Saturday, March 25, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2179

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

177

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

karauli baba santosh bhadauria controversy, एका मंत्राने उपचार, होम हवनसाठी अडीच लाखांची फी, करौली बाबाची देशभर चर्चा… – karauli baba santosh bhadauria said my fee is as same as doctors fee devotees have to pay 2 5 lakh rupees for home havan

0

लउनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमधील करौली आश्रमचे बाबा संतोष भदौरिया आणि एका भाविकातला झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाने ते सध्या संपूर्ण देशात चर्चेत आले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. पण, आज ते बाबा संतोष भदौरिया म्हणून ओळखले जातात. एका मंत्राने ते त्यांच्या भाविकांवर उपचार करत असल्याचा दावा केला जातो.बाबा झाल्यानंतर काही वर्षातच संतोष भदौरिया यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवली आहे. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे आश्रमात येणाऱ्या भाविकांना ५० रुपयांची पावती फाडावी लागत आहे. आता या बाबाने आणखी एक गोष्ट जाहीर केली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांची फी आणि असाध्य आजारांवर उपचारासाठी पैसे देता, तसेच आम्हालाही पैसे द्यावे लागतील, असं या बाबा संतोष भदौरियांनी जाहीर केलं आहे. १ एप्रिलपासून या बाबाने यज्ञ, होम हवनाचे शुल्कही वाढवले आहे.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर एका भक्ताने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाबा संतोष भदौरिया आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू आहे. या व्हिडिओनंतर बाबा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यानंतर ते त्यांच्या दरबारात येणाऱ्या भाविकांकडून १००-१०० रुपये घेतात, अशी बातमीही प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे.

देवस्थान समितीच्या सचिवाची बदली करणारा मास्टरमाईंड कोण?; दीपक केसरकरांवर शाहू प्रेमींचा मोठा रोष

आता याबाबत बाबांनी एका डॉक्टरचे उदाहरण देत सांगितलं की, लोक डॉक्टरांकडे फी भरतात, मोठ्या आजारांवर उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात, लाखो रुपये खर्च करतात. त्याचप्रमाणे येथेही शुल्क आकारले जाते. यानंतर बाबांनी तात्काळ लाभ मिळण्यासाठी १ एप्रिलपासून होम-हवनासाठी अडीच लाख रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी हे शुल्क दीड लाख रुपये होते.

बाबा संतोष भदौरिया मारहाण प्रकरण काय?

२०१९ पर्यंत कानपूर शहराला लागून असलेले करौली इतर सामान्य गावांसारखेच होते. येथे स्थित मानवी मंदिर-लवकुश आश्रमात औषधी वनस्पतींचा वापर करुन उपचार केला जात होता. २०१९ पासून करौली बाबा येथील लोकांमधील प्रेत-आत्मा आणि अडथळे दूर करत असल्याचा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी हे आश्रम अचानक चर्चेत आलं.

कैसा ये इश्क हैं! भाच्याच्या प्रेमात मावशी आकंठ बुडाली, पतीला ओळखण्यासही नकार…
कौटुंबिक समस्यांनी वेढलेले नोएडाचे डॉ. सिद्धार्थ चौधरी काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह या आश्रमात पोहोचले. तेथे ते करौली बाबांच्या समोर आले. डॉ. चौधरींनी बाबांना चमत्कार दाखवायला सांगितलं. काही सेकंदांच्या वादावादीनंतर वातावरण तापू लागलं. बाबांच्या सांगण्यावरून या डॉक्टरला बाहेर नेऊन मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. ड्रेसिंगनंतर ते आपल्या कुटुंबासह नोएडाला परतले.

१९ मार्च रोजी हे डॉक्टर पुन्हा कानपूरला आले आणि त्यांनी करौली बाबा आणि त्यांच्या लोकांविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. येथूनच माजी शेतकरी नेते संतोष सिंह भदौरिया प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांना आता करौली बाबा म्हणून ओळखला जाते.

Hina Khan reacts to those judging her religious posts; ‘I am no saint but I truly believe in neeyat…’

0

Hina Khan, who is in Saudi Arabia to perform Umrah in the holy cities of Mecca and Medina, has reacted to a certain section of followers on social media who have slammed her for ‘doing a photoshoot’ at masjid. One even reminded her that ‘it’s not a ramp but a masjid’.
The actress in a new post first related her experience of doing Umrah, regretting she should have started with Medina instead of Mecca. However, just as she desired she was able to complete her Umrah, all three of them.

