Monday, March 27, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2181

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

178

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Women’S Premier League: DC vs MI Highlights: Mumbai Indians beat Delhi Capitals to win inaugural WPL title | Cricket News

0

NEW DELHI: Harmanpreet Kaur-led Mumbai Indians won the inaugural Women’s Premier League title on Sunday, after registering a thrilling seven-wicket victory over Delhi Capitals in the summit clash at the Brabourne stadium.
All-rounder Nat Sciver-Brunt played a gritty knock of 60 not out, off 55 balls, to take Mumbai home in a tight low-scoring final against Delhi.
As it happened: WPL 2023 Final
After restricting Delhi to a below par 131 for 9, Mumbai chased down the target with three balls to spare in front of a partisan crowd. Sciver-Brunt and skipper Harmanpreet, who scored 37 off 39 balls, added a match-winning 72 runs for the third wicket as they reached 134 for 3 in 19.3 overs.

Opting to bat first, Delhi Capitals suffered a collapse to be reduced to 79 for 9 in 16 overs but posted a respectable total of 131 for 9, thanks to a 52-run partnership for the unbroken 10th wicket between Shikha Pandey (27 not out) and Radha Yadav (27 not out).
It was not an easy run chase for MI but they eventually crossed the line, reaching 134 for 3 in 19.3 overs, with Sciver-Brunt and captain Harmanpreet (37) playing crucial roles.
Sciver-Brunt (60 not out from 55 balls, 7×4), also the Player of the Final, struck her third fifty and finished second behind DC captain Meg Lanning (345) in run-scorers’ chart in the WPL with 332 runs.
Harmanpreet (37 from 39 balls, 5x4s) and Sciver-Brunt joined forces when MI were precariously placed at 23 for 2 in the fourth over, and combined their batting prowess to soak the pressure and add 72 runs for the third wicket.

MI needed 45 runs from the last five overs though they had eight wickets in hand then. Sciver-Brunt was 28 off 38 balls at that stage but she struck a flurry of boundaries to help her side cross the line.
In the process, Mumbai Indians recorded their second win over Delhi in three meetings this season, with their bowlers producing a stunning show in the first half.
MI made a shaky start, with Yastika Bhatia (4) hitting straight to deep midwicket for the fourth wicket of the final on a full toss, off Radha Yadav. Jess Jonassen dealt the second blow to Mumbai with Hayley Matthews (13 of 12 balls, 3x4s) chipping one straight to short midwicket.
Earlier, Shikha Pandey and Radha Yadav fought back with a counter-attacking 52-run unbeaten stand for the 10th wicket, lifting Delhi to 131 for 9.

Delhi Capitals were off to a rocky start, collapsing from 74 for 3 in the 11th over to 79 for 9 after 16, thanks to devastating show from overseas bowlers Hayley Matthews (4-2-5-3), Isabelle Wong (4-0-42-3) and Amelia Kerr (4-0-18-2).
However, the 52-run stand between Shikha (27 not out from 17 balls) and Radha Yadav (27 not out from 12 balls) took them across the 100-mark and gave them a fighting chance.
Shikha hit three fours and one six in her knock, Radha smashed two boundaries and as many maximums.
Earlier, Matthews, Wong and Kerr had shared a total eight wickets between them to put Mumbai in a strong position.
While the Caribbean all-rounder Matthews took her wickets tally to 16 – highest in the tournament alongside UP Warriorz’ Sophie Ecclestone – Wong and Kerr also finished at 15 wickets each.

Saika Ishaque failed to get any breakthrough and ended up with an impressive 15 wickets too.
The final was off to a dramatic start with MI claiming the first three wickets off full-tosses from Wong.
The first two decisions were ruled against the batters by the third umpire.
Shafali Verma (11 off 4 balls, 1x4s, 1x6s) began with a six over long-on and a four on the next ball in the second over from Wong, sliced over backward point to beat the third man.
However, the Delhi dasher was caught at point by Kerr off a full toss from the English bowler which was waist high.
Wong dealt another blow to the Delhi Capitals, again off a surprise full toss with Alice Capsey (0) failing to control her shot. The catch was completed by a stunning diving effort from Amanjot Kaur at extra cover, and left Delhi reeling at 12 for 2 in 1.5 overs.

