Tuesday, March 28, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2185

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

4

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

4

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

0

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

0

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

1

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

1

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

3

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

179

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Shrikant Shinde, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई – after the complaint of mp shrikant shinde kolhapur city engineer netradeep sarnobat remove from his post

0

म. टा. प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांना रस्त्याबाबत आलेल्या अनुभवानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली.कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. गेल्या काही वर्षात निधी मोठ्या प्रमाणात आला. पण त्यामधून दर्जेदार रस्ते होत नसल्याच्या तक्रारी होत्या. खासदार शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. तेव्हा रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचे जाणवले.

त्यांनी तातडीने राज्याच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिवांना फोन करून याची माहिती दिली. आपण यामध्ये लक्ष घाला, गरज असेल तर अधिकाऱ्यांनाही बदला अशी मागणीही त्यांनी केली. त्यानुसार तातडीने शहर अभियंता सरनोबत यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. जल अभियंता हर्ष जीत घाटगे यांच्याकडे या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
खासदारांनी तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव आल्यावर शहर अभियंत्याकडून पदाचा कार्यभार काढून घेतला गेला पण सामान्यांच्या तक्रारीनंतर खरंच अशी लगोलग कारवाई झाली असती का? असा प्रश्नही शहरात चर्चिला जातोय.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…

देवेंद्रजी, कुणाला फोडायचं त्याला फोडा पण मनसेची माणसं फोडायचं पाप करु नका : बाळा नांदगावकर

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेत रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता या पदावर आजच महेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात अधिकारी होते. सरनोबत यांच्या पदावर क्षीरसागर यांना नियुक्त करण्यात आलंय.

police arrest bidi worker, खात्यातून काढले १ लाख, मजूर गेला तुरुंगात; जाताना थेट पीएम मोदींचं नाव घेतलं; प्रकरण काय? – jharkhand banking mistake leaves man with over rs 1 lakh two year jail term

0

रांची: झारखंडमध्ये विडी मजुराच्या बँक खात्यात १ लाख रुपये आले. मजुराचा आधार नंबर चुकून एका महिलेच्या एका बँक खात्याशी लिंक झाला होता. मजूर बँक खात्यातून पैसे काढून खर्च करत होता. २ वर्षांत त्यानं १ लाखाहून अधिक रक्कम काढली. महिलेला याबद्दल समजताच तिनं याबद्दलची तक्रार बँक व्यवस्थापकाकडे केली. विडी मजूर असलेल्या ४२ वर्षीय जीतराय सामंत यांना २४ मार्चला पोलिसांनी अटक केली. खात्यातून पैसे का काढले, याबद्दल सामंत यांना विचारणा करण्यात आली. ‘मला वाटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता मी ते पैसे परत करू शकत नाही. मी आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही,’ असं सामंत तुरुंगात जाताना म्हणाले.
अग्निवीर होण्यासाठी निघालेल्या तरुणावर पोलिसांनी ३ गोळ्या झाडल्या; कुटुंब म्हणतं, हा तर…
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात ही घटना घडली. बँक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणे जीतराय सामंत यांचं आधार कार्ड एका महिलेच्या खात्यासोबत लिंक झालं. जीतराय कॉमन सर्व्हिस सेंटरला गेले. आपल्या आधारला लिंक असलेल्या खात्यात पैसे असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर सामंत या खात्यातून पैसे काढू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बँक कर्मचारी या मजुराला पैसे काढण्यात मदत करत होता.
पोलिसांचा २४ तास बंदोबस्त, ६४ लाख खर्च; झाडाला VIP सुरक्षा, पान तोडल्यास शिक्षा; कारण काय?
ज्या महिलेच्या खात्याला सामंत यांचं आधार कार्ड लिंक झालं होतं, तिचं नाव लागुरी आहे. आपल्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचं तिच्या लक्षात आलं. गेल्या सप्टेंबरमध्ये तिनं झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांकडे याबद्दल तक्रार केली. व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितलं. यानंतर अधिकाऱ्यांनी शोध घेतला आणि सामंत यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. सामंत पैसे देण्यास असमर्थ होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

बँक अधिकारी आपल्याला मानसिक त्रास देत आहेत. माझ्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामंत यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्र लिहून केली. ‘करोनाची पहिली लाट आल्यावर देशात लॉकडाऊन लागू झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी बँक खात्यात पैसे जमा करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे मी बँक खात्यातील पैशांची माहिती घ्यायला बँकेत गेलो. त्यावेळी खात्यात १ लाख असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी २-४ महिन्यांमध्ये गरजेनुसार पैसे काढले,’ असं सामंत म्हणाले.

