Tuesday, May 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2531

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

26

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

29

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

21

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

21

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

20

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

24

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

NCP Sharad Pawar Planning For MP Sujay Vikhe Defeat In Ahmednagar Lok sabha Constituency; नगरमध्ये विखेंना अस्मान दाखवण्यासाठी पवारांचं प्लॅनिंग; मुंबईत उमेदवारीसाठी लंकेंसोबत या नावांचीही चर्चा

0

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक आज मुंबईत झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वरिष्ठ नेते आणि मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पारनेरचे आमदार निलेश लंके हे उमेदवार असतील, असे मानले जात आहे. मात्र, आजच्या बैठकीत त्यांच्यासह अन्य नावांवरही चर्चा झाली. तयारीला वेळ मिळावा, यासाठी उमेदवार लवकर ठरवा, अशी मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली.या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांवरही चर्चा झाली. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. गेल्यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात लढत झाली. काँग्रेसमधून भापजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. विखे पाटील या निवडणुकीत विजयी झाले. विखे पाटील यांच्याकडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी, त्याला स्वत: पवार यांनी दिलेला नकार आणि नंतर विखे यांनी केलेले पक्षांतर यामुळे निवडणूक गाजली.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात त्यावेळी स्वत: पवार यांनी लक्ष घालून प्रचार केला होता. त्यामुळे या निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचा, अशी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापनादिनाचा मेळावाही ९ जूनला नगरला ठेवण्यात आला आहे.

भाकरी फिरवली, नाशिकमध्ये शह देण्यासाठी पवारांकडून नवा पर्याय, भुजबळांचा पत्ता कट?

स्वाभिमानाशी तडजोड करुन जगणार नाही, कुस्तीपटू ऑलिम्पिकमधली पदकं गंगेत विसर्जित करणार

शरद पवार यांचे कट्टर समर्थक आमदार लंके यावेळी लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत अनेक दिवसांपासून मिळत आहेत. तथापि आजच्या बैठकीत लंके यांच्यासोबतच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच श्रीगोंद्याचे गेल्या विधानसभेला थोडक्यातत पराभव झालेले घनःश्याम शेलार यांच्या नावांचीही चर्चा झाली. जो कोणी उमेदवार द्यायचा असेल तो लवकर द्यावा, म्हणजे तयारी सुरू करता येईल, अशी मागणीही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, या बैठकीला नगरमधून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. चौंडी येथील कार्यक्रमाच्या तयारीमुळे आमदार रोहित पवार आणि कुटुंबातील लग्न समारंभामुळे आमदार निलेश लंके या बैठकीला उपस्थित नव्हते.

US Debt Default Update Mukesh Ambani and Gautam Adani More Richer Than US Treasury; मुकेश अंबानींकडे अमेरिकेपेक्षा दुप्पट पैसा, अदानींकडेही जास्त संपत्ती, आकडे पाहून चक्रावून जाल!

0

मुंबई : भारताचे दिग्गज अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षा महासत्ता अमेरिकेकडे रोख रक्कम कमी असेल, असे कोणाला वाटले असेल. रोखीच्या संकटाचा सामना करणार्‍या अमेरिकेची सध्या वाईट स्थिती आहे. अमेरिकेसमोर पहिल्यांदाच डिफॉल्टर होण्याचा धोका घिरट्या घालत आहे. कर्जाची मर्यादा ५ जूनपर्यंत वाढवली नाही तर जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका दिवाळखोर होईल. अमेरिकेच्या खजिन्यातील रोख पातळी धोकादायकपणे घसरत आहे. कर्ज मर्यादा वाढवण्यास वेळ लागत असल्याने हे होत आहे.

अमेरिकेच्या खजिन्यात २५ मे पर्यंत फक्त ३८.८ अब्ज डाॅलर रोकड शिल्लक होती. या महिन्याच्या सुरुवातीला हा आकडा २०० अब्ज डाॅलर होता, तर आता ही रक्कम ३० अब्ज डाॅलरच्या नीचांकी पातळीच्या जवळ आहे. ट्रेझरीद्वारे कर्ज घेण्याची मर्यादा वाढविण्यावर आतापर्यंत कोणतेही एकमत झालेले नाही.

