Thursday, March 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2195

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

180

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

sangali girl news, आईचा जीव वाचवण्यासाठी लेकीचा दुर्गावतार; हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा थेट गळाच आवळला! – kavathe mahankal the girl strangled the fox that attacked the mother

0

सांगली : आई आणि मुलीच्या नात्यातील हळवेपणाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. मात्र आईवर संकट आले तर मुलगी धाडसाने काय करू शकते, हे दाखवणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी या ठिकाणी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने महिलेवर हल्ला चढवला. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलेच्या मुलीने कोल्ह्याचा थेट गळा आवळून धरला आणि आपल्या आईची सुटका केली. मुलीने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला. त्यामुळे सदर मुलीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, कोंगनोळी येथील आटपाडकर वस्तीवरील सुरेखा लिंगाप्पा चौरे या आपल्या मुलीसह पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मात्र वाटेत अचानक एका पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा चौरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कोल्ह्याने चौरे यांच्या हाताचा चावा घेत बोट धरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी भेदरुन गेली.

बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको, रोहित पवारांनी मोहित कंबोजना सुनावलं

आधी घाबरलेल्या मुलीने नंतर आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी धाडसाने पुढे येऊन कोल्ह्याचा थेट गळा आवळला. ज्यामुळे कोल्ह्याने तोंडात पकडलेला आईचा हात बाजूला झाला. यावेळी सुरेखा यांनी आरडाओरडा करत बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्ह्याने तिथून पळ काढला आणि दोघींनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

सिंधुदुर्ग : भरधाव वेगात डंपर कंपाऊड तोडून शिरला अंगणात

0








मालवण, पुढारी वृत्तसेवा : कोळंब मार्गावरून भरधाव वेगाने जाणारा डंपर तेथील राजन आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपण तोडून थेट अंगणात घुसल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री घडली. सुदैवाने आंगणे यांच्या अंगणात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एमएच ०७ सी ६१३१ या क्रमांकाचा रिकामी डंपर आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कोळंब येथील राजन शंकर आंगणे यांच्या घरासमोरील दगडी कुंपणाला धडकून अपघात घडला. या घटनेने ग्रामस्थानी त्याठिकाणी धाव घेतली. सदर डम्पर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थामध्ये बोलले जात होते. ज्या दगडी कुंपणावर डंपर आदळला त्यावर नेहमी लहान मुले खेळत असतात. मात्र आज सुदैवाने मुले त्याठिकाणी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच कुंपण नसते तर डंपर थेट घरात घुसून जीवितहानी झाली असती, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना देऊनही उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याबद्दल ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच डंपर चालकावर कारवाई व्हावी, या मार्गांवरून यापुढे धोकादायक अशी डंपर वाहतूक होता नये, त्यास पोलिसांनी पायबंद घालावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली.

हेही वाचलंत का?









Govt plans to borrow Rs8.8 lakh crore in first half of FY2024

0

NEW DELHI: The Centre plans to borrow Rs 8.88 lakh crore via bonds from the market in the first six months of the fiscal year starting on April 1, the finance ministry said in a release on Wednesday.
The Centre’s borrowing has more than doubled from 2019 levels as the government’s social spending on free food and subsidies rose to record highs largely due to the Covid pandemic.
Out of the Gross Market borrowing of Rs 15.43 lakh crore projected for FY 2023-24 in the Union budget, Rs 8.88 lakh crore (57.55%) is planned to be borrowed in 26 weekly tranches of Rs 31,000-39,000 crore.
The borrowing will be spread under 3, 5, 7, 10, 14, 30 and 40 year securities. The share of borrowing under different maturities will be: 3 year (6.31%), 5 year (11.71%), 7 year (10.25%), 10 year (20.50%), 14 year (17.57%), 30 year (16.10%) and 40 year (17.57%).
The issuance of Sovereign Green Bonds will be announced in the second half of FY 2023-24.
The Government will continue to exercise greenshoe option to retain an additional subscription of up to Rs 2,000 crore against each of the securities indicated in the auction notification.
Weekly borrowing through issuance of Treasury Bills in the first quarter (Q1) of FY 2023-24 is expected to be Rs 32,000 crore with net borrowing of Rs 1.42 lakh crore during the quarter, against net borrowing of Rs 2.40 lakh crore in Q1 of FY 2022-23.
There will be issuance of Rs 12,000 crore under 91 DTBs, Rs 12,000 crore under 182 DTBs and Rs 8,000 crore under 364 DTBs through each weekly auction to be conducted during the quarter.
To take care of temporary mismatches in government account, the Reserve Bank of India has fixed the Ways and Mean Advances limit for H1 of FY 2023-24 at Rs 1,50,000 crore.
(With inputs from agencies)

