Wednesday, March 22, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2172

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

2

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

172

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Trump jury reconvenes, New York on edge over likely indictment

0

NEW YORK: A grand jury was set to reconvene in New York on Wednesday as it weighs whether to charge ex-president Donald Trump over hush money paid to a porn star.
With barricades outside Trump Tower and police on high alert, the city has been holding its breath over the expected indictment for days but the timing is uncertain.
The 76-year-old Republican would become the first former or sitting president to ever be charged with a crime if the panel votes to indict.
The unprecedented move would send shockwaves through the 2024 election campaign, in which Trump is running to regain office.
It would also raise the prospect of a former leader of the free world being arrested, booked, fingerprinted and possibly handcuffed.
Grand juries operate in secret to prevent perjury or witness tampering before trials, making it virtually impossible to follow their proceedings.
Manhattan District Attorney Alvin Bragg, who was spotted arriving at his office on Wednesday morning, has not confirmed any plans publicly.
Some US media have speculated that the grand jury could take a vote on whether to indict when it reconvenes on Wednesday afternoon after not sitting on Tuesday. It is unclear when Bragg would announce any charges.
Legal experts have suggested it would likely be next week before Trump — currently at his Mar-a-Lago resort in Florida — is arraigned before a Manhattan Criminal Court judge.
Bragg, an elected Democrat, formed the grand jury in January following an investigation into the $130,000 paid to Stormy Daniels in 2016.
The payment was made weeks before that year’s election, allegedly to stop Daniels from going public about a liaison she says she had with Trump years earlier.
Trump denies the affair and has called the inquiry a “witch hunt.”
– Trump calls for protests – His ex-lawyer-turned-adversary Michael Cohen, who has testified before the grand jury, told Congress in 2019 that he made the payment on Trump’s behalf and was later reimbursed.
The payment to Daniels, if not properly accounted for, could result in a misdemeanor charge for falsifying business records, experts say.
That might be raised to a felony if the false accounting was intended to cover up a second crime, such as a campaign finance violation, which is punishable by up to four years behind bars.
Analysts say that argument is untested and would be difficult to prove in court, and any jail time is far from certain.
An indictment would begin a lengthy process that could last several months, if not more. The case would face a mountain of legal issues as it moves toward jury selection and pose a security headache for Secret Service agents who protect Trump.
New York police erected barricades outside the courthouse and Trump Tower.
Trump had said, without evidence, that he would be arrested on Tuesday but the day passed with no signs of an indictment.
He has called for massive demonstrations if he is charged, fueling fears of unrest similar to the January 6, 2021 riot at the US Capitol, but so far protests have been small and muted.
Trump is facing several criminal investigations at the state and federal level over possible wrongdoing that threaten his new run at the White House, many more serious than the Manhattan case.
They include his efforts to overturn his 2020 election loss in the state of Georgia, his handling of classified documents, and his possible involvement in the January 6 rioting.
Some observers believe an indictment bodes ill for Trump’s 2024 chances, while others say it could boost his support.

wife suffering from cancer, तू माझा सांगाती! पत्नीला कायम सोबत घेऊन जातो फूड डिलिव्हरीसाठी; कहाणी वाचून डोळे पाणावतील – man takes cancer stricken wife with him for food parcel

0

गांधीनगर: कर्करोग धोकादायक मानला जातो. औषध विज्ञानानं बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कर्करोगावर मात करणं शक्य झालं आहे. मात्र त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते. काही जण कर्करोगाशी दोन हात करून त्यावर मात करतात. यासंबंधित बातम्या येत असतात. आता सोशल मीडियावर एका दाम्पत्याची कहाणी व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीच्या पत्नीला कर्करोग आहे. या आजारामुळे तिच्या मनात सतत नकारात्मक विचार यायचे. त्यामुळे पतीनं एक अनोखा निर्णय घेतला आणि दोघांची कहाणी व्हायरल झाली.

