Saturday, June 3, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2543

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

30

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

34

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

25

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

23

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

25

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

24

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

28

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

261

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

How to Secure Online Banking if You Are Using Only One Saving Account; तुमचेही बचत खाते आहे ? मग ही बातमी वाचाच, एका चुकीमुळे होऊ शकते बँक खाते रिकामे

0

मुंबई : डिजिटायझेशनने बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले आहेत. यामुळे एकीकडे आर्थिक व्यवहार अगदी सहज करता येत आहेत, पण ज्या प्रकारे डिजिटल बँकिंगचा विस्तार होत आहे, त्यामुळे ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ मध्ये देशात UPI व्यवहारांच्या फसवणुकीच्या ९५,००० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. अशा स्थितीत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की देशात UPI फसवणुकीशी संबंधित प्रकरणे वाढत आहेत.

प्रत्येक वेळी सावधगिरी आवश्यक
जर तुम्ही UPI फसवणुकीमुळे झालेली फसवणूक पाहिली तर, फसवणुकीच्या मोठ्या चित्राचा हा एक छोटासा भाग आहे. फिशिंग, मालवेअर आणि सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांपासून ते QR-कोड हाताळणी आणि UPI संबंधित फसवणूक, ऑनलाइन ठग तुमचे बँक खाते यशस्वीरीत्या रिकामे करत आहेत. अशा स्थितीत जर तुम्ही ऑनलाइन बँकिंग करताना सावधगिरी बाळगली असली तरी तुमची फसवणूक झाली म्हणजे तुम्ही ऑनलाइन बँकिंग थांबवावे का?

Multiple Bank Accounts: एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास लगेच करा बंद, होऊ शकतं आर्थिक नुकसान, लगेच जाणून घ्या
असं अजिबात नाही. तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी फक्त एक बँक खाते असताना तुम्ही बचतीचा एक मोठा भाग ऑनलाइन फसवणुकीमुळे गमावून बसता. म्हणजे जर तुम्ही एकाच खात्यातून ऑनलाइन पेमेंट केले, तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

RBI Coin Deposit Rule: बँक खात्यात एकाच वेळी किती नाणी जमा करू शकता? नियम जाणून जागरूक व्हा!
एक बँक खात्याचे तोटे काय?

जेव्हा तुम्ही एका खात्यातून सर्व पैसे भरता तेव्हा तुमचे बँक तपशील अनेक ठिकाणी जातात. अशा स्थितीत तुमची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. याशिवाय तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहारांची अचूक माहिती ठेवणेही कठीण होऊन जाते.

Bank Locker: बँकेच्या लॉकरमधूनच दागिने-कॅशची चोरी, मग नुकसान तुमचं की बँकेचं? RBIचा नियम काय सांगतो वाचा
ऑनलाईन बँकिंगच्या सुरक्षेसाठी काय करावे?

  • बँकेची ऑनलाइन सुरक्षा मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमचे मुख्य खाते रोजच्या व्यवहार खात्यापासून वेगळे केले पाहिजे. असे केल्यास मुळात संपूर्ण बचत गमावण्याचा धोका कमी होईल.
  • तुम्ही मुख्य आणि दररोजच्या व्यवहाराची खाती वेगळी केल्यास अर्धी लढाई जिंकली. मात्र, तुमचे दैनंदिन व्यवहार खाते सुरक्षित आणि सहजतेने वारंवार ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी सोयीचे आहे, हे देखील सुनिश्चित केले पाहिजे.
  • जेव्हा तुम्ही सर्व व्यवहारांसाठी एकच खात्याचा वापर करता तेव्हा तुमच्या सर्व खर्चाचा मागोवा ठेवणे कठीण होते.
  • तुमचे बचत आणि दैनंदिन व्यवहारांसाठी दोन भिन्न खाती असल्यास तुम्हाला खर्चाचा मागोवा घेणे सोपे होते.
  • दररोजच्या व्यवहारासाठी वेगळे खाते वापरल्याने तुमची संपूर्ण बचत गमावण्याचा धोकाही कमी होतो.

