Monday, June 5, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2546

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

33

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

36

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

28

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

24

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

27

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

26

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

National institutional ranking: IIT-M top college overall, IISc best university

0

NEW DELHI: Indian Institute of Technology (IIT), Madras, continues to hog the limelight in the national rankings, leading the overall and engineering categories for the fifth and eighth consecutive years respectively, while Indian Institute of Science (IISc), Bengaluru, retains the best varsity spot for the eighth year in a row. Like in global rankings, in the ministry of education’s National Institutional Ranking Framework (NIRF) as well, the IITs and IISc are leading the lists in various categories. IIT-Kanpur is the top institute in innovation in the NIRF 2023 rankings, while IISc is the top-ranked in research.
The eighth edition of the NIRF released on Monday observed that faculty with doctoral qualification is concentrated in top 100 institutions, while remaining have fewer faculty with doctoral degrees. This is a serious handicap since mentorship received during the doctoral training can play a vital role in preparing the faculty for a teaching career in higher education, it noted.
Seven IITs – Madras, Bombay, Delhi, Kanpur, Kharagpur, Roorkee and Guwahati – figured in the top 10 in the overall rankings.
The All India Institute of Medical Sciences (AIIMS), which was ranked ninth last year, improved its ranking to sixth this year, while Jawaharlal Nehru University retained its 10th position in the overall category.
The ranking framework evaluates institutions in five broad generic groups on the parameters of teaching, learning and resources, research and professional practice, graduation outcomes, outreach, and inclusivity and perception.
In the universities category the trio of IISc, JNU and Jamia Millia Islamia retained their positions – first, second and third ranks respectively. The IISc continues to be the top university from the start of the rankings in 2015.
Banaras Hindu University, which was ranked sixth last year in the category, improved its rank and bagged the fifth spot.
Among private players, Manipal Academy of Higher Education is the top-ranked (6), followed by Amrita Vishwa Vidyapeetham in Coimbatore (7) and Vellore Institute of Technology (8).
Among colleges, Miranda House, Hindu College and Presidency College-Chennai retained the first and second and third positions. Miranda House has been the top college for the seventh year in a row.
Institutions like Siksha ‘O’ Anusandhan (SOA) Deemed to be University, Bhubaneshwar, also improved its rank in medical sciences (from 18 to 16), dental sciences (9) and law (8) this time, as it leads the institutions in Odisha.
Pradipta Kumar Nanda, vice-chancellor of SOA, said: “The aim is to be ranked among the top 10 universities of the country within the next five years.
In Engineering, eight IITs – Madras, Delhi, Bombay, Kanpur, Roorkee, Kharagpur, Guwahati and Hyderabad – are in the top 10 ranks.
Indian Institute of Management, Ahmedabad, and Bangalore, retained the first and second ranks respectively among the B-Schools in the country. IIM-Calcutta, which was at the third spot last year, slipped to the fourth position while IIM-Kozhikode bagged the third position.
In the medical colleges category, AIIMS, Delhi, bagged the top spot, followed by PGIMER, Chandigarh, and Christian Medical College, Vellore. The trio bagged the same positions as last year. The AIIMS, Delhi, has occupied the top slot in medical stream for the sixth consecutive year.
“Changes in metrics, parameters and normalisation algorithms were introduced over the years, although the basic framework was kept intact. As a result, the ranking of institutions has largely remained consistent, especially amongst 25 top-ranked institutions, over the years, although individual ranks might have changed by a few slots for some institutions due to performance variations across institutions on some of the parameters,” a senior ministry official said.
From 2023, a new subject “agriculture and allied sectors” has been introduced in NIRF and the Indian Agricultural Research Institute, New Delhi, has bagged the top slot in this category.

Pune Baramati Farmer Self Immolation Attempt; न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, लेकाला बघताच आईचा आक्रोश; बारामतीत काय घडलं?

