Saturday, April 1, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2231

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

184

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

राहुल गांधींच्या नावे केले या महिलेने आपले चार मजली घर; पाहा, हे घर नेमके आहे कुठे – a delhi woman gives her 4 storey house to rahul gandhi after he received a notice to vacate government bungalow

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर दिल्लीतील एका महिलेने तिचे चार मजली घर राहुल गांधींच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव असून त्यांनी दिल्लीतील मंगोलपुरी भागात असलेले आपले ४ मजली घर राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवादलाशी संबंधित आहेत. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेसने ‘मेरा घर, राहुल गांधी का घर’, असा प्रचार केला. राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण समितीने राहुल गांधी यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली आहे.

खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू
गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने २३ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आणि त्यांच्या ‘मोदी’ आडनावावर केलेल्या टिप्पणीवर २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ मार्च रोजी त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.

साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक
अपात्र ठरलेल्या सदस्याला त्याचे सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून एका महिन्याच्या आत त्याला मिळालेला सरकारी बंगला रिकामा करावा लागतो.
मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर, राज्यातील ही पहिलीच मदत

police naxal encounter, Gadchiroli : पोलीस नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक, एक नक्षलवादी ठार – gadchiroli naxal encounter one naxalite killed

0

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड जंगल परिसरात सकाळपासून पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत आहे. शुक्रवारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने एटापल्ली व भामरागड तालुक्यालगत छत्तीसगड सीमेवर अबुझमाड परिसरात नाक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

शाळा सुटली, स्विटी घराकडे निघाली; गावाजवळ पोहोचताच नियतीनं घात केला; सारेच हळहळले
विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पार्ट्यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एक मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या चकामकीनंतर गडचिरोली पोलीस दालने या भागात सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केलं आहे.

ऐकू तुला येतेय का?; आंदोलन कर्मचाऱ्यांची गाण्यातून फडणवीसांवर टीका

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर सर्चिंग ऑपरेशन राबविले असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्यासोबतच काही साहित्य आणि शस्त्रसाठा मिळाला आहे.

– निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

nagpur crime, रामनवमीची मिरवणूक पाहताना दोन कुटुंबात वाद, महिलेचा मृत्यू; पोलीस ठाण्याच्या बाहेरुन आरोपी महिला फरार – nagpur crime women died in clashes of two families in city during procession of ramnavami

0

नागपूर : रामनवमीच्या दिवशी नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. हा वाद इतका मोठा होता की तो हाणामारीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी धक्काबुक्कीमुळे एक महिला गंभीर जखमी झाली, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच हे चार जण बेपत्ता झाले.पोलिसांनी या आरोपींच्या मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, त्या आधारे पोलीस या तीन महिलांसह अन्य व्यक्तींचा शोध घेत आहेत.

धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फॉर्च्युन मॉलच्या पायऱ्यांवर रामनवमीनिमित्त झांकी पाहण्यासाठी आलेली महिला कुटुंबासह बसली होती. ही महिला आजारी असल्याने ती जिन्यावर आराम करत होती.या आजारी महिलेला 3 महिलांसह एकाने धक्काबुक्की करून मारहाण केली. ढकलल्यानंतर तोल गेल्याने ही महिला पायऱ्यांवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. संतोषी रामकिशोर बिनकर ,(बालाजीनगर, मानेवाडा )असे मृत महिलेचे नाव आहे. संतोषी मेडिकल कॉलेजमध्ये हेड नर्स म्हणून कार्यरत होत्या.पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, लेक हंबरडा फोडत कोसळताच सर्व संपलं, आईच्या पार्थिवावर मुलीनं प्राण सोडला

या प्रकरणी पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात या तीन आरोपी महिला दिसल्या आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच आरोपी व्यक्तीसह या तिन्ही महिला बेपत्ता झाल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या महिलांबाबत काही माहिती असल्यास तत्काळ धंतोली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रिय रोहित दादा, शाळेत जायला सायकल दिली, खूप आनंद झाला, आता…; विद्यार्थ्यांनीचं पत्र

रामनवमीला मिरवणुकांचं आयोजन

नागपूर शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नागपूर शहरात यंदा देखील रामनवमीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, दोन कुटुंबात झालेल्या घटनेनं या मिरवणुकीला गालबोट लागलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हार्दिक पंड्याने जय शहांसमोर केला धोनीचा मोठा अपमान, Video मध्ये पाहा काय घडलं