Nashik Municipal Education Officer Sunita Dhangar Clerk Nitin Joshi Arrested By Acb

0

Nashik Bribe Case :  नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड सापडलेआहे. त्यांच्याकडून लुचपत प्रतिबंधक विभागाने 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने जप्त केले आहेत. त्या 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडल्यात.


Updated: Jun 3, 2023, 12:29 PM IST

नाशिक पालिका शिक्षणाधिकारी धनगर यांच्या घरात सापडले मोठे घबाड, 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने

Nashik Municipal Education Officer Sunita Dhangar Clerk Nitin Joshi Arrested By Acb

Bike Accident On Dule Solapur Highway At Jalna Newly Married Lady Died; नुकतंच लग्न झालेलं, पतीसोबत प्रवासासाठी निघाली पण अनर्थ.. ट्रेलरच्या धडकेत नवविवाहिता ठार, दोघे जखमी

0

जालना : भरधाव येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. पती पत्नी आणि मावस दिर हे प्रवास करत होते. जालना जिल्ह्याच्या धुळे-सोलापूर महामार्गांवरील वडीगोद्री टी पॉईटच्या उड्डाणपुलाजवळ २ जून रोजी दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात आश्विनी अनिकेत कादगे वय २२ रा. रुई धानोरा ता.गेवराई या नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला. तर, अनिकेत हनुमंत कादगे वय २८ रा. रुई धानोरा ता. गेवराई आणि प्रमोद नामदेव घाटे वय २२ हे जखमी झाले आहेत.

देऊळगावराजा येथील १ जून रोजीचं लग्न आवरून अनिकेत कादगे, अश्विनी कादगे आणि प्रमोद घाटे हे तिखे २ जून रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच २३ बी जी ६५२१ या दुचाकीवरून निघाले होते. अश्विनी,अनिकेत आणि प्रमोद हे तिघे रुई धानोरा येथे जात असताना छत्रपती संभाजीनगर कडून बीड कडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलर क्रमांक जी जे ३६ एक्स ३३३३ ने धुळे -सोलापूर महामार्गांच्या वडीगोद्री टी पॉईंट जवळ दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अश्विनी या जागीच ठार झाल्या तर अनिकेत व प्रमोद हे दोघे जखमी झाले आहेत.
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, क्रांती रेडकर म्हणाल्या यापूर्वी दुर्लक्ष केलं पण आता…
या अपघाताची माहिती मिळताच वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी अपघात स्थळावर धाव घेत मदत केली. काही गावकऱ्यांनी धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रकला पकडून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती कळताच महामार्ग ५२ चे मदतनीस यांच्याकडून अश्विनी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शव शवविच्छेदनासाठी वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर गोद्री पोलिसांनी ट्रक ट्रेलर ताब्यात घेऊन शहागड चौकी येथे नेला असून ट्रक ट्रेलर चालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
WTC फायनलच्या आधी डेव्हिड वॉर्नरची बंडखोरी; क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये भूकंप, बोर्डाबद्दल…
वाहतूक पोलिसांनी यानंतर वाहतूक सुरळीत केली. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृत अश्विनी कादगे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लग्न होऊन जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कागदे परिवारासह गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Odisha Railway Accident : ओडिशात भयंकर रेल्वे दुर्घटना; महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही घेतला मोठा निर्णय

Odisha Railway Accident ST Bus Corporation Big Decision In Maharashtra; ओडिशात भयंकर रेल्वे दुर्घटना; महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही घेतला मोठा निर्णय

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ओडिशा राज्यात अत्यंत मोठी रेल्वे दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत २०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच अनेक सरकारी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ओडिशात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी आज, शनिवारी एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत,’ अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडून देण्यात आली आहे.

