Tuesday, June 6, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2554

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

34

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

37

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

29

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

25

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

28

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

27

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

32

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

262

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Konkan Krishi Vidyapeeth : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदी डॉ. संजय भावे

0








दापोली; पुढारी वृत्तसेवा : गेले अनेक दिवस उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू पदाची निवड पूर्ण झाली आहे. विद्यापीठाच्या पंधराव्या कुलगुरू पदी डॉक्टर संजय भावे याचे नावाची घोषणा राजभव येथून करण्यात आली आहे. (Konkan Krishi Vidyapeeth)

मार्च महिन्यात सुरू करण्यात आलेली ही कुलगुरू निवडीची प्रक्रिया दि ६ जून रोजी पूर्ण झाली आहे. राज्यपाल महोदयांकडे याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातून भावे यांची निवड करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस यांनी या मुलाखती घेतल्या. या मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करून भावे यांचे नाव घोषित करण्यात आले. (Konkan Krishi Vidyapeeth)

तूर्तास या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडे होता.मागील रविवारी कुलगुरू निवड समिती समोर पंचवीस इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या पंचवीस जणांमधून पाच जणांची निवड करून निवड समितीने पाच नावांची शिफारस राज्यपाल महोदयांकडे केली होती.

कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल महोदयांकडून नियुक्त करण्यात आलेल्या शोध समितीच्या अध्यक्षपदी कृषी अनुसंधान परिषदेचे निवृत्त डायरेक्टर जनरल डॉ.एस. अय्यप्पन तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. पी. एन. साहू यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच अन्य दोन ते तीन कृषी शास्त्रज्ञांचा या समितीमध्ये समावेश होता.









Leopard ran away with slippers; पुण्यात बिबट्याने पळवली चप्पल

0

पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे. दररोज बिबटे नागरिकांच्या निदर्शनास पडत आहेत. निरगुडसर येथे रामदास वळसे पाटील यांच्या घराच्या व्हरांड्यात चक्क बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. मात्र त्याला शिकार काही मिळेना. बराच वेळ तिथेच घुटमळल्यानंतर बिबट्याने त्या व्हरांडतील चक्क चप्पल चोरून नेली आहे. घरातील सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला आहे. त्यानंतर याचा व्हिडिओ समोर आला. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चिकूच्या बागेत काम करत असताना अचानक बिबट्याने मजूरावर केला हल्ला

बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागले आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. आंबेगाव तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरासमोर बिबट्या पासून बचावासाठी भिंती उभारल्या आहेत. मात्र अनेकदा बिबट्या भिंतीवरून चढून आत प्रवेश केल्याचे देखील आपण पाहिले आहे. मात्र निरगुडसर येथे एका शेतकऱ्याचा घरा बाहेर बिबट्या शिकारीच्या शोधता आला पण त्याला शोधूनही शिकार मिळेना. अखेर त्याने घराच्या व्हरांड्यात असलेल्या शेतकऱ्याची चप्पलच पळवून नेली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी आश्चर्याने डोक्याला हात मारला. अनेकांना हसू देखील आवरेना. त्यामुळे अनेक चर्चा यावर होऊ लागल्या आहेत.

भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या बिबट्याने चक्क चोरली चप्पल

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यात बिबट्याचे मोठे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बिबट्यांनी अनेक नागरिकांवर हल्ले केले. अनेकजण त्यात मृत्युमुखी पडले, कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पहिल्यापासून पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सहा ते सात फूट भिंतीवरून बिबट्याने घरासमोर बसलेल्या बिबट्याची शिकार केली होती. त्यामुळे बिबट्याची दहशत असल्याचे समोर आले होते.

