Thursday, June 8, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2562

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

36

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

39

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

31

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

28

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

31

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

34

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

PM Modi speaks with Saudi Crown Prince, thanks him for support during evacuation of Indians from Sudan | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Thursday spoke with Saudi Arabia’s Crown Prince Mohammed bin Salman bin Abdulaziz Al Saud and thanked him for his country’s “excellent support” during evacuation of Indians from Sudan in April, while also conveying best wishes for the upcoming Haj pilgrimage.
During the telephonic conversation, the leaders reviewed a number of issues of bilateral cooperation and exchanged views on various multilateral and global issues of mutual interest, the Prime Minister’s Office (PMO) said in a statement.
PM Modi thanked Saudi Arabian Prime Minister Mohammed bin Salman for Saudi Arabia’s “excellent support” during evacuation of Indian nationals from Sudan via Jeddah in April 2023, the statement said.

The Prime Minister also conveyed his best wishes for the upcoming Haj pilgrimage.
Crown Prince Mohammed bin Salman conveyed his full support to India’s initiatives as part of its ongoing G20 presidency and said he looks forward to his visit to India, the statement said.
The two leaders agreed to remain in touch, it said.
India had set up a transit facility at Jeddah in April to evacuate Indians from strife-torn Sudan. Under its evacuation mission ‘Operation Kaveri’, India took the evacuees from Sudan to Jeddah from where they returned home.

Crime News Today Cannabis Farming In Chilli Farm By Farmer To Make Easy Money Beed; बाहेरुन बघितलं तर मिरची लावलेली, आत भलतंच सुरु; तपासताच पोलिसांनाही फुटला घाम

0

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचपूर गावात एका शेतकऱ्याने शक्कल लढवत मिरचीच्या शेतात चक्क गांजाची लागवड केली होती. या घटनेची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळतात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पंचांसमोर पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे.

आजकाल पैसा कमवण्यासाठी कोणती शक्कल लढवली जाईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेलं चिंचपूर गावात घडली. येथील सतपाल ज्ञानबा घुगे या शेतकऱ्यांने पैसा कमवण्याच्या नादात आपल्या मिरचीच्या शेतात सोप्या पद्धतीने गांजा पेरला आणि या गांजाची सोप्या पद्धतीनेच विक्री करू लागला. यामध्ये पैसा अधिक मिळत असल्याने थोडं थोडं करत त्याने मिरचीच्या पूर्ण शेतात गांजाची लागवड केली. याचं गोष्टीची माहिती गोपनीय सूत्रांकडून सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या टीमला मिळाली होती.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
या टीमने सापळा रचत या शेताच्या ठिकाणी धाड मारली. तेव्हा या ठिकाणी सहा ते साडेसहा फुटाची नऊ झाडे गांजाची आढळून आली. यात तब्बल २४ किलो ८३० ग्रॅम इतका गांजा आढळून आला. याची किंमत १ लाख २४ हजार असल्याची माहिती आहे. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, या शेतात हिरवीगार सहा ते साडेसहा फुटाची ही गांजाची झाडं आतापर्यंत कोणाच्या कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न आहे. सात ते आठ झाड लावलेली असून अनेक छोटी मोठी रोपे देखील या शेतकऱ्यांनी इतरत्र लावली होती.

अब्दुल सत्तारांकडे शेतकऱ्याची थेट गांजा लागवडीची मागणी; कृषी मंत्र्यांच्या भुवया उंचावल्या

हा सगळा माल पोलिसांनी जप्त करत शेतकऱ्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. सर्वत्र कठोर निर्बंध असताना देखील हा शेतकरी गांजाची शेती करत असल्याने इतरांवरही याचा चाप बसावा यासाठी या शेतकऱ्यावर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं

Video Viral Of Odisha Train Accident Just Few Seconds Before The Incident Inside Coromandel Express; अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये काय घडलं?