US Debt Default: अमेरिकेचे काउंटडाउन सुरू! कधी आहे ‘X-डेट’?, USAकडे फक्त इतक्या दिवसांची मुदत
अमेरिकेपेक्षाही जास्त पैसा
भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची संपत्तीही अमेरिकेच्या रोख रकमेपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही तर ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार जगातील ३१ अब्जाधीशांकडे अमेरिकेच्या कॅश रिझर्व्हपेक्षा जास्त संपत्ती आहे.

US Debt: जागतिक महासत्ताही भारताचा कर्जदार, अमेरिकेच्या डिफॉल्टचा भारतावर परिणाम; किती थकबाकी? जाणून घ्या
अंबानींकडे दुप्पट पैसे
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६.१ अब्ज डॉलर असून ही मालमत्ता अमेरिकेच्या ३८.८ अब्ज डॉलरच्या रोख साठ्यापेक्षा दुप्पट आहे. त्याच वेळी गौतम अदानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत १८व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती ६२.९ अब्ज डाॅलर आहे, जी अमेरिकेच्या रोख साठ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

महासत्ता कर्जाच्या खाईत; अमेरिकेने कर्ज न चुकवल्यास जागतिक अर्थव्यवस्था… IMFचा गंभीर इशारा
बर्नार्ड अर्नॉल्टकडे ५ पट पैसा
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती १९३ अब्ज डाॅलर आहे. हे अमेरिकेच्या रोख साठ्यापेक्षा सुमारे पाच पट अधिक आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अर्नॉल्टनंतर एलन मस्क, जेफ बेझोस, बिल गेट्स इत्यादी अनेक अब्जाधीश आहेत. या सर्व अब्जाधीशांकडे अमेरिकेच्या रोख रकमेपेक्षा जास्त संपत्ती आहे.

Beed man marriage proposal letter to Gautami Patil; गौतमी पाटील, तुझ्या इच्छा-अटी मान्य, होतेस का माझी परी? बीडच्या तरुणाचं पत्र, थेट लग्नाची मागणी

0

बीड: सध्या समाजातील कानाकोपऱ्यात जितका राजकीय विषय चर्चिला जातोय, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, आपल्या अदांनी भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा सुरु आहे. या चर्चेत भर पडण्याचं कारण म्हणजे बीडच्या तरुणाने तिला लिहिलेलं पत्र. २६ वर्षीय रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला पत्र लिहित थेट लग्नाची मागणी घातली आहे. “गौतमी, तुझ्या इच्छा-अटी सर्व मान्य, बोल तू होती का माझी परी?” असं म्हणत आपल्या घराचा पत्ता तरुणाने दिला. इतकंच नाही, तर लग्नाला तयार असशील तर येऊन भेट, असं देखील त्याने म्हटलं आहे.

बीडच्या केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांनी गौतमी पाटीलला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, की ‘गौतमी पाटील, तू भारी, तुझ्या घरी, पण तू होती का माझी परी? मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीत तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना तू म्हणाली होतीस की, “आता मी २५ वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा, अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.”

भरधाव कारने इंजिनिअरला उडवलं, चालक जागीच गाडी सोडून पळला, आई-बाबांचा एकुलता एक आधार गेला
तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन गलांडे पाटील, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तू जशी आहेस, तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्यासोबत कुणी लग्नाला तयार नसले, तरी मी माणूसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय २६ वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. त्यामुळे शेती बागायती आहे, दुग्ध व्यवसाय आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर तू मला भेटायला ये. पत्ता मु. पो. चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड, या पत्त्यावर तू मला भेटायला ये, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे” असे रोहन गलांडे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान वराच्या शोधत असणारी गौतमी पाटील बीडच्या रोहन गलांडे पाटीलच्या पत्राची दखल घेणार का? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

लिफ्ट मागणं जीवावर बेतलं, २३ वर्षीय तरुणाचा नग्न मृतदेह सापडला, मेघदूत बारमुळे छडा लागला

IPL ची ट्रॉफी हातून गेली, मोहितच्या अश्रूंचा बांध फुटला, हार्दिक धावला अन् दाखवलं कॅप्टन कसा असावा

