Sunday, March 26, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2181

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

177

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

mumbai crime news, मला तिला मारायचं नव्हतं, पण…; १८ वर्षीय तरुणीच्या खुनाचा चेतन गाला याला पश्चाताप – grant road tripale murder case chetan gala regrets the murder of 18 year old girl

0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ग्रॅन्टरोडच्या पार्वती मेन्शनमधील चेतन गाला याने पत्नी आणि घरातील मंडळींचा राग शेजाऱ्यांवर काढला आणि शुक्रवारी दुपारी पाच जणांवर चाकूहल्ला केला. त्याने जयेंद्रभाई मिस्त्री आणि ईलाबाई मिस्त्री या दाम्पत्यासह १८ वर्षांच्या जेनील ब्रह्मभट हिचाही बळी घेतला. जेनीलला मारल्याचा पश्चाताप होत असल्याचे चेतन सांगत आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याला शनिवारी सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्याची २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.याप्रकरणी हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच इतर कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी चेतनला अटक केली.

त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. हल्ल्याचे नेमके कारण शोधायचे आहे. तसेच स्थानिकांनी केलेले रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फूटेज जमा करायचे असून चेतन याने ज्या दुकानात चाकू खरेदी केला, त्याची साक्षदेखील घ्यायची आहे, असे सांगत पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. मी पत्नी आणि मुलांपासून दूर राहत असल्याने मानसिक तणावाखाली होतो. ५० दिवसांपासून पत्नीला घरी परतण्याची विनंती करत होतो, पण ती ऐकत नव्हती. त्यामुळे राग अनावर झाला आणि हे कृत्य घडले, असे चेतन याने न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चेतनला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

काळीज पिळवटून टाकणारी घटना: आधी कॅन्सरने पतीचं निधन; आता आईसह दोन लेकरांचे विहिरीत मृतदेह

हल्ला करण्याचा विचार नव्हता पण…

अगदी शेजारी राहणारे मिस्त्री दाम्पत्य आणि चेतन गाला यांच्यामध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, तो मिटविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हापासून मिस्त्री यांच्याबद्दल चेतनच्या मनात राग खदखदत होता. त्यातच पत्नीला आपल्यासोबत न राहण्यास हेच दोघे फूस लावत असल्याचा संशय होता. त्यामुळे त्या दोघांवर हल्ला केला. इतरांवर हल्ला करण्याचा विचार नव्हता, पण चारही बाजूंनी सुरू असलेली आरडाओरड, आपल्यालाच दोषी असल्याच्या नजरेतून सर्वच जण बघत असल्याने संताप अनावर झाला आणि जो मध्ये येईल त्याच्यावर चाकू फिरवला, असे चेतन याने चौकशीत सांगितले.

आर्थिक चणचण हेही कारण

चेतनचे कपडेविक्रीचे दुकान होते. ते पुनर्विकासात गेले तेव्हा पहिल्या मजल्यावर मिळाल्याने फारसे चालत नव्हते. त्यामुळे त्याने ते भाड्याने दिले. मुलाचा पगार आणि दुकानाचे भाडे यावर घर चालत होते. आर्थिक चणचण भासत असल्याचे दुकान आणि घर विकून दुसरीकडे घर घेऊन राहू या, असे तो वारंवार सांगत होता. मात्र पत्नी आणि मुलाचा यास विरोध होता आणि यावरूनही दोघांमध्ये अनेकदा खटके उडत होते, अशीही माहिती समोर आली आहे.

parshuram ghat chiplun news, Parshuram Ghat: परशुराम घाट ७ दिवस बंद? कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग काय, वाचा सविस्तर… – parshuram ghat will be closed for 7 days what is the alternative route for those going to konkan goa read in detail

0

रत्नागिरी : कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक सुरू आहे. या महामार्गावरील परशुराम घाटाबाबत मोठी माहिती हाती आली आहे. मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाट हा २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद ठेवण्याबाबतचे नियोजन येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवरती काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ऍथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून येत्या २ ते ३ दिवसात या बाबतीत अंतिम निर्णय होणार आहे. हा घाट नेमका कोणत्या दिवशी व किती वेळ कसा बंद करायचा याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून येत्या २-३ दिवसांत याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच हा निर्णय घेतला जाणार आहे.

भर रस्त्यात अडवलं, तलवार, लोखंडी रॉड अन् दांडक्याने बेदम मारलं; वादाचं कारण वाचून पोलीसही हादरले…
परशुराम घाटात १.२० किमी लांबीत उंच डोंगररांगा, खोलदऱ्या असल्या कारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे.

सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में.कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतूकीसाठी दि. २७ मार्च २०२३ ते दिनांक ०३ एप्रिल २३ या कालावधीत ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी परशुराम घाट दि. २७ मार्च २०२२ ते दिनांक ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत दु. १२.०० संध्याकाळी ६.०० वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे.