ट्रेन अपघातावेळी रेल्वे क्रॉसिंगवर १० ते १५ जण…; प्रत्यक्षदर्शी दुकानदाराचा खळबळजनक दावा

0

भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. इतका भीषण अपघात कसा घडला यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीनं खळबळजनक माहिती दिली आहे.बालासोरमध्ये तीन रेल्वेगाड्यांना अपघात झाला. अपघातस्थळापासून २० मीटर अंतरावर असलेल्या मेडिकलचा मालक सौभाग्य रंजन सारंगी (२५) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अपघातावेळी रेल्वे क्रॉसिंगवर दुरुस्तीचं काम सुरू होतं. रेल्वे रुळांवर १० ते १५ गेटमॅन होते. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू होतं. अपघात झाला त्यादिवशीही रेल्वे क्रॉसिंगवर काम सुरु होतं,’ असं सारंगी यांनी सांगितलं. मी रोज संध्याकाळी दुकान बंद करुन निघतो. तेव्हा तिथे दुरुस्तीचं काम सुरू असतं. रुळांच्या चौपदरीकरणाचं कामदेखील गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी दुकानदारानं दिली. बालासोरमधील बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये २७५ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकापासून तमिळनाडूच्या चेन्नईपर्यंत धावते. अपघातात या एक्स्प्रेसचे १५ डबे रुळावरुन घसरले. यातील ७ डबे पूर्णपणे उलटले. सिग्नलमध्ये झालेल्या गोंधळामुळे अपघात झाल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकानं हिरवा सिग्नल पाहिला. त्यामुळे त्यानं एक्स्प्रेस पुढे नेली. एक्स्प्रेसचा वेग १३० किमी प्रतितास होता. याच वेगात एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. त्यामुळे एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरले आणि शेजारच्या रुळांवर जाऊन पडले. तितक्यात त्या रुळांवरुन शालिमार एक्स्प्रेस धावली. तिनं कोरोमंडलच्या डब्यांना धडक दिली. यामध्ये शालिमारचे डबे रुळांवरुन घसरले.

Man Found Alive After 48 Hours Of Odisha Train Accident Balasore Coromandel Express; ओडिशा रेल्वे अपघाताच्या ४८ तासांनी तो जिवंत सापडला

0

भुवनेश्वर: ओडिशात शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण देश हादरला. या रेल्वे अपघातात गाड्यांच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे. त्याचवेळी या घटनेनंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली, ज्यांना चमत्कार मानले जात आहे. शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये जिवंत सापडले. तर काही अपघाताच्या वेळी दुसऱ्या बोगीत असल्याने बचावले. आता एका अशा प्रवाशाची कहाणी समोर आली आहे जो अपघाताच्या दोन दिवसानंतर जिवंत सापडला आहे. तो दोन दिवस झुडपांमध्ये दबून होता, आता त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

त्याला कसं वाचवण्यात आलं याची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. अपघातानंतर बचाव कार्यात गुंतलेल्या १००० जणांची टीम थकली होती. अपघाताला ४८ तास उलटून गेले होते. शोध मोहीम मागे घेण्यात आली होती. तसेच, हा ट्रॅक रेल्वेसाठी खुला करण्यात येणार होता. तेवढ्यात अचानक हलणाऱ्या झुडपांकडे पथकाची नजर गेली. त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना हा जखमी व्यक्ती दिसला. हे सारं तेव्हा घडलं जेव्हा पथकाने आता कोणी जिवंत सापडेल याची आशा सोडून दिली होती. पण, ते म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण मारी. असंच या प्रवाशासोबत घडलं.

Pune Crime: मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग…
कोरोमंडल एक्स्प्रेसची एक बोगी दाट झाडा-झुडपांमध्ये उलटून पडली होती. त्यातील हा प्रवाशी झुडपांमध्ये दबला गेला होता. जेव्हा त्याला जिवंत बाहेर काढण्यात आलं तेव्हा रेस्क्यू टीम सुद्धा आश्चर्यचकित झाली होती की, एवढ्या भयंकर ट्रेन अपघाताच्या ४८ तासांनंतरही कोणी कसं जिवंत राहू शकतं.