Veteran actor Satish Shah asks his followers to pray for Cricket veteran Sudhir Naik; former opener is in a critical state

0

The Sarabhai Vs Sarabhai actor paid a visit to Sudhir in the ICU today and asked his fans and friends to pray for the cricketer’s health as he is in an extremely critical state.
He tweeted about Sudhir’s condition and wrote, “Please pray for my dear friend Sudhir Naik, test cricketer, captain Bombay Ranji Trophy team.”

Former India opener Sudhir Naik was hurt severely in a fall at his home and was taken to the intensive care unit at Hinduja Hospital in Mumbai. According to reports, the 78-year-old has a critical ailment.

Everything about Sudhir Naik

Between 1974 and 1975, the former cricketer Sudhir Naik represented India in three Test matches and two one-day internationals.
In addition to being the first Indian to score a boundary in an ODI, he made his international debut against England in the Birmingham Test in 1974.
For India, he amassed 141 Test runs at 23.50 along with fifty and 38 runs in ODIs. Naik’s home career was significantly more successful than his brief international career, which lasted just one year.
He served as the Bombay Ranji team’s captain for a number of years, and during the 1970–71 season, he even guided them to an unlikely triumph with a weak lineup.
In first-class cricket, Naik scored 4,376 runs at an average of 35.29, with seven hundred and 27 fifty-sixes, including the full score of 200 runs.

Talking about Satish Shah

Satish has been dabbling between Bollywood and TV, the actor was last seen in Sarabhai Vs Sarabhai, and the fans have been eagerly waiting to see the cast together for the third season. Recently, Ratna Pathak Shah, Rupali Ganguly and Sumeet Raghavan had a fun interaction on social media for the same.

crime news, विवाहित तरुणीनं प्रियकरासाठी घर सोडलं, घरच्यांचा लग्नाला नकार, दोघांनी टोकाचं पाऊल, तरुणाचा मृत्यू – chhatrapati sambhajinagar umesh taru and his lover trying to end life due to family oppose their marriage

0

छत्रपती संभाजीनगर : लग्न लावून दिलेल्या मुलीने प्रेमासाठी पतीचे घर सोडले. समाजात बदनामीच्या उद्देशाने कुटुंबीयांनी दोघांना विरोध केला. प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रेयसी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एकनाथनगर रेल्वेफाटकाजवळ घडली. उमेश मोहन तारू (वय २३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रेयसी जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तारू आणि प्रेयसी (वय १९) हे दोघे नातेवाईक आहेत. उमेश हा मुक्ताईनगरमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होता. त्याचवेळी दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. २८ फेब्रुवारीला संबंधित मुलीचा विवाह मध्यप्रदेशातील नातेवाईकाशी घरच्यांनी लावून दिला होता . ते सध्या ठाण्यात वास्तव्यास होते. लग्नानंतरही उमेश आणि प्रेयसी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, मुलीने घरी उमेशसोबतच्या प्रेमसंबधांची तसेच लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. कुटूंबीयांनी नकार दिल्याने दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शहरात येऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही दुर्घटना पाहिल्यानंतर स्थानिकांनी डायल ११२ वर दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको, रोहित पवारांनी मोहित कंबोजना सुनावलं

पोलिसांनी दोन्ही जखमींना घाटी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान उमेशचा मृत्यू झाला. प्रेयसी गंभीर जखमी आहे. या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ए. वाय. फिरंगे करत आहेत

धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्योती नगर भागात राहणाऱ्या आरती हेमंत शर्मा (वय ४५) या महिलेने घरात गळफास घेतल्याचा प्रकार बुधवारी (२९ मार्च) सकाळी उघडकीस आला.