0

भुवनेश्वर: ओडिशातील बालासोर येथे गेल्या आठवड्यात २ जूनला भीषण रेल्वे अपघात घडला. कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीवर आदळल्याने हा भयंकर अपघात घडला होता. या अपघातात आतापर्यंत २७५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १ हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. काही तर अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर काही मृतदेहांची अद्याप ओळखही पटलेली नाही. सध्या सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मालगाडीवर कोरोमंडल एक्स्प्रेस धडकली

कोरोमंडल एक्स्प्रेस ही २ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उभ्या मालगाडीला धडकली. कोरोमंडल एक्स्प्रेस ही तब्बल १२८ किमी प्रति तासाच्या वेगाने मालगाडीवर धडकल्याने भीषण अपघात घडला. त्याचे काही डबे मालगाडीवर चढले तर काही रुळावरुन घसरले. त्यानंतर त्याचदरम्यान या रेल्वे रुळावरुन जाणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आली आणि ती देखील कोरोमंडल एक्स्प्रेसवर आदळली. या अपघातामागे नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहे. याचदरम्यान, अपघातापूर्वी ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताच्या काही सेकंदांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
अपघातापूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अपघाताच्या पूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे.

सफाई कामगार रात्री फरशी साफ करताना दिसतोय आणि नंतर काहीच सेकंदात

रात्रीच्या वेळी एक सफाई कर्मचारी ट्रेनच्या डब्यात साफसफाई करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर, एक प्रवासी या कर्मचाऱ्याचा डब्यातील व्हिडिओ काढत आहे. तर इतर प्रवासी त्यांच्या बर्थवर आराम करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग, काहीच सेकंदात अचानक जोरदार हादरा बसतो आणि ट्रेनमध्ये सारंकाही उलटंपालटं झाल्याचं कळतं. कॅमेरा जोरजोरात हलताना दिसतो. लोकांच्या किंचाळण्याचा आवाज येतो. २७ सेकंदाचा हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.

ओडिशामध्ये कोरोमंडल रेल्वेचा भीषण अपघात, २०० प्रवाशांनी जीव गमावला तर ९०० हून अधिकजण जखमी

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…

Washim manager dies after falling from railway at jhansi going for document verification after promotion; पदोन्नतीचा आनंद ठरला औट घटकेचा, नागपूर-दिल्ली प्रवासात ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

0

वाशिम : पदोन्नती झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला. कारण रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. व्हेरिफिकेशनसाठी दिल्लीला ट्रेनने निघालेल्या तरुणावर अर्ध्या वाटेतच काळाने झडप घातली. वाशिम जिल्ह्यातील तरुणाच्या आनंदात नियतीने मिठाचा खडा टाकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पदोन्नती झाल्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिल्लीला जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील तरुणाचा नागपूर ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पदोन्नतीचा त्याचा आणि कुटुंबीयांचा आनंद क्षणिक ठरला.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील पंकज वामन भालेराव (३३) हा तरुण मागील २ वर्षांपासून एका फार्मसी कंपनीत मेडिकल प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. नुकतीच त्याची व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून पदोन्नती झाल्याने तो कागदपत्रे पडताळणीकरिता दिल्ली येथे जात होता. यावेळी झाशी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमधून पडून ५ जून रोजी पंकजचा मृत्यू झाला. काल शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

पंकज यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असून वडील मोलमजुरी करतात तर लहान भाऊ दुकान चालवतो. पंकज यांच्या कमाईवरच प्रामुख्याने घर चालत होते. पंकज यांचे बीएस्सी पर्यंतचे शिक्षण झाले होते. अत्यंत हुशार असलेल्या पंकजने आपल्या मेहनतीच्या जोरावर मॅनेजर पदापर्यंत मजल मारली होती. पंकजच्या मागे पत्नी, २ मुली, आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

बायकोने किचनमध्ये प्राण सोडले, नवरा भररस्त्यात मृत्युमुखी, मधुमेहाचं औषध जीवावर बेतलं?

