Friday, March 31, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2217

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

182

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

pune businessman honey trap, नाईट ड्रेसमध्ये सेल्फी, हनीट्रॅपमध्ये अडकवत ब्लॅकमेल; पुण्यात व्यावसायिकाकडून १७ लाख उकळले – maharashtra crime news pune girl honey trap blackmail businessman by clicking selfie in night dress loot 17 lakh rs

0

पुणे : व्यवसायाबाबत बोलणी करायची असल्याचे सांगून २५ वर्षीय तरुणीने व्यावसायिकाला तिच्या फ्लॅटवर नेले. तिथे नाईट ड्रेस घालत त्याच्या सोबत फोटो काढले. मात्र नंतर संबंधित व्यावसायिकाला वकिलामार्फत बलात्काराची केस दाखल करण्याची धमकी देत कारागृहात न पाठवण्यासाठी साडेसतरा लाख रुपये उकळल्याच्या धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.विक्रम भाटे (वय ३५ वर्ष, रा. हडपसर) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. तर वाघोली येथील २५ वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मगरपट्टा सिटी येथील एका ४२ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिजन मॉल, आरोपी तरुणी हिच्या घरी आणि विक्रम भाटी याच्या कार्यालयात ३ ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचा फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे. ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा मित्र व त्याची मैत्रिण यांच्याबरोबर सिजन मॉल येथील प्लॉयहाय रेस्टारंटमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या टेबलवर एक अनोळखी तरुणी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने तक्रारदारांशी बोलणे करून ओळख निर्माण करून घेतली.

तिने आपले नाव निधी दीक्षित असे सांगितले. ती मुंबईहून पुण्यात आले असून व्यवसाय करण्यासाठी तुमची मदत लागेल, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिने व्हॉटसअ‍ॅप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरु केले. 7 नोव्हेंबर रोजी तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले.

तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने 4-5 क्लोज सेल्फी काढले. त्यानंतर ती पुन्हा बेडरुममध्ये जाऊन ड्रेस बदलून बाहेर आली व तक्रारदार यांना तू येथे कशाला आलास, येथे काय काम आहे तुझे, येथून चालता हो असे म्हणाली. त्यामुळे व्यवसायिक तिथून निघून गेले.

मुलांच्या ट्यूशन टिचरशी प्रेमसंबंध, पण लग्नाचं वचन मोडलं; पुण्यात तरुणीने जीवन संपवलं
त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी तरुणीच्या फोनवरुन तिचा वकील विक्रम भाटे याने फोन केला. तिने तुमच्यावर अशी तक्रार केली आहे की त्यामध्ये तुम्हाला बेल मिळणार नाही. हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला मदत करतो. तुमची केस मिटून टाकतो, असे सांगून त्यांच्याकडे 8 लाखांची मागणी केली.

त्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले. त्यानंतर विक्रम भाटी याने वेळोवेळी त्यांना धमकावून अगदी सर्वोच्च न्यायालयातही जामीन मिळणार नाही असे सांगून त्यांना लुबाडत राहिला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी विक्रम भाटे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत

odisha car accident news, लग्नात जेवण केले, कुटुंबासह निघाले पण वाटेत काळाने गाठले; वर पक्षातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू – odisha: 7 dead, 2 injured as car falls into canal in sambalpur district

0

ओडिशाः लग्न आटपून घराकडे निघाले होते मात्र वाटेतच अपघात झाला. कार कालव्यात कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. वरपक्षाकडील ही मंडळी असल्याचं सांगण्यात येते. वराचे वाहन अंगावर पडल्याने या सात जणांचा मृत्यू झाला आहे. अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ , सुमंत भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी कुटुंबीय लग्नाहून परतत असताना हा अपघात घडला आहे. गाडी चालवताना डुलकी लागल्यामुळं अपघात घडला असल्याची शक्यता आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे.