गोदावरीत पोहताना अचानक तोंडाला आला फेस, मित्रांनी पाहताच ठोकली धूम; पुढे जे घडलं ते धक्कादायकच…
सदर बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्यात यावी तसे आदेश देण्याची विनंती पेण रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ मार्च रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या पावसात हा घाट धोकादायक बनला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर्षीही या पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागू नये, यासाठी परशुराम घाटात काम युद्धपातळीवरती सुरू आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने किमान ७ दिवस घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी दिली होती. चिरणी आंबडस या पर्यायी मार्गाला प्रमुख जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. या मार्गाच्या अपग्रेडेशनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

Crime Diary: हत्येसाठी बायकोने दिली बंदूक, दोघांना लगेच केलं ठार; माजी नगरसेवकाचा थरारक खूनी खेळ

rahul gandhi news, ललित मोदी, नीरव मोदी ओबीसी नेते, सन्मानाने परत आणा, त्यांना नेते मानू, वडेट्टीवारांचा टोला – vijay wadettiwar slams bjp over nirav modi and lalit modi on rahul gandhi disqualified issue

0

नागपूर : ललित मोदी आणि नीरव मोदी हे देशातील सर्वात मोठे ओबीसी नेते आहेत. ते पळून गेल्यामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला खूप वाईट वाटले आहे. त्यांना सन्मानाने परत आणून त्यांची पूजा करावी. आम्ही त्यांना आमचा नेता मानणार, चोर म्हणणार नाही. यासह त्यांनी कितीही वेळा देशाची लूट केली तरी त्यांना काही म्हणता येणार नाही, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल कर खरमरीत टीका केली आहे.सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर भाजप त्यांना ओबीसी विरोधी म्हणत आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांनी राहुल गांधींविरोधात देशभरात निदर्शने केली. यावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘नीरव आणि ललित यांचे भाषण भाजपला विजय मिळवून देईन’

‘नीरव आणि ललित पळून गेल्याने भाजप नेते आणि ओबीसी नेते अतिशय दु:खी झाले आहेत. भाजपने त्यांना सन्मानाने परत आणावे. आम्ही त्यांचे स्वागत रेड कार्पेटवर करू. या देशाला दोघांच्या भाषणांची गरज आहे. तरच भाजप पुढची निवडणूक जिंकू शकेल. ते दोन्ही नेते भाजपला इतके प्रिय झाले आहेत की, जिथे एक चित्र दिसेल तिथे दोघांचेही चित्र असावे आणि दोघांची पूजा व्हावी’, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.

‘लोकशाहीची हत्या होतेय’

‘राजकारण आता कुठे चालले आहे. चोराला चोर म्हणू नका. दरोडेखोराला दरोडेखोर म्हणू नका. जर असं म्हटलं तर संपूर्ण समाजाचा अपमान होईल. त्यांना आता सर म्हणायची परिस्थिती आली आहे. राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करून देशातील लोकशाहीची हत्या करून राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी
‘संविधान न पाळणे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कायदा न पाळणे हे केवळ विरोधकांचेच आहे. आपल्या हातात सत्ता आहे. आपण कितीही पापे केली तरी त्यावर काहीच नाही आणि विरोधक प्रश्न उपस्थित करत असतील तर दडपून टाका. महागाईने गरीब मरत आहेत. बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. पण विरोधकांनी प्रश्न केला तर दडपून टाका आणि सदस्यत्व रद्द करा, असा नवा ट्रेंड देशात सुरू झाल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण सचिवाच्या कारभाराबाबत लिहिले पत्र, गडकरींनी पत्रामागील कारण सांगितलं, म्हणाले…
‘देश भाजपला माफ करणार नाही’

गांधी घराण्याच्या लोकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. ब्रिटिश राजवटीत ज्यांनी इंग्रजांची जी हुजुरी केली ते देशभक्त कसे असू शकतात? काँग्रेस सोमवारपासून देशव्यापी आंदोलन करणार आहे. राहुल गांधींना लोकसभेत येण्यापासून सरकार रोखू शकत नाही. लोकांची मने रोखू नका, जनता भाजपला कधीच माफ करणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Man sets himself ablaze in nanded, डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलींच्या लग्नाची चिंता, हतबल बापाने घेतलेला निर्णय पाहून सगळेच हादरले – nanded: man sets himself ablaze, dies of burns

0

नांदेडः लग्नाला आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर या विवंचनेतून एका पित्याने स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पांगरी तांडा येथे ही हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. नंदू बाबुराव जाधव असं या मयत तरुणाचे नाव आहे. ३७ वर्षीय नंदू जाधव हा खासगी शैक्षणिक बस चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला लग्नाला आलेल्या दोन मुली देखील होत्या. लॉकडाऊनच्या काळात त्याने लोकाकडून कर्ज देखील घेतले होते. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. वाढती महागाई त्यातच लोकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि दोन्ही मुली लग्नाला आल्यामुळे तो मागील काही महिन्यांपासून चिंतेत होता. याच चिंतेतून नंदू जाधव याने शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर डिझेल टाकून पेटवून घेतले.

