Wednesday, March 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2185

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

180

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Agnihotri: Himachal Pradesh Dy CM Mukesh Agnihotri sustains head injury, hospitalised | India News

0

SHIML: Himachal Pradesh Deputy Chief Minister Mukesh Agnihotri sustained head injury after he slipped near his residence in Shimla while taking a stroll on Tuesday evening. He was rushed to IGMC Shimla and is under treatment, officials said.
Doctors said Agnihotri is fine and his city scan has been done.
Chief Minister Sukhvinder Singh Sukhu visited the IGMC to see Agnihotri and wished him speedy recovery.
Later in a social media post, Agnihotri said he is fine and thanked all the people for their concerns and wishes.
Mukesh Agnihotri, a five time MLA from Haroli assembly constituency in Una districts is the first deputy chief minister of Himachal and holds portfolios of Transport, Jal Shakti and Language, art and culture departments.

pandhar accident updates, पंढरपूर : अचानक घरात पडला भलामोठा खड्डा; एकामागोमाग ३ महिला कोसळल्या; अखेर साडीमुळे वाचला जीव – pandharpur suddenly, a big pit was formed in the house 3 women collapsed sari saved lives

0

सोलापूर : पंढरपूर शहरातील एका घरात अचानक जमीन खचली आणि मोठा खड्डा पडला. त्यामुळे घरातील तीन महिला या खड्ड्यात पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. हा खड्डा तब्बल ३० ते ३५ फूट खोल होता. त्यामुळे सदर महिलांना मोठ्या शिताफीने वाचवण्यात यश आलं आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली होती.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर शहरातील कोळी गल्ली परिसरातील राहुल शिंदे यांच्या घरात साधारण ३५ फूट खोल खड्डा पडल्याने यात तीन महिला पडल्या अडकल्या होत्या. आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत साडीच्या गाठी बांधत तिन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढले. पंढरपूर स्थानिक प्रशासनाला याबाबत ताबडतोब माहिती देण्यात आली होती. प्रशासनाला येण्यास दिरंगाई होत असल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी साड्यांना गाठी बांधून या महिलांचे प्राण वाचवले.

द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओला चोरट्यांनी गाडी आडवी लावली, फिल्मी स्टाईलने १ कोटी लुटले

अचानकपणे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास राहुल शिंदे यांच्या घरातील फरशी खाली आली. राहुल यांच्या कुटुंबातील एक महिला या खड्ड्यात पडल्यानंतर ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने शेजारील एक महिला काय झालं आहे, हे पाहण्यासाठी आली आणि तिलाही या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तीदेखील खाली पडली. राहुल शिंदे यांची वृद्ध आई देखील या खड्ड्यात पडली. तीन महिला एकापाठोपाठ खड्ड्यात पडल्याने कोळी गल्लीत एकच गोंधळ उडाला होता.

नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत फोनद्वारे कळवूनही अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे परिसरातील स्थानिक कोळी समाजाचे कार्यकर्ते या खड्ड्यात उतरले आणि त्यांनी साड्यांच्या गाठी बांधत या महिलांना खड्ड्यातून बाहेर काढले. या खोल खड्ड्यात महिला पडल्या तेथे पाणी होते, वरून दगड-माती पडत असल्याने त्यांना तातडीने वाचवणे गरजेचे होते. अशातच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत या खोल खड्ड्यात उतरून महिलांना बाहेर काढले. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर या तिन्ही महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर दाखल केलं आहे.

जखमी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला संताप

पंढरपूर स्थानिक प्रशासनाला माहिती देऊनही दिरंगाई झाली. त्यामुळे राहुल शिंदे यांनी संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांची मदत मिळाल्यानेच या तीन महिलांचे प्राण वाचू शकल्याची माहिती माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली. पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने आता हा खड्डा बुजवण्याचे काम सुरू केले असून हा खड्डा आता दगड आणि मुरुमाने भरून घेतला जात आहे .

वारंवार येत असलेल्या पुरामुळे जमीन भुसभुशीत?