Doubt of Love Jihad, आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का?; सोलापुरातील महाविद्यालयीन तरुणाला १५ जणांची मारहाण, लव्ह जिहादचा संशय – a youth was beaten up by 15 people on suspicion of love jihad in solapur

0

सोलापूर: सोलापुरातील काही संघटना तरुणांची माथी भडकवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जात असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन जातींत तेढ निर्माण करून सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणास बुधवारी ७ जून रोजी दुपारी जबर मारहाण करण्यात आली आहे. तू आमच्या धर्माच्या तरुणींना फसवतो का? असा जाब विचारत संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पीडित तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणाने लव जिहादचा देखील फिर्यादमध्ये उल्लेख केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे.महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडे काही तरूणी आल्या. त्या नोकरीनिमित्त बोलत बसल्या. काही वेळाने दुसऱ्या अन्य एका समाजाचे तरुण आले व तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो असा जाब विचारू लागले. काही समजण्याअगोदर टोळक्यातील तरुणांनी पीडित तरुणास एमआयडीसी परिसरात नेले व जबर मारहाण करू लागले.

Gilda Sportiello: संसदेत महिला खासदाराने केले आपल्या मुलाचे स्तनपान, सहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या
तेथे त्याच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी पावणे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. जखमी अवस्थेत असताना पीडित तरुणाने मारहाण करणाऱ्याचे मोबाईल नंबर घेतले होते. बुधवारी रात्री जखमी झालेल्या तरुणाने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणाने फिर्याद देताना महत्वाची बाब नमूद केले असून आमच्या धर्मातील मुलीला फसवतो का, लव जिहाद करतो का, असे म्हणत १५ जणांनी त्याला लाकडाने व दगडाने मारहाण केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
त्वरित करवाई करून एका संशयितास अटक

शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या घटनेवरून त्वरित कारवाई करण्याचे आदेश जेलरोड पोलिसांना दिले होते. शहर पोलिसांनी ताबडतोब तपास करत बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका संशयितास अटक करून त्याला कोर्टात हजर केले आहे. इतर १० ते १५ जणांचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या संशयित आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे. या प्रकरणात १० ते १५ जणांविरोधात भा.द वि. ३६३, ३२४, ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन, कायम आठवणीत राहील त्यांचा आवाज
याबाबत विजय कबादे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे कोणी षडयंत्र करत असेल तर सोलापूर पोलीस त्यांवर कठोर कारवाई करेल. दरम्यान, सोशल मीडियावर सोलापूर सायबर पोलीस नजर ठेवून आहेत.

Nagpur Incident Of Theft By Showing The Revolver Owner Was Caught On CCTV; मालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला, घरात घुसून रोकड लंपास; घटना CCTVमध्ये कैद

0

नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या यादव नगर परिसरात दोन अज्ञात आरोपींनी घरात घुसून दोन लाखांची रोकड लंपास केली. मात्र, त्याचवेळी घरमालक घरात पोहोचला, त्यानंतर आरोपीने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून घरमालकाला खोलीत कोंडून तिथून पलायन केले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५७ वर्षीय कमल अडवाणी हे यादव नगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे सेवानिवृत्त लिपिक असून काही दिवसांपासून ते घरी एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आपल्या मुलीकडे लंडनला गेली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राणी दुर्गावती चौकात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते आणि सुमारे ३५ मिनिटांनी ते घरी परतले.
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मनसे नेते वसंत मोरेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच!
त्याचवेळी घरी पोहोचल्यावर त्यांना खोलीचा दरवाजा तुटलेला दिसला. तक्रारदार आत जाऊ लागले तेव्हा हेल्मेट घातलेले दोन आरोपी खोलीतून बाहेर येताना त्यांना दिसले. त्यांनी प्रतिकार करत असताना आरोपींनी त्यांचे पिस्तूल काढून फिर्यादीच्या डोक्यावर ठेवले आणि त्यांना गप्प राहण्यास सांगितले. आरोपींनी कमल अडवाणी यांना ढकलून खोलीत कोंडून तेथून दुचाकीवरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना दोन अज्ञात आरोपी दुचाकीवरून पळताना दिसले. आरोपींनी घरातून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. मात्र, घरमालक वेळेवर घरी आल्याने आरोपींचे सोन्याचे दागिने चोरीला चुकले होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या प्रेमनगर परिसरातून एक वाहन चोरून त्याच वाहनाचा वापर करून गुन्हा केल्याचे उघड झालं आहे. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या माहितीचा आधारे पोलीस या दोन अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.

