गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.
सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.
प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.
साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.
या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.
मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.
देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines
मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.
पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.
भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज
भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.
दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!
2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.
२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.
हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.
“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.
26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.
“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.
माणसं सांभाळण्याची जबाबदारी
निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.
लंडन :विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फलंदाजांचा विचार केला तर त्यातही या दोघांची नावं आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये कमाल करून दाखवलेली आहे, तर स्मिथला कसोटीत कोणाची टक्करच नाही. ५००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मिथहून अधिक सरासरी फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचीच आहे. विराटच्या नावावर कसोटीत असा विक्रम नाही पण त्याने जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये विराटचा नेहमीत धाक राहिलेला आहे.इंग्लंडमध्ये विराट आणि स्मिथचा कसोटी विक्रम बहुतेक संघ आपल्या होम ग्राउंडवर किंवा मग विरोधी संघाच्या घरच्या मैदानांवर कसोटी सामने खेळतात. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC फायनल) अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. ७ जूनपासून दोन्ही संघ ओव्हल मैदानावर भिडतील. अशा परिस्थितीत केवळ इंग्लंडमधील रेकॉर्डला महत्त्व आहे. म्हणूनच विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथचा इंग्लंडमधील रेकॉर्ड कसा आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार विराट कोहली: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडमध्ये १६ कसोटी सामने खेळले आहेत. २०१४ मध्ये विराट पहिल्यांदा इंग्लंडला गेला होता. त्या दौऱ्यातील ५ कसोटीत विराटच्या बॅटमधून केवळ १३४ धावा निघाल्या. विराटने २०१८ च्या दौऱ्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि त्याच्या बॅटने कमाल दाखवली. यावेळी त्याने ५ कसोटीत ५९३ धावा ठोकल्या. २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या ५ कसोटींमध्ये विराटने केवळ २४९ धावा केल्या. २०२१ मध्ये विराटने २०१९-२१ कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही येथे खेळला होता. अशाप्रकारे विराटने १६ सामन्यात ३३.३३ च्या सरासरीने १०३३ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
स्टीव्ह स्मिथ: स्टीव्ह स्मिथबद्दल बोलायचे तर, परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विराटप्रमाणे स्मिथनेही इंग्लंडमध्ये केवळ १६ कसोटी सामने खेळले आहेत. लेग-स्पिनर म्हणून त्याने २०१० मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात तो पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर आणि दुसऱ्या डावात ९व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून एकूण १३ धावा निघाल्या. गोलंदाजीत ३ बळी घेतले. पण त्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. १६ कसोटी सामन्यांच्या ३० डावांमध्ये स्मिथच्या बॅटने इंग्लंडमध्ये १७२७ धावा केल्या आहेत. ५९.५५ च्या सरासरीने. यामध्ये ६ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
ओव्हल मैदानाबद्दल बोलायचे झाले तर, येथेही स्टीव्ह स्मिथचा वरचष्मा आहे. येथे ३ सामन्यांच्या ५ डावात त्याने ९७.७५ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विराटही येथे केवळ ३ सामने खेळला आहे. त्याच्या बॅटने २८.१६ च्या सरासरीने १६९ धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More
जळगाव: स्टेट बँकेत दरोडा घालून तीन कोटी रुपयांचे सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा दरोडा उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या घटनेत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेला 36 तास उलटून जाण्याच्या आत पोलिसांना या घटनेचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. पोलिसांच्या (Jalgaon SBI Robbery) या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव शहरात दोन दिवसापूर्वी कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत दरोडा घालण्यात आला होता. यामध्ये बँक मॅनेजरवर चाकू हल्ला करून 17 लाख रुपयांची रोकड आणि तीन कोटीहून अधिक रुपये किमतीचे सोने लूटण्यात आलं होतं. या गुन्ह्यात रायगड जिल्ह्यात कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना लाच घेतल्याच्या प्रकरणात निलंबित असलेल्या शंकर जासक (PSI involved in SBI Robbery) या बँकेत स्वच्छ्ता काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
या घटनेत पोलिसांनी पाच पथके तयार करून स्वतंत्र तपास यंत्रणा लावली होती. यामध्ये बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मनोज सूर्यवंशी यांची चौकशी केली असता त्यात वेळोवेळी तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला नातेवाईक असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या वडिलांनी हा दरोडा घातला असल्याचे सांगितलं. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली.
तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील घरी छापेमारी केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेल्या सोन्यासह 17 लाखांची रोकड हस्तगत करून त्यांना अटक केली. जळगाव न्यायालयात आज या तिघांना हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळाली.
reels
बँक दरोडा प्रकरणात बँकेची सुरक्षेबाबतचा निष्क्रियपणाही तितकाच जबाबदार असल्याचं समोर आले आहे. बँकेत जवळपास पाच कोटी रुपयांहून अधिकचे सोने आणि रोकड असा मुद्देमाल असताना बंदुकधारी सुरक्षा कर्मचारी नसणे, सिसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर कोणाच्याही हाती सहज लागेल अशा पद्धतीने समोरच ठेवणे असा हलगर्जीपणा होत असल्याचं स्पष्ट झालं.
याहून अधिक अशी गंभीर बाब म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम करणारे स्वच्छ्ता कर्मचारी लॉकरसह सर्वच आर्थिक व्यवहार होत असलेल्या ठिकाणी सहज जाऊन ते हाताळत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळेच हा दरोडा टाकण्यात दरोडेखोरांना यश मिळाले असल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच दरोड्यात सहभागी झालेल्या शंकर जासक या पोलिस उपनिरीक्षकास पोलिस दलातून कायमचे बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
NEW DELHI: In a thrilling encounter at Wembley Stadium on Saturday, Manchester City emerged triumphant over their cross-town rivals Manchester United with a 2-1 victory in the FA Cup final. Ilkay Gundogan‘s two-goal heroics ensured City’s domestic double and brought them one step closer to an unprecedented treble. The stage was set for an explosive clash as the game kicked off, and it took just 12 seconds for Gundogan to etch his name in the record books, scoring the fastest goal in the history of FA Cup finals. A perfectly timed volley off a Victor Lindelof clearance left United goalkeeper Stefan Ortega helpless and gave City an early advantage. As it happened: FA Cup Final Building on their early momentum, Pep Guardiola’s men dominated possession and dictated the pace in the first half. Their relentless pressure paid off when United’s Aaron Wan-Bissaka’s header brushed against the arm of Jack Grealish inside the box. Following a VAR review, the referee awarded a penalty, which Bruno Fernandes confidently converted to bring United back on level terms.
Controversy ensued as City protested against the decision, and Guardiola expressed his frustration as VAR did not intervene earlier when Kevin De Bruyne was seemingly fouled inside the United penalty area. Despite the setback, City continued to assert their dominance, while United struggled to create meaningful chances. The second half started in similar fashion to the first, with City once again making an immediate impact. Gundogan, showcasing his attacking prowess, found the back of the net from a Kevin De Bruyne free-kick, restoring City’s lead. David De Gea’s efforts to deny the shot proved insufficient, raising questions about his position as United’s first-choice goalkeeper.
City pressed for a third goal, with Gundogan coming close to completing his hat-trick. However, his strike was ruled offside after he turned in the rebound following a save from De Gea, denying Erling Haaland his 53rd goal of the season.
United launched a spirited comeback in the closing stages, with Marcus Rashford and Alejandro Garnacho narrowly missing opportunities to equalise. Deep into stoppage time, a goalmouth scramble saw the ball hit the City bar, but the Red Devils were unable to find the crucial goal.
With this victory, Guardiola secured his 11th major trophy as City boss and moved closer to an extraordinary achievement. Should City triumph over Inter Milan in the Champions League final on June 10, they will become only the second team in history, after Manchester United in 1998/99, to win the Premier League, FA Cup, and Champions League in the same season. (With inputs from AFP)
कोल्हापूर :आपल्या आयुष्याला पहिला वळण देणारा निकाल म्हणजे दहावीचा निकाल… या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. कोल्हापुरातील एका पठ्ठ्याची चक्क उंटावरून मिरवणूक निघाली. त्याला कारणही तसंच आहे. तू पास होणार नाही, असं मित्रांनी त्याला वर्षभर हिणावलं. पण पठ्ठ्या अभ्यास करत राहिला. सरतेशेवटी निकालादिवशी त्याने सगळ्या मित्रांची तोंडं बंद केली. मित्रांनीही त्याला सॅल्यूट ठोकून त्याची उंटावरुन मिरवणूक काढली… हा प्रसंग आहे कोल्हापुरातला आणि विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ सागर जाधव… समर्थ कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा करण्यात एक नंबर असलेला मुलगा. त्यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला तू पास होणार नाही असे वर्षभर चिडवत राहिले. मात्र पठ्ठ्याने आपलं लक्ष विचलित न होता अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ५१ टक्के गुण घेत पास झाला.
