Sunday, June 4, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2543

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

30

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

35

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

27

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

23

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

25

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

24

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

28

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

261

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

video calling at night, हॅलो… तू अविवाहित आहेस का?, महिला पोलिसांना तो करतो अश्लील व्हिडिओ कॉल, पोलीस दलात खळबळ – crime news harassment of women police by video calling at night in bhagalpur

0

भागलपूर: हॅलो… तुझे नाव काय आहे? तुझं लग्न झाले आहे का? अविवाहित आहेस का? मी व्हिडिओ कॉल करत आहे. तो उचल आणि माझ्याशी बोल. तू कोणत्या पोलीस ठाण्यात तैनात आहेस? तू कॉल कट केलास तर ते तुला अशा ठिकाणी ड्युटीवर लावतील की तेथे तू वैतागून जाशील. होय, भागलपूरच्या डझनभर महिला पोलीस अशाच काही कॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. रात्री उशिरा हा फोन येतो. हा व्हिडिओ कॉल कट केला तर तो समोरून धमकी देतो. कॉलवर अश्लील हावभाव करतो. या सेक्स मॅनियॉकची कहाणी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली आहे. तो महिला पोलिसांच्या शरीरासंदर्भात अश्लील हावभाव करतो. महिला नाराज होतात आणि कॉल डिस्कनेक्ट करतात. नंतर तो धमकी देतो. हे करणारी व्यक्ती आपण सार्जंट मेजर असल्याचे सांगतो.

महिला पोलीस कर्मचारी त्रस्त

महिला पोलीस या व्यक्तीमुळे अतिशय चिंतेत आहेत. तू आता कुठे आहेस, असे तो कॉल करून विचारतो. त्यानंतर तो व्हिडीओ कॉल करणार आहे असे सांगतो आणि जर तो व्हिडिओ कॉल उचलला नाहीस तर तुझी अत्यंत धोकादायक ठिकाणी ड्युटी लावली जाईल, अशी धमकीही देतो. कॉलमध्ये आरोपी महिला पोलिसांना त्यांचे चेहरे दाखवण्यास सांगतो. त्यानंतर अश्लील संभाषण सुरू करतो. महिलांच्या अंगांबद्दल तो टिप्पण्या करतो. व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, तो पुन्हा पुन्हा कॉल करतच राहतो.

Ruturaj Gaikwad Wedding: क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने बांधली लगीनगाठ, शेअर केले उत्कर्षासोबतचे सुंदर फोटो
भागलपूरमध्ये खळबळ

हे संपूर्ण प्रकरण भागलपूरच्या इशकचक पोलिस ठाण्याच्या महिला पोलिसांशी संबंधित आहे. त्यानुसार महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील महिलाही अशा कॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशीही सुरू झाली आहे. ऑडिओ कॉल आधी येतो, असे महिला पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. कॉल उचलल्यानंतर ती व्यक्ती तुझी ड्युटी कुठे आहे, असे विचारते. आता कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहेस? तू कोणत्या पोलीस ठाण्यात आहेस? त्यानंतर तो व्हिडिओ कॉल करण्याविषयी सांगतो. जेव्हा महिला कॉन्स्टेबल त्यांला सांगतात की, त्यांचे लग्न झाले आहे. त्यानंतर तो शिवीगाळ करू लागतो. अश्लील हावभाव करतो आणि दुसऱ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावतो.

इंग्लंडमधील विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथच्या रेकॉर्डमध्ये जमीन-अस्मानाचा फरक, WTC फायनलमध्ये कोणाचे पारडे जड?
सेक्स मॅनिऑक आहे आरोपी

असा फोन एका महिला कॉन्स्टेबलला आल्याने ही बाब उघडकीस आली. त्याने स्वत:ची ओळख पोलीस ठाण्यातील सार्जंट मेजर अशी करून दिली. त्यानंतर महिलेने लगेचच आपण दोन मुलांची आई असल्याचे सांगितले. शिवीगाळ केल्यानंतर फोन कट केला. यानंतर महिला कॉन्स्टेबलने ही घटना आपल्या सहकाऱ्यांना सांगितली. हळूहळू सर्व महिला हवालदारांनी सांगितले की, त्यांनाही असे फोन येतात. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे.

भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार
पोलिसांनी तपास सुरू केला

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन पोलीस ठाण्याचे पोलीस तपासात गुंतले आहेत. तज्ज्ञ अशा लोकांना सेक्स मॅनिऑक म्हणतात. असे लोक केवळ अश्लील बोलून आपली मानसिक विकृती शांत करतात. त्यांना हा एक प्रकारचा आजार आहे. या आजारात त्यांना सतत कोणाचा तरी छळ करण्यात मजा येते. महिलांचा मोबाईल क्रमांक आरोपींपर्यंत कसा पोहोचला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. याबाबत महिलांकडेही चौकशी सुरू आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यातही अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

Biden: President Biden signs debt ceiling bill that pulls US back from brink of unprecedented default

0

WASHINGTON: With just two days to spare, President Joe Biden signed legislation on Saturday that lifts the nation’s debt ceiling, averting an unprecedented default on the federal government’s debt.
The White House announced the signing, done in private at the White House, in an emailed statement in which Biden thanked congressional leaders for their partnership.
The Treasury Department had warned that the country would start running short of cash to pay all of its bills on Monday, which would have sent shockwaves through the U.S. and global economies.
Republicans refused to raise the country’s borrowing limit unless Democrats agreed to cut spending, leading to a standoff that was not resolved until weeks of intense negotiations between the White House and House Speaker Kevin McCarthy, R-Calif.
The final agreement, passed by the House on Wednesday and the Senate on Thursday, suspends the debt limit until 2025 — after the next presidential election — and restricts government spending. It gives lawmakers budget targets for the next two years in hopes of assuring fiscal stability as the political season heats up.
Raising the nation’s debt limit, now at $31.4 trillion, will ensure that the government can borrow to pay debts already incurred.
“Passing this budget agreement was critical. The stakes could not have been higher,” Biden said from the Oval Office on Friday evening. “Nothing would have been more catastrophic,” he said, than defaulting on the country’s debt.
“No one got everything they wanted but the American people got what they needed,” Biden said, highlighting the “compromise and consensus” in the deal. “We averted an economic crisis and an economic collapse.”
Biden used the opportunity to itemize the achievements of his first term as he runs for re-election, including support for high-tech manufacturing, infrastructure investments and financial incentives for fighting climate change. He also highlighted ways he blunted Republican efforts to roll back his agenda and achieve deeper cuts.
“We’re cutting spending and bringing deficits down at the same time,” Biden said. “We’re protecting important priorities from Social Security to Medicare to Medicaid to veterans to our transformational investments in infrastructure and clean energy.”
Even as he pledged to continue working with Republicans, Biden also drew contrasts with the opposing party, particularly when it comes to raising taxes on the wealthy, something the Democratic president has sought.
It’s something he suggested may need to wait until a second term.
“I’m going to be coming back,” he said. “With your help, I’m going to win.”
Biden’s remarks were the most detailed comments from the Democratic president on the compromise he and his staff negotiated. He largely remained quiet publicly during the high-stakes talks, a decision that frustrated some members of his party but was intended to give space for both sides to reach a deal and for lawmakers to vote it to his desk.
Biden praised McCarthy and his negotiators for operating in good faith, and all congressional leaders for ensuring swift passage of the legislation. “They acted responsibly, and put the good of the country ahead of politics,” he said.
Overall, the 99-page bill restricts spending for the next two years and changes some policies, including imposing new work requirements for older Americans receiving food aid and greenlighting an Appalachian natural gas pipeline that many Democrats oppose. Some environmental rules were modified to help streamline approvals for infrastructure and energy projects — a move long sought by moderates in Congress.
The Congressional Budget Office estimates it could actually expand total eligibility for federal food assistance, with the elimination of work requirements for veterans, homeless people and young people leaving foster care.
The legislation also bolsters funds for defense and veterans, cuts back some new money for the Internal Revenue Service and rejects Biden’s call to roll back Trump-era tax breaks on corporations and the wealthy to help cover the nation’s deficits. But the White House said the IRS’ plans to step up enforcement of tax laws for high-income earners and corporations would continue.
The agreement imposes an automatic overall 1% cut to spending programs if Congress fails to approve its annual spending bills — a measure designed to pressure lawmakers of both parties to reach consensus before the end of the fiscal year in September.
In both chambers, more Democrats backed the legislation than Republicans, but both parties were critical to its passage. In the Senate, the tally was 63-36 — 46 Democrats and independents and 17 Republicans in favor, 31 Republicans along with four Democrats and one independent who caucuses with the Democrats opposed.
The vote in the House was 314-117.

