Tuesday, May 30, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2529

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

26

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

28

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

21

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

21

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

20

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

24

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Mumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल विलंबाने धावत असल्याने लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने आपली भूमिका मांडली आहे. नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याने ४० टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात. रेल्वे फाटक खुले असणे, आपत्कालीन साखळीचा गैरवापर, रुळांवर होणारे रेल्वे अपघात यांमुळे एकूण २४ टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह दक्षिण भारतातून येणाऱ्या विशेष आणि नियमित मेल-एक्स्प्रेस फेऱ्या विलंबाने मुंबई उपनगरी हद्दीत दाखल होतात. याचा परिणाम लोकल फेऱ्यांच्या वक्तशीरपणावर होतो. यावर उपाय म्हणून मेल-एक्स्प्रेस वाहतुकीसाठी कल्याण आणि पनवेलमध्ये विशेष टर्मिनसची निर्मिती करण्यात येत आहे.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा
१०० गाड्यांना १० मिनिटांचा विलंब

दिवा, टिटवाळा, चुनाभट्टी, शिवडी या ठिकाणी रेल्वे फाटक आहेत. रेल्वे फाटक खुले राहिल्याने लोकल वाहतूक खोळंबते. लोकल वक्तशीरपणातील १४ टक्के विलंब यामुळे होतो. लोकल येऊन उभी राहिल्यानंतरही फाटकातून वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे रोज सुमारे १०० लोकल फेऱ्यांना सरासरी १० मिनिटांचा विलंब होतो. फाटक बंद करण्यासाठी पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. दिवा स्थानकात पूल उभारण्याचे काम सुरू आहे.

आपत्कालीन साखळीचा गैरवापर

मेल-एक्स्प्रेसमधील आपत्कालीन साखळीचा विनाकारण वापर झाल्याने रोज २५ लोकल फेऱ्या विलंबाने धावत आहेत. साखळीचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांकडून चुकीच्या रेल्वेगाडीत प्रवेश केला, सहप्रवासी फलाटावर राहिला, अशी कारणे देण्यात येतात.

रुळांवरील अपघातांमुळे ब्रेक

रेल्वे रुळांवर लोकलच्या धडकेत रोज तीन मृत्यू होतात. असा अपघात झाल्यानंतर सरासरी १० मिनिटे लोकल थांबवली जाते. यामुळे सुमारे सहा टक्के लोकल फेऱ्या विलंबाने धावतात.

२२ टक्के अन्य कारणे

सिग्नल आणि ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, रेल्वे स्थानकादरम्यान पायाभूत सुविधा उभारताना कार्यान्वित करण्यात आलेली वेगमर्यादा, रूळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे लोकल विलंबाने धावतात. लोकल वक्तशीरपणामध्ये या कारणांचे प्रमाण २२ टक्के इतके आहे.

मध्य रेल्वेची स्थिती

रोजच्या एकूण लोकल फेऱ्या – १,८१०

मुख्य मार्ग – ८९४

हार्बर मार्ग – ६१४

ट्रान्सहार्बर – २६२

बेलापूर-खारकोपर मार्ग – ४०

लांब पल्ल्यांच्या रेल्वे फेऱ्या – २००

रुळांवरील अपघात रोखण्यासाठी रुळांजवळ सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहेत. रूळ ओलांडणी बंद करण्यासाठी पादचारी पुलांची उभारणी करण्यात येत आहे. आपत्कालीन साखळीचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.

– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Balu Dhanorkar: शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!