दापोलीच्या मनिषला छप्परफाड गुण, सर्वच विषयात पैकीच्या पैकी, १०० टक्के मिळवून बोर्डात पहिला दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात आपण ‘समर्थ’ असल्याचे दाखवून देत ५१ टक्के गुण मिळवून समर्थ पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. पण समर्थला आश्चर्याचा धक्का देत त्यांनी त्याची उंटावरुन मिरवणूक काढत समर्थच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
निकालात मुलींचा दबदबा पहायला मिळाला. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलांच्या तुलनेत मुलींनी निकालात बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून ७९ हजार ३६१ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी ७५ हजार ९२४ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण ४. ४१ टक्क्यांनी अधिक आहे. विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२५ टक्के असे आहे. लातूर विभागातून ४७ हजार ४४९ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी ४५ हजार ९५ मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. मुलांच्या तुलनेत ४.३८ टक्क्यांनी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०. ६५ असे आहे.
नंदुरबार: खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून पोलिसांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हे यांचा स्वीय सहाय्यक याने नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना रात्री उशिरा कॉल करून सांगितलं की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील प्रवाशांचा गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यासाठी पी.आर.पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांना या अपघाताची संपूर्ण माहिती घेण्यास सांगितली. परंतु ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे सत्य समोर आलं आहे. खासदारांच्या मतदार संघातील असल्याने मदत मिळावी, असं सांगत खासदारांच्या स्वीय सहाय्यक यांना कॉल केला होता. या भामट्याचा खोटेपणा आणि नंदुरबार पोलिसांचा वेळ वाया घालवत अपघाताची खोटी बातमी देत वारंवार पैशांची मागणी करणाऱ्याचा नंदुरबार पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल नंबर वरुन काहीतरी काम असल्याचा रात्री ११ वाजता मेसेज आला. त्यांनी तात्काळ त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगितले. त्या अन्वये पी.एस.आय मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, कॉलर याने त्याचे नाव प्रबोधचंद्र सावंत असे सांगून ते खासदार अमोल कोल्हे यांचे पीए असल्याचं सांगितलं. त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला, असे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले.
अजितदादांच्या बालेकिल्ल्यात वर्चस्वाचं राजकारण, लोकसभेसाठी भाचेजावयांमध्येच टक्कर! तसेच त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक ९८३४३९५८०९ यावर पी.एस.आय मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला. सदर कॉलर याने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे सांगितले. त्यांचे बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होऊन ४ लोकं मयत झाले असून ७ ते ८ लोक जखमी आहे. जखमींवर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत, असे पी.एस.आय मोहिते यांना सांगितले. त्याबाबत हद्दीतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पी.एस.आय मोहितेंनी माहिती घेतली. सदर कॉलरने वारंवार कॉल करून त्यांना गुंतवून ठेवले. त्यानंतर कॉलर रविकात फसाळे यांनी पुन्हा पी.एस.आय मोहिते यांना कॉल केला. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी ७ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यावर पी.एस.आय मोहिते यांनी त्यांना आम्ही फक्त पोलीस मदत देऊ शकतो, असं सांगितलं. ही बाब पी.एस.आय मोहिते यांनी खासदार यांचे पीए प्रबोध चंद्र सावंत यांना सांगितली. त्यानंतर रविकांत मधुकर फसाळे यांनी पी.एस.आय मोहिते यांना थोड्या वेळाने पुन्हा कॉल करून सांगितले की, डिझेलचे काम झाले आहे. कृपया आम्ही सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत. कृपया आम्हाला जेवणासाठी २ हजार रुपयांची मदत करावी, जेणेकरून प्रवासादरम्यान काहीतरी जेवण करतील. सदर कॉलर यांना अपरात्र असल्याने आणि दूर प्रवास करणे असल्याने तसेच खासदार अमोल कोल्हे यांचा मदत करणेबाबतचा निरोप असल्याने पी.एस.आय मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने फोन पे अकाऊंटवर १ हजार रुपयांची मदत पाठवली.
