Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2559

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

26

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

29

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Crime News Today Woman Died Who Is 8 Months Pregnant Came To Jail To Meet Husband Bihar; तुरुंगात पतीला भेटायला गेलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू

0

पाटणा: हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटायला गेली. पतीला पाहताच ८ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे. ही महिला ८ महिन्यांची गर्भवती असून येत्या २० दिवसांनी २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. दीराने वहिणीच्या मृत्यूसाठी पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहात या महिलेचा पती असल्याची माहिती आहे.

भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात ६ जून रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि पल्लवी ही ८ महिन्यांची गर्भवती होती.

Mumbai Crime: मुंबईत वसतिगृहातील खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, सुरक्षारक्षकाची ट्रेनसमोर उडी
गुड्डू ३०७ प्रकरणी तुरुंगात

गुड्डू यादवचा विनोद यादवशी जमिनीवरुन वाद होता. या प्रकरणी गुड्डूवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

पल्लवीसह गर्भातील बाळाचाही मृत्यू

६ जूनला पल्लवी पती गुड्डूला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली होती. गुड्डू तिच्या समोर येताच पल्लवी बेशुद्ध होऊन कोसळली. यानंतर तिला तात्काळ मायागंज रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पल्लवीच्या मृत्यूसोबतच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. पल्लवीला आठवा महिना सुरु होता. डॉक्टरांनी तिला २७ जून ही प्रसूतीची तारीखही दिली होती. पण, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

दुसरीकडे, गुड्डूचा भाऊ विक्की यादवने वहिणीच्या मृत्यूला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दुसऱ्या पक्षाकडून पैसे घेऊन माझ्या भावाला तुरुंगात टाकलं, असा गंभीर आरोप त्याने केला आहे. जर, भाऊ तुरुंगात नसता तर ही परिस्थिती आली नसती. आमचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे, असं त्याने सांगितलं.

पल्लवीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शवविच्छेदनासाठी सहमत नव्हते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पल्लवीचा पती अंत्यसंस्कारासाठी पोलिस संरक्षणात स्मशानभूमीत पोहोचला होता. त्यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाला मुखाग्णी दिली.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…

​ॲपल युजर आहात? हे ॲप्स आहेत तुमच्या आयफोन, आयपॅडसाठी एकदम बेस्ट, पाहा लिस्ट – list of best designed apps for iphone ipad apple devices know details

0

​Inclusivity सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

inclusivity-

युनिव्हर्स एक्सप्लोरेशन कंपनीने डेव्हलप केलेले, हे युनिव्हर्स – वेबसाइट बिल्डर ॲप सोप्यापद्धतीने वेबसाइट बिल्डिंग टूल्स ऑफर करते. ज्यामुळे प्रत्येकजण वेबसाइट तयार करु शकतो. या सेक्शनमध्ये Lykke Studios ने डेव्हलप केलेला स्टिच हा Apple आर्केड गेम विजेता ठरला आहे. हा गेम त्याच्या वापरकर्त्यांना भरतकाम, ध्यान करण्याची कला अशा गोष्टी शिकवतो. कलर ब्लाईंडनेस, कमी दृष्टी आणि गती संवेदनशीलता असलेल्यांसाठी हा गेम बेस्ट आहे.

वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

Delight and fun सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

delight-and-fun-

ड्युओलिंगो, हे जवळपास १० वर्षे जुने अॅप असून नवनवीन फीचर्समुळे हे आजही बेस्ट आहे. भाषा शिकण्याची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी हे एक बेस्ट अॅप असून नवीन गोष्टी शिकण्यात मदत करत असल्यामुळे या अॅपला विजेता घोषित केलं गेलं आहे. या सेक्शनमध्ये आफ्टरप्लेस गेमलाही विजेता गेम म्हणून जाहिर केलं आहे. इव्हान काइसने डेव्हलप केलेला हा गेम मॉडर्न टच, नॉस्टॅल्जिया, ह्युमर अशा अनेक मजा युजर्सना देतो.