Congress Chandrapur MP Balu Dhanorkar Challenged PM Modi; ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; बाळू धानोरकरांनी दिलं होतं थेट PM मोदींना ओपन चॅलेंज

0

चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीच्या मेदांचा मेडिकेअर रुग्णालयात निधन झाले. महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार आणि कोणत्याही आव्हानाशी दोन हात तयार करायला तयार असणारा जिगरबाज नेता अशी बाळू धानोरकर यांची ओळख होती. अनेक चढउतारांनी भरलेला बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक असा राहिलेला आहे. स्वत:च्या कुवतीवर प्रचंड आत्मविश्वास असणारा नेता म्हणूनही बाळू धानोरकर यांची ओळख होती. त्यामुळेच की काय, बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही लढायची तयारी दाखवली होती. ‘पक्षाने आदेश द्यावा, मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’, हे त्यांचे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. भाजप ही आमची पैदाईश आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प हद्दपार झाले. त्याप्रमाणे मोदींना भारतातून हाकलल्याशिवाय मी राहणार नाही. पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्ष बाकी आहेत. पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकद माझ्यात आहे. आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा, असा आदेश पक्षाने द्यावा. जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर नाव बाळू धानोरकर सांगणार नाही, असे सांगत बाळू धानोरकर यांनी एकेकाळी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वाविरोधात दंड थोपटले होते.

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!

कोण आहेत बाळू धानोरकर?

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार होते. त्यांचा जन्म ४ मे १९७५ रोजी यवतमाळमध्ये झाला. त्यांनी कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी चालवली. त्यानंतर भद्रावतीमध्ये बारही सुरु केला होता.

Balu Dhanorkar: शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले!
बाळू धानोरकर आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २००४ नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. पण बाळू धानोरकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली होती.

Smart TV वापरताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर टीव्ही येईल धोक्यात, Google चा इशारा – smart tv care using third party devices can harm you smart tv google advice

0

थर्डपार्टी अॅप्स किती सुरक्षित?

थर्डपार्टी अॅप्स किती सुरक्षित?

Xataka Android यांच्या अहवालाने यापूर्वी अनेक बॉक्स-साइड उपकरणे किंवा Android TV सह सुसज्ज सेट-टॉप बॉक्सद्वारे ऑफर केलेल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता गुगलनेही या उपकरणांच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आहे. गुगलचे म्हणणे आहे की जर अशी डिव्हाईस कमी किमतीत अधिक फीचर्सचा दावा करत असतील तर त्यामुळे तुमच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.गुगलने सांगितले की, या डिव्हाईसचे मार्केटिंग हे अँड्रॉईड टीव्हीवर चालणारे बॉक्स असल्याचे सांगून केले जाते, मात्र त्यांच्याकडे गुगलचा परवाना नाही. म्हणजेच अधिकृत अॅप आणि प्ले स्टोअरचा अॅक्सेस नाही. म्हणजेच हे उपकरण गुगलने प्रमाणित केलेले नाही आणि त्यात मालवेअरसारखे व्हायरसेस असण्याची शक्यता जास्त आहे.

वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

किंमत कमी पण धोका अधिक

किंमत कमी पण धोका अधिक

तर
स्मार्ट टीव्हीवर हा मालवेअर किंवा इतर व्हायरसेचचा धोका हा प्रामुख्याने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या कमी किमतीच्या उपकरणांमध्ये दिसून येते. अशी उपकरणे सहसा अज्ञात ब्रँडच्या प्रोसेसरसह सुसज्ज असतात. म्हणजेच, या उपकरणांमध्ये मालवेअर इंजेक्ट करणे खूप सोपे होते. तुमच्या Android TV मध्ये AllWinner किंवा RockChip प्रोसेसर असल्यास, तुमचा डेटा धोक्यात असू शकतो. त्यामुळे कमी किंमतीत मिळणारी ही उपकरणं अधिक धोकादायक असतात.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

गुगलचा इशारा

गुगलचा इशारा

Google ने याबाबत बोलताना म्हटलं आहे की, या थर्ड पार्टी उपकरणांत Android Open Source Project (AOSP) वापरतात, त्यामुळे मालवेअरचा धोका वाढतो. त्याचा डिकोडर, AllWinnet T95 चिपवर आधारित, वापरकर्त्याच्या माहितीशिवाय, कमांड आणि कंट्रोल सर्व्हर आणि बॉट्ससह जगभरातील इतर हजारो Android TV डिव्हाइसेसशी संवाद साधतो. ज्यामुळे तुमचा खाजगी डेटा लिक होऊ शकतो.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

अशा प्रकारे तपासा तुमचा डेटा सुरक्षित आहे की नाही?

