Wednesday, June 7, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2555

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

27

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

32

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

US Congress, PM Modi : पंतप्रधान मोदी अमेरिकेत रचणार इतिहास, २२ जून रोजी होणार हा अनोखा विक्रम – pm narendra modi will be the first prime minister to address the us congress for the second time

0

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात २२ जून रोजी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला मोदी संबोधित करण्याची ही दुसरी वेळ असेल. दुसऱ्यांदा असे करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदींनी जून २०१६ मध्ये यूएस दौऱ्यादरम्यान यूएस काँग्रेसला संबोधित केले होते. संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पीएम मोदींनी ट्विट केले आहे. हे निमंत्रण स्वीकारताना मला सन्मान वाटत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान मोदींचे दुसरे भाषण ऐतिहासिक आहे. असे दोनदा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नेतन्याहू यांनी तीन वेळा भाषण केले आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा समावेश अशा मोजक्या जागतिक नेत्यांमध्ये होतो ज्यांना दोनदा अमेरिकन संसदेला संबोधित करण्याचा मान मिळाला आहे.

कल्याणमध्ये भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दोन महिला आपसात भिडल्या, २० मिनिटं चालली धुमश्चक्री, पाहा व्हिडिओ
सात वर्षांपूर्वी, अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणारे पंतप्रधान मोदी हे देशातील पाचवे भारतीय पंतप्रधान होते. त्यांच्या आधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९ जुलै २००५, अटलबिहारी वाजपेयी (१४ सप्टेंबर २०००), पीव्ही नरसिंह राव (१८ मे १९९४) आणि राजीव गांधी यांनी १३ जुलै १९८५ रोजी संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले होते. आता असे दोनदा संबोधन करणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान असतील.

Sharad Pawar : शरद पवारांनी गाठले जाफराबाद, नव्या राजकीय समीकरणाचे दिले संकेत? जालन्यात चर्चा सुरू
यूएस काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटच्या नेतृत्वाच्या वतीने पंतप्रधान मोदींना २२ जून रोजी काँग्रेस (संसदे) च्या संयुक्त बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर यजमानपद भूषवतील. या दौऱ्यात २२ जून रोजी राजकीय रात्रीभोजनाचाही समावेश आहे.
विरारमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली, ३ महिला कामगारांचा मृत्यू

3-year-old falls into borewell in Madhya Pradesh’s Sehore; rescue operation under way | Bhopal News

0

BHOPAL: Massive rescue operations were on to save a 3-year-old girl who fell into a borewell in Sehore district on Tuesday. The incident took place at Mungaoli village at around 1.30pm.
The girl, identified as Shristhi, daughter of Rahul Kushwaha, fell in a 300-feet deep borewell situated in a farm outside her house. The girl is said to be stuck between 25 and 30 feet depth. The girl was playing outside her house, while her elderly grandmother was also sitting nearby.

Senior officials of police including DIG Monika Shukla, sub-divisional magistrate, Aman Mishra rushed to the spot. Rescue teams were roped in and a parallel well at a distance of 5 feet from the borewell is being dug using JCB machines.
“After we reached close to 20 feet, layer of hard rock has been found. So the work has now slowed down and rock drilling machines are now being used instead of JCB machines. Camera has been put inside the borewell and oxygen supply has also been ensured. The girl’s condition is being regularly monitored. Rescue works are going on,” SDM Sehore, Aman Mishra told TOI.
Taking cognizance of the incident, CM Shivraj Singh Chouhan tweeted, “Got sad news of a daughter falling into a borewell in Mungaoli of Sehore district. Rescue teams are on the spot and rescue work is going. I have instructed the local administration to take appropriate measures and I am in contact with the administration.”

Meanwhile the farm in which the borewell was situated is said to be of another villager, who had not closed the well.
Mungaoli village panchayat secretary, Sitaram Meena said, “The land belongs to some other villager in which the borewell is situated”.

