Saturday, June 3, 2023
Home Blog

“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”

2543

गेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.

सोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

तसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.

साडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

साडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.

या परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.

Covid-19 Live Update

0

[COVID19-WIDGET]
[COVID19]

आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर

30

मालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.

देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

पालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली! 2019मध्ये एकही मृत्यू नाही!!

34

मलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन

25

भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज

भीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद या देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस! 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.

दाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगारीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा!

2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

महाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक

23

▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.

▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.

▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.

▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख??

25

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

बाप से बेटा सवाई ! राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक

24

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.

हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट

28

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.

“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.

26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.

…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार

261

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे  यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.

माणसं सांभाळण्याची जबाबदारी

निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमिताने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Nagpur crime news today police arrested 49 years old man for rape on three years old girl; चॉकलेटच्या बहाण्याने नागपूरमध्ये चिमुरडीवर बलात्कार, घरमालकाला रडण्याचा आवाज आला अन्…

0

नागपूर : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नागपूर शहर बलात्काराच्या एका घटनेने हादरले आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत तीन वर्षांच्या चिमुरडीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नरेंद्र धनराज वांधरे (वय ४९ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजूर काम करत आहेत. ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे.

रोज मंदिरात आरती करुन जायचे कामावर, पाईप लीकेज दुरुस्तीसाठी गेले, अन् अनर्थ घडला
नरेंद्र तिच्या आई-वडिलांना ओळखत असे आणि त्यांच्या घरी येत जात असे. गेल्या गुरुवारी मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. तिथे असताना ती आजीसोबत घरात खेळत होती. दरम्यान, आरोपी तेथे आला आणि त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत नेले.

धक्कादायक! वडापाव आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; दुकानदाराला ठोकल्या बेड्या

आरोपीने मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घरमालक बाहेर आला. तिथे त्यांना आरोपी बाहेर निघताना दिसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुलीच्या आई वडिलांना दिली. तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

यानंतर कुटुंबियांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नरेंद्रविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर महिला व मुलींसाठी अतिशय सुरक्षित शहर मानले जात होते, मात्र गेल्या काही वर्षांत येथे गुन्हेगारीत वाढ होताना दिसून येत आहेत. शहरातील निम्म्या लोकसंख्येशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

तीन वर्षांपूर्वी लग्न, तेव्हापासून सततचा छळ, प्रियांका कंटाळली, नको ते पाऊल उचललं….

0

रायगड : कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेमघर या गावामध्ये एका २४ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका अशोक शिंदे असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.याबद्दल सविस्तर माहिती अशी की, आरोपी विकास अशोक शिंदे आणि प्रियंका अशोक शिंदे यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून पती विकास अशोक शिंदे हा पत्नी प्रियांकाला नेहमी मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. तसेच तिचा छळ करून तिला नांदवायला नेणार नाही असे वारंवार सांगत होता.अखेर या सर्व जाचाला कंटाळून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. टेमघर येथील स्वतःच्या शिलाई दुकानात प्रियंका हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी पती विकास अशोक शिंदे (वय २७ रा. टेमघर तालुका महाड. मूळ रा. मोरगाव जिल्हा पुणे) याच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी विकास शिंदे हा पुणे परिसरातील एका कंपनीत कामाला आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपी असलेल्या पतीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत.

Mitchell Starc Prepration Marnus Labuschagne Bowled Video IND vs AUS WTC Final : चेंडू नव्हे आगीचा गोळा टाकतोय हा गोलंदाज; WTC फायनलमध्ये भारताची डोकेदुखी वाढली

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ची फायनल मॅच आता फक्त काही दिवसांवर आली आहे. ७ जूनपासून म्हणजे बुधवारपासून ही लढत लंडनच्या द ओव्हर मैदानावर होत आहे. दोन्ही संघ सध्या इंग्लंडमध्ये जोरदार सराव करत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाच्या सरावाचा एक व्हिडोओ समोर आला असून ज्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.WTC फायनलमध्ये जर कोणता खेळाडू भारतीय संघासाठी धोक्याचा ठरू शकतो तर तो आहे मिचेल स्टार्क होय. इंग्लंडमध्ये त्याची वेगवान गोलंदाजी रोहित आणि कंपनीसाठी डोकेदुखी ठरू शकते. ही गोष्ट स्टार्कने सराव सत्रात दाखवून दिली आहे.