पावसाळ्यात पंढरपूर शहरात नदीचे पाणी शिरते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे या ठिकाणची जमीन गाळाची व भुसभुशीत बनल्याने असे खड्डे पडत असल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करत होते. सुदैवाने ही घटना मंगळवारी दिवसा घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली. रात्री झोपेत असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पंढरपूर शहरातील अशा धोकादायक झालेल्या इमारतींची तपासणी प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे. कारण पंढरपुरातील अशा अनेक घरांमध्ये वारकरी वास्तव्याला उतरतात, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.

First batch of Agniveers graduates after four months of training | India News

0

CHILIKA: The Passing out Parade of the first batch of 2,585 Agniveers took place at INS Chilka in Odisha on Tuesday after the completion of their four-month-long training.
Naval chief Admiral R Hari Kumar took the salute from the new recruits in the Passing Out Parade, which was held post-sunset, a first of its kind in the Indian armed forces. Traditionally, Passing Out Parades are held in the morning.
Rajya Sabha MP PT Usha, a noted former athlete, and cricketer Mithali Raj were present at the historic programme. Among those passing out were 272 female Agniveers.
These Agniveers, who underwent training at the Chilika lake — Asia’s biggest brackish water lake, would be deployed on frontline warships for sea training, officials said.
The training at INS Chilka encompassed academic, service and outdoor training, based on the core Naval values of duty, honour and courage, they said.
Addressing the programme, Admiral Hari Kumar asked the Agniveers to develop a strong foundation of knowledge, willingness to learn and commitment to excel in their careers.
He also urged them to uphold the Navy’s core values of duty, honour and courage, in pursuit of nation-building.
This first batch also includes those Agniveers who were part of the Indian Navy’s Republic Day Parade contingent on Kartavya Path this year, officials said.
Medals and trophies were also given to the meritorious Agniveers at the programme.

mexico fire, मेक्सिकोत रात्रीच्या अंधारात अग्नितांडव, ३९ जणांचा जागीच मृत्यू , २९ जखमींवर उपचार सुरु – us mexico border fire broke out at migrant centre killed 39 migrants

0

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या सीमेजवळ मेक्सिकोतील स्थलांतरित नागरिकांच्या केंद्रात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मध्य आणि दक्षिण अमेरिकेतून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे. ही आग मेक्सिकोच्या सिउडाड जुआरेज शहरातील केंद्रात लागली.

मेक्सिकोतील नॅशनल मायग्रेशन इन्स्टिट्यूटनं एक अधिकृत पत्रक काढत भूमिका स्पष्ट केली आहे. या केंद्रात ७१ प्रवाशांना ठेवण्यासाठी आणण्यात आलं होतं. सिउडाड जुआरेजच्या केंद्रात मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ६८ प्रवासी होते. त्यापैकी २९ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वेडात मराठे वीर दौडले सातच्या चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू, उपचार खर्चावरुन वाद

रुग्णालयामध्ये ३९ जणांचे मृतदेह ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दशकांमधील आगीची सर्वात मोठी घटना असल्याचं सांगतण्यात येतं. व्हेनेझुएलाच नागरिक वियांगले इन्फान्टे त्यांच्या पतीची वाट पाहत होत्या. त्याचवेळी केंद्रातून धूर येऊ लागला. रात्री १० च्या सुमारस आग लागली. मृतांमध्ये ग्वाटेमाला आणि होंडुरासच्या प्रवाशांचा समावेश आहे.

राज्य कोरोनाशी झुंजत होतो तेव्हा सावंत बंडाचं प्लॅनिंग करत होते, व्वा रे आरोग्यमंत्री… राष्ट्रवादी खवळली

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

मेक्सिकोच्या गृह मंत्रालयाकडून या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. आग नेमक्या कोणत्या कारणानं लागली हे समोर आलेलं नाही. मेक्सिकोत या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.मेक्सिकोतून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी नागरिकांसाठी सिउडाड जुआरेज हे महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथूनचं दुसऱ्या देशातून येणारे प्रवासी अमेरिकेत प्रवास करतात.
आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान

railway accident news, आईची भेट घेऊन कामावर जाण्याचा बेत, मात्र वाटेत अनर्थ घडला; एक चूक तरुणाच्या जीवावर बेतली! – a young man died in an accident because he could not hear the sound of the train while listening to music on headphones