गुजरातमधील जोडप्याची कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राजकोटमध्ये राहणारे केतन भाई चरितार्थ चालवण्यासाठी फूड डिलिव्हरी करतात. केतन यांची पत्नी सोनल कर्करोगाशी लढा देत आहेत. पत्नी एकटी घरी राहून तिच्या मनात नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी केतन दररोज सोनल यांना घेऊन दुचाकीवरून फिरतात. सोनल यांचा कर्करोग चौथ्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांच्यावर ८ वेळा किमोथेरेपी करण्यात आली आहे.
अग्निवीरसाठी एकीकडे तरुणांची गर्दी; दुसरीकडे तब्बल ५० हजार जवानांनी नोकरी सोडली; कारण काय?
सोनल यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. मात्र या कठीण काळातही केतन हिंमत हरलेले नाहीत. पत्नी घरात एकटी राहू नये म्हणून ते तिला सतत सोबत ठेवतात. दोघे एकत्र फूड डिलिव्हरीसाठी जातात. त्यांना सोबत पाहून अनेक जण त्यांच्याकडे विचारणा करतात. केतन त्यांना आपली परिस्थिती, अडचण सांगतात. केतन यांची कहाणी आणि त्यांचं पत्नीवरील प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावतात.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

केतन आणि सोनल यांचा २००७ मध्ये प्रेमविवाह झाला. जवळपास ८ महिन्यांपूर्वी सोनम यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू होत्या. त्यामुळे केतन यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या. यातून सोनम यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हापासून सोनम उपचार घेत आहेत. सोनम घरी एकट्या असल्यावर त्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्या खचतात. ते टाळण्यासाठी केतन त्यांना स्वत:सोबत दुचाकीवरून सगळीकडे घेऊन जातात. सोनम यांना एकटं ठेवणं ते कटाक्षानं टाळतात.

पैसे दुप्पट करून देतो म्हणून ते ३ लाख रुपये घेऊन गेले, पण ठगाचा फसवणुकीचा प्लान अंगलट आला – police have arrested a man who pretended to double the money of a senior citizen

0

बारामती : आमच्याकडे असलेल्या काळ्या बाजारातील पैशातून तुम्हाला दुप्पट रक्कम देतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका ठगाला बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. एका बेरोजगार मुलाच्या वडिलांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या ठगाला पोलिसांनी रंगेहात पकडले. आपला मुलगा इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे कमी कष्टात अधिक पैसे मिळतील या हव्यासापोटी ६७ वर्षीय वयोवृद्धाची तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी दिलीप ईश्वरा सावंत (वय ६७ राहणार- सावंतपूर, तालुका- पलूस, जिल्हा- सांगली) यांनी फिर्याद दिली असून प्रसाद संजय टकले (वय २६, सध्या रा. प्रगतीनगर, शेळकेवस्ती, बारामती, मूळ राहणार- अहमदनगर) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या फसवणूक प्रकरणामागे गौतम पाटील नावाची व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलीस गौतम पाटील याचा शोध घेत आहेत

पैसे दुप्पट करून देतो अशा बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दिलीप सावंत यांना प्रसाद टकले याने फोन करून तुम्ही जेवढे पैसे आणाल त्याच्या दुप्पट करून देतो, माझ्याकडे ही रक्कम काळ्या बाजारातून आली आहे, असे सांगितले होते. वेळोवेळी फोन करत दिलीप सावंत यांना विश्वास देण्यात आला होता.सावंत यांचा मुलगा इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार आहे त्यामुळे कमी कष्टात अधिक पैसे मिळाले तर बरे, हा विचार दिलीप सावंत यांनी केला आणि ते या सापळ्यात अकडले. या भामट्याने त्यांना बारामतीत फलटण रस्त्यावर भेटीसाठी बोलावले. परंतु तेथे त्यांची भेट घेतली नाही. तत्पूर्वी नातेपुते, फलटण येथेही बोलावून घेतले होते, परंतु तेथेही भेट घेतलेली नव्हती.

पुण्यातील ओशो आश्रमात राडा, घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार
अखेर त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. सावंत यांनी येताना ३ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम दुप्पट करून घेण्यासाठी आणली होती. यावेळी एक भामटा एका बॅगेमध्ये वह्या तर दुसऱ्या बॅगेत नोटांचे बंडल घेऊन मोटारीतून (एमएच- ०९, बीबी-४३०७) आला. त्याने रस्त्यातच डिक्कीतील दोन्ही बॅगा फिर्यादीला दाखवल्या. यात लाखो रुपये आहेत, तुम्ही द्याल त्याच्या दुप्पट रक्कम देतो, असे सावंत यांना सांगितले.