0

पुणे : शहरातील प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिदास जनार्दन माने असं या शेतकऱ्याचं नाव आहे. संबंधित शेतकरी रेडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जमिनीच्या वादातून आम्हाला न्याय न मिळाल्याची त्याची तक्रार होती. यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेनंतर प्रांताधिकारी गणेश नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पांडुरंग, पांडुरंग! पायी चालताना रिक्षाची धडक, दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; नाशिक सुन्न
त्यानंतर जखमी माने यांना एमआयडीसीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते या घटनेत १५ टक्के भाजले आहेत. रेडा येथील माने यांनी रस्त्याच्या कामासाठी इंदापूर पोलिसांनी लक्ष न दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माने कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान, शेतकरी माने यांनी पेटवून घेताच त्यांच्या आईने रस्त्यावर लोटांगण घेत आक्रोश केला. “आमच्यावर मोठा अन्याय झाला आहे”. मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी माने यांच्या आईने केली आहे. न्याय न मिळाल्यास प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील माने कुटुंबियांनी दिला आहे.

याआधीही अनेक अशा आत्मदहनाच्या घटना समोर आल्या आहेत. यात अनेक घटना मंत्रालयात घडल्या आहेत. यानंतर प्रशासनाने यासाठी कठोर पाऊलं उचलली आहेत. राज्यातील शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन शासनाकडे जातात. मात्र, तेथे त्यांच्या प्रश्नावर अपेक्षित तोडगा निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. यातून असे काहीसं घडलेलं पाहायला मिळतं.

कामं नीट करा, नाहीतर कानाखाली आवाज काढेन; अजितदादांची तंबी; पदाधिकारी वाद विसरून एकत्र

रत्नागिरी जिल्ह्यावर पाणीटंचाईची गडद छाया

0








रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मोसमी पुर्व पावसानेही पाठ फिरवल्यामुळे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी जिल्ह्यात टंचाईची संकट गडद होत आहे. जिल्ह्यात सध्या 105 गावातील 195 वाड्यांत टँकरने पाणी पुरवठा केला जात असून 39 हजार 199 लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. आठ दिवसांमध्ये 14 गावातील 23 वाड्यांची भर पडली आहे.

उन्हाची तिव्रता चांगलीच जाणवत आहे. त्यामुळे विहिरी, नद्या, नाले कोरडे पडू लागले आहेत. अनेक विहिरी, विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाणी पाणी करत फिरावे लागत आहे. शासनाकडून टँकरचा पर्याय दिला आहे. मात्र वाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे टँकर अपुरे पडत आहेत. जिल्ह्यात 195 वाड्यांना टँकरचा आधार आहे. यासाठी 4 शासकीय आणि 14 खासगी टँकर घेण्यात आले आहेत.

आतापर्यंत 1 हजार 317 फेर्‍या झाल्या आहेत. 39 हजार 199 लोकांना टँकरने पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात हा आकडा 36 हजार 344 लोकांना टँकरने पाणी दिले जात होते. मोसमी पाऊस लांबला तर जिल्ह्यात टंचाईची तिव्रता अधिक जाणवणार असून त्यासाठी प्रशासनाला सज्ज रहावे लागणार आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात 4 गावातील 16 वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. या परिसरातील 11 हजार 125 लोकांना टंचाईची झळ बसत आहे. आतापर्यंत सुमारे 300 फेर्‍या पाणी पोचवण्यात आले आहे.

हेही वाचंलत का?

 









With 3.20 lakh H-1B visas bagged in FY 2022, Indians continue to top USCIS charts

0

MUMBAI: Of the total 4.41 lakh H-1B applications that were approved by the United States Citizenship and Immigration Services (USCIS) in the fiscal year 2022 (year ending September 30, 2022), 3.20 lakh or 72.6% were allotted to those who were India-born (Indians).
The second most common country of birth was China, with a comparatively meagre statistic of 55,038 (12.5% of the total). Canada with 4,235 successful applicants (1%) of the total, stood third in ranking. This statistic of 4.41 lakh includes approval of H-1B visas for initial employment and also for continued employment (aka visa extensions).
The H-1B visas can be allotted for a maximum of six years. If the beneficiary (individual who is sponsored by the American employer) is on track for a green card, periodical extensions are permitted.
According to the report – Characteristics of H-1B Specialty Occupation Workers – 2022, released by USCIS, the number of H-1B applications that were approved increased by 8.6% in fiscal 2022.
In the previous fiscal year, 3.01 lakh Indians had successfully obtained H-1B visas, which was 74.1% of the total visas approved in 2021. In contrast, 50,328 Chinese (constituting 12.4% of the total approvals) had obtained H-1B visas. In short, over the years, Indians have continued to bag more than 70% of the H-1B visas issued by USCIS.
Top 3 countries of origin: H-1B visas approved