0

अहमदाबाद : २०२३ च्या आयपीएलच्या पर्वाचं विजेतेपद महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडे गेलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळं लांबलेल्या सामन्यात अखेर चेन्नईनं बाजी मारली. गुजरातच्या हाता तोंडाशी आलेला विजेतेपदाचा घास रवींद्र जाडेजाच्या दमदार खेळीमुळं हिरावला गेला. रवींद्र जडेजानं अखेरच्या दोन बॉलमध्ये षटकार आणि चौकार खेचत विजय मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चार बॉलमध्ये केवळ तीन धावा देत मोहित शर्मानं गुजरातला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं होतं. मात्र, अखेरच्या दोन बॉलवर सगळं चित्र पालटलं अन् चेन्नईनं सामना जिंकला. संघाचा पराभव झाला तरी नेतृत्व करण्याऱ्यानं कसं असावं याचं उदाहरण हार्दिक पांड्यानं दाखवून दिलं.

हार्दिक पांड्याची मोहित शर्माला मिठी

अखेरच्या दोन बॉलमध्ये मॅच हातून निसटल्यानंतर निराश झालेल्या मोहित शर्माला मिठी मारत हार्दिक पांड्यानं कॅप्टन कसा असतो हे दाखवून दिलं. मोहितनं पहिल्या चार बॉलमध्ये केवळ तीन धावा देत संघाला विजयापर्यंत नेलं होतं. आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या मोहित शर्मावर हार्दिक पांड्यानं विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला मोहित शर्मानं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सार्थ ठरवलं होतं. मोहित शर्मानं पाच धावा देत पाच विकेट काढल्या होत्या.
Sai Sudarshan : अभ्यास केला शुभमन गिलचा, पेपर आला साई सुदर्शनचा, गुजरातच्या नव्या हिरोनं सीएसकेला घाम फोडला
मोहितच्या त्या कामगिरीच्या जोरावर गुजरातनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मोहित शर्मानं चेन्नई विरुद्ध देखील तीन विकेट घेतल्या पण त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही , त्यामुळं निराश झालेल्या मोहितला हार्दिकनं मिठी मारत त्याचं धैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
ऋतुराज गायकवाडने शेअर केला होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो; फोटोपेक्षा अभिनेत्री सायली संजीवची प्रतिक्रिया चर्चेत

मॅचसह ट्रॉफी गेली आणि मोहितला रडू कोसळलं…

चेन्नईनं विजय मिळवल्यानंतर गुजरातच्या टीममध्ये शांतता पसरली होती. मोहित शर्मा मॅच गमावल्यानंतर रडू लागला. यानंतर हार्दिक पांड्यानं त्याला मिठी मारत शांत केलं. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.मोहित शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केलं होतं. त्यानं या हंगामात १४ सामन्यामध्ये २७ विकेट घेतल्या.

थरारक विजयानंतर निर्विकार राहिलेल्या धोनीचा बांध फुटला; त्या एका मिठीने डोळ्यात आले पाणी…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Wreslers Throw Their Medal In Ganga River;कुस्तीपटू पदकं गंगेत विसर्जित करणार

0

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवावे, यासाठी आंदोलन गेल्या महिनाभरापासून राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन छेडलं आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी सरकारविरोधात संघर्ष छेडलेला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची निगरगट्ट शासन नोंद घेत नसल्याने तथा बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने संतापून भारताचे कुस्तीपटू ऑलिम्पिकमधली जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत.

राजधानी नवी दिल्लीत नवीन संसद भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा सुरू असताना, तिथून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेऊन ताब्यात घेतले. ‘भारतीय कुस्ती महासंघा’चे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप या खेळाडूंनी केला असून, सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ते महिन्याभरापासून ‘जंतर मंतर’वर आंदोलन करीत आहेत. खेळाच्या मैदानावर भारताची शान उंचावलेल्या विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आदींना पोलिसांनी दिलेली वागणूक खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण भारतातून उमटल्या. असं असताना कुस्तीगिरांना पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन सुरू करता येणार नाही’, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले. या कुस्तीगिरांवर रविवारी करण्यात आलेल्या कठोर कारवाईचेही पोलिसांनी समर्थन केले.