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल
या घटनेत तो ९० टक्के भाजला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेने पांगरी गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश बोदगिरे हे तपास करीत आहेत.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू Coronavirus in Maharashtra Maharashtra reports two deathe 1956 new Covid-19 cases

0

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.


Updated: Mar 26, 2023, 09:29 AM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra



Zee24 Taas: Maharashtra News

dharashiv news, काळीज पिळवटून टाकणारी घटना: आधी कॅन्सरने पतीचं निधन; आता आईसह दोन लेकरांचे विहिरीत मृतदेह – husband died of cancer now the body of son and daughter along with mother was found in the well

0

धाराशीव : आई आणि दोन लेकरांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली आहे. हा अपघात की आत्महत्या हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. ही घटना तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री बाबुराव तांबे (वय ४० वर्ष), समर्थ बाबुराव तांबे (वय १० वर्ष) आणि दुर्वा बाबुराव तांबे (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, समर्थ हा ४ थी इयत्तेत तर बहीण दुर्वा तांबे ही इयत्ता २ रीमध्ये शिकत होती. समर्थ आणि दुर्वा यांची शाळा सुटल्यानंतर त्यांची आई भाग्यश्री या आपल्या मुलांना घेऊन कुंभारी शिवारातील स्वतःच्या शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान काही वेळानंतर सुशांत स्वामी हे पाणी आणण्यासाठी आदेश स्वामी यांच्या शेतातील विहिरीवर गेले असता या तिघा माय-लेकरांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला.

किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. तसंच पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तुळजापूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशीलकुमार चव्हाण, विठ्ठल चासकर, पो. हे. कॉ. वैभव देशमुख, गणेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

आदेश स्वामी यांच्या खबरीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नाही.

दरम्यान, मयत भाग्यश्री तांबे यांचे पती बाबुराव तांबे हे सहा वर्षापूर्वी कॅन्सर या दुर्धर आजाराने मयत झाले होते. त्यामुळे सासू, एक मुलगा आणि दोन मुलींची जबाबदारी भाग्यश्री यांच्यावर पडली होती. शेती ही तलावाच्या खालीच्या बाजूस असल्याने जमिनीत सतत ओलावा असल्याने अपेक्षित उत्पन्नही मिळत नव्हते. त्यानंतर एक मुलगी ह्रदयविकाराने मयत झाली होती. अशी अनेक संकटं येत असल्याने व शेतातूनही काहीही उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. या नैराश्यातूनच महिलेने आपल्या मुलांसह आत्महत्या केली असावी, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Pro-Khalistani supporters attack, abuse DC-based Indian journalist outside Embassy in Washington | India News

0

WASHINGTON: Washington-based Indian journalist Lalit Jha was physically attacked and verbally abused by pro-Khalistan supporters in Washington while he was covering a pro-Khalistan protest outside the Indian Embassy on Saturday afternoon.
Jha on Sunday thanked US Secret Service for protecting him, and helping him do his job. He said he was hit on his left ear with two sticks by pro-Khalistan supporters. He also shared a video of the Khalistani supporters on his Twitter handle.
“Thank you @SecretService 4 my protection 2day 4 helping do my job, otherwise I would have been writing this from hospital. The gentleman below hit my left ear with these 2 sticks & earlier I had to call 9/11 & rushed 2 police van 4 safety fearing physical assault,” Jha tweeted on Sunday.
“At one point I felt so threatened that I called 911. I then spotted Secret Service officers and narrated the incident to them,” Jha told ANI, adding the protesters took charge of the situation. However, the journalist decided to take no action against those who heckled him.
“The pro-Khalistan protestors in support of Amrit Pal waved Khalistan flags and descended upon the embassy in the presence of the US Secret Service. They even openly threatened to vandalize the embassy and threatened the Indian Ambassador Taranjit Singh Sandhu,” Jha told ANI.
The protesters included turbaned men of all ages who raised pro-Khalistan slogans. They came in from different parts of the DC-Maryland- Virginia (DMV) area. The organisers used mics to make anti-India speeches both in English and Punjabi languages and targeted the Punjab Police for alleged human rights violations.
Multiple events of protests by supporters of Khalistan have been staged outside the Indian embassy and the San Francisco Consulate. Earlier this week the Indian Consulate in San Francisco was also attacked on March 20.
Visuals shared online show a huge mob brandishing Khalistan flags mounted on wooden poles, using them to smash glass doors and windows of the consulate building. They raised pro-Khalistan slogans as they broke through makeshift security barriers raised by the city police and installed two Khalistani flags inside the premises.
The United States strongly condemned the attack on the Indian consulate in San Francisco by a group of separatist Sikhs, terming it absolutely unacceptable.
The United States has condemned the attack on the Indian Consulate in San Francisco and any attack against diplomatic facilities within the US. The US has pledged to defend the safety, and security of these facilities as well as the diplomats who work within them.
“The United States condemns the attack against the Indian Consulate and any attack against diplomatic facilities within the United States. We pledge to defend the safety and security of these facilities as well as the diplomats who work within them,” US State Department spokesperson told ANI.
US National Security Advisor Jake Sullivan said via Twitter that the US condemns the acts of violence against the Indian Consulate in San Francisco. He further said that the US is committed to the safety and security of Indian diplomats.
He confirmed that the US State Department is in touch with the local law enforcement authorities.