डास मारण्याची कॉइल लावून झोपले, पण सकाळी उठलेच नाहीत, ‘ती’ एक चूक सहा जणांच्या जीवावर बेतली
वराचे कुटुंब आणि आणि नातेवाईकांना घेऊन रात्रीचे जेवण आटपून एसयुव्हीमधून घरी परतत होते. त्याचवेळी परमनपुर गावाजवळ हा अपघात पडला व गाडी कालव्यात कोसळली. गाडी कालव्यात कोसळल्यामुळं सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांकडे मृतदेह सोपवण्यात आले आहेत.

जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक सत्य

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

thane pregnant woman gave birth to daed baby, प्रसुतीकळांनी विव्हळणाऱ्या गर्भवतीला दोन रुग्णालयात सुविधांअभावी नकार, वाटेतच मृत बाळाचा जन्म – pregnant woman gave birth to daed baby at ambulance in middle of road to third hosiptal after two hospital refused to treat her thane

0

ठाणे: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि सुविधांअभावी एका महिलेने रुग्णवाहिकेतच मृत बाळाला जन्म दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. रायगड येथील ही महिला असून तिची प्रसूती अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने तिला एका सरकारी रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येत होते. मात्र, तिथून तिसऱ्या रुग्णालयात जाताना वाटेतच या महिलेची प्रसूती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला जो आधीच मृत झालेला होता. ही महिला नेरळ येथील राहणारी असल्याची माहिती आहे. २१ मार्च रोजी या ३० वर्षीय महिलेने १२ तास नरकयातना भोगल्या.

याबाबत स्थानिक कार्यकर्त्याने सोमवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. हे कुटुंब नेरळच्या कडव गावात राहतं. २१ मार्चला रोजी सकाळी ८ च्या सुमारास कडव गावातील या महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी महिला घेऊन कर्जत येथील स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तिथे डॉक्टरांनी सांगितले की बाळाचे गर्भाशयात उत्सर्जन झाले आणि तिला सुमारे ४० किमी दूर उल्हासनगर येथील सरकारी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पाठवले. कारण, त्यांच्याकडे या महिलेचा उपचार करण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा नव्हती.

सूरतकडे निघाले, वाटेत कुटुंबीयांशी संवाद, मग प्रेमीयुगुल रस्त्यावर पडलेले आढळले, अन्…
जेव्हा ९ महिने पूर्ण होतात तेव्हा गर्भाशयात मेकोनियम किंवा मल उत्सर्जित होऊ शकतं. अशा १० % प्रकरणांमध्ये, पोटातील बाळ हे श्वास घेताना मेकोनिअमही घेते. अशा परिस्थितीत जर तात्काळ उपचार मिळाला नाही तर बाळाचा मृत्यू होऊ शकतो.

उल्हासनगर रुग्णालयानेही नाकारलं

त्यानंतर या महिलेला दुपारी १ वाजता मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु येथील कर्मचाऱ्यांनीही असहायतेचा दावा करत तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. तोपर्यंत, कुटुंबाने स्थानिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दल लिहून वैद्यकीय सुविधा सुधारण्याची मागणी करण्याची मागणी केली.

साहेबांचं जाणं चटका लावून गेलं; गिरीश बापट यांच्या निधनानं संदीप खर्डेकरांना अश्रू अनावर

सकाळपासून सायंकाळ झाली पण उपचार मिळाला नाही

सकाळपासून उपचारासाठी फिरत असलेल्या या महिलेल्या सायंकाळपर्यंत वेदना सहन करत राहाववं लागलं. सायंकाळी उशिरापर्यंत कुटुंबीय उल्हासनगरच्या रुग्णालयात थांबले होते. त्यानंतर अखेर पतीने एका खाजगी रुग्णवाहिका चालकाला पत्नीला ठाण्यात घेऊन जाण्याची विनंती केली. परंतु पतीकडे यासाठी पैसे नव्हते, असं गंगावणे यांनी टाइम्सला सांगितले. त्यानंतर गंगावणे यांनी त्यांच्या मित्राकडून पैसे मिळवले आणि तसेच, रुग्णालयात काम करणाऱ्या एका नातेवाईकाला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात बेड आरक्षित करण्यास सांगितलं.