Jemimah Rodrigues (9 off 8 balls, 2x4s) began with a superb cover drive off the first delivery she faced off Wong and brought out another drive against Sciver-Brunt in the third over. But before that, Lanning smacked two fours on the first two balls to shrug off some pressure.
But Delhi sunk further when a low full toss swinging away from the off stump from Wong, who changed the bowling ends, had Jemimah playing it straight to Hayley Matthews at point.
DC, who were 38 for 3 at the end of the powerplay, were steadied by Lanning and Kapp. At the halfway mark the Capitals were relatively safe at 68 for 3, but the worst was yet to come.
From 74 for 3 in the 11th over, Delhi Capitals collapsed to 77 for 7 after 14 overs with some poor batting and communication in the middle.
Kapp (18 off 21 balls, 2x4s), who hit her first four on the 17th ball she faced, was removed by Kerr in the 11th over with Yastika Bhatia grabbing the catch.
The South African all-rounder added 38 runs for the fourth wicket in 37 balls.
Mumbai Indians, however, made the biggest breakthrough in the 12th over when Delhi’s captain and mainstay Lanning was run-out for 35.
Lanning’s hesitation to run after Jess Jonassen (2) hurdled a delivery off towards Amanjot at cover cost her dearly, with Bhatia breaking the stumps.
Kerr claimed her second wicket by getting rid of Arundhati Reddy (0), and after Matthews spilled a return catch off Jonassen’s bat in the 14th over, she grabbed a similar chance.
Matthews returned to cap off her best spell in the WPL, getting Minnu Mani (2) stumped to take her 15th wicket in the competition, and added one more when she got one to sneak between Taniya Bhatia’s (0) bat and pads for her third wicket in the game to leave DC tottering at 79/9.
(With inputs from PTI)

two devotees died, परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू – two devotees have died in an accident during the yatra of parameshwar maharaj in akkalkot

0

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी अक्कलकोट शहरापासून २० किमीच्या अंतरावर असलेल्या वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर महाराजांची यात्रा होती. आजूबाजूच्या दोन ते तीन गावचे ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. उत्सव काळात ठेर (रथ) ओढणे हा धार्मिक विधी होता. या धार्मिक कार्यक्रमात रथ ओढताना अचानकपणे रथाचा दगडी चाक निखळला. चाक निसटल्याने दुर्घटना होवून दोघे भाविक गंभीर जखमी होवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली आहे.या दुर्घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे संजय नंदे, गंगाराम गाडीवार अशी आहेत. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात छिन्नविच्छिन्न झालेल्या अवस्थेत मृतदेह शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.

बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक
देवाच्या रथाचे चाक निखळून दोघांचा मृत्यू

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य घटक म्हणून रथ ओढणे आहे. परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १ फूट रुंदी असलेला रथाचे गोलाकार दगडी चाकं आहेत. रथ ओढणे या धार्मिक विधीच्या वेळी परमेश्वर महाराज की जय…! ची घोषणा दिली जाते व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंचे उधळण केली जाते.

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द

यंदा रविवारी सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे दगडी चाक निखळले. ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत संजय नंदे, गंगाराम गाडीवर हे भक्त गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करम्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची कळते.
होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

BRO opens Ladakh’s lifelines in record time | India News

0

NEW DELHI: The Border Roads Organisation has cleared for vehicular traffic in record time Ladakh’s lifelines via Srinagar and Manali, supplementing the benefit of the Atal tunnel in Himachal and underlining the government’s push to bore through two more mountains for all-weather access to the strategic region.
The 439-km Srinagar route opened on March 16 after 68 days, a far cry from the time when the 11,540 ft Zoji La, 100 km from Srinagar, used to be closed for months. The pass was kept open till January 6. The 427-km Manali-Leh road via the Atal tunnel opened on Saturday after 138 days, against May/June earlier.
The 16,561 ft Shinku La (pass) on the Nimmu-Padam-Darcha (NPD) road opened on Thursday after a gap of 55 days. This road is being built as a third axis to Ladakh and yet to be blacktopped.
Early resumption of traffic will allow the forces to space out – instead of squeezing in 3-4 months – the annual rotation of larger-than-usual number of troops deployed in the region since the May 2020 Galwan border clashes with the Chinese army.
It will also allow trucking of civil and fresh supplies instead of costly air freight. Homebound Ladakhis and guest workers will have a cheaper travel option than the prohibitively expensive flights that remain the only means when heavy snow snaps road connectivity.
The short closures of the difficult passes has demonstrated BRO’s snow-clearing capability. The government aims to capitalise on this by boring tunnels under the 11,540 ft Zoji La, set to be completed soon, and Shinku La — to ensure all-weather connectivity to Ladakh, which will have a major bearing on defence preparedness and quality of life in the region.
The Shinku La tunnel will allow traffic to avoid the four high, avalanche-prone narrow passes, desolate wind-swept landscape and extreme cold on the Manali-Leh route during winters.
The Atal tunnel has ensured all-weather connectivity with Keylong, less than 100 km from Manali, by avoiding the 13,774 ft high Rohtang pass that remains under several meters of snow for months. But the remaining part of the road is difficult to maintain during winter. The Shinku La tunnel will offer NPD the second link to Leh during winters.