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

smartphone ip rating, स्मार्टफोनमध्ये दिली जाणारी IP रेटिंग काय असते?, कोणती रेटिंग महत्त्वाची, सविस्तर जाणून घ्या – what is ip52 ip67 and ip68 which rating is beneficial for a smartphone

0

स्मार्टफोनसाठी भारतीय मार्केट आता खूप मोठे झाले आहे. देशातील तसेच विदेशातील जवळपास सर्वच्या सर्व कंपन्या भारतात स्मार्टफोन लाँच करीत असतात. या फोनमध्ये बजेट फोनपासून फ्लॅगशीप आणि प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश असतो. फोनची फीचर्स पाहत असताना आपण नेहमी स्मार्टफोनमध्ये स्क्रीन, प्रोसेसर आणि रॅम सोबत IP रेटिंग्स पाहत असतो. काही फोन IP52 रेटिंग सोबत येतात तर काही फोन IP67 रेटिंग सोबत येतात. अनेक फोन अडवॉन्स्ड IP68 रेटिंग सोबत येतात. पण ही आयपी रेटिंग नेमकी आहे तरी काय?, याची पुरेसी माहिती स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला नसते. या रेटिंग्सचा काय फायदा होतो. वेगवेगळी आयपी रेटिंग्सचा अर्थ काय आहे. यासंबंधी या आर्टिकलमधून जाणून घेऊयात. तसेच कोणती रेटिंग किती फायद्याची आहे. हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला फोन खरेदी करताना नक्कीच फायदा मिळेल.

​काय असते IP रेटिंग​

-ip-

IP Code म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन रेटिंग जी अनेक इंटरनॅशनल प्रोटेक्शन रेटिंगच्या नावाने ओळखली जाते. Ingress Protection Rating किंवा International Protection Rating या दोन वेगवेगळ्या नावाने ही रेटिंग फोनमध्ये दिली जाते. यात दोन अल्फाबेट नंतर दोन न्यूमेरिकल अंक असतात. जे डिव्हाइसच्या सुरक्षेचे स्टँडर्ड सांगत असतात. IP रेटिंगला IEC म्हणजेच International Electrotechnical Commission द्वारा परिभाषित करण्यात आले आहे. ही रेटिंग वस्तूला म्हणजेच हात, बोटे, शरीराच्या अंगासह धूळ, आकस्मिक संपर्क आणि वीज तसेच पाण्यापासून सुरक्षित राहावे यासाठी सुरक्षित ठेवते.

​वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल

काय असते IP रेटिंग

-ip-

हे आहे आयपी संबंधी. आता यात दिल्या जाणाऱ्या आकड्यासंबंधी जाणून घ्या. खरं म्हणजे IEC कंपन्यांकडून डिव्हाइसला धूळ आणि पाणी अवरोध करण्यापासून दाव्याला रेटिंगमध्ये डिफाइन करते. त्याला १० पैकी किती गुण मिळते. या IP नंतर ५२, ६७ किंवा ६८ अंकाचा उपयोग केला जातो. यात पहिला अंक जो असतो. तो डिव्हाइसच्या धुळीची अवरोधक क्षमता दाखवतो. दुसरा अंक असतो. तो पाण्याची अवरोध क्षमता दाखवतो. उदाहर्णार्थ आपण IP67 चं उदाहरण घेतले तर यातील ६ अंक हा धुल अवरोध क्षमतेसाठी IEC कडून १० पैकी ६ अंक दिले आहे.

​वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

काय असते IP रेटिंग

-ip-

तर दुसरा अंक ७ हा IEC कडून पाणी अवरोध क्षमतेसाठी १० पैकी दिला आहे. अनेकदा आपण आपले असेल की, IP नंतर X लिहिले असते. यानंतर कोणताही अंक असतो. आता हे नेमके काय आहे. उदाहर्णार्थ IPX7 चे उदाहरण घ्या. या डिव्हाइस पाणी अवरोधक आहे. परंतु, धुळ अवरोधक नाही. या ठिकाणी एक्सचा अर्थ शून्य अंक आहे. जर तुमच्या फोनमध्ये IP6X असेल तर याचा अर्थ तुमचा फोन फक्त धुळीपासून बचाव करू शकतो. पाण्यापासून नाही. तसेच काही फोनला ५, ६ किंवा ७ अंक दिले जाते.

