Monday, May 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2523

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

25

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

27

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

20

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

19

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

19

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

19

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

23

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

256

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Wrestlers’ protest: FIR against organisers, others on charges of rioting, obstructing public servant | Delhi News

0

NEW DELHI: The Delhi Police on Sunday booked the organisers of the wrestlers’ protest at Jantar Mantar and their supporters on charges of rioting and obstructing public servant in discharge of duty after some of them were detained while marching to the new Parliament building.

The police said 700 people were detained across Delhi, including 109 protesters at Jantar Mantar.
According to a senior police officer, the FIR has been registered under sections 188 (disobedience to order duly promulgated by public servant), 186 (obstructing public servant in discharge of public functions), 353 (assault or use of criminal force to deter public servant from discharge of his duty), 332 (voluntarily causing hurt to deter public servant from his duty) of the Indian Penal Code (IPC).

Sections 352 (assault or criminal force otherwise than on grave provocation), 147 (rioting) and 149 (unlawful assembly) of the IPC have also been invoked.

Clash erupts between wrestlers and Delhi police; Sakshi Malik detained

03:55

Clash erupts between wrestlers and Delhi police; Sakshi Malik detained

Wrestlers Vinesh Phogat, Sakshi Malik and Bajrang Punia were among those detained.
(With PTI inputs)

Opposition leaders’ meeting will be held on June 12, Bihar CM Nitish Kumar tells JD(U) leaders

0

PATNA: The proposed meeting of non-NDA opposition leaders would be held in Patna on June 12, Bihar chief minister Nitish Kumar said here on Sunday.
Addressing a meeting of JD(U) leaders at the party’s state office here, Nitish said when he dumped the BJP in August last year and formed a new government in alliance with the RJD, Congress and others, the leaders of many political parties from across the country congratulated him. “Right now, we are working to unite the opposition parties from across the country against the BJP. Very soon, a positive result will come out. April 12 has been fixed for the meeting of opposition leaders,” Nitish told the party leaders.
It is widely understood in the state’s political circles that Nitish decided to reveal the date of the opposition leaders’ meeting only after he got a green signal about the said date from the Congress leadership and other leading opposition leaders like Sharad Pawar, West Bengal CM Mamata Banerjee and Tamil Nadu CM M K Stalin.
Sources in JD(U) said leaders of at least 16 opposition parties from different states have so far given their consent to attend the meeting being convened by Nitish Kumar as part of his efforts to unite all opposition parties against the BJP ahead of the 2024 Lok Sabha polls.
Sources in the grand alliance said, Nitish and his deputy Tejashwi Prasad Yadav have reached out, through different channels, to the leaders of almost all major non-NDA parties across the country and requested them to participate in the Patna meeting.
In the early morning on Sunday, Tejashwi called on Nitish at the latter’s residence before leaving for Kerala this afternoon. “It seems Tejashwi discussed the finalisation of the date before leaving for Kerala where he addressed a rally in Kozhikode,” a grand alliance leader said.
The major political parties, which have given their consent to join the opposition leaders’ meet, are Congress, Delhi CM Arvind Kejriwal-led Aam Aadmi Party (AAP), West Bengal CM Mamata Banerjee-led all India Trinamool Congress (TMC), Sharad Pawar-led Nationalist Congress Party, former Maharashtra CM Uddhav Thackeray-led Shiv Sena (UBT), Jharkhand CM Hemant Soren’s Jharkhand Mukti Morcha, former Uttar Pradesh CM Akhilesh Yadav-led Samajwadi Party, former Haryana CM Om Prakash Chautala-led Indian National Lok Dal (INLD), Rajya Sabha member Jayant Chaudhary-led Rashtriya Lok Dal, Maulana Badruddin Ajmal-led All India United Democratic Front (AIUDF), CPI, CPM and CPI-ML, sources in the JD(U) told this newspaper.

