Monday, May 29, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2524

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

25

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

27

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

20

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

20

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

20

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

19

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

23

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

257

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Jalna News: आर्मीची लेखी परीक्षा पास, मैदानीसाठी जोरदार तयारी; पण एकटाच तलावात पोहायला गेला अन् घात झाला

0

जालना: सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी घडली आहे. किरण सुरेश साळवे असे मयताचे नाव आहे. सैन्य दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून नियमित सराव करणाऱ्या किरणचा तलावात पोहत असताना अचानक बुडून मृत्यू झाल्याची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. जाफराबाद व देऊळगाव राजा यांची हद्द एकच असल्याने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

शेजारील विदर्भातील किनगाव राजा ता. सिंदखेडराजा येथील तरुण किरण साळवे हा सैन्य दलात जाण्यासाठी शारीरिक सराव करायचा. त्यासाठी तो देऊळगावराजा येथे राहत होता.दररोज पहाटे तो नित्यनेमाने देऊळगावराजा ते लगतच असलेल्या जाफराबाद तालुक्यातील शिराळा तलावापर्यंत धावण्याचा सराव करायचा. धावल्यानंतर तो दररोज शिराळा तलावात मित्रांसोबत काहीवेळ पोहायचा सुध्दा.पण काल नियतीने त्याच्यावर घाला घातला. काल शनिवारी सकाळी मित्र सोबत नसल्याने तो एकटाच पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र तलावातील खोल खड्डयाचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.खूप वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता तो तलावात बुडाल्याचे त्यांना कळाले.

पत्नीला कळलं, आरडाओरड करत धावली, पण उशीर झाला होता, शाळेच्या हौदात घडलं विपरीत

एक तरुण तलावात बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व नागरिकांची गर्दी जमा झाली.कुणी तरी टेंभुर्णी पोलिसांना ही बाब कलवताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर रविवारी सकाळी किरणाचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थ व पोलिसांना यश आले. टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रविवारी दुपारी मयत किरण याच्यावर किनगावराजा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि.रवींद्र ठाकरे, PSI सतीश दिंडे,बीट जमादार दिनकर चंदनशिवे, हरी क्षीरसागर, अशोक घोंगे, गजेंद्र भुतेकर आदींनी घटनास्थळी थांबून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

पोहणं बेतलं जीवावर; जळगावात तीन लहानग्यांचा बुडून मृत्यू

किरणला सैन्य दलात जायचे होते,त्यासाठी तो नियमित सराव करायचा. नुकताच तो लेखी परीक्षेत उत्तीर्णही झाला होता. त्यामुळे त्याने आता सर्व लक्ष फिजिकल सरावावर केंद्रित केले होते. व्यायामानंतर तो दररोज पोहण्याचा सराव करायचा, पण हा पाण्यातील सरावच एक दिवस आपल्या जिवावर उठेल याचा पुसटसा विचारही त्याने केला नसेल. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबासह गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

Police Bharti Result Three Recruits From Nirhale Fatehpur Sangle Family; लेकरांनी करून दाखवलं, शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; पोलिसात दोघं तर तिसरा सैन्यात भरती, सांगळे कुटुंब चर्चेत

0

Authored by पवन येवले | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 May 2023, 9:13 am

Police Bharti Result Three Recruits From Nirhale Fatehpur Sangle Family : नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेत राज्यभरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील आणि शेतकरी कुटुंबातील मुलांनी यश संपादन मिळवले आहे. जनसेवेसाठी पोलीस दलात दाखल झाले आहेत. यातच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगळे कुटुंबातील बहीण भावांनी स्पर्धा परीक्षेत भरारी घेतली आहे. आणि त्यांनीही मोठं यश मिळवल्याने त्यांची चर्चा होत आहे.