पाकिस्तानपुढे अखेर BCCI नमली? वनडे विश्वचषकासाठी एक पाऊल मागे, पाहा नेमकं काय घडलं..

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Netizens slam Shark Tank India 2’s dental care brand for promoting ‘toxic work culture’ with their post of an employee that read, “He has hardly slept in the last 30 days”

0

Shark Tank India 2 wrapped up with some impressive deals, one of them being the dental care company founded by Jatan Bawa and Tushar Khurana. They received huge funding of Rs 80 lakh from Peyush Bansal, Namita Thapar, and Vineeta Singh in 2021.

After the episode got aired on the show, their sales hiked and their inventory has been getting stocked out with massive orders on a daily basis. Recently, the brand shared a video of how they have been hustling with the orders. However, the post highlighted their work culture which got slammed by the netizens as they termed it ‘Toxic‘.

the post

Netizen’s reaction to the post

A Twitter user shared a screenshot of the brand’s Instagram account’s story that had written on it, “Meet Sonu: Our Account Manager at Partner Warehouse. He has hardly slept in the last 30 days. He looks after the entire order packing and dispatching.”
The user slammed the company and wrote, “for the millionth time, your startup employee not having slept well in 30 days is not a flex”.
Another user wrote, “They raised a total of $3.7M in Series-A funding, as well ₹80L investment on Shark Tank @peyushbansal @namitathapar @vineetasng are you guys funding startups that exploit its workforce? Is it not sufficiently funded to hire to meet rising demand?”
While one user called them irresponsible, “Most irresponsible company for this week and also forever. Never use their products.”

The brand’s clarification

The dental brand even wrote back to the users and clarified what they meant to share through their posts. They wrote, “We are extremely sorry if the post expressed the idea of toxic work culture. Our sole motive was to applaud people who extended their support when things went bigger than we had anticipated. We are deeply apologetic if this indicated toxicity in the workplace.”
Further added, ” We’re sorry if our post came out incorrectly. The idea was to not glorify toxic work culture but applaud the team that helped navigate the Shark Tank surge. We had not anticipated such customer love despite being prepared to the best of our abilities and we’re hiring constantly.”

rohit pawar, बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको, रोहित पवारांनी मोहित कंबोजना सुनावलं – rohit pawar slam mohit kamboj over statement on vaibhav kadam case death case and said police will investigate matter

0

बारामती : एखाद्या नेत्याचा माजी बॉडीगार्ड जेव्हा आत्महत्या करतो, त्यावर लक्ष केंद्रीत करून शेतकरी आणि युवा वर्गाच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करायचे प्रयत्न असेल तर तसे होणार नाही. हत्या की आत्महत्या हे पोलीस ठरवतील, त्यावर राजकारण करू नये, असा टोला भाजप नेते मोहित कंबोज यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. मोहित कंबोज यांनी जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदमांनी केलेल्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त रोहित पवार आले होते, त्यानंतर त्यांनी मध्यंशी संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी पवार म्हणाले की, मंत्रायलात लोक जातात त्याचे कारण खालच्या लेव्हलला काम होत नसे तेव्हा मंत्रालयात जातात. मंत्रालयात जाऊन काम होत नाही हे समजल्यावर आत्महत्या करणे ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले ही चिंतेची बाब आहे. सरकार काही करत नसेल तर लोकं उघड्या डोळ्याने बघत असतात. माणूस आत्महत्येचा निर्णय त्याच वेळेस घेतो ज्यावेळेस हातात काही गोष्टी नसतात. सरकार त्याला एक पर्याय असू शकतं परंतु जर सरकार राजकारणात मग्न असेल तर सर्वसामान्य लोकांकडे कोण बघणार? हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर महाराष्ट्रालाही शोभणार नाही. नसल्याचे त्यांनी सांगितले.

