Saturday, June 10, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2569

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

37

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

40

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

32

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

29

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

32

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

31

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

35

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

265

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Sukhois carry out long-range precision-strike drill in Indian Ocean Region | India News

0

NEW DELHI: The Sukhoi-30MKI fighters have now practised long-range precision strikes in the western seaboard of the Indian Ocean Region (IOR) in a combat training mission that lasted almost eight hours, which comes soon after Rafale jets undertook a similar exercise on the eastern one.
The “large package” of Sukhois and some other assets took off from an air base in Gujarat and then “hit” the designated target near the Gulf of Oman after mid-air refuelling by IL-78 tankers, an IAF officer said on Friday.
The Rafales, after taking off from the Hasimara airbase in northern West Bengal, had also conducted an over six-hour mission to hit a target in north Andaman on the eastern seaboard last week. “The Sukhois have done it now on a different axis. So, both the seaboards have been covered,” the officer said.
The twin IAF training missions constitute strategic signalling to China, which with the world’s largest Navy with 355 warships and submarines is steadily stepping-up its presence in the IOR.

WhatsApp Image 2023-06-10 at 7.41.57 AM.

Amid the continuing military confrontation with China in eastern Ladakh since May 2020, the IAF has been practising such interdiction missions in the IOR to choke China’s sea lanes of communication for huge energy and other imports from the Malacca Strait to the Persian Gulf.
Apart from the western and eastern fronts, the Sukhois are also deployed at Pune and Thanjavur in peninsular India. The Sukhois armed with BrahMos supersonic cruise missiles, whose strike range has been extended to 450-km from the original 290-km, were first based at the Thanjavur airbase in 2020 to give IAF “strategic depth” in the IOR.
With a combat radius of almost 1,500-km without mid-air refuelling, the Sukhois armed with BrahMos constitute a deadly weapons package for pinpointed strikes against high-value targets like warships on the high seas or enemy positions, bunkers, command-and-control centres and the like on land.
IAF chief Air Chief Marshal V R Chaudhari had last week said that the lethal combination of the BrahMos missiles, which fly at almost three times the speed of sound at Mach 2.8, fitted on the Sukhoi-30MKI fighter jets has made the IAF’s “deterrence value go up by leaps and bounds”.
The next-generation BrahMos, a smaller and lighter version of the existing missile that is under-development, will be fitted onto smaller fighters like the MiG-29s, Mirage-2000s and Tejas light combat aircraft in the future. An 800-km range variant of the BrahMos has also undergone its maiden test, as was earlier reported by TOI.

Mumbai Police Saves Man From Ending Life; पत्नी सोडून गेली, सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ, पोलिसांनी धाव घेत वाचवला तरुणाचा जीव

0

Mumbai Police Saves Man From Ending Life : सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओवर जीव देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी वाचवलं आहे. मुंबई पोलिसांनी लाइव्ह व्हिडिओ पाहून धाव घेतली. आणि तातडीने त्या तरुणाला शोधलं. भाईंदर पोलिसांनी ही कामगिरी केली.

 

bhayandar police saved man life
पत्नी सोडून गेली, सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ, पोलिसांनी धाव घेत वाचवला तरुणाचा जीव
‌म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणाचा तातडीने शोध घेऊन, त्याचे मतपरिवर्तन करण्याची मोलाची भूमिका भाईंदर पोलिसांनी नुकतीच पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत. त्याला पुढील उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वसईच्या नायगाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची पत्नी कौटुंबिक कारणास्तव त्याला सोडून गेली आहे. यामुळे नैराश्यात गेलेल्या या तरुणाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता तो भाईंदर-वसई खाडीवरील रेल्वे पुलावर गेला होता. यावेळी सोशल मीडियावरून लाइव्ह व्हिडीओ करत, पत्नीची समजूत काढूनही ती ऐकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. या तरुणाने व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केले होते.
Mumbai : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, आजपासून १४ तासांचा ब्लॉक, अनेक लोकल रद्द
मुंबई पोलिसांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती तत्काळ भाईंदर पोलिसांना दिली. भाईंदर पोलिसांनीही प्रसंगावधान दाखवून एक पथक तत्काळ खाडी पुलावर पाठवले. त्यांनी तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सुरुवातीला संवाद साधण्यास नकार दिला. मात्र, नंतर पोलिसांनी त्याची समजूत काढल्यावर त्याचे मतपरिवर्तन झाले.