Sexला क्रीडा म्हणून मान्यता; पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन; कधी आणि कुठे होणार जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी जलद गोलंदाज मिचेल स्टार्क WTC फायनलसाठी जोरदार सराव करत आहे. त्याने या अंतिम सामन्यासाठी आणि आगामी अॅशज मालिकेसाठी त्याने आयपीएलच्या १६व्या हंगामात भाग घेतला नव्हता. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय सराव सत्रात नेट्समध्ये त्याने संघातील सहकारी खेळाडू मार्नस लाबुशेन क्लीन बोल्ड केले. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

WTC फायनलच्या आधी डेव्हिड वॉर्नरची बंडखोरी; क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये भूकंप, बोर्डाबद्दल…


भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकायची असेल तर टीम इंडियातील फलंदाजांना कोणत्याही परिस्थितीत स्टार्कच्या गोलंदाजीवर तोडगा काढावा लागले. भारतासमोर फक्त स्टार्कचे आव्हान आहे. तर कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड या गोलंदाजांचा धोका आहे. हे तिनही गोलंदाजी भारताला विजेतेपदापासून दूर नेऊ शकतात.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन , केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

IPL 2023च्या फायनलमधील गुजरातचा पराभव आधीच ठरला होता; कारण जो खेळाडू…
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलेंड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मिशेल मार्श, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा



Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

Manish Sisodia reaches Delhi residence, fails to meet his ailing wife | Delhi News

0

NEW DELHI: The Aam Aadmi Party (AAP) on Saturday said that former Delhi deputy chief minister and AAP leader Manish Sisodia was unable to meet his wife as she got admitted to LNJP hospital ahead of Sisodia’s arrival.
It is to be noted that yesterday, Delhi High Court has allowed Sisodia to meet his ailing wife from 10am to 5pm on Saturday. However, the court said that Sisodia will be in police custody during the meeting.

Sisodia had earlier moved an interim bail citing his wife’s illness. Granting bail to the AAP leader, a bench of Justice Dinesh Kumar Sharma said that he (Manish Sisodia) shall not interact with media, use a mobile phone or access the internet.

“The court further directed that the medical report be verified and the medical report of Sisodia’s wife be furnished by tomorrow evening positively. The court in order further added that Sisodia will not meet anyone except family members during this period.

WATCH: Manish Sisodia reaches his home, allowed to meet his ill wife

02:48

WATCH: Manish Sisodia reaches his home, allowed to meet his ill wife

Sisodia’s legal team also moved an interim bail plea in Delhi High Court citing his wife’s medical illness. The interim bail is seeking court direction to grant six weeks of bail.
The ED on March 9 arrested former Delhi deputy chief minister Manish Sisodia in the liquor policy case, after hours of questioning at Tihar Jail.
Sisodia was arrested by the CBI earlier in its ongoing investigation of a case related to alleged irregularities in the framing and implementation of the excise policy of the National Capital Territory of Delhi (GNCTD).
(With inputs from ANI)

Sangli Miraj Boyfriend Kidnapped Girlfriend; रिक्षात बसवून पळवून नेलं, खोलीत आणलं अन्…; अल्पवयीन मुलीसोबत पुढे घडली भयंकर घटना

0

सांगली : प्रियसीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने गळ्यावर वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर विवाहित प्रियकर हा पसार झाला आहे. या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यामध्ये प्रसाद मोतुगडे-माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली शहरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला मिरजेत आणलं. यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रसाद मोतुगडे-माळी ( वय २०, राहणार ब्राह्मणपुरी, मिरज) या नराधमावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली राहणारी पीडीत मुलगी आणि प्रसाद याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आणि यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

तिघे जीवलग मित्र, मुंबईला परतताना कारला अपघात, दोघांच्या मृत्यूने आभिसेवाडीवर शोककळा
दरम्यान, शुक्रवारी प्रसाद याने पीडित मुलीचे सांगलीतून तिच्या घराजवळून रिक्षातून अपहरण केलं होतं. यानंतर मिरजेतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिच्या गळ्यावर कटरने वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तर या घटने प्रकरणी मिरज शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे-माळी याच्या विरोधात अपहरण, पोक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत.