Country 2022 % to total 2021 % to total
India 320,791 72.6% 301,616 74.1%
China 55,038 12.5% 50,328 12.4%
Canada 4,235 1.0% 3,836 0.9%
Total 441,502 100% 407,071 100%

The H-1B visa is a popular work visa, especially among Indian technology professionals. The total number of H-1B applications approved in FY 2022 for workers in computer-related occupations was 2.91 lakh or 66% of the total approved applications. The median compensation of beneficiaries with approved petitions increased by 9.3%, from $108,000 in the fiscal year 2021 to $118,000 in the fiscal year 2022.
The H-1B visa applications for ‘initial employment’ are filed for first-time employment in the US. Nearly 1.32 lakh applications for initial employment were approved in fiscal 2022, as against 1.23 lakh in the previous fiscal.
Late 2022 and the first few months of 2023 have seen a series of lay-offs, which would be reflected in next year’s report.
It should be noted that while there is an annual quota of 85,000 for H-1B visa allotments, some categories of employers such as those engaged in higher education are exempt from the cap, resulting in the higher figure of approval of H-1B visas for new jobs.
During the fiscal year 2022, nearly 77,673 India-born individuals obtained an H-1B visa for new employment (which is 58.7% of the total). The statistic for China-born is 18,911 (or 14,3% of the total). During the fiscal year 2021, Indians had bagged 75,858 (61.5%) of the visas for initial employment. Chinese had obtained 15.2% of such visas. International students continued to be a significant chunk of those who successfully made a transition from F-1 to H-1B visas.
Top 3 countries of origin: Initial employment H-1B visas approved

Country 2022 % to total 2021 % to total
India 77,673 58.7% 75,858 61.5%
China 18,911 14.3% 18,770 15.2%
Canada 2,055 1.6% 1,824 1.5%
Total 132,429 100% 123,414 100%

Latur crime news today 23 years old son murdered father in front of mother; आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार

0

लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा थेट चाकूने भोसकून मुलाने खून केला. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील रेणुका नगरमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई रोडवरील अंबा हनुमान मंदिराच्या पाठीमागे रेणुका नगरमध्ये दिनू जानकर यांच्या घरात सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय ४८ वर्ष) गेल्या काही वर्षापासून भाड्याने राहत होते. सोमनाथ नेहमीच पत्नी मंगल क्षीरसागर यांना काही ना काही कारणावरून सतत मारहाण करत. याचा राग त्यांचा २३ वर्षीय रोहित क्षीरसागर याला येत असे. मात्र आईच्या आणि इतरांच्या समजवण्यामुळे तो वाद घालून शांत बसायचा.

दरम्यान ३ जूनच्या रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास सोमनाथ क्षीरसागर आणि त्यांची पत्नी मंगल क्षीरसागर यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सोमनाथ क्षीरसागर यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यांची भांडण नेहमीची आहेत म्हणून शेजारीही कोणी भांडण सोडविण्याच्या भानगडीत पडले नाही.

रायगडाच्या पायऱ्या चढताना शिवभक्ताचा मृत्यू, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळीच दुर्घटना
वारंवार घडणाऱ्या या प्रकाराचा राग रोहित क्षीरसागर याच्या डोक्यात गेला. अन् आईला मारहाण करणाऱ्या बापाचा त्याने जागीच खून केला. रोहितने घरातील चाकूने बापाच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले. आई मंगल यांनी मुलाला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या ताकदीपुढे ती कमी पडली.