बालासोर रुग्णालयात दाखल

बचाव पथकाने सांगितले की, त्या व्यक्तीला सोरो येथील कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि तेथून त्यांना बालासोर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले. आसाममधील ३५ वर्षीय दुलाल मजुमदार असे या व्यक्तीचे नाव आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

चार लोकांसह कोरोमंडलमध्ये प्रवास करत होता

दुलालने सांगितले की, ते इतर पाच साथीदारांसह कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते. त्याच्या इतर ४ साथीदारांचे काय झाले हे त्याला माहित नाही. अपघात झाला तेव्हा ते कोरोमंडल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात होते. ट्रेनच्या धडकेनंतर ते उडी मारुन झाडीत पडले असावे, असा अंदाज आहे. तो दोन दिवसांपासून जिवंत राहिला हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

Odisha Accident: माझ्या भावाशी बोलणं करुन द्या; अखेरची इच्छा पूर्ण होताच ट्रेनमध्ये ललितने सोडले प्राण

SIP Investment or Home Loan EMI What Should You Increase After Salary Increment; पगारवाढीनंतर SIP गुंतवणूक वाढवायची की गृहकर्ज लवकर फेडायचे, काय करणे तुमच्यासाठी फायद्याचे

0

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात गृहकर्ज घेणे किंवा म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणे, हे दोन्ही वैयक्तिक आर्थिक निर्णय आहेत, जे व्यक्तीच्या गरजांवर आधारित असतात. एकीकडे तुम्ही SIP च्या माध्यमातून नियमित अंतराने छोट्या प्रमाणात मासिक गुंतवणूक सुरू करू शकता, जी जमा होऊन काही काळानंतर एकत्रित मोठ्या रकमेत रूपांतरित होईल आणि तुम्ही तुमच्या भविष्यतील गरजा पूर्ण करू शकता. याउलट गृहकर्ज घेतले तर त्याचे आपले वेगळे फायदे आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं स्वतःच घर घेऊ शकता, कर बचत, तुमची क्रेडिट मर्यादा वाढवणे, मालमत्ता वाढवणे आणि भाड्यात बचत करणे.

करोडपती बनायचे आहे तर म्युच्युअल फंडात किमान किती रक्कम गुंतवायची? समजून घ्या एकूण हिशोब
आर्थिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार तुम्ही साधारणपणे वार्षिक आधारावर तुमची SIP किमान १०% वाढवावी. तुमची SIP वाढवून तुम्ही फक्त उच्च चलनवाढीपासून बचाव करत नाही, तर तुमच्या परिभाषित आर्थिक उद्दिष्टांकडे वेगाने वाटचाल कराल. मात्र, या दोघांना केंद्रस्थानी ठेवून येत्या काही महिन्यांत जेव्हा तुमच्या पगारात वाढ होऊन पैशाचा ओघ वाढेल तेव्हा यापैकी कोणत्या पर्यायात अधिक पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल हे आपण पाहूया.

SIP Investment: तरुणांनो, दिवसाला करा ३३३ रुपयांची बचत; निवृत्तीला मिळेल ३.५ कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स
SIP की गृहकर्जाच्या ईएमआय
दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय जरी वैयक्तिक असला तरी तरीही काही गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही २० वर्षांसाठी ८.५% व्याज दराने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमचा मासिक EMI ४२,३९१ रुपये असेल आणि तुम्ही व्याज म्हणून एकूण ५४,१३,८९७ रुपये भराल. अशा स्थितीत तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीच्या अनुषंगाने तुमचा EMI दर वर्षी ५% ने वाढवण्याचा विचार करा, जे तुम्हाला व्याज खर्चावर रु. १९.५ लाखांपर्यंत बचत करण्यास मदत करेल.

करोडपती बनायचंय तर SIP मध्ये दरमहिना किती गुंतवणूक कारवी लागेल? समजून घ्या गणित…
तुमच्या कर्जाचा कालावधी सुमारे ७.५ वर्षांनी कमी होईल. तसेच, आयकर नियमांनुसार तुम्ही एका आर्थिक वर्षात भरलेल्या मूळ रकमेवर कलम ८०इ अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. तसेच, कलम २४(बी) अंतर्गत तुम्ही व्याजाच्या रकमेवर दोन लाखांपर्यंत कपातीचा दावा करू शकता.

निवृत्तीनंतरची तरतूद कशी करावी?