वाचा : Fake Call Alert : फेक व्हिडीओ कॉलमुळे होतेय अनेकांची फसवणूक, सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा’या’ स्टेप्स

​Interaction सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

interaction-

फ्लाईटी या अॅपला या पर्यायात बेस्ट अॅप म्हणून निवडलं आहे. विमान अर्थात फ्लाइट्ससंबधी माहितीसाठी हे एक बेस्ट ऑल इन वन अॅप आहे. या अॅप तपशीलवार उड्डाण नकाशे, विमानतळ नेव्हिगेशन आणि फ्लाईट किती लेट आहे? अशी सारी माहिती मिळते. या सेक्शलमध्ये गेम रेलबाउंड हा बेस्ट ठरला आहे. आफ्टरबर्नने डेव्हलप केलेला हा गेम सोपा इंटरफेससह दमदार फीचर्स असणार आहे. हा एक भारी पझल गेम असून यात एक ऑनबोर्डिंग अनुभव येतो.

वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण यादी

Social impact सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

social-impact-

हेडस्पेस हे एक असे अॅप आहे जे लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या अॅपमध्ये युजर्ससाठी वेगवेगळे सेशन्स असतात. ज्यात अगदी ४-५ मिनिटांपासून ते मोठ्या लेंथचे सेशनही असतात. यातून विविध प्रकारचं मार्गदर्शन युजर्सना दिलं जातं. या यादीतील बेस्ट गेम एन्डलिंग हा असून पर्यावरणीय आपत्ती आणि मानवी प्रभावामुळे जळलेल्या जमिनीवर नेव्हिगेट करण्यासाठी लढणारा कोल्ह्या हे गेमचं मूळ पात्र असतो.

वाचा : Airtel चं सिम वापरता? प्लानमधील डेटा संपला, स्वस्तात करू शकता रिचार्ज, फक्त १९ रुपयांपासून किंमत सुरू

Visuals and graphics सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

visuals-and-graphics-

‘एनी डिस्टन्स’ हे एक डिझाइन-फॉरवर्ड वर्कआउट ट्रॅकर असणारे अॅप आहे. हे एक हेल्थ रिलेटेड अॅप आहे. यात फिटनेस डेटा संकलित करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी अॅप लाइव्ह अॅक्टिव्हिटीज आणि ऍपल वॉचची मत घेते. यात धावणे आणि सायकल चालवणे यासारख्या कसरतीशिवाय व्हीलचेअर व्यायाम, चालणे आणि बाईक राइड्सचा हे सर्वही ट्रॅक होते. या सेक्शनमध्ये रेसिंडन्ट एव्हिल व्हिलेज हा गेम विजेता असून या गेमचे भारी व्हिजुवल्स या गेमला विजेता करण्यामागे मुख्य कारण आहेत.

वाचा : WhatsApp वर सेंट झालेला मेसेज आता एडिटही करता येणार, अगदी सोप्या आहेत स्टेप्स

Innovation सेक्शनमध्ये बेस्ट कोण?

innovation-

स्विंगव्हिजन हे टेनिस खेळाचे प्रशिक्षण देणारे अॅप आहे जे खेळाडूंना त्यांचा खेळ सुधारण्यास मदत करते. हे AI आणि न्यूरल इंजिन या दोन्हींवर अवलंबून आहे आणि प्रगत व्हिडिओ-ट्रॅकिंग क्षमता प्रदान करते. या श्रेणीत विजेता गेम मार्व्हेल स्नॅप हा गेम असून याचे दमदार अॅनिमेशन याच्या बेस्ट गेम असण्यामागे मुख्य कारण आहे.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

BSNL Revival Package, PM Modi-led Cabinet Approves Rs 89,047 Crore Support; BSNLला मोदी सरकारचा बूस्टर डोस, ८९००० कोटींच्या पॅकेजला मंजूरी!

0

मुंबई :भारत संचार निगम लिमिटेड किंवा BSNL साठी ८९ हजार ०४७ कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. हे पॅकेज 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी वापरले जाईल, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांची माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की मंत्रिमंडळाने बीएसएनएल आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) च्या विलीनीकरणाला देखील मान्यता दिली आहे.

