Wednesday, December 6, 2023
Home Blog Page 4844

rupali chakankar: ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो’; रुपाली चाकणकरांना पत्र – women commission president rupali chakankar facebook post about vat purnima facing offensive comments heramb kulkarni reaction

205

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये चाकणकर (Rupali Chakankar) यांनी, ‘लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टच्या खाली अनेक विरोधी मतांच्या लोकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, यापैकी अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य आणि अश्लील भाषेत आहेत. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांना ही गोष्ट प्रचंड खटकली आहे. या विरोधात हेरंब कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट लिहून रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
‘तिचं मंगळसूत्र काढू नका, कुंकू पुसू नका’; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला अन्…

हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मा.रुपाली चाकणकर,
मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही फक्त मी स्वतः जात नाही हे सांगितले व त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली.सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली.

यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली.मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कमेंट आहे.
वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नाही तर भावना महत्वाची, मेघना बोर्डीकरांनी चाकणकरांना सुनावलं
विशेष म्हणजे रूपाली चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते हे माहीत असूनही अशा कमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण आहे.
अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहे.

तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच अश्लील comment बाबत मी त्यानाच पत्र लिहितो आहे व सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाई चे आदेश द्यावी अशी मागणी करणार आहे. त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा comment केल्या तर सु मोटो कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज आहे.

पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते. तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी.

jalna accident news: लेकीवर अक्षता पडत असतानाच वडिलांवर काळाचा घाला, मंडपाच्या बाहेरच घडलं भीषण – father died accidentally while his daughter was getting married jalna news

0

जालना : जालना जिल्ह्यातील काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. इथं लग्न मंडपात लेकीच्या लग्नाच्या मंगलाष्टका सुरू असताना रोडवर वधुपित्याला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. लेकीच्या डोक्यावर अक्षदा पडत असतानाच पित्यावर काळाचा घाला आल्याने लेक जावयासह सारे वऱ्हाडी निशब्द झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन-जाफराबाद मुख्य रस्त्यावरील विरेगाव इथं मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान एका इसमाला अज्ञात भरधाव वाहनाने चिरडलं. राजू शेषराव खंडागळे वय ४८ असं मयत वडिलांचं नाव आहे. एकीकडे लग्न मंडपात वऱ्हाडी, नातेवाईक नवदाम्पत्यावर अक्षदाचा वर्षाव करत होते, मंगलाष्टक चालू होत्या. अशात कामानिमित्त वधुपिता पायी चालत रोडवर आले. तेवढ्यात भरधाव वेगाने त्यांना चिरडून पोबारा केला.

Monsoon Update : राज्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईसह ‘या’ भागांत वरुणराजा बरसला
रोडवर गर्दी जमलेली पाहताच लग्नातील नातेवाईक, पाहुण्यांनी धाव घेतली असता यानंतर जे दिसलं ते काळीज पिळवटून टाकणारं होतं. तातडीने राजू यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हा अपघात इतका भयंकर होता की खंडागळे यांना डोक्याला जबरदस्त फटका बसला. खंडागळे यांच्या जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, दोन मुलं, तीन मुली असा परिवार आहे. लेकीच्या लग्नातच पित्यावर काळाने घाला घातल्यामुळे साऱ्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलाचं लग्न जुळत नाही, आईचं धक्कादायक पाऊल…

cm uddhav thackeray: उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी वर्षावरील बैठकीत प्लॅन आखणार – uddhav thackeray will make plan to defeat bjp devendra fadnavis in vidhanparishad election 2022

0

Vidhanparishad Election 2022 | विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे.

