Saturday, April 1, 2023
Home Blog Page 3

sanyogitaraje chhatrapati, तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट – jitendra awad tweet in support of sanyogitaraj over ved mantra controversy nashik kalaram mandir temple

0

नाशिक : ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही, असं सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही खुलेआम सांगावे लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यांनी संगोयिताराजे छत्रपती यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या भावना व्यक्त करत भलीमोठी पोस्ट लिहिलीये.नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले, असं सांगतानाच या प्रकारानंतर पुजाऱ्याला झापल्याचंही संयोगिताराजेंनी सांगितलं. संयोगिताराजेंना वेदोक्त मंत्र पठण नाकारल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?

मी धर्माभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शुद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुराणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या. या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.

महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलंच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजाबाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकवलं. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट सनातम्यांनी रचला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.

पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहिले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. या देशाच्या घटनेत, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00 वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात….

sandipan thorat passes away, काँग्रेसकडून सलग सात वेळा खासदार राहिलेल्या संदिपान थोरात यांचे निधन – former congress mp sandipan thorat passes away at the age of 90

0

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार संदिपान थोरात यांचं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

संदिपान थोरात हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात. त्यांचे गांधी कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. संदिपान थोरात यांनी पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले ते १९७७, १९८०, १९८४, १९८९ , १९९१ , १९९६ आणि १९९८ असे सलग सात वेळा पंढरपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

संदिपान थोरात हे मुळचे माढा तालुक्यातील निमगाव येथील होते. त्यांनी माढा येथे जगदंबा सुतगिरणीची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. संदिपान थोरात हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
जनता पक्षाची लाट असतानाही संदीपान थोरात निवडून आले होते

सामान्य मातंग समाजातून आलेले आणि गांधी घराण्यावर एकनिष्ठ म्हणून ओळखले गेलेले संदीपान थोरात हे प्रतिष्ठित वकील होते. थोरात यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील निमगाव होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. १९७७ साली काँग्रेसच्या पडत्या काळात संदीपान थोरात यांना पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तेव्हा देशभर जनता पक्षाची लाट असतानाही थोरात हे निवडून आले होते. त्यानंतर सलग सातवेळा थोरात यांनी पंढरपूर मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावर त्यांची अढळ निष्ठा होती.

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… २९ उमेदवार अपात्र केल्यावर बंटी पाटील इरेला पेटले!
आठवलेंनी पंढरपूरमधून पाडल्यानंतर थोरात राजकारणापासून अलिप्त राहिले

१९९९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर त्याचवर्षी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. त्याकाळी पंढरपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा आठव्यांदा संदीपान थोरात यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यावेळी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांच्याकडून थोरात यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मात्र संदीपान थोरात राजकारणापासून दूर राहिले होते.

Indian, Romanian families found dead crossing into US from Canada

0

MONTREAL: Six people from two families — one of Romanian descent with Canadian passports, the other from India — were found dead in a marsh near the Canada-US border after trying to cross illegally into the United States, police said Friday.
Their bodies were found Thursday near a capsized boat belonging to a missing man from the Akwesasne Mohawk community, local deputy police chief Lee-Ann O’Brien told a news conference.

mohammed shami bowld devon conway, IPL 2023: शमीचा चेंडू आगीच्या गोळ्या सारखा आला अन् कॉन्वेची बोल्ड उडाली, पाहा व्हिडिओ – ipl 2023 csk vs gt mohammed shami bowld devon conway completes century of wickets in ipl

0

अहमदाबाद: आयपीएल २०२३ची पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरूवात सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी केली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने चेन्नईला पहिला धक्का दिला. गुजरातकडून तिसऱ्या ओव्हरमध्ये शमीने डेव्हॉन कॉन्वेची बोल्ड घेतली. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉन्वे बोल्ड झाला. शमीचा चेंडू इतका वेगवान होता की पीचवर पडला आणि थेट स्टंपचा वेध घेतला. डेव्हॉन कॉन्वेला चेंडू समझण्याआधीच त्याची विकेट पडली होती. कॉन्वेला ६ चेंडूत फक्त १ धावा करता आली. कॉन्वेच्या या विकेटसह मोहम्मद शमीने आयपीएलमधील १०० विकेटचा टप्पा पार केला. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये २ विकेट गमावत ५१ धावा केल्या.