देशातील सगळ्यात मोठ्या प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लोकवाहिनीची गाथा सांगणाऱ्या एसटी विश्वरथाचे आज, शनिवारपासून मार्गक्रमण सुरू होणार आहे. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने रथाची बांधणी करण्यात आलेली आहे. एसटी रथाचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फुटणार होता.

Sameer Wankhede : समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, क्रांती रेडकर म्हणाल्या यापूर्वी दुर्लक्ष केलं पण आता…

१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचकलमी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवनियुक्त एसटी सदिच्छा दूत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. एसटीच्या पहिल्या गाडीपासून ते ई-शिवनेरी यांची प्रतिकृती, कालानुरूप झालेले बदल आणि सरकारकडून एसटीच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या योजनां यांची माहिती रथातून गावागावात देण्यात येणार आहे.

असे होते एसटीचे पंचकलमी कार्यक्रम

– २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित सेवा बजावणाऱ्या पाच चालकांचा सपत्निक सत्कार

– करोनानंतर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभांगाचा व ९ आगारांचा सत्कार.

– दूरदर्शी प्रणालीद्वारे राज्यातील बसस्थानकांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटिकरण.

– एसटी कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण

– एसटी विश्वरथाचे उद्घाटन

Sanjay Raut and Ajit Pawar clashed strongly

0

Sanjay Raut and Ajit Pawar clashed : संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावेळी राऊत यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. त्याचवेळी पवार यांनीही प्रत्युत्तर दिलेय.


Updated: Jun 3, 2023, 11:36 AM IST

संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपली, Raut म्हणाले, 'धरणामध्ये xxx पेक्षा... थुंकणं चांगलं'

Sanjay Raut and Ajit Pawar clashed

Nashik Young Man Arrested For In Girl Student Case Before 10th Results; दहावीतील मुलीची तरुणासोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग, नंतर प्रेमात पडले; पण निकालाआधीच घात झाला

0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दहावीच्या निकालापूर्वीच बांधकाम सुरू असलेल्या पाचमजली इमारतीच्या गच्चीवरून विद्यार्थिनीला ढकलून दिल्याप्रकरणी एका संशयिताला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे.

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कैलासनगरमध्ये प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. विनायक सुरेश जाधव (वय १९, रा. घोटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जाधवने विद्यार्थिनीला ढकलले, की तिनेच उडी मारली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कैलासनगरमध्ये राहणारी विद्या हनुमान काळे (वय १६) हिला बुधवारी (दि. ३१) रात्री राहत्या घरासमोरील इमारतीवरून ढकलण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी तिने कुटुंबीयांशी साधलेल्या जेमतेम संवादात संशयिताचे नाव घेतले. गुरुवारी (दि. १) सायंकाळी सात वाजता तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता तिचे वडील हनुमान शाहूराव काळे (वय ४०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांच्या पथकाने जाधव याला अटक केली.

कोल्हापुरचा पठ्ठ्या १० वी पास, मित्रांनी उंटावरून मिरवणूक काढली

ओडिशातून रेल्वे अपघाताची बातमी, मडगाव- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठा निर्णय, गोव्यातून नवी अपडेट

दहावीत मिळाले ५७ टक्के

काळे कुटुंबीय मूळचे परभणी येथील आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. एकुलती मुलगी असल्याने विद्याला उच्चशिक्षित करण्यासाठी आई-वडील प्रयत्नशील होते. शुक्रवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागल्यावर विद्याला ५७ टक्के गुण मिळाले. मात्र, निकालापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी तिचे आई-वडील भाजी खरेदीसाठी गेले होते. घरी परतल्यावर गाडी उभी करी असतानाच समोरील इमारतीच्या गच्चीवरून विद्या खाली कोसळली होती.