वाटेत रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर

पण, संकटं येतात ती चारी बाजूने असं म्हणतात ते खरं ठरलं. वाटेत या रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाला. जोपर्यंत तो टायर बदलून चालक २५ किलोमीटरचा रस्ता पार करुन महिलेला रुग्णालयात पोहोचवणार त्यापूर्वीच महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. तिने एका मृत बाळाला जन्म दिला होता, असं तिच्या पतीने सांगितलं.
Video: रेल्वे पकडताना तोल जाऊन पडली, आईला पाहून लेकीची धावत्या गाडीतून उडी; थरारक प्रसंग
कर्जत येथील डॉ. मनोज बनसोडे यांनी टाइम्सला सांगितले की, महिलेला मेकोनियमसह रुग्णालयात आणण्यात आले होते आणि आमच्याकडे अशा प्रकारची प्रकरणे हाताळण्यासाठी सुविधा किंवा नवजात अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ऑन-ड्युटी डॉक्टरांनी तिला उल्हासनगरला रेफर केले, कारण तिथे अधिक सुविधा आहे. तरीही त्यांनी या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून तपशीलवार स्पष्टीकरण मागवले आहे.

तर कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात येण्यापूर्वीच महिलेने रुग्णवाहिकेतच मृत बाळाला जन्म दिला होता. आम्ही तिला तात्काळ अॅडमिट केले आणि नंतर तिची प्रकृती तपासल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. महिलेचे हृदयाचे ठोके असामान्य असल्याचं लक्षात आल्यानंतर उल्हासनगर रुग्णालयातून तिला इथे रेफर करण्यात आले होते.

मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर यांच्याकडून अद्याप याप्रकरणी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मुख्य सिव्हिल सर्जन डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले की, रुग्णाला कळवा रुग्णालयात का पाठवण्यात आले याची चौकशी आपण उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात करणार आहोत. कारण, या रुग्णालयात सर्व सुविधा आहेत आणि येथे उपचार घेत असलेल्या कोणत्याही रुग्णाला इतरत्र जावे लागत नाही.

tax saving investment, कर बचत करत आहात? मग घाई-घाईत ‘या’ चुका मुळीच करू नका, अन्यथा तुमच्या कष्टाची कमाई जाईल पाण्यात – mistakes to avoid while saving tax otherwise you’ll land in trouble

0

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आज ३१ मार्च २०२३ आहे आणि पुढील काही तासात नवे आर्थिक वर्षाची सुरुवात होईल. जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल आणि उरलेल्या काही तासात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. आज आम्ही तुम्हाला टॅक्स बचत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे सांगणार आहोत. शेवटच्या क्षणी गुंतवणूक करण्याच्या घाईत अनेक वेळा लोक अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. आज आपण अशाच काही चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या अनेकदा टॅक्स वाचवण्यासाठी केल्या जातात.

करदात्यांनो, आता थोडेच दिवस शिल्लक, जाणून घ्या कर बचतीच्या जबरदस्त गुंतवणूक टिप्स!
निधी विकण्याची घाई करू नका
जेव्हा-जेव्हा मोठ्या बातम्या येतात तेव्हा चित्र स्पष्ट होईपर्यंत संयम ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नकारात्मक बातमी ऐकून बरेच लोक घाबरतात आणि घाईघाईने आपली गुंतवणूक विकतात किंवा थांबवतात. उदाहरणार्थ, बाजारातील मोठी घसरण अनेक नवीन गुंतवणूकदारांना बाजारातून बाहेर काढण्यास भाग पाडते. निश्चितच, म्युच्युअल फंड उद्योगाने सरकारवर प्रभाव टाकून निर्णय बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ते मार्गदर्शक तत्त्वे बदलण्यासाठी सेबीचे मन वळवू शकतात जेणेकरून ते नवीन उत्पादने लाँच करू शकतील जे इंडेक्सेशनसह LTCG कर लाभ देऊ शकतील. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

चुकीची गुंतवणूक
शेवटच्या क्षणी कर बचतीसाठी गुंतवणूक करताना घाईघाईत तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता जास्त असते. सारे बर्‍याच वेळा आढळून आले आहे की बर्‍याच वेळा लोक त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांना अनुरूप नसलेली योजना किंवा उत्पादने निवडतात. परिणामी त्यांना नंतर पैसे भरण्यात अडचणी येतात. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल पूर्णपणे जाणून घेण्याचा सल्ला दिला जातो.