Cec: Delimitation in Assam will be completed in a ‘speedy manner’, yet with care, says CEC | India News

0

GUWAHATI: Chief election commissioner Rajiv Kumar on Tuesday assured that effort will be to complete the delimitation of Lok Sabha and assembly constituencies in Assam in a “speedy manner”, yet with utmost care.
Speaking to the media here, the CEC said that the commission is encouraged by the representation of political parties and organizations during the three-day visit of the poll panel to the northeastern state.
“Close to 65 organizations, 10 political parties spent time with us (during the hearing). There is an understanding, appreciation and participation to get this exercise completed. If we continue receiving such support and suggestions, we will complete the exercise in a speedy manner, as much as required, but with extreme care. It’s a complex exercise,” he said.
Kumar said different historical, cultural, geographical and demographic aspects will be kept in mind during the delimitation exercise. “There should not be a mistake in hurry,” Kumar cautioned, even as he did not disclose a possible timing of completion of the delimitation exercise- to redraw the boundaries of the parliamentary and assembly constituencies of the state.
He said the delimitation in Assam will continue as per the 2001 census figures.
Kumar said as raised by political parties and as per the provisions of the Constitution, the interests of the autonomous council areas and Bodoland Territorial Region (BTR) districts of the state will be kept in mind during the exercise. He confirmed that the number of constituencies in the state will remain the same.
“We will publish a draft and after that will give one-month time for giving us suggestions,” the CEC said.
Principal opposition party, Congress, boycotted the meeting with EC, accusing it of giving “less time” to them. State PCC chief Bhupen Borah alleged the EC visit was ‘predetermined’, indulged in “match-fixing” and influenced by the BJP.
Kumar however rubbished the allegation and EC cannot be or will not be influenced by any force. He said that the EC is open to receive suggestions till April 15 and welcomed all to put forth their suggestions.

sushma andhare, शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याची लगोलग चौकशी करा, ४८ तासांत अहवाल द्या, चाकणकरांचे पोलिसांना आदेश – rupali chakankar order to sambhajinagar police over sanjay shirsat sushma andhare case

0

मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी, अशी मागणी केली. महिला आयोगानेही या प्रकरणात आक्रमक पाऊल उचलून शिरसाट यांची लगोलग चौकशी करुन पुढील ४८ तासांत पोलिसांनी अहवाल द्यावा, असे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजीनगर पोलिसांना दिले आहेत.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलंय?

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना आमदार संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली याबाबतची तक्रार महिला आयोगाकडे श्रीमती सुषमा अंधारे यांनी दाखल केली आहे.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत तसेच या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. ‘ती बाई सगळेच माझे भाऊ आहेत म्हणते…. सत्तार माझेच भाऊ आहेत, भुमरे पण भाऊ… पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती…’ अशी अश्लाघ्य आणि हीन टीका संजय शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर केली होती.

तक्रार दाखल झाली नाही, देवेंद्रजी लक्ष द्या.. की आपल्या आशीर्वादानेच हे सगळं सुरू आहे?

दुसरीकडे सुषमा अंधारे तक्रार दाखल करण्यासाठी परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना अंधारे म्हणाल्या, “कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होत नाही. पोलीस कर्मचारी वरिष्ठांना विचारून घेतो असे उत्तर देताहेत. इथे महिला किती सुरक्षित आहेत? देवेंद्रजी आपण याकडे लक्ष द्याल का की हे सगळे आपल्याच आशीर्वादाने चालू आहे?”

cotton rate, विदर्भाच्या कापूस पंढरीतून गुड न्यूज, पांढऱ्या सोन्यासह, तूर आणि हरभऱ्याचे दर वाढले, जाणून घ्या नवी अपडेट – cotton tur and harbharara rate update in akot and akola market price raised and farmers get relief

0

अकोला : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विदर्भातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर अकोल्यात तुरीच्या दरात तेजी कायम असून आज पुन्हा तुरीचे दर १६५ रुपयांनी वाढले आहेत. कापसाच्या दरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता तुरीमुळे दिलासा मिळाला आहे.