यावेळी हे दोघेही एकमेकांना अजमावत होते. तुम्ही आणलेले पैसे द्या, लगेच दुप्पट पैसे देतो असे भामटा सांगत होता. तर तुम्ही बॅग उघडून पैसे मोजून दाखवा असे सावंत म्हणत होते. शहरातील फलटण रस्त्यावर हा प्रकार सुरू असताना शहर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकत सावंत यांच्यासह त्यांचा मुलगा व आणखी एकाला पोलिस ठाण्यात आणत चौकशी केली.

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का
टकले याच्याकडील बॅगची तपासणी केली असता बॅगेमध्ये प्रथमदर्शनी नोटांचे बंडल दिसून आले. परंतु बारकाईने पाहणी केली असता शंभर नोटांची पाचशे रुपयांची एक गड्डी व अशा एकत्र बपांधलेल्या दहा ते बारा गड्डींचा एक गठ्ठा असे चार गठ्ठे व त्यावर पाचशे रुपयांची एक खरी नोट लावण्यात आली होती. आतमध्ये नोटांचे झेरॉक्स तसेच लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचा समावेश होता. पोलिसांनी टकले याचा हा फसवणूकीचा प्रयत्न उधळून लावला.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गौतम पाटील नावाची व्यक्ती या फसवणूकीमागचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले. तो टकले याच्या मोबाईलद्वारे संपर्कात होता. पोलिसांनी टकले याला पकडल्यामुळे तो पसार झाला. गौतम पाटील याचे नावही बनावट असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

कोण आहे ही मुलगी? अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ; कोल्हापूरच्या चिमुकलीने मन जिंकलं
ही कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, संजय जाधव, तुषार चव्हाण, शाहू राणे, अशोक जामदार, अक्षय सिताप यांनी केली.

pune man fell in well with tempo, चालक उतरताच तरुणाने रिव्हर्स गियर टाकला, टेम्पोसह थेट ४० फूट खोल विहिरीत पडला… – man fell in well with tempo at katraj kondhava road after putting reverse gear fire brigade javan rescued him in pune

0

पुणे: एक व्यक्ती पिकअप टेम्पोसह विहिरीत पडल्याची थरारक घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली आहे. मात्र, अग्निशमन दलाने मोठ्या जिकरीने या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. जवळपास ३० मिनिटं हा सर्व थरार सुरु होता. मात्र, अखेर जवानांनी आपल्या जिवाची बाजी लावत त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढलं आहे.

बुधवारी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांनीकात्रज-कोंढवा रस्ता गोकुळ नगर येथील पुरंदर वॉशिंग सेंटर जवळ एक व्यक्ती पिकअप टेम्पोसह विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर दलाकडून कात्रज अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, अंदाजे ४० फुट खोल असलेल्या विहिरीमधे एक व्यक्ती पडली होती. ती कडेला असणाऱ्या एका दोराला पकडून उभी असून होती. ती खूप भेदरलेल्या स्थितीत होती. जवानांनी त्याला धीर दिला आणि तात्काळ त्याला वाचवण्याच्या कामात लागले.

शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवणाऱ्या मुस्लीम बांधवांचा जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ शेअर

जवानांनी मोठी रस्सी, रिंग पाण्यात टाकून जवान किरण पाटील यांना खाली विहिरीत उतरवले. जवान पाटील यांनी विहिरीत अडकलेल्या व्यक्तिशी संवाद साधत त्याला धीर देत त्याच्या कमरेला दोर बांधला आणि रिंगचा वापर करत सदर व्यक्तीला इतर जवानांनी सुखरुप बाहेर काढत त्याची सुखरुप सुटका केली. जवानांनी सुमारे तीस मिनिटात ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली.