0

सोलापूर : पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनजवळील रेल्वे मार्गावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जयेश जाधव (वय ३२, रा. जुना कासेगाव रोड, पंढरपूर) असं मृत तरुणाचं नाव आहे. जयेश हा सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आईला भेटण्यासाठी जात होता. त्याची आई रोहन पॅथोलोजी येथे काम करते. रेल्वे रुळावरून जाताना जयेशच्या कानामध्ये हेडफोन असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाठीमागून आलेल्या मिरज-कुर्डुवडी या रेल्वेगाडीचा जयेशला आवाज ऐकू आला नाही आणि रेल्वेची धडक बसताच गंभीर जखमी झालेल्या जयेशचा जागीच मृत्यू झाला.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जयेश जाधव हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची आईदेखील एका खाजगी पॅथोलोजी सेंटरमध्ये कामाला आहे. काही दिवसांपूर्वी जयेशवर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया झाल्याने अनेक दिवसांपासून तो घरी आराम करत होता. तब्ब्येत बरी झाल्याने त्याने कामाला जाण्यासाठी आईकडे हट्ट धरला होता. मंगळवारी सकाळी आधी आईला भेटावं आणि नंतर कामाला जावं, या विचाराने तो घरातून निघाला. मात्र कानात हेडफोन घालून तो रुळावर चालत निघाला होता. पाठीमागून मिरज-कुर्डवाडी रेल्वेगाडी वेगात येत होती. कानातील हेडफोनमुळे रेल्वे चालकाने मारलेला हॉर्न जयेशच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही आणि अनर्थ घडला.

वेडात मराठे वीर दौडले सातच्या चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू, उपचार खर्चावरुन वाद

दरम्यान, रेल्वे रुळावर एका तरुणाला रेल्वेने चिरडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अपघात होताच मोठी गर्दी झाली होती. जयेशचे घर देखील याच परिसरात असल्याने त्याची लगेच ओळख पटली. त्याचे नुकतेच ऑपरेशन झाले होते आणि आजच तो कामावर चाललेला होता, अशी चर्चा करत नागरिक हळहळ व्यक्त करत होते. अधिक तपास रेल्वे पोलीस संजय चिटनीस, एएसआय काझी आणि एसबी पाटील हे करत आहेत.

tanaji sawant, राज्य कोरोनाशी झुंजत होतो तेव्हा सावंत बंडाचं प्लॅनिंग करत होते, व्वा रे आरोग्यमंत्री… राष्ट्रवादी खवळली – ncp attack health minister dr tanaji sawant over his statement on maharashtra political crisis

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचं मन वळवलं, अशी पोटातही बात ओठावर आणली ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी… धाराशिव जिल्हातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘अंदर की बात’ जगजाहीर सांगितली. ज्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीने तर तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे.व्वा रे आरोग्यमंत्री… राष्ट्रवादी खवळली

वाह रे आरोग्यमंत्री… जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंजत होता आणि मविआ सरकार कोरोनावर मात करण्यासाठी लढत होते, सर्वसामान्यांना उपचार मिळावेत, लसीकरण व्हावे, रोगाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम करत होते, तेव्हा तुम्ही तत्कालिन सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने बंड करण्याची, सरकार पाडण्याची आणि राज्यात अस्थिरता आणण्याची खलबतं करत होतात. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठका घेत होतात.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
ज्यांना राज्य एका महाभयंकर रोगाचा सामना करत असतानाही सत्तालोलुपता जास्त प्रिय वाटते, त्यांच्याकडे आज राज्याच्या आरोग्याची जबाबदारी ईडी सरकारने टाकली आहे यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव ते अजून काय असावे? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

जितेंद्र आव्हाड सावंतांवर तुटून पडले

आज सत्य समोर आलं. सत्ताबदलामध्ये तानाजी सावंत यांचे काम हे काऊन्सिलिंग आणि मिटिंगचे होते. त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर १००-१५० बैठका घेतल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर १००-१५० बैठका घेतल्या. आमदारांचं मतपरिवर्तन केलं आणि मग सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती. हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधलाय.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…
तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले होते…?