पोलिसांच्या हाती पिशव्या, कुत्र्यांचा भेसूर आवाज.. मीरारोडमध्ये थरकाप उडवणारी घटना

या तरुणाला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी तो नैराश्यामुळे मागील चार दिवसांपासून जेवला नसल्याने त्याची प्रकृती खालावल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भाईंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

India vs Australia WTC Final: Pluck and luck play a part in Ajinkya Rahane’s redemption | Cricket News

0

After his hurricane yet pleasing 27-ball 61 for Chennai Super Kings against Mumbai Indians at the Wankhede Stadium in the IPL, Ajinkya Rahane, while speaking to Ravi Shastri, the former India coach on TV, said, “I love playing at the Wankhede. I know the ground well. I have not played a Test here, yet.”
That word “yet”, was a bigger statement than his refreshingly liberated innings and the stroke-filled cameos he essayed throughout the IPL. It basically said, “I am not going anywhere. Not yet”.

1/9

Ajinkya Rahane becomes 13th Indian to score 5000 runs in Test cricket

Show Captions

Four days before the IPL had begun, he had been dropped from BCCI’s list of centrally contracted players. Last March, he was downgraded and eventually dropped from the Test team. Only six months before, in November, he was captaining India in Kanpur vs New Zealand. But with an average of 22.60 over 13 Tests for almost two years at No.5, it was tough to justify his spot in the squad.
Also, with the kind of Bunsen pitches India had opted to play on in home Tests, in search of quick wins, there was no fallback option for him to score big runs and get confidence for tougher, away assignments. Almost all the Indian batters, barring Rohit Sharma and Rishabh Pant have suffered because of that.

Injuries to Shreyas Iyer and KL Rahul saw him earn a surprise recall to the squad for the World Test Championship (WTC) final vs Australia at The Oval when the team was announced on April 25. It sparked a meme fest on social media on how he was being picked for a Test on the basis of a few IPL performances.
India though knew what they were signing up for. Experience and pedigree. Rahane is one of those rare Indian batters, who can be considered an overseas specialist, especially when the team is down in the dumps. Durban (2013) Wellington (2014), Lord’s (2014), Bangalore (2017), Johannesburg (2018), MCG (2020), are all venues that bear the signatures of his toil. He averages 41.17 away from home with eight of his 12 hundreds coming overseas.
At home, he averages 35.73.

Many of those overseas runs have come when India were in the dumps, like they were at the Oval. They were 50 for 3 when he walked in. 71 for 4 when Virat Kohli was out and 152 for 6 when KS Bharat was cleaned up by Scott Boland off the second ball on Day Three.
He had the twin tasks of scoring runs and guiding fellow Mumbai teammate, Shardul Thakur. He did that expertly till he was dismissed for 89, caught in the gully by Cameron Green, a blinder off Pat Cummins.
Yes, Rahane rode his luck. He survived a lbw shout against Cummins when on 17 on Day Two because the bowler had overstepped. Cummins also battered his fingers with sharp, lifting deliveries from a length that needed frequent medical attention. On Day Three, he was dropped in the slips by David Warner just before lunch on 72, but in between those bits of luck, there was pluck and technical brilliance. He was playing more on the backfoot and meeting the ball late.

Cricviz suggested that his average interception points were 1.49 metres, which meant he was playing closer to his body than at any time in his career.
Rahane’s drives through covers don’t get viral like the ones played by other superstars, but the efficiency he displayed while playing the stroke was first rate.
Six of his 11 boundaries came through cover drives as he scored 33 runs through that stroke off just 12 balls.
In his attempt to play another one, he perished and was denied a well-deserved 13th Test ton. What he wasn’t denied though was the record of becoming the 13th Indian to score 5000 Test runs and genuine appreciation of everyone who watched the innings.

cricket match2

Odisha Train Accident Government starts Demolish School ; रेल्वे अपघातातील मृतांचे मृतदेह शाळेत ठेवले, लेकरं घाबरली, ओडिशा सरकारनं उचललं मोठं पाऊल

0

वृत्तसंस्था, भुवनेश्वर : बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातातील मृतदेह तात्पुरत्या स्वरूपात बहानगा हायस्कूलच्या इमारतीत ठेवण्यात आले होते. मात्र, यामुळे भीतीपोटी शाळेत जाण्यास मुलांनी नकार दिला होता. अखेर ६५ वर्षे जुनी असलेली ही इमारत पाडण्याचे काम ओडिशा सरकारने शुक्रवारी सुरू केले.

