Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2559

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

29

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

woman’s body was found in Palghar; पालघरमध्ये शेतात महिलेचा मृतदेह आढळला

0

पालघर: पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच 50 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मांडे गावाच्या हद्दीत घडला आहे. पद्मा बहादुरसिंग बिक (50) असे मृत महिलेचे नाव असून त्या माकणे येथे वास्तव्यास होत्या. त्या मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Mumbai Police : मोबाइलवरून भांडण, १६ वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल, मुंबई पोलिसांमुळे मिळालं जीवदान

मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील माकणे येथील 9 स्टार लँडमार्क या इमारतीत वास्तव्यास असलेली मूळ नेपाळ येथील रहिवासी पद्मा बहादुरसिंग बिक (50) ही महिला काही कामानिमित्त सोमवारी सायंकाळच्या सुमारास माकणे नाक्यावर गेली होती. मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. महिला घरी आली नसल्याने घरच्यांनी रात्रभर तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मांडे गावाच्या हद्दीतील मुजबादेवी मंदिराच्या समोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या प्रसन्न हरीश ठाकूर यांच्या शेतात महिलेचा मृतदेह स्थानिकांना आढळला. हा मृतदेह पद्मा बहादुरसिंग बिक यांचा असल्याची आणि संपूर्ण घटनेची माहिती त्यांचा मुलगा मदन बहादुरर्सिंग बिक आणि स्थानिकांनी सफाळे पोलिसांना दिली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

घटनेची माहिती मिळताच पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी व सफाळे पोलिस दाखल झाले. मृतदेह व घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. महिलेच्या चेहऱ्यावर घाव घातल्याचे, त्याचप्रमाणे तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळून गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलेच्या गळ्यात सोन्याची चेन, कानातले आणि मोबाईल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र असा कुठलाही ऐवज मृतदेहाजवळ तसेच घटनास्थळी आढळून आला नाही. पोलिसांना घटनास्थळी महिलेची चप्पल, रिकामे पाकिट व एका पिशवीत दारुची बाटली आढळून आली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भादवि 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Ind Vs Aus Wtc Final 2023; भारत की ऑस्ट्रेलिया WTC फायनल कोण जिंकणार? दोन्ही संघांची बलस्थानं ते कमजोरीचा रिपोर्ट काय सांगतो?

0

लंडन: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या अंतिम फेरीची लढत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये आजपासून सुरु होत आहे. आजपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर अंतिम फेरीची लढत सुरु होणार आहे. दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी तयार आहेत. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या संघामध्ये जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही संघांची ताकद आणि कमजोरी आणि संघांचे एक्स फॅक्टर याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे.

भारतीय संघाची ताकद

भारतीय संघाची अंतिम फेरीतल बलस्थान हे जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे आहेत. ओव्हलच्या खेळपट्टीवर दोन्ही अधिक धोकादायक ठरू शकतात. याशिवाय भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये आल्यानं ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. चेतेश्वर पुजारानं काऊंटी क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत तो संघासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो. लंडनमध्ये भारतीय मोठ्या संख्येनं असल्यानं मोठे चाहते देखील मोठ्या संख्येनं दाखल होऊ शकतात.

भारतीय संघाची कमजोरी

भारताचा विकेटकीपर रिषभ पंत जखमी झाल्यानं तो संघाबाहेर आहे. जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल यासारखे दिग्गज खेळाडून टीममध्ये नाहीत. या खेळाडूंचं संघात नसणं भारतासाठी तापदायक ठरू शकतं. रोहित शर्माचं फार्मात नसणं देखील चिंताजनक आहे.

एक्स फॅक्टर- प्रचंड फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर शुभमन गिल डब्ल्यूटीसीमध्ये फायनल संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. आयपीएलमधील फॉर्म त्यानं कायम ठेवल्यास भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.