VIDEO: थोडावेळ मैदानात आला अन् कांगारूची बँड वाजवून गेला; रॉकेट थ्रो मारून त्रिफळा उडवला

Nashik Crime News Minor Boy Commit Suicide At Home By Hanging Himself; नाशकात राहत्या घरात अल्पवयीन मुलाची आत्महत्या

0

नाशिक: शहरातील ध्रुवनगर परिसरात राहणाऱ्या अल्पयीन मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप मुलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाने बुधवारी (दि. ७) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेत जीवन यात्रा संपवली आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलाची आई घरात असतानाच त्याने गळफास घेतला. जेव्हा मुलाने गळफास घेतल्याची बाब त्यांंच्या लक्षात आली तेव्हा कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचारापूर्वी वैद्यकीय सूत्रांनी त्याला मृत घोषित केले. अल्पवयनी मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण समजू शकले नाही.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
अल्पवयीन मुलाला एक छोटी बहीण असून तो नुकताच नववी पास होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

नाशिक शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असून आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी ठाणे येथील रहिवासी असलेला सिद्धेश सुरेश कदम (वय २५) हा युवक नाशिक शहरात कामानिमित्त आला होता. नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबलेला होता. यावेळी त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरी घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या नवनाथ नगर भागात घडली आहे. ललित मनोज रंगारी (वय ३८) या व्यक्तीने मंगळवारी आढण्यात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला तार बांधून गळफास लावून घेतला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं

Father of minor wrestler admits filing false sexual harassment allegations against WFI chief | More sports News

0

NEW DELHI: The father of the minor wrestler said on Thursday that they deliberately filed a false police complaint of sexual harassment against WFI chief because they wanted to get back at him for the perceived injustice against the girl.
The startling admission by the father substantially weakens the case against Brij Bhushan Sharan Singhwho has relentlessly faced protest for the past six months by wrestlers, who have accused him of sexual harassment.The complaint by the minor wrestler has also led to investigation underPOCSO Act.

“It’s better that truth comes out now instead of court,” he told PTI when asked why he is changing his story now.

“Now that interactions have started, the government has promised fair enquiry into my daughter’s defeat (in Asian U17 championship trials) last year, so it is also my duty that I rectify my mistake,” he said.
He also provided elaborated explanation for the origin of his and his daughter’s animosity against Singh, who has vehemently denied the sexual harassment allegations, including against the minor.

The origin of the animosity goes back to the 2022 Under 17 Asian Championship trials in Lucknow when the minor lost the final and missed out on selection to the Indian team.
They blamed Brij Bhushan Sharan Singh for the referee’s decision.
“I was filled with rage my child’s one-year hard work had gone down the drain because of that referee’s decision in final and I decided to take revenge,” he said.

Pune Indapur Madanwadi Woman Has Been Murder; भल्यापहाटे महिलेचा जळालेला मृतदेह, पुण्यातील त्या हत्येचा उलगडा; धक्कादायक कारण समोर

0

पुणे (इंदापूर) : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडीजवळील भकासवाडी येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं भिगवण पोलिसांच्या तपासात उघड झाले असून या प्रकरणी भिगवण पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. काळु उर्फ दादा श्रीरंग पवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे.