पॅकेजमध्ये काय समाविष्ट
कॅबिनेट बीएसएनएलला 4G सेवांचा विस्तार करण्यास मदत करण्यासाठी स्पेक्ट्रमचे वाटप करेल. बीएसएनएलची ३३ हजार कोटी रुपयांची वैधानिक देणी इक्विटीमध्ये रूपांतरित केली जातील. यासोबतच कंपनी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बाँड्सही जारी करणार आहे. कंपनीचे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी CAPEX ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

BSNL ची भन्नाट ऑफर फक्त ३२९ रुपयांमध्ये १००० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही
BBNL आणि BSNL विलीन होतील
सरकारच्या या निर्णयानंतर टेलिकॉम कंपनीला 4G मध्ये अपग्रेड करण्यासाठी मदत होणार आहे. यासह बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्या मजबूत होतील. या विलीनीकरणामुळे बीबीएनएलच्या ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण बीएसएनएलकडे येईल. BBNL चे ५.६७ लाख किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर देशभरात टाकण्यात आले आहे.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी BSNL चा प्लान आहे एकदम बेस्ट, ३ महिने दररोज ३जीबी डेटासह फ्री कॉलिंग
विलीनीकरणाचा काय फायदा
बीएसएनएलकडे ६.८० लाख किलोमीटरपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. त्याच वेळी, BBNL द्वारे देशभरात ५.६७ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले आहे. या दोन कंपन्यांचे फायबर नियंत्रण युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) च्या माध्यमातून दिले जाईल. या निधीसाठी सरकारने २३ हजार कोटी रुपयांचे रोखे जारी केले असून MTNL साठी दोन वर्षात १७ हजार ५०० कोटींचे रोखे जारी केले जातील.

बीएसएनएलकडे 4G सेवा नाही.
भारतात सध्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होत असून या लिलावात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि इतर अनेक कंपन्या सहभागी होत आहेत. बीएसएनएल या लिलावात सहभागी होत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बीएसएनएलने अद्याप 4G सेवा सुरू केली नसून BSNL ने 4G नेटवर्क सेवा देण्यासाठी आयटीआय वर ३,८८९ कोटी रुपयांची आगाऊ खरेदी ऑर्डर (APO) दिली होती. कंपनी आणि आयटीओ यांच्यातील कराराच्या अटींनुसार, आयटीआय रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) उपकरणे तयार करण्यासाठी जबाबदार आहे.

धनी छत्रपती जाहले! दुबईच्या बुर्ज खलिफाजवळ शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

0

दुबई: स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर काल ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गडावर शिवभक्तांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. या सोहळ्याला छत्रपती युवराज संभाजीराजे सपत्नीक उपस्थित होते. तसेच सर्वपक्षीस नेतेही उपस्थित होते. देशभरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतानाच विदेशातही शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.shivrajyabhishek sohala 2023 : रायगडावर अडीच लाख शिवभक्त; संभाजीराजेंकडून महत्त्वाच्या सूचना
सौदी अरेबीयातील आणि जगभरातील आकर्षण असलेल्या बुर्ज खलिफा या दुबई येथील इमारतीवर शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. जगातील सर्वात उंच इमारत असा नावलौकिक असलेल्या बुर्ज खलिफा या दुबईतील इमारतीच्या परिसरात दुबईतील मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. मराठी बांधवांसाठी दरवर्षी शिवजयंतीचे आयोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रशेखर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता.

दुबईत राहणाऱ्या मराठी बांधवांनी परिवारासोबत मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभप्रसंगी टूर्स व ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचे अनावरण करण्यात आले. तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून नवीन संस्थेचे डॉक्युमेंट्स छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यात आली.

Shivrajyabhishek Din: शिवराज्याभिषेकानिमित्त राज्य सरकारकडून मोठी घोषणा, मुंबईत १३६ एकरात संग्रहालय उभारणार
या सहकाऱ्यांमध्ये श्री चंद्रशेखर जाधव यांच्या सोबत संदीप शिंपी,संदीप पवार,प्रशांत शिंपी व त्यांचे परिवार सामील झाले होते.मायदेशापासून दूर राहून देखील शिवरायांची शिकवण व प्रेरणा देणारा आणि शिवभक्ती जपणारा अनोखा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आल्याचे समाधान असल्याचे जाधव यांनी सांगितले.

