Thursday, March 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2206

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

182

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Virat Kohli Shared His 10th Marksheet Passed In 2004 Pic Gone Viral

0

Virat Kohli 1oth Class Marksheet : फलंदाजी करताना लक्षाचा पाठलाग करताना चेंडू आणि धावांचे गणित अचूक साधणारा विराट कोहली दहावीला गणितात कच्चा होता. होय… माजी कर्णधार विराट कोहलीचे दहावीचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 2004 मध्ये विराट कोहली दहावी पास झाला होता, तेव्हाचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

विराट कोहलीने स्वत: कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहावीचे मार्कशीट शेअर केले आहे. हे मार्कशीट पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल… कारण दहावीमध्ये विराट कोहलीला गणितात फक्त 51 गुण होते. विराट कोहलीने #LetThereBeSport या हॅशटॅगचा वापर करत दहावीचे मार्कशीट कू केले आहे. तो म्हणतो, ज्या गोष्टी तुमच्या मार्कशीटमध्ये कमीत कमी जोडतात, त्या तुमच्या चारित्र्याला अधिक कशा जोडतात हे मजेदार आहे. 

किंग कोहलीने शेअर केलेल्या दहावीच्या मार्कशीटमध्ये एकूण पाच विषय दिसतात. यामध्ये विराट कोहलीला सर्वात कमी गुण गणितात असल्याचे दिसतेय. इंग्रजीमध्ये विराट कोहलीला 83 गुण आहेत. तर हिंदीमध्ये विराट कोहलीला 75 गुण आहेत. तर विज्ञानमध्ये 55 गुण आहेत. समाजशास्त्र या विषयात विराट कोहलीला 81 गुण आहेत. गणितात विराट कोहलीला फक्त 51 गुण आहेत. धावांचे आणि चेंडूचे गणित परफेक्ट असणाऱ्या विराट कोहलीला दहावीला कमी गुण असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत. 

पाहा विराट कोहलीची पोस्ट –


विराट कोहलीचे दहावीचे मार्कशीट 28 जून 2004 रोजीचे आहे. विराट कोहलीचे शिक्षण सीबीएससीमध्ये झाले आहे. तर दिल्लीमधील Saviour convent sec A-2 Paschim vihar  मध्ये शिक्षणासाठी होता. विराट कोहलीची जन्मतारीख 5 नोव्हेंबर 1988 अशी आहे. 

विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत विराट कोहलीने शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीची बॅट शांत होती. यंदा विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबी ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात असल्याचे दिसत आहे.  

आणखी वाचा :  

IPL मध्ये आतापर्यंत 21 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी

आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

IPL 2023 मध्ये रोहित शर्माला आराम दिला जाणार ? कोच मार्क बाऊचरने दिली हिंट

इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 

IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी



sports

shirdi news, द्वेषाचा नाही इथं प्रेमाचा उत्सव भरतो; साईंच्या शिर्डीत मुस्लीम बांधव रामजन्मोत्सवात तर हिंदू बांधव संदल उरुसात दंग! – sai baba shirdi muslim participate in ram navami 2023 while hindu participate in sandal urus

0

शिर्डी : शिर्डीत साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे हे ११२ वे वर्ष असून येथील रामनवमी उत्सवाचे एक विशेष वेगळेपण आहे. अनेक दशकांपासून हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. शिर्डीत आज मोठा जल्लोष करत देशविदेशातील भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. शिर्डीत रामनवमी उत्सव कसा आणि कधी सुरू झाला? त्यामागची काय कहाणी आहे? हिंदू-मुस्लीम ऐक्य कसं साधलं जातं? याविषयी साईमंदिराचे निवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी आणि अब्दुल बाबांचे वंशज गनीभाई यांनी माहिती दिली आहे.साईबाबा मंदिराचे माजी मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी म्हणाले की, ‘साईबाबांनी स्वतः श्री रामनवमी उत्सव सुरू केला. गोपाळराव गुंड नावाच्या व्यक्तीने साईबाबांना आपण एक उरूस भरावावा अशी संकल्पना मांडली. दोन वर्ष झाल्यानंतर लेखक भीष्म यांच्या असं लक्षात आलं की हा उरूस नेमका श्रीराम जन्मदिनी भरला जातो. त्याला आपण रामजन्मोत्सव का करू नये. त्यामुळे काका महाजनांना त्यांनी सांगितले की आपण बाबांची आज्ञा घेऊया. त्यानंतर ते बाबांकडे गेले आणि त्यांनी आज्ञा देताच बाबांच्या समोर पाळणा बांधून पहिला रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. राम जन्म उत्सवाचं पहिलं कीर्तन श्री कृष्ण भीष्म यांनी स्वतः केलं. त्यांना हार्मोनियमची साथ स्वतः काका महाजनांनी दिली. बाबांच्या आज्ञेने हा रामनवमी उत्सव सुरू झाला.’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करा, उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी, ठिकाण पण सांगितलं