Air India: Air India plane ascends sharply to avoid collision with Nepal Airlines flight | India News

0

ZURICH: An Air India aircraft flying into Kathmandu averted a collision with a Nepal Airlines flight on March 24, 2023, by ascending sharply.
The incident occurred when AI Airbus-319 (VT-SCG) coming from Delhi was at flight level 19,000 feet and descended to 15,000 feet reportedly on air traffic control (ATC) clearance. However, at the same flight level Nepal Airlines flight from Kuala Lumpur, flight RNA-416, was also descending to land.

“The Air India crew saw the flight coming from the other direction and immediately informed Kathmandu air traffic control. The ATC asked Air India crew to ascend sharply to avoid a collision, which they did and a tragedy was averted,” said people in the know.
Air India has informed Indian authorities that they were asked to descend to 15,000 feet by ATC. Nepal authorities are investigating this air proximity and Directorate General of Civil Aviation (DGCA) has sought information from them which is awaited.
The Civil Aviation Authority of Nepal tweeted: “Air Traffic Controllers (ATCs) of Tribhuvan International Airport involved in traffic conflict incident (between Air India and Nepal Airlines on 24th March 2023) have been removed from active control position until further notice.”

cotton rate, विदर्भाच्या कापूस पंढरीतील कापसाच्या दराची अपडेट, आठवड्यात बाजारभाव कसे होते, दर वाढतील का? जाणकार म्हणतात… – cotton rate review and reasons to rates not hike in akot apmc market of akola

0

अकोला : विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यामध्ये कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु, या आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा होऊन काही प्रमाणात दर वाढले आहे. मागील आठवड्यातील १६ मार्चला कापसाला प्रतिक्विंटल मागे ७ हजार ८७५ पासून ८ हजार २९५ रूपयांपर्यत भाव मिळाला होता. या भावात सुधारणा होऊन आजच्या तारखेपर्यंत कापसाला प्रतिक्विंटल मागे ७ हजार ७०० ते ८ हजार ३०० रूपयांपर्यत भाव आहे. म्हणजेच दहा ५ रुपयांनी वाढले आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातील २३ मार्चला कापसाचे भाव ८ हजार १०० ते ८ हजार ६४५ रूपयांपर्यत होते. मागील फ्रेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात कापसाचे भाव तब्बल ३४५ रुपयांनी घसरले आहेत. सध्या अपेक्षेनुसार कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस म्हणजेच २८ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी कापसाला प्रतिक्विंटल मागे ७ हजार ६०० पासून ८ हजार ३३० इतका भाव मिळाला होता. तसेच या दिवशी कापसाची आवकही चांगली होती, तब्बल ५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला होता. परंतु, फेब्रुवारीच्या अखेरपासून कापसाचे घसरायला सुरुवात झाली. अन् मार्च महिन्याच्या सुरुवातीला १ मार्चला ७ हजार ८०० पासून ८ हजार ३९५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाचे दर पोहोचले. येथून कापसाची आवकही कमी झाली असून तेव्हा ३ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी झाला होता.

गेल्या काही दिवसांतील कापसाचे दर.

तारीख : कमीत कमी : जास्तीत जास्त भाव : आवक.
०८ मार्च – ८,००० – ८,४४५ – १,८०० क्विंटल.
०९ मार्च – ७,८५० – ८,३५० – ३,०४५ क्विंटल.
१३ मार्च – ७,८०० – ८,१९५ – २,२०० क्विंटल.
१४ मार्च – ७,७०० – ८,१९५ – २,०१० क्विंटल.
१६ मार्च – ७,८७५ – ८,२९५ – १,६७० क्विंटल.
१८ मार्च – कापूस खरेदी बंद.
२१ मार्च – ७,७५० – ८,३३५ – २,८०० क्विंटल.
२३ मार्च – ७,७०० – ८,३५० – २,४०० क्विंटल.
२४ मार्च – ७,७०० – ८,३०० – २,२०० क्विंटल.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारासह कापसाच्या गाठीचे दर घसरले आहे, त्यात देशातील बाजारपेठमध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, म्हणजेच बाजारात कापूस फुल झाला आहे. कापसाचे आवक वाढल्याने त्याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस अचानक बाजारात दाखल होत आहे. त्याच कारण म्हणजे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचं सर्व व्यवहार मार्च महिन्यामध्ये राहते. त्यामुळ शेतकऱ्यांना आपला कापूस मिळेल ‘त्या’ भावात बाजारात विकावा लागत आहे.

बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे, जशी जशी कापसाची आवक वाढेल तसे कापसाचे भाव कमी होणार आहेत. एप्रिल महिन्यात कापसाची आवक कमी झाल्यास नक्कीच कापसाचे भाव वाढू शकतील. परंतु, आवक वाढल्यास कापसाचे भाव खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची निर्यातही कमी आहे. सद्यस्थितीत बांगलादेशासह काही भागात कापसाची निर्यात केली जात आहे. कापसाची मागणी वाढल्यास नक्कीच कापसाच्या भावात सुधारणा होईल, असे मत एमसीएक्सचे सदस्य दिलीप ठाकरे यांनी व्यक्त केलं.
चंद्रकांतदादा, बावनकुळेंचा दाखला, निवडणुकीचं चॅलेंज, ठाकरेंचं भाजपच्या वर्मावर बोट

म्हणून कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही

सद्यस्थितीत बाजारात कापसाला अतिशय कमी प्रमाणात भाव मिळतोय. त्यात अतिवृष्टीमुळं कपाशीच्या उत्पादनात घट झाली, एकरी ६ क्विंटलहून अधिक कापसाचं उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र उत्पादनात मोठी घट झाल्याने बारा एकरात फक्त ५५ क्विंटल कापूस झाला. जानेवारी महिन्यात गरजेपोटी १० क्विंटल कापूस विकला. आता वाचलेल्या शेतमालाला हवा तसा भाव मिळत नसल्यानं अजूनही कापूस घरातच आहे. सध्या कापसाचे दर कधी वाढणार याची प्रतीक्षा करत आहोत. मात्र, अद्याप दरात अपेक्षित वाढ झाली नाहीये. त्यामुळ कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.

सुनिल चेडे, शेतकरी, बोर्डी, अकोट, जि. अकोला.

शेतकऱ्यांचे प्रश्न,भाजपला निवडणुकांचं चॅलेंज, सावरकरांचा मुद्दा, ठाकरेंकडून खेडचा ‘तो’ ट्रेंड मालेगावात कायम

आमचं मुख्य पीक कपाशी आहे. या पिकावर सर्व आर्थिक बजेट आहे, त्यामुळं कापसाला १० हजार क्विंटल मागे भाव असल्यास कपाशी पीक काही प्रमाणात परवडते. या पिकाला फवारणी, खते, बियाणे, निंदण, कापूस वेचणी, डवरणीसह इतर खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या पिकाला दर चांगले मिळणे गरजेचे आहे, असं अकोल्यातील केळीवेळी गावातील शेतकरी गजानन आढे म्हणाले.

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा

बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक – buldana news a zilla parishad teacher ended his life at mehkar in buldani

0

बुलडाणा : मेहकर येथील शारंगधर नगरातील रहिवासी असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विजय पोटरे (वय ३७ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून हे शिक्षक संध्याकाळच्या सुमारास फिरायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत. मात्र, शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला.मेहकर येथील शारंगधर नगरातील रहिवाशी असलेले शिक्षक विजय पोटरे यांनी काल २५ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तालुक्यातील घाटबोरी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले विजय शामराव पोटरे हे काल सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान फिरायला जातो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र सात वाजेपर्यंत ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठले. माजी उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया हे सुद्धा यावेळी पोलीस ठाण्यात आले.