घर भाड्याने देणे आहे… फक्त करबचत करण्यासाठी भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी
विमा पॉलिसीद्वारे कर बचत
पूर्वीच्या काळात लोक कर बचत करण्यासाठी विमा आणि कर्ज गुंतवणूकला जुळून घ्यायचे, परंतु विम्याद्वारे गुंतवणूक करणे हा फार चांगला पर्याय नाही. PPF आणि इतर लहान बचत योजनांच्या तुलनेत तुम्हाला कमी परतावा मिळतो, त्यामुळे कर वाचवण्याच्या नावाखाली या दोन्हींची सरमिसळ करू नका.

ITR भरताना होईल ५० हजाराची बचत; कोणतीही गुंतवणूक किंवा विम्याची गरज नाही; जाणून घ्या कसे…
कर्ज घेऊन गुंतवणूक करू नका
तुम्हाला फक्त कर बचत करायची आहे म्हणून कर्ज घेऊन गुंतवणूक करू नका. कर बचत आणि तरलता गरजा यांच्यात समतोल ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, कर-बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरणे किंवा वैयक्तिक कर्ज घेणे टाळा. मात्र, कर्ज घेण्याच्या बाबतीत ते अल्प कालावधीसाठी घेतले जात असेल तरच ते निवडा.

jalgaon jamner school bus accident, स्कूल बसचा पाटा तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, झाडाला धडकताच बस उलटली; भीषण अपघातात ३० विद्यार्थी जखमी – terrible accident of jalgaon jamner school bus 30 students injured

0

जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा पाटा तुटला आणि चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्यामोठ्या झाडावर आदळली आणि त्यानंतर उलटली. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये एकूण असलेल्या ४० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेची एम. एच. १९ वाय ५७७८ या क्रमाकांची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन विद्यालयाकडे येत होती. पहूर ते शेंदुर्णीदरम्यान घोडेश्‍वर बाबाजवळ या बसच्या खालील बाजूस असलेला पाटा तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात पडली. तेथे असलेल्या झाडाला बसची जोरदार धडक बसली. झाडाचे अक्षरश: तुटून दोन तुकडे झाले आणि धडक दिल्यानंतर बस उलटली.

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव? संयोगिताराजे छत्रपती संतापल्या
अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या अपघातामुळे वाहनातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नेमके काय होतंय? हे कळलं नाही. बस आदळल्यानंतर बसमधील विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. बसमधून सर्व जण कसे तरी बाहेर रस्त्यावर आले. काहींनी याची माहिती तातडीने पालकांना दिली. पहूर येथून अनेकजण मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी आले. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये सुमारे ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे ३० विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले आहेत. खासगी वाहनांनी काही जखमींना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर..मोठी दुर्घटना टळली

स्कूल बसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे दैव बलवत्तर असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बसचा पाटा तुटेपर्यंत या वाहनाची आरटीओ विभागाकडून तपासणी केली गेली नव्हती. तपासणी केली असेल तर वाहन रस्त्यावर आले कसे? वाहनाचा पाटा अचानक कसा तुटला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महत्त्वाची बातमी! सरकारचा सर्व अधिकाऱ्यांना आदेश, शेअर बाजारात पैसे गुंतवले आहेत तर…

two youth drowned in lake, तलावाजवळ बोट दिसली, २ मित्र वल्हवत निघाले; पण काही वेळातच अघटित; छोट्या गोव्यात दोघांचा अंत – two youth died after boat capsized in nagpur parshivni

0

नागपूरमधील छोट्या गोव्यात दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. दोघे नागपूरच्या महेश कॉलनीचे रहिवासी होते. दोघे फिरायला आले होते. बोट चालवत असताना ते बुडाले. त्यांचे मृतदेह हाती लागले आहे.