समृद्धीचा १०० दिवसांचा रिपोर्ट, महामार्गावर ९०० अपघात अन् ३१ बळी…
याबाबत अधिक माहिती अशी की, पिकअप टेम्पो वॉशिंग सेंटर येथे आला असता वाहन चालक उतरून बाहेर जाताच विनोद पवार (वय ३५) यांनी टेम्पोत बसून टेम्पोचा रिव्हर्स गियर टाकला आणि अचानक टेम्पोसह पवार विहिरीत पडल्याची घटना घडली.

या कामगिरीत कात्रज अग्निशमन केंद्र अधिकारी संजय रामटेके, वाहनचालक बंडू गोगावले, तांडेल वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी सहभाग घेतला.

वडिलांनी चुकीच्या केंद्रावर सोडलं, पेपरला १५ मिनिटं; निशाला काही कळेना, तेवढ्यात तो आला…

sachin pilot, नरेंद्र मोदींचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होईल का? काँग्रेस नेत्यानं विजयाची पंचसूत्री सांगितली – sachin pilot said if congress work on five point formula then we will defeat pm narendra modi in lok sabha election

0

जयपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १ वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. २०२४ च्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीएचा पराभव होईला का असा प्रश्न विचारला जात आहे. विरोधकांची एकजूट होत नसल्याचं चित्र सध्यातरी दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकपूर्वी राजस्थानची विधानसभा निवडणूक होणार आहे. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेस सत्तेत असूनही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद मिटताना दिसत नाही. या दरम्यान सचिन पायलट यांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीएचा पराभव करता येईल का, असं विचारलं असता त्यांनी पंचसूत्री सांगितली.

सचिन पायलट यांना २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करता येणं शक्य आहे का असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारण्यात आलं. पायलट यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं का शक्य नाही, असा प्रश्न विचारला. आम्ही ज्यांना पराभूत करु शकत नाही असा कोणता पक्ष आहे, मी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाही पण काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या निवडणुका झाल्या, असं सचिन पायलट म्हणाले. तिथे निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहत होतो. डबल इंजिन सरकार असल्याचं सांगण्यात आलं, भाषण झाली, योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा प्रचारात होते, मात्र, आम्ही तिथं आव्हान दिलं आणि एकत्रित येत मजबुतीनं काम करत काँग्रेसचं सरकार बनवलं, असं सचिन पायलट म्हणाले.

सचिन पायलट यांनी पंचसूत्री सांगितली

काँग्रेसनं पाच मुद्यांवर काम केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय कोणत्याही पक्षाचा पराभव करु शकतो, असं सचिन पायलट म्हणाले.

रणनीती : सचिन पायलट यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीत पराभव करायचं असल्यास चांगली रणनीती बनवण्याची गरज असल्याचं म्हटलं. रणनीती ठरवण्यात प्रत्येक नेत्यांच्या संकल्पनांची गरज असल्याचं ते म्हणाले.

नरेटिव्ह : कोणत्याही राजकीय पक्षाला पराभूत करण्यासाठी नरेटिव्ह सेट करण्याची गरज असते. पक्षाचे कार्यकर्ते आणि संघटनेच्या सदस्यांनी त्या नरेटिव्ह नुसार काम करण्याची गरज असते, असं सचिन पायलट म्हणाले.

प्रचाराची मोहीम : कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी चांगल्या प्रचार मोहिमेची आवश्यकता असते. भाजपला म्हणजेच नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी चांगल्या प्रचार मोहिमेची गरज असल्याचं पायलट म्हणाले.

बाबांसोबत राहायला आई तयार होईना, १६ वर्षांची लेक चिडली, भररस्त्यात आईच्या चेहऱ्यावर फेकलं…

मुद्दे : कोणत्याही निवडणुकीत कुणाचाही पराभव करायचा असल्यास चांगल्या मुद्यांची निवड करणं आवश्यक असतं. जनतेशी संबंधित चांगले मुद्दे निवडेल पाहिजेत, असं पायलट यांनी सांगितलं.

जनसंपर्क : सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचा जनतेशी चांगला संपर्क असणं आवश्यक आहे, असं सचिन पायलट म्हणाले. त्यासाठी पक्षानं प्रत्येक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचं पायलट म्हणाले.