इन्स्टाग्रामवर चॅटिंग

मृत विद्या आणि संशयिताचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते, असे पोलिस तपासात पुढे येत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाल्यानंतर चॅटिंगमध्ये वाढ झाली. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाले. पासवर्ड एकमेकांना देणे, इतरांशी होणारे चॅटिंग यातून त्यांच्याच वाद झाल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यातून भेटीदरम्यान झालेल्या वादातून संशयिताने विद्याला धक्का दिल्याचा संशय आहे. पोलिसांनी दोघांच्या मोबाइलचा ‘सीडीआर’ मागविला आहे. त्यातून येणाऱ्या लोकेशनच्या माहितीनुसार गुन्ह्यातील खरे तथ्य उकलण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्याहदे यांनी सांगितले.

Sameer Wankhede Received Threat From Tweet Said By Kranti Redkar: मोठी बातमी, समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, पत्नी क्रांती रेडकर यांची माहिती

0

मुंबई : मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे अडचणीत आले होते. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सीबीआय आज मुंबई हायकोर्टात त्यांच म्हणनं सादर करणार आहे. नेमक्या त्याच दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात येत आल्याचं समोर आलं आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमकीप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं.

क्रांती रेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. धमक्या आणि या सगळ्या गोष्टी ट्रोल ज्याला म्हणतो हे खूप आदीपासून येत होतं. ते आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण, आता हे दोन हँडल्स नॅशनल नाहीत, ती इंटरनॅशनल अकाऊंट आहेत, असं त्या म्हणाल्या. लोकं दाऊदचं नाव घेऊन धमक्या देत आहेत. ती लोकं भारताला शिवीगाळ करत आहेत, भारताच्या सरकारला शिवीगाळ करत आहेत. माझ्या पतीला शिवीगाळ करत आहेत, आमच्या मुलांना शिवीगाळ करत आहेत. आमच्यावर अॅसिड हल्ला झालं तर काय असा विचार मनात येतो, त्यामुळं आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.
Train Accident: मला रक्तदान करायचंय, युवकांची गर्दी उसळली, रेल्वे अपघाताच्या धक्क्यात माणुसकीचा झरा
सीबीआय आज आर्यन खान प्रकरणी मुंबई हायकोर्टात उत्तर दाखल करणार आहे. समीर वानखेडे यांना हायकोर्टानं ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

Balasore Train Accident : दबलेले अन् छिन्नविछिन्न मृतदेह, किंकाळ्या आणि वेदनांनी विव्हळणाऱ्यांचा आवाज
समीर वानखेडे यांनी हायकोर्टात त्यांची बाजू मांडताना बदल्याच्या भावनेतून कारवाई केली जात असल्याचं म्हटलं होतं. माझ्यावर यापूर्वी देखील भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. ते त्यावेळी सिद्ध झालं नव्हते, असं वानखेडे म्हणाले होते. सीबीआयला देखील या प्रकरणी पुरावा मिळणार नाही, असं वानखेडे म्हणाले. सीबीआयनं समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी आर्यन खानला सोडण्यासाठी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली.

WTC फायनलच्या आधी डेव्हिड वॉर्नरची बंडखोरी; क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये भूकंप, बोर्डाबद्दल…
काही दिवसांपासून ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. आर्यन खान प्रकरणात वानखेडेंवर गंभीर आरोप झाल्याने सीबीआयने वानखेडें विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच समीर वानखेडे यांच्या घरावर छापादेखील टाकण्यात आला होता. सीबीआय विरोधात वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली होती. यांनतर, त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमद याच्यासारखी आपलीही हत्या होऊ शकते अशी शक्यता वानखेडेंनी वर्तविली होती. आता त्यांना ट्विटरवरून धमकी मिळाल्याने वानखेडेंनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Matheran Monkey Death News; माथेरानमध्ये ६ माकडांचा तडफडून मृत्यू, विषप्रयोगाचा संशय, स्थानिकांमधून हळहळ व्यक्त