 

nagpur news
नागपूर: तलावात बोट चालवताना नाव बुडून २ तरुणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका खासगी तलावात ही घटना घडली. दोन्ही मृत तरुण नागपूरचे रहिवासी आहेत. भवानी जांगीड आणि पंकज जांगीड अशी दोघांची नावं आहेत.नागपूरच्या महेश कॉलनीत राहणारे भवानी आणि पंकज मोटारसायकलवरून पारशिवनी येथील छोटा गोवा समजण्यात येणाऱ्या तलावावर दुचाकीनं (क्रमांक एम.एच.31 बीएन 5097) फिरायला गेले होते. तलावाजवळ कोणीही नाही आणि किनाऱ्यावर ठेवलेली बोट पाहून दोन्ही तरुण बोटीत चढले. त्यांनी बोट सुरू केली. बोटीला असलेल्या छिद्रातून थोड्याच वेळात पाणी आत येण्यास सुरुवात झाली. यानंतर काहीही समजायच्या आत बोट बुडून दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान घडली.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
संध्याकाळच्या सुमारास काही मच्छिमार तलावाजवळ आले असता त्यांना तलावाच्या काठावर दुचाकी, कपडे, मोबाईल आढळून आले. मात्र तलाव परिसरात कोणीही दिसून न आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवत दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पारशिवनी येथील आरोग्य केंद्रात पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

पारशिवनी येथील बरेजा पंच समितीच्या कुंडात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये भवानी जांगीर (वय २४) आणि पंकज जांगीर (वय २३) यांचा समावेश आहे. दोघेही नागपूर येथील महेश कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. दोन्ही तरुण उच्चशिक्षित होते. त्यांच्या अकाली निधनानं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

thane ulhasnagar nephew kills uncle, प्रॉपर्टीच्या वादातून दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण; एकाचा मृत्यू – thane ulhasnagar property dispute nephew killed uncle

0

ठाणे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं प्रॉपर्टीच्या वादातून पुतण्याने दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात एका काकाचा मृत्यू झाला असून दुसरे काका गंभीर जखमी झाले आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन चौकात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या परिसरात राहणाऱ्या एका पुतण्याने त्याच्या दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केला. प्रॉपर्टीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात मनवीर मरोठीया यांचा मृत्यू झाला. तर रामपाल मरोठीया हे गंभीर जखमी झाले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय, छ. संभाजीनगरची दंगल ही सरकार पुरस्कृत, संजय राऊतांची घणाघाती टीका
पुतण्याने दोघांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने वार केले. यातील जखमी रामपाल यांच्यावर सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पुतण्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

MLA Fund Allocation:: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका; आमदार निधीच्या वाटपाला हायकोर्टाकडून स्थगिती

Travelling on expressways to get costlier from tomorrow: NHAI hikes toll fees by 7 percent

0

Travelling on national highways and expressways is set to get costlier from April 1, 2023, as the National Highway Authority of India (NHAI) implements its toll fee hike of up to 7 percent across the country. The toll revision is an annual affair as per the National Highways Fee (Determination of Rates and Collection) Rules, 2008. In 2022, toll tariffs saw a hike of up to 15 percent for all types of vehicles plying on national highways. The average toll tax being collected across the country’s expressways is Rs 2.19 per kilometre currently.

1

Expressway routes that see a high-number of four-wheeler traffic such as the Delhi-Meerut Expressway, will see a hike of Rs 5 in toll fees. Other major routes such as the Eastern Peripheral Expressway and Kundli-Manesar-Palwal Expressway will get costlier by 5 to 7 percent. Minimum toll tariffs on major routes will range between Rs 35 to Rs 105. Toll prices for heavy vehicles will see a hike of as much as Rs 40 from current rates.

