Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2559

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

35

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

38

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

30

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

29

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

33

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

263

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

WTC Final 2023 India vs Australia Oval London Weather Report; WTC फायनलमध्ये पाऊस व्हिलन ठरणार? असे आहे लंडनचे हवामान, पुढील ५ पैकी…

0

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलची लढत आज दक्षिण लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि त्यासाठीचा टॉस २ वाजून ३० मिनिटांनी होईल. जो संघ ही कसोटी जिंकेल तो कसोटी क्रिकेटचा नवा चॅम्पियनश होईल. दोन्ही संघासाठी द ओव्हल हे न्यूट्रल व्हेन्यू आहे. या मैदानावर दोन्ही संघाचे रेकॉर्ड एक सारखे आहे.

क्यूरेटर काय म्हणतात…

द ओव्हलचे मुख्य क्यूरेटर ली फोर्टिस यांनी मंगळवारी सांगितले की, फायनल मॅचमध्ये चेंडू उसळी घेईल. ओव्हलचे पिच पारंपारिक असून तेथे चेंडूला उसळी मिळते आणि फलंदाजांना फायदा होतो. पण यावेळी मात्र पिच कसे असेल याबाबत अनिश्चितता आहे. मॅचच्या पूर्वसंधेला पिचवर गवत दिसत होते. अर्थात खेळ सुरू होण्याआधी गवत कापले जाऊ शकते. ढगाळ वातावरण असेल तर ऑस्ट्रेलियाला फायदा मिळू शकतो. याउटल स्वच्छ प्रकाश असेल तर टीम इंडियाला फायदा होईल.

IND vs AUS: जेतेपदासाठी लढत ऑस्ट्रेलियाशी; ती खोचक शेरेबाजी संपुष्टात आणण्यासाठी टीम इंडिया उत्सुक
द ओव्हलचे पिच रिपोर्ट

मॅचच्या एक दिवस आधीपर्यंत पिचवर गवत दिसत होते. या पिचचा गेल्या ११ वर्षाचा इतिहास सांगतो की येथे झालेल्या १० कसोटी मॅच पैकी फिरकी आणि जलद गोलंदाजांच्या सरासरी फार काही फरक पडला नाही. कर्णधार रोहित शर्मा देखील म्हणाला की, जी परिस्थिती दिसते त्यानुसार जलद गोलंदाजांना मदत मिळणार असे दिसते.

ऑल द बेस्ट टीम इंडिया! १० वर्ष वाट पाहतोय यावेळी ट्रॉफी जिंकाच; भारताला फायनलसाठी शुभेच्छा द्या…
कसे आहे लंडनचे हवामान

फायनल मॅचच्या पहिल्या ३ दिवशी हवामान चांगले असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान २० डिग्रीच्या आसपास असेल. मॅचच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी तसेच राखीव दिवशी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

जेतेपदाच्या या लढतीसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर पाच दिवसाच मॅचचा निकाल लागला नाही किंवा पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे काही तास वा दिवस वाया गेला तर मॅच सहाव्या दिवशी खेळवली जाईल.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

कोकण रेल्वेमार्गावर धावणार वन-वे स्पेशल ट्रेन

0








रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान वन-वे स्पेशल ट्रेन दि. 9 जून रोजी धावणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01149 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन वन-वे स्पेशल ट्रेन ही वन-वे स्पेशल गाडी शुक्रवार, दि. 9 जून 2023 रोजी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे 5 वा. 30 मिनिटांनी सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

या गाडीला एकूण 16 एलएचबी श्रेणीचे कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम 01 कोच, एसी चेअर कार 03 कोच, सेकंड सीटिंगचे 10 कोच, एसएलआर – 01 तर जनरेटर कार 01 असे डबे या गाडीला असतील. वन वे स्पेशल गाडीचे थांबे ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.

हेही वाचा : 









हायवेवर रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, समोर दुचाकी; विचित्र अपघातात दोघांचाही अंत

0

पालघर: दोन दुचाकी आणि एका रिक्षाचा विचित्र असा अपघात डहाणू- जव्हार- नाशिक मार्गावर घडला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन जण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटी आणि मोटारसायकल अशा दोन दुचाकी आणि रिक्षा असा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे येणाऱ्या दुचाकीची समोरून डहाणूकडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर दोन्ही दुचाकींना पुन्हा रिक्षाने जोरदार धडक दिली. धोकादायक वळणावर ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune Accident: अल्पवयीन मुलांनी बाईक दामटवली; पुण्यात भीषण अपघात, दोघांचा करूण अंत
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कल्पेश दशरथ गोवारी (वय 30), हरेश मच्छी (रा. वापी) अशी भीषण अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दिलीप वरठा, माणिक डगला आणि पिंकी डगला हे तिघे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात मायलेकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर,वडील आणि दोन मुली गंभीर जखमी झाले होते.

शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत वाहतूक नियमावली तयार करण्यात आली आहे. ही वाहतूक नियमावली जिल्हाभर लागू करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालघर पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेमार्गावर धावणार वन-वे स्पेशल ट्रेन

0








रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावदरम्यान वन-वे स्पेशल ट्रेन दि. 9 जून रोजी धावणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01149 मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन वन-वे स्पेशल ट्रेन ही वन-वे स्पेशल गाडी शुक्रवार, दि. 9 जून 2023 रोजी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे 5 वा. 30 मिनिटांनी सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

या गाडीला एकूण 16 एलएचबी श्रेणीचे कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम 01 कोच, एसी चेअर कार 03 कोच, सेकंड सीटिंगचे 10 कोच, एसएलआर – 01 तर जनरेटर कार 01 असे डबे या गाडीला असतील. वन वे स्पेशल गाडीचे थांबे ही विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.









Stuck in small Russian town ‘makeshift’ stay; Air India alternate aircraft to leave Mumbai at 1 pm | India News

0

NEW DELHI: Air India will send a ferry flight on Wednesday afternoon (without passengers) to Magdan, Russia, where 232 people — 216 passengers and 16 crew members — are stranded since Tuesday when its Delhi-San Francisco nonstop had diverted to safely following an engine snag.
Being a small far eastern Russian port town, Magdan does not have big hotels and all the 232 people have been staying at makeshift accommodations. The US is also closely watching the situation as a number of American citizens are also believed to be flying this aircraft and are currently in Magdan. The concern arises from the current strained ties between teh west and Russia following the latter’s invasion of Ukraine.

Fx9FyRoakAAdfRD

“Given the infrastructural limitations around the remote airport, we can confirm that all passengers were eventually moved to a makeshift accommodation, after making sincere attempts to accommodate passengers in hotels locally with the help of local government authorities. As we do not have any Air India staff based in the remote town of Magadan or in Russia, all ground support being provided to the passengers is the best possible in this unusual circumstance through our round the clock liaison with the Consulate General of India in Vladivostok, local ground handlers, and Russian authorities,” AI said in a statement.
Vedant Patel, principal deputy spokesperson at US department of state said in his media briefing: “We are aware of a US-bound flight that had to make an emergency landing in Russia. We continue to monitor that situation. I am not able to confirm how many US citizens were onboard that flight… It is likely there are American citizens on board. AI is sending a replacement aircraft to (Magdan) to take passengers to their destination.”
A ferry flight is scheduled to operate to Magdan from Mumbai at 1 pm (IST) on June 7, “subject to necessary regulatory clearances”, which would take passengers and crew of Al-173 onward to San Francisco. “The ferry flight would be carrying food and other essentials for our passengers. All of us at Air India are concerned about the passengers and staff and are making every effort possible to operate the ferry flight as soon as possible, and to ensure the health, safety, and security of all while they wait,” AI statement added.

Air India’s Delhi-San Francisco (SFO) nonstop on Tuesday had made a safe landing in Magadan, Russia, after one of the Boeing 777’s engines developed a snag enroute. The aircraft (VT-ALH) with 232 people on board had taken off from IGI Airport at 4 am Tuesday.
Unlike western carriers, AI overflies Russian airspace — though its Moscow flights were suspended last year — while operating between India, mainly Delhi, and North America.

Air India Delhi-San Francisco flight lands in Russia after engine snag

01:04

Air India Delhi-San Francisco flight lands in Russia after engine snag

Adani Group Share Price Rally After BSE, NSE Raise Circuit Limits; अदानी शेअर्स गगनाला भिडले, नेमकी काय घडली घडामोड, तुम्हाला माहिती आहे की नाही