Thank You रासनेसाहेब, तुमच्यामुळे मला देश ओळखायला लागला, धंगेकरांचा चिमटा

भारताचे मतदार समजूतदार असून मतदारांकडे तरातू असतो. सत्तेचं केंद्रीकरण होणार नाही, याची ते दक्षता घेत असतात. महागाई, बेरोजगारी, तरुणांचे मुद्दे, गुंतवणूक, शिक्षण, वीज, चिकीत्सा, औषध उपचार या सारख्या मुद्यांवर चर्चा करुन निवडणूक जिंकून दाखवा, असं आव्हान सचिन पायलट यांनी दिलं.

तिसरा वनडे सामना सुरु असताना भारताला बसला मोठा धक्का, पाहा ऑस्ट्रेलियाने असं काय केलं…

IPL new rule allows captains naming of playing XI after toss: Report | Cricket News

0

NEW DELHI: The Indian Premier League (IPL) 2023 will see a new rule that will help captains to choose their final Playing XI after the toss, reported ESPNcricinfo.
The move would allow captains to come with the different team sheets and as per the toss result they will hand over their final Playing XI with the appropriate impact player included.
“Currently the captains have to exchange the team lists before the toss. This has been changed to exchange of teams immediately post the toss, to enable teams to choose the best XI depending on whether they are batting or bowling first. It will also assist the teams to plan for the impact player,” ESPNcricinfo reported.
Hence, the IPL joins the SA20 as the second T20 franchise event to permit teams to disclose their starting lineup following the toss.

cricket match

Teams list 13 players on the squad sheet for the SA20, which recently held its maiden season, before declaring their final XI after the toss.
The IPL has adopted a similar strategy currently, with another crucial element being neutralising the influence of dew, which has historically had a significant impact on matches at various Indian grounds, negatively affecting teams that bowl second.
Other IPL playing condition tweaks:
Over rate penalty of only four fielders outside the 30-yard circle for every over not completed in the allocated time.
Unfair movement of the wicketkeeper will result in a dead ball and 5 penalty runs.
Unfair movement by a fielder will result in a dead ball and 5 penalty runs.
(With ANI Inputs)

chhatrapati sambhajinagar farmer suicide, ४ वर्षीय लेकाला भावाकडे दिलं, नवरा-बायको शेतात गेले; सकाळी समोरचं दृश्य पाहताच घरचे हादरले – chhatrapati sambhajinagar young farmer couple ended their lives

0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण शेतकरी दाम्पत्याने शेतात आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. झालं असं की, आपल्या ४ वर्षीय एकुलत्या एक मुलाला आपल्या भावाच्या घरी सोडून रात्री शेतात राखण करण्यासाठी जातो म्हणून दोघे निघाले. मात्र, सकाळी शेतात दोघांचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांनी ही आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

ही घटना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील महालब्धा गावात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संदीप आळेकर (वय २८) आणि लता आळेकर (वय २५) असं मृत दाम्पत्याचे नाव आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, आळेकर यांनी कसण्यासाठी जमीन घेतली होती. दोघेही पती-पत्नी ही जमीन कसत होते. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यासह सोयगाव भागात जोरदार पाऊस झाला. शिवाय काही भागात गारपीट देखील झाली आहे. या अवकाळी पावसाने त्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे आळेकर हे चिंतेत होते. मंगळवारी रात्री संदीप आणि लता दोघांनी आपल्या चार वर्षीय एकुलत्या एक मुलाला संदीप यांनी आपल्या भावाकडे दिले.

त्यानंतर, ते दोघेही रात्री शेतात गेले. मात्र, आज सकाळ झाली तरी दोघेही घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता संदीप यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले तर लता या जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक भरत मोरे यांनी दिली आहे.