ही इमारत जुनी झाल्यामुळे सुरक्षित नसल्याचे शाळा व्यवस्थापन समितीने (एसएमसी) सांगितले होते. शिवाय रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवण्यात आले होते, या कारणामुळे या शाळेतील विद्यार्थी वर्गांमध्ये जाण्यास तयार नव्हते. मुलांच्या मनात भीती असल्याने पालकांनीही इमारत पाडण्याची मागणी केली होती. शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णय, पालक व स्थानिकांची मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी मुख्य सचिवांसह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजुरी दिली. ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि डिजिटल वर्गखोल्या अशा आधुनिक सुविधांनी युक्त आदर्श शाळा बनवण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर शुक्रवारी ताबडतोब इमारत पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ‘एसएमसी’ सदस्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडकाम सुरू करण्यात आले.
Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाजCostal Road : कोस्टल रोडच्या कामाबाबत अपडेट, मुंबई महापालिकेवर आर्थिक भार, ३५७ कोटी मोजावे लागणार, कारण…
दरम्यान, भीती आणि अंधश्रद्धा पसरवू नका, असे आवाहन बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी शुक्रवारी केले; तसेच तरुणांच्या मनात वैज्ञानिक वृत्ती रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सुचवले. तर, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी संबंधित अधिकारी समुपदेशन आयोजित करतील, असे शालेय आणि सामूहिक शिक्षण विभागाचे सचिव एस. अश्वथी यांनी सांगितले.

El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली

ओडिशा रेल्वे अपघातात २७८ जणांचा मृत्यू

ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार स्टेशन जवळ कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. या अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये काही जणांचा रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही काळासाठी मृतदेह बहानगा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती.

Trump took files on US nuclear, defence secrets and stored them in shower

0

WASHINGTON: After his indictment on Friday on federal charges in the classified documents case, former US President Donald Trump said, “I never thought it possible that such a thing could happen to a former president of the United States, who received far more votes than any sitting president in the history of our country, and is currently leading, by far, all candidates, both Democrat and Republican, in polls of the 2024 presidential election.” “I am aninnocent man!” he lamented on his social media platform.
He will appear before a judge on Tuesday — Aileen Cannon — whom Trump himself had appointed.

The indictment gives the clearest picture yet of the files that Trump took with him when he left the White House. It said he had illegally kept hold of documents concerning “US nuclear programmes; potential vulnerabilities of the US and its allies to military attack; and plans for possible retaliation in response to a foreign attack. ” One document concerned a foreign country’s support of terrorism against US interests. Materials came from the Pentagon, the Central Intelligence Agency, the National Security Agency and other intelligence agencies, the indictment said.

Gfx 6

Investigators seized roughly 13,000 documents from Trump’s Mar-a-Lago estate in Palm Beach, Florida, nearly a year ago. In all, roughly 300 documents were marked classified, including some at the top secret level, even though one of Trump’s lawyers had previously said all records with classified markings had been returned to the government.

'I never thought it possible...': Former US President Donald Trump indicted in classified documents probe

02:45

‘I never thought it possible…’: Former US President Donald Trump indicted in classified documents probe