0

मुंबई : तुम्हीपण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) अदानी समूहाच्या चार कंपन्यांच्या शेअर्सची सर्किट लिमिट बदलली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी विल्मार लिमिटेडची सर्किट मर्यादा बीएसईने ५% वरून १०% पर्यंत वाढवली असून अदानी पॉवरची सर्किट मर्यादा पूर्वी ५% होती, ती आता २०% पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अदानी शेअर्सची उसळी
बीएसईने अदानी समूहाच्या चार कंपन्यांची दैनिक सर्किट मर्यादा वाढवल्यानंतर समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये बुधवारी सुरुवातीच्या व्यवहार सत्रात उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी विल्मर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. तर या उलट आज, अदानी ग्रीनचा स्टॉक ०.७१% वाढून ९९९.९० रुपयांवर पोहोचला असून अदानी पॉवरचा शेअर ८.८० रुपयांनी (३.३५%) वाढून २७१.८० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी, बीएसई आणि एनएसईने २४ मे रोजी अदानी एंटरप्रायझेसला अल्पकालीन अतिरिक्त पर्यवेक्षी उपाय (ASM) फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले होते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताय… ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल, जास्तीत जास्त नफा कमवाल
आम्ही हे सुनिश्चित करू की कोणत्याही शेअरची किंमत एका दिवसात निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त किंवा खाली जाणार नाही, असे एनएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

अदानी समूहाचे शेअर्स उसळले
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ०.६९% वाढीसह २,४५०.५० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. वीज क्षेत्राशी संबंधित अदानी पॉवर कंपनीचा शेअर ६.०८ टक्के उसळी घेत २७९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. अदानी टोटल गॅस लिमिटेड ०.६४% वाढून ६८२.७५ रुपये, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स २.५४% वाढीसह ८३६.९५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

Bank Nifty Expiry Day: बँक निफ्टीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नियमात झाला हा बदल
अदानींच्या कोणत्या कंपन्यांची सर्किट मर्यादा वाढवली?
ASE ने अदानी पॉवरमधील सर्किट मर्यादा ५% वरून २०% केली असून अदानी विल्मार, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्किट मर्यादा पाच टक्क्यांवरून १०% करण्यात आली आहे. मार्केट एक्स्चेंजने अदानी समूहाच्या कंपन्यांसह एकूण १७२ कंपन्यांच्या शेअर प्राइस बँडची सर्किट मर्यादा एक्सचेंजने वाढवली आहे.

अदानींनी भाजपला किती पैसे दिले? प्रश्नांचा भडीमार करत राहुल गांधी लोकसभेत मोदींवर बरसले

जानेवारीमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सर्किट लिमिट कमी झाली
यंदा जानेवारीमध्ये किमतीतील उलथापालथ रोखण्यासाठी अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅसवरील सर्किट मर्यादा NSE आणि BSE ने कमी केल्या होत्या. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गने अहवाल जारी केल्यावर शेअर्समध्ये मोठी पडझड सुरू झाली होती, ज्यामुळे जानेवारीमध्ये सर्किट मर्यादा कमी करण्यात आली होती.

Jimny: Maruti Suzuki Jimny launched in India at Rs 12.74 lakh: Price, specs, features

0

Maruti Suzuki India today launched the highly anticipated Jimny 5-door SUV at a starting price of Rs 12.74 lakh (ex-showroom). The 5-door Jimny has already garnered over 30,000 bookings in the Indian market. Deliveries for the Maruti Suzuki Jimny start today across all Nexa dealerships across the country. Customers can also own the Jimny through Maruti Suzuki Subscribe at a monthly subscription fee, starting from Rs 33,550.
Maruti Suzuki Jimny Variant-wise pricing
The Jimny 5-door will be available in Zeta and Alpha variants with automatic and manual transmission choices.

Variant Ex-showroom price Variant Ex-showroom price
Zeta MT Rs 12,74,000 Zeta AT Rs 13,94,000
Alpha MT Rs 13,69,000 Alpha AT Rs 14,89,000
Alpha MT (Dual Tone) Rs 13,85,000 Alpha AT (Dual Tone) Rs 15,05,000