IPLमधील महाविक्रम या वर्षी तरी मोडले जातील का? यादीत दोघा भारतीय खेळाडूंचा समावेश
काय झालं पॉवर प्लेमध्ये

हंगामातील पहिल्या मॅचच्या निकालाचा आणि विजेतेपदाचे काय कनेक्शन? जो ओपनिंग मॅच जिंकतो त्याचं…


– ऋतुराज गायकवाडने चेन्नईला धमाकेदार सुरुवात करुन दिली
– शमीने कॉन्वेला बाद करत आयपीएलमधील १०० विकेट पूर्ण केल्या
– जोशुआ लिटलने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावा दिल्या
– मोईन अलीकडून शमीची धुलाई, एका ओव्हरमध्ये १७ धावा केल्या
– राशिद खानने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोईन अली सारख्या धोकादायक खेळाडूची विकेट घेतली.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

पहिल्या सामन्याआधी चेन्नई संघाला टेन्शन होते ते कर्णधार महेंद्र सिंह धोनी खेळणार की नाही याचे, मात्र धोनी टॉससाठी आला आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. धोनीने संघात ऋतुराज गायकवाड आणि राज्यवर्धन हंगरगेकर या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंना अंतिम ११ मध्ये स्थान दिले. राज्यवर्धन हा तुळजापूरचा आहे तर ऋतुराज पुण्याचा आहे. वयाच्या २१व्या वर्षी चेन्नईकडून राज्यवर्धनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. चेन्नईकडून पदार्पण करणारा तो चौथ्या क्रमांकाचा युवा खेळाडू आहे.

चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघात गेल्या हंगामात दोन लढती झाल्या होत्या. या दोन्ही लढतीत चेन्नईचा पराभव झाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

A school boy died, खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू – in jalgaon a school boy has unfortunately died after the protective wall of the school collapsed on him

0

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असतांना संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ वर्षे, राहणार- वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. सायंकाळपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. नशिराबाद गावातील वरची आळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्याकारणामुळे तो घरी होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला असता, अचानक शाळेची संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.

साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई; तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना दापोली पोलिसांकडून अटक
कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम करण्यात आले आहे. काही कारणास्तव ते काम अपूर्ण राहिले आहे, ते काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराने भिंतीचे काम हे चांगल्या दर्जाचे केलेले नसल्यामुळे ती आज अचाकन कोसळली. यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला आहे. तसेच संबंधित ठेकेदार तसेच जिल्हा परिषद शाळा प्रशासनावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत कारवाई होवून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्राही मयत मोहित याचे कुटुंबीय तसेच नातेवाईकांनी घेतला आहे. कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सायंकाळी मोहित याचा मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला नाही.

मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर, राज्यातील ही पहिलीच मदत
दुर्देवी घटनेत मुलाच्या मृत्यूमूळे नशीराबाद गाव सुन्न

मयत मोहित याच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई, वडील योगेश नारखेडे असा परिवार आहे. मोहित याचे वडील योगेश नारखेडे हे नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. दरम्यान दुर्देवी घटनेत मुलाच्या मृत्यूमूळे नशीराबाद गाव सुन्न झाले आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य लालचंद पाटील यांनीही जिल्हा रुग्णालयात मयताच्या कुटुंबीयांची भेट घेत सात्वंन केलं. तसेच याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

दुर्दैवी! ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला
याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे

Impact Player Rule: IPL 2023: Having an impact player is a luxury, says MS Dhoni | Cricket News

0

NEW DELHI: Chennai Super Kings skipper Mahendra Singh Dhoni on Friday feels that having an impact player is a luxury for the team. According to the ace captain, the new rule makes decision making easier.
Under the newly-introduced ‘Impact Player’ rule, a batter or bowler can be replaced in the middle of the game as per the match situation, to make it more exciting.
“It’s a luxury to have (impact players). It becomes slightly easy to take the decision because you can use it at any time,” Dhoni said at the toss for the tournament opener between CSK and Gujarat Titans.
But the World Cup-winning captain feels the rule will reduce the role of an all-rounder in the team.
“Influence of all-rounders has become slightly less because of the rule,” Dhoni added.

What the IPL's new and exciting Impact Player rule is all about

06:00

What the IPL’s new and exciting Impact Player rule is all about

(With inputs from PTI)

rajaram sugar mill election kolhapur, थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… २९ उमेदवार अपात्र केल्यावर बंटी पाटील इरेला पेटले! – kolhapur rajaram sugar mill election after disqualifying 29 candidates, mla satej patil submitted their eligibility documents