Prosecutors presented evidence that Trump shared a highly sensitive “plan of attack” against Iran to visitors at his golf club in Bedminster, N. J. in July 2021 — and was recorded on tape describing the material as “highly confidential” and “secret,” while it admitting it had not been declassified. In another incident in September, 2021 he shared a top secret military map with a staffer at his political action committee who did not have a security clearance.
The indictment also names one of his personal aides, Waltine Nauta, as a co-conspirator who assisted in obstructing the investigation into the former president’s retention of sensitive defence documents at his residence and resort in Florida.
The indictment says that Trump stored the boxes throughout Mar-a-Lago, including in a ballroom, a bathroom and a shower, as well as in an office and his bedroom. His lawyers had told investigators that documents were kept only in a storage room.
The filing includes many pictures of what appear to be bankers’ boxes, some containing highly sensitive national documents, which were haphazardly moved by Nauta and other aides at Trump’s behest. Some of the boxes appear to be sagging — and on December 7, 2021 Nauta found that one of the boxes had toppled and spilled its contents on the floor. The files that splayed on the carpet included the designation “SECRET/REL TO USA, FVEY” — which meant that they were meant to be seen by officials from the US, UK New Zealand and Australia with high-level security clearances.
Trump himself turned on US President Joe Biden, accusing him of taking classified material, too, although legal experts say there are no parallels between the two.
“The corrupt Biden Administration has informed my attorneys that I have been Indicted, seemingly over the Boxes Hoax, even though Joe Biden has 1850 Boxes at the University of Delaware, additional boxes in Chinatown, DC , with even more boxes at the University of Pennsylvania, and documents strewn all over his garage floor where he parks his Corvette, and which is ‘secured’ by only a garage door that is paper thin, and open much of the time,” he claimed.
After classified documents were found at Biden’s thinktank and at ex-vice-president Mike Pence’s Indiana home, their lawyers notified authorities and arranged for them to be handed over. They also authorised other searches by federal authorities.

देशातील मधुमेह रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी; ‘लॅन्सेट’ अहवालातून माहिती समोर, सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात?

0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतात ११.४ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर ३५.५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब आहे. १५.३ टक्के लोक मधुमेह होण्याच्या रेषेवर आहेत. ‘लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.देशातील मधुमेह आणि असंसर्गजन्य रोगांवरील (एनसीडी) सर्वांत मोठ्या अभ्यासात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, की सन २०२१मध्ये भारतातील १० कोटी दहा लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे, तर १३ कोटी ६० लाख लोक मधुमेह होण्याच्या रेषेवर असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ३१ कोटी ५० लाख लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने ‘मद्रास डायबिटीज रीसर्च फाउंडेशन’ने (एमडीआरएफ) हा अभ्यास केला. यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिला होता. भारतातील २८.६ टक्के लोक सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त आहेत, तर ३९.५ टक्के लोक ढेरपोटेपणाने ग्रस्त आहेत. सन २०१७मध्ये भारतातील सुमारे ७.५ टक्के लोकांना मधुमेह असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

राज्यांमध्ये गोव्यात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण (२६.४ टक्के) आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वांत कमी रुग्ण आहेत (४.८ टक्के). पंजाबमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे (५१.८ टक्के).

बिगरसंसर्गजन्य आजारांमध्ये झपाट्याने होणारी वाढ हे मुख्यतः जीवनशैलीतील बदल जसे आहार, शारीरिक हालचाल आणि तणावाच्या पातळीमुळे असू शकते, असे ‘एमडीआरएफ’चे अध्यक्ष डॉ. आर. एम. अंजना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

हा अभ्यास सन २००८ ते २०२०दरम्यान देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एक लाख १३ हजार ४३ लोकांवर करण्यात आला. यापैकी ३३ हजार ५३७ शहरी आणि ७९ हजार ५०६ ग्रामीण भागातील रहिवासी होते.अभ्यास पथकात नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) संशोधकांचाही समावेश होता.

‘… तर चार लाख मृत्यू टाळता येतील’

नवी दिल्ली : ‘जल जीवन मिशन’ने सर्व ग्रामीण कुटुंबांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट साध्य केले, तर अतिसारामुळे होणारे सुमारे चार लाख मृत्यू रोखले जाऊ शकतात, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. सरकारने सन २०१९मध्ये जल जीवन मिशन सुरू केले होते. या अंतर्गत पुढील वर्षापर्यंत ग्रामीण भागांतील सर्व घरांना नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने ‘डब्ल्यूएचओ’ला भारतात सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे आरोग्य फायदे आणि आर्थिक बचतीचा अभ्यास करण्यास सांगितले होते. ‘जलजीवन मिशन’ भारतातील सर्व लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवू शकले, तर अतिसारामुळे होणारे सुमारे चार लाख मृत्यू टाळता येतील, असे या अभ्यासातून समोर आले आहे.
महाराष्ट्राचा पहिला नंबर, गुजरात आणि कर्नाटकलाही मागे टाकलं, शिंदे-फडणवीस सरकारसाठी गुड न्यूज
मधुमेहाचे औषध करोनावर गुणकारी

