Wednesday, May 31, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2531

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

27

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

29

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

22

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

21

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

20

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

25

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Solapur News, सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा – the coach of a freight train carrying a car derailed in solapur

0

सोलापूर: सोलापूर जवळ असलेल्या पाकणी येथे दौंडकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी मुंढेवाडी ते पाकणीदरम्यान पाकणी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरून सांयकाळी पावणेपाचच्या सुमारास घसरली आहे. ही मालगाडी लुपलाईनवर असल्याकारणाने मालगाडीचा वेग कमी होता. रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला आहे. डाऊन साईडचे चार ते पाच डबे मेन लाइनवर असल्यामुळे रेल्वे वाहतूक दोन ते अडीच तास खोळंबली होती. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती दिली.रुळावरून डबा घसरल्याने अधिकाऱ्यांची धावपळ

पाकणी रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाल्याची माहिती कळताच रेल्वेचे आरपीएफ ऑफिसर सतीश विधाते फौज फाट्यासह दाखल झाले होते. या अपघातात कोणतीही जीविहानी झाली नाही.

लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, खासदार संजय जाधव यांना केला चरणस्पर्श
रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी डीआरएम निरजकुमार धोरे, अधिकारी आलोरे, पी. डब्ल्यू. मुळे हे ठाण मांडून होते. रेल्वेचे रेस्क्यू टिमने मुंढेवाडीकडील मेन लाइनवरचे मालगाडीचे डबे, रेल्वे इंजन मुंढेवाडीस्थानकाकडे घेऊन जाऊन सांयकाळीे ७.२५ ला मेन लाइन मोकळी केली. हा अपघात बघण्यासाठी यावेळी पाकणी आणि परिसरातील बघ्याची गर्दी झाली होती.

ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी, मेहकरमधील घटना
अहमदाबाद ते बंगळुरूकडे कार घेऊन निघाली होती मालगाडी

रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना माहिती दिली,ही मालगाडी कार घेऊन अहमदाबाद ते बंगळुरूकडे जात होती.मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक डबा रुळावरून घसरला. मालगाडीचा वेग कमी असल्याने एकच डबा रुळावरून खाली उतरला. यामध्ये कोणतीही जीविहानी झाली नाही. वित्तहानीबाबत रेल्वे अधिकारी एक समिती नेमून अपघाताचे नेमके कारण व एकूण नुकसान किती झाला याबाबतची माहिती घेणार आहेत.
IPL फायनलवर सुरू होता सट्टा, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, गोव्याहून आलेले बुकी नागपुरात अकडले

LeT leader who indoctrinated 26/11 terrorists who attacked Mumbai dies in Pakistan jail | India News

0

ISLAMABAD: Jamaat-ud-Dawa (JuD) leader and outlawed Lashkar-e-Taiba (LeT) founding member Abdul Salam Bhuttavi, who had indoctrinated terrorists for the 26/11 Mumbai terrorist attacks, was found dead inside his prison cell in Sheikhupura town of Punjab province, Pakistani authorities confirmed on Tuesday.
Speaking to TOI, authorities claimed that the JuD leader’s death had occurred due to cardiac arrest on Monday. “It was a severe heart attack and it caused sudden death on the spot in a prison cell,” a well-placed source confirmed.
His funeral prayers were offered at 9 am (local time) on Tuesday at LeT’s headquartersin Muridke, near Lahore. Bhuttavi (78) was believed to be a key figure responsible for indoctrination of LeT terrorists and its affiliated outfits. He, however, was not sentenced for masterminding the 2008 Mumbai attacks.
A court in Pakistan had sentenced him to prison time along with two other JuD leaders, Malik Zafar Iqbal and Hafiz Abdul Rehman Makki, in August 2020 for financing terror, ahead of a September 2020 deadline for Pakistan to avoid being blacklisted by the Financial Action Task Force (FATF), the global financial watchdog, for failing to curb “terror financing”.
Each of them were handed more than 16 years in jail to be served concurrently. The men were considered to be close associates of LeT founder Hafiz Saeed. Salam was described as the interim leader of the group during the brief periods when Saeed was arrested following the Mumbai attacks, and running its network of seminaries. In mid-2002, Bhuttavi was in charge of establishing an LeT organisational base in Lahore.
The US treasury department had sanctioned him in September 2011, saying he had been responsible for fundraising, recruitment and indoctrination of LeT operatives for 20 years.“Bhuttavi…helped prepare the operatives for the November 2008 Mumbai attacks by delivering lectures on the merits of martyrdom. Bhuttavi has issued fatwas authorizing LeT/JuD’s militant operations, has instructed group leaders and members, and is responsible for LeT/JuD’s madrassah network,” the US treasury department had said at the time.
The UNSC designated Bhuttavi a terrorist in 2012 for being associated with al-Qaida for “participating in the financing, planning, facilitating, preparing, or perpetrating of acts or activities” by LeT. At the time, the UNSC described Bhuttavi as a founding member of LeT and deputy to Hafiz Saeed.
“Bhuttavi has served as the acting emir of Lashkar-e-Tayyiba/Jamaat-ud-Dawa (LeT/JuD) on at least two occasions when Saeed has been detained. Saeed was detained days after the November 2008 Mumbai attacks and held until June 2009. Bhuttavi handled the group’s day-to-day functions during this period and made independent decisions on behalf of the organization,” the Security Council notification said. The UNSC notification added that Bhuttavi helped prepare the operatives for the November 2008 terrorist assault in Mumbai by delivering lectures on the merits of martyrdom operations.