Maruti Suzuki Jimny: Design
The rugged Jimny gets squared body proportions and a flat clamshell bonnet. Featuring LED projector headlamps with washers, the Maruti Suzuki Jimny comes equipped with a chrome-finished five-slate front grille, fog lamps, chunkier body cladding, and more.
Maruti Suzuki Jimny: Dimensions
The Jimny measures 3,985mm in length, 1,645mm in width, and 1,720mm in height. It has a wheelbase of 2,590mm and a ground clearance of 210mm.
Maruti Suzuki Jimny: Off-Roading Pedigree
Maruti Suzuki Jimny has an approach angle of 36 degrees, a departure angle of 47 degrees, and a ramp break-over angle of 24 degrees. Built on ladder frame chassis, the Jimny gets 3-link rigid axle suspension and ALLGRIP PRO (4WD) with low-range transfer gear (4L mode) that offers extreme off-road ability. It enables seamless shifting from 2H two-wheel drive to 4H four-wheel drive on-the-fly.
Maruti Suzuki Jimny: Engine specs
Under the hood, the Maruti Suzuki Jimny is powered by a 1.5L K-series engine with Idle Start-Stop technology that churns out a peak power of 103 hp at 6,000 rpm and a ma torque of 134.2 Nm at 4,000 rpm. The engine is mated with a 5-speed manual and 4-speed automatic transmission. Jimny offers a claimed fuel efficiency of 16.94km/l for 5-speed MT and 16.39km/l for 4-speed AT.

Kolhapur Protest Today Over Offensive Posts On Social Media About aurangzeb; एका पोस्टमुळे कोल्हापुरात तणाव: औरंगजेबावरून रणकंदन, जमावबंदीनंतरही रस्त्यावर उतरले हजारो लोक

0

कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचंही चित्र पाहायला मिळालं.

कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात जमा झाले. तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक व इतर काही भागांत गेला. तिथे त्यांनी हातगाड्या व इतर काही वाहने, दुकानांची तोडफोड केली. यामुळे शहरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही केला. सायंकाळपर्यंत शहरात तणावाची परिस्थिती कायम होती.

Satara News: मुंबईतील तरुण गावी गेला, कोयना धरणातील बॅकवॉटरमध्ये उतरला, मित्रांदेखत गाळात रुतत गेला अन्…

दरम्यान, संबंधित समाजकंटकांवर कारवाई व्हावी; तसेच अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजता सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन ‘बंद’चे आवाहन करण्याचे निश्चित केले. बुधवारी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पोलिसांकडून बंदी आदेश जारी

हिंदुत्ववादी संघटनानी आज कोल्हापूर बंदची हाक दिल्याने काल रात्रीपासूनच कोल्हापूरात चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केलं होतं. स्टेटस ठेवणारे तसेच बेकायदेशीर जमाव जमवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे. बंदची हाक दिल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि हिंदुत्ववादी संघटनांची बैठक पार पडली असून यामध्ये कोल्हापूर बंदचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती पोलिसांनी केली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम राहिल्याने पोलिसांनी रात्री उशिरा कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदी आदेश जारी केले आहेत.

कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात धक्काबुक्की, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न । OffensiveWhatapp States Hindutva organizations in Kolhapur took an aggressive

0

Bandh In Kolhapur : कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात  आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे.  


Updated: Jun 7, 2023, 11:28 AM IST

कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात धक्काबुक्की, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न

Bandh In Kolhapur Today Angry Protests Hindutva organizations

Home Loan Recovery Rule What If You Miss Three or More Installments;

0

मुंबई : गृहकर्जामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे सोपे झाले आहे. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये लोक गृहकर्ज घेऊन सहजपणे घर खरेदी करतात. मात्र, आता छोट्या शहरांमध्येही फ्लॅट संस्कृती झपाट्याने वाढत आहे, विशेषतः नोकरदार वर्गाला सहज गृहकर्ज मिळते. परंतु अनेक वेळा कर्जदार घराचा ईएमआय वेळेवर भरण्यात अपयशी होतो. विशेषत: नोकरी गमावणे किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत आपण ईएमआय भरणे चुकवतो. पण तुम्ही गृहकर्जाचा EMI भरण्यात अपयशी ठरल्यास काय होते, हे तुम्हाला माहित आहे का?

तुम्ही किती EMI चुकवू शकता आणि बँक कधी कारवाई करते, याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. गृहकर्जाला सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले आहे, त्यामुळे कर्जासाठी ग्राहकाला हमी म्हणून बँकेकडे मालमत्ता गहाण ठेवावी लागते.

सलग तिसरा हप्ता न मिळाल्याने बँक ॲक्शन मोडमध्ये
गृहकर्जाचा हप्ता न भरण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? हे सविस्तर जाणून घेऊ. एखाद्या ग्राहकाने गृहकर्जाचा पहिला हप्ता भरला नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला गांभीर्याने घेत नाहीत. ईएमआय भरण्यास काही कारणास्तव उशीर होत आहे, असे बँकेला वाटते. परंतु जेव्हा तुम्ही सलग दोन EMI भरण्यात अपयशी होता, तेव्हा बँक प्रथम रिमाइंडर पाठवते आणि यानंतरही, ग्राहक तिसरा EMI हप्ता भरण्यात अयशस्वी झाला, तर बँक पुन्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली जाते.