Ruturaj Weds Utkarsha, Ruturaj Gaikwad Wedding: क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने बांधली लगीनगाठ, शेअर केले उत्कर्षासोबतचे सुंदर फोटो – cricketer rituraj gaikwad married utkarsha pawar wedding photos went viral on social media

0

मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला चॅम्पियन बनवणारा धडाकेबाज स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड आज शनिवारी विवाहबंधनात अडकला. चेन्नई सुपरकिंग्जसाठी या वर्षी शानदार कामगिरी करून दाखवणाऱ्या ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत लगीनगाठ बांधली. ऋतुराजने आपल्या विवाहाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा गोलंदाज, तसेच फलंदाज देखील आहे. तिने आपला शेवटचा सामना नोव्हेंबर ०२१ मध्ये सीनियर विमेंस वनडे ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध खेळला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा सोबत दिसले होते. आयपीएलची फायलन जिंकल्यानंतर उत्कर्षा पवारने महेंद्रसिंह धोनीचे चरणस्पर्श करत आशीर्वाद देखील घेतला होता. हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Ruturaj Gaikwad weds Utkarsha

ऋतुराजचा उत्कर्षाशी विवाह

ऋतुराजने इंस्टाग्रामवर शेअर केले लग्नाचे फोटोयाच आठवड्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला होता. ऋतुराजचे नाव टीम इंडियाच्या राखीव यादीत होते. ऋतुराज गायकवाडने स्वत: इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या लग्नाची आनंदवार्ता आपल्या चाहत्यांना दिली.

Ruturaj and Utkarsha

ऋतुराज आणि उत्कर्षा

महाराष्ट्रातर्फे क्रिकेट खेळली आहे उत्कर्षा

उत्कर्षा पवार ही महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. २४ वर्षीय उत्कर्षा मीडियम पेसर आहे. ती २०२१ मध्ये लिस्ट ए क्रिकेट खेळलेली आहे. त्यानंतर तिला संघात संधी मिळालेली नाही. पु्ण्याची रहिवासी असलेल्या उत्कर्षाने इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन अँड फिटनेस साइंसेसमध्ये शिक्षण घेतले आहे. सध्या ती ट्रेंडमध्ये आहे.

Seat swap saves lives of father & daughter in deadly Odisha train mishap | Bhubaneswar News

0

BHUBANESWAR: It was by a sheer stroke of luck that M K Deb and his eight-year-old daughter, Swati swapped their seats in the ill-fated Coromandel Express and defied death at the last moment on Friday evening.

The father-daughter duo boarded the train at Kharagpur and were supposed to get down at Cuttack as they had an appointment with a doctor on Saturday. Though they had the tickets to travel in a third AC coach, the child insisted on sitting near a window.
“We did not have a window seat ticket. We requested the TC, who suggested we get our seats swapped with other passengers, if possible. We went to another coach and requested two persons, who agreed. They came to our original coach while we sat in their seats in the coach, which was positioned three rakes away,” said Deb, a government employee in Kharagpur.

After some time, the horrifying tragedy occurred that left 288 dead. Fortunately, the coach in which the father-daughter duo was travelling was not damaged much while the other coach where their seats were reserved turned into mangled metal, leaving many dead.
“We are not aware of the conditions of the two passengers, who agreed to change their seats with us. We pray for their safety. At the same time, we are grateful to the almighty for this miracle. Almost all passengers in our coach were safe,” he said.
The man and his daughter, who sustained minor injuries, managed to reach Cuttack on Saturday morning with the help of locals. The child has an abscess on her left hand and wanted to consult the doctor.
“I fell short of words to express my feelings when I came to know about the father-daughter duo’s miraculous escape. She suffered minor injuries after falling down inside the coach following the collision,” said paediatrician Vikram Samal.