‘रामजन्मोत्सवाच्या दिवशीच संध्याकाळी उरूस भरलेला असतो म्हणून मुस्लीम बांधवही बाबांकडे गेले आणि आपल्याला संदल मिरवणूक करायची आहे, असं सांगितलं. संदल मिरवणुकीसाठीही बाबांनी आज्ञा दिली. तेव्हापासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक ठरलेला रामनवमी उत्सव उदयास आला. आजही प्रतिकात्मक स्वरूपात श्रीरामनवमी उत्सवात रथयात्रा, किंवा रामजन्मोत्सवात मुस्लीम बांधव हिरिरीने सहभाग घेतात आणि उत्साहाने कार्यक्रम पार पडतो. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या संदल मिरवणुकीच्या कार्यक्रमात हिंदू बांधव उपस्थित राहतात. असे एकत्रितरीत्या बाबांच्या समाधीवर चंदनाचे ठसे उमटवली जातात आणि द्वारकामाई मशिदीत संदल मिरवणूक होते,’ अशी माहिती बाळकृष्ण जोशी यांनी दिली

दरम्यान, रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने आज राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. पुढील तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार असून पहाटे काकड आरतीपासूनच भाविकांनी साई दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. दिवसभर गर्दी कायम राहणार असल्याने आज रात्रीपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.

lic share price, गुंतवणूकदारांना बुडवण्यात एलआयसीचा IPO नंबर वन, वर्षभरात २.६ लाख कोटी बुडाले; वाचा सविस्तर – lic becomes worst ipo in a year investors suffer 2.6 lakh crore loss these shares gives bumper returns

0

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आयपीओ बाजारातील परताव्यावर शेअर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम झाला आहे. बाजारातील दबावामुळे अनेक आयपीओ चांगले भरल्यानंतरही परतावा कमी किंवा उणे झाला आहे. असे असले तरी जवळपास ६०% आयपीओ असे आले, ज्यात गुंतवणूकदारांचा पैसा कमी झालेला नाही. तर यापैकी दोन आयपीओंनी १०० टक्क्यांहून अधिक तर काहींनी ४० ते ५०% परतावा दिला.

दुसरीकडे नकारात्मक परतावा मिळालेल्या ४० टक्के आयपीओमध्ये एलआयसीने मूल्याच्या बाबतीत सर्वाधिक नुकसान केले. दुसरीकडे इतर काही आयपीओमध्ये ४०-५० टक्के कमजोरी होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३० आयपीओ लाँच करण्यात आले होते. ज्यापैकी १४ शेअर्सने आतापर्यंत नकारात्मक परतावा दिला आहे.

अदानी प्रकरणाचा LIC ला धसका! गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी काय पण… नवीन प्लॅन तयार
एलआयसीकडून सर्वात मोठे नुकसान
मूल्याच्या बाबतीत सर्वात जास्त तोटा एलआयसी इंडियाच्या आयपीओमध्ये झाला आहे. ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत शेअर्समध्ये ४४% घसरण झाली असून सध्या हा शेअर ५३२ रुपयांवर आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. जेव्हा कंपनीचा आयपीओ आला तेव्हा त्याचे मूल्यांकन ६ लाख कोटी इतके होते, जे आता ३.४ लाख कोटींच्या आसपास घसरले आहेत. म्हणजे गुंतवणुकदारांना २.६ लाख कोटींचं नुकसान सोसावं लागलं आहे.