गेल्या ३ दिवसात कापसाच्या दरात सुधारणा होऊन वाढ होत असताना पुन्हा कापसाच्या दरात घसरण होतं असल्याचं चित्र होतं. परंतु, आज मंगळवारी कापसाच्या दरात काहिशी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळ कापसाला प्रतिक्विंटल मागे ७ हजार ७०० ते ८ हजार ३०० रूपयांपर्यत भाव होता. तर सोमवारी देखील ७५ रुपयांनी घसरण झाल्याने कापसाचे दर ७ हजार ६०० ते ८ हजार २२५ रूपयांवर आले होते. आज कापसाच्या कालच्या दराच्या तुलनेत आज शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. ७ हजार ७०० पासून ८ हजार ३२५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाला भाव मिळाला. कालपेक्षा आज कापसाची आवक १ हजार २५० इतकी क्विंटल झाली असून कमी झाली आहे.अकोल्याच्या बाजारात काल कापसाला ७ हजार ९०० पासून ८ हजार १०१ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव होता. पण आज कापूस खरेदी बंद होती.

तुरीच्या दरात १६५ रुपयांनी वाढ

कापसाच्या दराच्या तुलनेत अकोल्यात तुरीला जादा भाव मिळत आहे. दरम्यान, अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला गेल्या दोन दिवसांत २६५ रुपयांनी वाढ झाली असून आज १६५ रूपये प्रतिक्विंटल मागे तुरीचे दर वाढले आहेत. काल प्रतिक्विंटल मागे तुरीला ५ हजार ५०० पासून ८ हजार ८०० रूपयांपर्यत भाव मिळाला होता. तर सरासरी भाव ७ हजार ९०० रूपये मिळाला होता. पण आज तुरीचे दर वाढल्याने हा आकडा ७ हजार पासून ८ हजार ९६५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे गेला आहे. दरम्यान १ हजार ९७१ क्विंटल इतकी तूर खरेदी झाली आहे.

झरझर चढले अन् धाडकन आदळले! न्यायालयाकडून गौतम अदानींना दिलासा पण गुंतवणूकदार धास्तावले

अकोटच्या कृषी बाजारात सोमवारी तुरीच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली होती. पण आज तुरीचे दर पाच रुपयांनी घसरले आहेत. ७ हजार ७०० ते ८ हजार ७२५ रूपये इतका भाव आजच्या तारखेत तुरीला मिळतो आहे. अकोटच्या बाजारात कापसाच्या दराच्या तुलनेत तुरीला ५०० रुपयांनी ज्यादा भाव मिळत आहे. तर अकोल्याच्या बाजारात ८६५ रुपयांनी तुरीला जादा भाव आहे.

सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…

हरभऱ्याच्या दरात १४० रुपयांनी वाढ

अकोल्यात हरभऱ्याच्या दरात १४० रुपयांनी वाढ झाली आहे. आज दरवाढ होऊन हरभऱ्याचे भाव ४ हजार ते ५ हजार १४० रूपयांपर्यत प्रतिक्विंटलवर पोहोचले. आज ४ हजार ११४ क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली आहे. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ६ हजार ६०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव होता. तर अकोटच्या बाजारात जास्तीत जास्त ५ हजार रूपयांपर्यत हरभऱ्याला भाव असून सरासरी ४ हजार ५९० पासून ५ हजार ९० प्रतिक्विंटल मागे हरभऱ्याला भाव आहे. म्हणजेच इथे ९० रुपयांनी हरभऱ्याच्या दरात सुधारणा झाली आहे.

IPL 2023 Ticket Booking: आयपीएलची तिकिटं कशी विकत घेऊ शकता आणि किती असेल किंमत जाणून घ्या एकाच क्लिकवर…

Amritpal Singh seen without turban in Delhi in fresh CCTV footage | Delhi News

0

DELHI: A new video of Amritpal Singh, a pro-Khalistan preacher and his aide Papalpreet Singh, has surfaced on social media platforms.
The CCTV footage, which is said to be from a market in Delhi and has no official date, shows Amritpal Singh without a turban and wearing a mask, walking down the street with wearing glasses.

Papalpreet Singh can be seen walking behind him carrying a bag. There has been no official statement from Punjab Police about the video.
The video has emerged a day after a picture of Amritpal Singh and Papalpreet Singh went viral on social media, showing them relaxing, with Amritpal Singh holding a beverage can. Papalpreet Singh is believed to be Amritpal Singh’s mentor and allegedly had connections with Pakistan’s spy agency ISI.