Thank You रासनेसाहेब, तुमच्यामुळे मला देश ओळखायला लागला, धंगेकरांचा चिमटा

daughter threw puncture solution on mother face, बाबांसोबत राहायला आई तयार होईना, १६ वर्षांची लेक चिडली, भररस्त्यात आईच्या चेहऱ्यावर फेकलं… – maharashtra crime news akola 16 years old daughter threw puncture solution on mothers face who denied to stay with father

0

अकोला : १६ वर्षीय मुलीने आपल्याच आईच्या चेहऱ्यावर चिकट द्रव्याने हल्ला केला. दुचाकीचं पंक्चर काढण्यासाठी चिटकवण्यात येणारं द्रव्य मुलीने आईवर फेकल्याचा आरोप आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीच्या मोठ्या पुलाजवळ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत हा आज सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान प्रकार घडला.

विशेष म्हणजे पती-पत्नीमध्ये वाद आहे, त्यात आईचा वडिलांजवळ राहण्यास नकार आहे, वेळोवेळी तिला वडिलांजवळ राहण्यास बोलावलं. मात्र तिच्याकडून नकार मिळत आला, याच रागातून तिने आईवर चिकट द्रव्याने हल्ला चढवला, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील गंगा नगर येथील अनिता चतुर्भुज अहिरवार या महिलेच्या चेहऱ्यावर पोटच्या १६ वर्षीय मुलीने चिकट द्रव्य फेकल्याची घटना घडली. ही घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मोर्णा नदीच्या मोठा पुलाजवळ जवळ आज ४ वाजताच्या सुमारास घडली.

दरम्यान अनिता हिचे तिच्या पतीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत, तेव्हापासून दोघेही पती-पत्नी वेगवेगळे राहतात. आपल्या आई वडील वेगवेगळे राहत असल्याचे त्यांच्याच मुलीला पाहवलं जात नव्हतं. म्हणून तिने अनेकदा दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला की दोघेही सोबत राहा. परंतु तिच्या आईकडून तिला वेळोवेळी सोबत राहण्यासाठी नकार यायचा.

आजही १६ वर्षीय मुलगी आपल्या आईला वडिलांजवळ राहण्यासाठी तयार करायला गेली. परंतु पुन्हा आईचा नकार आल्याने तिचा राग अनावर गेला. यावेळी तिने सोबत आणलेले चिकट द्रव्य म्हणजेच दुचाकीचं पंक्चर काढण्यासाठी चिटकवण्यात येणारं द्रव्य (सोल्युशन) आईच्या चेहऱ्यावर फेकले.

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

हे द्रव्य तिच्या चेहऱ्यावर तसेच डोळ्यात पण गेल्याने तिला इजा झाली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. लागलीच रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी महिलेला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सद्यस्थितीत महिलेची प्रकृती ठीक असून तिचे डोळेही व्यवस्थित असल्याचे समजते.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

दरम्यान, या घटनेवेळी नागरिकांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला असता. मुलींनी नागरिकांना चकवा देत पळ काढला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

तीन ग्लास, पाण्याची बॉटल न् अर्धवट खाल्लेला वडापाव; पण मृतदेहाची ओळख पटली ‘त्या’ खुणेने

delhi rajesh murder case, चाळिशीतील विवाहितेचा तिशीतील बॉयफ्रेण्ड, नवराही राजेश प्रियकरही राजेश, एकाने जीव गमावला अन्… – delhi crime married woman boyfriend arrested for killing husband coincidently both named rajesh

0

नवी दिल्ली : पतीची हत्या केल्या प्रकरणी विवाहितेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम दिल्लीच्या नजफगढमध्ये रविवारी पोलिसांनी कारवाई केली. ४२ वर्षीय विवाहित महिला आणि ३३ वर्षीय विवाहित पुरुषाचे अनैतिक प्रेमसंबंध होते. मात्र महिलेच्या पतीला याची कुणकुण लागल्यानंतर त्याने आक्षेप घेतला. या कारणावरुन दोघांनी मिळून चाकून भोसकून त्याची हत्या केल्याचे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

पश्चिम दिल्लीच्या नजफगढचा रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय राजेशची हत्या करण्यात आली. योगायोग म्हणजे विवाहित महिलेचा पती आणि तिचा प्रियकर (अर्थात हत्या प्रकरणातील आरोपी) या दोघांचेही नाव राजेशच आहे. दोन्ही राजेश पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागात आपापल्या कुटुंबासह राहायचे. दोघांच्या परिवारात पत्नी, मुलं आहेत. दोघंही एका सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत.