Delhi Crime News Two Children Found Dead In Old Wooden Box At Batla House; दिल्लीत बाटला हाऊस परिसरात लाकडी पेटीत भाऊ-बहिणीचा मृतदेह सापडला

0

नवी दिल्ली: दिल्लीतून पुन्हा एकदा एक भयंकर हत्याकांड समोर आलं आहे. येथे दोन लहान मुलांचे मृतदेह त्यांच्याच घराच्या परिसरात एका लाकडी पेटीत सापडून आले. हे दोघेही दुपारपासून बेपत्ता होते. त्यांचे आई-वडील त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांना त्यांची मुलं थेट मृतावस्थेत सापडतील असा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल.

लाकडी पेटीत भाऊ-बहिणीचे मृतदेह सापडले

दिल्लीतील जामिया नगरमधील बाटला हाऊस परिसरात दोन लहान मुलांचे मृतदेह सापडले आहेत. हे दोघेही भाऊ-बहीण असल्याची माहिती आहे. ८ वर्षांचा नीरज आणि ६ वर्षांची आरती अशी या दोघांची नावं आहेत. जामिया नगरच्या एफ-२ जोगाबाई एक्स्टेंशनमध्ये दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Mumbai Crime: मुंबईत वसतिगृहातील खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, सुरक्षारक्षकाची ट्रेनसमोर उडी
दुपारी आई-वडिलांसोबत जेवले अन् मग बेपत्ता झाले

हे दोन्ही चिमुकले याच घरात आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यांचे वडील बलबीर हे याच इमारतीत चौकीदार म्हणून काम करतात. दोन्ही मुलं दुपारपासून बेपत्ता होते. या दोघांचे मृतदेह एका लाकडी पेटीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर, मुलांचे मृतदेह सापडल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. या लहान मुलांशी कुणाचं काय वैर असेल असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

Mumbai Crime: मुंबईत आईची हत्या करुन मुलाने स्वत:ला संपवलं, घरातील भयंकर दृष्य पाहून वडिलांचा आक्रोश
मुलांच्या शरीरावर जखमांच्या कुठल्याही खुणा नाही

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, दोन्ही मुलांनी त्यांच्या पालकांसोबत दुपारी ३ वाजता जेवण केले होते. यानंतर दोघेही दुपारी ३.३० वाजल्यापासून बेपत्ता होते. बराच वेळ मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. नंतर दोघेही लाकडी पेटीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण बाटला हाऊस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Novak Djokovic: Major 23 still on the cards as Djokovic springs into French Open last four | Tennis News

0

NEW DELHI: Novak Djokovic overcame a challenging first set to defeat Karen Khachanov 4-6, 7-6(0), 6-2, 6-4 and secure a spot in the French Open semi-finals. The victory keeps Djokovic on track to potentially claim his record-breaking 23rd men’s singles Grand Slam title.
Although Khachanov showcased a formidable serve in the opening set, Djokovic managed to turn the tide after winning the second set tiebreak.

From there, Djokovic’s consistent and precise game took control, leaving Khachanov with few answers to halt his opponent’s march to the semi-finals.
Djokovic will now eagerly await the outcome of the match between world number one Carlos Alcaraz and fifth seed Stefanos Tsitsipas, as the winner will be the last obstacle standing between Djokovic and a seventh French Open final.

As the match unfolded on Court Philippe Chatrier, Djokovic displayed his trademark metronomic style of play.

Djokovic

Despite facing a lack of break opportunities and a sluggish start, he found his rhythm and overwhelmed Khachanov with his superior performance.
Khachanov managed to break Djokovic’s serve and secure a lead in the first set, but Djokovic’s resilience and determination shone through in subsequent sets.

The Serbian star broke Khachanov’s serve multiple times, ultimately sealing victory and advancing to the next stage with an ace.