 

Uddhav Thackeray feature (2)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत
  • दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत सत्ता आणि संख्याबळ असूनही पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानपरिषद निवडणुकीसाठी अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस रंगणार आहे. ही जागा भाजपने जिंकल्यास अपक्ष आमदार आणि लहान पक्षांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होईल. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रतिमेला मारक ठरू शकते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषद निवडणुकीत बाजी मारण्याचा चंग बांधलेला दिसत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Vidhanparishad Election 2022)
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले
या बैठकीला महाआघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. विधानपरिषेदच्या दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना हाताशी धरून मतांची जुळवाजुळव कशाप्रकारे करायची याची रणनीती आज वर्षा बंगल्यावरही बैठकीत आखली जाईल. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोणत्या सूचना देतात, हे पाहावे लागेल.
देवेंद्र भुयार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘उद्धवसाहेब निधी नको, पण तुमच्या भेटीची वेळ द्या!’
तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना १८ जून रोजी मुक्कामासाठी मुंबईत दाखल होण्याचा आदेश दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : uddhav thackeray will make plan to defeat bjp devendra fadnavis in vidhanparishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

mumbai monsoon 2022: Monsoon News 2022 Mumbai Maharashtra Rain Updates Monsoon Konkan Weather Today | राज्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईसह ‘या’ भागांत वरुणराजा बरसला

0

मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये मध्य ते अतिमध्य पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उन्हापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार आज पहाटे अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

आज पहाटे नवी मुंबईतील उपनगरं, मुंबईतील विरार, वांद्रे, वडाळा, विलेपार्ले, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली, मानखुर्द, कुर्ला अशा अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अशात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय आहे.

Monsoon 2022 Update : मान्सून महाराष्ट्रावर नाराज, धमाकेदार एन्ट्रीनंतर झालं तरी काय?
आज गुरुवारी मुंबईसह उपनगरात पहाटे पाऊस बरसला. अनेक भागांमध्ये काळ्या ढगांची चादर आहे. तर मुंबईवर पावसाचा शिडकावा झाला असला, तरीही सर्वांनाच आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

Monsoon 2022 Progress : पुढच्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या भागांना अलर्ट?
राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांनाही वेग आला आहे. खरंतर, रविवारनंतर राज्यात पावसाने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता पाऊस पुन्हा सक्रीय होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात तुफान पाऊस

बीड जिल्ह्यातील काल संध्याकाळपासू तुफान पाऊस बरसला. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. पहिल्याच पावसात केज शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून नजिकच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

‘विधानपरिषद निवडणुकीत मविआतील नाराज आमदार भाजपला मतदान करण्याच्या तयारीत’

Farmers Leader Ravikant Tupkar Criticism On Agriculture Department Over Bogus Seeds

0

Ravikant Tupkar on Bogus Seeds : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. खरीप हंगाम सुरु झाला असून, अनेक कृषी केंद्र चालक हे रासायनिक खतांच्या बाबतीत लिंकिंग करत असल्याच्या घटना राज्यभर उघडकीस येत आहेत. तसेच अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे सुद्धा विकलं जात असल्याचे समोर आलं आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृषी खात आणि बियाणं कंपन्यांचं साटलोट असल्याचा आरोप करत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी (17 जून) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी बुलढाण्यात शेतकरी मोर्चाच आयोजन करण्यात आल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे.

सध्या अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे विकलं जात आहे. असे प्रकार हे कृषी अधिकारी आणि कृषी केंद्र चालकाच्या संगनमताने सुरु असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. जर असे प्रकार उघडकीस आले तर कृषी केंद्र चालकासह संबंधित कृषी अधिकाऱ्याला कपडे काढून मारु असा इशाराच रविकांत तुपकर यांनी दिला आहे. यासंबंधी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शेतकरी मोर्चाच आयोजन केलं आहे. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले असल्याचे तुपकरांनी सांगितले.

कृषीमंत्री, तुमच्या राज्यात नेमकं काय सुरु?

राज्यात खरीप हंगाम सुरु झाला असून, अनेक कृषी केंद्र चालक हे रासायनिक खतांच्या बाबतीत लिंकिंग करत असल्याच्या घटना राज्यभर उघडकीस येत आहेत. अनेक कृषी केंद्रावर बोगस बियाणे विकले जात आहे. मुळ किंमतीपेक्षा जास्त दरानं खतांची विक्री होत आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे आपण संवेदनशील मंत्री आहेत असे आम्ही समजतो, पण तुमच्या राज्यात नेमकं काय सुरु आहे, असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना कोणते खत घ्यावे, कोणते बी पेरायचे याचा शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. तो आमचा पिडीजात धंदा असल्याचे तुपकर म्हणाले.  

बोगस बियाणं मार्केटमध्ये नेमकं येत कसं?