 

Nashik Sinnar News
लेकरांनी करून दाखवलं, शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; पोलिसात दोघं तर तिसरा सैन्यात भरती, सांगळे कुटुंब चर्चेत
नाशिक : राज्यातील पोलीस भरतीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये अनेक तरुण तरुणींची निवड झाली आहे. मात्र, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील एक मुलगा लष्करात, तर आणखी एक मुलगा आणि मुलगी पोलीस दलात भरती झाल्याने शेतकरी माता-पित्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रबळ इच्छाशक्ती मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एकाच कुटुंबातील या भावंडांनी यश मिळवलं आहे.नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निरहाळे फत्तेपूर येथील बबन भिकाजी सांगळे हे पत्नी सावित्री, मुलगी व दोन मुलांसोबत राहतात. त्यांनी शेती करून आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षित केलं आहे. एक मुलगा देश सेवेसाठी सैन्य दलात तर एक मुलगा आणि एक मुलगी जनसेवेसाठी पोलीस दलात भरती झाले आहेत.
Nashik : सप्तशृंगी देवी मंदिरात ड्रेसकोड लागू होणार, गाभाऱ्यात या भाविकांनाच मिळणार प्रवेश
सांगळे कुटुंबातील मोठी मुलगी ज्योती हिने पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली. पोलीस भरतीसाठी सराव सुरू असताना भाऊ अमोल आणि बालाजी यांनीही भरतीसाठी तयारी सुरू केली. दोन्ही भावंड आणि बहीण आपल्या घराच्या परिसरातच भरतीसाठी मेहनत घेऊ लागले. धावण्याचा सराव उड्या मारणे व्यायाम करणे, गोळा फेक असा सराव सुरू असतानाच भरतीच्या परीक्षेचेही तयारी केली. आणि अखेर त्यांच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवले.
ज्याची बांगड्यांची गाडी त्याला लाखाचं वीजबिल देऊन ‘शॉक’, महावितरणवाल्यांनो हे बरं नव्हं…!
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत बहीण ज्योतीची आणि भाऊ अमोल यांची मुंबई पोलीस दलात भरती झाली. त्यांचा लहान भाऊ बालाजी याने याच दरम्यान, भारतीय सैन्य दलाची परीक्षा दिली होती. आणि त्यात त्याला यश मिळाल्याने सैन्य दलात त्याची निवड झाली. सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले पोलीस दलात आणि सैन्य दलात भरती झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

IPL 2023 Final CSK vs GT Groundsman And Support Staff Did Superb Job Amid Heavy Rain In Narendra Modi Stadium : सर्वांनी मैदान सोडले तेव्हा या ६ जणांनी पावसाला अंगावर घेतलं; IPL फायनलच्या खऱ्या हिरोंना सलाम

0

अहमदाबाद: आयपीएल २०२३चा विजेता कोण होणार याचा निर्णय २८ मे ला होणार होता. पण पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि फायनल मॅच पुढे ढकलण्यात आली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार होती. सर्व तयारी झाली होती, मात्र टॉसच्या काही मिनिटे आधी पावसाला सुरुवात झाली जो थांबलाच नाही, ज्यामुळे अंतिम लढत आज २९ मे रोजी होणार आहे.अंतिम सामन्यात आलेल्या या पावसामुळे चाहत्यांना निराश केले. एका बाजूला स्टेडियमवर आणि टीव्हीवर चाहते कधी एकदा पाऊस थांबतोय आणि मॅचला सुरुवात होईल याची वाट पाहत होते. तर दुसऱ्या बाजूला पाऊस पडत असताना देखील मॅच खेळवता यावी यासाठी मैदानावरील स्टाफ जीवाचे रान करत होता.

CSK vs GT: फायनल मॅच होण्याआधीच ठरला IPL 2023 विजेता; समोर आले चॅम्पियन संघाचे नाव
नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. खेळाडू, अंपायर्स आणि प्रेक्षकांनी पावसापासून वाचण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. पण ग्राउंडवरील स्टाफ मात्र पावसाशी दोन हात करत मैदानावर थांबले. पावसाने अधून मधून थोडी विश्रांती घेतली होती. तेव्हा हे कर्मचारी मैदान सुख करण्यासाठी झटत होते. जेव्हा जोरदार पाऊस पडत होता तेव्हा हे कर्मचारी मैदानावरच थांबले होते आणि पाणी काढण्याचे काम करत होते.

IPL Final: धोनी फायनलमध्ये काढणार हुकुमाचा एक्का; हार्दिकला कळणार देखील नाही मॅच कधी गमावली

मैदानाला जेव्हा तळ्याचे स्वरुप आले होते तेव्हा देखील हे कर्मचारी पाणी काढण्याचे काम करत होते. अशातच एक फोटो समोर आला आहे ज्यात एका छतरीमध्ये सहा ग्राउंड स्टाफ पावसापासून स्वत:चा बचाव करत आहेत. पाऊस कितीही पडो पण आम्ही मॅच सुरु होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू हेच या फोटोतून दिसून येते.