MPSC, iPhone आणि थरारक हत्या, कोल्हापुरात बाप आणि भावानेच विद्यार्थ्याला संपवलं
यात सोमनाथ क्षीरसागर जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. डोळ्यादेखत आपल्या पोटच्या मुलाकडून आपल्याच पतीची हत्या पाहण्याचा दुर्दैवी क्षण तिच्या आयुष्यात आला. ती धाय मोकलून रडू लागली.

मुलगी पळून गेल्यानं आई-वडिलांची आत्महत्या, नातेवाईकांकडून प्रियकराच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

दरम्यान, हत्येनंतर रोहितने घटनास्थळावरून पळ काढला. मंगल यांचा आरडाओरडा अधिकच होत असल्याचे पाहून शेजारीही धावले. अन् त्यांनाही धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय
मंगल क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून मुलगा रोहित क्षीरसागर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं. ४०२/२०२३ कलम ३०२ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे रोहित क्षीरसागरला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कराड करत आहेत.

रायगड : महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त सीईटीपी जवळील चेंबरला आग!

0








महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड औद्योगिक वसाहती मधील अतिरिक्त क्षेत्रामध्ये वेल खोले गावाच्या हद्दीत असलेल्या सीईटीपीच्या चेंबरला सायंकाळी अचानक आग लागली. या आगीमुळे  निर्माण झालेल्या धुराने काळीज विरखोले परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रस्तुत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी द्वारे बोलताना या गावातील नागरिकांनी केले आहे.

यासंदर्भात सीईटीपीच्या सूत्रांकडे विचारणा केली असता त्यांनी चेंबरला अचानक लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न एमआयडीसी फायर फायटर मार्फत सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आणले.  प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त चेंबरमध्ये आज पसरत असल्याचे निदर्शनास आल्याने दोन फायर फायटर ना बोलवण्यात आल्याची माहिती येथील प्रशासकीय यंत्रणेने दिली आहे. या आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकलेले नाही हे आगे मध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

हेही वाचंलत का?









Rinku Singh Got Pannic In Flight Video kolkata knight riders IPL 2023; रिंकू सिंगसोबत विमानात असं काही घडलं की त्याने थेट हातच जोडले

0

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू रिंकू सिंगसाठी आयपीएल २०२३ हे कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. या लीगनंतर रिंकू आता सुट्टीवर गेला आहे. रिंकू हा सुट्ट्या घालवण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे.

रिंकू सिंगची फ्लाइटमध्ये वाईट अवस्था

कोलकाता नाईट रायडर्सने रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला रिंकू सिंग झोप घेत आरामात फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसत आहे. पण, दुसऱ्या भागात रिंकू सिंग फ्लाइटमध्ये होणाऱ्या टर्ब्युलन्समुळे खूपच घाबरलेला दिसत आहे. यासोबतच हवेचा दाब जास्त असल्याने विमान विमानतळावर उतरू शकत नसल्याचंही तो सांगताना दिसत आहे. यादरम्यान, तो देवाकडे प्रार्थना करताना दिसतो आहे. रिंकू सिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिक्स-पॅक ऍब्समधील फोटो व्हायरल

रिंकू सिंग सध्या मालदीवमध्ये असून तो त्याच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. त्याचे सिक्स पॅक अॅब्समधील फोटो पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलची बहीण शहनील गिलनेही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. शाहनीलने लिहिले – ओ हिरो. शाहनील गिलच्या या कमेंटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मी कधी विचारच केला नव्हता… रिंकू सिंहच्या कामगिरीनं वडिलांचं उर भरून आलं

IPL 2023 मध्ये जोरदार कामगिरी

रिंकू सिंग हा आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हिरो ठरला. तो केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा नववा खेळाडू ठरला. आयपीएल २०२३ मध्ये, रिंकू सिंगने १४ सामन्यात ५९.२५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या. त्याचवेळी गुजरात टायटन्सविरुद्ध रिंकू सिंगने सलग ५ चेंडूत ५ षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