50 Khoke Ekdam OK, लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, खासदार संजय जाधव यांना केला चरणस्पर्श – 50 khoke ekdam ok slogans were made after santosh bangar arrived at a wedding ceremony in parbhani

0

परभणी : शिंदे गटाचे नेते जिथे कुठे जात आहेत तेथे ‘एकदम ओके’ अशी घोषणाबाजी त्यांची काही केल्या पाठ सोडत नाही. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले असता त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचे चरणस्पर्श केले. त्यानंतर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीमुळे लग्न समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक खासदार आणि आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गुहाटी येथे गेले. त्यानंतर या आमदारांनी पन्नास खोके घेतले असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जात आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले असता त्यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी, मेहकरमधील घटना
विशेष बाब म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव हे त्या लग्न समारंभाला उपस्थित होते. आमदार संतोष बांगर यांना ते दिसल्यानंतर त्यांनी त्यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

IPL फायनलवर सुरू होता सट्टा, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, गोव्याहून आलेले बुकी नागपुरात अकडले
मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदार आणि आमदारांना अशा घोषणाबाजीचा सामना करावा लागत आहे. परभणी हा मागील तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे आता या ठिकाणी शिंदे गटाचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune Crime : म्हणून प्रेयसीने प्रियकराला संपविले, वाघोली खून प्रकरणाचा झाला धक्कादायक उलगडा

buldhana news, ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी, मेहकरमधील घटना – a mother and daughter died and a father and another daughter were seriously injured in a horrific accident in buldhana

0

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्गासह अंतर्गत वाहतूक मार्गामध्ये देखील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटासायकलवरील माय-लेकी ठार झाल्या. तर वडील व दुसरी मुलगी जखमी झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव आलेगाव रोडवर जनुना फाट्याजवळ आज,३० मे च्या सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात झाला.परवीन बी उस्मान शाह (३३) व खुशी उस्मान शाह (३) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर उस्मान शाह (३७) व त्यांची दुसरी मुलगी नगमा (७) हे गंभीर जखमी आहे. शाह कुटुंब मूळचे डोणगाव येथील रहिवाशी असून सध्या ते बाळापूरात राहत होते. आईला भेटण्यासाठी उस्मान शहा पत्नी व दोन मुलींसह डोणगावला येत होते.

IPL फायनलवर सुरू होता सट्टा, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, गोव्याहून आलेले बुकी नागपुरात अकडले
उस्मान शाह मोटारसायकल ने कुटुंबासह डोणगावकडे येत होते. डोणगाव-आलेगाव रोडवरील जनुना फाट्याजवळील वळणावर गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील चौघेही गंभीर जखमी झाले. त्याच रस्त्याने डोणगाव कडे जाणाऱ्या नवाज कुरेशी यांनी तातडीने सर्व जखमींना त्यांच्या गाडीत टाकून उपचारासाठी मेहकर येथे हलवले. मात्र उपचाराला नेत असताना गोहोगाव जवळ खुशी(३) चा मृत्यू झाला.