She wrote, “I just can’t can’t can’t believe this is happening.. ok lemme tell u guys.. when I left home I decided to perform three umrah’s in one n a half day, which was practically and physically not possible.. I misjudged, Miscalculated, also I didn’t realise I should do madina first and then Mecca to perform umrah in the holy month of Ramadan.. I did exactly reverse ( no complaints though) I really enjoyed my time and rozas in madina sharif.. but somewhere deep down I was not content, and a bit sad ki mera ek Umrah reh Gaya…”
She continued, “I really wanted to perform umrah in Ramzan especially when u are so close to Mecca sharif…but I decided it’s god’s will and I will achieve it next time.. shall come in the month of Ramadan next year for umrah again.. Also my flight back home was from madina and I can’t make my mom travel back and forth since she’s wheelchair bound.. but I had no inclination that god had other plans.. yet again this god sent Farishta ( bless bless bless u, you know who u are) convinced me and we decided to go back to Mecca just for a few hours to perform umrah in Ramadan.. AB ISKO KHUDA KA BULAAWA NAA KAHUN TO KYA KAHUN..God is great and all knowing .. pious intent and a humble will to seek can never be dismissed at the house of god.”

Hina then addressed those who had been slamming her ‘left right and centre’ under her religious posts.

She shared, “And to all those people who have been judging me left right and centre under my religious posts…All I can say is, I am no saint but I truly believe in Neeyat, kindness and good karma, good deeds.. Baaki aap sab ko apne karma ka khud jawaab dena hai oopar 😇Spread love ❤️ Teesra Umrah Mukammal 🧿 Mashallah, Jazaakallah khair, Labbaik allahuma Labbaik..🤲”

The month of Ramadan has begun and it’s not just Hina Khan but her industry colleagues Aly Goni and Asim Riaz are also there to perform Umrah.

20 year old youth dies police bharti physical test, पोलीस भरतीत आयुष्याची शर्यत हरला; १६०० मीटर धावला, बेशुद्ध होऊन कोसळला, मग… – odisha 20 year old youth dies during running 1600 meter race in police bharti physical test

0

भुवनेश्वर: ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात कॉन्स्टेबल भरतीसाठी शारीरिक चाचणी देण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. हा तरुण शारीरिक चाचणीदरम्यान १६०० मीटरच्या शर्यतीत धावत होता. धावता धावता तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे नेण्यापूर्वीच त्याचा जीव गेलेला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. लेखी परीक्षा उत्तीर्ण केली, शारीरिक चाचणीदरम्यान अनर्थ घडला

एका वृत्तसंस्थेनुसार, दीप्ती रंजन हा श्यामसुंदरपूर भागातील रहिवासी होता. ओडिशा पोलीस भरतीसाठी त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. शनिवारी तो छतरपूर येथील पोलीस राखीव मैदानावर पुढील फेरीसाठी म्हणजेच शारीरिक चाचणीसाठी आला होता.

हार्ट अटॅकनं जीव गेला, पुन्हा जिवंत झाला; मृत्यूनंतर काय झालं सारं सांगितलं, डॉक्टरही हैराण
धावता धावता अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला

येथे १६०० मीटर शर्यतीत धावताना तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्यानंतर उपस्थितांनी त्याला तात्काळ छतरपूर येथील एमकेसीजी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारांना सभागृहात पोहोचायला उशीर, बेल ऐकून धावत सुटले

फिजिकल टेस्टमध्ये फीट मग अचानक बेशुद्ध झाला

गंजमचे एसपी जगमोहन मीणा यांनी सांगितले की, शारीरिक चाचणीपूर्वी त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये तो फीट आढळला. मात्र, शर्यतीदरम्यान अचानक तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

समुद्रातून भयानक प्राणी बाहेर येतील, माणसांवर हल्ला करतील, शास्त्रज्ञांचा धडकी भरवणारा रिसर्च

पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरं

दुसरीकडे, तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच दीप्तीच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपल्या मुलाला पोलिसात भरती व्हायचे होते, असं त्यांनी सांगितले. पण, तो आपल्याला असाच सोडून कायमचा निघून जाईल हे माहीत नव्हते, असं म्हणताना कुटुंबीयांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते.