मंगळवारी (दि. ६) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मदनवाडी गावच्या हद्दीत जेवण आणण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा भिगवण पोलिसांनी कसून तपास करत या घटनेचा उलघडा केला आहे.

राजकारणासाठी औरंगजेब ही भाजपची गरज, खासदार संजय राऊत यांची टीका
सदर मृत महिला ही आरोपीकडे “माझा आणि माझ्या मुलांचा सांभाळ करणार का नाही? शिवाय दिलेले पैसे परत दे”, असा तगादा लावत होती. यातून चिडलेल्या श्रीरंग पवार याने मारहाण करून त्या महिलेचा गळा दाबून तिची हत्त्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या महिलेला त्याने पेटवून दिले होते. मृत महिलेची मुलगी टिना कल्याण काळे हिच्या फिर्यादीवरुन या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, विनायक दडस पाटील, रूपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने हसीम मुलाणी यांच्या पथकाने केली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

Crime News Today Human Legs And One Foot Found Near Lake Uttarakhand; तलावाजवळ दोन पाय अन् एक पंजा सापडला, भयंकर घटनेने गावात खळबळ

0

डेहराडून: एका गावात बांधलेल्या तलावाजवळ मानवी अवयव सापडले आहेत. दोन पाय आणि एका पायाचा पंजा पोलिसांनी जप्त केला आहे. उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून ही भयंकर घटना समोर आली आहे. येथे दोन दिवसांपूर्वी गावातून एक महिला बेपत्ता झाली होती, ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलिसांना पायासोबत पायजामाी सापडला आहे. कुटुंबीयांकडून त्याची ओळख करून घेतली जात आहे. शरीराच्या इतर अवयवांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून तलावात शरीराच्या अवयवांचा शोध घेतला जात आहे.

हे प्रकरण जिल्ह्यातील केळखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरा काजी गावातील आहे. गावातील बौर तलावाजवळ मानवी अवयव पडून असल्याची माहिती ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. याठिकाणी पथकाला तलावाजवळ मानवी शरीराचे दोन छाटलेले पाय आणि पायाचा पंजा आढळून आला. तत्काळ फॉरेन्सिक आणि डॉग स्वॅक्ड टीमलाही पाचारण करण्यात आले. यानंतर परिसरात शरीराच्या इतर अवयवांचा शोध घेण्यात आला.

मिरारोड मर्डर केस; फरशीवर केसांची वेणी, बेसिनमध्ये रक्ताने भरलेल्या बादल्या, प्रत्यक्षदर्शीने सारं सांगितलं
गावातील रहिवासी जोगिंदर कौर या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. ती तिचे पाच सख्खे भाऊ आणि एका सावत्र भावासोबत गावात राहत होती. जोगिंदर या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे, त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही, अशी माहिती त्यांच्या भावांनी दिली.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

बेपत्ता झालेल्या महिलेच्या घराजवळ आहे तलाव

ज्या तलावाजवळ दोन पाय आणि एक पायाचा पंजा सापडला तो जोगिंदरच्या घरापासून १०० मीटर अंतरावर आहे. पायाला गुंडाळलेला पायजमाही सापडल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. पीडितेच्या भावांना तो पायजामा दाखवण्यात आला आहे, जेणेकरून तो जोगिंदरचा आहे की अन्य कोणाचा हे ओळखता येईल.

या प्रकरणाची माहिती देताना सीओ बाजपूर भूपेंद्र सिंह भंडारी सांगतात की, मानवी शरीराचे अवयव सापडल्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यासोबतच एसपी काशीपूरही घटनास्थळी पोहोचले. दोन पाय तर एका पायाचा पंजा सापडला आहे. मृतदेहाचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी परिसरात ४ जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तलावातही शरीराच्या अवयवांचा शोध घेतला जात आहे.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी

Latest posts