अशा प्रकारे तपासा तुमचा डेटा सुरक्षित आहे की नाही?

तुमच्याकडे Android TV सह थर्ड पार्टी डिव्हाइस असल्यास आणि ते Android TV पावर्ड बॉक्स असल्यास, त्यांच्याकडे Play Protect प्रमाणित प्रमाणपत्र असेल. आपण ते डिव्हाइसमध्ये देखील तपासू शकता. Play Protect Certified certification तपासण्यासाठी, तुम्हाला Google Play Store उघडावे लागेल आणि येथून वरच्या उजव्या कोपर्‍यातील प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. आता इथून तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन अबाऊट सेक्शनमधून ‘प्ले प्रोटेक्ट सर्टिफिकेशन’मध्ये जावे लागेल. तुमच्या डिव्हाइसमध्ये Play Protect प्रमाणित प्रमाणपत्र आहे की नाही ते येथे तुम्हाला दिसेल. हे असल्यास तुमच्या टीव्हीला धोका नसणार आहे.

वाचा : आता मानवी मेंदूत चिप बसवता येणार, एलन मस्‍कच्या न्‍यूरालिंक कंपनीला USFDA ची मंजूरी

स्मार्ट टीव्ही घेताना आणखी काय काळजी घ्याल?

स्मार्ट टीव्ही घेताना आणखी काय काळजी घ्याल?

तुम्हीही एखादा स्मार्टटीव्ही घेणार असाल तर खूप सारे बजेट ऑप्शन्स तुम्हाला मिळतील पण खूप ऑप्शन्स पाहून गडबड करु नका स्मार्टटीव्ही घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करता. टीव्ही खरेदी करताना, कलर व्हॉल्यूम, एचडीआर, रिफ्रेश रेट, एचडीएमआय कनेक्शन आणि एचडीआर हे सारं समजून घ्या, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल.

वाचा : २६ हजारांचा Realme 10 Pro+ 5G फक्त २ हजार रुपयांना, Flipkart वर आहे भन्नाट ऑफर

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

Petrol Diesel Price Today 30 May 2023; पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील भाव

0

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर सर्वसामान्य नागरिकांचे सातत्याने लक्ष असते. गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ३० मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर वेबसाईटवर अपडेट करण्यात आले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्यांनी दररोज त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले असून सर्वसामान्यांना आजही पेट्रोल आणि डिझेल जुन्याच दरांवर खरेदी करावे लागणार आहे.

व्हायरल होतोय अमूल लस्सीमध्ये बुरशी असल्याचा दावा करणारा व्हिडिओ; जाणून घ्या काय आहे सत्य
सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर वाहन इंधनाचे दर आजही स्थिर आहेत. अशाप्रकारे दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या महानगरांमध्ये किमती कायम आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झालेला नसून दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर नोएडा आणि गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत.

वडिलांची एक चूक ठरली भाऊबंदकीचं कारण; एकमेकांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या भावांमध्ये दुरावा
दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. WTI कच्चे तेल ०.१९% वाढून $७३.८२ प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल ०.०३% घसरवून प्रति बॅरल $७७ वर ट्रेंड करत आहे.

डिझेलसाठी बीड बस डेपोकडे पैसेच नाही; ८२ पैकी फक्त २० बसेस सुरु; प्रवाशांची तारांबळ अन् संताप

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर इकडे तपासा
तुम्ही अगदी सहज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. यात शिपिंगची किंमत, कर आणि डीलर कमिशन समाविष्ट असतो. दरम्यान, जर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत जाणून घ्यायची असतील, तर इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्ही RSP डीलर कोड ९२२४९ ९२२४९ वर SMS करून किंमत जाणून घेऊ शकता.