हृदयद्रावक! घरात लग्नाची तयारी सुरु, बहीण तयार होत होती, तेवढ्यात भावाच्या मृत्यू बातमी अन्…

0

जेहानाबाद: ज्या दारात काही तासात लेकीच्या लग्नाचं वऱ्हाड येणार होते, त्याच दारातून भावाची अंतयात्रा निघाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बिहारच्या जेहानाबाद येथे घडलं आहे. लेकीच्या लग्नाचा आनंद साजरा करत असलेल्या घरावर अचानक दु:खाचा डोंगर येऊन कोसळला. एकीकडे सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक लग्नाच्या तयारीत गुंतलेले असताना अचानक गोळी चालण्याचा आवाज आला आणि परिसरात एकच कोलाहल माजला. या गोळीबारात तिघे जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि हा होणाऱ्या वधूचा भाऊ होता.

हे संपूर्ण प्रकरण जेहानाबादच्या अमन गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे. शनिवारी (३ जून) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आणि या घटनेत दोन जणांवर गोळीबार करण्यात आला. त्यात सुबोध नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले होते.

Crime News: सावधान आत लहान मुलं आहेत! व्हॅनवर संशय, उघडताच असं काही सापडलं की पोलिसही हादरले
यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका तरुणाला गंभीर अवस्थेत पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले आहे. या घटनेबाबत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट मॅच खेळताना वाद झाला होता आणि या वादातून ही घटना घडली आहे.

हा वाद आजचा नसून काही दिवसांपूर्वीचा आहे. मात्र, आज सर्व लोक लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना ही घटना घडली. सुबोध कुमार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. लग्नाचं वऱ्हाड नवरदेवासोबत शनिवारी येणार होते. त्यामुळे घरात तयारी चालली होती. सगळे लग्नाच्या कामात व्यस्त होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण, क्षणात या आनंदावर विरजण पडलं.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. तर, लग्नघरावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या दिवशीच घरात तरुण पोराचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांची अवस्था वाईट आहे. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे. गुन्हेगारांना पकडल्यानंतरच या घटनेचं संपूर्ण सत्य कळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

Lionel Messi to leave PSG at end of season | Football News

0

Paris St Germain (PSG) announced on Saturday that Lionel Messi will be leaving the club at the end of the current season, bringing his two-year tenure in the French capital to a close.
The news of Messi’s departure from PSG comes ahead of their final Ligue 1 match against Clermont later on Saturday. In an official statement, PSG confirmed, “After two seasons in the French capital, Leo Messi‘s adventure with Paris St Germain will come to an end at the conclusion of the 2022-23 campaign.”

Rumours surrounding Messi’s future at PSG had been swirling recently, with reports suggesting that he had received a formal offer to join Saudi Arabian club Al-Hilal for the upcoming season.
Additionally, there has been speculation linking the Argentine superstar with a return to his boyhood club Barcelona and a potential move to Major League Soccer’s Inter Miami in the United States.

Expressing gratitude for Messi’s time at PSG, club president Nasser al-Khelaifi said, “I would like to thank Leo Messi for his two seasons in Paris. To see a seven-time Ballon d’Or winner in the Rouge & Bleu and at Parc des Princes, winning back-to-back Ligue 1 titles and inspiring our younger players has been a pleasure.”
Despite Messi’s impressive individual statistics of 21 goals and 20 assists in all competitions this season, his impact at PSG has been underwhelming. The club was unable to progress beyond the round of 16 in the UEFA Champions League during Messi’s two seasons with them.

As Messi prepares to bid farewell to PSG, the football world awaits his next destination and eagerly anticipates the next chapter in his illustrious career.
(With inputs from Reuters)

Crime News Today Liquor smuggling exposed from school van in Bihar; सावधान आत लहान मुलं आहेत! तपासताच असं काही सापडलं की पोलिसही हादरले

0

पाटणा: बिहारच्या किशनगंज येथे दारु तस्करीचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्हॅनमधून दारुची तस्करी केली जात होती. पोलिसांनी या व्हॅनमधून तब्बल ३७० लीटर दारु जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. जप्त केलेली दारू बंगालमधील डालकोला येथून सुपौल येथे नेली जात असल्याची माहिती आहे.