Wrestlers Protest: देशात हुकूमशाहीला सुरुवात? आधी फरफटत गाडीत टाकलं अन् नंतर गुन्हा दाखल; साक्षी मलिकचा सवाल
स्वाभिमानाशी तडजोड करुन जगणार नाही, साक्षीचं इमोशनल पत्र…

पोलिसांच्या ताब्यातून सुटलेल्या साक्षी मलिकने ट्विटरवर एक पत्र शेअर केलंय. त्यात ती म्हणते, २८ मे रोजी आमच्यासोबत काय घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं. दिल्ली पोलीस आमच्याशी कसे वागले, किती निर्दयीपणे आम्हाला अटक करण्यात आली, हे तुम्ही सर्वांनी पाहिलं. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी धुडगूस घालून आमचं आंदोलन उधळून लावलं आणि दुसऱ्याच दिवशी आमच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर दाखल केला. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाचा न्याय मागून काही गुन्हा केला आहे का? पोलिस आणि यंत्रणा आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत.

आता असं वाटू लागलंय की आमच्या गळ्यात सजलेल्या या पदकांना काही अर्थ उरला नाही. ते परत करण्याच्या विचारानेच आम्हाला नकोसं झालं. पण स्वाभिमानाशी तडजोड करूनही काय जगायचं..? पण आम्हाला आता या पदकांची गरज नाही कारण ते परिधान करून, ही यंत्रणा केवळ आम्हाला मुखवटा बनवून स्वतःचा प्रतार करते आणि नंतर नेहमीच शोषण करते. त्या शोषणाविरुद्ध बोललो तर ही यंत्रणा तुरुंगात टाकण्याची तयारी करते.

देशाची मान उंचावणारे पदकविजेते कुस्तीपटू का करतायेत आंदोलन? बजरंग पूनिया, साक्षी मलिकही मैदानात
पदक हे आमचं जीवन, आमचा आत्मा आहे. ते गंगेत वाहून गेल्यावर आमल्या जीवनालाही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. आज संध्याकाळी ६ वाजता हरिद्वार येथे आमची पदके गंगेत अर्पण करणार आहोत.

Sayali Sanjeev Comment on Ruturaj Gaikwad Girlfriend Utkarsha Pawar Photo with MS Dhoni After IPL Final 2023; ऋतुराज गायकवाडने शेअर केला होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो; फोटोपेक्षा अभिनेत्री सायली संजीवची प्रतिक्रिया चर्चेत

0

मुंबई: आयपीएल २०२३ चा यंदाचा हंगाम मोठ्या दिमाखात पार पडला. एम एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवत पाचवी ट्रॉफी घरी नेली. २०२३ च्या आयपीएल हंगामात चेन्नईचा ओपनर ऋतुराज गायकवाडने धमाकेदार कामगिरी केली आहे. CSK च्या या विजयात ऋतुराजचा मोठा वाटा आहे. आयपीएल २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत धोनीचा हा शिलेदार सातव्या स्थानी असून त्याने या हंगामातील १७ सामन्यांमध्ये एकूण ५९० धावा केल्या. CSK च्या टीममधील सर्वाधिक धावा करणारा तो डेव्हॉन कॉनव्हेनंतरचा दुसरा खेळाडू आहे.

IPL Final 2023: CSK च्या विजयावर साराचा विश्वास बसत नव्हता, विकी कौशलने डोक्याला हातच लावला; रिअ‍ॅक्शन Viral
चेन्नईने ट्रॉफी तर जिंकलीच पण त्याचबरोबर ऋतुराजने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमीही दिली. ऋतुराजने सोशल मीडियावर पोस्ट करत तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची माहिती दिली. गेल्या रविवारी ऋतुराजचे लग्न उत्कर्षा नावाच्या मुलीशी होणार असल्याचे समोर आलेले, मात्र तिच्याविषयी फार अपडेट नव्हते. मात्र आता ऋतूने उत्कर्षासोबतचा थेट फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. दरम्यान आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे ऋतुराजने शेअर केलेल्या फोटोवर एका खास व्यक्तीच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.


आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर ऋतुराजने महेंद्रसिंह धोनी आणि उत्कर्षा पवार या दोन व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेत्री सायली संजीवने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन उत्कर्षा आणि ऋतुराज’, अशी सायलीची कमेंट आहे. तिने उत्कर्षाच्या नावापुढे हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.