SIP गुंतवणुकीचे फायदे
दुसरीकडे, समजा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात २० वर्षांसाठी दरमहा ४०,००० रुपयाची SIP सुरू केली. यावर १२% चा CAGR गृहीत धरून तुम्ही तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीसह SIP मधील गुंतवणूक ५% वाढवण्याचा निर्णय घेतला. असे केल्यास तुम्हाला २० वर्षानंतर ५,४९,५०,४९३ रुपयांचा निधी तयार होईल. म्हणजे तुम्हाला १,५८,७१,६५८ रुपयांच्या गुंतवणुकीवर ३,९०,७८,८३५ रुपयांचा नफा होऊ शकतो. याउलट जर तुम्ही SIP मध्ये ५% वाढ केली नाही, तर हा नफा फक्त ३,०३,६५,९१७ लाख रुपये असेल. अशा स्थितीत तुमच्या एकूण नफ्यात ८७,१२,९१८ रुपयाचे नुकसान होईल. त्यामुळे तुम्हाला पगार वाढ झाल्यावर तुमची गुंतवणूक कुठे वाढवायची आहे, हे तुम्ही ठरवू शकता.

Pune Bike Accident; पुण्यात दोन दुचाकींची धडक, दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

0

पुणे : वाडागाव पुनर्वसन(ता. शिरूर) येथील वाडागाव – डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घचली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

महादेव दत्तात्रय कांबळे (वय १४) आणि सिद्धेश शिंदे ( वय १७)अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक या अपघातात जखमी झाला आहे.शिक्रापूर पोलीस ठाण्यात ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Accident: रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यालाकारने चिडले; दहा ते पंधरा फूट फरपटत नेले
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वाडागाव (ता. शिरूर) येथील वाडागाव डिंग्रजवाडी रस्त्यावरुन महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे हे दोघे त्यांच्या ताब्यातील (एम एच १२ जि.पी. २०३६) या दुचाकीवरून जात असताना, ओंकार कंदारे हा युवक त्याच्या दुचाकीहून भरधाव वेगाने आला. त्यावेळी त्याची धडक महादेव कांबळे याच्या दुचाकीला बसून अपघात झाला. या अपघातात महादेव दत्तात्रय कांबळे याचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धेश बाळासाहेब शिंदे याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

राँग साईडने येणाऱ्या कारची बाईकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू; पुण्यात भीषण अपघात
या अपघातात ओंकार चंद्रकांत कंदारे रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे हा जखमी झाला आहे. अमोल महादेव कांबळे (वय ३३ वर्षे रा. कोरेगाव भीमा (पंढरीनाथ नगर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी ओंकार कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

dead body of a young man was found; जळगावात आढळला तरुणाचा मृतदेह

0

जळगाव: शहरातील मुक्ताईनगर मंदिराच्या मागील बाजूस एका अनोळखी तरुणाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचण्यात येऊन त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुक्ताईनगर शहराजवळच्या मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला एका ३५ ते ४० वयोगटातील तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या तरुणाचा खून झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे.
Navi Mumbai: मानेत खुपसलेला सुरा घेऊन त्याने सानपाड्याच्या रस्त्यावरुन बाईक पिटाळली, हॉस्पिटलमधील डॉक्टर्स अवाक

दरम्यान दोन दिवसांपासून हा मृतदेह या ठिकाणी पडलेला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी मुक्ताईनगर येथे घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. ठसे तज्ञांसह फॉरेन्सिसक पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे. या अनोळखी तरुणाची ओळख पटेपर्यंत इतर कुठल्याही गोष्टींचा उलगडा होणार नाही. त्यामुळे मयताची ओळख पटवण्यासाठी मुक्ताईनगर शहरासह विविध पोलीस ठाण्यांना मयताचे छायाचित्र तसेच घटनास्थळावरची परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

जळगाव सध्या गुन्हेगारीचे घरच बनत आहे. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. जळगावातील या वाढत्या गुन्हेगारीकडे पोलीस प्रशासनाने ठोस पाऊले उचलणे गरजेचे बनले आहे. यावर वेळेत कठोर कारवाई न केल्यास येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