रात्री सात वाजता पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याचा लपंडाव सुरू होता. जेव्हा ९ वाजता पाऊस थांबला आणि मैदानावर प्रथमच सुपर सॉकर (मैदान सुखं करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र) आणले तेव्हा स्टेडियमवर आणि टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या चाहत्यांना आनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झाली आणि मैदान पुन्हा झाकण्यात आले.

ग्राउंड स्टाफ मॅच सुरू करण्यासाठी ज्या पद्धतीने काल प्रयत्न करत होते त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सर्वजण सलाम करत आहेत. आज (२९ मे) फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर आज देखील मॅच झाली नाही तर नियमानुसार गुजरात टायटन्सला विजेते जाहीर केले जाईल. नियमानुसार जो संघ साखळी फेरीत अव्वल स्थानी होता त्याला विजेतेपद दिले जाईल.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

Samruddhi Mahamarg Car Accident At Buldhana Deulgaon; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार जळून खाक, आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, ओळखही पटेना

0

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मध्यरात्री हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि या आगीत कार जळून खाक झाली. यात कारमधील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.समृद्धी महामार्गावर कारला अपघात होऊन ती सुरुवातीला इम्पॅक्ट बॅरियरला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर कारला आग लागली. या आगीत होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही कार नागपूर शिर्डीला निघाली होती. बुलडाण्यातील देऊळगाव पोळ या गावाजवळ कारला अपघात झाला.

सामान्यांच्या लालपरीचे आरोग्य व्हेंटिलेटरवर! एसटीला ५० किमीसाठी दोन तास, गतिमान सरकारच्या काळात एसटीची दुर्दशा
अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस आता तपास करत आहेत. अपघात इतका भीषण होता आगीत कार जळून खाक झाल्याने ती कुठली होती आणि त्यात कोणते प्रवासी होते? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीत कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळखही पटवता येत नाहीए. अपघातातील जखमीवर दुसरबीड रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडोरवरची वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. या घटनेतील मृतदेह दुसरबीड रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

Buldhana Accident: बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी प्राण गमावले; थरारक Video

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 29 May 2023

0

Top Headlines

28 May, 03:10 PM (IST)

TOP Headlines ABP Majha 10 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 28 मे 2023

Bandra-Versova Sea Link to be named after Veer Savarkar | Mumbai News

0

MUMBAI: CM Eknath Shinde on Sunday announced that the under-construction Bandra-Versova Sea Link will be named after Swatantrya Veer Savarkar. Earlier this month, CM Shinde announced that Mumbai Coastal Road will be named after Chhatrapati Sambhaji Maharaj. The move is being seen as an attempt by the Shinde-Fadnavis government to woo Maharashtrian voters ahead of the local body polls and next year’s assembly polls.
Over 10 years ago, the city’s first sea link – the 5.6km Bandra Worli Sea Link – was opened to motorists. The BWSL is named after former Prime Minister Rajiv Gandhi. The move is also seen as a bid to take on the Shiv Sena (UBT), as Uddhav Thackeray is part of the Maha Vikas Aghadi (MVA) with the Congress and NCP.
Political analysts said that the BVSL was going to be one of the city’s biggest landmarks and naming it after Savarkar would help the Sena woo Marathi voters. Analysts said that as the main railway station and airport are named after Chatrapati Shivaji Maharaj, and the coastal road being named after Chatrapati Sambhaji Maharaj, naming the BVSL after Savarkar would also serve as a political statement for CM Shinde and show his commitment to the Marathi manoos.

Ulhasnagar News: शिवसेना शाखाप्रमुखाच्या हत्येबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडलं, हत्येचं कारण समोर

0

उल्हासनगर: उल्हासनगरमधील जुगार क्लब चालकाची हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे यानंतर समोर आले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील जय जनता कॉलनीत जुगाराचा अड्डा चालवणारा शब्बीर शेख याची २६ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या भावावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर उल्हासनगर परिमंडळ ४ मधील ८ पोलीस स्टेशन आणि ठाणे गुन्हे शाखा यांच्याकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता. ही हत्या विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, जयेश साळुंखे, विजय रुपानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं.