सर्वाधिक घसरलेला आयपीओ
गेल्या एक वर्षाबद्दल बोलायचे तर टक्केवारीच्या परताव्याच्या बाबतीत एलिन इलेक्ट्रॉनिकचा आयपीओ सर्वात वाईट ठरला आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झालेला हा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर आयपीओ किंमतीच्या तुलनेत ५२% घसरला असून शेअर २३०.६५ रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत सध्या ११८.४० रुपयांवर आहे.

LICधारकांसाठी आली मोठी बातमी; अदानी ग्रुपला दिलेल्या कर्जात झाली…; स्वत: अर्थमंत्र्यांनी दिली लेखी माहिती
या नवीन शेअर्समध्येही मोठी घसरण
केफिनटेक २९ डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झाल्यानंतर आयपीओ किमतीच्या तुलनेत २४% घसरला. दुसरीकडे २३ डिसेंबर २०२२ रोजी सूचीबद्ध झालेला अबन्स होल्डिंग्सचा शेअर २१% गडगडला आहे. याशिवाय धर्मज क्रॉप ४१$, आयनॉक्स ग्रीन ३७%, टीएमबी २४%, दिल्लीवरी ३४%, एलआयसी इंडिया ४४% घसरले आहे. उमा एक्स्पोर्ट्सचे शेअर ४६ टक्क्यांनी घसरले, तर तामिळनाड मर्कंटाइल बँक २१ टक्क्यांनी घसरले आहे.

‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात, ‘या’ गोष्टी समजून घ्या

कोणत्या शेअर्सनी दिला चांगला परतावा
प्रुडंट अॅडव्हायझरच्या शेअरने आयपीओ किंमतीच्या २९%, फाइव्ह-स्टार बसिन १५%, बिकाजी फूड्स २०%, फ्यूजन मायक्रो १०%, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट १३%, सिरमा SGS १८%, इथॉस ८%, परदीप फॉस्फेट्स २२%, कॅम्पस अॅक्टिव्ह ११%, ग्लोबल सर्फेसेस १२%, दिवगी टॉर्कट्रान्स ८%, साह पॉलिमर्स ७%, लँडमार्क कार्स १ टक्के आणि सुला व्हाइनयार्ड १% इतका परतावा दिला आहे.

women commits suicide, चार वर्षांपूर्वी पतीचा एन्काऊंटर, आता पत्नीचं टोकाचं पाऊल; तळहातावर २ ओळी लिहून जीवनाची अखेर – pushpendra yadav encounter shivangi ends life writes 2 lines on her hand

0

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या झाशीमधील चर्चेत असलेल्या पुष्पेंद्र यादव एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे. २०१९ मध्ये एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या पुष्पेंद्र यादव यांची पत्नी शिवांगीनं आज गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवांगीच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. शिवांगीनं आत्महत्येसाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे.जालौनच्या कालपी तहसीलमधील पिपराया गावात वास्तव्यास असलेल्या राकेश यादव यांची मुलगी शिवांगीचा विवाह झाशीच्या करमुखामध्ये राहणाऱ्या पुष्पेंद्र यादवशी २०१९ मध्ये झाला. लग्नाच्या काही महिन्यांतच झाशी जिल्ह्यात पुष्पेंद्र यादवचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काऊंटरमुळे पोलीस अडचणीत आले. पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग…
पुष्पेंद्र यादव एन्काऊंटरचा तपास अद्याप सुरू आहे. या दरम्यान पुष्पेंद्रची पत्नी शिवांगीनं गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांनी तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
आशिष कुठेय? आई-वडील जीव तोडून धावले; लिफ्टच्या आत डोकावून पाहिले; लेकराचे पाय लटकत होते
मी माझ्या मर्जीनं आयुष्य संपवतेय. त्यात कोणालाही अडकवलं जाऊ नये, असं हाताच्या तळव्यावर लिहून शिवांगीनं आयुष्य संपवलं. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तळव्यावरील हस्ताक्षर पडताळून पाहिलं जात आहे. शिवांगीनं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीच कल्पना नसल्याचं तिचे वडील राकेश यांनी सांगितलं.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

पुष्पेंद्रच्या मृत्यूनंतर शिवांगीला खूप एकटं वाटत होतं. ती तिच्या मर्जीनं माहेरी राहायला गेली होती. तिच्या आत्महत्येचं कारण मला माहीत नाही, असं शिवांगीचे सासरे हरिश्चंद्र यादव म्हणाले. सध्या शिवांगीच्या हातावरील अक्षर पडताळून पाहिलं जात असल्याची माहिती सर्कल ऑफिसर देवेंद्र पचौरी यांनी सांगितलं.