Three labourers killed as soil mound collapses in Karnataka’s Dakshina Kannada district | Mangaluru News

0

MANGALURU: Three labourers died after a mound of soil caved in on them at a village in Sullia town of Karnataka’s Dakshina Kannada district on Saturday.
The deceased, identified as Somashekar and Shantha, a couple from Gadag while the identity of another labourer is yet to be ascertained.
Sources said that the incident took place when the work on a retaining wall behind the house of Abubakkar was in progress. Pillars were laid to construct the retaining wall and all of a sudden mound of soil caved in on the labourers.
The fire service personnel and police rushed to the spot. After more than one-and-a-half hours of rescue operation, three bodies were recovered from the spot.
Minister S Angara, Fisheries Development Corporation A V Theertharama, tahsildar Manjunath, Taluk Panchayat EO Bhavanishankar visited the spot.
KPCC spokesperson T M Shahid demanded Rs 10 lakh compensation for the kin of each of the deceased.

satara old lady agitation, घरुन भाकर आणतात, दिवसभर धरणग्रस्तांबरोबर ठिय्या, सातारच्या ७५ वर्षांच्या आजीबाई चर्चेत – maharashtra satara 75 years old lady agitation with dam affected people at koyna

0

सातारा : श्रमिक मुक्ती दलातर्फे कोयनानगर येथे दि. २७ फेब्रुवारीपासून प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तरुण तरुणींसह वयोवृद्ध धरणग्रस्त सहभागी झाले आहेत. अशाच एक वयोवृद्ध धरणग्रस्त ७५ वर्षीय आजीबाई सौ. अनुसया कुशाबा कदम या न्याय हक्काच्या या लढ्यात धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. धरणग्रस्तांचा उत्साह वाढवणाऱ्या आजीबाई या राहतात तरी कुठे म्हणून कुतूहलापोटी त्यांचं घर गाठलं तर भयानक वास्तव समोर आलं. अनुसया आजी या मूळच्या कोयना धरणग्रस्त. पाटण तालुक्यातील आंबेघर गावचे कदम कुटुंब. त्या गेली ६४ वर्ष आपल्या वडिलांच्या जागेत कुडामाडाचं घर करून गोषटवाडी येथे स्थायिक आहेत. आजीच्या कुटुंबात सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले ८० वर्षीय पती, मुलगा, सून, नातवंडे असा आजींचा परिवार. आजींनी अनेक अनेक वर्ष धरणग्रस्त व भूकंपाचे धक्के खात संसार मांडला. साधी भोळी आजी पण तिसरी चौथी पिढी सुरू झाली, तरी आजी मोडक्या तोडक्या फळ्या पत्रे, कौले यांनी तयार केलेल्या घरात राहाते. कोयना धरणात ४० गुंठे नव्हे, तर सुमारे ४० एकर जमीन धरणात गेल्याचे आजी सांगतात.

पोलीस भरतीत आयुष्याची शर्यत हरला; १६०० मीटर धावला, बेशुद्ध होऊन कोसळला, मग…
आजीबाई घरून तुकडा भाकर घेऊन दिवसभर आंदोलनात ठिय्या मारून बसतात. सायंकाळ झाली की आजीबाई आजारी वयोवृद्ध पतीच्या काळजीत घराकडे परतीच्या प्रवासाला निघून जातात,असा हा आजीबाईंचा दिनक्रम असल्याचं पाहायला मिळालं.

२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

“आमी म्हातारे झालो, आमी जिवंत असे तोपर्यंत तरी जमीन मिळेल का नाही सांगता येत नाही. परंतु आमच्या मुला बाळांना तरी जमीन सरकार देईल” या भाबड्या आशेवर अनुसया आजी वाढत्या वयाचं भान हरपून आंदोलनात आघाडीवर राहून धरणग्रस्तांचा उत्साह वाढवत आहेत. आता काही झाल तरी हटायचं नाही. मरण आलं तरी मागं हटणार नाही, जमीन मिळवणारच असा दृढ निश्चयच या आजीबाईंचा. सरकारच्या नावानं आरोळी देत आजीबाई मंत्री आमदार, खासदारांना साद घालत आहेत.

आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध

‘Identify stress points, adverse exposures’: What FM Sitharaman told state banks amid global turmoil

0

NEW DELHI: With the global banking sector plunging into turmoil after the Silicon Valley Bank collapse in US, the Centre on Saturday asked all public sector lenders (PSBs) to assess various financial health parameters.
The direction came at a review meeting chaired by Union finance minister Nirmala Sitharaman.
After a detailed meeting with the chiefs of the state-run banks, the finance ministry said in a statement that lenders have been asked to identify stress points, including “concentration risks and adverse exposures”.
During the meeting, Sitharaman reviewed the exposure of state-run banks and immediate external global financial stress from both the short and the long-term perspectives.
Banks should safeguard themselves from any potential financial shock, Sitharaman told lenders according to the statement.
“All the major financial parameters indicate stable and resilient public sector banks,” the statement added.
During the review meeting, an open discussion was held with the heads of the banks on the global scenario following the failure of the Silicon Valley Bank and the Signature Bank along with the UBS’s takeover of crisis-hit Credit Suisse.

Untitled-1

“The finance minister underlined that PSBs must look at business models closely to identify stress points, including concentration risks and adverse exposures. She also exhorted PSBs to use this opportunity to frame detailed crisis management and communication strategies,” the statement said.
FM Sitharaman’s 5-point advice to state banks

  1. Take focused steps to attract the deposits given the steps taken by the government to reduce the tax arbitrage in some debt instruments;
  2. Pivot their strengthened financial position to support credit needs of the growing economy;
  3. Focus on credit outreach in States where the credit offtake is lower than the national average, particularly in North-East and Eastern parts of the country;
  4. Enhance business presence in new & emerging areas like One District One Product (ODOP), e-NAM, and drones;
  5. Aim to increase brick & mortar banking presence in border and coastal areas;
  6. PSBs should promote the Mahila Samman Bachat Patra announced in the Budget 2023-24 through special drives and campaigns.

Meanwhile, the bank executives told Sitharaman that they are vigilant of developments in the global banking sector and are taking all possible steps to safeguard themselves from any potential financial shocks.
This review meeting comes amid volatility in the US banking system due to the recent collapse of Silicon Valley Bank and some other banks in contagion.
A number of Indian startups have funds parked in the failed Silicon Valley Bank and possibly others too.
However, analysis have said that Indian banks are in a relatively good position to withstand the global headwinds amid the crisis.
Earlier this week, S&P Global Ratings said that Indian lenders are capable of enduring any potential contagion effects emanating from the US banking turmoil.
“Strong funding profiles, a high savings rate, and government support are among the factors that bolster the financial institutions we rate,” the rating agency said.

pune koyta broke his arm, तुमचा मर्डर करतो; पुण्यात कोयत्याने वार करत हाताचा पंजाच तोडला; नंतर डॉक्टरांनी… – pune katraj man hand was cut off by a koyta in a petty dispute

0

पुणे : पूर्ववैमनस्यातून पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन एका जणाच्या हाताचा पंजा तोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलं आणि त्यासोबतच आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अखिलेश उर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला.

या प्रकरणी अभिजीत दुधनीकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी या अल्पवयीन मुलांवर कारवाई केलीय. पोलिसांनी निखील उर्फ रोहित गोरख दिनकर यास अटक केली आहे. तर रोहित बोद्रे, प्रेम गुंगारग, युवराज देवकाते त्यांच्या साथीदारांसह तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना सुखसागरमधील स्मार्ट मेन्स पार्लसमोर बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

तुम्ही भाजपसाठी थेट काम का करताय? थोडं फिरवून विचारा ना, राहुल गांधींनी पत्रकाराला झापलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडप्पा, रोहीत बोद्रे आणि इतरांमध्ये मागील अनेक दिवसांपासून अनेक कारणावरुन किरकोळ वादावादी सुरु होती. तक्रारदार आणि लाडप्पा हे तीन दिवसांपूर्वी सुखसागर परिसराकडे जात असताना आरोपी दुचाकीवरुन आले आणि त्यांचा पाठलाग करत होते. लाडप्पा यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला त्यांना या आरोपींनी घेरलं. “तुम्ही केस करता का आमच्यावर थांबा, आता तुमचा मर्डर करतो”, असं म्हणत मारुन टाकण्याची धमकी दिली.