UK orders China to shut ‘secret police stations’ on British soil

0

LONDON: The UK government has ordered China to shut unofficial police stations operating on British soil, Security Minister Tom Tugendhat told parliament on Tuesday.
The Foreign Office “told the Chinese Embassy that any functions related to such ‘police service stations’ in the UK are unacceptable and that they must not operate in any form,” a written statement said.
The embassy “responded that all such stations have closed permanently”, it added.
British police began investigations after the human rights group Safeguard Defenders reported their existence in the UK, Tugendhat said.
According to the group, they were officially set up to provide administrative services but were also used “to monitor and harass diaspora communities and, in some cases, to coerce people to return to China outside of legitimate channels”, he added.
Tugendhat said police visited each location identified by Safeguard Defenders and “have not, to date, identified any evidence of illegal activity on behalf of the Chinese state across these sites”.
“We assess that police and public scrutiny have had a suppressive impact on any administrative functions these sites may have had,” he added.
“However, these ‘police service stations’ were established without our permission and their presence,” Tugendhat said.
In April, The Times newspaper reported that Chinese businessman Lin Ruiyou operated a food delivery business in the London suburb of Croydon that doubled as an undeclared Chinese police station.
Beijing’s embassy in London denied the report and warned against “false accusations” spread by the media.

How to Become Rich, How Much Should You Invest in SIP to Make Rs 10 Crore in 10 Years; महिन्याला ३० ते ४० हजार कमावणाराही बनू शकतो करोडपती, अशी गुंतवणूक करून तुम्हीही व्हा मालामाल

0

नवी दिल्ली : एक छोटी-मोठी नोकरी करणारी व्यक्ती १० कोटी रुपये जमा करू शकते का? जवळपास प्रत्येक जण एकच उत्तर देईल, ते शक्यच नाही. १० कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे आणि एवढी रक्कम जमा करायची असेल तर उत्पन्नही मजबूत असले पाहिजे. मग एखादी छोटीशी नोकरी करणारी व्यक्ती १० कोटी रुपये कसा जमा करू शकतो? पण ते म्हणतात ना की या जगात काहीही अशक्य नाही आणि प्रबळ इच्छाशक्तीने मोठे ध्येयही सध्या करता येते.

इथे आपण १० कोटी रुपये जमा करण्याविषयी बोल्ट आहेत. मग ते सर्वसामान्य व्यक्तीला १०, २० किंवा ३० वर्षात ते कसं शक्य होईल. तर याचे एकच सूत्र आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल आणि वर्षानुवर्षे सातत्याने करत राहावी लागेल. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की गुंतवणूक कुठे करायची आणि किती करायची?

SIP Investment: तरुणांनो, दिवसाला करा ३३३ रुपयांची बचत; निवृत्तीला मिळेल ३.५ कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स
१० कोटी रुपये जमा करण्याचा फॉर्म्युला
१० कोटी रुपयेसारखा मोठा फंड उभा करण्याचा सर्वात सोपा पर्याय कोणता असू शकतो. नोकरी-व्यवसाय म्हणजे विशेषत: नोकरदारांसाठी एकत्रित तेवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक उत्तम पर्याय असू शकतो, ज्यामध्ये नियमित गुंतवणूक करून मोठे उद्दिष्ट साध्य करता येते. म्युच्युअल फंडांनी गेल्या दोन दशकांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. अशा स्थितीत भविष्यातही अधिक चांगल्या परताव्याची अपेक्षा केली जाऊ शकते. म्युच्युअल फंडात तुम्ही दर महिन्याला ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकतात.

करोडपती बनायचंय तर SIP मध्ये दरमहिना किती गुंतवणूक कारवी लागेल? समजून घ्या गणित…
१० वर्षात १० कोटींचा फंड उभा करणे थोडे अवघड आहे. परंतु जर तुम्ही दर महिन्याला मोठ्या प्रमाणात SIP करण्यास तयार असाल तर ते देखील शक्य आहे. जर तुम्हाला वार्षिक १२ टक्के परतावा मिळत राहिल्यास तुम्हाला १० वर्षात १० कोटींचा फंड बनवण्यासाठी दरमहा ४.३० लाख रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय १५% परतवा मिळाल्यास तर दरमहा ३.६० लाख रुपयांची SIP करावी लागेल आणि १८% परतावा गृहीत धरून तुम्हाला दरमहा २,९५,००० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे काम अवघड आहे.

