Sunday, June 4, 2023
Home Blog Page 4

Shehnaaz Gill tells BK Shivani about feeling guilty of having non-veg food for health reasons; says, “I was crying from inside, I thought it would save me”

0

Brahma Kumari BK Shivani was recently invited to appear on Shehnaaz Gill‘s show Desi Vibes. Shehnaaz spoke on the show about being asked to consume non-vegetarian food for medical reasons, as they discussed forgiveness, coping with despair, and the difference between consuming vegetarian and non-vegetarian food.

Shehnaaz explained why she had to eat non-vegetarian food: “I had a C3C5 problem and I couldn’t move my neck. My neck was tense. Because I was a vegetarian, the doctor encouraged me to begin eating non-veg. He advised me to eat non-vegetarian foods until I recovered. I had to consume that soup for a long time, and I was crying on the inside.”
BK Shivani responded to Shehnaaz, said, “Today, people in the West also say- You are what you eat. Non-veg implies pain vibration. Even if we talk about karma, if someone needs to die for us merely to acquire that taste or even for health benefits, it is not healthy for us, both karma-wise and vibrationally. It is the dying energy. A vegetarian diet contains a lot of proteins; find the source of those proteins and return to eating vegetarian.”
Shehnaaz further replied, “I have gone back to eating vegetarian, but I was sad because I had to go back to eating non-veg food. I can do anything for my health and I thought it would save me.”
Shehnaaz has been associated with Brahma Kumari, after Sidharth Shukla‘s demise she has been attending all the major events at the organisation with Sidharth’s mother.

Sharad Pawar Statement on Nanded Akshay Bhalerao Murder case; नांदेड खून प्रकरणातील आरोपींना त्यांची जागा दाखवा : शरद पवार

0

पुणे : नांदेडच्या बोंढार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेरावच्या खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. गावात भीम जयंती कशी काय साजरी केली? असा प्रश्न विचारुन आणि त्याचा राग मनात ठेऊन गावातील सवर्णांनी अक्षयची हत्या केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. अक्षय भालेराव खून प्रकरणातील ९ आरोपींवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. दोन आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या खून प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आरोपींना त्यांची जागा दाखवा, असं म्हटलं.

अक्षय भालेराव खून प्रकरणातील अटक असलेल्या सात आरोपींना न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातीदरम्यान झालेल्या वादात २४ वर्षीय अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन ९ आरोपी विरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरातीत नाचण्यावरून दोन गटात वाद, दलित तरुणाची हत्या, ॲट्रॉसिटीचा दणका, ७ जण जेलमध्ये
शरद पवार काय म्हणाले?

नांदेडची घटना अत्यंत निंदनीय आहे. ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, असं सांगतानाच राज्य सरकारने या घटनेच्या खोलात जाऊन जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवावी. सरकारने या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं शरद पवार म्हणाले.

घटना नेमकी काय?

बोंढार हवेली गावात आंबेडकर जयंती कशी काय साजरी केली? यावरुन अक्षयचा खून झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तर लग्नाच्या वरातीत दोन गटात वाद होऊन त्यात अक्षयचा खून झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

नांदडच्या तरुणाची हत्या कशी झाली? कुटुंबियांचा आरोप काय? पोलिसांचा FIR जसाच्या तसा…
आंबेडकर जयंती साजरी केल्यावरुन गावातील सवर्ण समाजाचा अक्षयवर राग होता. लग्नाच्या वरातीवेळीच अक्षय किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता. त्यावेळी वरातीत नाचणाऱ्या सवर्ण समाजातील मुलांनी अक्षयला जातिवाचक शिवीगाळ केली आणि तिथेच अक्षयचा निर्घृण खून केला. यावेळी त्यांनी बौद्ध वस्तीवरही हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली, असा आरोप अक्षयच्या कुटुंबियांनी केलाय. तशी तक्रार त्यांनी नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात दिली आहे.

Crime News Boyfriend Killed Girlfriend By Stabbing Screw Driver 51 Times Love Story Chhattisgarh; स्क्रू ड्रायव्हरने छातीत ३४, पाठीत १६ वार, प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट

0

रायपूर: प्रेमात लोक वेडे होतात. कधीकधी हा वेडेपणा या थराला जाऊन पोहोचतो की त्यातून भयंकर गुन्हे घडतात. प्रेमासाठी कधी लोक इतरांना खून करतात, तर कधी ज्याच्यावर प्रेम करतात त्याचाही खून करायला मागेपुढे पाहत नाही. कोरबा येथील नीलम कुसुम पन्ना यांचीही अशीच कहाणी आहे. कुसुमचा एकेकाळचा मित्र असलेला शाहबाज तिच्याच जीवाचा शत्रू झाला. शाहबाजने नीलमवर स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार वस्तूने तब्बल ५१ वार केले आणि तिची हत्या केली.

