameer Ahmed Khan, and Dinesh Gundurao – were given “significant” portfolios like revenue, housing and health. HK Patil was initially given law and parliamentary affairs along with minor irrigation. But irrigation has now been assigned to NS Boseraju, who is also science and technology minister. HK Patil will additionally handle tourism. Sources say Siddaramaiah also spoke to G Parameshwara, MB Patil, SS Mallikarjun, Shivanand Patil, and others reportedly upset with their portfolios. He is said to have promised to consider their requests when the cabinet is re-jigged.
Kannada and culture was initially given to B Nagendra, who refused saying he is not a native Kannada speaker. The portfolio has now been given to Shivaraj Tangadagi. As demanded by Nagendra, a Valmiki, he got ST Welfare along with sports. All eyes will now be on three ministers who will play a crucial role in implementing poll promises.

58 years after death, body of war veteran flown to US | India News

0

KOLKATA: The remains of a decorated American officer, Major General Harry Kleinbeck Pickett, who fought in both World War I and II (he was at Pearl Harbour when the Japanese attacked), were flown home to the US on Monday for reburial at Arlington National Cemetery in Virginia from their previous resting place at Singtom cemetery on Lebong Cart Road, Darjeeling.
Pickett had died of heart failure on March 19, 1965 in Darjeeling while on a round-the-world trip and had been buried in the cemetery, which houses the graves of many Englishmen, including the discoverer of Darjeeling, Lt Gen George W Aylmer Lloyd, and Hungarian linguist Sandor Csoma de Koros.
The decorated officer’s body was exhumed in March after the American Citizens Services (ACS) unit of the US consulate general, Kolkata, got the necessary approvals from the West Bengal government’s home & hill affairs department. “We issued the no-objection certificate that was required for exhumation and another for the repatriation of the remains,” department special secretary B P Gopalika told TOI.
Earlier, negotiations between the US embassy and the ministry of external affairs had led to clearance from the government of India.
“This week, more than 50 years after his passing, decorated World War I and II veteran Major General Harry Kleinbeck Pickett returned home to his family in the United States, for re-burial at Arlington National Cemetery. This was only possible because dedicated partners in West Bengal and Darjeeling extended their care and support. Thank you for reuniting Major General Pickett with his loved ones, and for strengthening the bonds of friendship that bind Americans and Indians together,” tweeted US ambassador to India Eric Garcetti.
Major General Pickett was commissioned into the United States Marine Corps in 1913 and went on to become one of the few Americans who served with distinction in both world wars.

Congress: 3 months after bypoll win, lone Congress MLA in West Bengal joins TMC

0

GHATAL: Less than three months after trumping Trinamool Congress to win the Sagardighi bypoll, Congress’s lone MLA in Bengal assembly, Bayron Biswas, Monday joined the governing party in the presence of its national general secretary Abhishek Banerjee, reports Sujoy Khanra. On March 2, Biswas pulled off a remarkable 22,986-margin victory at Sagardighi, a seat deceased TMC minister Subrata Saha held thrice.
Abhishek inducted Biswas into TMC saying, “We want to support Congress where they are strong, but Congress should reciprocate that in Bengal. If it weakens TMC, the only party that will gain is BJP.”
Denying he was ‘a traitor’, Biswas said: “Bayron Biswas won the polls, not Congress. If I contest again, I’ll win.”
(With inputs from Sukumar Mahato and Pinak Priya Bhattacharya)

Pakistan: 9-year-old forced to convert and marry in Pakistan, India protests | India News

0

NEW DELHI: India has registered a strong protest with Pakistan against the forced conversion and marriage of a Hindu girl in Sindh province. The girl, who is only nine years old, was reportedly abducted from her home earlier this month by a 55-year-old man who married her after having her converted to Islam.
Lodging a protest, India called upon Pakistan to ensure the safety and security of its minority communities and to protect their rights.

'Accurately showcased': After PM Modi's support for 'The Kerala Story', a victim of forceful religious conversion too backs film

04:00

‘Accurately showcased’: After PM Modi’s support for ‘The Kerala Story’, a victim of forceful religious conversion too backs film

The forced conversion and marriage is the latest in a series of incidents reported from Sindh in the past few years in which Hindu girls and women were targeted.
A 44-year-old Hindu woman was murdered and her body mutilated in Sindh late last year, leading to widespread panic among the minorities. An 18-year-old was killed last year in Sukkur after she resisted attempts to abduct her.
According to Indian authorities, as many as 124 cases of forced conversion and marriage involving girls and women from minority communities have been reported from Pakistan in the past year. Many of the victims have been minors.