Sayali Sanjeev Comment On Ruturaj Gaikwad Photo With Wife To Be

दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ऋतुराजचा उत्कर्षासोबत आणखी एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यात दोघे अभिमानाने आयपीएल २०२३ ची ट्रॉफी हातात घेऊन पोज देताना दिसतायंत. दरम्यान गुजरातने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ओपनिंगला आलेल्या ऋतुराजने महत्त्वाची खेळी केली. ऋतुराजने १६ चेंडूमध्ये २६ धावा केल्या आणि विजयाचा पाया रचला. त्याने डेवोनसह ७४ धावा केल्या.


सायली आणि ऋतुराज रिलेशनशिपमध्ये असल्याच्या नेहमीच रंगल्या चर्चा

गेल्या काही वर्षांपासून त्याचे नाव सायलीसोबत ऋतुराजचे नाव जोडले जात होते. सायलीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही आजही ऋतुराजचे चाहते त्याच्याबद्दल कमेंट करताना दिसतात. सीएसकेने सामना जिंकला किंवा हरला किंवा ऋतुराजने चांगली कामगिरी केली की सायलीच्या कमेंट बॉक्समध्ये असंख्य कमेंट्स हल्ली हल्लीपर्यंत येत होत्या. २०२१ साली आयपीएल दरम्यान सायली आणि ऋतुराजने एकमेकांच्या फोटोंवर केलेल्या कमेंटमुळे त्यांचे नाव एकमेकांसोबत जोडले गेले होते. आता ऋतुराजने त्याचे नाते उत्कर्षासोबत असल्याचे कन्फर्म केल्याने या चर्चांना नक्कीच पूर्णविराम मिळाला आहे.

या फोटोत विंडो सीटजवळ बसलेत मराठीतील तीन सुपरस्टार, ओळखलं तर तुम्ही खरे सिनेप्रेमी!
सायलीनेही अनेकदा सांगितले आहे की, त्यांच्यात केवळ मैत्री आहे. ऋतुराज तिच्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेचा चाहता होता, असेही ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात तिने सांगितले होते.

धोनीची एक झलक पाहण्यासाठी दिल्लीत गर्दी, व्हिडिओ व्हायरल

Nanded Trans Woman Sejal Clear HSC Exam; टाळ्या वाजवून पैसे मागितले, परीक्षा दिली अन् यश मिळवले, तृतीयपंथीय सेजलची भरारी

0

नांदेड : समाजात तृतीयपंथीयांना दुजाभावाची वागणूक मिळते. ते जवळ आले की नागरिक त्यांच्याकडे डोळे वटारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. मात्र अशाही परिस्थितीत आयुष्याशी संघर्ष करत नांदेड शहरातील एका तृतीयपंथीयाने बारावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण प्राप्त करत यश मिळवलं आहे. या तृतीयपंथीयाच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमोल सर्जे उर्फ सेजल असं या तृतीयपंथीयाचं नाव असून एक ट्रान्स वुमेन आहे.अमोल उर्फ सेजल ही काही वर्षांपासून तरोडा भागात आपल्या गुरू सोबत वास्तव्यास आहे. इतर तृतीयपंथीयांप्रमाणे तो टाळ्या वाजवून आपला उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीतही सेजलने आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पहिली ते १०वी पर्यंत त्याचं देगलुरला शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर अकरावी आणि बारावीपर्यंतचं शिक्षण आश्रमशाळा शिवजी तांडा जळकोट येथे पूर्ण केलं.

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत अमोल याने ६२ टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे कुठलंही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश गाठलं आहे. बारावी परीक्षेत यश संपादन करणारी सेजल ही मराठवाड्यातील पहिली तृतीयपंथीय असल्याचा दावा केला जात आहे.

आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं, कामगाराचा मुलगा कामगार आयुक्त बनला!
वयाच्या सतराव्या वर्षी ट्रान्सजेंडर

सेजल आधी अमोल होता. अमोल मुलगा होता पण त्याचे हावभाव मात्र तृतीयपंथीयासारखे होते. त्यामुळे त्याने वयाच्या सतराव्या वर्षी लिंग परिवर्तन केलं. या शस्त्रक्रियेनंतर त्याने आपलं नाव बदलून सेजल असं ठेवलं. परीक्षा काळात सेजलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र लोक काय म्हणतील, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा राहील या गोष्टीची पर्वा न करत तिने बारावीची परीक्षा दिली आणि त्यात तिने यश देखील मिळवलं. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