तसेच दुबई येथे १८ जून २०२३ रोजी छत्रपती मराठा साम्राज्य याच्या तर्फे यंदा मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. दुबईतील सर्व शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोफत आनंद घेता येणार आहे, असे श्री चंद्रशेखर जाधव यांनी नमुद केले.
Shivrajyabhishek : शिवछत्रपतींचा जय हो… रायगडावरील गर्दीने शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा अक्षरशः झाला जिवंत

‘Country will witness a change in forthcoming elections, if … ‘: Now, Sharad Pawar cites Karnataka results to claim anti-BJP wave | India News

0

NEW DELHI: Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar on Wednesday claimed the country will witness a change in the forthcoming elections if the anti-BJP mindset of the people continues.
“Looking at the scenario, I think there is an anti-BJP wave going on. Considering the Karnataka election results, people are in the mood for a change. If this mentality of people continues, there will a change in the country in the forthcoming elections. There is no need of any astrologer to tell this,” the NCP chief said.
His remarks come days after Congress leader Rahul Gandhi claimed during his US tour that the BJP will be “decimated” in the next three-four assembly elections. Elections are scheduled in states like Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, Telangana and Mizoram later this year.
Rahul also claimed that a majority of people of the country don’t vote for the BJP.
“There is a tendency of people to believe that this sort of juggernaut of the RSS and the BJP is unstoppable. This is not the case. I’ll make a little prediction here. You will see that the next three or four elections that we fight directly with the BJP will be decimated,” Rahul had said in one of his interactions in the US.
“I can give it to you right now, that they’re gonna have a really tough time in these assembly elections. We’ll do to them the very similar stuff that we’ve done in Karnataka. But if you ask the Indian media that’s not going to happen,” he had said.
“Please realise that 60 per cent of India does not vote for the BJP, does not vote for Narendra Modi. That’s something you have to remember. The BJP has the instruments of noise in their hand, so they can shout, they can scream, they can distort, they can yell, and they are much better at doing that. But they do not have the vast majority of the Indian population (supporting them),” he said at another event.
The Congress had decimated the BJP in Karnataka to register a comprehensive win in the May 10 assembly elections. The grand old party had won 135 seats in the 224-member Karnataka assembly, while the BJP could win only 66 seats and was ousted from power in the state.

opposition unity

Karnataka was the second state in which the Congress defeated the BJP in recent months. In Himachal Pradesh also, the grand old party had managed to defeat the saffron party and form its government.
The opposition has been trying to unite to form an anti-BJP front ahead of the 2024 Lok Sabha elections. One such major initiative is being spearheaded by Bihar chief minister Nitish Kumar, who has met several opposition leaders over the last few months.
Efforts are on for adjustments at state-level instead of one all-India platform of all the parties. The Congress competes with several regional parties in the states and hence faces opposition from its state units against any unity moves with them.
A meeting of several opposition parties scheduled for June 12 in Patna had to be deferred after Nitish Kumar insisted on the presence of party heads at the meeting. This meeting is likely to be held now on June 23.
Several other leaders have also been making efforts to unite different parties against the BJP. However, it will be a herculean exercise to bring all the regional leaders like West Bengal chief minister Mamata Banerjee. Delhi chief minister Arvind Kejriwal Telangana chief minister K Chandrashekar Rao on one platform along with the Congress.
Meanwhile, the BJP may not be bothered much about the fallout the Karnataka election results. Ahead of the 2019 Lok Sabha elections, the BJP had lost quite a few state elections. However, when it came to the Lok Sabha elections, the party was back with a bang winning most of the seats in the states it had lost in assembly elections.
While the Karnataka may be a great booster for the opposition, it may not be enough to predict 2024 just yet.
(With inputs from agencies)

husband and wife were hit by a vehicle in a Daund; दौंडमध्ये पती-पत्नीला वाहनाची धडक

0

दौंड: पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुर्गेश अंकुश जगताप (35) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाटस दौंड अष्टविनायक या रस्त्यावर पहाटे ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, दुर्गेश जगताप व त्यांची पत्नी स्वाती हे दोघे पहाटे दौंड रस्त्यावर दौंड बाजूने पाटस दिशेला मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान दौंड बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने दुर्गेश जगताप यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुर्गेश हे रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले होते.
हायवेवर रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, समोर दुचाकी; विचित्र अपघातात दोघांचाही अंत

नागरिकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना पाटस येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यांनी यवत येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात जगताप यांच्या पत्नी स्वाती थोडक्यात बचावल्या आहेत. यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. मयत दुर्गेश यांचा भाऊ योगेश जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

दरम्यान सकाळ संध्याकाळ व्यायाम करायला जाणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे बनले आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे वाहने अति वेगाने धावत आहेत. सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी वाहनांचा अंदाज घेऊन व्यायाम करणे आवश्यक आहे, असे पोलीस वारंवार सांगतात.

Bharti Singh, husband Haarsh Limbachiyaa get relief in drug case after court rejects NCB plea for cancellation of bail

0

There’s relief for comedian Bharti Singh and her husband Haarsh Limbachiyaa after a special NDPS act court rejected the Narcotics Control Bureau‘s (NCB) plea seeking cancellation of their bail in a drug case.
According to PTI, V V Patil, special judge for cases under the Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, rejected the plea last week for lack of merit, but the detailed order became available on Tuesday.
After Sushant Singh Rajput‘s demise, several Bollywood and TV actors came under the scanner for drug consumption. Bharti and Haarsh’s name also cropped up during the investigation of a drug peddler.
In November 2020, the couple was arrested by the NCB for alleged possession of 86.5 grams of ganja (cannabis). They were granted bail on a bond of Rs 15000 each. Trouble continued for the two as NCB filed a chargesheet last year.
The court, however, in its order last week said there were no allegations that the couple interfered with administration of justice or violated their bail conditions. Therefore, there were absolutely no grounds made out for cancellation of bail, the judge said, according to PTI.
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa turned parents to a baby boy last year. The two continue to fulfill their professional commitments along with their personal responsibilities. They have hosted several TV shows together including Khatra Khatra Khatra, Funhit Mein Jaari and Hunarbaaz.
ALSO READ: Bharti Singh recalls living life in extreme poverty; shares ‘Someone’s stale food would be our fresh food’

मोलमजुरी करणाऱ्या आईबापाच्या कष्टाचं चीज; देशभरात केवळ ७ जागा; नंदुरबारच्या विशालनं पटकावला तिसरा क्रमांक

0

नंदुरबार: शेतीकाम करणारा बाप आणि मोलमजुरी करणारी माय यांच्या लेकराने मोठ्या कष्टाने यश मिळवले आहे. घरची परिस्थिती हलाखीची खडतर प्रवास मात्र जिद्दीने, मोठ्या कष्टाने यश मिळवलेल्या नंदुरबारच्या ग्रामीण भागातील विशाल निंबा पाटील याची जूनियर कमिशनर ऑफिसर या पदासाठी भारतातून सात जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. भारतातून सात जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड त्याची झाली असून त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही परीक्षा पास झाल्यामुळे इंडियन आर्मी इंजिनिअरिंग फोर्समध्ये विशालची निवड झाली आहे.

क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला १० तास अभ्यास, बहीण भावाचा MPSC परीक्षेत डंका

नंदुरबार जिल्ह्यातल्या आसाने या छोट्याशा गावातून नेहमीच मेहनतीने केलेल्या कामांची आणि जिद्दीने पेटून यश मिळवलेल्याची बातमी समोर येत असते. नंदुरबार तालुक्यातील आसाने या दुष्काळग्रस्त गावांमधून अनेकांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवत सरकारी नोकरी प्राप्त केल्या आहेत. देशाची सेवा करण्यासाठी या गावातून अनेक चेहरे भारतीय लष्करात आपली कर्तव्य बजावत आहे. आणि आता असाच एक चेहरा या गावातून समोर आला आहे. विशाल निंबा पाटील या युवकाने शेती आणि मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांचा सांभाळ करत मोठ्या कष्टाने यश मिळवले आहे.