Mumbai Crime News Borivali Railway Police Arrested Accused From Virar In Molestation Case In 24 Hours Maharashtra News

0

Mumbai Crime News:  मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर उभ्या असलेल्या तरुणीचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या तरुणाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी (Borivali Railway Police) अटक केली आहे. पोलिसांनी विरारमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीने या प्रकरणाची पीडित तरुणीने कुटुंबीयांसोबत बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात (Borivali Railway Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. 

मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरून परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणाची बोरिवली लोहमार्ग पोलिसांना अवघ्या 24 तासांत उकल करण्यास यश आले. विनयभंगप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला विरारच्या फुलपूर भागातून अटक केली आहे. 

प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 19 वर्षीय विद्यार्थिनी परीक्षेला जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकात (Borivali Raiway Station) आली. लोकलची वाट पाहत ही तरुणी एका बेंचवर बसली होती. त्यावेळी आरोपी हा तिच्या बाजूला बसला आणि त्याने तिच्या कंबरेत हात घातला. या घटनेने भेदरलेल्या तरुणीने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करत फलाटावर तिला मागून मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे तरुणी गांगारून गेली. मात्र, परीक्षा असल्यामुळे ती परीक्षा केंद्रावर गेली. 

पेपर दिल्यानंतर विद्यार्थिनीने आपल्या कुटुंबीयांसह बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या मदतीने मिळालेल्या सुगावाच्या आधारे आरोपीला विरार परिसरातून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर आरोपीला 24 तासात अटक केली असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. 

news reels reels

आरोपी हा विविध धार्मिक कार्यक्रमात धार्मिक गीते, भजन गाण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. आरोपी हा मूळचा गुजरात येथील असून सध्या तो विरारमध्ये वास्तव्यास आहे. आरोपीला न्यायलयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. दारुच्या नशेत हे कृत्य झाले असल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बोरिवली रेल्वे पोलीस करत आहेत. 

इतर महत्त्वाची बातमी:

सिंधुदुर्ग : आचरा रामेश्वर संस्थानात राम जन्मोत्सव दिमाखात संपन्न

0








सिंधुदुर्ग (आचरा); उदय बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरा येथील इनामदार श्री रामेश्वराच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्य आल्याने उन्हाचे चटके बसत होते. त्याचवेळी १२.३९ वाजण्याच्या मुहूर्तावर रामजन्माची “जय जय रघुवीर समर्थ ” अशी ललकारी आसमंतात दुमदुमली आणि तोफा दणाणल्या… बंदुकीच्या फैरी आकाशात झडू लागल्या… नगारखान्यात नगारे- ताशे झडू लागले… रामजन्म होताच आसमंतात जय जय रघुवीरचा जयघोष दुमदुमू लागला. इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरा नगरीत साजरा होणाऱ्या राम जन्म उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक हजर होते.

जिल्ह्यात आज सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला. मालवण तालुक्यातील आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थच्या ललकारी बरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला उत्सव

इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. आचरा पंचक्रोशी पूर्ण १२ दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्याचा सांब सदाशिव पुरता दंग झालेला होता. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी उन्हाचे चटके बसत असूनही भाविकांना उत्कंठा होती ती रामजन्माची. रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत  ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ चा जयघोष सुरू झाला. वाद्यांच्या घोषात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या घोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रामनामाची गीते म्हटली जात होती. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामनव आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळा उत्सवात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते. उत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व आचरा ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी  विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा : 









MS Dhoni: The symbiotic rise of MS Dhoni and the Indian Premier League | Cricket News