0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पोटनियमाचे कारण पुढे करत २९ उमेदवारांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्या पात्रतेचे सव्वा लाखावर कागदपत्रे आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी प्रादेशिक साखर संचालकांकडे सादर केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नियमित ऊस घातला नाही असे कारण सांगत आमदार पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे पाटील व महाडिक गटातील संघर्ष वाढला आहे. महाडिक घाबरले म्ह्णून त्यांनी प्रशासनावर दबाव आणत हा निर्णय घ्यायला लावला असा आरोप पाटील यांनी केला होता. मागून लढण्यापेक्षा मैदानात येऊन लढा असे आव्हानही त्यांनी दिले. त्यानंतर महाडिक यांनीही त्यांना प्रतिआव्हान दिले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार पाटील आपल्या समर्थकासह प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात आले. २९ उमेदवारांच्या पात्रतेचे पुरावेच त्यांनी सादर केले. दोन वाहनातून त्यांनी सव्वा लाख पुरावे आणले होते. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तीन एप्रिलपर्यंत अपील करण्याची मुदत असल्याने त्यानंतर संबंधितांना नोटीसा काढून चौकशी करण्याचे आश्वासन साखर सहसंचालक अशोक गाढे यांनी सांगितले.

कारखान्याच्या या निवडणुकीत १२ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. प्रादेशिक सह संचालकांना दहा दिवसात आपला निर्णय द्यावा लागणार आहे. त्यांनी जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. यामुळे या निवडणुकीत आता प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

यापूर्वी त्यांनी अठराशेवर सभासद कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यावरही पाटील यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर सध्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराला जोर आला असताना प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या निर्णयाने चुरस वाढत चालली आहे.

मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील मागे हटणार नाही, माझ्याकडे एक्का, डाव आम्हीच जिंकणार, बंटी पाटलांनी ललकारलं
२९ उमेदवारांना अपात्र ठरवलं, सतेज पाटलांनी जोरदार भाषण ठोकलं

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिकांनी रडीचा डाव खेळलाय. त्यांनी जोकर टाकलाय, एक्का माझ्याकडे आहे. आता तुमची पाठ सोडत नसतो. तुमच्या सत्ताकाळात एवढा जर तुम्ही चांगला कारभार केला होता तर १२ हजार सदस्यांना का घाबरलात? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता? जर तुमची एवढीच ताकद होती, एवढीच जर खुमखुमी होती तर मैदानातून पळ का काढलात?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत १४ तास राबणार होतो पण आता झोपणारच नाही, असा निर्धार करुन महाडिकांविरोधातील लढाई तीव्र केल्याची घोषणाच आमदार बंटी पाटलांनी केली.

मग्रुरी सहन करणार नाही, हा DY पाटील कारखाना वाटला काय? रणांगणात या, मग बघतो : अमल महाडिक
लोकांत जाऊन निवडणूक जिंकू शकत नाही हे कळाल्यामुळेच महाडिक यांच्याकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा, सभासदांना निर्णय घेऊ दे, कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखी लढा. आता तुम्ही रडीचा डाव खेळलाय. हा बावड्याचा पाटील कधीही मागे हटणार नाही. ज्या गावात जाईन, तिथेच वळकट घेऊन जाणार, सकाळी उठून प्रचाराला लागणार, असं आव्हानच सतेज पाटलांनी महाडिकांना दिलं.

Gauahar Khan calls Justin Bieber and Hailey’s opinion on fasting ‘dumb’; asks them to ‘get an education’

0

Bigg Boss fame Gauahar Khan has reacted to Canadian singer Justin Bieber and his wife Hailey’s viral video on ‘fasting‘.
In the video, Justin shares that he has never really fasted for spiritual reasons. “I think our bodies need nutrition to think properly,” he says.
To this Hailey adds, “I believe in fasting off things. Like I think if you want to fast off the TV or fast off with your phone, I believe it more than I think fasting off with food. It’s never really made sense to me, to be honest.”
Justin continues, “When you fast food, you deprive your body of nutrition.” Hailey cuts him, “Or if you are fasting off sweets or sugar.” The singer says, “Fasting off something that is not going to deprive your body of food.”

Since it is the month of Ramadan, Gauahar Khan reacted sharply to the video and said that Justin and Hailey need to ‘get an education’ to understand the health benefits of fasting.
Sharing a screenshot of their clipping, Gauahar wrote, “Just proves how dumb they are, only if they knew about the science behind it. And the health benefits from it! Get an education @justinbieber @haileybieber.”
She added, “It’s okay to have an opinion, BTW! But be intelligent enough to put forth correctly.”