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. लोकांनी आमच्या बाजूने कौल दिला. मात्र उद्धव ठाकरे भाजपशी बेईमानी करुन मविआ सरकार स्थापन केलं. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या, असं डॉ. सावंत म्हणाले.

फडणवीसांच्या आदेशाने २०१९ मध्ये पहिलं बंड, तानाजी सावंतांचा दावा, १५० बैठका घेत आमदारांना वळवलं

Vedat Marathe Veer Daudale Saat, वेडात मराठे वीर दौडले सातच्या चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू, उपचार खर्चावरुन वाद – mahesh manjekars movie at panhala fort vedat marathe veer daudale saat movie shooting accident young man died in private hospital in kolhapur

0

कोल्हापूर: पन्हाळा गडावरील सज्जा कोठी परिसरात महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा एक तरुण तटबंदीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे.

पन्हाळा गडावर गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना सज्जा कोटी येथे तटबंदीवरून १९ वर्षीय नागेश प्रशांत खोबरे (वय १८, रा. हिप्परगा, जि. सोलापूर) १९ मार्च रोजी रात्रीच्या साडेनऊच्या सुमारास सज्जा कोठी परिसरात नागेश खोबरे हा मोबाइलवर बोलत तटबंदीकडे गेला. अंधारात तटबंदीचा अंदाज न आल्याने तो तब्बल शंभर फूट खाली दरीत पडला होता यामुळे नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली होती.

लोकांनी दोरीच्या साह्याने त्याला बाहेर काढले होते व उपचारासाठी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज, मंगळवारी (दि. २८) पहाटे जखमी नागेश खोबरे या तरुणाचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई
नागेश चित्रपटाच्या सेटवर घोड्यांची देखभाल करत होता त्याचा अपघात झाला. यावेळी जखमी नागेशला उपचारासाठी दाखल केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलवलेल्या व्यवस्थापकांनी त्याच्या उपचाराचा खर्च देण्याचे नातेवाईकांकडे कबूल केले होते. मात्र, गेल्या दहा दिवसात काहीच खर्चाची रक्कम मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच उपचाराचे पैसे मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने मंगळवारी दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून होता असे नातेवाईकांनी सांगितले आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानं विरोधकांची एकजूट, आता लोकसभा अध्यक्ष निशाण्यावर,मोठं पाऊल उचलणार?

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेढात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपट प्रदर्शना आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील सात कलाकारांच्या भूमिका व त्यांच्या वेशभूषा बाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आयपीएलची ओपनिंग सेरेमनी नेमकी कुठे, कधी आणि किती वाजता होणार जाणून घ्या…

grant road stabbing case, डोक्यात सारखं तेच! ग्रँटरोड हल्ल्यामागचं कारण अखेर उघड; चेतनच्या पत्नीनं सगळंच सांगितलं – grant road stabbing case reason behind attack revealed in police probe

0

मुंबई: पन्नाशीतील व्यक्तीनं शेजाऱ्यांवर जीवघेणा चाकू हल्ल्यानं मुंबई हादरली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (२४ मार्च) ही घटना घडली. आरोपी चेतन गालानं केलेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चेतनची पत्नी दीड महिन्यांपूर्वी त्याला सोडून शेजारच्या इमारतीत राहू लागली. शेजारच्यांनी भडकावल्यामुळेच आपली पत्नी, मुलं सोडून गेल्याचा चेतनचा समज होता. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग होता. हाच राग उफाळून आल्यानं हत्याकांड घडलं.चेतन गाला सेक्स ऍडिक्ट असल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितल्याची माहिती मिड डेनं पोलिसी सुत्रांच्या दिली आहे. ‘चेतन सेक्स ऍडिक्ट आहे. २ वर्षांपूर्वी त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो काम करत नव्हता. त्यामुळे हाताशी पैसे नव्हते. त्यावरून घरात सतत वाद व्हायचे. याच वादाला कंटाळून पत्नी आणि मुलं चेतनपासून वेगळी राहू लागली. यासाठी चेतननं त्याच्या शेजाऱ्यांना जबाबदार धरलं आणि बदला घेण्याचा प्लान आखला,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
चेतनला ‘त्या’ दोघींना संपवायचं होतं, चाकू घेऊन अंगावर गेला, पण…; ग्रँटरोडमध्ये काय घडलं?
चेतन, त्याची पत्नी आणि मुलं ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शनमध्ये राहायची. वन रुम किचन असल्यानं घरात प्रायव्हसी नव्हती. त्यामुळे चेतन अनेकदा मुलांना बाहेर जाण्यास भाग पाडायचा. त्यासाठी जबरदस्ती करायचा. पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता यावेत यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असायचे. पती-पत्नीच्या वादामागे हेच प्रमुख कारण होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कुटुंबानं चाकू पाहिला, चेतनला फेकायला लावला, तरीही हल्ला झाला; ग्रँटरोडच्या चाळीत काय घडलं?
गाला दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. यातील एका मुलीचं लग्न झालं आहे. ग्रँट रोडमध्ये चेतन गाला आणि त्याच्या भावाच्या मालकीचं एक दुकान आहे. ते त्यांनी भाड्यानं दिलं आहे. यातून महिन्याकाठी २० हजार रुपये मिळायचे. दोन भाऊ ते पैसे वाटून घ्यायचे. यातील काही रक्कम गाला स्वखर्चासाठी ठेवायचा. यामुळेही पत्नी आणि मुलांचे चेतनसोबत वाद व्हायचे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