त्यानंतर अपरात्र झाल्याने सकाळी पी.एस.आय मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत सदर अपघाताचे घटनेबाबत खात्री केली. तेव्हा अशा प्रकारची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी व्यक्ती रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वापरून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहिती देऊन पोलिसांची आर्थिक फसवणूक केली. तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहिती देऊन विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवला आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे ४३४/२०२३ भा.द.वी कलम भा.द.वि. कलम ४२०, १८२ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुंबई: लंडनला पोहोचलेल्या टीम इंडियाच्या सर्वात सीनियर खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या अंतिम सामन्यात आपली जादू दाखवताना दिसेल. अलीकडे त्याला बराच काळ संघाबाहेर राहावे लागले होते. तब्बल १८ महिन्यांनंतर आता त्याची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. मात्र, या सामन्यापूर्वी रहाणेने मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघ सध्या लंडनमध्ये आहे, जिथे ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू लंडनला पोहोचले असून सरावात व्यस्त आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेने महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो संघाबाहेर होता तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. रहाणेने त्याचे कुटुंब आणि मित्रांचे आभार व्यक्त केले आहेत, ज्यांनी तो टीम इंडियातून बाहेर असतानाही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. तो म्हणाला, ‘हे माझ्यासाठी भावनिक होते. जेव्हा मी संघाबाहेर होतो तेव्हा मला माझ्या कुटुंबाचा मोठा आधार होता, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भारतासाठी खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मी माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले. मी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी पुन्हा भारतासाठी खेळू शकेन असा मला विश्वास होता.
सेलिब्रेशनची अति घाई अन् हातची विकेट गेली
राहुल आणि द्रविडचे कौतुक
रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. त्याने आतापर्यंत ८२ कसोटी सामन्यांमध्ये ४९३१ धावा केल्या आहेत. त्याने सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. रहाणे म्हणाला, ‘रोहित संघाला चांगल्या प्रकारे सांभाळतो आहे आणि राहुल द्रविड देखील संघाला खूप चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे. याने संघाला मदत मिळते आणि संघातील वातावरण खूप छान आहे. प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या सहवासाचा पूर्ण आनंद घेत आहे.
जुन्नर, पुणे : यंदाच्या वर्षीही दहावी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तरी पण चर्चा मात्र ज्यांना अनोखे गुण पडले असतील, त्याच विद्यार्थ्यांची होते. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी गावच्या एका विद्यार्थ्याने एसएसी दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. वैभव मोरे असं या विद्यार्थ्याचं नाव असून विशेष म्हणजे त्याचे आई वडील दोघेही शेत मजूर आहेत. काठावर पास झालेल्या वैभवचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.वैभव मोरे हा शेत मजूर जोडप्याचा मुलगा. कृष्णा मोरे हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून गेल्या १९ वर्षांपासून ते जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी येथे शेत मजुरीचे काम करतात. मोरे पती पत्नी दोघेही कमी शिकलेले असून परिस्थितीमुळे त्यांना अधिक शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे अशीच शेतीवर मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मुलाला सर्व विषयात ३५ गुण मिळाल्याने त्यांना आनंद झाला आहे. पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी नव्वद टक्क्यांहून अधिक मार्क मिळवणारे विद्यार्थी खुश असतातच, पण आजूबाजूच्या मित्रांचे मार्क पाहून त्यांना आणखी चुटपूट लागते. ७०-८० टक्केवाल्यांनाही थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. ५०-५५ वाले बऱ्याचदा नाराज असतात. कारण आणखी मार्क पडले असते, तर फर्स्ट क्लास असता, असं वाटत राहतं. पण ३५ गुण मिळवणाऱ्यांइतके समाधानी कोणीच नसतात. कारण एखाद्या विषयातही एखादा मार्क कमी पडला असता, तरी वर्ष पणाला लागलं असतं. त्यामुळे पास झाल्याचं समाधान मोठं असतं. आणखी एक-दोन टक्क्यांचाही त्यांना हव्यास नसतो.