गिरीश बापट मोठे नेते होते. यांनी मंत्री असताना त्यांनी चांगले काम केलं. मोठा नेता आपल्यात नाही. आमच्या सारखे नवीन आमदार या नेत्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. पुढच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

आत्महत्यांच्या घटनेचं राजकारण करु नये :रोहित पवार

आत्महत्येसारख्या घटनांचा फक्त राजकिय हेतुतून तपास सीबीआय कडे जात असेल तर ते योग्य नाही. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पण हे करत असताना राजकारण करता काम नये. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने महाराष्ट्रच्या पोलिसांची बदनामी केली. त्यांना वाटले की सुशांत सिंग राजपूत याचं नाव पुढे करून बिहाराची निवडणूक सोपे होईल पण तसे झालं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

डिसले गुरुजी अमेरिकेला जाऊन आले पण अहवाल दिला नाही, विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार? जिल्हा परिषदेपुढं प्रश्न

राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला म्हणून यात्रा काढणार असे समजले. यात्रा काढण्यात त्यांचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर खालच्या पातळीत बोललं गेलं. त्यावेळेस यात्रा का काढले नाही? तेव्हा काय निषेध केला नाही. राजकीय हेतूनं तुम्हाला सगळ्या आहेत गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला संस्कृती कळत नाही ती कधीच तुमच्याकडून जपली जाणार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर केला.

आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्समध्ये वादाची ठिणगी, रोहित शर्मा आणि प्रशिक्षकांमधील मतभेद उघड

तानाजी सावंत एखादं स्टेटमेंट करतात ते आपण किती सिरियसली घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यांचा अभ्यास किती असतो हे दाखवून दिले आहे. त्यांनी सांगितले की १५० बैठका घेतल्या. त्यांची कॅपिसिटी आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा फडणवीस म्हणत होते, मला याबद्दल काही माहित नाही ज्यावेळेस अधिवेशन भरलं त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले या सगळ्या पाठीमागे एकच माणूस आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आता तानाजी सावंत म्हणत आहेत की त्यांनी दीडशे घेतल्या. आता खरं कोण हे लोकांना कसं कळणार? गेल्या आठ नऊ महिन्यात आपल्याला अनेक नाट्यमय घटना बघावा लागल्या आणि लोकांचे हित बाजूला राहिले आहे, असं रोहित पवार म्हणाले.

राज्यात सध्या राजकीय हेरा फेरी सारखा चित्रपट सुरु आहे. हे सगळे राजकीय कलाकार आहेत. स्वतःच्या स्वार्थापोटी, प्रसिद्धी साठी हा चित्रपट रंगवत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…

girish bapat, धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो… – congress mla ravindra dhangekar shared memories with bjp girish bapat

0

पुणे : महापालिका ते संसद, कसब्यावरचं निर्विवाद वर्चस्व आणि पुण्याची ताकद अशी बहुआयामी ओळख मिळवलेलं सुसंस्कृत नेतृत्व गिरीश बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. गिरीश बापट यांनी चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. राजकीय गणिते जुळवताना इतर पक्षांतील नेत्यांशी त्यांनी कायम मधुर संबंध ठेवले. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांची उत्तम मैत्री होती.

गिरीश बापट गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंजत होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या कसबा पोटनिवडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असणार की नाही? असला तर त्याचा फटका काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना बसणार का? अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रचारात सहभागी होणार नाही, असं बापटांनी सांगितलं. पण कसब्यातलं वारं विरोधात जातंय, असं लक्षात येताच भाजपने बापटांना मैदानात उतरवलं. बापटांनीही तब्येतीची तमा न बाळगता पक्षनेतृत्वाचा आदेश मानून नाकाला नळ्या असताना भाजपचा प्रचार केला. पण कसब्याची जागा राखण्यात यावेळी मात्र भाजपला अपयश आलं.

Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर ‘राज’ कसं केलं?
कसब्याचं मैदान मारल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. धंगेकरांना पाहतक्षणी गिरीश बापटांनी त्यांचं निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं, पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धंगेकरांनी बापटांना नमस्कार केला, आशीर्वाद राहू द्यात… असं लडीवाळपणे म्हणाले. त्यावर भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता, रवी काही अडचण आली तर सांग, काही लागलं तर कळव… असं धंगेकरांना उद्देशून म्हणाले. धंगेकरांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!
रवींद्र धंगेकरांनी २००९ आणि २०१४ साली गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली. दोन्ही वेळा तिरंगी लढती झाल्या. मतविभाजनामुळे गिरीश बापटांनी दोन्ही वेळी बाजी मारली. एकदा तर गिरीश बापट हरता हरता जिंकले. धंगेकरांनी बापटांना घाम फोडला होता. ती निवडणूक बापटांनी केवळ ९ हजार मतांनी जिंकली. परंतु आपल्या विरोधात लढणारा उमेदवार म्हणून बापटांनी कधी धंगेकरांकडे पाहिलं नाही. निवडणूक झाली की सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध असायचे.

पुण्यात सुसंस्कृत राजकारण रुजविण्यात गिरीश बापट यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आज एकंदरीत महाराष्ट्राचं विखारी राजकारण बघता पुण्याला या राजकारणापासून गिरीश बापट यांनी कायम अलिप्त ठेवलं. पुण्याबाहेरचे नेते पुण्यात येऊन एकमेकांबद्दल राजकीय उणीदुणी काढत असताना, एकमेकांवर चिखलफेक करत असताना गिरीश बापट यांनी मात्र पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणून सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कायम ठेवली.

books were gifted to library in marriage, कौतुक करावे तेवढे कमीच! विवाहात चक्क सासरी जाणाऱ्या बहिणीची भर मांडवात ग्रंथतुला – marriage in amravatil books were gifted to library

0

अमरावती: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो या क्षणाला अधिका अधिक आनंददायी व सहस्मरणीय करण्यासाठी सध्या अनेक युवक युती आपल्याला लग्नात भन्नाट कल्पना वापरून असे स्मरणीय करत आहे. काही दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यात लग्नाच्या करारनाम्यावर सही करत अनेकांचे लक्ष वेधले होते तर आज जिल्ह्यातील एका ठिकाणी झालेल्या विवाहात नवरीच्या भावाने चक्क सासरी जाणाऱ्या बहिणीची भर मांडवात ग्रंथ तुला केल्याने गावभर एकाच चर्चेला उधाण आले होते, अनेकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे आज एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा बुद्धिप्रामाण्यवादी विवाह पार पडला. महामानवांच्या विचारांनी प्रेरीत झालेले दाळू आणि पोळकट या दोन परिवाराने हा योग जुळून आणला. दाळू यांच्या कुटुंबातील वधू आणि पोळकर यांच्या कुटुंबातील वर यांचा ऋणानुबंध जोडणारा शिव मंगल सोहळा म्हणून त्याकडे पाहिले जाते.

कर्नाटकात यावेळी स्पष्ट बहुमत, पण कोणाला? Opinion Pollच्या ताज्या सर्व्हेत या पक्षाला…
आहेर, हार-तुरे वाजंत्री, फटाके यावर होणारा अनाठायी खर्च टाळत शिव मंगल परिवर्तनशील शिव विवाह सोहळ्याची विशेषतः म्हणजे मुलीचे वडील शिवदास दाळू यांनी हुंडा पद्धत नाकारुन साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नसमारंभात होणाऱ्या खर्चात बचत करुन जावाई वैभव आणि मुलगी क्रांती हिला सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथ व स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्याचा संकल्प केला होता. त्याची संकल्पपूर्ती यावेळी करण्यात आली. त्यासाठी लग्न विधीदरम्यान नवरीची ग्रंथतुला करण्यात आली. या शिव विवाह सोहळ्याला प्रसिद्ध सत्यपाल महाराज, आमदार देवेंद्र उपस्थीत होते.