नवी दिल्ली : करोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीनंतर मधुमेहाचे औषध गुणकारी ठरल्याचे समोर आले आहे. मधुमेहावरील सुरक्षित आणि परवडणारे औषध असलेल्या मेटफॉर्मिनचा दोन आठवड्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतरच्या १० महिन्यांत करोनाचा धोका ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे ‘लॅन्सेट’च्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या अभ्यासासाठी निवडलेले सहभागी हे ३० वर्षांहून अधिक वयाचे होते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे त्यांना करोनाचा धोका जास्त होता; तसेच गेल्या तीन दिवसांत त्यांची ‘सार्स कोव्ह २’ चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

Mumbai Mira Road Murder Case; धक्कादायक! तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोज सानेने घेतला गुगलचा आधार

0

Mumbai Mira Road Murder Case : मुंबईत शासकीय वसतिगृहातील तरुणीच्या हत्येचं प्रकरण गाजत आहे. त्याचबरोबर मिरा रोड येथील हत्येची भयंकर घटनाही चर्चेत आहे. या घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलचा आधार घेतल्याचं समोर आलं आहे.

 

हायलाइट्स:

  • मिरा रोड येथील महिलेच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता नवीन माहिती
  • सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगल सर्च
  • चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा रोड येथील महिलेच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज साने याने गुगलचा आधार घेत माहिती मिळवल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त तो चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले असून या दोघांचे नातेवाईकही आता पुढे आले आहेत.

मिरा रोडच्या गीता नगर परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मनोज साने याने सरस्वती वैद्य हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. इतकेच नव्हे तर ते तुकडे त्याने कुकरमध्ये शिजवल्याचे तपासात उघड झाले. हे कृत्य करण्यापूर्वी मनोजने मृतदेहाची काही छायाचित्रेही काढली होती. याशिवाय मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी, तसेच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय करावे ही माहिती मिळवण्यासाठी त्याने गुगलचा आधार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, मिरा रोडमधील धक्कादायक प्रकार
आरोपी मनोज याने याआधी दोघेही अनाथ असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, मनोजचे काका व इतर नातेवाईक बोरिवली परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. सरस्वतीलाही पाच बहिणी असून त्यातील एक बहीण आता पोलिसांसमोर आली आहे. मनोज व सरस्वतीने तिच्या एका बहिणीच्या घरी जाऊन जेवणही केले होते. आरोपीने प्रथम आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांनी एका मंदिरात विवाह केल्याची माहिती मनोजने आता पोलिसांना दिली आहे.
…म्हणून सरस्वती वैद्यला प्राण गमवावे लागले, नीलम गोऱ्हेंनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
या दोघांची ओळख सन २०१२मध्ये सरस्वती नोकरीच्या शोधात असताना, बोरिवली परिसरात झाली होती. त्याआधी ती तिच्या बहिणीकडे राहायला होती. तत्पूर्वी ती अहमदनगर येथील आपटे अनाथ आश्रमात राहायला होती. या आश्रमात काही कागदपत्रे घेण्यासाठी सरस्वती मधल्या काळात गेली होती. यावेळेस तिने मनोजची ओळख मामा अशी तेथील लोकांना करून दिली होती. दोघेही मूळचे अहमदनगरचे असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पोलिसांना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत आरोपी मनोज पोलिसांना गुंगारा देत आहे. सरस्वतीची हत्या केल्याची कबुली त्याने अद्याप दिलेली नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Mumbai Costal Road Cost Increased by 357 Crore Due to GST: कोस्टल रोडच्या कामाबाबत नवी अपडेट, महापालिकेवर आर्थिक भार, ३५७ कोटी मोजावे लागणार, कारण…