​वाचाः OnePlus 10R 5G च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात, फोन ७ हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

​IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

या ठिकाणी IP सोबत जितके मोठे आकडे असतील त्याचा अर्थ तो फोन तितका सक्षम आहे. सर्वात पहिल्या अंक म्हणजेच डस्ट किंवा धुळ रेटिंग संबंधी माहिती देत आहे. अनेक फोन मध्ये तुम्ही पाहिले असेल की, ते IP52 रेटिंग सोबत येते. अनेक वेळा IP67 सोबत येतो. या ठिकाणी IP नंतर पहिल्या अंकात ५ आणि ६ मध्ये फरक आहे. IP5 हा फोन मर्यादित धुळ पासून बचाव करण्यात सक्षम आहे. जास्त धुळ लागल्यास हा फोन खराब होवू शकतो. तर IP6 नंबर फोनमध्ये असेल तर धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. फोन धुळीने खराब होणार नाही. भारतात बनवलेले जास्तीत जास्त फोन हे ६ रेटिंग प्राप्त आहेत.

​वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही

IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

आज आम्ही या ठिकाणी IP52, IP67 आणि IP68 या तिन्हीची उदाहरण सांगत आहोत. जर तुमच्या फोनला IP52 ची रेटिंग मिळाली असेल तर याचा अर्थ आहे. धुळीच्या सोबत छोटे छोटे पाण्याच्या थेंबापासून फोनला काहीच होणार नाही. यात पाण्याची रेटिंग २ दिली आहे. जी खूपच कमी आहे. थोडे पाण्याची थेंब पडली तर फोनला काही होणार नाही. परंतु, फोन वर जास्त पाणी पडल्यास फोन खराब होवू शकतो.
याच प्रमाणे तुमचा फोन IP67 रेटिंगचा असेल तर धुळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित आहे.

​वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

म्हणजेच फोन एक मीटर पाण्यात ३० मिनिट पर्यंत ठेवला तरी त्याला काहीच होणार नाही. परंतु, जास्त प्रेशरमध्ये गेल्यास फोन खराब होवू शकतो. या ठिकाणी पाण्याची रेटिंग ७ आहे. जी सरासरी चांगली आहे. आता IP68 संबंधी जाणून घेऊयात. यात धुळीची क्षमता आहे. म्हणजेच धुळीपासून फोन पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु, ८ रेटिंग दिली असल्याने पाण्याची क्षमता आणखी वाढते. IP68 रेटिंग प्राप्त फोन दीड मीटर पाण्यात ३० मिनिट पर्यंत राहू शकतो.

​वाचाः iPhone 14 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, ४५ हजारांची बंपर सूट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Some people hell-bent on denting my image, have given ‘supari’: PM Modi | India News

0

NEW DELH: In a swipe at the Congress and Rahul Gandhi, Prime Minister Narendra Modi on Saturday said there were people who were “hell-bent” on denting his image and have gone so far as “giving supari (contract)” and colluding with others inside and outside the country to achieve their goal.
“Since 2014, there are some people who have publicly announced their aim to destroy Modi’s image. For this, they have given ‘supari’ to others. Some are working within India and some are abroad but they don’t know that common Indians are my ‘Suraksha Kavach’,” PM Modi told a gathering in Bhopal.
PM Modi was in Madhya Pradesh to flag off the Bhopal-Delhi Vande Bharat Express train. The semi-high speed train was flagged off from Rani Kamalapati railway station in the presence of railway minister Ashwini Vaishnaw, Madhya Pradesh Governor Mangu Bhai Patel and chief minister Shivraj Singh Chouhan.
While addressing the gathering after flagging off the premium service, PM Modi said the aim of his government was to transform the railway sector and make travel convenient for citizens. “Previous governments were busy with public appeasement. But this government is dedicated to satisfying people’s needs and aspirations … Vande Bharat express train showcases the skill, potential and confidence of our nation,” he said.
In another potshot at the Congress, the PM said: “They (the previous governments) considered one family as the first family of the country and ignored the poor and middle class. Railways is a living example of this.”
This is the 11th Vande Bharat Express service on the Indian Railway network and will run on all days except Saturday.
Assembly polls are scheduled to be held in MP at the end of the year.
(With inputs from agencies)

devendra fadnavis, देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, ‘मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…’ – devendra fadnavis reaction supriya sule allegations

0

Nagpur News : महाविकास आघाडीची सभा होण्यापूर्वी राज्यातलं राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीला झालेल्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