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
पोलिसांनी त्यांच्या मोबाइलच्या लोकेशनवरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता जामगाव रस्त्यावर डॉ. आनंद सावजी यांच्या शेतात त्यांचे लोकेशन दाखविले गेले. रात्री नऊच्या सुमारास घटनास्थळी जाऊन शोधले असता विजय पोटरे यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. विजय पोटरे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली,वृध्द आई आणि एक बहिण असा परिवार आहे. या निधनामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
घटनास्थळी मृतकाच्या खिशातून पोलिसांनी एक चिठ्ठी जप्त केली आहे. या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे हे तपासात कळेलच. एका युवा शिक्षकाने आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एका युवा शिक्षकांच्या जाण्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे व शोककळा देखील पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी शोकाकुल वातावरणात जानेफळ रोड स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन

uddhav thackeray live speech in malegaon nashik, शिंदेंसह भाजपवर ठाकरी आसूड, मिंधे गट असा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे – uddhav thackeray live speech in malegaon nashik cm eknath shinde bjp

0

नाशिक: मालेगावात आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर नेते, भाजप सर्वांवर एकएककरुन तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरेंनी कांदा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्नही मांडला. तसेच, शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह त्यांच्यापासून हिरावून घेतलं याबाबतही त्यांनी जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– त्यांनी नाव, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही तरी इतकी गर्दी आहे. ही पुर्वजांची पुण्याई आणि जगदंबेची कृपा आहे. मी मुख्यमंत्रीदपासाठी नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढतोय. जिंकेपर्यंत लढायचं, जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

– आजची सभा बघून शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही. नाव चोरलं, धनुष्यबाण चोरला, जीवाभावाची प्रेम करणारी माणसं चोरु शकत नाही, ही भाड्याने आणता येत नाही, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला मारला.

– मुख्यमंत्री शेतीत रमले पण त्यांच्या शेतीत दोन दोन हेलिपॅड आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात. स्वत:च्या शेतात रमतात पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी आहे ते काळोखात जाऊन नुकसानाची पाहणी करतात, महिलांना शिव्या देतात, सुप्रिया सुळेंना शिवी दिली, तरीही निर्जल्लासारखे मांडीला मांडी लावून बसतात हे यांचं हिंदुत्व आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

एक कांदा ५० खोक्याला, मग तुम्हाला किती खोके, रक्ताचा आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे : उद्धव ठाकरे

– सत्ता गेल्याचं दु:ख नाही, चांगलं काम करणाऱ्यांचं सरकार तुम्ही गद्दारीने पाडलं आणि शिवाजी महाराजांचा भगवा हाती घेऊन फिरता. हे खंडोजी खोपड्याची औलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही, असंही ते म्हणाले.

– मी शिवसेनाच म्हणेन कारण शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे मिंधेंच्या वडिलांनी नाही, ज्यांना स्वत:च्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचं नाव तुम्ही चोरता, असंही ते म्हणाले.

चंद्रकांतदादा, बावनकुळेंचा दाखला, निवडणुकीचं चॅलेंज, ठाकरेंचं भाजपच्या वर्मावर बोट
– ही लढाई माझ्या एकट्याची नाही देशाच्या लोकशाहीची आहे. ज्या दिवशी न्यायालयातील रामशास्त्री माणस संपेल आणि केंद्राच्या पालथी वाहणारे न्यायमूर्ती तिकडे बसतील, त्यादिवशी लोकशाहीची श्रद्धांजली वाहण्याची सभा आपल्याला घ्यावी लागेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला टोमणा मारला.

– भाजप मिध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का, हे भाजपने जाहीर करावे, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. तसेच, जर भाजपला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करु शकत नाही, प्रयत्न करुन पाहा, तातडीने निवडणुका घ्या. हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो, बघू महाराष्ट्र कोणाला कौत देतो, असं आव्हान त्यांनी दिलं.

– एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करु नये. सावकरांनी जे कार्य केलं ते येड्यागबाळ्याचं काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष रोज मरण सहन केलं, असंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न,भाजपला निवडणुकांचं चॅलेंज, सावरकरांचा मुद्दा, ठाकरेंकडून खेडचा ‘तो’ ट्रेंड मालेगावात कायम

– राहुल गांधीच्या २० हजार कोटींच्या प्रश्नावर भाजपची गुपचिळी. आपली एकी फोडण्यासाठी डिवचलं जातंय, राहुल गांधीना ठाकरेंचा सल्ला.