Ahmedabad Weather Forecast Tomorrow Monday 29 May 2023

0

IPL Final 2023 : अहमदाबादमध्ये आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाच्या ख्वाडामुळे आयपीएलचा महाअंतिम सामनाही होऊ शकला नाही. संततधार पावसामुळे आज एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाली नाही. आता सोमवारी सामना होणार आहे. पण सोमवारी पावसाने हजेरी लावली तर… अहमदाबादमध्ये सोमवारी हवामान कसे आहे.. काय सांगतो हवामानाचा अंदाज… 

सोमवारी अहमदाबादचे हवामान कसे आहे ?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. accuweather संकेतस्थळानुसार, अहमदाबादमध्ये सोमवारी ढगाळ वातावरण राहणार आहे. संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान अहमदाबादमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. संकेतस्थळानुसार, संध्याकाळी सात ते दहा वाजता पावसाची शक्यता आठ टक्के वर्तवण्यात आली आहे. तर रात्री 11 वाजता पावसाची शक्यता 20 टक्के इतकी आहे. त्यामुळे सोमवारीही फायनलवर पावसाचे सावट आहे. हवामान ढगाळ असून पावसाची अंधूक शक्यता नाकारता येत नाही. पाहा सोमवारी कसे असेल वातावरण…. 

(सौजन्य : accuweather )

उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात धो धो –
29 मे रोजी उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  बनासकांठा, पाटन, मेहसाणा आणि साबरकांठा येथे वादळी पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय राजकोट, अमरेली, भावनगर आणि कच्छ येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

अहमदाबादमध्ये कसे असेल सोमवारी हवमान

(सौजन्य – hi.meteocast.net)

सोमवारीही पाऊस थांबला नाही तर विजेता कोण ?
आयपीएलच्या सोळाव्या मोसमाचा विजेता कोण?  धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. पण अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे आज सामना झाला नाही. जवळपास चार ते पाच तास इथं जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरु होण्याची वाट पाहिली.. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. 

यंदाच्या मोसमात हार्दिक आणि धोनीच्या दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकणार होत्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा IPL सामना ठरण्याची शक्यता आहे.. त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी IPL च्या फायनलमध्ये धडक मारलीय. IPL च्या मागच्या मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं. यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहील. पण चारवेळा IPL जिंकणाऱ्या चेन्नईचं यंदा गुजरातसमोर तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर IPL च्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत…एकीकडे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला लागलीय.. मात्र दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

sports

CSK vs GT, IPL 2023 Final: Relentless rain moves final between Chennai Super Kings and Gujarat Titans to reserve day | Cricket News

0

NEW DELHI: The IPL 2023 final between Chennai Super Kings and Gujarat Titans was on Sunday moved to reserve day due to relentless rain in Ahmedabad.
The announcement was made at 10:55 pm local time.
The final between the two teams – GT and CSK – will now be played on Monday (May 29).
HIGHLIGHTS
Gujarat Titans will be declared winners if the reserve day is also washed out due to rain on Monday.

The defending champions Gujarat Titans had topped the points table after the 70-match league round, finishing as the only team to have won 10 out of 14 matches and 20 points. Chennai Super Kings had finished second with 17 points.

With the weather forecast not being too promising for the final on Sunday, it only kept getting worse for the fans who had turned up to pack the house.
It began drizzling just about half an hour before the toss time and the ground staff was quick to cover the centre with two separate layers of sheets, along with covering the areas of run-ups for fast bowlers.

But the intensity of downpour picked up heavily, along with thunder and lightning soon, and the fans who had filled up the stands in large numbers were forced to look for cover and retreat into the stands.
Huge puddles of water were also seen adjacent to the centre strip which remained uncovered.
The rain, however, did stop after 9:00 pm local time and the covers were taken off, with two super sopper already in action from around 8:30 pm IST.
However, heavy spell of rain returned to force the ground staff to cover the field again and players off the pitch, who had started warming up.
There were some serious puddles on the covers and exposed parts of the outfield, which would have taken the groundstaff more than a hour to clear, provided the rain had stopped.
As per the rules, the IPL final will have a reserve day — Monday, May 29 in this year’s case — in case the match is not able to start by 12:06am cut-off time, in which case there will be a five-overs per-side contest.
There are no such predictions of rain here on Monday, which means that there is full possibility of a 20-20 over match.

cricket match

(With inputs from PTI)

Nagpur Son Threatens To Father For Property; फ्लॅट माझ्या नावावर करा, पोटचं पोर जन्मदात्यांना संपवायला निघालं, जीव मुठीत घेऊन बाप धावला