Since the police crackdown on him and his outfit ‘Waris Punjab De’ began on March 18, several images and videos of the radical preacher have surfaced on social media. Despite the police crackdown in Jalandhar, Amritpal Singh managed to escape by changing his appearance and using different vehicles. According to police, Amritpal Singh and Papalpreet Singh were harboured by a woman at her home in Shahabad in Haryana’s Kurukshetra district on March 19.

On March 25, CCTV footage emerged, purportedly showing Amritpal Singh talking on a mobile phone. The police action began about three weeks after Amritpal Singh and his supporters stormed the Ajnala police station near Amritsar to secure the release of an arrested man, which resulted in six police personnel being injured.
Punjab Police have arrested or detained a number of his associates under criminal cases related to spreading disharmony, attempt to murder and attack, police personnel and creating obstructions in the lawful discharge duty by public servants. They have slapped the stringent National Security Act against some of them.
On Sunday, Punjab Police said they have released 197 people out of 353 taken into preventive custody till then on apprehension of breach of peace and disturbance of law and order.
(With inputs from PTI)

seaface accident, सीफेसवर CEOचा अपघाती मृत्यू; २० फूट दूर फेकल्या गेल्या; RTOच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय? – worli ceo dies in accident while jogging rto report confirms accused was overspeeding

0

वरळी सीफेसवर काही दिवसांपूर्वी भरधाव कारनं टेक कंपनीच्या सीईओला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरटीओनं आपला अहवाल दिला आहे.

 

mumbai accident
मुंबई: टेक कंपनीच्या सीईओ असलेल्या राजलक्ष्मी रामकृष्णन (५८) यांचा वरळीत सीफेसवर अपघाती मृत्यू झाला. १९ मार्चला राजलक्ष्मी वरळी सीफेसला जॉगिंग करत होत्या. यावेळी भरधाव कारनं त्यांना धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक सुमेर मर्चंटला अटक केली आहे. सुमेर मर्चंट मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप झाला. ब्रेथलायझर टेस्टमध्ये मात्र तसं आढळून आलं नाही. पण मर्चंटच्या रक्त चाचणीतून महत्त्वाची माहिती उघडकीस आली. यानंतर आता वाहतूक विभागाच्या अहवालानं मर्चंटचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.राजलक्ष्मी यांच्या अपघाती मृत्यूनंतर पोलिसांनी मर्चंटला अटक केली. मर्चंटच्या रक्तात अल्कोहोलचे अंश आढळून आले आहेत. त्यामुळे कार चालवण्याआधी त्यानं मद्यपान केल्याचं स्पष्ट झालं आहे. कारच्या तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेल्या माहितीनं मर्चंटच्या अडचणी आणखी वाढू शकतात. अपघातावेळी मर्चंट ९५ ते १०० किमी प्रतितास वेगानं कार चालवत होता, असा तपशील आरटीओच्या तपासातून पुढे आला आहे. वरळी सीफेस परिसरात वेगमर्यादा ४० किमी प्रतितास आहे. त्यामुळे अपघातावेळी मर्चंटनं वेगमर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट आहे.
बायको-मुलं ऐकेनात, ‘प्रायव्हेट’ मागणी पूर्ण होईना; संतापलेला चेतन शेजाऱ्यांच्या जीवावर उठला
‘अपघातावेळी कारचा वेग ९० किमी प्रतितासाहून अधिक होता, असं प्राथमिक तपासातून उघड झालं आहे. मात्र याबद्दलचा पुरावा नसल्यानं त्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलेला नाही. आरोपीच्या रक्तात अल्कोहोलची पातळी अधिक आढळून आली आहे. त्यामुळे आरोपीविरोधातील खटला मजबूत आहे. आरोपीच्या लघवीची चाचणीदेखील करण्यात आली आहे. त्याचा अहवाल यायचा आहे,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
शेजाऱ्यांना चाकूनं भोसकणाऱ्या चेतनला पोलीस चाळीत नेणार नाहीत; अचानक प्लान चेंज, कारण काय?
जेट लॅग आणि अपुऱ्या झोपेमुळे अपघात झाल्याचं मर्चंटनं पोलिसांना सांगितलं. अपघाताच्या १५ दिवसांपूर्वी अमेरिकेला गेले होतो. तिथून परतल्यानंतर जेट लॅगचा त्रास झाला. झोप अपुरी राहिल्यानं तणाव जाणवत होता. अपघात झाला, त्याच्या तीन दिवस आधीच मुंबईला परतलो होतो, अशी माहिती आरोपीनं पोलिसांना दिली. मर्चंटच्या कारच्या धडकेनं राजलक्ष्मी २० फूट लांब जाऊन पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