0

The popularity of T20 cricket, especially in India, can be attributed to a particular Indian team led by Mahendra Singh Dhoni, who returned as World champions of the format in its inaugural global competition in 2007. And a year later, the advent of the Indian Premier League (IPL) coincided with the transformation of Dhoni into the beloved ‘Captain Cool’.
A leader par excellence, Dhoni has donned the captaincy role for two IPL teams – Chennai Super Kings (CSK) and Rising Pune Supergiants (RPS), since the beginning of the league in 2008. IPL, arguably the world’s most popular T20 cricket league, and its most famous skipper, Dhoni, have grown by leaps and bounds in their decade-and-half long symbiotic coexistence.
In the process, Dhoni has played the most number of matches in the league as captain, effected the most dismissals as a wicketkeeper and earned the nickname ‘Thala’ among his CSK fans, while becoming one of the most successful skippers with four IPL titles. He is probably the most prominent ambassador of the league and his performance and form in the league spilled over to his international career and the reverse is true too.
Overall IPL batting stats

Player Mat Runs HS Ave SR 100 50 4s 6s
MS Dhoni 234 4978 84* 39.20 135.20 0 24 346 229
1

Here we have to retrace the glorious journey of the IPL and its best representative ‘Mahi’ Dhoni:
The beginning…
Dhoni started his IPL journey as the most expensive cricketer in the league, fetching (at that time) a jaw-dropping USD 1.5 million or upwards of Rs 6 Crore contract as the skipper of Chennai Super Kings in the first players’ auction. It turned out to be a fruitful and long-term relationship between Dhoni and the Chennai-based franchise.
Soon, Dhoni became a superstar for the CSK fans. And in no time, the calm and composed wicketkeeper batsman became ‘Thala’ for the team’s vast followers, making the team one of the most popular in the league.
Dhoni did not disappoint his fans, taking the team to the final of the inaugural edition itself in 2008. CSK though lost the title clash to the Shane Warne-led Rajasthan Royals. But it was the beginning of a beautiful relationship with the team, its fans and the league.
Most dismissals in IPL

Player Mat Inns Dis Ct St Dis/Inn
MS Dhoni 234 227 170 131 39 0.748

1/20

IPL 2023: The captains and their teams

Show Captions

That midas touch!
Dhoni and his team did not have to wait long before they became IPL champions. The third season returned to India, after the second in 2009 was organised in South Africa due to a date clash with the country’s general elections. And with it the midas touch of Dhoni returned.
The semi-final defeat to Royal Challengers Bangalore (RCB) in South Africa was soon forgotten as CSK lifted the IPL trophy for the first time in 2010, beating Mumbai Indians in the summit clash. CSK went on to win the T20 Champions League too the same year. The role that former CSK player turned Head Coach Stephen Fleming played cannot be forgotten either. Like Dhoni, Fleming too has become synonymous with the yellow brigade.

The run continued in the next season too. CSK finished the league stage behind RCB, but in the final they got the better of the Bangalore-based franchise to lift the IPL trophy for the second successive year in 2011.
Dhoni’s midas touch didn’t abandon him when he played in the national colours. He later led India to their second ODI World Cup triumph in 2011, 28 years after the Kapil Dev-led side won India’s first way back in 1983.
Most matches as IPL captain

Player Mat Won Lost Tied NR %
MS Dhoni 210 123 86 0 1 58.85
2

The aura grows…
Even though CSK’s next IPL title was won seven years later in 2018, Dhoni, with his match-winning knocks and shrewd captaincy, guided CSK to the play-off phase 11 times in 13 seasons. With his successes in national colours and the ever growing aura in CSK’s yellow jersey, Dhoni the brand too was unstoppable.
During this period, Dhoni led India to the 2013 ICC Champions Trophy title winy, making him the only skipper to win all ICC organised global events — T20 World Cup, ODI World Cup and Champions Trophy. And in 2014, Dhoni led CSK to their second Champions League title.
The dark cloud…
Dhoni’s successful run with CSK was abruptly halted after the 2015 season. The two-time champions, along with Rajasthan Royals, were banned for two years from the league for involvement in illegal betting by team officials.
Dhoni had to join a newly formed team – Rising Pune Supergiants, for the 2016 edition after spending eight successive seasons with CSK. As expected, he was made captain of the Pune-based side, but the new franchise finished a lowly 7th in its debut season. The dismal run though did not last long for Dhoni.
CSK’s Result summary