0

नागपूर : फ्लॅट नावे न करून दिल्याने मुलाने जन्मदात्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा त्याच्या पालकांना फ्लॅट माझ्याकडे हस्तांतरित करा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळून वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांनी मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली.अमित अरबट असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा सतत दारू पिऊन तो आई-वडिलांशी भांडत होता. फ्लॅट आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अमित अरबट याला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू पिऊन आई-वडिलांना मारहाण करायचा. फ्लॅट आपल्या नावावर करून घेण्यासाठी तो आई-वडिलांशी वाद घातला होता. फ्लॅट नावावर करून द्या, तसे न केल्यास तो आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होता. अखेर मुलाच्या छळाला कंटाळून वडिलांनी नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दारू पिऊन जेवायला आला, उधार जेवण मागितलं; मालकाने नकार देताच चाकूने भोसकलं
काही दिवसांपूर्वी अमित रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आई-वडिलांना घराबाहेर पडण्यास सांगितले. फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा यासाठी त्याने शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणही झाले. मुलाचा त्रास खूप जास्त झाल्याचे वाटल्याने अखेर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News : पोलिसाने लाच नाकारल्याने ठकबाजाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; काय घडलं असं?

Erdogan: Erdogan declares victory in Turkey run-off election

0

ISTANBUL: Turkish President Recep Tayyip Erdogan declared victory Sunday in a historic run-off election that posed the toughest challenge of his two-decade rule.
“We will be ruling the country for the coming five years,” Erdogan told his cheering supporters from atop a bus in his home district in Istanbul. “God willing, we will be deserving of your trust.”

आयपीएलची फायनल पावसामुळे पुढे ढकलली, आता Reserve Day ला खेळवणार

0

अहमदाबाद : पावसामुळे अखेर आयपीएलता अंतिम सामना हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.पाऊस पडल्यावर आयपीएलचे नियम काय आहेत, जाणून घ्या…

  • प्लेऑफ सामना षटकांची संख्या कमी न करता रात्री ९.४० वाजता उशिरा सुरू होऊ शकतो (१० मिनिटांचा मध्यांतर, टाइम-आउट कायम).
  • प्लेऑफ सामन्यातील षटकांची संख्या, आवश्यक असल्यास, कमी केली जाऊ शकते जेणेकरून प्रत्येक संघाला ५ षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल.
  • प्रत्येक बाजूचा पाच षटकांचा नवीनतम सामना रात्री ११.५६ (१० मिनिटांचा मध्यांतर) सुरू होऊ शकतो १२.५० वाजता नियोजित समाप्तीसह.
  • अतिरिक्त वेळेच्या शेवटी ५ षटकांचा सामना पूर्ण करणे शक्य नसेल तर, संघ, परिस्थितीने परवानगी दिल्यास, विजेता निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर खेळतील. याचा अर्थ असा आहे की खेळपट्टी आणि मैदान खेळण्यासाठी तयार असले पाहिजे जेणेकरून सुपर ओव्हर रात्री १२.५० च्या आत सुरू होईल.
  • सुपर ओव्हर सुरू करणे शक्य नसल्यास, हा सामना राखीव दिवशी जाऊ शकतो.
  • पण राखूव दिवशीही पाऊस सुरु राहीला आणि सामना झाला नाही तर नियमित हंगामातील ७० सामन्यांनंतर लीग टेबलमध्ये सर्वोच्च स्थान मिळविलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

आजचा सामना हा पावसामुळे स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे तो आता राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. हा राखीव दिवस म्हणजे २८ मे हा असेल. हा सामना आता सोमवारी खेळवण्यात येणार आहे. पण सोमवारी पाऊ पडणार की नाही, यावर हा सामना होणार की नाही ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सोमवारी पुन्हा एकदा पाऊस पडणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे आता सर्व चाहत्यांना सोमवारची उत्सुकता असेल. पण पावसाने पुन्हा एकदा हिरमोड करू नये, अशीच आशा आता चाहत्यांची असणार आहे. आयपीएलची फायनल पहिल्यांदाच अशी राखीव दिवशी होणार आहे.

swatantrya veer savarkar, Savarkar : वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा – cm eknath shinde has announced that the bandra worli sea link will be named after swatantrya veer savarkar

0

मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी आज केली.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मित्रासह फिरायला गेला, बाईकवर बसून फोटो काढत होता, बाईक सरकली, अचानक ७०० मीटर खोल दरीत पडला
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.