किशनगंज पोलिस ठाण्याच्या पथकाला दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरुन दारूविरोधी सेलचे पथक पोलिस फौजफाट्यासह ब्लॉक चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी पोहोचले. तेव्हा त्यांना ‘सावधान! मुलं आहेत’, असं लिहिलेलं एक वाहन दिसले, पोलिसांना संशय आला आणि ते वाहून थांबवून तपासलं.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO
यादरम्यान, तस्करांनी व्हॅनमध्ये तळघर केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यात दारू भरलेली होती, ती पोलिसांनी जप्त केली. तसेच एका तरुणालाही अटक केली. त्याने पोलिस तपासात सांगितले की या व्हॅनमध्ये दारू भरून मोजबारी पूल ओलांडण्यास सांगितले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी वारंवार जबाब बदलत होता. दारू तस्करीचा हा जुगाड पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

मुझफ्फरपूरमध्ये ३२५ लिटर दारू पकडली

मार्चच्या सुरुवातीला मुझफ्फरपूर पोलिस आणि बिहारमधील डीआययू पोलिसांनी संयुक्त छाप्यात ३२५ लिटर विदेशी दारू जप्त केली होती. ही दारू दोन आलिशान कारमधून नेली जात होती. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. यामध्ये हरियाणातील दोन मोठे दारू माफिया सामील होते.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

डीआययूला दोन आलिशान कारमधून हरियाणातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या गाड्या मुझफ्फरपूरमार्गे शिवहार आणि दरभंगा येथे जात होत्या. यानंतर डीआययू टीम आणि सदर पोलिस स्टेशनच्या टीमने जवानांसह नाकाबंदी केली. तेवढ्यात समोरून गाडी येत असल्याचे पाहून पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, तस्करांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून कारला थांबवलं. त्यात एक दारू तस्करही बसला होता, त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दरभंगा आणि शिवहर भागात छापा टाकून दुसरी कारही पकडली.

Odisha train accident: Mamata Banerjee and Ashwini Vaishnaw face-off over death toll | Bhubaneswar News

0

BHUBANESWAR: In a show of a public disagreement, West Bengal chief minister Mamata Banerjee and railway minister Ashwini Vaishnaw were engaged in a verbal duel at the triple train accident site at Bahanaga in Odisha’s Balasore on Saturday.
There was a clear difference of opinion among the two leaders on the number of casualties in the accident and also on the transportation services provided to stranded passengers.
Coromandel express accident live: PM Modi says those responsible won’t be spared
After visiting the accident site when Mamata Banerjee was addressing the media when she said, the death toll in the accident might exceed 500. The railway minister who was standing near her immediately opposed her and said the death toll is 233.
Banerjee nodding her head in denial said bodies are yet to be removed from three more bogies following which the toll is likely to cross 500.

Reiterating his claim Vaishnaw said, the rescue work has already been completed and the toll is 233.

Now is not the time to do politics: Railways minister Ashwini Vaishnaw on Odisha train tragedy

00:43

Now is not the time to do politics: Railways minister Ashwini Vaishnaw on Odisha train tragedy

As per latest official figures, the toll in the train tragedy has increased to 288, while more than 1,000 are injured.
Further the CM said, hundreds of passengers were stranded in different stations like Soro and Balasore. Interrupting her, Vaishnaw said, shuttlers have been operating between Soro and Balasore station carrying passengers and no passengers are stranded in the station.

1/7

Deadliest train accidents in history of Indian Railways

Show Captions

Pune Daund newly married couple donates two and half lakh to chief minister relief fund saving wedding expenses; नको राजेशाही थाट, लग्नाच्या अनावश्यक खर्चाला काट, दौंडच्या नवदाम्पत्याचा आदर्श निर्णय