 

devendra fadnavis reaction supriya sule allegations
देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, ‘मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहीन, पण…’
नागपूर : संभाजीनगर आणि जळगाव येथील हिंसाचारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद सोडावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक जण नाराज आहेत. पण लक्षात ठेवा मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहणार आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्न विचारण्यात आला. ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत, हे मला माहीत आहे. मी गृहमंत्री होऊ नये, अशी अनेकांची इच्छा आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो. मी गृहमंत्री राहणारच आहे’, असं फडणवीस म्हणाले. ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. राज्यात चुकीचं काम करणाऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही’, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार? जुन्या प्रकरणात नामुष्की
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी माहिती दिली. ‘राऊत यांना धमकीचा फोन करणार्‍याची ओळख पटली आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार सदर व्यक्ती ही दारुच्या नशेत होती. तथापि या प्रकरणाचा सरकार तपास करेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल’, असं फडणवीस यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी युतीत, एकेरी उल्लेख करत बावनकुळेंची टीका

‘या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तरी कारवाई निश्चितपणे केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. सरकार त्यावर कारवाई करेल’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

godrej consumer products multibagger returns, भारीच की! ४ रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा रिटर्न, पाहा स्टॉक डिटेल्स – multibagger stock returns godrej consumer products share investors gets rs 2 cr return on 1 lakhs investment

0

नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूक करून कोट्याधीश बनलेले अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अस्थिर आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना रडवलं तर अनेक असे शेअर्सनी गुंतवणूकदारांना कोट्यवधींची कमाई करून दिली आहे. गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा शेअर देखील असाच आहे. गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला असून या स्टॉकमध्ये एक लाखाची गुंतवणूक करणारे आज कोट्याधीश बनले आहेत. आणि अजूनही हा शेअर तुफान तेजीने वाटचाल करत आहेत.

हिंडेनबर्ग अहवाल अन् अदानी साम्राज्य आपटला, दोन वर्षाची घोडदौड थांबली; शेअर्सची चमक पडली फिकी
बाजार एक्स्पर्टनुसार स्टॉकमध्ये पुढे देखील तेजीत व्यवसाय होताना दिसत आहे. शुक्रवारी गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा स्टॉक ९६८.०५ रुपयांच्या पातळीवर वाढीसह बंद झाला असून स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, जर तुम्ही पण कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा कारण बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे आणि तुम्हाला फायदा होण्याबरोबर अर्थी फटकाही बसू शकतो.

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठया हालचाली, अंबानींच्या शेअरने नशीब पालटलं, पाहा आज काय घडलं
मल्टीबॅगर गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्सचा स्टॉक
या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले आहे. २२ जून २००१ रोजी कंपनीचा स्टॉक ४ रुपयावर व्यवहार करत होता. तर सध्या कंपनीचा स्टॉक रु. ९६८च्या पातळीवर स्थिरावला आहे. अशा स्थिती, गेल्या २२ वर्षात स्टॉकमध्ये २३,०००% हून अधिक वाढ झाली आहे. अशा स्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने २००१ मध्ये या स्टॉकमध्ये १ लाखाची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला २ कोटींचा परतावा मिळाला असेल.

महत्त्वाची बातमी! सरकारचा सर्व अधिकाऱ्यांना आदेश, शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत तर…
अल्पावधीतही शेअरची कमाल
दुसरीकडे, या स्टॉकने फक्त आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्याधीश बनवले असे नाही. तर अल्पावधीत देखील गुंतवणूकदारांचा खिसा भरला आहे. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी शेअर ७०० रुपयाचा पातळीवर व्यवहार करत होता. अशा स्थितीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारना अल्पावधीत देखील ३९% असे जोरदार रिटर्न दिले आहे. याशिवाय आगामी काळात देखील स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता एक्स्पर्टसनी वर्तवली आहे.

(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाजारातील गुंतवणुकीने तुमचे नुकसानही होऊ शकते.)

students letter to mla rohit pawar, प्रिय रोहित दादा, शाळेत जायला सायकल दिली, खूप आनंद झाला, आता…; विद्यार्थ्यांनीचं पत्र – thousand bicycles distributed to the students of karjat taluka from mla rohit pawar students wrote letter to him and thanked

0

MLA Rohit Pawar: कर्जत तालुक्यातील १० हजार विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्याकडून सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एका विद्यार्थींनीने त्यांना पत्र लिहले.