6 labourers working on rail power project electrocuted | India News

0

DHANBAD: Six contract labourers were electrocuted while installing a truss pole to support the overhead railway power line near Nichitpur railway crossing, on the Dhanbad-Gaya section in Dhanbad rail division, on Monday morning. Five trains were stranded at nearby railway stations for about one-and-a-half hours due to the tragedy.
Divisional railway manager (DRM) K K Sinha, who visited the spot along with other senior officials from the division, said the poles were being installed by contract labourers engaged by Rail Vikas Nigam Ltd (RVNL). At about 11.35 am on Monday, one of the truss poles slipped from their hands and touched the live 25KV overhead wire. The six workers holding the pole were charred to death.
Sinha admitted that the incident was a clear-cut case of negligence on the part of the contractor and that suitable action would be taken against the firm deploying the workers. The incident could have been avoided had the contractor taken permission for a power block to erect the poles, Sinha added.
The deceased have been identified as Govind Singh, Shyamdev Singh, Suresh Mistri, Sanjay Bhuiyan, Sanjay Ram, and Damodar Ram. While five of the deceased are from Palamu and Latehar, one is reportedly a native of Prayagraj, UP, the DRM said, stating that other workers present there fled after the incident.

9 of a family among 10 killed in Karnataka SUV-bus collision

0

MYSURU: Nine members of a family from Ballari in Karnataka, returning to Mysuru after a sightseeing trip, died when their hired SUV shot out of the lane and crashed into a private bus on a state highway on Monday afternoon. The SUV driver, who was from Srirangapatna in Mandya district, also died in the accident.
Three others travelling in the SUV were admitted to Mysuru’s KR Hospital. One of them, who suffered grievous head injuries, is battling for life, according to police. The dead included three children.
Mysuru superintendent of police Seema Latkar told TOI that the 13 people travelling by the SUV were scheduled to board the Hampi Express in the evening to return to Ballari. The bus dashcam footage revealed the accident occurred at 2.09 pm on a steep curve. The SUV driver may have lost control while negotiating the curve and rammed into the bus, coming from the opposite direction. A few bus passengers sustained minor injuries.
Chief minister Siddaramaiah announced a compensation of Rs 2 lakh each to the family of the deceased and directed the Mysuru deputy commissioner to ensure that the injured receive proper treatment.

Sbi: SBI has received Rs 14,000cr in 2k notes as deposits so far

0

AHMEDABAD: The State Bank of India (SBI) has received Rs 14,000 crore of Rs 2,000 notes as deposits since the RBI withdrew the high-value note from circulation on May 23. This was announced by SBI chairman Dinesh Khara at an event Monday in Gandhinagar.
That apart, “Rs 3,000 crore were exchanged at the bank through its branch network”, Khara said. “As the withdrawn currency notes continue to be a legal tender with a ‘fairly wide window given for exchange’, people are not anxious.”

Watch: What are people doing with their Rs 2000 notes?

04:20

Watch: What are people doing with their Rs 2000 notes?

SBI listed Monday foreign currency bonds of $750 million under its $10 billion Global Medium Note Programme on India INX’s global securities market (GSM) at GIFT IFSC in Gandhinagar. The SBI chairman expressed confidence in expanding the bank’s international banking vertical with the push for export-oriented manufacturing.

Gautami’s program postponed, Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पण पावसाचा… कार्यक्रम करावा लागला स्थगित – lavani dancer gautami patil show had to be postponed due to heavy rain in khed pune

0

खेड : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्या वरून नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती तिचा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर पावसाने तुफान राडा घातला आहे. त्यामुळे आयोजकांना आजचा कार्येक्रम उद्यावर ढकलावा लागला. त्यामुळे आजचा कार्यक्रम ठरलेल्या वेळेत याच ठिकाणी होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील मोई येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमाच्या काही तास आधी पावसाने या भागात जोरदार हजेरी लावली. आणि कार्यक्रम ठिकाणी सर्व राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

धरणाच्या काठावर होते कपडे, त्यात मोबाइल वाजत होता, त्यांनी उचलला, माहिती देताच बसला धक्का
गौतमी पाटील ही सद्या तिच्या पाटील आडनाव लावण्यावरून चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक मराठा संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. मात्र माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे असं म्हणत गौतमी. पाटील हिला संभाजीराजे छत्रपती यांनी समर्थनच दिले आहे.

Shubman Gill : ३ शतके, ४ अर्धशतके आणि ३३ षटकार, तरीही शुभमन गिल विराटला मागे टाकू शकला नाही
याबाबत माहिती देताना आयोजक समीर गवारे म्हणाले की, आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने आजचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून उद्या ठरलेल्या वेळेत कार्यक्रम होणार आहे. पावसाने अचानक राडा केल्याने कार्यक्रम स्थगित करावा लागला असल्याचे गवारे यांनी सांगितले.