देवदर्शनास निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला, भरधाव कार ४-५ वेळा पलटली अन्…
पोलीस दलात काम करण्याची इच्छा

एकीकडे समाजात वेगळी वागणूक मिळत असताना शासनाच्या वतीने त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीयांच्या उत्कर्षासाठी सुविधा केंद्र चालविण्यासाठी दिले आहे. त्यातच आता नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सेजलने पोलीस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आराम करायला आलेल्या ‘आजारी’ मेहुण्यामुळे नसता ‘ताप’; बहीण, भावोजी घराबाहेर जाताच साधला डाव!

0

छत्रपती संभाजीनगर: आजारी असल्यामुळे तुमच्या घरी आलो आहे असं सांगत बहिणीच्या घरी आलेल्या भावाने सकाळी बहीण आणि दाजी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात जाताच संधी साधून चार लाख ७५ हजार रुपये ठेवलेली घरातील पैशांची बॅग घेऊन पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये बायकोच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवऱ्याशी भांडण, रागात मैत्रिणीच्या घरी गेली, वृद्धाशी लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगतसिंह हरी सिंह (वय ४२ रा. सिडको महानगर) हे धुळे सोलापूर महामार्गावर साजापूर फाटा येथे असलेल्या मुकुल गोयल विकास पाईप आणि स्टील कंपनीमध्ये वसुली करण्याचे काम करतात. शनिवार दिनांक २७ रोजी कंपनीचे मालक रजत बंसल यांनी दिवसभर कंपनीमध्ये वसूल झालेल्या पैशांची बॅग भगतसिंग यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ही बॅग घेऊन भगत सिंह हे घरी आले यावेळी त्यांना घरामध्ये त्यांचा मेहुना आलेला दिसला. भगतसिंह यांनी विचारपूस केली असता, मी आजारी असल्यामुळे तुमच्या घरी आराम करण्यासाठी आलो आहे असं कारण दशरथसिंह क्रांतिसिंह (वय 25 रा.राजस्थान, हल्ली मु.दहेगाव बंगला) याने सांगितलं.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात अन्नाची प्रचंड नासाडी

थोडावेळ घरात थांबून दशरथ सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडला. यानंतर रात्री उशिरा दहा वाजेच्या सुमारास घरी परतला. यावेळी भगतसिंह झोपले होते. सकाळी आठ वाजता भगतसिंग हे पत्नीला घेऊन पंढरपूर येथे भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. यावेळी घरामध्ये भगतसिंग यांची मुलं आणि दशरथ झोपलेला होता. काही वेळाने भाजीपाला घेऊन घरी आल्यानंतर भगतसिंग यांना दशरथ दिसला नाही. तसेच घरात ठेवलेली पैशांची बॅग देखील कपाटात नसल्याचे लक्षात आलं. घरातील पैशाची बॅग घेऊन दशरथ घेऊन गेल्याचा संशय आल्याने भगतसिंग यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

‘तो’ प्रवास ठरला अखेरचा! दुचाकीने जात असताना काळानं दाम्पत्याला घेरलं; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

IPL 2023 GT VS CSK Final Sai Sudharshan Ravindra Jadeja Shines; आयपीएल फायनलमध्ये साई, जाडेजा चमकले

0

अहमदाबाद: गेल्या वर्षी आयपीएलच्या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं यंदा फिनिक्स भरारी घेतली. गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावणाऱ्या चेन्नईनं अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं. चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपदक पटकावत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यंदा आयपीएलच्या बाद फेरीत मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं.