 

Rohit Pawar
अहमदनगर : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शाळेची चांगली सोय झाली आहे. याबद्दल आठवीतील एका विद्यार्थींनीने आमदार पवार यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, आता कर्जत मध्ये आमच्यासाठी एक सुसज्ज मेडिकल कॉलेज उभारावे, अशी अपेक्षा या चिमुकलीने पत्रातून व्यक्त केली आहे. सायकल वाटपातून आपल्याला समाधान मिळाल्याचे सांगून आमदार पवार यांनी याबद्दल त्या विद्यार्थ्यांचेच आभार मानले आहेत.मतदारसंघासोबतच राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेले आमदार रोहित पवार मतदारसंघात विद्यार्थी आणि युवकांसाठीही कार्यरत असतात. गेल्या आठवड्यात त्यांनी कर्जतमध्ये मोठा कार्यक्रम घेतला. यामध्ये दहा हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांची शाळेत जाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने त्यांना सायकली देण्यात आल्या. आता या नव्या कोऱ्या सायकली घेऊन विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील तृप्ती थिटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने याबद्दल आमदार पवार यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे तर एक मोठी मागणीही केली आहे. पवार यांनी हे सोशल मीडियात शेअर करून या विद्यार्थ्यानीचे आभार मानले आहेत.
तृप्ती हिने पत्रात म्हटले आहे की, तुम्ही सायकली दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्ही आमच्या भविष्यासाठी एक दूत आहात, याची खात्री पटली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. आमची स्वप्न तुम्ही पूर्ण करताना दिसत आहात. आता कर्जतमध्ये एक भव्य मेडीकल कॉलेज उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. आमची ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. तुम्ही आमच्या भागासाठी काम करीत आहात, याचा आम्हा लहान मुलांनाही खूप आनंद वाटत आहे, असेही तिने म्हटले आहे.

bicycles distributed

आमदार पवार यांनी यावर म्हटले आहे की, तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.

आज्जे काळजी करू नको मी आहे; जामखेड दौऱ्यादरम्यान रोहित पवारांकडून एका आजीला गुडघ्याचे उपचार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

tur rate, तुरीच्या दरवाढीनं शेतकऱ्यांना तारलं, वाढीचा ट्रेंड मार्चमध्येही कायम, बाजारात चित्र कसं होतं? – tur rate reviews of march month price increased by three to four hundred rupees like previous months farmers get relief

0

अकोला : कापसाच्या दरात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. परंतु, यंदा तुरीच्या दरात याविषयी वेगळंचं चित्र दिसून आलं. मार्च महिना संपत असतानाही तुरीच्या दरात चांगली सुधारणा झाली. फेब्रुवारी महिन्यात तुरीच्या दरात प्रतिक्विंटलमागे १ हजार ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. तर मार्च महिन्यात १ हजार ६९५ रुपयांनी वाढ झाली आहे. महिन्याभरात सरासरी दराने उच्चांक गाठल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. आता याचा फायदा खऱ्या अर्थाने तुरीची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. सद्य:स्थितीत मोजक्याच शेतकऱ्यांच्या घरात तूर राहिल्याने तूर शेतकऱ्यांचा फायदा की व्यापाऱ्यांचा असे चित्र आहे. २९ मार्चला तुरीला ८ हजार ७९५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.

गेल्या वर्षात कापसाला विक्रमी भाव म्हणजेच १३ ते १४ हजार रूपये मिळाला. म्हणून यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पांढऱ्या सोन्याला पसंती दिली. मात्र सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर असून शेतकरी संभ्रमात आहे. गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवणं पसंत केलं. मात्र, शेतकऱ्यांना तुरीकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या नक्कीच फलदायी ठरत असल्याचे चित्र आहे. कारण सद्यस्थितीत देशभरात तुरीचे उत्पादन घटले आहे.

मार्च २०२३ मध्ये तुरीला सरासरी भाव हा ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. मार्च महिन्यात तुरीला ८ हजार ९६५ रुपये इतका भाव देखील मिळाला होता. मागील महिन्याभरापूर्वी ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विटल दर होता. शासनाने तूर खरेदीसाठी हमीभाव केंद्रात नोंदणी सुरू केली, मात्र शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. आगामी काही दिवसांतही तुरीला जास्त भाव मिळण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

या पाच महिन्यांत भावात असा झाला चढ-उतार

महिना – तुरीला मिळालेला दर (सरासरी)

नोव्हेंबर – ७ हजार २०० रूपये.
डिसेंबर – ६ हजार ९५० रूपये.
जानेवारी – ६ हजार ८०० रूपये.
फेब्रुवारी – ७ हजार ४०० रूपये.
मार्च – ८ हजार ४०० रूपये. (जास्तीत जास्त भाव ८ हजार ७९५)