शाहबाज हा बस वाहक म्हणून काम करायचा. यादरम्यान त्याची कोरबा येथील सीएसईबी पोलीस स्टेशन हद्दीतील पंप कॉलनीत राहणाऱ्या नीलम कुसुमशी मैत्री झाली. शाहबाज नोकरीसाठी गुजरातला गेला होता. यादरम्यान, कुसुम आणि शाहबाज यांच्यात दुरावा निर्माण झाला. काही काळाने या दोघांमध्ये पुन्हा संवाद सुरु झाला. काही काळाने शाहबाजला कुसुमवर शंका येऊ लागली.

जमिनीतून रहस्यमयी आवाज येतो, का, कसा, कुठून? कळेना; लोकांमध्ये घबराट, तज्ज्ञांना टेन्शन
गेल्या वर्षी ख्रिसमसच्या एक दिवसापूर्वी शाहबाज गुजरातहून कोरब्याला आला. मग तो थेट कुसुमच्या घरी पोहोचला. तिथे नाताळची तयारी सुरू होती. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. कुसुम आणि शाहबाज यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर शाहबाजने कुसुमवर स्क्रू ड्रायव्हर आणि धारदार हत्याराने वार केले. कुसुमच्या छातीवर ३४ तर पाठीवर १६ वार करुन तो घटनास्थळावरून पळून गेला.

कुसुमचा ओढा हा ख्रिश्चन धर्माकडे होता आणि शाहबाज मुस्लिम असल्याने या प्रकरणाला लव्ह जिहादचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न झाला. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडल्यावर सर्व बाबी समोर आल्या. शाहबाज गुजरातहून विमानाने छत्तीसगडला पोहोचला होता. कुसुमच्या खोलीतून विमानाचे तिकीट मिळाल्याने या प्रकरणाचं गूढ उकललं.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये दररोज तीन खून आणि तीन बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात आहेत. २०२१ मध्ये राज्यात खुनाचे १०५७ आणि बलात्काराचे १०९३ गुन्हे दाखल झाले आहेत. जुन्या आकडेवारीशी तुलना करता, २०१८ मध्ये, राज्य बलात्काराच्या बाबतीत देशात पाचव्या स्थानावर होते आणि २०२१ मध्ये ते ११ व्या स्थानावर आले होते, अपहरण आणि दरोडेखोरीच्या बाबतीत परिस्थिती सुधारली आहे.

Jalna News: गावकऱ्यांना शंका, पाहिलं तर अख्खा रस्ता हातात आला, जालन्यातील त्या रस्त्याची Inside Story

Ahmednagar Shirdi Illegal Smuggling Of Gutkha In Container; कंटेनरमध्ये गोण्याच गोण्या, बेसन आणि सोयाबीनमागे पाहताच पोलिस चक्रावले

0

अहमदनगर : सध्या देशात अंमली पदार्थाच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतेच इंदौरमधून गुटखा तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. इंदौरहून कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनच्या गोण्यांच्या मागे बेकायदा गुटख्याच्या शेकडो गोण्या भरून पुण्याच्या दिशेने जात होत्या. या कंटेनरला कोपरगाव तालुका पोलिसांनी तालुक्यातील येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावरून ताब्यात घेतलं आहे. या कंटेनरमध्ये गुटख्याच्या लाखो रुपये किंमतीच्या शेकडो गोण्या आढळून आल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडून ५० लाखांचा गुटखा आणि कंटेनरसह कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, एक कंटेनर सोयाबीन आणि बेसन पीठाच्या गोण्यांच्या मागे अवैध पद्धतीने महाराष्ट्र राज्यात कायद्याने बंदी असलेल्या गुटख्याच्या गोण्या भरून वाहतूक होत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या फौजफाट्यासह येसगाव शहरात पोहोचले. त्यांनी चालत्या कंटेनरला अडवून खात्री केली असता त्यामध्ये गुटख्याच्या शेकडो गोण्या आणि बॉक्स मिळून आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कंटेनरमधून सर्व गोण्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यानंतर चालक जमील अहमद इद्रिस अहमद राहणार हरियाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खतरनाक! महिला शिक्षण अधिकारी लाच घेताना रंगेहाथ, घरात सापडली ८५ लाखांची रोकड, ३२ तोळं सोनं
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कूसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, रशीद शेख, जयदीप गवारे, पोना रामा साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मस्के, प्रकाश नवाली युवराज खुळे आदींनी केली आहे.