Team Span Mat Won Lost Tied Tie+W Tie+L NR %
CSK 2008-2022 209 121 86 0 0 1 1 58.41

The revival…
Dhoni played under Steve Smith’s captaincy at RPS in 2017, as the team reached the final, but lost the summit clash dramatically by 1 run to Mumbai Indians. It was the team’s last season in the league as they, along with Gujarat Lions, were contracted for just two seasons as a stop-gap arrangement for the two banned teams.
Dhoni then made an emotional return to CSK in 2018 and the team rose like the proverbial phoenix. Dhoni led the Chennai-based team to their third IPL title in their comeback year. Dhoni was in amazing form with the bat too, scoring 455 runs at an astounding average of 75.83. He also scored the runs in double quick time, at a strike rate of 150.66.
In 2019, Dhoni again led CSK to the final, their eighth summit clash appearance in 10 editions in the league. But unfortunately they failed to defend the title, losing by 1 run to Mumbai Indians.

Untitled-1

Historic low and the fourth title
The league moved outside India for the second time in its history in 2020, this time due to the Covid-19 pandemic. The United Arab Emirates hosted IPL for two years during the Covid times.
Dhoni’s CSK failed to qualify for the playoffs for the first time in the league’s history in 2020. Dubbed ‘Dad’s Army’, for being the only team with the average squad age above 30, CSK finished a lowly 7th in the eight team tournament, winning just six of the 14 league matches in the UAE.
But Dhoni led the same ‘dad’s army’ the following year to the pinnacle, winning their fourth IPL title. It was a remarkable turnaround for the team and its captain Dhoni, who himself was 39 years old by then.

WhatsApp Image 2023-02-27 at 12.08.31.

An experiment that didn’t work…
The league became a 10-team affair with the addition of two new teams – Gujarat Giants, the eventual champions, and Lucknow Super Giants, when it returned to India in 2022.
The 40-year old Dhoni relinquished the CSK captaincy for the first time and the defending champions began their campaign with all-rounder Ravindra Jadeja at the helm. But they had a terrible start, losing their first four league matches on the trot.
They won two of the next four games, making it just two wins in eight games, but by then they were out of the playoffs race. Jadeja handed over the captaincy back to Dhoni, who led CSK to two more wins in the next three games. But they ended their campaign with three consecutive defeats to finish a disappointing 9th, just above the wooden-spoon holders Mumbai Indians, courtesy a better net run rate.
Despite the disappointments last year, the love affair between Dhoni and IPL will be rekindled again when the 16th edition of the league kicks-off on March 31 this year, highlighting that the beautiful journey is not over yet.
Dhoni and his yellow brigade will play the season opener against the defending champions the Gujarat Titans, led by Hardik Pandya, who is also a close friend of Dhoni’s.

Chhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत ‘झी 24 तास’ची भूमिका

0

Zee 24 Tass Stand On Chhatrapati Sambhajinagar Riots: शहरामधील किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या दंगलीनंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.


Updated: Mar 30, 2023, 04:48 PM IST

Chhatrapati Sambhajinagar Riots: छत्रपती संभाजीनगर दंगलीबाबत 'झी 24 तास'ची भूमिका

Zee 24 Tass Stand on Chhatrapati Sambhajinagar Riots

udayanraje bhonsle, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करा, उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी, ठिकाण पण सांगितलं – udayanraje bhonsle meet amit shah and demanded to build chhatrapati shivaji maharaj national memorial at delhi

0

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली. या भेटीत राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे अशीही मागणी केल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल, असं उदयनराजे भोसले म्हणाले. महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असं उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले.

ऑटोतून कामासाठी निघालेले,नांदेडमध्ये ट्रकची धडक, अपघातात ५ जणांचा मृत्यू, ७ महिन्यांच्या बालिकेनं जीव गमावला

वेळ, वार ठिकाण ठरवा; मी भ्रष्टाचार केला असेल तर मिशाच काय भुवयाही काढून टाकेन; उदयनराजेंचं मोठं विधान

महाराजांचा इतिहास जगासमोर येण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले

राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्याकडे केली. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली.