बालपणी लग्न, पतीचं निधन, कचरा वेचून शाळा शिकली, मायलेकाला एकत्रच दहावीत घवघवीत यश

भारतातून सात जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत विशालची निवड झाली आहे. या भारतातून सात जागांपैकी महाराष्ट्रातून तीन जणांची निवड झाली आहे. त्यात विशालची भारतातून तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. ग्रामीण भागात राहून शेती करून अभ्यास करत मोठ्या पदावर यश मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थीही देखील मागे नसल्याचे विशालने दाखवून दिले. शिक्षणात आवड असल्याने विशालने आपले गाव सोडून जळगाव येथे जाऊन शिक्षण घेतले शिक्षण घेत असताना अधूनमधून त्याने शेती कामांकडे देखील लक्ष घातले आई मोलमजुरी आणि बाप शेतकरी आणि ग्रामीण भाग असल्याने विशालला घरातील आणि शेतीचे काम करत अभ्यास करावा लागत आणि या सर्वातून त्याने मोठया कष्टाने यश मिळवले आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलेल्या विशालचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे कुटुंबात आणि गावात त्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.

वडिलांचं निधन, कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या आईला मुलाचा सपोर्ट; मायलेकाला एकत्र दहावीत यश

Top wrestlers’ crucial meeting with Sports Minister Anurag Thakur begins | More sports News

0

NEW DELHI: A crucial meeting between the top wrestlers, led by Olympic medallist Bajrang Punia, and Sports Minister Anurag Thakur began at his residence on Wednesday morning as the government continued its effort to strike a deal with the protesting grapplers, who are demanding arrest of WFI chief Brij Bhushan Sharan Singh.
The meeting was called upon by Thakur to break the deadlock as the wrestlers have been adamant that they will continue their agitation till Singh, who they have accused of sexual harassment, is arrested.
Vinesh Phogat, a prominent face of the protest, is not attending the meeting as she is in her village Balali in Haryana to attend a pre-scheduled ‘panchayat’.
Punia, Rio Olympic bronze medallist Sakshi Malik and her wrestler husband Satyawart Kadiyan, arrived at the minister’s house for the meeting.
Bhartiya Kisan Union (BKU) leader Rakesh Tikait, who has been supporting the wrestlers in their protest, is not part of the meeting.
The wrestlers had resumed their protest against Singh and the national federation on April 23 at Jantar Mantar.
They were removed from the protest site on May 28 when the police detained them for violation of law and order after they began their march to the new Parliament building without permission.
It is the second round of meeting between the government and protesting wrestlers in a space of five days. The wrestlers had met Home Minister Amit Shah on Saturday night and apprised him of their demands.
While the government is willing to accept most of their demands, the arrest of Singh, who is also a BJP MP, remains the bone of contention.

Wrestling-AI

The wrestlers had also resumed their duties with the Northern Railways, last week. Sakshi Malik and Punia are attached with Railways as OSD.
“The wrestlers look positive in their approach. We are hoping for a resolution today. The idea is that the sport should not suffer,” said a sports ministry official ahead of the meeting.

Kolhapur ruckus stone pelting Home Minister Devendra Fadnavis comments on Aurangzeb Photo Status; औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? : देवेंद्र फडणवीस

0

कोल्हापूर : अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर फडणवीसांनी शांततेचं आव्हान केलं आहे.अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, यासाठी तर या औलादी पैदा झाल्या नाहीत ना, हे आपल्याला तपासावं लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कायदा हातात घेऊ नये, आम्ही कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे नव्याने पैदा झाले आहेत, त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याला डाग लागतो. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे वादंग
महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणी केलंच, तर साहजिक संताप होतोच, पण त्यासाठी कोणी कायदा हातात घेतला, तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही. राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. जे त्याचे फोटो, स्टेटस ठेवून दुर्भावना निर्माण होत आहे. या कारणाने तणाव निर्माण होत आहे. यामागे कोण आहे, हे शोधावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हजारोंचा मोर्चा धडकला, पण कोल्हापुरात पोलिसांची कणखर भूमिका, परिस्थिती कशी नियंत्रणात आणली IG म्हणाले…

काय आहे प्रकरण?

कोल्हापूरमध्ये काल औरंगजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाला होता. त्यावरुन दगडफेकीचा झाल्यानंतर पोलिसांनी कालच जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. त्यानंतर आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. मात्र, आंदोलक भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

Latest posts