अंतिम सामन्यात क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शननं ९६ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानं ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळेच गुजरातला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. पावसामुळे दुसरा डाव १५ षटकांचा करण्यात आला. चेन्नईला १७१ धावांचं आव्हान होतं. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होतं. पहिल्या ४ चेंडूंमध्ये मोहित शर्मानं केवळ ३ धावा दिल्या. पाचव्या चेंडूला रविंद्र जाडेजा स्ट्राईकला होता. २ चेंडूंमध्ये १० धावांची गरज असताना जाडेजानं षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
चेन्नईनं इतिहास रचला, धोनीवर अभिनंदनाचा वर्षाव, अन् विराट कोहलीसह राहुलची ती पोस्ट चर्चेत
साई सुदर्शन आणि रविंद्र जाडेजा यांच्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यात क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. साई सुदर्शन मूळचा चेन्नईचा आहे. मात्र गुजरातकडून खेळणाऱ्या साईनं चेन्नईच्या संघाची धुलाई केली. त्याच्या खेळीमुळे गुजरातनं २१४ धावांचा डोंगर उभारला. तर दुसरीकडे मूळचा गुजरातचा असलेल्या जाडेजानं गुजरात टायटन्सला धूळ चारण्यात मोलाची भूमिका बजावली. मोहित शर्मा अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत असताना आणि प्रचंड दडपण असतानाही जाडेजानं शानदार फलंदाजी केली. त्यामुळे गुजरातच्या संघाला गुजरातमध्येच पराभूत व्हावं लागलं. जाडेजा गुजरातच्या सौराष्ट्र भागातून येतो.
ऋतुराज गायकवाडने शेअर केला होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो; फोटोपेक्षा अभिनेत्री सायली संजीवची प्रतिक्रिया चर्चेत
साई सुदर्शनला किती मानधन?
२०२२ मध्ये झालेल्या लिलावात गुजरात टायटन्सनं साईला २० लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केलं. आयपीएल २०२३ मध्ये त्याला रिटेन करण्यात आलं. यंदाच्या हंगामात साई गुजरातकडून ८ सामने खेळला. त्यात त्यानं ५१.७१ च्या सरासरीनं ३६२ धावा केल्या असून त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तमिळनाडू प्रीमियर लीगमुळे साईला ओळख मिळाली. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो लाइका कोवई किंग्सकडून खेळला. या संघानं त्याच्यासाठी २१.६० लाखांची बोली लावली होती. मात्र गुजरातनं त्याला त्यापेक्षाही कमी मानधन दिलं.

इंजिनिअरिंग ते एकेकाळचा टेनिस बॉल प्लेअर… मुंबई इंडियन्ससाठी खेळला अन् स्टार बनला

जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सीएसके किंग
३४ वर्षांचा रविंद्र जाडेजा २०१२ पासून चेन्नईकडून खेळत आहे. सीएसकेसोबत त्यानं तीन जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएल २०२३ साठी चेन्नईनं जाडेजाला १६ कोटी रुपये देऊन करारबद्ध केलं. गेल्या वर्षी जाडेजाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नव्हती. मात्र यंदा त्याची कामगिरी अतिशय उत्तम राहिली. १६ सामन्यांत त्यानं २३.७५ च्या सरासरीनं १९० धावा केल्या. तर गोलंदाजीत ७.५६ च्या इकॉनॉमी रेट आणि २१.५५ च्या सरासरीनं २० फलंदाजांना बाद केलं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Who is Sahil Khan, the ruthless killer of Delhi girl Sakshi | Delhi News

0

NEW DELHI: A 16-year-old girl, Sakshi, was stabbed 34 times in full public view, kicked and her head crushed with a concrete block by a man named Sahil in Delhi’s Shahbad Dairy on Sunday night.

Here’s what we know about Sakshi’s murderer so far

  • Sahil is a 20-year-old man who was arrested on Monday from Uttar Pradesh’s Bulandshahr for killing Sakshi.
  • Sahil was known to be in a relationship with her.
  • He used to work as an AC and refrigerator mechanic in the area.
  • Sahil was captured on CCTV stabbing the victim more two dozen times and then battering her with a concrete slab. The brutality of the crime has evoked strong reactions.
  • According to the initial investigation, Sahil fought with Sakshi a day before killing her.
  • Sahil used a long knife during the assault, which he had bought recently.
  • Sahil, son of Sarfaraz, wore kalava, a sacred Hindu thread, on his wrist to mislead police.
  • His father Sarfaraz had moved to this locality two years ago. He stayed here with his wife, three daughters and his son Khan.
  • Neighbours said Sahil Khan mostly remained quiet and did not interact much, but he would get offended if someone made a religious joke.
  • Most of the pictures and videos on Instagram show him smoking a hukkah with his friends.
  • Sahil also likes to make reels. Many of his reels on Instagram show him either performing solo or with friends.
  • His Insta account reveals he was in touch with many girls.

Latest posts