Tuesday, March 28, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2183

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

178

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Nashville: US: Nashville school shooting leave multiple victims, suspect dead

0

A shooting at a private Christian school in Nashville, Tennessee, on Monday morning, left multiple victims before police “engaged” the gunman, leaving the suspect dead, local officials said.
The shooting happened at The Covenant School, where the Metropolitan Nashville Police Department said in a tweet that the suspect was dead but did not specify exactly what led to the death. It did not specify whether the suspect was male or female.
The Nashville Fire Department said on Twitter that it responded to the scene and there are “multiple patients.” It did not say if any victims were killed or how many may have been wounded.
“An active shooter event has taken place at Covenant School, Covenant Presbyterian Church, on Burton Hills Dr. The shooter was engaged by MNPD and is dead,” police said on Twitter.
The Covenant School, founded in 2001, is a ministry of Covenant Presbyterian Church in Nashville with about 200 students, according to the school’s website. The school serves preschool through 6th graders and held an active shooter training program in 2022, WTVF-TV reported.
Nashville police did not immediately return calls for more details. A shooting at a private Christian school in Nashville, Tennessee, on Monday morning, left multiple victims before police “engaged” the gunman, leaving the suspect dead, local officials said.
The shooting happened at The Covenant School, where the Metropolitan Nashville Police Department said in a tweet that the suspect was dead but did not specify exactly what led to the death. It did not specify whether the suspect was male or female.
The Nashville Fire Department said on Twitter that it responded to the scene and there are “multiple patients.” It did not say if any victims were killed or how many may have been wounded.
“An active shooter event has taken place at Covenant School, Covenant Presbyterian Church, on Burton Hills Dr. The shooter was engaged by MNPD and is dead,” police said on Twitter.
The Covenant School, founded in 2001, is a ministry of Covenant Presbyterian Church in Nashville with about 200 students, according to the school’s website. The school serves preschool through 6th graders and held an active shooter training program in 2022, WTVF-TV reported.
Nashville police did not immediately return calls for more details.

a youth dead in an accident, मंडणगड दुधेरे येथील दुचाकीचा भीषण अपघात, युवकाचा दुर्देवी मृत्यू, १२ वीचे क्लास सुरू होते – a bike rider lost his life in a horrific accident on dapoli mandangarh road

0

मंडणगड : जिल्ह्यात दापोली मंडणगड मार्गावर दुधेरे येथे झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात चिपळूण पिंपरी येथील पार्थ विजय इंदुलकर या युवकाचा दुर्दैवीरीत्या जागीच मृत्यू झाला असून खेड येथील सिध्दांत अरविंद माने हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे राज्यमार्गावरील पुलालगत रविवारी मध्यरात्री उशिरा किंवा पहाटेच्या काळोखात हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. रस्ता बाजूला खोल पडल्याने हा अगोदरचे कोणाच्या लक्षात आले नव्हते मात्र सकाळी हा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान
झालेल्या (मोटार सायकल एम.एथ. शुन्य 8 ए.एम. 3556 ) दुचाकीच्या या अपघातात चिपळूण येथील तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. दुचाकीवरून प्रवास करणारा दुसरा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अधिक उपचाराकरिता तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

या संदर्भात पोलीसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार दुधेरे पुलानजीक रविवारी मध्यरात्रीनंतर मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीस अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिकांना सकाळी गाडीचा चालक बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्यांनी ही माहीती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तात्काळ मंडणगड पोलीसांना कळवली व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अपघतात दुचाकीवरुन प्रवास करणारा पार्थ विजय इंदुलकर (वय १७ वर्षे, राहणार- पिंपळी, तालुका- चिपळूण) याचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला. मोटार सायकल चालक सिध्दांत अरविंद माने (वय १८ वर्षे, राहणार- भडगाव, तालुका- खेड) हा या अपघातात गंभीर जखमी अवस्थेत अत्यवस्थ असलेला आढळून आला. १०८ रुग्णवाहीकेच्या मदतीने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलवण्यात आले. अपघात कसा झाला या संदर्भात स्थानीक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या अपघाताची नोंद मंडणगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या सगळ्या अपघात प्रकरणाचा तपास मंडणगड तालुक्याच्या पोलीस निरीक्षक शैलजा सावंत करत आहेत