बापाकडून पैसे उसने, मग जमीन नावावर करण्यासाठी तगादा, वाद वाढताच लेकाने वाद संपवला!

जखमी पीडित तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. तर आरोपी प्रसाद हा फरार असून त्याचा शोध मिरज पोलीस घेत आहेत. प्रसाद याने आधी रिक्षेतून मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तो राहत असलेल्या मिरज शहरातील ब्राह्मणपुरे येथील भाड्याच्या खोलीत तरुणीला नेलं. त्याने इथे तिच्यावर आत्याचार केला. यावेळी विरोध केल्याने आरोपी प्रसाद याने त्याच्याकडे असणाऱ्या कटरने मुलीच्या हातावर वार केला. त्यानंतरही आरडाओरडा केल्यावर त्याने पीडित मुलीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Bhayander Uttan Beach Headless Body Identify Two Arrested; त्रिशूळ अन् ओमचा टॅटू, शिर नसलेल्या बॉडीचं गूढ १२ तासात उकललं; भाईंदरमधील हत्या प्रकरणात अपडेट

0

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर परिसरात काल शुक्रवारी उत्तन समुद्रकिनाऱ्यावर एका प्रवासी बॅगेत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पीडित महिलेची ओळख पटली आहे. मृत महिला नायगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि पतीच्या भावाला अटक केली आहे. महिलेचा पती नट्टू सिंग आणि त्याचा भाऊ चुनचुन सिंग हे मूळचे नेपाळचे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, आज पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करणार आहेत.

बॅगेत शिर नसलेला महिलेचा मृतदेह, हातावर त्रिशूल अन् ओमचा टॅटू; भाईंदरमध्ये खळबळ
शुक्रवारी सकाळी मच्छीमार समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांना एक प्रवासी बॅग पाण्यात तरंगताना दिसली. ती बॅग पाहिल्यानंतर त्यांना थोडासा संशय आल्याचे मच्छिमारांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी बॅग उघडली असता त्यात एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला. हे पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.

सुरुवातीला या महिलेचे शिर नसल्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. मात्र, नंतर पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महिलेचे हात, पाय बांधून मृतदेह ट्रॅव्हल बॅगेत टाकला होता आणि नंतर बॅग फेकली होती.

सुरक्षा कवच शिवाय धावली ट्रेन! ओडिशातील भयावह रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक अपडेट समोर

Odisha Train Tragedy: Rupali Ganguly, Renuka Shahane and other TV celebs express their grief and shock

0

At least 238 people were killed and another 900 were injured in a catastrophic three-train crash in Odisha’s Balasore, the country’s bloodiest rail catastrophe in more than 20 years.
According to sources, Prime Minister Narendra Modi would visit the train disaster scene and meet with injured victims at hospitals in Cuttack. In addition, he convened a high-level conference with railway officials. The Bengaluru-Howrah Superfast Express, the Shalimar-Chennai Central Coromandel Express, and a cargo train were all involved in the disaster. The tragedy shook the whole nation.
TV celebs like Rupali Ganguly, Arjun Bijlani and others have reacted to the sad news. Rupali took to her Instagram story and shared, “Waking up to such horrific and heartbreaking news, my heart goes out to all the families who lost their loved ones in the #OdishaTrainAccident and I pray for a very speedy recovery for all those who are injured.”

rupali

Arjun Bijlani and Sanaya Irani expressed their heartfelt condolences to the families that got affected by the tragedy. Arjun also tweeted, “Deeply saddened to hear about the #OdishaTrainTragedy. Sending heartfelt prayers to the injured for a speedy recovery & wishing strength to the families of those who lost their lives. May God give them the courage to bear this irreparable loss.”
Dipika Chikhlia wrote, “Deeply sad, may the injured have a speedy recovery and the deceased rest in peace.”