अशाप्रक्रारे सलग तीन कर्जाचा EMI चुकवल्यास बँक ॲक्शन मोडमध्ये येते. आणि कायदेशीर नोटीस पाठवूनही EMI न भरल्यास बँक ग्राहकांना डिफॉल्टर घोषित करते. तसेच बँक कर्ज खाते NPA मानते. तर इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही मर्यादा १२० दिवसांची आहे. या काल मर्यादेनंतर बँक पुनर्प्राप्ती प्रक्रियेबद्दल विचार काटे.

पगारवाढीनंतर SIP गुंतवणूक वाढवायची की गृहकर्ज लवकर फेडायचे, काय करणे तुमच्यासाठी फायद्याचे
रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे
मालमत्तेला सुरक्षित कर्जामध्ये गहाण ठेवली जाते, जेणेकरून कर्ज न भरल्यास बँक ती मालमत्ता विकून कर्ज वसूल करू शकते. मात्र, बँकेकडे हा शेवटचा पर्याय आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकाला काही वेळ दिला जातो. तर कायदेशीररीत्या बँकेला त्यांचे पैसे परत मिळण्याचा शेवटचा पर्याय म्हणजे लिलाव. लिलावातून मिळालेली रक्कम कर्जाची रक्कम ऑफसेट करण्यासाठी वापरली जाते.

Home Buying: नोकरी करताना घर घेण्याच्या तयारीत आहात? पुढे होणारा त्रास टाळण्यासाठी समजून घ्या व्याजाचं गणित
तर तीन महिन्यांपर्यंत ईएमआय न भरल्यानंतर बँक ग्राहकाला दोन महिन्याचा आणखी वेळ देते. आणि यामध्येही ग्राहक चूक करत असल्यास बँक ग्राहकाला मालमत्तेच्या अंदाजे मूल्यासह लिलावाची नोटीस पाठवते. जर ग्राहकाने लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजे लिलावाच्या सूचनेच्या तारखेपासून एक महिन्यानंतरही हप्ता भरला नाही, तर बँक लिलावाची औपचारिक प्रक्रिया सुरू करते.

आर्थिक अडचणींमुळे अडलेलं घराचं स्वप्न आता होणार पूर्ण !

डिफॉल्टरचा धोका
दरम्यान, या सहा महिन्यांच्या आत ग्राहक कधीही बँकेशी संपर्क साधू शकतो आणि थकबाकीची रक्कम भरून प्रकरण निकाली काढू शकतो. कर्जाची वेळेवर परतफेड न करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे बँक ग्राहकाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. याचा मोठा फटका म्हणजे ग्राहकाचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर खराब होतो. आणि खराब CIBIL स्कोरमुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळण्यात अडचण येते.

Home Loan Repayment: ​गृहकर्जाचे ओझे वाहता कशाला, या एका ट्रिकने झटपट कमी होईल कर्जाचा भार!
अशा स्थिती जर अशी परिस्थिती एखाद्या व्यक्तीसमोर उद्भवली, म्हणजेच EMI भरण्यात अयशस्वी झालात, तर यावरही काही उपाय आहेत. ग्राहक त्याच्या आर्थिक प्राधान्याच्या आधारावर गृहकर्जाची पुनर्रचना करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी ज्या बँकेतून त्याने गृहकर्ज घेतले आहे, त्या बँकेशी संपर्क साधू शकतो. ग्राहक आपली समस्या बँकेला सांगू शकतो, तसेच कागदपत्रे सुपूर्द करू शकतो. कर्जाची पुनर्रचना केल्यास EMI काही महिन्यांनी पुढे ढकलण्यात किंवा EMI रक्कम कमी करण्यात मदत होऊ शकते. मात्र, अशा स्थितीत गृहकर्जाचा कालावधी वाढतो.

याशिवाय गृहकर्जाचा EMI शक्य तितक्या वेळेवर भरण्याचा प्रयत्न करणे, हा एक सोपा उपाय आहे. यासाठी फिक्स डिपॉझिट असेल तर ती मोडून टाका. तसेच जर काही गुंतवणूक केली असेल तर त्यामधील रक्कम काढा आणि EMI भरा. यासाठी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांकडूनही कर्ज घेऊ शकता आणि तुमच्या सोयीनुसार ते नंतर परत करू शकता.

Latest posts