या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला पार्थ विजय इंदुलकर हा खेड येथील ज्ञानदीप कॉलेज मध्ये शिकत होता. इयत्ता ११ वी कॉमर्सची त्याने परीक्षा दिली होती. पार्थचे बारावीचे क्लास चालू होते. पार्थच्या मृत्यूमुळे पिंपळी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पार्थ याच्यावरती अत्यंत शोकाकुल वातावरणात पिंपरी येथे सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंडलाधिकाऱ्याला १० हजारांची लाच मागणं भोवलं,एसीबीकडून कारवाई,साताऱ्यात महसूल विभागात खळबळ – satara crime news acb file complaint against circle officer of saidapur karad for taking 10 thousand rs bribe

0

सातारा : खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती. या प्रकरणी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील आणि मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात शासकीय कार्यालयामध्ये किरकोळ कामासाठी लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने लाच घेणाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जात आहे. या दरम्यान या विभागाकडून सोमवारी सैदापूर (ता. कराड) येथील मंडलाधिकारी विनायक दिलीप पाटील व मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) या दोघांवर १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली.

तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्याकरता १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली.

आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने

१५ हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर अखेर तडजोडीअंती मंगेश उत्तम गायकवाड (रा. सुपने, ता. कराड) यांच्याकडून १० हजार रुपये लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सातारा पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक राजपुरे व जाधव यांनी कारवाई केली आहे. संबंधित संशयित आरोपी मंडलाधिकारी याचा शोध घेतला जात आहे.
काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान
दरम्यान, या कारवाईमुळं सातारा जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. एसीबीच्या कारवाईची साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु होती.

बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांची आठ तासांची मेहनत अखेर फळली

कापसात १० किलोंची लूट, शेतकऱ्याची तक्रार; आमदार मंगेश चव्हाणांकडून प्रकरण उघडकीस

Warning by Ajit Pawar, काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान – ajit pawar has given a warning to the local party leaders at the workers meeting in baramati

0

ूबारामती: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबंधित करताना त्यांनी बारामतीत येणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा तर साधलाच, मात्र स्वपक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. शहरातील एका सामान्य कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला.. यावेळी पवार म्हणाले की, काही पदाधिकारी पनवेल ला जातात असं कानावर आल आहे. काहीजण स्वतःचाच गट तयार करतात.. काहींना संचालक म्हणून घेणार आहे असं सांगतात… असे म्हणत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. असा इशाराच पवारांनी यावेळी दिला..बारामती बाजार समिती, दूध संघ व निरा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे मेळावा पार पडला यावेळी पवार बोलत होते.

आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने
नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दौरा झाला. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, वेगवेगळ्या लोकांना आता बारामतीचे प्रेम खूप उतू चाललंय, कोण कुळे येतायत तर कोण येतात.. हा त्यांचा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. तसेच विरोधक आल्यानंतर आपल्यामध्ये काही गडबड होणार नाही. असे म्हणत, ‘काही नाही दादा सहज जाऊन बसलो होतो;, हे चालणार नाही असे म्हणून संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव पदावरून काढले जाईल असा इशाराच त्यांनी दिला.
रहाटगावजवळील अपघातातील त्या मृताची अखेर ओळख पटली, होणार होता निकाह, कुटुंबीय म्हणाले…
‘राज्यात ठीकठिकाणी महाविकास आघाडीच्या जाहीर सभा होणार’