Pune Crime : म्हणून प्रेयसीने प्रियकराला संपविले, वाघोली खून प्रकरणाचा झाला धक्कादायक उलगडा
खुशीची आई परवीन बी (वय ३३ वर्षे) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. मायलेंकीचा मृत्यू आणि बाप व लेक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने डोणगावात शोककळा पसरली आहे.
Nagpur Crime: बहिणीला अश्लील मॅसेज पाठवले, भाऊ संतापला, अनेकदा समजावले, शेवटी घडले धक्कादायक

Tollywood director Pijush Saha arrested for fraud, aspiring actor alleges he’s been duped 20 lakhs | Bengali Movie News

0

Director-Producer Pijush Saha who has produced several Tollywood films like ‘Kartabya’, ‘Raju Uncle’, and ‘Tulkalam’ has been arrested on charges of duping an aspiring actor of Rs 20 lakh.
According to reports, the well-known director took Rs 20 lakh from Akshay Gupta, who hails from Rampurhat in Birbhum. He had promised Akshay that the aspiring actor will be given a chance to make his debut in a leading role in Pijush Saha’s film. However, the filmmaker-producer didn’t give him any chance and he even refused to return the money despite several requests from the guy.
Akshay Gupta finally decided to go to the police and filed an FIR against the director last year. Police have now arrested director Pijush Saha based on the FIR filed by Akshay. Right now, the director is in police custody as the court has rejected his bail application.

Akshay Gupta who came up with the shocking allegation revealed that he comes from a middle-class family and his father died a long time ago. It wasn’t possible for him to give Pijush 20 lakhs at a time, but he still managed to give the huge sum and trusted the director. Akshay says that he even attended acting classes under Pijush for a few days.
He further revealed that Pijush Saha at that time said that he has already launched some of the big names in the industry such as Soham Chakraborty and Ankush Hazra. So, it won’t be difficult for him to launch Akshay also. The aspiring actor has said that the budget of the film Pijush promised was around Rs 1 crore. The director told him that he would give Rs 50 lakh and the rest Akshay have to manage. However, the young lad could only arrange 20 Lakhs.
Akshay believed Pijush Saha’s words and waited for a long time. However, the director, after some time, showed no interest in making a movie with him. Instead, he launched his son Prince in the film ‘Jaalbondi’.
Later, Pijush also didn’t entertain the guy over the phone as well. Even when Akshay’s mother was suddenly diagnosed with cancer, he had requested the director to return some of the amount but the director didn’t respond. Akshay says he had to file the FIR out of compulsion.

Delhi Murder Woman Murdered By Roommate Bottles Of Beer And Liquor And Food In Room; संशयास्पद परिस्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0

नवी दिल्ली: साक्षी हत्याकांड ताजं असतानाच दिल्लीत आणखी एक हत्येची घटना घडल आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. याप्रकणी पोलिसांनी या महिलेच्या रुममेटला अटक केली होती. यावेळी पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा क्राइम सीन अत्यंत हादरवणारा होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह, तिच्या आसपास बिअर आणि दारुच्या बाटल्या. तसेच, टेबलवर काही जेवणही ठेवलेलं होतं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ३५ वर्षीय राणी असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिच्यासोबत राहणाऱ्या ३६ वर्षीय सपनाला संशयाच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

२ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी
दारु प्यायल्यानंतर दोघींमध्ये भांडण

राणी आणि सपना या दोघी भाड्याच्या घरात राहत होत्या. राणी गुडगावमधील ब्युटी पार्लरच्या दुकानात काम करायची आणि सपना पार्टींमध्ये वेटर/डेकोरेटर म्हणून काम करायची. तिचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि राणी या त्यांच्या नेहा नावाच्या मैत्रिणीच्या घरी रात्री मित्रांसोबत दारु पार्टी करत होत्या. यादरम्यान, सपना आणि राणीमध्ये भांडण झाले. पार्टीनंतर दोघीही त्यांच्या फ्लॅटवर परतल्या आणि पुन्हा दारुचं सेवन करु लागल्या.

नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे
पहाटे साडेचारच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद होऊन हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यादरम्यान, सपनाने भाजी कापण्याच्या चाकूने राणीच्या छातीवर वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला

वडिलांना शिवीगाळ करण्यावरुन वाद

पोलिसांच्या चौकशीत सपनाने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. राणीने तिच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. यामुळे ती संतापली. त्यांच्यात वाद झाला आणि मग रागाच्या भरात तिने राणीवर चाकूने वार करुन तिचा खून केला. सपनावर ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nmc: 30 medical colleges derecognised in 2 months, 100 more in line, say sources | India News