अमेरिकेहून परतल्यानंतर मर्चंटनं त्याच्या ताडदेवमधील घरी पार्टी ठेवली होती. १९ मार्चच्या (रविवारी) सकाळी मर्चंटच्या कारनं राजलक्ष्मी यांना धडक दिली. अपघाताच्या आदल्या रात्री मर्चंटनं त्याच्या घरी मित्रांना पार्टी दिली. मर्चंट रात्रभर झोपला नव्हता. कारला अपघात झाला तेव्हा त्याला डुलकी लागली होती. मर्चंट कारनं त्याच्या मित्रांना सोडायला निघाला होता. कारमध्ये त्याचा एक मित्र आणि एक मैत्रीण होती. या दोघांनी मर्चंटला तू आराम कर. तुला झोपेची गरज असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांच्याकडे मर्चंटनं दुर्लक्ष केलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Govt cancels licenses of 18 pharma companies for ‘manufacturing spurious medicines’ | India News

0

NEW DELHI: The government on Tuesday cancelled the licenses of 18 pharma companies for manufacturing of spurious medicines following an inspection by the Drugs Controller General of India (DCGI) on 76 companies across 20 states.
“Huge crackdown underway on pharma companies across the country related to manufacturing of spurious medicines,” news agency ANI reported quoting sources.
More to follow.

shiv sena vs rahul gandhi, सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा… – sharad pawar played the role of mediator between shiv sena and rahul gandhi in the veer savarkar case

0

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यस्थाची भूमिका निभावत सावकरांवरील टीका टाळावी, त्यांना माफीवीर संबोधणं योग्य नाही, अशा शब्दात राहुल गांधींना खडसावलं. पवारांच्या म्हणण्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही सहमती दर्शवली. ज्यानंतर कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी टीका करणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

नवी दिल्लीतील बैठकीत काय झालं?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी राजधानी नवी दिल्लीत सोमवारी सायंकाळी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. स्वत: मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, शरद पवार तसेच विरोधी पक्षाचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या बैठकीत भाजपला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांनी विशेष रणनीतीवर चर्चा केली. यादरम्यान सावकरांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचं महत्त्व समजावून सांगितलं. सावरकरांचं विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेता त्यांना ‘माफीवीर’ संबोधणं योग्य नसल्याचं म्हणत आपण सावकरकांवरील टीका टाळायला हवी, असं शरद पवार राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. ज्यावर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही होकारार्थी मान डोलावली.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
शरद पवार यांनी समज दिल्यानंतर राहुल गांधी यांनीही एक पाऊल मागे घेतलं. जर माझ्या टीकेने कुणाच्या भावना दुखावणार असतील तर मी टीका करणार नाही, मी तो वाद टाळण्याचा प्रयत्न करेन, असं राहुल गांधींनी पवारांना आश्वस्त केलं.

पवारांचं एक वाक्य आणि मविआ फुटण्यापासून वाचली

सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर सभेत राहुल गांधी यांना खडसावत त्यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुन्हा सावकरांवरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्षामुळे याच मुद्द्यावरुन मविआत फूट पडते की काय? अशी स्थिती होती.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
त्याचमुळे पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने एक पाऊल पुढे टाकत मध्यस्थाची भूमिका निभावली. सावकरांवरुन वाद घालण्यापेक्षा काही मुद्दे टाळून भाजपचा विजयी वारु लोकसभेत कसा रोखता येईल, भाजपवर अॅटॅक करण्यासाठी कोणते मुद्दे असावेत, अशी जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षांनीही त्याच अनुषंगाने टिका टिप्पणी करावी, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

adani group share fall sharply, झरझर चढले अन् धाडकन आदळले! न्यायालयाकडून गौतम अदानींना दिलासा पण गुंतवणूकदार धास्तावले – adani group stocks update today all 10 counters in red here’s why

0

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये एक महिन्याहून अधिकच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा तेजी-मंदीचे सत्र पाहायला मिळत आहे. देशांतर्गत बाजारात मंगळवारचा दिवस अदानी शेअर्ससाठी फारसा चांगला ठरला नाही. अदानीच्या शेअर्समध्ये आज पुन्हा कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाकडून अदानींला दिलासा मिळाला असेल, पण शेअर्सच्या वाटचालीला मोठा झटका बसला आहे. बाजारात अदानी समूहाच्या सूचिबद्ध १० पैकी १० कंपन्यांचे शेअर्सवर आज लाल चिन्हाचे वर्चस्व राहिले.