त्यावेळी त्यांनी धारदार कोयत्याने वार करायला सुरुवात केली. अखिलेश यांनी हाताने हा वार हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी त्यांना पकडून मारहाण देखील करण्यात केली. त्यांच्या डोक्यावर देखील आरोपींनी जोरात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोक्यावरचा वार वाचवण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि हा वार थेट त्यांच्या हाताच्या मनगटावर बसला. वार एवढा जोरात होता की, त्यांच्या डाव्या हाताचा थेट पंजाच तुटला.

तर दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणुका लढवेन, हर्षवर्धन जाधवांनी शड्डू ठोकला

त्वरा करा, पॅन कार्डशी आधार लिंक करा! ऑनलाइन करताना अडचण आली तर काय कराल, जाणून घ्या – link aadhaar with pan step-by-step guide to link pan and aadhaar via sms online

0

नवी दिल्ली : तुम्ही भारतीय नागरिक आहात किंवा नियमित कर फाईल करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या पॅन कार्डसोबत आधार क्रमक लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. या मुदतीची माहिती प्राप्तिकर विभागाने यापूर्वीही अनेकदा दिली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अजूनही पॅन कार्डशी आधार लिंक केले नसेल, तर घाई करा कारण एकदा मुदत संपल्यावर त्याऐवजी तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

पॅन-आधार लिंक न केल्यास मोठे नुकसान होईल
विशेष म्हणजे करदात्यांसाठी पॅन कार्ड सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अशा स्थितीत तुम्ही ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक न केल्यास तुमचे पॅन वार्ड निष्क्रिय होईल आणि तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. सर्वात मोठा तोटा म्हणजे नवीन वर्षांपासून तुम्ही तुमचे आयकर रिटर्न (आयटीआर) भरू शकणार नाहीत.

Aadhaar-PAN Card Link न केल्यास होणार हे ३ नुकसान, पाहा डिटेल्स
याशिवाय तुम्ही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुमहाला तुम्ही लगेच ते लिंक करा. तुम्हाला दोन्ही दस्तऐवज लिंक केले आहेत की नाही हे तपासायचे असल्यास तुम्ही ऑनलाईन सोप्या स्टेप्सचे अनुसरण करून लिंकिंग स्थिती तपासू शकता. तसेच पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत जवळ आल्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन लिंकिंग करण्यास अडचण होत असेल तर तुम्ही अन्य काही चरणांद्वारेही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

पॅन-आधार लिंकिंगची ऑनलाईन प्रक्रिया

  • पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्ही प्रथम आयकर ई-फायलिंग वेबसाइट www.incometax.gov.in वर जा.
  • पुढे लॉगिन तपशील प्रविष्ट करा.
  • एक पॉप अप विंडो उघडेल, जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल. नसल्यास, मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘आधार लिंक करा’ वर क्लिक करा.
  • पॅन तपशीलांनुसार नाव जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील आधीच नमूद केले जातील.
  • तुमच्या आधार कार्डावर नमूद केलेल्या पॅन तपशीलांसह स्क्रीनवर पडताळणी करा. कृपया. लक्षात घ्या की जर काही जुळत नसेल, तर तुम्हाला कागदपत्रांमध्ये ते दुरुस्त करावे लागेल.
  • तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.
  • एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.
  • तुमचा पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ ला देखील भेट देऊ शकता.

PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका
पॅन- आधारशी लिंक न झाल्यास काय करायचं?
तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला जवळच्या पॅन सेंटरला भेट देऊन स्वाक्षरी केलेला आधार सीडिंग फॉर्म सबमिट करावा लागेल. लक्षात ठेवा की आधार सीडिंग फॉर्मसोबत तुम्ही पॅन आणि आधार सारखी सर्व संबंधित कागदपत्रे जवळ ठेवा.

Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा
SMS द्वारे पॅन क्रमांक आधारशी कसा लिंक करायचा?
ऑनलाईन तुम्हाला पॅन कार्डशी आधार क्रमांक लिंक करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही मोबाईलवरून एक SMS पाठवून लिंक करू शकता. एसएमएसद्वारे तुमचा आधार पॅनशी लिंक करण्यासाठी खाली नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा.