२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर दिली आहे. त्यानंतर अमरावती विभागात होणाऱ्या सभेची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्याकडे सोपवली आहे. नाशिक येथेही सभा होणार असून त्याची जबाबदारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले
पुण्यात होणाऱ्या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, तर मुंबई विभागात होणाऱ्या सभेची जबाबदारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सेवेची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे दिले आहे अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत दिली.

beed crime, सोने व्यापाऱ्याला बसमध्ये त्रास, रुग्णालयात नेण्यापूर्वीचं मृत्यू, कुटुंबीयांना वेगळाच संशय, तिघांवर गुन्हा – pune gold trader nitin udawant died family members register complaint against three persons

1

बीड : सोन्याच्या दागिन्यांची होलसेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाथर्डी येथील सोने व्यावसायिकांसह गेवराई येथील एकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नितीन अर्जुनराव उदावंत ३५, रा. वाघोली, जिल्हा पुणे येथे राहत होते. ते सोन्याचा होलसेल व्यापार करत होते.पाथर्डी शहरातील सोन्याचे दुकानदार ओम छगनराव टाक आणि प्रशांत छगनराव टाक यांना गेवराई येथील मध्यस्थ निलेश माळवे यांच्या मध्यस्थीने त्यांनी सुमारे दोन लाखांचे सोने उधार विकले होते. वर्षभरापासून टाक पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. याबाबत मयत उदावंत यांनी आपल्या नातेवाईकांना माहिती दिली होती, असं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
२५मार्च रोजी उदावंत पाथर्डी येथे उधारी घेण्यासाठी आले होते. सायंकाळी करंजी घाटात बस मध्ये त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत उदावंत यांचा भाऊ किरण अर्जुनराव उदावंत यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. तसेच मृत नितीन उदावंत यांना विषारी पदार्थ प्राशन करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने

किरण अर्जुनराव उदावंत यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात ओम टाक, प्रशांत टाक आणि मध्यस्थ निलेश माळवे या तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यरंजन वाघ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांची आठ तासांची मेहनत अखेर फळली

Causes Of Stomach Cancer | जठराच्या कॅन्सरची कारणं आणि निदान | Maharashtra Times

bhor murder news, अनोळखी मृतदेह सापडला, पोलिसांनी पुणे साताऱ्यातलं रेकॉर्ड काढलं, एक तक्रार मिळाली, चक्र फिरली, मित्रांनीच… – pune bhor police arrested 2 accused case in friend murder

0

पुणे : उसने घेतलेले पैसे बरेच दिवस होऊनही परत न दिल्याने दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे. उसण्या पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. अक्षय होळकर (वय ३०) आणि समीर शेख (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दत्तात्रय पिलाने असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. भोर पोलिसांनी सखोल तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोर पोलिसांना १७ मार्च रोजी भोर महाड रस्त्यावर एक अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, दतात्रय पिलाने याच्याकडून अक्षय होळकर याने पाच ते सहा लाख रुपये उसने घेतले होते. पैसे घेऊन अनेक दिवस झाल्याने दतात्रय अक्षयकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र सतत पैशाचा तगादा लावल्याने अक्षयच्या डोक्यात दत्तात्रय याला संपवण्याचा प्लॅन आला.

नागपुरात पोलिसांचा लॉजवर छापा, कॉलेजची पोरगी ताब्यात, समोर आली धक्कादायक माहिती
त्यानुसार १० मार्च रोजी अक्षय याने दत्तात्रय याला बोलवून घेतले. त्यानंतर त्याला गाडीत बसवून त्याच्यावर गाडीतच चाकूने, हातोडीने घाव घालून त्याचा खून केला. अक्षय याने त्याचा मित्र समीर याच्या मदतीने हा खून केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरचे कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मृतदेह वरांधा घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत फेकून दिला. त्यानंतर पोलिसात दत्तात्रय हरवला असल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलीस शोध घेत असताना त्याचा मृतदेह १७ मार्चला सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटत नव्हती.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
त्यानंतर पोलिसांनी पुणे आणि सातारा या ठिकाणी हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळवली. त्यानंतर सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये दत्तात्रय पिलाने मिसिंग असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या वडिलांकडे चौकशी केली. वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्याचा मित्र अक्षयला पोलिसांनी बोलवून घेतले. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी अक्षय आणि त्याच्या मित्रावर गुन्हेशाखेच्या मदतीने पाळत ठेवली.