मंगळवारच्या बाजार सत्रात अदानी ग्रीन एनर्जीला मोठा झटका बसला असून, त्यानंतर आज अदानीचे शेअर्स कोसळले. मात्र, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने गौतम अदानी यांना दिलासा देत महसूल गुप्तचर संचालनालयाची याचिका फेटाळून लावली. पण या निर्णयाचा परिणाम मंगळवारी अदानींच्या शेअर्सवर दिसला नाही.

हिंडेनबर्गच्या घावाने जॅक डोर्सी घायाळ, श्रीमंतांच्या यादीतून ‘गायब’; इतकी शिल्लक राहिली Net Worth
न्यायालयाचा दिलासा पण बाजारातून झटका
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अदानी पॉवरच्या दोन सहयोगी कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क विभागाचे अपील फेटाळून लावली, ज्यात कंपन्यांनी परदेशातून आयात केलेल्या भांडवली वस्तूंचा मोठ्या प्रमाणात अतिरेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. विभागाने अदानी पॉवरने आयात केलेल्या भांडवली वस्तूंचे मूल्य वाढवले, असा आरोप केला. न्यायालयाने आरोप फेटाळून लावले आणि अदानींना दिलासा मिळाला असतानाच मार्केट एक्स्चेंजने दणका दिला. अदानी समूहाच्या दोन कंपन्यांवर अतिरिक्त देखरेख ठेवण्यात आली असून समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एएसएम फ्रेमवर्कमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीएसई आणि एनएसईने या अदानी कंपन्यांना एएसएम फ्रेमवर्कमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत जॅक डोर्सी? हिंडेनबर्गच्या जाळण्यात नवीन ‘मासा’, एका अहवालाने ८० हजार कोटी बुडाले
गौतम अदानी यांच्या संपत्तीत आणखी बुडाली

एकावेळी जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत असलेले गौतम अदानी आता अब्जाधीशांच्या टॉप-२० यादीतूनही बाहेर फेकले गेले आहेत. गौतम अदानींच्या संपत्ती त्यांच्या शेअर्सच्या वाढीचा सर्वाधिक वाटा होता, अशा परिस्थितीत स्टॉक्समधील पडझडीचा परिणाम त्यांच्या एकूण नेटवर्थवर झाला. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार गौतम अदानींची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलरने घसरली असून स्वतः उद्योगपती देखील श्रीमंतांच्या यादीत ४६.३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह आता २४व्या क्रमांकावर आहेत.

संकटं कधीच एकटी येत नाही! गौतम अदानींच्या अडचणीत आणखी वाढ, नवीन अहवालाने डोक्याला ताप
शेअर्सची आजची बिकट स्थिती

  • मंगळवारी अदानी समूहाच्या १० पैकी १० शेअर्स तोंडघशी आपटले. दुपारी १२ वाजता अदानी एंटरप्रायझेसचे शेअर ७.०७ टक्के घसरून १६०१.४० रुपयांवर कोसळला.
  • अदानी पोर्टचे शेअर्स ६.९०% घसरून ५९०.८० रुपयांवर आले.
  • अदानी पॉवर लिमिटेडचा स्टॉक आज ५% टक्क्यांसह १७३.८५ रुपयांवर घसरला
  • अदानी ट्रान्समिशनचा शेअर पाच टक्क्यांनी १०१५.७५ रुपयांवर खाली आला.
  • अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरही ५% घसरून ९३५.५० रुपयांवर आला.
  • अदानी टोटल गॅसचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ९१०.४५ रुपयांवर आला.
  • अदानी विल्मारचा शेअर ४.६४ टक्क्यांनी घसरून ३६९.६५ रुपयांवर आला.
  • एसीसी सिमेंटचा शेअर आज ४.३८% कमजोर होऊन १६११ रुपयांवर पोहोचला.
  • अंबुजा सिमेंटचा शेअर २.०७% घसरून ३६२.१० रुपयांवर आपटला.
  • NDTV शेअर्स ४.९९ टक्के घसरणीसह १७४.३५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

देशातील दोन बड्या उद्योगपतींच्या ठाकरे-शिंदेंसोबत भेटीगाठी

Latest posts