विशेष बाब : सध्या भारतीय संघात समावेश असलेल्या कोणत्याही गोलंदाजानं इंग्लंडमध्ये एका डावात पाच विकेट घेतलेल्या नाहीत.
London Weather Report: WTC फायनलमध्ये पाऊस व्हिलन ठरणार? असे आहे लंडनचे हवामान, पुढील ५ पैकी…

ऑस्ट्रेलियाची ताकद

ऑस्ट्रेलियाची ताकद त्यांच्या ऑलराऊंड यूनिटमध्ये आहे. याशिवाय त्यांच्याकडे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. ते कोणत्याही वेळी डाव पलटवण्याची क्षमता ठेवतात. याशिवाय सलामीवीर उस्मान ख्वाजा या स्पर्धेत ७० च्या सरासरीनं धावा काढतोय. तो संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क भारतीय फलंदाजांसाठी संकट ठरु शकतो.

कमजोरी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड संघाबाहेर गेला आहे. त्यामुळं त्यांच्यापुढं अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर, मधली फळी दबाव आल्यास चांगली कामगिरी करण्यास असमर्थ ठरु शकते.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला
एक्स फॅक्टर- ऑस्ट्रेलियाचा अनुभवी दिग्गज ऑफ स्पिनर नॅथन लायन फायनलमध्ये संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. भारतीय फलंदाजांना

विशेष बाब- ऑस्ट्रेलियानं १९८५ ते २०१९ पर्यंत द ओवलमध्ये १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ २ सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामने अनिर्णित झाले तर पाच कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे वादंग

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Siblings Wnter Wooden Box While Playing Found Dead Hours Later; लाकडी खोक्यात सापडले चिमुकल्या भावंडांचे मृतदेह

0

दिल्ली: दिल्लीमध्ये दोन भावंडांचे मृतदेह लाकडाच्या खोक्यात सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. आग्नेय दिल्लीतील जोगाबाई एक्स्टेन्शनमधील गोदामात असलेल्या लाकडी खोक्यात दोन भावंडांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली. नीरज आणि आरती अशी दोघांची नावं आहेत.

दोन मुलांचे मृतदेह लाकडी खोक्यात सापडल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. आठ वर्षांचा नीरज आणि सहा वर्षांची आरती परिसरात खेळत होते. खेळता खेळता दोघे लाकडी खोक्यात अडकले. नीरज आणि आरती दिसत नसल्यानं कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. बेपत्ता झाल्याच्या चार तासांनंतर दोघांचे मृतदेह सापडले. श्वास गुदमरल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
माझं सौभाग्य गेलं! मृतदेहाजवळ बसून महिला ओक्साबोक्शी रडली; पोलिसाला संशय, फोन फिरवला अन्…
मुलांचा शोध न लागल्यानं मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पालकांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन लावला. आरती आणि नीरजचे वडील बलबीर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पत्नी आणि पाच मुलं असा त्यांचा परिवार आहे. दोन मुलांच्या अकाली निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

‘आम्ही परिसरात चौकशी केली. दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही मुलं दिसली होती. जेवल्यानंतर ती खेळायला बाहेर पडली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांनी गोदामात असलेला लाकडी खोका उघडला. त्यात मुलांचे मृतदेह आढळन आले,’ अशी माहिती आग्नेय दिल्लीचे पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी दिली.
पुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं, कुटुंबाला बोलावलं अन् मग…
पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऑटोप्सी अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. ‘गुन्हे शाखेनं दोन्ही मुलांच्या मृतदेहाचं नीट निरीक्षण केलं. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळलेली नाही. श्वास गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला असावा,’ असं देव यांनी सांगितलं.

Rent home app, ​अरे वा! आता भाड्यानं घर शोधताना एजंटची गरज नाही, ‘हे’ ५ ॲप्स करतील मदत – if you are looking to rent a house or pg flat this 5 apps will help know details

0

99ACRES

99acres

हे 99acres.com या लोकप्रिय प्रॉपर्टी ॲपच्या मदतीने युजर्स मोफत घर भाड्याने घेऊ शकतात. या ॲपमध्ये वापरकर्त्याला उच्च दर्जाची चित्रे, व्हिडिओ आणि नकाशांद्वारे प्रॉपर्टीची संपूर्ण सविस्तर माहिती मिळते. या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांची नोंदणी केली गेलेली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना विविध पर्यायांच्या बाबतीत कोणतीही अडचण येत नाही. येथे तुम्ही घरमालकाशी थेट बोलू शकता, संपर्क क्रमांक मिळवू शकता. यासोबतच टेक्स्ट आणि ई-मेलची सुविधाही दिली गेली आहे.