“I think he was a better player for most of the first two sets,” said Djokovic.
“I was struggling to find my rhythm. I came into the match quite slow but played a perfect tie-break and from that moment onwards played a couple levels higher.
“It’s a big fight, something you expect in the quarter-finals. You’re not going to have your victories handed to you, you have to earn them.”
Djokovic improved his record at Roland Garros to 90-16 after denying Khachanov his spot in a third successive Grand Slam semi-final. He will return to number one if he wins the title in Paris.
With his relentless pursuit of success, Djokovic continues his pursuit of tennis history and further cements his status as one of the sport’s all-time greats.

Mumbai Crime News Today Girl Found Dead In Hostel Room Police Suspect Rape Marine Drive; मुंबईच्या वसतिगृहात तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला

0

मुंबई: मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षाच्या तरुणीचा विवस्त्र स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेपासून वसतिगृहाचा सुरक्षारक्षक गायब होता. त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, ही बातमी समोर येताच या गुन्ह्यातील आरोपी सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी तसाप सुरु आहे.

मरीन ड्राइव्ह येथे तारापोरवाला मस्त्यालयाच्या शेजारी सावित्रीबाई फुले वसतिगृह असून देशभरातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींना राहण्यासाठी या वसतिगृहात व्यवस्था आहे. पॉलिटेक्निकलमध्ये शिकणारी अकोल्याची ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून या वसतिगृहात राहत होती. चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ही तरुणी मंगळवारी सकाळपासून खोलीबाहेर न आल्याने इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…
खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली होती. कडी उघडून पाहिले असता ही तरुणी खोलीमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळली. तरुणींनी वसतिगृहाच्या व्यवस्थापनाला कळवताच त्यांनी याबाबतची मरीन ड्राइव्ह पोलिस घटनास्थळी पोहोचले. ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अहवालानंतर तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Mumbai Crime: मुंबईत आईची हत्या करुन मुलाने स्वत:ला संपवलं, घरातील भयंकर दृष्य पाहून वडिलांचा आक्रोश
या वसतिगृहात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सुरक्षारक्षकावर पोलिसांचा संशय होता. मंगळवारी सकाळपासून सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया हा गायब होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिस पकडू नयेत म्हणून त्याने स्वतःचा मोबाइल देखील वसतिगृहात ठेवला होता. तरुणीच्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून लावत असताना सुरक्षारक्षक दिसत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलं.

ही तरुणी विदर्भातील अकोल्याची असल्याची माहिती आहे. ती काहीच दिवसात तिच्या मूळ गावी जाणार होती. त्यासाठी तिने गाडीचं तिकीटही बुक केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वीच तिचा असा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने वसतिगृहासह परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Kalyan News, कल्याणमध्ये भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दोन महिला आपसात भिडल्या…२० मिनिटं चालली धुमश्चक्री – kalyan news a freestyle brawl between two women in kalyan led to a traffic jam

0

कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकांमध्ये तुफान राडा झाला आहे. दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. भर चौकातच एकामेकांना मारहाण सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली. तब्बल वीस मिनिटं ही हाणामारी सुरू होती. काही वेळाने वाहतूक पोलीस व पोलिसांच्या मदतीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ट्रॅफिक पोलिसांसमोरच झाली हाणामारी

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तिसाई माता पूल (पत्रिपुल) ते दुर्गाडी किल्ल्याला जोडणाऱ्या गोविंद बायपास रोडवर आज सायंकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान दोन दुचाकी वाहनाची धडक झाली. या धडकेनंतर चुकी कोणाची हे न पाहता दोन्ही वाहन चालकांमध्ये भर रस्त्यातच तुडुंब हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे हे ट्रॅफिक पोलिसांसमोरच झाले.

Sharad Pawar : शरद पवारांनी गाठले जाफराबाद, नव्या राजकीय समीकरणाचे दिले संकेत? जालन्यात चर्चा सुरू
२० मिनिटं सुरू होती फ्री स्टाइल हाणामारी

वाहन चालकांची हाणामारी होत असतानाच त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोन्ही महिलाही आपसामध्ये एकामेकींना भिडल्या. या महिलांचे भांडण सोडवण्यासाठी इतर प्रवासी प्रयत्न करू लागले. ही फ्री स्टाईलमध्ये सुरू असलेली हाणामारी तब्बल वीस मिनिटं सुरू होती. महिलाची हाणामारी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती.

विरारमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली, ३ महिला कामगारांचा मृत्यू
या घडलेला प्रकाराची माहिती एका वाहतूक पोलिसाने महिला अंमलदार यांना कळवले. माहिती मिळतात महिला अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणत वाहतूक कोंडी सुरळीत केली. ही फ्री स्टाईलची हाणामाऱी प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती वायरल होत आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.

WTC Final : रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बनणार वर्ल्ड चॅम्पियन, WTC फायनलमध्ये आश्चर्यकारक योगायोग

‘Honored to accept’: PM Modi says ‘looking forward’ to address US Congress for 2nd time | India News

0

NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Tuesday said he looks forward to addressing the joint meeting of US Congress for the second time during his upcoming visit to America.
The Prime Minister also thanked Speaker Kevin McCarthy, Senate Majority Leader Chuck Schumer, Senate Republican Leader Mitch McConnell and House Democratic Leader Hakeem Jeffries for their “gracious invitation”.
He added that India is proud of its comprehensive global strategic partnership with US, which is “built upon the foundation of shared democratic values, strong people-to-people ties, and an unwavering commitment to global peace and prosperity.”

PM Modi will address a joint session of the US Congress on June 22 during his official state visit to the country.
He will share his vision of India’s future and speak on the global challenges facing the two countries, top congressional leaders had announced on Friday.

President Joe Biden will host Prime Minister Modi for an official state visit to US, which will include a state dinner, on June 22.
“On behalf of the bipartisan leadership of the United States House of Representatives and the United States Senate, it is our honour to invite you (Prime Minister Modi) to address a joint meeting of Congress on Thursday, June 22,” the congressional leaders had said in a statement.
This will be the second time that PM Modi will address a joint meeting of the US Congress after June 2016.
Prime Minister Modi’s upcoming address to the joint meeting of the US Congress is historic, officials said, noting that he is the first Indian Prime Minister to do so twice.

Globally in this respect, as a head of state or government, Prime Minister Modi is second only to Israeli Premier Benjamin Netanyahu who has addressed the US Congress thrice, they said.
This honour bestowed on Prime Minister Modi shows the bipartisan respect and support for him in the US, they said.
(With inputs from PTI)

Virat Kohli Will Make Big Record In WTC Final 2023 Sachin Tendulkar Ricky Ponting World Records Most Runs In ICC; क्रिकेटच्या जगतात इतिहास रचणार Virat Kohli

0

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (London) मैदानावर खेळवला जाणार आहे. यावेळी टीम इंडियाचा धाकड फलंदाज विराट कोहली क्रिकेट विश्वात इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. आतापर्यंत हा महान विक्रम आपल्या नावे करण्यात सध्या खेळत असलेल्या कोणत्याही फलंदाजाला यश आलेलं नाही.

विराट कोहली क्रिकेट विश्वात इतिहास रचणार

७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११२ धावा केल्या तर तो ICC नॉकआऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. विराट कोहलीने हा महान विक्रम केला तर तो क्रिकेट विश्वात इतिहास रचेल.

Pune Crime: मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग…
WTC फायनलमध्ये हा महान विक्रम करेल

जर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात११२ धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडेल. सध्या ICC बाद फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. रिकी पाँटिंगने ICC नॉकआऊट सामन्यात १८ डावात ७३१ धावा केल्या आहेत. या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने ICC बाद फेरीत १४ डावात ६५८ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,३२२ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३४,३५७ धावा केल्या आहेत.