अधिवेशन संपताच जयंत पाटील पक्ष बांधणीच्या कामाला, राष्ट्रवादीचा पुन्हा परिवर्तनाचा निर्धार
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. भोर पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

Netanyahu: Israeli’s Netanyahu delays judicial overhaul after mass protests

0

JERUSALEM: Israeli Prime Minister Benjamin Netanyahu on Monday announced a delay in his judicial overhaul plan, saying he wanted to give time to seek a compromise over the contentious package with his political opponents.
Netanyahu made the announcement after two days of large protests against the plan.
Tens of thousands of Israelis demonstrated outside parliament and workers launched a nationwide strike Monday in a dramatic escalation of the mass protest movement aimed at halting Prime Minister Benjamin Netanyahu’s plan to overhaul the judiciary.
But as Netanyahu remained silent, signs emerged that he would soon delay the divisive program. His national security minister, Itamar Ben-Gvir, announced late Monday that the plan was being put on hold for a month, giving time for the rival sides to seek a compromise.
The chaos shut down much of the country and threatened to paralyze the economy. Departing flights from the main international airport were grounded. Large mall chains and universities closed their doors, and Israel’s largest trade union called for its 800,000 members to stop work in health care, transit, banking and other fields.
Diplomats walked off the job at foreign missions, and local governments were expected to close preschools and cut other services. The main doctors union announced that its members would also strike.
The growing resistance to Netanyahu’s plan came hours after tens of thousands of people burst into the streets around the country in a spontaneous show of anger at the prime minister’s decision to fire his defense minister after he called for a pause to the overhaul. Chanting “the country is on fire,” they lit bonfires on Tel Aviv’s main highway, closing the thoroughfare and many others throughout the country for hours.
Demonstrators gathered again Monday outside the Knesset, or parliament, turning the streets surrounding the building and the Supreme Court into a roiling sea of blue-and-white Israeli flags dotted with rainbow Pride banners. Large demonstrations in Tel Aviv, Haifa and other cities drew thousands more.
“This is the last chance to stop this move into a dictatorship,” said Matityahu Sperber, 68, who joined a stream of people headed to the protest outside the Knesset. “I’m here for the fight to the end.”
It was unclear how Netanyahu would respond to the growing pressure. Some members of his Likud party said they would support the prime minister if he heeded calls to halt the overhaul. Israeli media, citing unnamed sources, reported that he could indeed pause it.
Ben-Gvir, who has been one of the strongest proponents of the plan, announced after meeting with the prime minister that he had agreed to a delay of at least a few weeks.
He said Netanyahu had agreed to bring the legislation for a vote when parliament reconvenes for its summer session on April 30 “if no agreements are reached during the recess.”
Netanyahu was scheduled to speak to the nation later Monday.
But even before he delivered his address, the grassroots anti-government protest movement said a delay was not enough.
“A temporary freeze does not suffice, and the national protests will continue to intensify until the law is rejected in the Knesset,” organizers said.
The plan — driven by Netanyahu, who is on trial for corruption, and his allies in Israel’s most right-wing government ever — has plunged Israel into one of its worst domestic crises. It has sparked sustained protests that have galvanized nearly all sectors of society, including its military, where reservists have increasingly said publicly that they will not serve a country veering toward autocracy.
Israel’s Palestinian citizens, however, have largely sat out the protests. Many say Israel’s democracy is tarnished by its military rule over their brethren in the West Bank and the discrimination they themselves face.
The turmoil has magnified longstanding and intractable differences over Israel’s character that have riven it since the country was founded. Protesters insist they are fighting for the soul of the nation, saying the overhaul will remove Israel’s system of checks and balances and directly challenge its democratic ideals.