reactions
reaction

Nikki Tamboli expressed grief, “It is very heartbreaking & sad to know that an unfortunate accident took away the most special one from your life. I pray to God to give you all the strength to conquer these painful times. May God rest the souls of the deceased in peace, Protect n give strength to the families.”
Renuka Shahane wrote, “What a terrible tragedy! Condolences to the families of those who’ve lost their lives in the horrific train accident at Balasore. Prayers for the speedy recovery of the injured”
Delnaaz Irani also reacted, “So heartbreaking to read this news, devastating! May the one injured recover soon, praying for everyone! #TrainAccidentInOdisha”
Fahmaan Khan also wrote, “Completely disheartened, #OdishaTrainAccident my deepest condolences to the diseased and their families. Wish something like this doesn’t happen ever. “
Rohit Bose Roy tweeted, “Prayers It’s just so sad that even in today’s technologically advanced world, accidents like this take place… #CoromandelExpressAccident”

WTC Final: I don’t want to think about my past, I just want to start afresh, says Ajinkya Rahane | Cricket News

0

NEW DELHI: Ajinkya Rahane is back in the Indian cricket team after nearly 18 months and doesn’t want to have any regrets for the time lost and wants to carry the positive and aggressive mindset he had during the IPL into the World Test Championship final against Australia.
Rahane’s experience and skills will be valuable for India in the highly-anticipated World Test Championship final. His ability to absorb pressure, play long innings, and contribute significantly to the team’s success make him a vital member of the batting line-up.

1/11

The turnaround in Ajinkya Rahane’s career

Show Captions

“Coming back after 18-19 months, whatever has happened, good or bad, I don’t want to think about my past. I just want to start afresh and keep doing whatever I have been doing,” Rahane told BCCI.TV on the sidelines of India’s training session at Arundel in Portsmouth.
“Personally enjoyed playing for CSK as I have been batting well throughout the season, even before IPL. I had a very good domestic season and I felt good. So this comeback was a bit emotional for me.”

Rahane, who was a part of CSK’s fifth IPL title-winning side, has already received a lot of praise for his attacking batting and improved strike-rate in T20 cricket, and especially the 27-ball 61 against Mumbai Indians showed a shift in his intent.
“I want to bat with the same mindset and show same intent that I showed before coming here in IPL and Ranji Trophy. I would not like to think about format whether it is T20 or Tests. The way I am batting now, I don’t want to complicate things and the more I keep it simple, better it is for me,” the veteran of 82 Tests and 4,931 runs said.
Rahane played a crucial role in leading the Indian cricket team to a historic Test series victory in Australia during the 2020-2021 Border-Gavaskar Trophy. Rahane’s captaincy was widely praised as he stepped in for regular captain Virat Kohli and guided the team to a remarkable comeback after losing the first Test.

1/11

WTC Final: India and Australia records at The Oval

Show Captions

Rahane praised Rohit Sharma for his leadership during the World Test Championship (WTC) cycle.
“I thought culture in team now is really good. Rohit is handling the team really well and I am sure Rahul bhai is also handling the team really well. That helps as well and atmosphere is really good. Whatever I am seeing right now is that everyone is enjoying each other’s company,” he said.
Rahane thanked his family and friends for the support he got during his time away from the national team.
“It was (an) emotional moment for me. When I got dropped, the support I got from my family was massive and dream was to play for India and that was massive. Playing for India matters a lot for me and I worked hard on my fitness and went back to domestic cricket.”
“Thanks to BCCI and selectors and when I went back to domestic cricket, the goal was to play for India — be it Ranji Trophy and Syed Mushtaq Ali Trophy or practice session, for me, every day that I was waking up, it was all about thinking that I can play for India again.