शिर्डीत श्रीरामनवमीचा उत्साह; रात्रभर मंदिर खुले राहणार, साईभक्तांसाठी खास आयोजन

लग्नाच्या मंडपातच ग्रंथतुलेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटनही करण्यात आले. शिवाय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वॉटर फिल्टरही देण्यात आले. दरम्यान, सर्व वऱ्हाडी मंडळी आणि पाहुण्यांच्या साक्षीने ग्रंथतुलेतील पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्यात आली. या ग्रंथसंपदेमुळे रोजगाराची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील.

ranjitsinh disale, डिसले गुरुजी अमेरिकेला जाऊन आले पण अहवाल दिला नाही, विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार? जिल्हा परिषदेपुढं प्रश्न – ranjitsinh disale not submit any report after came back from america said by solapur zp education officer sanjay javir

0

सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे अमेरिकेत जाऊन परत आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर रुजू झाले आहेत.याबाबत शिक्षण अधिकारी संजय जावीर यांकडे अधिक माहिती घेतली असता,डिसले गुरुजींनी अमेरिकेत जाऊन आल्यापासून कोणताही अहवाल दिला नाही. मात्र, ते ड्युटीवर हजर आहेत, अशी माहिती दिली. रणजितसिंह डिसले यांनी अमेरिकेत जे शिक्षण घेऊन आलेत ,त्याचा लाभ आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून देऊ असा विश्वास संजय जावीर यांनी व्यक्त केला. रणजितसिह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेला कसलीही माहिती दिली नाही.अमेरिकेत जाऊन काय शिक्षण घेतले,सोलापुरातील किंवा भारतातील विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होईल याबाबत जिल्हा परिषदेला काहीही माहिती नसल्याचं शिक्षणाधिकारी संजय जावीर म्हणाले. रणजितसिंह डिसले यांनी अहवाल दिला तर,आम्ही आगामी जून या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू असेही जावीर यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२२ मध्ये रणजितसिंह डिसले फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेत

ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिकेला गेले होते. गेल्या वर्षी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार होते.डिसले यांनी सहा महिन्यांची रजा घेतली होती.पण ते साडेतीन महिन्यांत ड्युटीवर रुजू झाले असल्याची माहिती सोलापूर शिक्षण विभागाने दिली आहे.सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत २७९५ शाळा आहेत.त्यामधील विद्यार्थ्यांना डिसलेंच्या अमेरिकन शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार,आणि तसे पत्र देखील रणजितसिंह डिसले यांना देऊ असे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी बोलताना सांगितले.रणजितसिंह डिसले यांची शैक्षणिक रजा ही ३ ऑगस्ट २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात होती. पण डिसले हे नोव्हेंबर २०२२ मध्येच रुजू झाले असल्याची माहिती समोर आली आहे.सहा महिन्याऐवजी साडेतीन महिन्यात ते कामावर म्हणजेच माढा तालुक्यातील परीतेवाडी या जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले आहेत.

अंबाबाईच्या दर्शनाला आले, रांगेत असताना कोसळले, अहमदनगरच्या भाविकाला रुग्णालयात नेलं, पण सारं संपलेलं

डिसलेंची चौकशी होल्डवर ठेवली

तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांची चौकशी लावली होती.अमेरिकेला जाण्यासाठी डिसले यांनी रजेचा अर्ज घेऊन थेट मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटले होते.यावरून तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी प्रोटोकॉल प्रमाणे रजेचा अर्ज द्या,असा आदेश बजावला होता.किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांच्याबाबत २०१७ ते २०२० या काळात गैरहजर असल्याची माहिती दिली होती.त्यानंतर चौकशी सुरू झाली होती.या चौकशी बाबत विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे माहिती विचारली असता,त्यांनी चौकशी होल्डवर ठेवली आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अधिक माहिती देतील असे सांगून टाळाटाळ केली.

कौतुक करावे तेवढे कमीच! विवाहात चक्क सासरी जाणाऱ्या बहिणीची भर मांडवात ग्रंथतुला

दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइननं रणजितसिंह डिसले यांना यासंदर्भात त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!

वडील वारले, आईनं शाळेत भात शिजवून दोन्ही पोरांना वाढवलं; एक लेक शिक्षक तर दुसऱ्याला १ कोटी ७० लाखांची फेलोशिप

Latest posts