वाचा : NASA News : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची कमाल, एकाच फोटोत सामावल्या ४५ हजार आकाशगंगा

MAGICBRICKS

magicbricks

मॅजिकब्रिक्स ॲपमध्ये जीपीएस हे खास फीचर आहे, जे तुम्हाला हवं त्या लोकेशनवरील अचूक ऑप्शन्स दाखवते. तसंच कंपनीने ॲपचा इंटरफेस साधा ठेवला असून त्यामुळे तो वापरण्यासाठी सोपा आहे. या ॲपमध्ये वापरकर्त्याला थेट घरमालकाशी संपर्क साधता येतो. तुम्हाला हव्या तशा चांगल्या प्रॉपर्टीसाठी अलर्ट देखील येथे मिळू शकतात.

वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे

​OLX

olx

वापरलेल्या सेकंड हँड वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी OLX हे लोकप्रिय ॲप भाड्याने घर मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे. यातही जीपीएसच्या मदतीने तुम्हाला ज्या भागात घर हवे आहे, त्याचे पर्याय दाखवले जातात. संपर्क क्रमांकापासून घराची सर्व माहिती आणि छायाचित्रे याठिकाणी उपलब्ध असतात. यात युजर सोप्या पद्धतीनं लॉग इन करू शकतो आणि भाड्याने घर मिळवू शकतो.
​वाचा : Fake Call Alert : फेक व्हिडीओ कॉलमुळे होतेय अनेकांची फसवणूक, सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा’या’ स्टेप्स

​NESTAWAY

nestaway

तुम्ही जाहिरातींमध्ये Nestaway बद्दल ऐकले असेल. हे ​ॲप देखील भाड्यानं घर शोधण्यासाठी एक भारी ॲप आहे. यामध्ये प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीला भेट देण्यची सुविधाही मिळते. याठिकाणी भाडे करार इत्यादी देखील ​ॲपवरूनच केले जाऊ शकते.

​वाचा : WWDC 2023: फक्त ‘या’ आयफोन मॉडेल्सनाच मिळणार iOS 17 अपडेट, पाहा संपूर्ण यादी

​FLATCHAT

flatchat

फ्लॅटचॅट हे ॲप दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये सक्रिय आहे. तुम्ही येथे साइन अप करून भाड्याने घर तसंच पीजीमध्ये राहण्यांसाठी फ्लॅटमेट निवडण्याची देखील क्षमता आहे. या ​ॲपमध्ये तुम्हाला बजेट आणि ठिकाणांच्या दृष्टीने बरेच पर्याय देते. नंतर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घर निवडू शकता.

वाचा : Airtel चं सिम वापरता? प्लानमधील डेटा संपला, स्वस्तात करू शकता रिचार्ज, फक्त १९ रुपयांपासून किंमत सुरू

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

Will the WTC Final be disrupted by protestors? This is why the ICC is wary | Cricket News

0

NEW DELHI: The International Cricket Council (ICC) has prepared two pitches for the much-anticipated World Test Championship Final between India and Australia starting today (June 7) at the Oval in London.
The ICC took the step in response to the threat posed by the ‘Just Stop Oil’ protesters, who have been disrupting major sports events in the UK.
‘Just Stop Oil’ is an environmental activist group founded in February 2022 which aims at making the British Government stop fossil fuel licensing and production.

WTC-Gfx

Keeping the threat in mind to the Oval, security has been beefed up at the venue.
Both captains Rohit Sharma and Pat Cummins have been taken into confidence.
The ICC in fact has added a new clause – 6.4 – to the playing conditions, just in case the pitch is damaged in any way due to the protests that might or might not affect the WTC Final.
First of all, if there is a pitch invasion, the on-field umpires will determine if it is unsafe or unreasonable to continue playing on the match pitch, they will halt the game and immediately inform the ICC match referee under sub-section 6.4.1.
Under 6.4.4, if the decision is to not resume play, the on-field umpires will assess whether the existing pitch can be repaired and the match can resume from the point it was stopped in consultation with the ICC match referee. The ICC match referee must consider whether this repair would unfairly advantage either side or not, given the play that had already taken place on the ‘dangerous’ pitch.