Crime News: आता आणखी सहन होत नाही, माजी आयपीएस अधिकाऱ्याने घरातच आयुष्य संपवलं
ICC बाद फेरीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १८ डावात ७३१ धावा
  2. सचिन तेंडुलकर (भारत) – १४ डावात ६५८ धावा
  3. विराट कोहली (भारत) – १५ डावात ६२० धावा

Deep depression over Arabian Sea intensifies into cyclonic storm Biparjoy | Mumbai News

0

MUMBAI: The India Meteorological Department (IMD) on Tuesday evening said that the deep depression over southeast and adjoining eastcentral Arabian Sea has intensified into cyclonic storm ‘Biparjoy’ (pronounced as ‘Biporjoy’).
The IMD as on Tuesday 8pm, in a forecast said, “The Deep Depression over southeast and adjoining eastcentral Arabian Sea moved nearly northwards with a speed of 4 kmph during last 6 hours, has intensified into cyclonic storm ‘Biparjoy’ and lay centered at 1730 hours IST of today, the June 6, 2023 over eastcentral and adjoining southeast Arabian Sea about 920km west-southwest of Goa, 1050km southwest of Mumbai, 1130km south-southwest of Porbandar and 1430km south of Karachi. It is likely to move nearly northwards and intensify gradually into a Severe Cyclonic Storm over eastcentral Arabian Sea during next 24 hours.”
Rajesh Kapadia, who runs private weather forecasting blog Vagaries of the Weather, said, there was no direct impact of cyclone in Mumbai. “Some showers on Friday through Sunday for Mumbai from the ‘far away’ system, with winds at 30 kmph. (Current wind speed in Mumbai today 5/6 kmph),” said Kapadia.
Meanwhile, the IMD in its five-day forecast has predicted light to moderate rain very likely from Wednesday to Saturday for parts of Mumbai, Thane and Palghar.
Experts have expressed views that the cyclonic storm ‘Biparjoy’ in the Arabian Sea, could lead to a weak monsoon onset.
“This is clearly the climate change link, as Arabian Sea warming is favoring more intense cyclones,” said climate scientist Roxy Mathew Koll adding that the cyclone is likely to drive away the moisture making it unfavourable for the monsoon onset.

Jalna News, Sharad Pawar : शरद पवारांनी गाठले जाफराबाद, नव्या राजकीय समीकरणाचे दिले संकेत? जालन्यात चर्चा सुरू – after sharad pawar visit to jafrabad there are indications that the ncp candidate will contest the lok sabha elections from jalanya

0

जालना : कालच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीतनंतर आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शरद पवार यांनी भेट दिली. जाफराबादच्या राष्ट्रवादीच्या सुरेखाताई लहाने यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे उपस्थित होते. कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभेच्या तयारीचे संकेत मिळाले असून जालना लोकसभेसाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची शरद पवार यांची जाफराबाद येथील सदिच्छा भेट नक्कीच काही तरी संकेत देत असल्याच्या चर्चा होत आहेत.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे पुत्र माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याने जालन्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. ५ वेळा लोकसभा निवडून येणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोर चंद्रकांत दानवे यांच्या रूपाने नव्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे.

विरारमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली, ३ महिला कामगारांचा मृत्यू
अर्थात चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीचे असले तरी मविआची आघाडी झाल्यावर ही जागा काँग्रेसकडे जाईल की राष्ट्रवादीकडे, की उध्दव ठाकरे यांच्या उमेदवाराकडे हे अजून स्पष्ट झाले नाही. पण कालच्या चंद्रकांत दानवेंच्या नावाच्या चर्चेने राजकीय समीकरणे काय असतील याचे आखाडे आता लोक बंधू लागले आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा पाच वेळा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी जालना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्य राहील. आपण तेथून लढायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केले.

WTC Final : रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बनणार वर्ल्ड चॅम्पियन, WTC फायनलमध्ये आश्चर्यकारक योगायोग
राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये औरंगाबाद मतदारसंघ हवा होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार सतीश चव्हाण हे लोकसभेसाठी आग्रही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवला होता. परंतु स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसने ही जागा लढवली होती. भाजपचे रावसाहेब दानवे यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केल्याने यावेळेस राष्ट्रवादी आग्रही असेल असे चित्र सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्यात शरद पवार काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन आले पुढे, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा

Latest posts