The government has labeled them anarchists out to topple democratically elected leaders. Government officials say the plan will restore balance between the judicial and executive branches and rein in what they see as an interventionist court with liberal sympathies.
At the center of the crisis is Netanyahu himself, Israel’s longest-serving leader, and questions about the lengths he may be willing to go to maintain his grip on power, even as he battles charges of fraud, breach of trust and accepting bribes in three separate affairs. He denies wrongdoing.
On Monday afternoon, Netanyahu issued his first statement since he fired Defense Minister Yoav Gallant, urging against violence ahead of a planned counterprotest in Jerusalem organized by ultranationalist supporters of the judicial overhaul.
The counterprotest was also slated to take place outside parliament. “They won’t steal the election from us,” read a flyer for event, organized by Religious Zionist party.
“I call on all protesters in Jerusalem, right and left, to behave responsibly and not act violently,” Netanyahu wrote on Twitter.
The firing of Netanyahu’s defense minister at a time of heightened security threats in the West Bank and elsewhere, appeared to be a last straw for many, including apparently the Histadrut, the country’s largest trade union umbrella group, which sat out the monthslong protests before the defense minister’s firing.
“Where are we leading our beloved Israel? To the abyss,” Arnon Bar-David, the group’s head, said in a rousing speech to applause. “Today we are stopping everyone’s descent toward the abyss.”
On Monday, as the embers of the highway bonfires were cleared, Israel’s ceremonial president, Isaac Herzog, called again for an immediate halt to the overhaul.
“The entire nation is rapt with deep worry. Our security, economy, society — all are under threat,” he said. “Wake up now!”
Opposition leader Yair Lapid said the crisis was driving Israel to the brink.
“We’ve never been closer to falling apart. Our national security is at risk, our economy is crumbling, our foreign relations are at their lowest point ever. We don’t know what to say to our children about their future in this country,” Lapid said.
The developments were being watched by the Biden administration, which is closely allied with Israel yet has been uneasy with Netanyahu and the far-right elements of his government. National Security Council spokesperson Adrienne Watson said the United States was “deeply concerned” by the developments.
Netanyahu reportedly spent the night in consultations and was set to speak to the nation, but later delayed his speech.
The architect of the plan, Justice Minister Yariv Levin, a popular party member, had long promised he would resign if the overhaul was suspended. But on Monday, he said he would respect the prime minister’s decision should he halt the legislation.
Earlier, Netanyahu’s hard-line allies pressed him to continue.
“We must not halt the reform in the judicial system, and we must not give in to anarchy,” Ben-Gvir said.
Netanyahu’s dismissal of Gallant appeared to signal that the prime minister and his allies would barrel ahead. Gallant was the first senior member of the ruling Likud party to speak out against the plan, saying the deep divisions threatened to weaken the military.
And Netanyahu’s government forged ahead with a centerpiece of the overhaul — a law that would give the governing coalition the final say over all judicial appointments. A parliamentary committee approved the legislation on Monday for a final vote, which could come this week.
The government also seeks to pass laws that would grant the Knesset the authority to overturn Supreme Court decisions and limit judicial review of laws.
A separate law that would circumvent a Supreme Court ruling to allow a key coalition ally to serve as minister was delayed following a request from that party’s leader.

missing father of kedar jadhav has been found, बेपत्ता झालेले केदार जाधवचे वडील अखेर सापडले, पोलिसांची आठ तासांची मेहनत अखेर फळली – the missing father of kedar jadhav has finally been found, eight hours of police work has finally paid off