Balu Dhanorkar Defeat Hansraj Ahir Sanjay Deotale; बाळू धानोरकरांनी मंत्र्यांना पराभवाचं पाणी पाजलं, विधानसभेसह लोकसभा गाजवली, लढाऊ नेता काळाच्या पडद्याआड

0

चंद्रपूर : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. २०१९ ला मोदी लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला असताना बाळू धानोरकर यांनी विजय मिळवत खातं उघडलं होतं.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी संजय देवताळे यांचा पराभव केला होता. संजय देवताळे यांनी मंत्री म्हणून काम केलेलं होतं. मंत्रिपदाचा अनुभव असणारे देवताळे त्यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होते. बाळु धानोरकर यांनी ५३८७७ मतं मिळवली तर संजय देवताळे यांना ५१८७३ मतं मिळाली होती. संजय देवताळे यांचा पराभव करत बाळू धानोरकर यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

हंसराज अहीर यांचा पराभव करत लोकसभेत

बाळू धानोरकर यांनी २०१४ ला विधानसभेत शिवसेना आमदार म्हणून पहिल्यांदा प्रवेश केला. काही कारणांमुळं बाळू धानोरकर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसनं २०१९ मध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. राज्यातील बडे काँग्रेस नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले असताना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात नवख्या बाळू धानोरकर यांनी हंसराज अहीर यांना पराभूत केलं. हंसराज अहीर केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत होते. हंसराज अहीर यांचा पराभव चर्चेत राहिला होता. बाळू धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५९ हजार ५०७ मतं मिळाली. तर, हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४ मतं मिळाली होती.
महारेराचा मोठा निर्णय! घरांच्या जाहिरातींमध्ये ही गोष्ट बंधनकारक, कारण…

चंद्रपूरचा जाएंट किलर नेता हरपला

बाळू धानोरकर यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी चंद्रपूरमधील दिग्गज नेते मंत्री म्हणून काम केलेले नेते संजय देवताळे यांचा पराभव करत २०१४ ला विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २०१९ ला हंसराज अहीर हे केंद्रात मंत्री म्हणून चंद्रपूरचं प्रतिनिधीत्व करत होते. त्यांना देखील बाळू धानोरकर यांनी पराभूत केलं. राजकीय लढाईत जाएंट किलर ठरलेल्या बाळू धानोरकर यांच्या निधनानं चंद्रपूरच्या जनेतला मोठा धक्का बसला आहे.

पादचारीही अपघात छायेत; महाराष्ट्रात चार वर्षांत इतक्या जणांचा बळी; धक्कादायक आकडा समोर

‘It will be a gift from me’: MS Dhoni hasn’t ruled out playing another IPL season | Cricket News

0

MS Dhoni isn’t sure and wants to see how his body responds over the next 6-7 months; but the Chennai Super Kings‘ skipper hasn’t ruled out playing another season of the Indian Premier and said “it would be a gift” from him to his fans who have made him emotional with their love.
The talismanic former India captain led CSK to a record-equalling fifth IPL title on Monday, beating Gujarat Titans on the rain-curtailed reserve day of the final after bad weather didn’t allow any play on Sunday.

WhatsApp Image 2023-05-30 at 8.14.23 AM.

Ravindra Jadeja held his nerve to score 15 not out off 6 balls and take CSK to the revised (DLS) target of 171 in 15 overs off the last ball for a five-wicket win. GT had scored 214/4 in their stipulated 20 overs, thanks to Sai Sudharsan’s blistering 96 off 47 balls.

Speaking at the post-match presentation, the 41-year-old Dhoni shared his thoughts on the question on everyone’s mind: Is this his last IPL?
“Circumstantially, this is the best time to announce my retirement. But the amount of love I have received all over, the easy thing would be to walk away from here, but the harder thing would be to work hard for nine months and try to play another IPL,” Dhoni said.
Dhoni has been the cynosure of all eyes ever since the Indian Premier League began this year and in a fitting end to the finale, the captain finished with a record-levelling fifth trophy.