– टीका केली की घरात पोलीस घुसतात, कुटुंब टार्गेट केलं जातं. मुख्यमंत्री असताना मी हिंदुत्व सोडल्याचं उदाहरण दाखवा. राजकारणासाठी कुटुंब वेठीस धरणं अमानुष आहे. अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या मुलीची चौकशी, लालूंच्या गरोदर सुनेची चौकशी केली, असं म्हणत त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

pune punawle road accident video, Video : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा अंत – pune punawale road one person died under a cement truck in an accident

0

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणावळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील पुणावळे येथे भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. फुटेजमध्ये या अपघाताचा थरार कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पुणावळे भागातून रस्त्यावरून एक सिमेंट काँक्रीटचा ट्रक जात होता. त्याचवेळी त्या ट्रकच्या शेजारून एक व्यक्ती पायी जात होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या त्या व्यक्तीला धडक दिली आणि दुचाकीसह दुचाकीस्वार देखील रस्त्यावर पडले. त्यानंतर दुचाकीस्वार मागून येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या अपघाताने प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला. या दुर्देवी अपघाताने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पिंपरी चिंचवड परिसरातील काटे वस्ती भागात हा दुर्देवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मृत तरुणाचे नाव देखील अद्याप समोर आले नसले तरी अपघाताने अंगावर शहारे उभे राहतात हे नक्की.

पिंपरी चिंचवड परिसरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण दुचाकी वाऱ्याच्या वेगाने चालवतात. त्यामुळे वाहन कंट्रोल न झाल्याने अनेकदा अपघात होत असतात. अल्पवयीन मुलं देखील रस्त्यावर वेगाने गाडी चालवताना पाहायला मिळतात. आज झालेला या अपघातातून धडा घेण्याची गरज आहे. दुचाकीस्वाराने गाडी चालवताना काळजी घेऊन चालवणं गरजेचं आहे. गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा

Quinton de Kock’s dazzling ton powers South Africa to highest successful T20I run chase | Cricket News

0

NEW DELHI: The SuperSport Park in Centurion witnessed a batting mayhem as South Africa brushed away West Indies by six wickets to register the highest ever successful run chase in T20Is.
A jaw-dropping 517 runs were scored combined in the match as bowlers from both the sides were taken to the cleaners.
For the hosts, it was opener Quinton de Kock, who went ballistic with a 44-ball ton to lay a solid platform in chase after West Indies raked up their highest ever T20I total of 258 for five.
Johnson Charles fired the fastest T20I century for West Indies in the shortest format after hosts opted to bowl first on a batting paradise. Along with Charles, opener Kyle Mayers (51 off 27) and Romario Shepherd (18-ball 41*) smoked the Proteas bowlers to lift their side to a massive total.
In the chase, De Kock went all guns blazing from the word go and Reeza Hendricks (68 off 28) provided him the perfect support. Skipper Aiden Markram (38*) and in-form Heinrich Klaasen (7 ball 16*) then wrapped up the chase with 7 balls to spare.
With the emphatic win, South Africa levelled the 3-match series 1-1.

chandrashekhar bawankule, विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा – bjp state president chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray

0

बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. मात्र सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बारामती येथे रविवारी ( दि. २६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी इंदापूर व बारामती मध्ये भाजप युवा मोर्चाच्या ५२ शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व इतर विरोधकांवर टीका केली.

होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आमच्याही सभा होतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जनतेच्या कोर्टामध्ये आता याचा फैसला होईल. महाराष्ट्रातील जनतेला आता टीकाटिप्पणी नको आहे. त्यांना विकास हवा आहे, असे बावनकुळे म्हणाले.

सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकऱ्यांनी नीरा नदी मधील प्रदूषणाबाबत अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना देखील निवेदन दिले होते. येथील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना या परिसरात राहणे मुश्किल झाले आहे. परिणामी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराला भेट देत येथील पाहणी केली.

जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन
यावर ते बोलताना म्हणाले, यापूर्वीच्या तक्रारींबाबत कोणी काय कारवाई केली हे पाहत बसण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथील समस्येवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दरम्यान, नीरा नदीमध्ये या परिसरातून अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी तसेच बेकायदेशीर कत्तलखान्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे. त्यामुळे एक प्रकारचा उग्र वास या ठिकाणी येत असतो, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले हे सर्व भयंकर आहे. निश्चित सरकारने यावर उपाययोजना करायला हवी. प्रश्न मी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. मला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न मी हा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. नीरा नदीचे हे प्रदूषित पाणी पंढरपूर पर्यंत जाते त्यामध्ये भाविक आंघोळ करतात अत्यंत भयंकर आहे, याबाबत मी सरकारशी बोलणार आहे असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.
साहेबांनी शब्द पाळला; लाडक्या वसंतसाठी राज ठाकरे पुण्यात, अखेर पूर्ण केली इच्छा

Latest posts