लवकर निवृत्त होताय…

२० वर्षात १० कोटी कसे मिळवायचे
पण २० वर्षाचा कालावधी गृहीत धरल्यास आणि १२% वार्षिक परतावा मिळाल्यास तुम्ही दरमहा सुमारे १००००० रुपये SIP करून १० कोटी रुपये जमा होऊ शकतात. दुसरीकडे, जर तुम्हाला १५% वार्षिक परतावा मिळत असेल, तर २० वर्षांनंतर १० कोटी रुपयांसाठी म्युच्युअल फंडात दरमहा ६६,००० रुपये जमा करावे लागतील. तसेच १८% परतव्यानुसार २० वर्षांसाठी दरमहा ४३,००० रुपयांची SIP करावी लागेल.

दरमहाची छोटी गुंतवणूक, करेल तुम्हाला काही वर्षातच लखपती… भन्नाट योजना जाणून घ्या
३० वर्षांत १० कोटी रुपये सहज जमा करू शकता
दुसरीकडे जर ३० वर्षांचा कालावधी असेल तर हे ध्येय खूप सोपे होते. SIP कॅल्क्युलेटर पाहता दरमहा रु. २८,००० च्या SIP वर ३० वर्षात १२% वार्षिक होऊ शकतात. दरमहा फक्त १४ हजार ३०० रुपयांच्या SIP वर ३० वर्षांत १० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, परंतु त्यासाठी १५% वार्षिक परतावा मिळणे आवश्यक आहे. चक्रवाढ व्याजाची ताकद म्हणजे की दरमहा केवळ ७००० रुपयांच्या SIP वर ३० वर्षांत १० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात, ज्यावर वार्षिक १८% परतावा जोडला जातो, जे आजच्या तारखेत प्रत्येकासाठी शक्य आहे. दरमहा ३० ते ४० हजार रुपये कमावणारा सर्वसामान्य ७००० महिन्यांची बचत करून म्युच्युअल फंडात SIP करू शकतो.

Couple attempts Suicide in front of Kolkata Metro CCTV footage; कोलकाता मेट्रो येताना दिसली, नवऱ्याने बायकोला उचलून रुळांवर उडी घेतली

0

कोलकाता : जोडप्याने मेट्रोसमोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. समोरुन मेट्रो येत असल्याचे पाहून पतीने पत्नीला उचलले आणि थेट रुळांवर झोकून दिले. सुदैवाने दोघांचेही प्राण प्रशासनाने वाचवले आहेत.कोलकाता मेट्रोवरील नोआपारा स्थानकावर ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. ही घटना मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सच्याही अंगावर काटा उभा राहिला आहे.

संबंधित जोडप्याने मेट्रो ट्रॅकवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कोलकाता मेट्रोच्या नोआपारा स्टेशन प्लॅटफॉर्मवर पतीने ट्रेन आल्याचे पाहून आपल्या पत्नीला मागून उचलून घेतलं आणि तिच्यासोबत मेट्रोसमोर उडी मारली. नेमक्या कुठल्या कारणामुळे पतीने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पत्नीच्या मर्जीने हा आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार घडला, की पतीनेच पत्नीसह आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, याविषयी माहिती मिळालेली नाही.

मिशन मालामाल : दिल्लीतील मायलेकीच्या हत्येचं गूढ उकललं, गायकासह चुलत भावाला अटक
व्हिडिओमध्ये संबंधित जोडपे मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर निवांत चालत असल्याचे दिसते. अचानकच पतीने पत्नीसह जीवन संपवण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे दिसते. मेट्रोचा डबा स्टेशन परिसरात शिरताच, पतीने पत्नीकडे धाव घेतली आणि तिच्यासोबत रुळांवर उडी मारली. हे दोघे चालत्या ट्रेनखाली येताना दिसत आहेत, मात्र तिथल्या मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवला.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याच्या सुटकेनंतर तासाभरात कवी सुभाष ते दक्षिणेश्वर या स्थानकांदरम्यान असलेली सेवा पुन्हा सुरु झाली.

आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार

घटनेचा व्हिडिओ : (ही दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतात)

Latest posts