व्हायरल होतोय अमूल लस्सीमध्ये बुरशी असल्याचा दावा करणारा व्हिडिओ; जाणून घ्या काय आहे सत्य

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती मागणी

मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे. १६ मार्च २०२३ रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी केली होती. आपल्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण सदोदित नव्या पिढीला होत राहील आणि त्यातून उद्याच्या समर्थ भारतासाठी गौरवशाली पिढ्यांचे निर्माण होईल.’
Breaking वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावले

Girish Mahajan Sambhajiraje Chhatrapati News; संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…

0

जळगाव : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज जळगावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दोघांमधील भेट आणि बंद दाराआड चर्चा यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.महाविकास आघाडीमध्ये असो की भाजप शिंदे गटाच्या महायुतीमध्ये असो गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाचा मुद्द्यावरून राज्यात राजकारणात तापलं आहे. दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने आगामी काळात निवडणुका स्वबळावर लढविण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या सर्व विषयावरून आगामी काळातील निवडणुकांवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादीतून बडतर्फ झालेल्या संजय पवारही यांची उपस्थिती चर्चेत

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे आज एका कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. या दरम्यान जळगावातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत केलं. यादरम्यान गिरीश महाजन आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे यावेळी संजय पवारही उपस्थित होते. बाजार समिती आणि इतर निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर बडतर्फिची कारवाई केली आहे. यावेळी संजय पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

राज्यात भाविकांसाठी सर्वप्रथम या मंदिरात लावला ड्रेस कोडचा बोर्ड; फॅशन करायची असेल तर…
कुठलीही राजकीय चर्चा नाही – महाजन

संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात आगामी काळातील निवडणुकांबाबत संवाद झाला, अशी चर्चा होती. गिरीश महाजन यांनी अशी चर्चा फेटाळून लावली. ही चर्चा राज्यभिषेक सोहळा आयोजनाच्या विषयावर होती. संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत मित्रत्वाचे आणि कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्यासोबत राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.
गौतमी पाटीलला आडनावावरून धमकी, मराठा समाजाचे पदाधिकारी संतापले, शिवबा संघटनेला सुनावले
संभाजीराजे छत्रपती यांनी आगामी काळात स्वराज्य पक्षाच्या वतीने स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली, यावर मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आलं. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, राजकारणावर कुठलीही चर्चा त्यांच्यासोबत झालेली नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

गिरीश महाजन यांची जळगावातून लोकसभेसाठी तयारी, चर्चा रंगल्या

गिरीश महाजन यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ह्या सर्व खोट्या गोष्टी आहेत. मीही टीव्हीवरच बघतोय. माझं नाव खासदार म्हणून सुचवलं जातंय. असा कुठलाही विषय आणि चर्चा निर्णय भाजपच्या बैठकीत झालेली नाही किंवा समोर आलेली नाही, हे सर्व कपोलकल्पित आहे. माझ्या खासदारकीच्या किंवा लोकसभेच्या उमेदवारीबाबत कुठलाही विषय आजपर्यंत झालेला नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

शिंदे-फडणवीसांवर रुपाली चाकणकर संतापल्या! दिल्लीतील तो फोटो ट्वीट करून सरकारला धरलं धारेवर – rupali chakankar was angry with shinde fadnavis government over savarkar jayanti in maharashtra sadan

0

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. कारण या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याचा आरोप करत सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत सरकारविरोधात हल्लाबोल केल्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याचं दुष्कृत्य करणाऱ्या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी सरकारकडे केली आहे.रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील घटनेवर संताप व्यक्त करताना केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे,’ असा गंभीर आरोप यावेळी चाकणकर यांनी केला आहे.

जुनं संसद भवन हेच माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर राहणार, सुप्रिया सुळेंचं विधान

संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दिल्लीतील प्रकाराची चौकशी करून राज्य सरकारकडून काही कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.

रोहित पवारांनी काय म्हटलं आहे?

सावकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला आहे. ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय महाराष्ट्र सदनातील घटनेवर गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत ते दाखवतील का?’ असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Latest posts