चादरीसारखा फोल्ड होणारा रस्ता, केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकाकडून पाहणी, सत्य समोर येणार?

Jalna Hast Pokhari And Karjat Road Scam; चादरीसारखा फोल्ड होणारा रस्ता, केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकाकडून पाहणी, सत्य समोर येणार?

0

जालना : जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील हस्तपोखरी कर्जत या १० किलोमीटर रोडच्या डांबरीकरणाचं काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलं आहे. या रोडच्या कामात कंत्राटदाराने डांबरीकरणाच्या नावाखाली चक्क लांबच लांब प्लास्टिक पेपरचा वापर केला. आणि त्यावर डांबरीकरण केलं. यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हे बोगस काम सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

रस्त्याच्या बोगस कामाची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः रस्ता हाताने चादरी सारखा उचलून त्याखाली आसलेला प्लास्टिक पेपर उघड करून दाखला. आणि रस्त्याच्या डांबरीकरणातील बोगस काम गावकऱ्यांनी समोल आणलं. त्यानंतर नागरिकांनी या संपूर्ण कामाची चौकशी करून सदरील कंत्राटदारावर अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Jalna News: गावकऱ्यांना शंका, पाहिलं तर अख्खा रस्ता हातात आला, जालन्यातील त्या रस्त्याची Inside Story
अखेर या बातमीची दखल केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पथकानं कर्जत हस्तपोखरी रस्त्याची पाहणी केली. त्यामुळे या पाहणीतून काय निष्कर्ष समोर येतो याकडे आता सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. या रस्त्यात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. आम्ही सदरील कामाच्या दर्जाची तपासणी करत आहोत. आमची तपासणी पूर्ण झाल्यावरच यावर निष्कर्ष देता येईल. सध्या यावर बोलणं योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया पथकातील सदस्य राकेश कुमार यांनी दिली.

जालन्यातील कंत्राटदारांचा भोंगळ कारभार; रस्त्यावर पॉलिथीन अंथरूण डांबरीकरण, ग्रामस्थांकडून पोलखोल!

दरम्यान, या रस्त्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला विषयावर विचारण्यात आलं. या कामाचे कंत्राटदार खुषालसिंग राणा ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आला आहे. सदरील रस्त्याचे काम आम्ही नव्या नियमांनुसार करत आहोत. त्यानुसार रस्त्यावर एक म्याटिंग पसरवली जाते. त्यानंतर त्यावर रस्त्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य पसरवलं जातं. त्यावर टाकण्यात असलेला माल सेट होण्यासाठी कमीत मामी ३/४ तास लागतात. परंतु काही लोकांनी रोडवरील माल सेट होण्याआधीच तो उकरून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आम्ही उच्च गुणवत्तेच्या निकषांवर रस्त्याचं काम करत आहोत. जे की सर्व चाचण्यामध्ये पास झालेलं आहे, असा दावा राणा ठाकूर याने केला.
Bike Accident : नुकतंच लग्न झालेलं, पतीसोबत प्रवासासाठी निघाली पण अनर्थ.. ट्रेलरची धडक अन् नवविवाहिता ठार
आम्ही रोड बनवण्याचे साहित्य रोडवर पसरवले, त्यावेळी त्याचे तापमान १६५ अंश इतके होते. शिवाय बाहेरील तापमानही जास्त होते. त्यामुळे ते साहित्य लवकर सेट झालेले नव्हते. त्यामुळे आम्ही खराब प्रतीचा माल वापरतो असं लोकांना वाटलं. आम्ही आमच्याकडून तांत्रिक रित्या काहीच चूक केलेली नाही. उलट या रस्त्याची ५ वर्षांपर्यंत देखभालीची जबाबदारी आमची आहे. तर मग मी खराब मटेरियल का वापरू? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकाचा काय निष्कर्ष निघतो हे बघणं गरजेचं आहे.