WTC-Gfx2

Under 6.4.7- throughout the decision-making processes that are mentioned above, the ICC match referee will keep both captains and the head of the ground authority informed about the situation. The head of the ground authority will ensure appropriate public announcements are made timely.
The WTC final will begin at 3 pm IST from June 7. There is also a reserve day on June 12 in case of any substantial loss of playing time due to rain interruptions.
Australia captain Pat Cummins said he hopes ‘Just Stop Oil’ protesters will not disrupt the WTC final against India after his team’s bus was held up on the way to training.
Protesters stopped traffic near The Oval on Monday and had to be cleared by police before the Australian team could reach the venue for training.
England’s team bus was held up by the same protesters when heading to Lord’s ahead of the first day of their one-off Test against Ireland last week.
“It’s something we got in the security briefing a couple of days ago,” Cummins told reporters.
“I’ve heard that they’re aware of it and kind of keeping an eye out. But that’s as much as we’ve heard.

WTC-Gfx3

“So hopefully, it doesn’t happen, obviously. But yeah, I’ve heard there are a few different events that have been affected.”
‘Just Stop Oil’ protesters halted the World Snooker Championship and the English Premiership rugby final in recent months.
One protester climbed onto a table and scattered a bag of orange powder paint at the snooker tournament while protesters invaded the pitch 15 minutes into the rugby match at Twickenham between Saracens and Sale.
Cummins has long voiced concerns about the impact of climate change but did not throw his weight behind the demonstrations.
“My view is always that there are right ways to go about things and potentially not the right way to go about things,” he said.
“Whenever anyone’s got any beliefs, you just hope you take the right option.”

cricket match

(With inputs from agencies)

Bhatia: Sabeer Bhatia bets big on short format videos to mentor entrepreneurs

0

Remember Sabeer Bhatia, who co-founded Hotmail in 1996, and then led what was one of the first email service providers as president and CEO, till its acquisition by Microsoft in 1998? The Silicon Valley based serial entrepreneur, who believes in simplicity behind successful business ideas, is now looking to bring innovation to the world of entrepreneurship using short-form video content with his new company ShowReel, of which he is a co-founder.
“I have created a content focussed management programme on entrepreneurship with short form videos, each 24-25 minutes long. These provide a good sense of all aspects of entrepreneurship and what it takes to become an entrepreneur. The new generation has a short attention span and they are not reading books; instead they are watching short form videos.” Bhatia told the Times of India in a recent interview. He believes that the future of education through short form videos, which have been created with artificial intelligence, will be a game changer.
“As a great start to test our product, we have brought 500 start-ups on our platform. The future will be to support entrepreneurs around the world and build partnerships for our product,” he said.
While Bhatia believes that AI is the new technology that will destroy and disrupt many sectors and jobs; he feels that out-of-the-box thinkers who are looking to solve problems, that have so far not been solved, will flourish. “We are at that moment in history when jobs that depend on a certain body of knowledge are in jeopardy and there is no turning back. I created videos of what would have earlier been one-hour lectures in two and a half minute packages. Earlier it would take a year to create these videos; now I personally made them in two weeks,” he said. He added that with lot of unemployment and job losses in different sectors it was increasingly important to create a mentorship and support platform for entrepreneurs with content created with AI.
Bhatia is excited about the future of ShowReel and is now toying with different business models for the company. “The business plan in coming months will be first to educate entrepreneurs and later deploy capital to fund some of them. Initially, it’s an opportunity to get educated on the platform through the free videos, later we could create testing facilities and provide a certificate for a small fee,” he said.
ShowReel has a big focus on India and already has a development team working from Kochi in Kerala and smaller teams based in Silicon Valley and the East Coast of the US. “We also plan to use the short form video format to build more and more content and present knowledge and education on several other topics including health and religion through the ShowReel platform,” Bhatia said.
On the personal front, Bhatia travels to India at least two to three times a year and is now planning a bicycling trip from Bengaluru to Mysore later this month. “My new passion is biking trips to explore different locations and places in India, especially parts where I have never been, such as North East and Kashmir. I would love to explore India’s rich history and culture through bicycling,” said Bhatia who is an avid biker around Los Altos Hills in Silicon Valley where he lives. “It’s a great way to explore places and neighbourhoods that you have never seen before. My biking trips in the Bay Area have helped me to experience nature and see towns and cities that I would never have done when I was driving a car on the freeways,” he said. He explained that on a recent 77-mile bike ride around Gilroy, a city in his neighbourhood in California, he discovered hills and wineries that he had never seen before despite having lived in the area for several years. And even though he is aware of the challenges that bikers in India face; Bhatia hopes that he will be able to explore places which are outside large metros using routes with good roads. “Some of my friends in India are keen bikers and they usually start very early in the morning and ride on routes away from the bustle of metros. I would love to do the same and explore places and nature at the ground level rather than as someone’s guest in a big car,” he said.
Not surprisingly, the co-founder of Hotmail is not willing to sign out of email just yet. “People have been talking about the demise of email for the longest time. But its usage continues to grow and it remains the best tool for businesses to communicate with their customers,” Bhatia said.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला

0

मुंबई:एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतल्यानंतर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आतापर्यंत शिंदे गटाच्या शिवसेनेकडून राज्यभरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते गळाला लावले जाताना दिसत होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी यापुढे जात थेट शिवसेना भवनात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाच्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमलाच गळाला लावले आहे.

शिवसेना भवनातील या कर्मचाऱ्यांनी उद्धव गटाला रामराम ठोकल्यानंतर चांदिवली येथील एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत शिवसेनेत केला प्रवेश केला. यामध्ये अमोल मटकर, अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि सचिव अनिल देसाई यांचा विश्वासू असलेला कट्टर सैनिक अशी ओळख असलेल्या अमोल मटकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस; बॅनरवरुन फडणवीसांचा फोटो हटवला, रविंद्र चव्हाणांशी वितुष्ट

अमोल मटकर हे शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा कार्यकर्ता म्हणून पक्षात परिचित होता. दरवर्षी दसरा मेळावा, पक्षाचा आणि मार्मिकचा वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या आयोजनाची आणि मंचावरच्या बॅकड्रॉप पासून संपूर्ण नेपथ्याची जबाबदारी अमोल यांच्यावर असायची. तसेच पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियावरचे मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि व्हिडिओजचे डिझायनिंगच्या कामात महत्वाची भूमिका असायची.

डोंबिवलीत भाजप नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा, भाजप-शिंदे गटात धुसफूस, पोलीस अधिकाऱ्याला ‘ठाण्यातून’ पाठबळ?

विशेष म्हणजे २०१२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे गाजलेले स्लोगन ‘होय, करून दाखवलं !’ या कॅम्पेनमध्ये अमोल यांचा महत्वाचा सहभाग होता. याचबरोबर सेना-भाजप युती सरकारमध्ये परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात सर्व नव्या शिवशाही एसटी बसेसवरचे महाराष्ट्रभरात पोहचलेले लोगो सुद्धा त्यांनीच डिझाईन केले होते. यंदाच्या वर्षात स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचा मराठी लोगो सुद्धा अम्ब्रेला डिझाइन्स यांच्या संकल्पनेतून साकारलेली अमोल यांचीच कलाकृती. त्यामुळे पक्षातील एक महत्वाचा शिलेदार ठाकरे गटाने गमावल्याची शिवसेनेत चर्चा आहे. आता ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी काय पावले उचलली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कल्याण लोकसभा पुन्हा शिवसेना लढवणार की भाजपला सोडणार?

WTC Final 2023 India vs Australia Oval London Weather Report; WTC फायनलमध्ये पाऊस व्हिलन ठरणार? असे आहे लंडनचे हवामान, पुढील ५ पैकी…

0

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलची लढत आज दक्षिण लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि त्यासाठीचा टॉस २ वाजून ३० मिनिटांनी होईल. जो संघ ही कसोटी जिंकेल तो कसोटी क्रिकेटचा नवा चॅम्पियनश होईल. दोन्ही संघासाठी द ओव्हल हे न्यूट्रल व्हेन्यू आहे. या मैदानावर दोन्ही संघाचे रेकॉर्ड एक सारखे आहे.