  • पहिले UIDPAN फॉरमॅटमध्ये एक संदेश टाइप करा म्हणजे, UIDPAN (स्पेस) १२-अंकी आधार क्रमांक (स्पेस) १०-अंकी पॅन क्रमांक.
  • तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून फक्त ५६७६७८ किंवा ५६१६१ वर एसएमएस पाठवा.
  • तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासंदर्भात एक पुष्टीकरण संदेश मिळेल.

दरम्यान, लक्षात घ्या की तुमच्या आधार आणि पॅन कार्डावर नमूद केलेली नावे तंतोतंत जुळली पाहिजेत. काही विसंगती असल्यास पॅनशी आधार लिंक होणार नाही. UIDAI ने आधार धारकांना त्यांच्या अधिकृत वेब पोर्टलमध्ये किंवा NSDL PAN मध्ये त्रुटी आढळल्यास बदल करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

​6G Network, 6G साठी PM मोदींचं ‘मिशन’ ठरलं; जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या रांगेत भारत – pm modi unveils indias 6g vision what is 6g internet what will be the benefits

0

6G Network: भारतात अजून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या संपूर्ण ग्राहकांना 5G नेटवर्कची सुविधा देणे बाकी आहे. देशात सध्या फक्त दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या ग्राहकांना ​5G नेटवर्कची सुविधा देत आहे. ही सुविधा सुद्धा देशातील काही प्रमुख शहरात मिळत आहे. संपूर्ण भारतात ५जी सर्विस मिळायला अजून वेळ आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची तर अजून ४ जी सेवा मिळत नाही. देशात ५जी नेटवर्कची चर्चा सुरू असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G नेटवर्क साठी प्रयत्न सुरू केले आहेत. पीएम मोदी यांनी ६ जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यासाठाी एक टास्क फोर्स बनवले आहे. हे लागोपाठ यावर काम करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत भारतात 6G नेटवर्क सुरू केले जावू शकते.

जगातील या देशात ​6G साठी प्रयत्न

-6g-

जगातील अनेक देशात 6G इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाने तर याची घोषणा सुद्धा केली आहे. २०२८ पर्यंत तेथील नागरिकांना ६जी सुविधा मिळू शकणार आहे. कोरियाची सरकार लोकल कंपन्यांना ६जी नेटवर्कमध्ये वापर करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग करण्यास सांगितले आहे. ६जी नेटवर्कची घोषणा करणारा कोरिया हा पहिला देश बनला आहे. कोरियाई सरकार यावर ३ हजार ९०० कोटी रुपयेहून जास्त खर्च करणार आहे. साउथ कोरियाचे विज्ञान मंत्री लिम हेई यांच्या माहितीनुसार, ६जी नेटवर्कचा वेग देशातील उपलब्ध असलेल्या तुलनेत ५० पट जास्त असणार आहे.

​वाचाः Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

​साउथ कोरियाची मोठी भूमिका​

​साउथ कोरियाची मोठी भूमिका​

५जी विस्तारात साउथ कोरियाची मोठी भूमिका
दक्षिण कोरियाच्या सरकारने स्थानिक कंपन्यांना ६ जी नेटवर्क संबंधी सामान बनवण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी सबसिडीची घोषणा सुद्धा केली आहे. दक्षिण कोरिया सरकार याच्या संबंधी सप्लाय चेनला मजबूत करण्यावर जोर देत आहे. साउथ कोरियाच्या ५ जी विस्तारात २५.९ टक्के भागीदारी आहे. तर चीनची यात २६.८ इतकी भागीदारी आहे.

​वाचाः AC खरेदी करताना स्टार रेटिंग पाहणे का आहे आवश्यक?, ५ स्टार आणि ३ स्टारमध्ये फरक काय?