This IPL his fans from across the country went to the venues in large numbers to cheer for him, chanting his name wherever CSK have played.
“It would be a gift from me, won’t be easy on the body. You do get emotional. The first game at CSK, everyone was chanting my name. My eyes were full of water, I needed to take some time off in the dugout.
“I realised I need to enjoy this. I think they love me for what I am, I don’t try to portray something I’m not. Just keep it simple,” Dhoni said.

Speaking about the match, Dhoni said, “Every trophy is special, but what is special about IPL is every crunch game you need to be ready. There were lapses today, the bowling department didn’t work, but it was the batting department that took the pressure off them today.
“I do get frustrated, it is human but I try to step into their shoes, every individual deals with pressure differently. Ajinkya (Rahane) and a few others are experienced, so you don’t worry. If anyone is confused, then can always ask,” he concluded.

Dhoni-ai

(With agency inputs)

Congress Chandrapur MP Balu Dhanorkar Passed Away; शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, खासदारकीसाठी फिल्डिंग लावली, धानोरकर २०१९ ला किंग ठरले

0

बाळू धानोरकर… आधी चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार… मग २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचं पाणीपत झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून निवडून आलेले एकमेव खासदार…. आक्रमक आणि स्पष्टवक्ता… एकाच कामासाठी लोकांना वारंवार खेटे घालायला नको म्हणून परमनन्ट सोल्यूशन काढणारा नेता अशीही त्यांची ओळख… याच धानोरकरांचे वडील नारायण धानोरकर यांचं २७ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. यात खासदार धानोरकरांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या मेदांता मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी पहाटे बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली.

सुरेश धानोरकर यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कपड्यांचे दुकान सुरु केलं. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरु केली. त्यानंतर भद्रावतीमध्ये मद्यविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. कालांतराने भद्रावती नगरपालिकेपासूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

बाळू धानोरकर कोण आहेत?

चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार होते
२०१९ ला काँग्रेसकडून लोकसभेसाठीचे तिकीट मिळाले, काँग्रेसमध्ये प्रवेश
त्यानंतर शिवसेनेच्या आमदार पदाचाही त्यांनी राजीनामा दिला होता
चंद्रपूरच्या मतदारसंघात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव केला
आणि लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले
त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २००४ नंतर काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. धानोरकरांना तिकीट द्यायच्या वेळी मद्यविक्रीचा व्यवसाय आणि चंद्रपुरात असलेली दारूबंदी उमेदवारीच्या आड आली. काँग्रेसच्या यादीत धानोरकरांना तिकीट नाकारल्याने गदारोळ झाला. यानंतर धानोरकर-वडेट्टीवार-अशोक चव्हाण या तिघांनीही मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. तोवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांनी चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीला द्या, असा निरोपच राहुल गांधींना दिला असल्याची माहिती समोर आली होती.

मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह समर्थकांनी अगदी राहुल गांधींपर्यंत फिल्डिंग लावली. बाळू धानोरकर कसे विनिंग कँडिटेट आहेत, हे काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना पटवून दिले. त्यामुळे २०१९ ला बाळू धानोरकर हेच काँग्रेससाठी मॅन ऑफ द मॅच ठरले. बाळू धानोकर यांची प्रकृती ठीक नसल्याने अख्खा पक्ष चिंतेत होता. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी पक्षाकडून समर्थकांकडून प्रार्थना केली जात होती. मात्र, मंगळवारी पहाटे बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

7 dead, several injured as bus going from Amritsar to Katra falls into gorge | Jammu News

0

JAMMU: As many as seven people were killed and over a dozen injured after a bus they were travelling in fell into a deep gorge on Jammu-Srinagar National Highway on Tuesday morning.
According to officials, the bus was on its way to Katra from Amritsar when the incident took place near Jhajjar Kotli, about 15km from Katra in Jammu district.