Rafael Nadal’s season cut short as surgery rules him out for five months | Tennis News

0

Rafael Nadal‘s hopes for the current season have been dashed as he recently underwent surgery on a hip muscle, forcing him to be out of action for an estimated five months, according to his representative on Saturday.
The 14-time French Open champion and winner of 22 Grand Slam titles has been sidelined since January when he injured his hip flexor during his second-round match at the Australian Open.
Nadal’s representative, Benito Perez-Barbadillo, stated, “Rafa will begin his progressive functional rehabilitation in a few hours, and the normal recovery process is estimated at five months, always taking into account respecting the biological times of said structure.”
The 37-year-old Spaniard previously indicated that 2024 is likely to be his final year as a professional player.

nadal

Initially expected to miss up to eight weeks, Nadal decided to skip clay court tournaments in Madrid and Rome to focus on regaining his fitness after being ruled out of events at Indian Wells, Miami, Monte Carlo, and Barcelona this season.
In March, Nadal slipped out of the top 10 in the world rankings for the first time since 2005 and is currently ranked 15th. This setback further hampers his chances of reclaiming his position among the top-ranked players.
With his season effectively cut short, Nadal faces a challenging road to recovery as he undergoes rehabilitation for his hip injury. Fans and tennis enthusiasts will eagerly await his return to the court, hoping to witness more of his unparalleled skills and determination in the future.
(With inputs from Reuters)

Nashik crime news today ACB Police arrested lady education officer Sunita Dhangar in bribe case found 85 lakh cash 32 tola gold at home; नाशिक महापालिका महिला शिक्षण अधिकारी सुनिता धनगर लाच घेताना रंगेहाथ, घरात सापडली ८५ लाखांची रोकड, ३२ तोळं सोनं

0

नाशिक : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या घरातील झाडाझडती घेतली असता तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं मिळाले, तर एनसीबीला काही मालमत्तांची कागदपत्रे देखील सापडली आहेत.

एवढी रक्कम पाहून खुद्द एसीबीचे अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये ही सर्वात जास्त रक्कम आढळून आल्याचे एसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

काल महापालिका शिक्षण विभाग अधिकारी सुनीता धनगर आणि शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. सस्पेंड मुख्याध्यापकास कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी महापालिका शिक्षण विभागातील अधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी यांनी ५० हजारांची लाच मागितली होती.

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय
तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एका प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार, तर धनगर ४५ हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले आहे.

समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी मागितल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे

सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली आहे. प्लॉट आडगाव येथे, एक फ्लॅट टिळकवाडी, तर दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे असल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढेंची महिन्याभरातच पुन्हा बदली, वीस IAS अधिकाऱ्यांची ट्रान्सफर
पालिका शिक्षण अधिकारी असूनही त्यांनी एवढे घबाड जमा केल्याने पथकही अचंबित झाले आहेत. सुनिता धनगर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे.

Dharashiv News, भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार – 7 passengers were seriously injured and 23 passengers sustained minor injuries in the st bus accident on paranda barshi route

0

धाराशिव : परांडा शहराजवळ आज सकाळी एसटी बसला अपघात होऊन ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर २३ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना परांडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. ही बस उलटल्याने हा अपघात झाला.

या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परांडा आगाराची एमएच २० बीएल २१९२ क्रमांकाची परांडा – बार्शी धाराशिव ही बस सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४३ प्रवासी प्रवास करीत होते. परांडा शहरापासून ४ किलोमीटक अंतरावर असलेल्या परांडा बार्शी – रोडवरील सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पुलाजवळील वळणावर हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परांडा आगाराची परंडा – बार्शी – उस्मानाबाद ही बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटली होती.

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी
परांडा शहरापासून ४ कि.मी. अंतरावर परंडा बार्शी रोडवरील सोनगिरी – पुलाजवळील वळणावर ७ वाजून ४० मिनिटांनी बस उलटली व हा अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी नागरिकांना दिली. बस मधील ४३ पैकी एकूण ७ प्रवाशांना फ्रॅक्चर झाले असून १३ प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे. तर या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण
बार्शी बाजूकडून एक कंटेनर येत असताना समोरूनच एक जीप त्या कंटनेरला ओव्हरटेक करीत बसच्या अंगावर समोर आली. या वेळी बस चालकाने धडक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेतली असता ती घसरून रस्त्याच्या बाजूला कोसळली.

दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने व बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घनटनेची माहिती मिळताच शेजारील लोकांनी प्रवाश्यांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच जखमींवर परांडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक

Chhatrapati Sambhaji Nagar Mdnight Murder Of Youth CCTV Footage; भावासोबत झालेल्या वादाचा राग, मध्यरात्री सपासप वार; हत्येचे थरारक CCTV फूटेज

0

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने लहान भावासमोर एका तरुणाच्या पोटावर अन् छातीवर चाकूने वार करत हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना माळीवाडा गल्ली बेगमपुरा येथे रात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कैलास शिंदे (वय २५, रा. माळीवाडा गल्ली, हनुमान मंदिराच्या पाठीमागे, बेगमपुरा) असं मयत तरुणाचं नाव आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Mdnight Murder Of Youth CCTV Footage