6G साठी या देशाचे प्रयत्न

6g-

६जी नेटवर्कवर कोणकोणते देश काम करीत आहेत
साउथ कोरिया शिवाय, अमेरिका, चीन, जपान आणि भारत हे सर्व ६ जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेने यासाठी ‘नेक्स्ट जी अलायंस’ लाँच केले आहे. या अलायन्स मध्ये अॅपल, एटी अँड टी, क्वॉलकॉम, गुगल आणि सॅमसंगचा समावेश आहे. तर चीनने २०२२ च्या अखेर मध्ये आपल्या टेलिकॉम रिसर्च इंस्टिट्यूटला लिहिलेल्या श्वेतपत्र द्वारे ६ जी साठी व्हिजन जारी केले होते. यासाठी एका चिनी मोबाइल कंपनीने सुद्धा या दिशेने आपला सल्ला जारी केला होता.

​वाचाः LG 1.5 Ton Split AC ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, सोबत १० वर्षाची वॉरंटी

​जपानने बनवली रिसर्च सोसायटी​

​जपानने बनवली रिसर्च सोसायटी​

जपानमध्येही ६जी साठी व्हिजन २०२३ नावाने श्वेतपत्र प्रकाशित केले आहे. हे श्वेतपत्र जपानच्या इंटिग्रेटेड ऑप्टिकल अँड वायरलेस नेटवर्क फोरमने तयार केले होते. जपानच्या मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेयर्स एंड कम्युनिकेशन ने यासाठी एक गव्हर्नमेंट सिव्हिलियन रिसर्च सोसायटी बनवली होती. तर साउथ कोरियाच्या मिनिस्ट्री ऑफ सायन्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी ने 6 जी नेटवर्कचा शोध व विकासासाठी प्लान बनवला आहे.

​वाचाः Aadhaar-PAN Card Link न केल्यास होणार हे ३ नुकसान, पाहा डिटेल्स

​6G नेटवर्कमुळे कोणते फायदे होणार​

6g-

आपल्या मोबाइलच्या इंटरनेटसाठी 5G इंटरनेट पुरेसी आहे. परंतु, जर ६जी नेटवर्क सेवा सुरू केली जात असेल तर याचा कव्हरेज एरिया १० किमी पर्यंत जाईल. यावरून स्पष्ट आहे की, नेटवर्क गायब होण्याची झंझट संपून जाईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 6G नेटवर्क सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटच्या स्पीड मध्ये ५ जीच्या तुलनेत १०० पट जास्त वाढेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ६ जी इंटरनेटचा वेग १०० जीबीपीएस पर्यंत जाईल. इंटरनेटचा सर्वात जास्त फायदा ऑनलाइन मीटिंग्स पासून मूव्ही एक्सपीरियन्स पर्यंत स्पष्ट पणे दिसेल.

​वाचाः ४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

​चित्रपट डाउनलोडसाठी फक्त १ सेकंद लागेल​

​चित्रपट डाउनलोडसाठी फक्त १ सेकंद लागेल​

जर ६ जी नेटवर्क सेवा सुरू झाली तर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग आताच्या तुलनेत आणखी शानदार होईल. प्रत्येक काम एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने होईल. यासाठी सध्या व्यक्तीला जी नजर ठेवावी लागते. याची गरज पडणार नाही. सामान्य आयुष्यात एक 4K मूव्ही डाउनलोड करण्यासाठी फक्त १ सेकंद लागेल. तसेच विजेची बचता आणि वेळेची बचत होईल. कारखान्यात मशीन आणि रोबोटमुळे उर्जा व पाण्याची बचत होईल.

​वाचाः Vu चा धमाका, स्वस्त किंमतीतील ४३ इंच आणि ५५ इंचाचे प्रीमियम स्मार्ट भारतात लाँच

​कृषि क्षेत्रात कसे मदत करणार ६जी नेटवर्क​

​कृषि क्षेत्रात कसे मदत करणार ६जी नेटवर्क​

६जी इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर कृषि क्षेत्राला मोठा फायदा मिळणार आहे. स्मार्ट फार्मिंगच्या मदतीने पिकांवर योग्य प्रमाणात कीटकनाशकाचा वापर केला जाईल. तसेच पाण्याची बचत सुद्धा होवू शकते. सोबत सर्व गोष्टींवर स्मार्ट पद्धतीने वॉच ठेवली जावू शकते. ड्रायवरलेस व्हीकलला ऑपरेट करण्यात सहज मदत मिळणार आहे. स्मार्टफोन शिवाय, लोक ब्रेन कंप्यूटर्सचा वापर सुरू करतील. यासोबत चिपला व्यक्तीच्या शरीरात बसवून सायबॉर्गचचा वापर करतील.