0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पात एक जलवाहिनी स्थलांतरित करावी लागणार आहे. या कामापोटी कंत्राटदाराला वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सहा टक्के वाढीव फेरफार द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला विविध करांसह तब्बल ३५७ कोटी मोजावे लागणार आहेत. परिणामी एकूण प्रकल्प खर्चात वाढ होत हा प्रकल्प १२ हजार ७२१ कोटींवरून सुमारे १३ हजार ६० कोटींहून अधिक रकमेचा झाला आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस (एल ॲण्ड टी), बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे दक्षिणेकडील टोक (एचसीसी आणि एचडीसी), तसेच प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क (एल ॲण्ड टी) या कंपन्या काम करत आहेत. प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रकल्पामध्ये येणाऱ्या सर्व उपयोगिता सेवांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी प्रकल्पात येत असून, ती अलिखित उपयोगिता सेवा या सदरामध्ये मोडते. या जलवाहिनीचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याने, जल अभियंत्याकडून त्याप्रमाणे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा खर्च सहा कोटी ९४ लाख ४३ हजार रुपये आहे.
Palkhi Sohala 2023 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज मार्गस्थ होणार, देहूकर सज्ज, असा असेल प्रस्थान सोहळा
प्रकल्प सुरू झाला, तेव्हा जलवाहिनी स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना, जलवाहिनीचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याची बाब पुढे आली. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा सन २०१८मध्ये जीएसटी १२ टक्के होता तो २०२२ मध्ये १८ टक्के करण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाच्या तीनही कंत्राटदारांना अतिरिक्त सहा टक्के वस्तू व सेवा कराची रक्कम द्यावी लागणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि साधारण सल्लागार यांनी तसेच वरिष्ठ विधिज्ञ व्ही. श्रीधरन आणि कर सल्लागार मे. बाटलीबॉय अँड पुरोहित कंपनीने यांनी आपल्या अभिप्रायात संबंधित रक्कम कंत्राटदाराला देय आहे, असे नमूद केले आहे.
शरद पवार धमकी प्रकरणात मोठी अपडेट, तपास गुन्हे शाखेकडे, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

असा वाढला प्रकल्प खर्च

प्रकल्प भाग-१ प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस या कामासाठी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड यांच्याशी केलेल्या ४ हजार ३७४ कोटी २४ लाख या मूळ कंत्राट किमतीमध्ये १२४ कोटी ५४ लाख इतक्या रकमेची वाढ करून ४ हजार ४९८ कोटी ७८ लाख इतकी झाली आहे.

प्रकल्प भाग-२ बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोकापर्यंतच्या कामासाठी मे. एचसीसी-एचडीसी (संयुक्त भागीदार उपक्रम) यांच्याशी केलेल्या २ हजार ६५३ कोटी २४ लाख या मूळ कंत्राट किंमतीत ८६ कोटी ३६ लाख ५७ हजार इतक्या रकमेची वाढ करून २ हजार ७३९ कोटी ६१ लाख झाली आहे.

प्रकल्प भाग-४ प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुल ते प्रियदर्शिनी पार्क या कामासाठी मे. लार्सन अन्ड टुब्रो लिमिटेड यांच्याशी केलेल्या ३ हजार ४९२ कोटी ४५ लाख कंत्राट किमतीमध्ये ७९ कोटी ६६ लाख रकमेची वाढ करून ३ हजार ५७२ कोटी ११ लाख झाली आहे.
El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली

Weather Forecast Mumbai Rains; महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाज

0

Weather Forecast Mumbai Rains : यंदा मान्सून उशिराने भारतात दाखल झाला आहे. आता हा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

 

weather forecast of mumbai maharashtra
महाराष्ट्रात तापमान वाढणार, उकाड्याची स्थिती कधीपर्यंत राहणार? पाहा हवामान विभागाचा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : घामाच्या धारा पुसत, पाण्याच्या बाटल्या संपवत मुंबईकरांनी शुक्रवारचा दिवस कसाबसा ढकलला. मुंबईमध्ये शुक्रवारी उष्णतेच्या लाटेप्रमाणे परिस्थिती जाणवली. सांताक्रूझचे कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर कुलाब्यामध्ये ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. आज, शनिवारीही वातावरणाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. रविवारनंतर यात थोडासा दिलासा मिळू शकतो. मान्सून दाखल होईपर्यंत महाराष्ट्रात तापमानवाढ होण्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
El Nino : भारतीयांची काळजी वाढवणारी बातमी, एलनिनोचं कमबॅक, मान्सूनवर परिणाम होणार का? चिंता वाढली
मुंबईमध्ये शुक्रवारी कुलाबा येथे ३५.२, तर सांताक्रूझमध्ये ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.५ आणि २ अंशांनी चढे होते. याआधी सन २०१९मध्ये जून महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३६.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्याआधीच्या वर्षीही जूनमधील मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून दक्षिणेकडून वारे येत असल्याने मुंबईमध्ये तापमानाचा पारा अधिक चढल्याचे प्रादेशिक हवामान विभाग अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. यातच शुक्रवारी समुद्रावरून येणारे वारेही उशिरा आले. त्यामुळे या उकाड्यामध्ये आणि त्रासामध्ये भर पडल्याचेही त्या म्हणाल्या. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवसांसाठी उत्तर कोकणामध्ये उष्ण आणि आर्द्र स्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. शुक्रवारी किमान तापमानाचा पाराही कुलाबा येथे २८.५, तर सांताक्रूझ येथे २९.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे रात्रीही मुंबईकरांना दिलासादायक वातावरण अनुभवता आले नाही. चक्रीवादळाचा प्रवास आणखी पुढे सरकेपर्यंत उकाड्यातून फारशी सुटका नाही असे पूर्वानुमान आहे. त्यातच पूर्वमोसमी सरी आल्यास थोडा दिलासा मिळू शकेल.