1/11

WTC Final: Acid test for Shubman Gill

Show Captions

“What made my comeback possible was enjoying each and every moment, be it success or failure, and having no regrets. Learning from every individual in Mumbai Ranji team. You have to grow as a cricketer every single day, learning process shouldn’t stop,” he said.
Playing in England is challenging, feels Rahane, who had scored a match-winning hundred in a Test match at Lord’s back in 2014.
“It’s all about mindset and reading the situation well, staying in (the) moment and playing it session by session. In England, you just don’t look at the pitch but also keep an eye on the weather. In England, you never feel that you are in even if you are batting on 70,” he said.
(With PTI inputs)

Gold Hallmarking Rule For Buying and Selling of Jewellery Items; सोने खरेदी-विक्रीच्या नव्या नियमांनंतर आता विक्री तरी कशी करणार, जाणून घ्या डिटेल्स

0

नवी दिल्ली : आपल्या देशात सोन्याच्या खरेदीला फक्त शोभेसाठी नाही, तर आर्थिक अडचणीच्या काळात साथीदार म्हणून जास्त प्राधान्य दिले जाते. सण-उत्सव असो किंवा लग्नसराई सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. वर्षानुवर्षे सोने पिढ्यानपिढ्या साठवले जाते. अशा स्थितीत आता आपण तिजोरीत ठेवलेल्या सोन्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. १ जून २०२३ पासून सोने खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. पण तरीही अनेकांना या नियमांची माहिती अद्यापही नाही. सोन्याशी संबंधित नवीन नियम जाणून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते, म्हणूनच ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सोने खरेदीचे नियम बदलले
सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करताना नेहमी त्याच्या शुध्दतेबाबत मनात नेहमी प्रश्न उपस्थित होतो. खरेदीदारांची ही चिंता लक्षात घेऊन हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. यापूर्वी चार अंकी हॉलमार्क अनिवार्य होता, जो १ एप्रिल २०२३ पासून ६-अंकी HUID क्रमांकावर बदलला गेला आहे. भारतीय मानक ब्युरोने (BIS) ६ अंकी शब्द आणि संख्यांच्या हॉलमार्कसह अद्वितीय ओळख क्रमांक (HUID) अनिवार्य केला असून याशिवाय कोणताही ज्वेलर सोन्याचे दागिने किंवा नाणी विकू शकणार नाही.

Rule Change June 1: नवीन महिन्यात नवीन बदल; सोन्याचे हॉलमार्किंग ते LPG गॅसची किंमत, आजपासून बदलले ‘हे’ नियम
HUID क्रमांकाशिवाय सोने विकल्यास कारवाई
BIS ने जुना चार अंकी हॉलमार्क बदलून ६ अंकी HUID अनिवार्य केले असून आता ६ अंकी HUID क्रमांकाशिवाय सोन्याचे दागिने किंवा नाणी विकणाऱ्या ज्वेलर्सवर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद आहे.

घरातील जुन्या दागिन्यांचं काय होणार?
सरकारच्या या नियम बदलानंतर आता घरातील तिजोरीत ठेवलेल्या जुन्या दागिन्यांचे काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? ज्या दागिन्यांमध्ये ६ अंकी HUID क्रमांक नाही त्यांचे काय होईल? तर लक्षात घ्या की आता या क्रमांकाशिवाय दागिने विकता येणार नाहीत. ज्या लोकांकडे जुने किंवा हॉलमार्क नसलेले दागिने आहेत त्यांच्याकडे आता दोनच पर्याय आहेत.

Gold Price Today: सोन्याची घसरगुंडी सुरुच! आज पुन्हा सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव
पहिला पर्याय म्हणजे BIS नोंदणीकृत ज्वेलर्सकडे जाऊन जुन्या दागिन्यांचे हॉलमार्क करून घेणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या दागिन्यांची BIS मान्यताप्राप्त असेईंग अँड हॉलमार्किंग सेंटरमध्ये चाचणी करून घेणे आणि तुमच्या दागिन्यांचे हॉलमार्क करून घेणे.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्याचा हॉलमार्कचा सर्वाधिक फायदा कुणाला?
सोन्याचे दागिने किंवा नाण्यांवरील हॉलमार्क नियमांचा फायदा ग्राहकांना होईल. हॉलमार्क दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचा (BIS) लोगो असतो, ज्यावर सोन्याचे दागिने किती कॅरेट आहेत याची माहिती दिली जाते. हॉलमार्क सोन्यावर BIS चिन्हही असते, जे सोन्याच्या शुद्धतेची हमी देते. कॅरेट आणि शुद्धतेनुसार हॉलमार्किंग सेंटरद्वारे त्यांना चिन्हांकित केले जाते.