दरम्यान ४७ वर्षीय राजेशच्या ४२ वर्षीय पत्नीचा जीव ३३ वर्षीय राजेशमध्ये अडकला. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी याची कुणकुण महिलेच्या पतीला लागली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने दोघांच्या नातेसंबंधांना कडाडून विरोध केला.

दरम्यान, यामुळे महिला आणि तिचा प्रियकर बिथरले. गेल्या आठवड्यात दोघांनी महिलेच्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ती हरियाणातील सोनेपत येथे असलेल्या माहेरी जायला निघाली. तिने आपल्या दोन मुलांनाही सोबत घेतलं. निघण्यापूर्वी तिने प्रियकराला पतीचा ठावठिकाणा, त्याचं रुटिन, तो कधी कुठे कसा जातो, याची इत्यंभूत माहिती दिली.

तीन ग्लास, पाण्याची बॉटल न् अर्धवट खाल्लेला वडापाव; पण मृतदेहाची ओळख पटली ‘त्या’ खुणेने
महिलेने प्रियकराला आपल्या घराची अतिरिक्त चावी देऊन ठेवली होती. ती माहेरी जाताच प्रियकर दबक्या पावलांनी चावीने दार उघडत त्यांच्या घरी शिरला. त्यानंतर त्याने महिलेच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याचा आरोप आहे.

रिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक

महिला रविवारी दुपारी परतली आणि तिने पोलिसांना फोन करून पतीच्या मृत्यूची माहिती दिली. पोलीस चौकशीत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं की हत्येच्या दिवशी आरोपी राजेशला त्यांनी विवाहितेच्या घरी जाताना पाहिले होते. पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांनी कट रचल्याप्रकरणी महिलेलाही अटक केली.

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

youth killed by drowning, बेदम मारलं, तलावात फेकलं, तरीही तरुण बुडेना; मग अंगावर विटा टाकल्या; ‘तो’ वाद जीवावर बेतला – group of men takes life of youth by drowning him in pond

0

बाराबांकी: उत्तर प्रदेशच्या बाराबांकीमध्ये प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाचा जीव गेला आहे. एका टोळक्यानं तरुणाला मारहाण करून त्याला तलावात फेकलं. तरुणाला बुडवून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तरुण बुडत नव्हता. ते पाहून आरोपींनी त्याच्यावर विटा टाकल्या. यानंतर तरुणाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ माजली. अनेक बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीनं मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृताच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर दुसऱ्या गटाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना बाराबांकीमध्ये नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केवाडी गावात घडली. प्रेम प्रकरणातून दीड वर्षांपूर्वी एक वाद झाला होता. त्याच वादातून तरुणाचा जीव गेला. मोहम्मद जसीम असं मृताचं नाव असून तो २३ वर्षांचा होता.
कॉलेजनं टॉयलेटमध्ये लावले CCTV; मुख्याध्यापकांनी दिलेलं कारण वाचून डोक्यावर हात माराल
मोहम्मद जसीमचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे दीड वर्षांपू्र्वी दोन्ही बाजूंमध्ये कडाक्याचा वाद झाला होता. त्याच वादाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या पक्षानं जसीमवर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी जसीमला मारहाण केली. त्यानंतर त्याला तलावात फेकलं. जसीम बुडावा यासाठी त्याच्यावर विटा टाकल्या. यामुळे जसीमला पाण्यातून बाहेर पडता आलं नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. जसीम तलावाच्या जवळच दुकान चालवायचा.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

काही जण जसीमला मारहाण करत असल्याचं त्याच्या बहिणीनं घराच्या छतावरून पाहिलं. मारहाणीनंतर त्यांनी जसीमला तलावात ढकललं. त्याच्यावर विटा टाकल्या. जसीमला वाचवण्यासाठी त्याच्या बहिणीनं तलावाजवळ धाव घेतली. तेव्हा आरोपींनी तिलादेखील जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी अनेकदा ठार करण्याची धमकी देत होते. अखेर त्यांनी संधी साधली, असं मृताच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

Latest posts