चेतनसोबतच्या सततच्या वादांना कंटाळून पत्नी आणि मुलांनी शेजारीच असलेल्या पन्नालाल टेरेसमधील फ्लॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा फ्लॅट गाला यांच्या पालकांचा आहे. पत्नी घर सोडून गेल्यानंतर चेतन यांच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यानं पत्नीला अनेकदा घऱी परत बोलावलं. पण तिनं नकार दिला. माझ्यासोबत दिवसातला काही वेळ तरी घालव, अशी विनंती त्यानं करून पाहिली. ही विनंती पत्नीनं धुडकावली. शेजाऱ्यांनी फूस लावल्यामुळेच पत्नी आपल्यासोबत राहत नाही, असा त्याचा ठाम समज होता. शेजाऱ्यांवरचा हाच राग उफाळून आला आणि चाकू हल्ला प्रकरण घडलं.

Bjp: PM Modi inaugurates newly-constructed BJP office in Delhi | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Tuesday inaugurated the newly-constructed BJP office in the national capital as he marvelled at the journey of the saffron party over the last four decades.
Speaking at the inauguration event, PM Modi recounted the growth trajectory of the BJP.
He said that the BJP was almost reduced to nothing in the aftermath of 1984 elections. He said that despite this, the party never gave up.
“From 2 seats in 1984, the BJP has now reached 303 seats in 2019. In many regions, the party garners over 50% of the vote share,” he said.
PM Modi said that BJP is a unique pan-Indian party with roots from south to north, east to west.
He asserted that BJP is the most “futuristic party” in the country.

mumbai news, पतीच्या निधनानंतर मित्राने जमीन बळकावली; समाजसेवकाच्या सल्ल्याने विष प्यायलं, महिलेचा मृत्यू – a woman from dhule who consumed poison in front of the mantralay died during treatment in the hospital

0

मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी एकीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शीतल गादेकर (धुळे) आणि संगिता ढवरे (नवी मुंबई) अशा दोन महिला काल मंत्रालयासमोर आल्या आणि त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबवले. मात्र, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे दोघींनाही तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका महिलेची प्राणज्योत आज मालवली आहे. शीतल गादेकर असं सदर महिलेचं नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चेहर्‍याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून शीतल गादेकर आणि संगिता ढवरे या दोघी सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तरीही त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. संगीता ढवरे या नवी मुंबईतून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. सदर पोलीस कॉन्स्टेबलचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्याची मागणी होती. तर शीतल गादेकर या धुळ्यातील असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. आज गादेकर यांचा मृत्यू झाला.

शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याची लगोलग चौकशी करा, ४८ तासांत अहवाल द्या, चाकणकरांचे पोलिसांना आदेश

दरम्यान, या दोन्ही महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानेच या दोन्ही महिलांना मंत्रालयासमोर जाऊन विषप्राशन करा, त्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण होतील, असा विचित्र सल्ला दिला होता. त्यामुळे पोलीस या कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत.

Latest posts