The bus was reported to have been carrying pilgrims to the Mata Vaishno Devi shrine.
Local residents and police went to the spot and launched the rescue operation.
“CRPF, police and other teams are also here. Ambulances were called and the injured were immediately taken to hospital. Bodies have also been taken to the hospital. A crane is being brought here to see if someone is trapped under the bus. A rescue operation is under way,” said Ashok Choudhary, assistant commandant, CRPF.
He said, “We are being told that the bus was coming from Amritsar and that people from Bihar were onboard. They perhaps lost their way to Katra and reached here.”
According to Jammu deputy commissioner (DC) Avny Lavasa, the injured have been shifted to a hospital.

“Those critically injured have been brought to Government Medical College and Hospital in Jammu and 12 others have been admitted at Local Public health Centre,” he added.
(With inputs from agencies)

Maharashtra Four Years Total 10,634 People Lost Their Lives In Accidents; पादचारीही अपघात छायेत; महाराष्ट्रात चार वर्षांत इतक्या जणांचा बळी; धक्कादायक आकडा समोर

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात विविध अपघातांमध्ये नाहक बळी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहेच. पण, कोणतेही वाहन न वापरता केवळ रस्त्यावरून चालताना कधी खबरदारी न घेतल्याने, तर कधी चालकांच्या हलगर्जीने जीव धोक्यात येतो. राज्यामध्ये गेल्या चार वर्षांत १०,६३४ पादचाऱ्यांनी जीव गमावला आहे.

राज्यामध्ये लहान-मोठ्या रस्त्यापासून महामार्गांपर्यंत सुमारे तीन लाख २४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर दरवर्षी साधारण ३० ते ३३ हजार अपघात घडतात. यामध्ये सरासरी १२ ते १४ हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. या मृतांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक पादचाऱ्यांचा समावेश असतो. २०१९ ते २०२२ या चार वर्षांतील आकडेवारी पाहिली असता १०,६३४ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. एकूण २५,३६२ अपघातांमध्ये १२,६३७ पादचारी गंभीर जखमी झाले असून ३,५९२ पादचाऱ्यांना किरकोळ इजा झाली आहे. अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पादचाऱ्यांनी रस्त्याच्या कडेने चालताना, रस्ता ओलांडताना तर चालकांनी गाड्या चालविताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा
राज्यातील अपघातांमध्ये जखमी, मृत होणाऱ्या पादचाऱ्यांची आकडेवारी काळजी करण्यासारखी आहे. ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही प्राधान्याने प्रयत्न करीत असून वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनीही विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महामार्ग पोलीस

वर्ष अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी दुखापत नाही

२०१९ ७२९४ २८४९ ३३०० १२४७ ०१

२०२० ५१५६ २२१४ २३१२ ६३१ ३६

२०२१ ६१४८ २६७७ २६८४ ७९४ १९

२०२२ ६७६४ २८९४ २९५२ ९२० ५९

अतिक्रमणही कारणीभूत

पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे पदपथ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये पदपथांवर फेरीवाले, बेघरांनी अतिक्रमण केलेले दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांना नाईजास्तव रस्त्यावरून चालावे लागतात. शहरांमध्ये अरूंद रस्ते, रस्त्याच्या कडेलाच उभी केलेली वाहने, वाहनांची अधिक संख्या अशी परिस्थितीही असते. त्यातून वाट काढताना पादचारी अपघातांना बळी पडतात. छोट्या रस्त्यांवर पादचाऱ्यांचे होणारे अपघात रोखण्यासाठी त्यांना पदपथ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पादचाऱ्यांसाठी खबरदारी

– ज्या ठिकाणी उपलब्ध असेल, तेथे क्रॉसवॉक आणि पादचारी क्रॉसिंग वापरा.

– ट्रॅफिक सिग्नल शोधा आणि योग्य सिग्नल सुरक्षितपणे पार होण्याची वाट पहा.

– मोबाइल फोन किंवा हेडफोन यांसारख्या लक्ष विचलित करणाऱ्या साधनांचा वापर टाळा.

– शक्य तेथे पदपथांवर चाला आणि नसल्यास वाहने दिसावीत यासाठी येणाऱ्या रहदारीकडे तोंड करून चाला.