वर्षभर मित्रांनी १० वी पास होणार नाही म्हणून डिवचलं; पठ्ठ्यानं करून दाखवलं, थेट उंटावरून मिरवणूक
वैभव म्हणाला की, मी अभ्यास केला होता, पण तिथे गेल्यावर जेवढं आठवलं तेवढं पेपरमध्ये लिहिले. मला वाटलं नव्हतं की मला सर्व विषयात ३५ गुण मिळतील. मी जेवढा अभ्यास केला, तेवढं लिहून पास झालो. माझ्या मित्रांना देखील मला असे मार्क्स पडल्याने आश्चर्य वाटले. वैभवला शाळेतील शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. गुण बघून वैभवच्या तोंडातून दोनच शब्द फुटले होते, ते म्हणजे ‘भारी ना’…
ठाण्याचा पठ्ठ्या काठावर पास! सर्वच विषयात ३५ मार्क्स; आई-वडील म्हणतात, आमचा विशाल… वैभवला शिक्षणात थोडा फार रस आहे. बाकीच्या वेळेत तो आपल्या आई वडिलांना शेतात मदत करतो. तर उरलेल्या वेळात तो क्रिकेट आणि कबड्डी खेळतो. येणाऱ्या काळात त्याला व्यावसायिक शिक्षणात रस असून त्याचे काहीतरी करण्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या गुणांची सर्वत्र हवा आहे.
पुणे : विधानसभा निवडणूक २०१४ चा काळ.. अजितदादांनी आपला समर्थक राहिलेल्या नेत्यालाच लक्ष केलं… ज्यांना भांग पाडता येत नाहीत, ते विधानसभेचं तिकीट मागतात, असा टोला लगावला. अजितदादांचा घाव वर्मी लागला आणि आमदार होऊनच कार्यकर्त्याने बदला घेतला. हा तडफदार आमदार म्हणजे महेश लांडगे… हेच महेश लांडगे आता शिरूरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. अशातच महेश लांडगेंच्या मामांचेही भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत. विलास लांडे लोकसभेच्या मैदानात उतरल्यावर भाचे जावयांमधील राजकीय संघर्ष पुन्हा पेटू शकतो.. विलास लाडे आणि महेश लांडगे हे भाचे जावई आहेत… मधल्या काळात महेश लांडगेंनी मामांच्या छत्र छायेखालीच काम केलं.. पण पुढे मामा भाचे आमनेसामने आले. विलास लांडे आणि महेश लांडगेंचा राजकीय संघर्ष पाहिला तर….
विलास लांडे २००९ ला भोसरीतून अपक्ष आमदार झाले
भोसरीचे पहिले आमदार म्हणून नावलौकिक मिळवला
२०१४ ला भाचेजावयाई असलेल्या महेश लांडगेंकडून लांडेंना आव्हान
अपक्ष लढत महेश लांडगेंची मामा विलास लांडेंवर मात
२००९ ला राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यावर विलास लांडे अपक्ष आमदार झाले खर…. पण त्यांच्या विजयाची पुनरावृत्ती महेश लांडगेंनीच हुकवली.
पक्षाने विश्वास दाखल्यास लांडे-लांडगे भाचेजावयांमध्ये सामना होण्याची शक्यता
विलास लांडे भोसरीचे आमदार झाल्यावर महेश लांडगेंनी त्यांच्या नेतृत्वात काम केलं. पण महेश लांडगेंनी विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केल्याने दोघांमध्ये अंतर वाढलं. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यावरही लांडगेंनी माघार न घेता झुंज दिली.. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित दादांचा बोलबाला चालणाऱ्या भागात ताकद लावून राजकारण यशस्वी केलं. अजितदादांनी केलेल्या अपमान डोळ्यामोर ठेवला, जोराची लढाई केली आणि आमदारकीपाठोपाठ महानगर पालिकेत प्रस्थ निर्माण केलं. कधीकाळी समर्थक असलेले महेश लांडगे आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांनाच टक्कर देताना दिसतात.. लांडे आणि लांडगे लोकसभेच्या मैदानात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
जळगाव : संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी आव्हान असलेल्या जळगाव शहरात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या ३६ तासात उलगडा करून तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या दरोड्याच्या घटनेत संशयितांनी तब्बल १७ लाख रुपयांची रोकड आणि ३ कोटी ६० लाख रुपयांचे दागिने असा मुद्देमाल लांबविला होता. हा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या जळगावतील मेहुणा आणि वडिलांना सोबत घेत हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. शंकर रमेश जासक असे अटकेतील पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्याचे वडील रमेश राजाराम जासक आणि मेहुणा मनोज रमेश सूर्यवंशी असे इतर दोघांची नावे आहेत. जळगाव शहरातील कालींका माता मंदिर परिसरात असलेल्या गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्या शाखेवर दरोडा पडल्याने जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आल्यानंतर कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन जण डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या कर्मचार्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचार्यांना कार्यालयातील शौचालायत कोंबून ठेवले.
Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने कुटुंबाचा आधार हिरावला, तीन सख्ख्या भावांचा मृत्यू त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जाऊन लॉकरच्या चाव्या मागितल्या. महाजन यांनी प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे दागिने आणि १७ लाख रूपयांची रोकड असा एकूण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर चोरून नेला. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेऊन ते पसार झाले.
दरोडेखोरांनी जळगाव शहराच्या बाहेर बँक कर्मचाऱ्यांचे जप्त केलेले मोबाईल तसेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर हा एका नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. पोलिसांनी डीव्हीआर जप्त केला होता. मात्र, पाणी गेल्यामुळे त्यातून माहिती संकलन करण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. तर एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दुचाकीवरून जात असलेले दोन दरोडेखोर कैद झाले होते. एवढाच धागा पोलिसांकडे होता आणि याच आधारावर संपूर्ण यंत्रणा काम करत होती.
परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, मुबारक तडवी ,परीस जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, विजय निकम, किरण वानखेडे, मुकुंदा गंगावणे, अमोल विसपुते, गिरीश पाटील, अश्विन हडपे अभिजीत सैंदाणे, सुनील पवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी या सर्वांची पथके जळगाव जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात गुन्ह्यात तपास करण्याचे अहोरात्र काम करत होते.
पॅरासिटामॉल कॉम्बिनेशनसह १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; माणसांसाठी धोकादायक, पाहा औषधांची यादी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मनोज रमेश सूर्यवंशी हा स्टेट बँकेमध्ये करार पद्धतीने ऑफिस बॉय म्हणून नोकरीला आहे. त्याला बँकेतील सर्व गोष्टींची माहिती होती, त्यानेच रेकी करून याबाबत त्याचे कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक असलेला शंकर जासक याला माहिती पुरवली होती. तब्बल १५ दिवस शंकर जासक याने प्लॅन करुन तब्बल १५ दिवस दरोड्याचा प्लॅन तयार केला आणि त्याचे वृध्द वडील आणि त्याचा मेहुणा मनोज यांना सोबत घेत दरोडा टाकला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
अटकेतील शंकर जासक हा रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक आहे. त्याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्यामुळे दोन वर्ष त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो नुकताच पुन्हा कर्तव्यावर हजर झाला होता. मात्र, एक वर्षापासून तो वैद्यकीय रजेवर असून याच काळात त्याने हा दरोडा टाकल्याचेही चौकशीत समोर आलं आहे. दरोडा टाकल्यानंतर संपूर्ण रोकड आणि दागिने शंकर हा त्याच्यासोबत कर्जत येथे घेऊन गेला होता. त्या ठिकाणाहूनच त्याला जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने अटक करत एकूण रोकड पैकी १६ लाख ४० हजार ३७० रुपये तसेच ३ कोटी ६० हजार रुपयांचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करून आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यात रमेश जासक याला न्यायालयीन कोठडी तर शंकर जासक आणि मनोज सूर्यवंशी यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष या गुन्ह्यात पोलीस महासंचालक स्वतः जातीने लक्ष घालून होते. ते जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याशी फोनवरून संपर्कात होते तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. तसेच खुद्द पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांच्यासह प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम या गुन्ह्याच्या तपासात काम करत होती.