४ मृतदेह पाहून लवंगीत रात्रीपासून पेटली नाही चूल, प्रत्येकजण रडला, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
गौतमी पाटीलची तरुणांमध्ये मोठी क्रेझ

गौतमी पाटीलची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ वाढत आहे. तिच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण हजेरी लावतात. अनेक व्हिडिओ देखील गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे व्हायरल होत असतात. त्यामुळे तिला अनेक ठिकाणी मागणी असते.

Urban joblessness slows to 6.8% in January-March quarter

0

NEW DELHI: The unemployment rate in urban areas in the January-March quarter of 2023 slowed to 6.8% from 8.2% in the January-March period of last year as the job situation improved and economic activity gathered strength.
The unemployment rate during the January-March quarter of 2023 eased to at least a five-quarter low. The rate had accelerated sharply during the Covid-19 pandemic as curbs were imposed to prevent the spread of the deadly virus. The rate for workers above 15 years has been slowing since the lifting of the curbs. In the October-December 2022 quarter, the rate was 7.2% similar to the rate in July-September 2022.

Capture

Data released by the National Statistical Office (NSO) on Monday showed the unemployment rate for females in the 15 years and above category eased to 9.2% in the March quarter from 9.6% in the previous three month period..
The strict lockdown imposed to prevent the spread of the coronavirus had pushed the overall unemployment rate to 20.9% in the April-June quarter of 2020, raising worries about the job situation across the country.
For males in the 15 years and above category, the unemployment rate slowed to 6% in the March quarter, and below the 6.5% in the October-December period and lower than the 7.7% in the January-March quarter of 2022.
The labour force participation rate, which is defined as the percentage of persons in the labour force (working or seeking or available for work) in the population, marginally improved to 48.5% in the January-March quarter of 2023 quarter from 48.2 % in the October-December period and above the 47.3% in the January-March 2022 period. For females, it inched up to 22.7% in the January- March quarter from 22.3% in the October-December 2022 period. The rate was at 20.4% in the January-March quarter of 2022.
The NSO released the quarterly bulletin of the Periodic Labour Force(PLFS) survey, which is a key indicator of the measure of labour force participation rate, the worker population ratio and the unemployment rate. The unemployment rate is defined as the percentage of persons unemployed in the labour force. The PLFS was launched by the NSO to estimate the employment and unemployment indicators (worker population ratio, labour force participation rate, unemployment rate) in the short time interval of three months for urban areas only in the current weekly status.
Under CWS a person is considered as unemployed in a week if he/she did not work even for one hour on any day during the reference week but sought or was available for work at least for one hour on any day during the reference week, according to the PLFS. The annual PLFS report covers both rural and urban areas whereas the quarterly bulletin is for urban centres.

ठरलं…. आयपीएलची फायनल आता किती षटकांची होणार, जाणून घ्या पंचांनी काय सांगितलं….

0

अहमदाबाद : आयपीएलच्या फायनलच्या राखीव दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर आता पंचांनी मैदानाची पाहणी केली आहे आणि त्यांनी हा सामना आता किती षटकांचा होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे.या सामन्यात पहिला डाव सलीसलामत पार पाडला. गुजरातच्या साई सुदर्शनने यावेळी ९६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला वृद्धिमान साहाने अर्धशतकी साथ दिली. दमदार फलंदाजी करत गुजराच्या संघाने यावेळी २१४ धावांचा डोंगर उभारला. चेन्नईचा संघ २१५ धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरला खरा. पण चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने यावेळी चौकार मारला आणि त्यानंतर पावसाचे मैदानात आगमन झाले. त्यानंतर जवळपास अर्धा तास तरी पाऊस पडला. त्यानंतर पंचांनी रात्री १०.४५ वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर पंचांनी पुन्हा एकदा ११.३० वाजता पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी हा सामना किती षटकांचा खेळवला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार आता मध्यरात्री १२.१० वाजता सामना सुरु होईल आणि तो १५ षटकांचा असेल. चेन्नईला यावेळी १५ षटकांत १७० धावांचे आव्हान देण्यात आले आहे.धोनीने या सामन्याचा टॉस जिंकला होता आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने यावेळी टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्यचा निर्णय त्याने घेतला. मुंबईने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनी याववेळी प्रथम फलंदाजी घेईल, असे त्याला वाटले होते. पण धोनीने गोलंदाजी घेतल्यामुळे हार्दिकही चकीत झाला. पण या सामन्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे. कारण रविवारी पाऊस पडला होता. त्यामुळे खेळपट्टी जरी ओली नसली तरी जमिनीचा ओलावा मात्र नक्कीच असणार. त्याचबरोबर आज गुजरातमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या सामन्यात जो प्रथम गोलंदाजी करणार त्यांना मदत मिळणार आहे. ही गोष्ट धोनीला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पण धोनीचा हा निर्णय फसल्याचे पाहायला मिळाले. कारण पावसानंतरही गुजरातच्या फलंदाजांना जास्त फायदा झाला आणि त्यांनी दोनशेपेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला.

Latest posts