यानंतर ठाणे गुन्हे शाखेने यापैकी दिनेश कवठणकर याला बेड्या ठोकल्या. तर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी विक्रम कवठणकर, प्रशांत तायडे आणि बोराळे या तिघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता जुगार चालक शब्बीर शेख यांच्यासोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आपले यापूर्वी वाद झाले होते आणि त्याच वादातून आपण ही हत्या केल्याची कबुली या सर्वांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर काही आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे.

भर चौकात झालेल्या हत्या प्रकरणाला कलाटणी; वहिनीनेच मुलांसह दिराच्या हत्येचा कट रचल्याचं उघड

उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृण हत्या,संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

या घटनेचे सीसीटीव्ही व्हायरल झाले असून जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लबबाहेर ही हत्या झाली आहे.शब्बीर शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना शाखाप्रमुख होता.तर शब्बीर शेख जुगाराचा क्लब चालवत होता. हल्लेखोर हे चॉपर, तलवार असे धारदार हत्यार घेऊन आले होते. हल्लेखोरांनी शब्बीर शेखवर दहा ते बारा वार केले. जखमी अवस्थेत शब्बीर शेख यांना क्रिटी केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बहिणीसोबत अफेअर असल्याचं समजलं; भावाने बॉयफ्रेंडला मागे पळून पळून मारलं

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 29 May 2023

0

Top Headlines

28 May, 03:10 PM (IST)

TOP Headlines ABP Majha 10 AM : आत्ताच्या ताज्या हेडलाईन्स : 28 मे 2023

Weather updates, GT vs CSK: Better forecast for IPL final on reserve day, May 29 | Cricket News

0

The Ahmedabad weather forecast for the evening of May 29, the reserve day for the IPL 2023 final between Chennai Super Kings and Gujarat Titans, is much more promising than the downpour that the Narendra Modi Stadium witnessed on Sunday, when the wet conditions didn’t allow even the toss to happen.
The cut-off time for a full 20-over-a-side game was 9:40 pm, while a curtailed five-overs-a-side game had to start by 12:26 am. According to the rules, if both of the above are not possible, a ‘Super Over’ starting at the cut-off time of 12:56 am can decide the winner. But none of those playing conditions could be used as the rain played spoilsport.
If it happens the same way on the reserve day, the team that finished on top in the league stage, i.e., defending champions Gujarat Titans, will be declared the winners.
However, according to accuweather.com, the forecast in Ahmedabad for Monday evening is not as threatening as May 28 and the fans could see a full T20 game being played.
OVERALL FORECAST: Mostly cloudy with a thunderstorm in spots this afternoon
At 7 pm, May 29

7-pm

At 9 pm, May 29

9pm

At 11 pm, May 29

11pm

आयव्हीएफ ट्रीटमेंट सुरु असणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये नवऱ्याने बायकोला संपवलं

0

अंबरनाथ: लग्नाला १२ वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं पतीने पत्नीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली असून यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले.

भयंकर! शेतात बायकोवर वार; शिर हातात घेऊन गावात आला; दारात ठेवून कित्येक तास बसून राहिला

अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल (३७) हा पत्नी नीतू कुमारी मंडल (३०) सोबत वास्तव्याला होता. मूळच्या बिहारमधील असलेल्या या दोघांचं २०११ साली लग्न झालं होतं, तर २०१६ साली रोनीतराज हा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर म्हणून कामाला लागला. ऑर्डनन्स इस्टेटमधील एच ३८ या स्टाफ क्वार्टरमध्ये हे दाम्पत्य राहायला होतं. त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली, तरी त्यांना मूलबाळ होत नसल्यानं नीतू कुमारीची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती. मात्र, रोनीतराज हा याच कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी तिच्याशी वाद घालत होता.

घरातील सगळ्यांना संपवलंय, आता मी…; मेट्रोच्या सुपरवायझरचा कॉल; पोलीस घरी पोहोचले अन्…

रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर तो जेवत असताना त्याचे पत्नीसोबत पुन्हा वाद झाले आणि त्याने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्याने शेजाऱ्यांना बोलावत आपल्या पत्नीची कुणीतरी हत्या केल्याचं सांगितलं आणि आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव रचला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मात्र, रोनीतराज सांगत असलेल्या गोष्टीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यालाच ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत नीतू कुमारी हिचा पती रोनीतराज यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या व्यक्तीनं केलेल्या या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे.

स्कॉलरशीप फॉर्म भरायला गेली; पण पुढे जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं होतं

Latest posts