संभाजीनगर तरुणाची हत्या सीसीटीव्ही फुटेज

बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेल्या ठिकाणी… पंकजांनी सांगितली हृदयस्पर्शी आठवण
गणेश पटारे (रा. बेगमपुरा) असं आरोपीचं नाव आहे. विशाल हा कुटुंबीयांसोबत बेगमपुरा परिसरामध्ये राहतो. त्याच्या कुटुंबामध्ये आजी, आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. विशाल आणि त्याची आई बीबीका मकबरा येथे कामावर आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी विशाल आणि योगेश सूर्यकांत पटारे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये विशाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान, काल शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास योगेश पटारेचा भाऊ गणेश पटारे हा माळीवाडा गल्लीमध्ये आला आणि काही एक न विचारता त्याने विशालला चाकूने भोसकायला सुरुवात केली. छातीत आणि पोटात वार करून विशालला गंभीर जखमी केलं. ही बाब विशालच्या भावाच्या लक्षात येताच तो धावत आला. तो गणेशाला विनवणी करत होता. मात्र, गणेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने विशालला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं.

दरम्यान, घटनास्थळावरुन आरोपी गणेश हा फरार झाला. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने विशालला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये मयत विशालच्या भावाच्या तक्रारीवरून गणेशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेगमपुरा पोलीस आरोपी गणेशचा शोध घेत आहेत.

८३ ची वर्ल्डकप विजेती टीम कुस्तीगीरांच्या पाठिशी, कपिल देव म्हणाले, त्या दृश्यांनी व्यथित…

Success in SSC Exam, पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी – the boy who lived in pipeline sold garlands at signals cracks ssc exam and now wants to become a cop

0

ठाणे : वडील नाहीत, रस्त्यावर पाइपलाइनला राहून आई फुलांचे गजरे, हार विकून कसेबसे कुटुंब चालवते. आईला मदत व्हावी म्हणून किरण काळे हा सिग्नलवर गजरे विकण्याचे काम करतो. मात्र अशा खडतर आणि दिशाहीन प्रवासात तो दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण घेत घेत इयत्ता १० वीची परीक्षा देतो आणि ६० टक्के गुण मिळवून पास होतो. या यशाने किरणने आपल्या जगण्याचा मार्ग तयार केला आणि रस्त्यावरील मुलांसाठी एक आदर्श निर्माण केला. अशा या किरणच्या नेत्रदीपक यशाची चर्चा ठाण्यात ऐकायला मिळत आहे.

किरण आईसोबत रस्त्यावरच राहतो. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे त्याची सुरुवातीची शाळेची काही वर्षे वाया गेली. किरणची आई मीना या नौपाडा ट्रॅफिक जंक्शनवर फुले, हार, गजरे विकण्याचे काम करतात. किरण आईला हार विकून देत हातभार लावत आला आहे. समर्थ भारत व्यासपीठ या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची नजर हार विकणाऱ्या किरणवर पडली. त्यांनी त्याला सिग्नल शाळेत आणले. किरणसारख्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी या संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने सिग्नल शाळा सुरू केली आहे.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण
सिग्नल शाळेचे समन्वयक भटू सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही किरणला इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर त्याला सरस्वती हायस्कूलमध्ये दाखल केले. त्याची सुरुवातीची दोन वर्षे गळली असली तरी त्याने इयत्ता तिसरीत अभ्यास करून ती भरून काढली.

आपल्या यशाबाबत बोलताना किरण म्हणाला की, ‘ही माझ्यासाठी जगण्याची लढाई होती. दररोज हार विकण्याशिवाय आमचं रोजचं जीवन चालूच शकत नव्हते. त्यामुळे हे काम एकदिवसही टाळता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या आईला तिच्या कामात हातभार लावत होतो. फुलं विकत आणणे आणि नंतर हार आण गजरे तयार करून ती विकणे असे काम मी करत असतो. रस्त्यावरील दिव्याखाली मी अभ्यास केला आहे.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक
मला पोलीस अधिकारी बनायचे आहे- किरण

खडतर परिस्थितीशी झगडत मिळवलेले हे यश किरणने आपल्या वर्गमित्रांसोबत सिग्नल शाळेत आनंदाने साजरे केले. मला पोलीस अधिकारी बनायचे आहे. तसेच माझ्या आईसाठी मला घरही विकत घ्यायचे आहे, असे आपले स्वप्न असल्याचे किरणने सांगितले.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव

Latest posts