New Hyundai Verna: Taking the fight to Virtus, Slavia and City | TOI Auto

Recent data reveals that in FY 2022, toll worth Rs 33,881 crore was collected on national highways, a 21 percent jump from FY 2021. Moreover, toll prices across the country have risen by 32 percent, since 2018-19. One of the indirect effects of such toll hikes is the increase in cost for essential items that are distributed across the country through freight. The increase in already inflated essential commodity prices impacts the lives of ordinary citizens.
What are your thoughts on annual toll tariff hikes? Tell us in the comments.

six people died after mosquito coil, डास मारण्याची कॉइल लावून झोपले, पण सकाळी उठलेच नाहीत, ‘ती’ एक चूक सहा जणांच्या जीवावर बेतली – mosquito coil turns deadly for family; 6 people dies, 2 critical

0

दिल्लीः डास मारण्यासाठी कॉइल लावली मात्र त्यामुळं एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील लोक डास मारण्यासाठी येणारी कॉइल लावून झोपले होते. त्याचवेळी कॉइलमुळं उशीला आग लागली. आग भडकल्यामुळं दोघं गंभीररित्या भाजले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर, चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळीच एका घरातील काही लोक घरात बेशुद्ध पडले असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर आम्ही लगेचच घटनास्थळी पोहोचलो. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी आठपैकी सहा जणांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

जन्मदात्या बापामुळं लेकीने संपवले आयुष्य, मृत्यूपुर्वी पोलिसांना सांगितले धक्कादायक सत्य
मच्छरांची कॉइल लावून झोपणं आरोग्यासाठी घातक

डास मारण्यासाठी असलेल्या कॉइलमध्ये डीडीटी, अन्य कार्बन फॉस्फोरस आणि घातक रासायनिक घटक असतात. त्यामुळं बंद खोलीत डास मारण्याची अगरबत्ती वा कॉइल लावून झोपण्यामुळं आतील गॅस बाहेर पडण्यासाठी जागाच नसते. कॉइल जळत राहिल्यामुळं संपूर्ण खोलीत कार्बन मोनोक्साइड पसरतो आणि त्यामुळं ऑक्सिजनची मात्रा कमी होते. हळूहळू कार्बन मोनोक्साइड व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळं त्याला श्वास होण्यास त्रास होतो आणि गुदमरुन जीव जाण्याची शक्यता वाढते. एका संशोधनानुसार, एक कॉइल १०० सिगारेटच्याबरोबरीची आहे. यातून कमीत कमी २.५ पीएम धूर निघतो. त्यामुळं हा धूर शरीरासाठी घातक आहे.

महिलेचा पाठलाग करायचा, एकदिवस तिनेच घरी बोलवलं, बेडवर बसवून डोळ्यावर पट्टी बांधली अन्…

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

sanyogita raje chhatrapati, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव? संयोगिताराजे छत्रपती संतापल्या – sambhaji raje wife sanyogita raje chhatrapati slams priest nashik kalaram mandir temple ved mantra controversy

0

नाशिक: देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली.शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणोक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाजांच्या वंशज संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले.

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींचे शनिचौथऱ्यावर पूजन, संभाजीराजेंच्या अर्धांगिनीचे धाडस

हा सगळा प्रकार संयोगिता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणाली, असे संयोगिताराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

माझ्या जीवनाशी एकरुप झालात, प्रत्येक चढउतारामध्ये खंबीरपणे साथ दिलीत; संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट

शाहू महाराज वेदोक्त प्रकरण काय?

धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधीनुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता. यास नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळले. त्यावर शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्ये यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकत जमिनी सरकार जमा करण्यात आल्या. हा वाद वाढत जाऊन थेट ब्रिटिश सरकारकडे गेला. मात्र ब्रिटिश सरकारने राजोपाध्ये यांना सुनावले. मात्र त्यानंतरही वाद चिघळत राहिला. शेवटी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला. यात ते म्हणतात की, छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले आहे.

Latest posts