खेळण्यासाठी गोट्या घेतल्या, सायकलवरून आयुष घराकडे निघाला, भर चौकात जीव गेला

अकोल्याच्या बाजारात मागील काही दिवसात मिळालेला तुरीला असा आहे भाव-

तारीख – कमीत कमी – जास्तीत जास्त –
१५ मार्च – ६ हजार – ८,२८० रूपये.
१६ मार्च – ६,८०० – ८,२०५ रूपये.
१७ मार्च – ६ हजार – ८,२९५ रूपये.
१५ मार्च – ६,५०० – ८,४०० रूपये.
२० मार्च – ५,५०० – ८,७०० रूपये.
२१ मार्च – ५,५०० – ८,५०५ रूपये.
२३ मार्च – ६ हजार – ८,४५० रूपये.
२४ मार्च – ६,९२० – ८,६३० रूपये.
२५ मार्च – ५,५०० – ८,७०० रूपये.
२७ मार्च – ५,५०० – ८,८०० रूपये.
२८ मार्च – ७ हजार – ८,९६५ रूपये.
२९ मार्च – ७ हजार – ८,७९५ रूपये.

दरम्यान अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ मार्च म्हणजेच सोमवारी तुरीला ५ हजार ५०० पासून ८ हजार ८०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. तर सरासरी भाव ७ हजार ९०० रूपये इतका होता. दरम्यान गेल्या काही दिवसात तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने २८ मार्च रोजी तुरीच्या दरात १६५ रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे तुरीचा भाव ७ हजार ७०० पासून ते ८ हजार ९६५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे गेला होते.. परंतु २९ मार्च रोजी म्हणजेच बुधावरी तुरीच्या दरात १७० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळ तुरीचा भाव प्रतिक्विंटल मागे ७ हजार पासून ८ हजार ८ हजार ७९५ रूपयांपर्यत आला.

आई आता मी कसं जगू, माझं कसं होणार, लेक हंबरडा फोडत कोसळताच सर्व संपलं, आईच्या पार्थिवावर मुलीनं प्राण सोडला

दुसरीकडे विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी बाजारात २८ मार्च रोजी तुरीला ७ हजार ८०० ते ८ हजार ७३० प्रतिक्विंटप्रमाणे भाव मिळाला होता. परंतु, या तुलनेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ मार्च रोजी तुरीच्या दरात १३५ रुपयांनी वाढ झाल्याने तुरीला ८ हजार ११० पासून ८ हजार ८६५ रूपयांपर्यत भाव मिळाला. या दिवशी अकोल्याच्या बाजारात असलेल्या तुरीच्या दराच्या तुलनेत अकोटच्या बाजारात तुरीला ७० रुपयांनी तर कापसाच्या दराच्या तुलनेत ४४० रुपयांनी अधिक भाव होता.
Adani Crisis: गौतम अदानींच्या अडचणी वाढल्या; आता SEBI इन ॲक्शन मोड, पाहा नवीन घडामोड

GST collection grows 13% to over Rs 1.60 lakh crore in March, second highest ever

0

NEW DELHI: India’s goods and services tax (GST) mop-up in March rose 13% year-on-year to Rs 1.60 lakh crore, its second highest ever, the government said on Saturday.
Goods and services tax (GST) collected in February was Rs 1.50 lakh crore.
In 2022/23, total GST collected was Rs 18.10 lakh crore, 22% higher than last year, the finance ministry said in a statement.
“The gross GST revenue collected in the month of March 2023 is Rs 1,60,122 crore of which CGST is Rs 29,546 crore, SGST is Rs 37,314 crore, IGST is Rs 82,907 crore (including Rs 42,503 crore collected on import of goods) and cess is Rs 10,355 crore (including Rs 960 crore collected on import of goods),” it said.

The ministry said it is for the fourth time in the current financial year that the gross GST collection has crossed the Rs 1.5 lakh crore mark, registering the second highest collection since the implementation of the regime.
Moreover, this month also witnessed the highest IGST collection ever.
Meanwhile, the total gross collection for 2022-23 stands at Rs 18.10 lakh crore and the average gross monthly collection for the full year is Rs 1.51 lakh crore.
The gross revenues in 2022-23 were 22% higher than that last year.
The average monthly gross GST collection for the last quarter of the FY 2022-23 has been Rs 1.55 lakh crore against the average monthly collection of Rs 1.51 lakh crore, Rs 1.46 lakh crore and Rs 1.49 lakh crore in the first, second and third quarters respectively, the statement said.

Latest posts