0

NEW DELHI: Around 30 medical colleges across the country have lost recognition over the past two months allegedly for not following standards set by the National Medical Commission (NMC), official sources said on Tuesday. About 100 more medical colleges in Tamil Nadu, Gujarat, Assam, Punjab, Andhra Pradesh, Puducherry and West Bengal may also face similar action, they said.
The colleges were not found to be complying with the set norms and several lapses related to CCTV cameras, Aadhaar-linked biometric attendance procedures and faculty rolls were found during inspections carried out by the Commission, an official source said.
According to government data, the number of medical colleges has increased significantly since 2014.
There is an increase of 69 per cent in medical colleges from 387 before 2014 to 654 as of now, Minister of State for Health Bharati Pravin Pawar had told the Rajya Sabha in February.
Further, there is an increase of 94 per cent in MBBS seats from 51,348 before 2014 to 99,763 as of now and an increase of 107 per cent in PG seats from 31,185 before 2014 to 64,559 as of now.
To increase the number of doctors in the country, the government has increased the number of medical colleges and subsequently increased MBBS seats, she had said.
The measures and steps taken by the government to increase the number of medical seats in the country include a centrally-sponsored scheme for establishment of new medical colleges by upgrading district/referral hospitals, under which 94 new medical colleges are already functional out of 157 approved.
Reacting to derecognition of medical colleges, experts from the field said the NMC is largely relying on the Aadhaar-enabled biometric attendance system for which it considers only the faculty which is on duty during daytime from 8 am to 2 pm.
“But the working hours of doctors are not fixed. They have to work in emergency and at night shifts also. So the NMC’s rigidity with the working hours has created this issue. Such micro management of medical colleges is not practical and the NMC needs to be flexible to such issues,” an expert said.
Another expert said, “The NMC is derecognising medical colleges believing there are deficiencies. At the same time, the NMC has also allowed the registration of students in such colleges, which is a contradiction. Moreover, such experiment is tarnishing India’s image at the global level because India is the largest supplier of doctors and with such instances coming to light, the world will lose confidence in Indian doctors.”

UWW condemns detention of wrestlers; expresses disappointment over investigation against Brij Bhushan Singh | More sports News

0

HARIDWAR: Reacting for the first time, the United World Wrestling (UWW) – the sport’s global governing body – on Tuesday condemned the detention of India’s leading wrestlers by the police during a protest march on Sunday and expressed its deep disappointment over the tardy pace of investigation against Wrestling Federation of India’s (WFI) sidelined president, Brij Bhushan Sharan Singh, who is accused of sexually harassing seven female grapplers, including a minor. The UWW also threatened to suspend the wrestling federation if its pending elections weren’t held within the stipulated deadline of 45 days as suggested by the Indian Olympic Association’s (IOA) two-member ad-hoc committee, which has been tasked with running its day-to-day affairs of the WFI and hold the electoral process to its new executive council (EC).
“For several months, UWW has followed with great concern the situation in India where wrestlers are protesting over allegations of abuse and harassment by the president of the WFI. The events of these last days are even more worrying that the wrestlers were arrested and temporarily detained by the police for initiating a march of protest. The site where they had been protesting for more than a month has also been cleared out by the authorities. UWW firmly condemns the treatment and detention of the wrestlers. It expresses its disappointment over the lack of results of the investigations so far. UWW urges the relevant authorities to conduct a thorough and impartial investigation into the allegations,” the UWW said in a statement.
“Finally, UWW will request further information about the next elective general assembly from the IOA and the ad-hoc committee of the WFI. The 45-day deadline that was initially set to hold this elective assembly shall be respected. Failing to do so may lead UWW to suspend the federation, thereby forcing the athletes to compete under a neutral flag,” the statement added.

Late Actress Vaibhavi Upadhyaya Fiancé Jay Gandhi shares emotional Instagram Post; ती गोष्ट मला नेहमीच बोचत राहील, वैभवीच्या निधनानंतर Fiancé जय गांधीची अस्वस्थ करणारी पोस्ट

0

मुंबई : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या अपघाती निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील जॅस्मिनच्या भूमिकेतून वैभवीने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. हिमाचल प्रदेशात झालेल्या कार अपघातात वैभवीला प्राण गमवावे लागले. यावेळी तिच्यासोबत तिचा होणारा पती जय गांधीही होता. वैभवीच्या निधनानंतर जयने सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.”आपण परत भेटेपर्यंत… तुझ्या त्या खास आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहतील. जर तू थोड्या वेळासाठीही परत येऊ शकलीस, तरी आपण नेहमीप्रमाणे बसून बोलू शकतो. तू माझ्यासाठी कायमच सर्वस्व होतीस आणि नेहमीच राहशील. तू आता इथे नाहीस, ही वस्तुस्थिती मला नेहमीच वेदना देत राहील, परंतु आपण पुन्हा भेटेपर्यंत तू कायम माझ्या हृदयात नेहमीच असशील…तुझ्या आत्म्यास शांती लाभो प्रिये” अशा आशयाची पोस्ट जयने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.