0

दौंड : अलिकडच्या काळात अफाट खर्च करत शाही विवाह सोहळे पार पाडण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर लग्न मंडपात हेलिकॉप्टरमधून वधू वर आल्याचेही आपण ऐकले व पाहिले आहे. मात्र यापैकी कोणताही बडेजाव न करता लग्नातील अनावश्यक खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आश्रम शाळेला देत एका जोडप्याने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डाळिंब गावातील गायकवाड कुटुंबाने हा निर्णय घेतला.कुंडलिक गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव वाल्मिक गायकवाड यांची कन्या अंकिता हिच्या लग्न प्रसंगी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा एकीकडे मान सन्मान करतानाच, दुसरीकडे गायकवाड कुटुंबियांनी विवाह सोहळ्यातील थाटमाट टाळला. अनावश्यक खर्च टाळून तब्बल अडीच लाख रुपयांची मदत करुन आपणही समाजाचे काही देणे लागत असल्याचे दाखवून दिले आहे. कुंडलिक गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या विवाह सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख एकावन्न हजार रुपयांचा निधी दिला, तर नगर जिल्ह्यातील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा” या शाळेसाठी एक लाख एक हजार रुपयांचा निधी दिला आहे.

तू पास होणार नाही, मित्रांनी वर्षभर हिणवलं, पठ्ठ्याने सगळ्यांना तोंडावर पाडलं, उंटावरुन मिरवणूक काढली!
कुंडलिक गायकवाड यांची नात अंकिता हिचा विवाह वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील लक्ष्मण श्रीपती गावडे यांचे चिरंजीव अजित गावडे यांच्याबरोबर नुकताच हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे पार पडला. या विवाहप्रसंगी एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड व त्यांचे बंधू वाल्मिक गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवला. तर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेसाठी” एक लाख एक हजार रुपयांच्या निधीचा धनादेश दिला आहे.

नवरीची लग्नमंडपात खास एंट्री; भारतीय संविधानावर शपथ घेऊन वधू-वरानं बांधली लग्नगाठ

लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट असते. मोठे लग्न व्हावे तसेच मोठ्या लोकांनी आपल्या लग्नाला यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र गायकवाड व गावडे परिवाराने लग्नातील अनावश्यक खर्च टाळून, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करतानाच, शाळेसाठीही एक लाख रुपयांची मदत करुन दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्याला एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

दहावीला सर्वच विषयात ३५ मार्क, जुन्नरचा वैभव काठावर पास, गुण बघून तोंडातून फुटले दोनच शब्द

Gujarat News Love Marriage Father Requested Daughter To Come Back Touched Her Feet Video Viral; नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठूर पोरीने काही ऐकलं नाही

0

अहमदाबाद: एक वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभा आहे आणि तिच्याकडे घरी चलण्याची विनवणी करत आहे. जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो. पण, त्या निष्ठुर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही आणि ती आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी देऊन त्यांना सोडून प्रियकराकडे निघून जाते. लेकीसमोर हताश आणि असहाय झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

मुलगी घरी न परतल्याने वृद्ध आई-वडील चिंतेत होते. मुलीला शोधण्यासाठी वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. मात्र, मुलगी सापडल्यानंतर तिने आई-वडिलांना ओळखण्यासही नकार दिला.

पाहा व्हिडिओ-

मुलगी प्रियकरासोबत गेली होती

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ साबरकांठा जिल्ह्यातील देवधर तालुक्यातील रैया गावाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीला घरी परत आणण्यासाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, मुलीने वडिलांचे काहीही ऐकले आणि ती प्रियकरासह निघून गेली.

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला, तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
मुलगी घरी यावी म्हणून वडील तिच्या पाया पडतात. इतकंच नाही तर तिच्या प्रियकरासमोर हात जोडतात. मात्र, मुलगी वडिलांना ओळखण्यासही नकार देते. ही मुलगी काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रियकरासह स्वमर्जीने पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

मुलीला घरी आणण्यासाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. वडिलांनी सुरुवातीला पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पळून गेलेल्या जोडप्याला पालकांसमोर हजर केले. पोलिस ठाण्यात वडिलांनी मुलीसमोर हात-पाय जोडले. मात्र, मुलीने ओळखण्यासही नकार दिला. कोणाच्याही डोळ्यात पाणी आणेल असा हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघेही प्रौढ असल्याने पोलिसांनाही या प्रकरणात कुठली कारवाई करता आली नसल्याचे समोर आले आहे.

आय एम सॉरी मम्मा, १२ वर्षांची लेक रडत-रडत आली, सत्य कळताच आईच्या पायाखालची जमीन सरकली

Latest posts