Indian Railways Staff Averts Major Accident; रेल्वेचा मोठा अपघात टळला

0

चेन्नई: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला. हजारपेक्षा अधिक जण या अपघातात जखमी झाले. यानंतर आता तमिळनाडूमध्ये एक मोठा अपघात टळला आहे. रेल्वेच्या एका डब्याला भेग पडली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्यानंतर हा डबा वेगळा करण्यात आला. त्या डब्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आला. त्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली.कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस कोल्लमहून चेन्नईला जात होती. रविवारी संध्याकाळी ट्रेन सेंगोट्टाई रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचं लक्ष एका डब्याच्या खालील भागाकडे गेलं. त्या भागाला भेग पडली होती. कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेसच्या एस-३ डब्याच्या खालील भागाला भेद पडली होती. ही भेग चाकाजवळ होती.
पप्पा, मला विंडो सीट पाहिजे! लेक हट्टाला पेटली अन् जीव वाचला; बापलेकीसोबत चमत्कार घडला
ट्रेनच्या डब्याच्या खालील भागात असलेली भेग रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि एकच खळबळ माजली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वेगानं चक्रं फिरली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबद्दल कळवलं. त्यानंतर ट्रेन तिथेच थांबवण्यात आली.

कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेसला सेंगोट्टोई रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आलं. भेग पडलेल्या डब्यातील प्रवाशांची समजूत काढून त्यांना पुढेमागे असलेल्या डब्यांमध्ये शिफ्ट करण्यात आलं. जवळपास एक तासाचा अवधी यात गेला. त्यानंतर कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस पुढे रवाना करण्यात आली. याची माहिती मदुराई रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.
अरेरे! १२ तासांपासून वडील मृतदेहांमधून वाट काढताहेत, लेकाला शोधताहेत; हृदयद्रावक कहाणी
कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस मदुराईला पोहोचल्यावर एस-३ डबा वेगळा करण्यात आला. त्याच्या जागी नवा डबा जोडून त्यामध्ये प्रवाशांना बसवण्यात आलं. डब्याला पडलेली भेग बरीच मोठी होती आणि ती चाकाच्या अगदी वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकली असती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सजगपणामुळे एस-३ डबा तातडीनं रिकामा करण्यात आला. पुढच्याच स्थानकात त्या डब्याच्या जागी नवा जोडण्यात आला. त्यामुळे मोठा अपघात टळला.

बायकोला अन् लेकराला भेटायला जाताना अनर्थ, चंद्रपुरातील अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

0

नागपूर : नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या अल्टो कार आणि एका खासगी बसला भीषण धडक बसून काल मोठा अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच झाला मृत्यू तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. रोहन विजय राऊत (३०), ऋषिकेश विजय राऊत (२८), गीता विजय राऊत (४५), सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३६), यामिनी रूपेश फेंडर (९) अशी मृतांची नावे आहेत.

हे सर्व नागपुरातील चंदननगर येथील रहिवासी आहेत. नागपूर-नागभीड रस्त्यावरील कान्पा गावाजवळ काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघात इतका भीषण होता की, अक्षरश: गाडी कापून मृतांना बाहेर काढण्यात आले.

भरधाव कारची बसला धडक, एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत; एका चिमुकलीचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व नागपुरातील रहिवासी एमएच ४९ बीआर २२४२ क्रमांकाच्या कारने नागपूरहून ब्रम्हपुरीकडे जात होते. कार कान्पा गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या एआरबी नावाच्या खासगी बसला कारची जोरदार धडक बसली. या अपघातात कारचा चूराडा झाला. या अपघातात दोन पुरुष आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात एक मुलगी आणि एक महिला गंभीर जखमी झाली. त्यांना नागभीड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. यामध्ये महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले. मात्र, वाटेतच मुलीचाही मृत्यू झाला.