– कायम रहदारीच्या किंवा महामार्गावर चालणे टाळा

– मुलांना रस्तेसुरक्षतेबद्दल शिक्षण द्या

चालकांसाठी सूचना

– वाहनांबरोबर रस्त्यावर पादचारी, जनावरे येतात, याचे भान असू द्या

– गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगवर वाहनाचा वेग कमी करा

– सिग्नलचा नियम काटेकोरपणा पाळा

– रात्रीच्या वेळेस हेडलाइट सुस्थितीत आहेत का, याची खात्री करा

– कुणी रस्ता ओलांडताना दिसल्यास वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा

महारेराचा मोठा निर्णय! घरांच्या जाहिरातींमध्ये ही गोष्ट बंधनकारक, कारण…

Manipur ethnic gulf widens, big relocation on: Security officials | India News

0

GUWAHATI: The nearly month-long ethnic conflict in Manipur has polarised the majority Meitei and the tribal Kuki communities to the extent that they appear irreconcilable, accentuated by a fresh outbreak of violence that could get worse unless the Centre acts fast and decisively to end it, top sources in the security establishment said Monday as Union home minister Amit Shah began a four-day visit.

Manipur: Ahead of Amit Shah's visit fresh violence breaks out, 40 Kuki militants killed

01:52

Manipur: Ahead of Amit Shah’s visit fresh violence breaks out, 40 Kuki militants killed

The two communities had clashed previously over territory and identity, but the violence since May 3 has been the worst in their tumultuous history, leaving over 100 people dead and scores wounded. While both sides say they want the hostilities to end, the underlying message is that they would rather not live together. “Relocation is happening in hordes – most Kukis have fled to areas where they are in a majority while Meitei people have returned from Kuki areas like Churachandpur to the Imphal valley,” a senior security official said. “Even government officials are relocating in the same pattern.”
Army visiting villages, talking to both sides but no meeting ground yet’
The situation outwardly looks like it is being brought under control, but inside it is extremely volatile. The breakdown of trust between the Meitei community of the valley and the Kuki tribe that inhabits the hills is total,” the official said.

Fresh Violence in Manipur: "We have taken strict action. Till now 40 terrorists eliminated," says Manipur CM

03:55

Fresh Violence in Manipur: “We have taken strict action. Till now 40 terrorists eliminated,” says Manipur CM

A group of 10 Kuki-Zomi MLAs of BJP-led coalition, two of them ministers, has already petitioned Shah for a separate administration for areas inhabited by the tribe.
Kukis blame the state government and chief minister N Biren Singh for the ongoing violence, alleging that police were siding with perpetrators of the attacks on them. The Meitei accuse Kuki militant outfits that are in ceasefire with the Centre and the state government of attacks on them and their properties.
“This instability will remain unless the Centre takes some concrete steps. We are trying to contain unrest with the maximum possible effort, but we possibly cannot deploy soldiers at every location. Army commanders are visiting villages and talking to civil society organisations of both communities, although there is no meeting ground at this moment,” another top source in the security set-up said.

'40 terrorists killed by armed forces'; fresh clashes break out in Manipur

01:57

’40 terrorists killed by armed forces’; fresh clashes break out in Manipur

Both sides have suffered in equal measure when it comes to arson targeted at villages, but the number of dead could be higher on the Kuki side, sources said. A large number of bodies lying in morgues are still to be identified.
The toll last updated by the state government on May 14 stood at 73. Since then, many more have been killed. On Sunday, the CM said 33 militants had been killed by security forces in 48 hours.
Manipur has a history of ethnic unrest, starting with Naga-Kuki clashes in 1990s in which thousands lost their lives. In 1993, the state battled violence between the Hindu Meitei and the Muslim Meitei (Pangals).
Kukis then clashed with the Paites in 1997-98. The Meitei-Naga divide since 2001 over the insurgent NSCN(IM)’s demand for a “greater Nagalim”, entailing integration of Naga-inhabited areas of Manipur with Nagaland and other northeastern neighbours, remains a bone of contention.

Latest posts