0

माथेरान : मुंबई जवळचे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणजे माथेरान. सुट्टीच्या दिवसांमध्ये माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होते. माथेरान आणि माकडं हे एक समीकरणच आहे. माथेरानच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे माकडं. असे असताना माथेरानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी काही माकडांचा तडफडून मृत्यू झाला आहे.माकडांचा तडफडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात सकाळच्या दरम्यान सात ते आठ लहान मोठी माकडं बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. एकूण आठ माकडांपैकी दोन माकडं तडफडत होती. तर उर्वरीत सहा माकडं आधीच मृत्यूमुखी पडलेली होती.

चार कोयते हातात घेऊन व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर पोस्टही केला; त्यानंतर जे झालं…
तडफडत असलेल्या दोन माकडांना स्थानिक नागरिकांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही इलाज होऊ शकला नाही. रात्रीच्या वेळी या माकडांवर कुणी विष प्रयोग तर केला नाही ना? असा सवाल उपस्थिती केला जात आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या उष्णता वाढली असून उष्माघातामुळे ही माकडं दगावली का? की अन्य काही कारणांमुळे यांचा मृत्यू झाला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाण्यातील विशालची कमाल, सर्वच विषयात ३५ गुण; आई-वडिलांसाठी बनायचंय कलेक्टर

दरम्यान, मृत्यू पावलेल्या माकडांना वनखात्याच्या अधिकारी वर्गाने शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्या माकडांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे हे उघडकीस येईल. या माकडांच्या मृत्यूमुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अचानक ब्रेक फेल झाले, भरधाव रिक्षा २० फूट खोल खड्ड्यात पडली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 03 June2023

0

Top Headlines

31 May, 08:44 AM (IST)

TOP Headlines ABP Majha 7 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 31 मे 2023

Late Flights, Damaged Bags Prove Costly For Gulf Airline | Bengaluru News

0

BENGALURU: What was to be a memorable holiday to Turkiye for a Bengaluru-based family was spoiled in many ways as flight delays resulted in them missing two connecting flights to Turkiye even as their checked luggage was damaged. The family sued Gulf carrier Kuwait Airways at a city consumer court and was awarded Rs 59,620 refund on ticket fares and Rs 30,000 as compensation.
In December 2017, Ulsoor resident S Rajendran, 59, his wife and three other family members decided to go on a holiday to Turkiye. As there was no direct flight to the country from Bengaluru, Rajendran booked tickets on Kuwait Airways flights from Bengaluru to Mumbai, Mumbai to Istanbul, and Istanbul to Kayseri. Trouble began on day 1 of the trip itself as their flight from Mumbai to Istanbul was delayed and the family missed their connecting flight from Istanbul to Kayseri. They were forced to book a fresh flight and make arrangements for accommodation.
The family’s ordeal continued even on their return journey, as their Istanbul-Mumbai flight got delayed, resulting in them missing their connecting flight to Bengaluru. Three of their checked bags were missing and finally arrived after two days. But two of the bags were badly damaged.
After reaching Bengaluru, Rajendran contacted the customer helpline of Kuwait Airways and narrated their ordeal. He demanded a refund on the additionally booked flights. With the Gulf carrier not responding favourably, he approached the Bengaluru fourth additional district consumer disputes redressal commission in Shantinagar in December 2018 with a complaint against Kuwait Airways for service deficiency.
His lawyer presented his claims while the attorney for Kuwait Airways denied all the allegations. The latter further said that the flight delays were beyond the airline’s control and they had offered the complainant a refund for the trouble, which he had refused to accept.
In their verdict pronounced on April 17, 2023, judges of the consumer court said the airline had indeed committed service deficiency by not addressing the family’s problems all through the trip. They ruled that Kuwait Airways must pay Rs 59,629 towards refund of ticket fare along with interest to the complainant, apart from Rs 25,000 as compensation, and Rs 5,000 towards litigation expenses.

Latest posts