वैभवीने मृत्यूच्या आधी पोस्ट केलेला अखेरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘सगळं काही बाजूला ठेवून थोडा वेळ थांबा आणि मोकळा श्वास घ्या.. कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण जगून घ्यायला हवा..’ अशा आशयाची कॅप्शन तिने दिली होती. तिच्या मृत्यूनंतर ही पोस्ट वाचून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. मृत्यूच्या अवघ्या १६ दिवसांपूर्वी लिहिलेली पोस्ट योगायोग आहे की दुसरं काही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

उद्धव की एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचं स्वप्न कुणी पूर्ण केलं? राज ठाकरे थेट आणि स्पष्टच बोलले…
हिमाचल प्रदेशमध्ये वाग्दत्त पती जय गांधी सोबत फिरायला गेलेल्या अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या कारला भीषण अपघात झाला होता. यात वैभवीचा मृत्यू झाला. सीटबेल्ट न लावल्याने वैभवीला प्राण गमवावे लागल्याची चर्चा होती, मात्र जयने ती फेटाळून लावली होती.

त्या कष्टाचं फळ आता आम्ही चाखतोय,लेकासोबत संकर्षणनं शेअर केला खास Video नक्की बघा

NASA Finds Giant Black Hole In Milky Way Galaxy Can Swallow 800 Sun; अंतराळात सर्वात मोठा ब्लॅक होल सापडला, ८०० सूर्य गिळंकृत करण्याची क्षमता

0

मुंबई: दीर्घकाळापासून माणूस अवकाशावर लक्ष ठेवून आहे. अंतराळ घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर अंतराळ संस्था लक्ष ठेवून असतात. कारण, अंतराळात काही घडलं तर त्याचा थेट परिणाम हा पृथ्वीवर दिसून येतो. अंतराळातील मिल्कीवे गॅलेक्सीमधील कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होलमुळे (Black Hole) पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होतो. अंतराळ संस्था नासाला अवकाशात लाखो ब्लॅक होल असल्याचं आढळून आलं आहे. पृथ्वीवर होत असलेलं प्रदूषण यासाठी जबाबदार आहे. पण, आता सापडलेला ब्लॅक होल इतका मोठा आहे की तो आठशेहून अधिक सूर्य (Sun) गिळंकृत करु शकतो.

या ब्लॅक होलमध्ये सूर्यासारखे सुमारे आठशे तारे गायब होऊ शकतात, असे नासाला (NASA) आढळून आले आहे. परंतु, मानवी डोळ्यांनी हे ब्लॅक होल दिसणं अशक्य आहे. नासाच्या म्हणण्यानुसार मेसियर ४ नावाच्या ताऱ्यांच्या या समूहात हजारो तारे आहेत. हे पृथ्वीपासून सुमारे ६ हजार प्रकाशवर्ष लांब आहेत. NASA ने आपल्या हबल स्पेस टेलिस्कोपद्वारे ताऱ्यांच्या या गटावर लक्ष ठेवले, ज्यामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठा ब्लॅक होल दिसून आला.

End Of Earth: पृथ्वीचा नाश कसा होणार, तज्ज्ञांकडून धडकी भरवणारी माहिती उघड
स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटचे एडुआर्डो विट्राल (Eduardo Vitral) ही दुर्बिण ऑपरेट करतात. त्यांनी सांगितले की अशा गोष्टी हबलशिवाय दिसू शकत नाहीत. असे म्हटले जाते की एकट्या आकाशगंगेमध्ये १०० दशलक्षाहून अधिक ब्लॅक होल आहेत. पण हे ब्लॅक होल सामान्य नाही. हे आतापर्यंत पाहिलेले सर्वात मोठे ब्लॅक होल आहे.

ना मेकॅनिक, ना उच्चशिक्षित, रोजगारासाठी भन्नाट जुगाड; मामाने तयार केली ‘जुगाड गाडी’

ब्लॅक होल म्हणजे काय?

ब्लॅक होलमध्ये खूप मजबूत गुरुत्वाकर्षण असते. असे म्हटले जाते की ते इतके मजबूत आहे की त्याच्या आतून प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. संशोधकांनी बारा वर्षे मेसियर ४ च्या ताऱ्यांचे निरीक्षण केले होते. आता त्याच्या आत एवढा मोठा ब्लॅक होल दिसला आहे. हे संशोधन नुकतेच रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (Royal Astronomical Society) च्या मंथली नोटिसेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण खूप मजबूत आहे, त्यामुळे काहीही टिकून राहणे कठीण आहे, असं निरिक्षण यामध्ये नोंदवण्यात आळं आहे.

नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे

Latest posts