क्यूरेटर काय म्हणतात…

द ओव्हलचे मुख्य क्यूरेटर ली फोर्टिस यांनी मंगळवारी सांगितले की, फायनल मॅचमध्ये चेंडू उसळी घेईल. ओव्हलचे पिच पारंपारिक असून तेथे चेंडूला उसळी मिळते आणि फलंदाजांना फायदा होतो. पण यावेळी मात्र पिच कसे असेल याबाबत अनिश्चितता आहे. मॅचच्या पूर्वसंधेला पिचवर गवत दिसत होते. अर्थात खेळ सुरू होण्याआधी गवत कापले जाऊ शकते. ढगाळ वातावरण असेल तर ऑस्ट्रेलियाला फायदा मिळू शकतो. याउटल स्वच्छ प्रकाश असेल तर टीम इंडियाला फायदा होईल.

IND vs AUS: जेतेपदासाठी लढत ऑस्ट्रेलियाशी; ती खोचक शेरेबाजी संपुष्टात आणण्यासाठी टीम इंडिया उत्सुक
द ओव्हलचे पिच रिपोर्ट

मॅचच्या एक दिवस आधीपर्यंत पिचवर गवत दिसत होते. या पिचचा गेल्या ११ वर्षाचा इतिहास सांगतो की येथे झालेल्या १० कसोटी मॅच पैकी फिरकी आणि जलद गोलंदाजांच्या सरासरी फार काही फरक पडला नाही. कर्णधार रोहित शर्मा देखील म्हणाला की, जी परिस्थिती दिसते त्यानुसार जलद गोलंदाजांना मदत मिळणार असे दिसते.

ऑल द बेस्ट टीम इंडिया! १० वर्ष वाट पाहतोय यावेळी ट्रॉफी जिंकाच; भारताला फायनलसाठी शुभेच्छा द्या…
कसे आहे लंडनचे हवामान

फायनल मॅचच्या पहिल्या ३ दिवशी हवामान चांगले असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान २० डिग्रीच्या आसपास असेल. मॅचच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी तसेच राखीव दिवशी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

जेतेपदाच्या या लढतीसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर पाच दिवसाच मॅचचा निकाल लागला नाही किंवा पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे काही तास वा दिवस वाया गेला तर मॅच सहाव्या दिवशी खेळवली जाईल.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

कोकण रेल्वेमार्गावर धावणार वन-वे स्पेशल ट्रेन

0








रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान वन-वे स्पेशल ट्रेन दि. 9 जून रोजी धावणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01149 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन वन-वे स्पेशल ट्रेन ही वन-वे स्पेशल गाडी शुक्रवार, दि. 9 जून 2023 रोजी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे 5 वा. 30 मिनिटांनी सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

या गाडीला एकूण 16 एलएचबी श्रेणीचे कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम 01 कोच, एसी चेअर कार 03 कोच, सेकंड सीटिंगचे 10 कोच, एसएलआर – 01 तर जनरेटर कार 01 असे डबे या गाडीला असतील. वन वे स्पेशल गाडीचे थांबे ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.

हेही वाचा : 









हायवेवर रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, समोर दुचाकी; विचित्र अपघातात दोघांचाही अंत

0

पालघर: दोन दुचाकी आणि एका रिक्षाचा विचित्र असा अपघात डहाणू- जव्हार- नाशिक मार्गावर घडला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन जण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटी आणि मोटारसायकल अशा दोन दुचाकी आणि रिक्षा असा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे येणाऱ्या दुचाकीची समोरून डहाणूकडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर दोन्ही दुचाकींना पुन्हा रिक्षाने जोरदार धडक दिली. धोकादायक वळणावर ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune Accident: अल्पवयीन मुलांनी बाईक दामटवली; पुण्यात भीषण अपघात, दोघांचा करूण अंत
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कल्पेश दशरथ गोवारी (वय 30), हरेश मच्छी (रा. वापी) अशी भीषण अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दिलीप वरठा, माणिक डगला आणि पिंकी डगला हे तिघे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात मायलेकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर,वडील आणि दोन मुली गंभीर जखमी झाले होते.

शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत वाहतूक नियमावली तयार करण्यात आली आहे. ही वाहतूक नियमावली जिल्हाभर लागू करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालघर पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Latest posts