शनिपेठ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यासह पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गुन्ह्याच्या तपासात रवाना करण्यात आलं होतं. पोलीस महासंचालकांचे गुन्ह्याकडे लक्ष असल्याने जिल्हा पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी भूक, तहान आणि झोप सर्व विसरून काम करत होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर गुन्ह्याचा उलगडा केला आणि तीन संशयितांना गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. गुन्ह्याचा जलद गतीने उलगडा केल्यामुळे जिल्हा पोलीस दलाचे खुद्द पोलीस महासंचालकांनी अभिनंदन केलं असून बक्षीस जाहीर केलं आहे. अवघ्या ३६ तासातच या गुन्ह्याचा उलगडा केल्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाची कॉलर पुन्हा टाइट झाली आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शनिवारी तुळजापूरला जाताना काही वेळ सोलापूरला विश्रांती केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्यावर प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाड यांनी अधिक बोलणं टाळलं. पण त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे थुंकण्यावरून सध्या वादात आहेत. यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही प्रत्येकाची स्टाईल असते, त्यांच्या त्यांच्या स्टाईल प्रमाणे बोलत असतात. आमच्यावर शरद पवार यांचे संस्कार आहेत. आम्ही कुणाचंही नाव घेतल्यावर थुंकत नाही. आम्हाला शरद पवार यांची भीती आहे’, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रकारे संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
शिंदे-पवार भेटीने कोणतंही वातावरण ढवळलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचं सिंहासन आधीच हललं आहे; संजय राऊतांनी डिवचलं
‘एकनाथ शिंदे यांचे विचार पटत नाही, बाकी मैत्री आहे’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावर जितेंद्र आव्हाड बोलले. ‘शरद पवार यांचे अनेक नेत्यांशी आणि उद्योगपतींशी वैयक्तीक संबंध आहेत. आम्ही व शरद पवार कुणाशी वैयक्तीक द्वेष ठेवत नाही. आमची विचारांची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांचे विचार आम्हाला पटत नाही. बाकी मैत्री आमची राहील’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या बाबतही आव्हाड यांनी सांगितलं. ‘पंकजा ही भाजपत राहील, तिला माध्यमांनी बाहेर ढकलू नये. तसेच महाराष्ट्र राज्यात भाजपला मोठं करण्यात तिच्या वडिलांचा आणि मामाचा मोठा हात आहे. पंकजाला भाजपमध्ये डावललं जातंय. भाजप नेत्यांना माहितीय कोण तिला डावलतय. हे भाजप नेत्यांना विचारा’, असं आव्हाड म्हणाले.
‘सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह बोललोच नाही’
‘ठाणे पोलिसांना दिलेला एकसूत्री कार्यकम आहे. दर आठवड्याला जितेंद्र आव्हाडवर एक गुन्हा दाखल केला पाहिजे. ठाणे पोलिसांनी एका खोट्या क्लिपच्या आधारे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. खरं तर क्लिप तपासायची असते, फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याची सत्यता पडताळून पाहायची असते. पण तसं पोलिसांनी केलं नाही. मी बोललो होतो,”सौ कुत्ते मिलकर एक शेर का शिकार नही कर सकते”, त्या जंगली या शब्दाच्या ठिकाणी दुसरा शब्द आहे. सिंधी समाजापेक्षा शिंदे गटाला अधिक घाई होती. पण जितेंद्र आव्हाड घाबरणार नाही. ही क्लिप घेऊन येणाऱ्यावर गुन्हे दाखल करा’, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अहमदनगर नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर असं नामकरण केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं होतं. राज्यभरातील विविध पक्षाचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारण्यात आलं आणि त्यांनी कान खाजवून प्रतिक्रिया दिली. ‘हे कान खाजवून जस बरं वाटतंय, तसं बर वाटल असेल. अहमदनगर जिल्ह्याला शहाजी आणि पिरजी या दोघांचा देखील इतिहास आहे’, असं आव्हाड यांनी सांगितलं.
‘चित्रपटाच्या माध्यमांतून द्वेष’
काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी चित्रपटानंतर आता गोध्रावर टिझर रिलीज झाला आहे. यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या वीस वर्षांपासून भारतात देशप्रेमवर एखादा सिनेमा आला का? चित्रपट हे असे माध्यम आहे जे लोकांपर्यंत थेट पोहोचतं. पण चित्रपटाच्या माध्यमांतून द्वेष पसरवला जात आहे’, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.