0

पुणे : क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (वय ८५) कोथरूड परिसरातून सोमवारी सकाळी बेपत्ता झाले होते. अलंकार पोलिसांनी त्यांचा दिवसभर शोध घेतल्यानंतर ते रात्री साडेआठ वाजता घोरपडी भागात ‌सापडले.

mahadev jadhav

जाधव कुटुंबीयांनी या संदर्भात अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. जाधव कुटुंबीय सिटी प्राइड कोथरूडजवळील ‘द पॅलेडियमन’ या सोसायटीत वास्तव्यास आहे. महादेव जाधव यांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. ते सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतले नाहीत. या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्यात आला. कोथरूड, एरंडवणे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले तसेच परिसरातील रिक्षाचालकांकडून माहिती घेण्यात येत होती. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात शोधमोहीम राबविली. अखेर रात्री साडेआठच्या सुमारास केदारचे वडील मुंढवा भागात सापडले, असे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सांगितले.

केदारचे वडील महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. त्यामुळे जाधव कुटुंबिय हे त्यांना आजारपणामुळे घराबाहेर पाठवत नाहीत. दरम्यान, आज दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले होते. महादेव जाधव सिटी प्राईड कोथरूड येथुन रिक्षात बसुन सकाळी घराबाहेर पडले होते, अशी माहिती आता समोर आली होती. ही माहिती पोलिसांना सांगण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज चेक केले होते. पण बराच काळ त्यांना महादेव जाधव यांचा पत्ता लागत नव्हता. महादेव जाधव हे रिक्षामधून गेले असल्याचे पोलिसांनी समजले होते. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकांची चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यानंतर वेगवेगळ्या भागांत शोधकार्य सुरु केले होते. पोलिसांच्या या शोधकार्याला अखेर जवळपास आठ तासांनी यश आले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

महादेव जाधव हे अखेर पोलिसांना मुंढवा भागात सापडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांबरोबरचा एक फोटोही त्यांचा व्हायरल झाला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Satej Patil, आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने – mahadik and patil have come face to face on the occasion of chhatrapati cooperative sugar factory election

0

कोल्हापूर : छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन गटातील वादात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आमदार पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत आपल्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरताना‘ आमचं ठरलंय, यंदा कंडका पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन प्रचारात उडी घेतली. तर त्याला महाडिक गटाने ‘सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय’ असे टॅगलाइन घोषित करत प्रत्युत्तर दिले आहे.लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, गोकुळ अशा निवडणुकीनंतर महाडिक व पाटील गट पुन्हा एकदा थेट आमने सामने येत आहेत. गेले वीस वर्षे राजाराम कारखाना महाडिक यांच्या ताब्यात आहे. गोकुळनंतर हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी पाटील गट निवडणुकीत उतरला आहे. पण काहीही करून हा कारखाना आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी महाडिक गट प्रचारात उतरल्याने प्रचाराचा अधिकृत नारळ फुटण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडाला आहे. महाडिक आणि पाटील या दोघांनीही एकमेकांचा समाचार घेतला आहे.

रहाटगावजवळील अपघातातील त्या मृताची अखेर ओळख पटली, होणार होता निकाह, कुटुंबीय म्हणाले…
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत आमदार पाटील गटाने अर्ज भरले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा ही आमची भूमिका आहे. बारा हजार सभासद हेच त्याचे खरे मालक आहेत. ही लढाई अनाधिकृत ६०० सभासद विरोधात १२ हजार अधिकृत सभासदांत आहे. ती महाडिक आणि पाटील अशी नाही.’ महाडिक कुटुंबीयांनी राजाराम कारखान्याची काय प्रगती केली? असा सवाल करून ते म्हणाले, ‘काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानेच महादेवराव महाडिक प्रचारासाठी बाहेर पडत नाहीत. कारखान्यात केलेल्या भ्रष्टाचाराला सभासद कंटाळले आहेत. या कारखान्यात महाडिक यांची हुकूमशाही चालते, ती थांबवून एकदा कंडका पाडायचा आहे.’

पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले
सतेज पाटील यांच्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘राजाराम कारखान्याचा कारभार हुकूमशाही पद्धतीने नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन सुरू आहे. तो १२२ गावातील सभासदांच्या मालकीचा आहे. हेच सभासद ‘सहकार टिकवायचा आहे’ असे म्ह्णत निवडणुकीत उतरले आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कारखान्याचे नेतृत्व करताना सभासदांना न्याय दिला. तब्बल २७ वर्षे नेतृत्व करताना त्यांनी हा कारखाना सभासदांचा ठेवला, त्याचे खाजगीकरण केले नाही. शेतकरी सभासदांना सन्मानाची वागणूक दिली.‌‌ याउलट पाटील यांच्या डॉ. डी.वाय. पाटील कारखान्यातच हुकुमशाही आहे. एका रात्रीत तेथील पाच हजार सभासद कमी का केले ? सभासदांना त्यांच्या हक्काची साखर मिळते का ?, या प्रश्नांची उत्तरे आमदार पाटील यांनी द्यावीत. कारखान्याच्या कारभाराविषयी कोठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत.’

पुणे हादरला! आधी मुलाचे अपहरण, नंतर हातपाय बांधून ट्रेनखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
महाडिक म्हणाले, राजाराम कारखाना हा १२२ गावातील सभासदांचा आहे. त्याचे सर्व सभासद आमच्या सोबत आहेत. आमच्या विरोधकांना कारखान्याचे सभासद नेमके किती हे सुद्धा माहित नाही. ते बारा हजार विरुद्ध सहाशे सभासद अशी लढाई असल्याचे सांगत आहेत असा टोलाही त्यांनी मारला.

पत्रकार परिषदेला माजी आमदार महादेवराव महाडिक, विद्यमान चेअरमन दिलीप पाटील, माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, मुडशिंगीचे तानाजी पाटील, भास्कर शेटे आदी उपस्थित होते.

Nashville: US: Nashville school shooting leave multiple victims, suspect dead

0

A shooting at a private Christian school in Nashville, Tennessee, on Monday morning, left multiple victims before police “engaged” the gunman, leaving the suspect dead, local officials said.
The shooting happened at The Covenant School, where the Metropolitan Nashville Police Department said in a tweet that the suspect was dead but did not specify exactly what led to the death. It did not specify whether the suspect was male or female.
The Nashville Fire Department said on Twitter that it responded to the scene and there are “multiple patients.” It did not say if any victims were killed or how many may have been wounded.
“An active shooter event has taken place at Covenant School, Covenant Presbyterian Church, on Burton Hills Dr. The shooter was engaged by MNPD and is dead,” police said on Twitter.
The Covenant School, founded in 2001, is a ministry of Covenant Presbyterian Church in Nashville with about 200 students, according to the school’s website. The school serves preschool through 6th graders and held an active shooter training program in 2022, WTVF-TV reported.
Nashville police did not immediately return calls for more details. A shooting at a private Christian school in Nashville, Tennessee, on Monday morning, left multiple victims before police “engaged” the gunman, leaving the suspect dead, local officials said.
The shooting happened at The Covenant School, where the Metropolitan Nashville Police Department said in a tweet that the suspect was dead but did not specify exactly what led to the death. It did not specify whether the suspect was male or female.
The Nashville Fire Department said on Twitter that it responded to the scene and there are “multiple patients.” It did not say if any victims were killed or how many may have been wounded.
“An active shooter event has taken place at Covenant School, Covenant Presbyterian Church, on Burton Hills Dr. The shooter was engaged by MNPD and is dead,” police said on Twitter.
The Covenant School, founded in 2001, is a ministry of Covenant Presbyterian Church in Nashville with about 200 students, according to the school’s website. The school serves preschool through 6th graders and held an active shooter training program in 2022, WTVF-TV reported.
Nashville police did not immediately return calls for more details.

Latest posts