जनसामान्यांच्या सेवेचा वसा… बापटांचं शनिवार पेठेतील कार्यालय निधनाच्या अवघ्या २४ तासांच्या आत सुरु

What is Commodity Trading, शेअर बाजारातील कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय? गुंतवणुकीसाठी किती फायदेशीर, समजून घ्या – what is commodity trading in stock market know how to buy sell and its benefits

0

मुंबई : करोना संसर्गानंतर देशांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच डिमॅट खात्यांची संख्या १०० दशलक्ष पार पोहोचली. तर शेअर मार्केटनेही गुंतवणूकदारांची निराशा केली नाही. अस्थिर जागतिक परिस्थितीत तेजीच्या काळात गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळाला. परंतु युरोपमधील युद्धाच्या वातावरणामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी झपाट्याने वाढली. अशा स्थितीत कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या मागणीत तेजी दिसून आली आहे. कमोडिटी मार्केट म्हणजे काय आणि ते इक्विटी मार्केटपेक्षा वेगळे कसे आहे? हे तुम्हाला माहिती आहे का…कमोडिटी मार्केट म्हणजे काय?
कमोडिटी मार्केट हे एक मार्केटप्लेस आहे जिथे गुंतवणूकदार मसाले, मौल्यवान धातू, मूळ धातू, ऊर्जा, कच्चे तेल अशा अनेक वस्तूंमध्ये व्यापार करतात. सामान्यतः कमोडिटी वस्तूंचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते, तर भारतात दोन प्रकारच्या वस्तूंचा व्यापार होतो.
टाटांच्या शेअरची जोरदार बॅटिंग! गुंतवणूकदारांना लॉटरी, कोणता आहे हा शेअर जाणून घ्या

  • कृषी किंवा सॉफ्ट वस्तूंमध्ये काळी मिरी, धणे, वेलची, जिरे, हळद आणि लाल मिरची यांसारखे मसाले याशिवाय सोया बिया, मेंथा तेल, गहू, हरभरा यांचाही समावेश आहे.
  • बिगर कृषी किंवा कठोर वस्तूंमध्ये सोने, चांदी, तांबे, जस्त, निकेल, शिसे, अॅल्युमिनियम, कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो.

देर आए दुरुस्त आए! अदानी शेअरचे छप्परफ़ाड रिटर्न, १ लाख रुपये गुंतवल्यावर मिळाला इतक्या कोटींचा परतावा
इक्विटी मार्केट आणि कमोडिटी मार्केटमध्ये काय फरक?

  • इक्विटी बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. यामध्ये कच्चा माल कमोडिटी मार्केटमध्ये विकला आणि खरेदी केला जातो.
  • इक्विटी धारकांना शेअरधारक म्हणतात, तर कमोडिटी धारकांना ऑप्शन म्हणतात.
  • शेअरहोल्डरना कंपनीचे आंशिक मालक मानले जाते, परंतु कमोडिटी मालकांना नाही.
  • इक्विटी शेअर्सची कालबाह्यता तारीख नसते, पण वस्तूंमध्ये तसे होत नाही.
  • इक्विटी मार्केटमधील भागधारक लाभांशासाठी पात्र मानले जातात. दुसरीकडे, कमोडिटी मार्केटमध्ये लाभांशाची तरतूद नाही.

शेअर आहे की रॉकेट? गुंतवणूकदारांची लाईफ बदलली, ३ वर्षात जबरदस्त रिटर्न्स, स्टॉकचे नाव लक्षात ठेवा!
भारतातील प्रमुख कमोडिटी एक्सचेंजेस
देशात कमोडिटी ट्रेडिंगसाठी प्रमुख एक्स्चेंज आहेत. यामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (NCDEX) तसेच युनिव्हर्सल कमोडिटी एक्सचेंज (UCX), नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज (NMCE), इंडियन कमोडिटी एक्सचेंज (ICEX), ACE डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटी एक्सचेंज लिमिटेड यांचा समावेश आहे.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

कमोडिटी बाजारात ट्रेडिंग कशी होते?
तुमहाला कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग सुरू करायची असेल तर डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खाते तुमचे सर्व व्यवहार आणि होल्डिंग सुरक्षित करेल, मात्र तुम्हाला एक्सचेंजवर ऑर्डर देण्यासाठी ब्रोकरद्वारे जावे लागेल.

Latest posts