नागपूरचं हे कुटुंब रुपेश विजय राऊत यांच्या वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी नागपूर येथील रोशन तागडे यांच्या गाडीतून भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांसह ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही गावी जात होते. त्याचवेळी ही खासगी बस नागभीडहून नागपूरकडे येत होती. दरम्यान, कान्पा गावाजवळ नागभीडकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार बसला धडकली.

ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भागाचा चुराडा झाला आणि चार जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी खासगी बस चालक राजेंद्र लकडू वैरकर याला ताब्यात घेतलं आहे.
पांडुरंग, पांडुरंग! पायी चालताना रिक्षाची धडक, दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; नाशिक सुन्न

Kerala News, महिलेने मुलांकडून करून घेतली आपल्या अर्धनग्न शरीरावर पेंटिंग, बनवला व्हिडिओ आणि… – the kerala high court ruled that a woman painted her half naked body by her children is not obscene

0

थिरुवनंतपुरम : केरळमधील एका महिलेवर आपल्या मुलांकरवी आपल्या अर्धनग्न शरीरावर पेंटिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण शेवटी न्यायालयात गेले. यावेळी केरळ उच्च न्यायालयाने नग्नता आणि अश्लीलतेत फरक असल्याचे सांगत आपला निर्णय दिला. महिलेच्या नग्न शरीराकडे अश्लीलतेच्या नजरेने पाहणे उचित नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने सांगितले की, नेहमीच लोकांना त्यांच्या शरीराच्या स्वायत्ततेच्या हक्कांपासून वंचित केले जाते. हे चुकीचे आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने या महिलेवर करण्यात आलेल्या अश्लीलतेच्या आरोपाचे प्रकरण निकालात काढले.

लग्नाच्या दिवशीच पळून गेली नवरी, शाळेत जाऊन लपली, सकाळी कारण सांगितल्यावर लोक थक्क झाले
या प्रकरणी महिलेचे असे म्हणणे आहे की, तिने महिलांच्या शरीराच्या संबंधात पितृसत्ताक धारणेला आव्हान दिले आहे. तसेच आपल्या मुलांना सेक्स एज्युकेशन देण्यासाठी तिने व्हिडिओ बनवल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. हा व्हिडिओ अश्लील आहे असे म्हणता येत नाही असे उच्च न्यायालाने म्हटले आहे.

महिलेचा आपल्या शरीरावर हक्क आहे

या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, महिलांच्या शरीराच्या वरील भागाला नग्नता किंवा लैंगिक किंवा अश्लील म्हटले जाऊ शकत नाही. महिलेचे नग्न शरीर हे कोणत्याही दृष्टीने अश्लील नाही. या महिलेने आपल्या मुलाला केवळ आपल्या शरीरीवर एखाद्या कॅनव्हाससारखे पेंटिंग करण्याची परवानगी दिली होती. आपल्या शरीराबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेणे हा एक महिलेचा हक्क आहे, असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
पुरुषांच्या नग्न शरीरावर क्विचितच प्रश्न उपस्थित केले जातात, असे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी म्हटले आहे. महिलांवर सतत प्रश्न उपस्थित करणे पितृसत्ताक पद्धतीची निशाणी आहे. महिलांचा त्यांच्या बोल्ड चॉइसबाबत नेहमीच छळ केला जातो, असेही न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

न्यायालयाचा हा निर्णय समाजात पुरुष आणि महिलांसंदर्भात भेदभावाच्या मोजमापावर आधारित आहे. एखाद्या महिलेने आपले शरीर एखाद्या कॅनव्हासारखे पेंट करण्यासाठी आपल्या मुलाला दिले तर त्यात काही वावगे नाही. या महिलेने आपल्या मुलाला आपल्या शरीराच्या वरच्या भागातील शरीरावर पेंटिंग करण्याची अनुमती दिली होती. हे कृत्य कोणत्याही प्रकारे लैंगिक कृत्य किंवा अश्लील आहे असे म्हणता येत नाही. या मुलाचा उपयोग पोर्नोग्राफीसाठी करण्यात आला असेही म्हणता येत नाही आणि या व्हिडिओत अश्लीलता अजिबातच नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ

Latest posts