Weather Alert: पुढच्या ५ दिवसांत सूर्य आग ओकणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून तीव्र उष्णतेचा इशारा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Varsha Gaikwad New Mumbai Congress Chief; काँग्रेसने भाकरी फिरवली, मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या वर्षा गायकवाड कोण आहेत? पाहा…

0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच बदलाचे वारे वाहणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा मुंबई काँग्रेस कार्यालयासमोरील सभागृहात असंघटित कामगारांचा जाहीर मेळावा सुरू असतानाच त्यांना पदावरून हटविण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीने जाहीर केला. जगताप यांच्या जागी काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून पक्षाने निवडणुकीपूर्वीच भाकरी फिरविल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा निर्णय घेतला असून राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत पत्रक काढून घोषणा केली. मुंबई काँग्रेसच्या नियुक्तीबरोबरच गुजरातच्या अध्यक्षपदी शक्तीसिंह गोहिल, पुद्दुचेरीच्या अध्यक्षपदी व्ही. व्हेथिलिंगम यांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्त्वाचा बदल केला आहे. महिला व दलित समाजात असणारा पाठिंबा, राज्य सरकारमध्ये विविध मंत्रीपदावर काम करण्याचा अनुभव या वर्षा गायकवाड यांच्या जमेच्या बाजू असून त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली असल्याचे बोलले जाते.

वर्षा गायकवाड उच्चशिक्षित असून दलित समाजातील आहेत. धारावी या मतदारसंघावर त्यांचे गेली अनेक वर्षे वर्चस्व आहे. राज्यातील मंत्रीमंडळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केलेले आहे. दलित समाजात त्यांना चांगला जनाधार आहे. तसेच इतर राज्यांमधील निवडणुकांमध्ये पक्षाच्या निरीक्षक म्हणून त्यांनी अनेकदा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मुंबईत काँग्रेसला जनाधार मिळवून देणे, आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत समन्वय राखणे आणि काँग्रेस पक्षाच्या जागा वाढविण्याचे मोठे आव्हान वर्षा गायकवाड यांना आगामी काळात पेलावे लागणार आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल; भाई जगतापांची उचलबांगडी, अध्यक्षपदी वर्षा गायकवाडांची नियुक्ती
वर्षा गायकवाड यांचा परिचय

– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची मुलगी.

– एमसीसी बीएडपर्यंत शिक्षण.

– २००९, २०१४ व २०१९ या विधानसभा निवडणुकीत धारावी मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदार.

– २००९च्या आघाडी सरकारच्या काळात वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, पर्यटन आणि विशेष साहाय्य या विभागाचे राज्यमंत्री भूषिवले.

– २० नोव्हेंबर २०१० ते ७ नोव्हेंबर २०१४ या काळात महिला व बालविकासमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून काम केले.

महिलांची बदनामी करणं बंद कर नाहीतर; चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा

– २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्रिपद भूषिवले.

– विधिमंडळाच्या विविध समित्यांवर काम केले आहे.

– २००६-२००७मध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरव, तर २०१५-१६मध्ये विधिमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे उत्कृष्ट भाषण पुरस्कार.

– मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची भूमिका नेटाने बजावली. त्याशिवाय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समितीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

– सन २०१८मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Latest posts