सोन्याचे हॉलमार्किंग करण्यासाठी किती खर्च येईल?
जुन्या दागिन्यांची विक्री किंवा बदली करण्यासाठी आता सोन्याचे हॉलमार्किंग आवश्यक असून यासाठी तुम्हाला नाममात्र रक्कम खर्च करावा लागेल. तुम्हाला दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यासाठी ४५ रुपये खर्च करावा लागेल. BIS केंद्रात विविध मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सोन्याची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने विकायला किंवा बदली करायला जाल तेव्हा तुम्हाला प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

Odisha Train Accident Coromandel Express Derailed And Tragedy Starts; कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, इंजिन मालगाडीच्या डब्यावर, डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले ,बंगळुरु- हावडा एक्स्प्रेसची धडक अनं भीषण अपघात

0

बालासोर : ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्याती बहानगा गावाजवळ झालेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या अपघातात आतापर्यंतच्या माहितीनुसार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दोन एक्स्प्रेस आणि एक मालगाडी अपघातग्रस्त झाल्यानं हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. प्राथमिक माहितीनुसा हा अपघात बालासोर स्टेशन जवळील बहानगा बाजार स्टेशनच्या जवळ झाला. अपघाताच्या वेळी मालगाडी आउटर लाइनवर उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८४१ ही शालिमारहून चेन्नईला निघालेली होती. ही रेल्वे बहानगा बाजार स्टेशनच्या पूर्वी ३०० मीटरवर डिरेल झाली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचं इंजिन मालगाडीच्या डब्यावर गेलं होतं एक्स्प्रेसचे इतर डबे दुसऱ्या ट्रकवर गेले होते. त्याच ट्रॅकवरुन हावडा बंगळुरु एक्स्प्रेस १२८६४ निघाली होती. त्या एक्स्प्रेसची धडक कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना बसली.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार लागोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. एकापाठोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. यानंतर घटनास्थळी पाहिलं तर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरली होती.

कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघाताबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार कोरोमंडल एक्स्प्रेसचे कोच बी २ ते कोच ९ पलटले होते. तर ए १ आणि ए २ कोच ट्रॅकवर आडवे पडलेहोते. तर बी १ इंजिनसह रुळावरुन घसरलं होतं. कोच १ आणि जीएस कोच ट्रॅकवर होता. यामुळं मृतांमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसमधील मृतांची संख्या अधिक असू शकते.
Pankaja Munde : राज्याचं लक्ष लागलेली भेट झाली, पंकजा मुंडे एकनाथ खडसेंची बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं नुकसान

बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं १२८६४ देखील नुकसान झालं आहे. या एक्स्रप्रेसचा जनरलचा डबा दुर्घटनाग्रस्त झाला. तरस मागील बाजूनं जनरल सिटींग आणि दोन कोच रुळावरुन उतरले आणि पलटी झाले. कोच १ पासूनचे इंजिनपर्यंतचे इतर डबे रुळावर होते. या दुर्घटनेची चौकशी ए.एम. चौधरी (सीआरएस/एसई सर्कल) करणार आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Odisha Railway Accident :…तर २३८ जणांचा जीव वाचला असता; रेल्वे दुर्घटनेतील एक चूक आणि देशभरातील नागरिकांचा संताप
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर मधील पीयूष पोद्दार या अपघातातून बचावेल आहेत. ते कोरोमंडल एक्स्प्रेसमधून तामिळनाडूला निघाले होते. अपघाताबद्दल सांगताना ते म्हणतात की पहिल्यांदा आम्हाला धक्का बसला आणि आमचा डबा वळता दिसला. आमचा डबा रुळावरुन घसरत होता. आम्हाला एक धक्का बसला आणि आमच्यामधील काही जण डब्या बाहेर फेकलो गेलो. त्यावेळी आमच्या जवळपास चार ते पाच मृतदेह पडले होते, असं त्यांनी सांगितलं. तिथूनचं रांगत रांगत आम्ही बाहेर पडलो, असं पीयूष पोद्दार यांनी सांगितलं.

सुरक्षा कवच शिवाय धावली ट्रेन! ओडिशातील भयावह रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक अपडेट समोर

Latest posts