st bus and car accident, आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; अपघातात महिला ठार – st bus and car accident in pimprad phaltan satara woman died

0

सातारा : आळंदी-पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी बस आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार, तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपल्ले (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये एसटी बसमधील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे.आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने निघालेली एसटी (एमएच १४ बीटी १२६७) आणि फलटणहून सांगोलाच्या दिशेने चाललेली कार (एमएच १२ डीवाय १५०२) यांची पिंपरद हद्दीतील बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत एक ठार, तर नऊ जण जखमी झाले. पिंपरदजवळ हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपल्ले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले. आणि कमल भीमराव यलपल्ले (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर एसटी बसमधील स्वाती बंडू खोमणे (१७, रा. निंबळक ), दयानंद सीताराम गावडे (१९, रा. गुणवरे), श्रद्धा सूर्यकांत दळवी (१७), आकांशा बापू चव्हाण (१७, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (१७, रा. निंबळक ) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी हे जखमी झाले.

कामं झाली तर श्रेय तुमचं अन् रखडली तर जबाबदारी इतरांची?; शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना पुन्हा डिवचलं

याअपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एसटी बसचालक शरद वडगावे व कारचालक मोहन भीमराव यलपल्ले यांनी एकमेकांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तपास करत आहेत.

उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना खुलं आव्हान; ‘… देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवयाही काढून टाकेन’

man suicide in depression, किराणा सामान उधार दिले नाही म्हणून दिला मानसिक त्रास, वैतागलेल्या मालकाने उचलले टोकाचे पाऊल – beed news man takes his own life in depression

0

बीड: किराणा सामान उधार दिले नाही म्हणून सतत मानसिक त्रास दिल्याने एका किराणा दुकान चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील कान्नापूर मोहा येथे घडली आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. गावातील किराणा दुकानदार अविनाश अशोक देशमुख वय वर्ष ३२ राहणार कानपूर तालुका धारूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अविनाश देशमुख यांचे कानापूर येथे किराणा दुकान आहे. गावातील स्वप्निल रामकिसन देशमुख, सुरज रामकिसन देशमुख, सुमित्रा रामकिशन देशमुख यांना अविनाशने किराणा सामान उधार दिले नाही‌. याचा राग मनात धरून यातील आरोपी किराणा चालक अविनाश देशमुख यास सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून मानसिक त्रास देत असत. या मानसिक त्रासाने अविनाश नेहमीच त्रस्त असायचे कोणत्या न कोणत्या कारणावरून भांडणंही हे तिघेजण काढत होते.

सततच्या या भांडणाला आणि मानसिक त्रासाला अविनाश कंटाळले होते. घरच्यांशी बोलतानादेखील त्यांनी हे तिघे मानसिक त्रास देत आहेत, असा उल्लेख केला होता. या सगळ्यागोष्टीचा त्रास अविनाश यांना होत होता. तसंच, सतत हालअपेष्टा आणि अपमान सहन होत नसल्याने अविनाशने स्वतःच्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन रात्री आठच्या सुमारास आत्महत्या केली. मात्र अविनाशने ही आत्महत्या मानसिक त्रास देणाऱ्या व्यक्तींमुळे केली आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी स्वप्निल रामकिसन देशमुख, सुरज रामकिसन देशमुख ,सुमित्रा रामकिशन देशमुख, यांच्यावर शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये मयताचे भाऊ संतोष देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम ३०६,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस कशी असणार पावसाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज
जवळच्या लोकांनी इतक्या खालच्या थरापर्यंत जाऊन मानसिक त्रास दिल्याने ही आत्महत्या घडली असल्याचे गावकरी देखील स्पष्टपणे आणि उघड बोलत आहेत. अविवाश देशमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. या घटनेनंतर सर्वत्र गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

0

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सातत्याने पडत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट जारी केली. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


BGR | Updated: Mar 26, 2023, 08:27 AM IST

Maharashtra Weather : पुन्हा अवकाळी संकट! 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update



Zee24 Taas: Maharashtra News

Latest posts