​वाचाः अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

devendra fadnavis, मुंबई महापालिकेचा कॅग अहवाल सादर; बीएमसीवर ताशेरे, फडणवीसांचा इशारा, ठाकरे गटाची ही मागणी – bmc cag report 2023 the cag report of the bmc was presented in the legislature today

0

मुंबई : अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मुंबई महानगरपालिकेचा कॅग अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. या अहवालात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हा अपारदर्शक, निधीचा निष्काळजीपणाने वापर, ढिसाळ नियोजन अशी निरिक्षणे या अहवालात मांडण्यात आले आहेत. हा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना टीकेचे प्रहार केले आहेत. हा केवळ ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.शिंदे फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत पालिकेच्या ९ विभागांचे ऑडिट करण्यात आले आहे. हे १२ हजार कोटी रुपयांचे आहे. यांपैकी ३५०० कोटींची कामे करोनाशी संबंधित आहेत. या कामाचे ऑडिट साथरोग अधिनियम कायद्याच्या तरतुदींमुळे करता आलेलं नाही.

तुम्ही माझी कॉपी करू नका, मी तर बैल आहे, बेडकाने बैलासारखं होऊ नये; बिचुकलेंचा टोला
कॅगच्या अहवालात नेमके काय आहे?

१. मुंबई महानगरपालिकेने एकूण २ विभागांची २० कामे टेंडर न काढता दिल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ही २० कामे २१४.४८ कोटी रुपयांची आहेत.

२. ४७५५.९४ कोटींच्या कामांचा ६४ कंत्राटदार आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला नाही. यामुळे या कामांची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. आता या कामांसाठी करार नसल्याने महापालिकेला कारवाईचा अधिकार नाही.

3. ३३५५.५७ कोटींच्या ३ विभागांच्या १३ कामांसाठी थर्ड पार्टी ऑडिटर नियुक्त करण्यात आला नाही.त्यामुळे ही कामे कशी झाली, हे पाहणारी यंत्रणा उपलब्ध नाही.

४. महापालिकेच्या ब्रिज विभागात मान्यता नसताना अतिरिक्त कामे देण्यात आली आहेत. कंत्राटदाराला महापालिकेकडून अतिरिक्त मेहेरनजर दाखवण्यात आली. इतकेच नाही तर, निविदा अटींचे उल्लंघन करीत २७.१४ कोटी रुपयांचे लाभ देण्यात आले.

५. रस्ते आणि वाहतूक विभागाकडून ५६ कामांचा CAG कडून अभ्यास करण्यात आला. यांमध्ये ५२ पैकी ५१ कामे कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण न करताच निवडली गेली.

६. माहिती तंत्रज्ञान विभागात १५९.९५ कोटी रुपयांचे कंत्राट निविदा न मागविताच पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले.

लेखक राहुल बनसोडेंची मनाला चटका लावणारी अकाली एक्झिट; चवदार तळ्यावर शेअर केलेली अखेरची पोस्ट ठरली होती लक्षवेधी
कॅगने ओढले ताशेरे

अहवालातील मुख्य निरीक्षणे समजून घेतल्यानंतर या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूणच व्यवहारावर कॅगकडून ताशेरे ओढले गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे योग्य त्या कार्यप्रणालीचा अभाव आणि ढिसाळ नियोजन असल्याचे कॅगने म्हटले आहे. या बरोबरच कामांसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा निष्काळजीपणाने वापर करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ईडीवर आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ; गोपनीय दस्तावेज मूलचंदानीच्या माणसाला पुरवले, ३ अटकेत
ठाकरे गटाकडून करण्यात आली ‘ही’ मागणी

या अहवालामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टांगची तलवार असल्याचे सत्ताधारी वर्गाकडून बोलले जाऊ लागले आहे. आता या कॅग रिपोर्टच्या अहवालानंतर ठाकरे यांच्यावर टांगती तलवार असल्याचा बोललं जातंय. याचे कारण म्हणजे आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.मात्र, कॅगचा हा अहवाल सादर केला गेल्यानंतर ठाकरे गटाकडून राज्यातील इतर महापालिकांचे सुद्धा अशा प्रकारे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Latest posts