Gauahar Khan

This year Gauahar is not fasting in the month of Ramzan. The actress is expecting her first child.
In fact she was recently asked by a follower if she is keeping rozas and she replied, “Pregnant ladies, sick people and travelling humans are exempted from observing Rozas. You can feed the needy Rozedaars instead! Subhan Allah.”

ancient idols found, JCBनं खोदकाम सुरू, अख्खं गाव जमलं; अचानक जयघोष सुरू, साऱ्यांनी हाती जोडले अन् मग… – three ancient idols found in akola while digging

0

अकोला: जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथे खोदकामात प्राचीन तीन दुर्मिळ मूर्ती सापडली आहे. रामेश्वर इंगोले यांच्या घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्टनेमी यांच्यासह आणखी दोन मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींचं विधीवत पूजन करण्यात आलं असून या मूर्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील माना हे गाव जवळपास २० हजार लोकसंख्येचं आहे. माना हे गाव पुरातन काळात मणिपूर या नावानं ओळखलं जायचं. आज (३१ मार्च) माना गावात जेसीबीनं खोदकाम सुरू केलं आणि काही तासांत पाच फूट जमिनीत दगडाच्या मूर्ती सापडल्या. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ यांची ही मूर्ती असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राम मंदिरात ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात पुरातन विभागाला कळवण्यात आल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी दिली आहे. सापडलेल्या मूर्ती तब्बल ३ हजार वर्षांपूर्वीची असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
लग्नानंतर ३ महिन्यांनी माहेरी गेलेल्या तरुणीनं आयुष्य संपवलं; विरहात पतीचं टोकाचं पाऊल
माना गाव पुरातनकाळी मणिपूर नावानं ओळखलं जायचं. या गावावर बब्रुवानाचं राज्य होतं. बब्रुवानानं युद्ध केल्यानंतर संपूर्ण गाव पलटी केलं होतं, अशा पुरातन काळातील दंतकथा आहेत. तेव्हापासून मानागावात सापडलेल्या स्थितीत उलट्या स्थितीत सापडल्या आहेत. १४ मार्च १९८६ रोजी माना येथील याच जागेवर खोदकाम करताना जैन धर्माच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्या मूर्ती आजही नागपूरातील संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
अनोळखी तरुणीचा VIDEO कॉल, पुणेकर आजोबांशी गुलूगुलू बोलली; कपडे काढायला लावले अन् मग…
माना येथील रमेश इंगोले यांच्या आजोबांनी आपल्या नातवाला आपल्या घराच्या खाली प्राचीन मूर्ती दबून असल्याचं एकेकाळी सांगितलं होतं. नातवाने ही चर्चा आपल्या मित्रांसोबत केली. त्यानंतर याचा सुगावा जैन समाजाच्या लोकांना लागला. मग जैन समाजातील लोक हे मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्यापर्यंत पोहोचले. सर्व हकीकत आमदारांसमोर ठेवली. आमदारांनी पोलीस यंत्रणेसह माना इथे जेसीबीनं खोदकाम सुरू केले. खोदकामात दगडाची ३ मूर्ती सापडली. जैन धर्माचे बाविसावे तीर्थंकर नेमीनाथ म्हणजेच अरिष्टनेमी यांच्यासह अन्य दोन मूर्ती सापडली आहे. अजूनही या ठिकाणी खोदकाम सुरू आहे.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांनी ज्या ठिकाणी ३ मूर्ती आढळून आल्या, तिथे जैन मंदिर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच या जागेवर जी घरं आहेत, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना इतर ठिकाणी घरं बांधून देण्याचा शब्दही दिला आहे.

If I start thinking about the outcome, I won’t be able to attempt anything new: Vishal Aditya Singh on hosting Bhojpuri IPL

0

Vishal Aditya Singh believes in pushing the envelope and exploring new opportunities. The actor, who is best remembered for his participation in Bigg Boss 13 and Fear Factor: Khatron Ke Khiladi 11, will host segments before, in between matches, and after the end of every match of IPL 2023 in Bhojpuri. Sharing his excitement over the opportunity, he says, “I was approached two months ago to host the Bhojpuri version. I can’t say no to anything to do with Bhojpuri, IPL, and cricket. Besides, I have always wanted to do something different. I represented Bihar when I was playing for the under-17 cricket team. It is a great opportunity to put my knowledge and experience to use. Also, the young generation should know about their roots and culture. This is the right time to do something in my language.”
The cricket buff believes in observing and learning. He says that he wasn’t nervous when he was approached with the offer. He shares, “I am always excited about attempting something new. I may make mistakes, but I am never nervous or anxious. As a human, I am bound to make mistakes but, in the process, I will learn, too and that surpasses everything else. Hosting requires me to be spontaneous and look organic. One doesn’t get to prepare because what you speak depends on the match, which can go either way. I look forward to attempting something that I haven’t done before.”
While he is willing to learn from his mistakes, social media isn’t too forgiving given that netizens watch everything hawk-eyed. “Insaan galtiyon ka putla hota hai and we have made social media. Some get affected by unwanted criticism, but I don’t. I will apologise for the mistakes I made. If I start thinking about the outcome, I won’t be able to attempt anything new. I aim to set a benchmark for those who will follow,” he says.

Latest posts