काही कृषी केंद्र चालकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून कृत्रीम खतांचा तुटवडा केला जातो. यामध्ये कृषी विभाग सहभागी असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. बोगस बियाणे मार्केटमध्ये नेमकं येत कसं? असा सवालही यावेळी तुपकर यांनी उपस्थित केला. तुमच्याकडे कारवाईसाठी यंत्रणा आहे, कर्मचारी आहेत, अधिकारी आहे, ती यंत्रणा कारवाई का करत नाही? असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला. ही यंत्रणा कारवाई करत नसले तर कृषी विभाग, कृषी केंद्र चालक आणि कंपन्यांचे साटलोट असल्याचा आरोप यावेळी तुपकरांनी केला.  मूळ किंमतीपेक्षा जास्त दरानं खत आणि बियाणांची विक्री कोणी केली तर त्या कृषी केंद्र चालकांना फटके दिल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचे तुपकर म्हणाले.   

महत्वाच्या बातम्या:

Sangli Crime News : इस्लामपुरात सोयाबीनचं बोगस बियाणं विकणाऱ्या गोदामावर छापा; 23 लाख 50 हजाराचं बियाणं जप्त

Agriculture News : ऑनलाईन बोलावलेली खतं, बियाणं आणि कीटकनाशक जप्त, यवतमाळमध्ये कृषी विभागाची कारवाई

भुजबळांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज तातडीची बैठक

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ः ओबीसी इंपिरिकल डेटा संकलनाबाबत आलेल्या बातम्या धक्कादायक आहेत. आडनावाच्या आधारे घरात बसून कोणी माहिती घेत असेल तर चुकीचे आकडेवारी येईल. हे चुकीचे आकडे केवळ या आरक्षणासाठी नाही तर पुढे सर्व प्रकारच्या आरक्षणासाठी अडचणीचा विषय ठरतील. अशामुळे ओबीसींच्या आरक्षणाची कत्तल होईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा व्यक्त केली. राज्यपालांच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसींच्या इंपिरिकल डेटाबाबत खोलात जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने काम करण्यात आले असून ते चुकीच्या पद्धतीने होत आहे. ओबीसींचे प्रमाण ५४ टक्के असल्याचे प्रत्येकवेळी सिद्ध झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर २००४पासून कुणबी मराठा हेसुद्धा ओबीसींमध्ये आले. त्यावेळी अडीचशे जाती होत्या. आता सव्वाचारशे जाती झाल्या आहेत, ओबीसींची माहिती योग्यरितीने संकलित केली गेली पाहिजे अशी मागणी असून, याबाबत आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे भुजबळ म्हणाले.

मंगळवारी राजभवनामध्ये राज्य सरकारचा एक कार्यक्रम होता. त्यात दोन-चार मंत्र्यांना बोलावले होते. बाकी मंत्र्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. राज्याचा कार्यक्रम राजभवनमध्ये होतो, त्यात बाकीचे अनेक लोक असतात. मात्र राज्यपालांकडून मंत्र्यांना बोलावले जात नाही. केवळ एका पक्षाच्या नेत्यांना बोलावले गेले, हा काय प्रकार आहे अशा शब्दांत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

बहुसंख्य मुस्लीम हे ओबीसी…

मुंबईतील झोपडपट्टीमध्ये उच्चवर्णीय राहत नसून, दलित, ओबीसी लोक राहतात. बहुसंख्य मुस्लीम हे ओबीसी आहेत. त्यात थोडे जणच उच्चवर्णीय आहेत. ओबीसींची नावे घेतली पाहिजेत. शहरात ओबीसी संख्या पाच, दहा टक्के लिहिली जात आहे. ते धक्कादायक आहे. यामागे काय गौडबंगाल आहे याचे सरकारमधील वरिष्ठांनी शोधून काढले पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.

ही कारवाई क्लेशदायक

विरोधी पक्षनेत्यांवर ईडीचे छापे टाकायचे यात नवीन काही नाही. राहुल गांधी यांना तीन-तीन दिवस ईडीकडून चौकशीला बोलावले जात आहे. त्यांच्या पणजोबाने निर्माण केलेली संस्था, ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या आजीने, वडिलांनी बलिदान दिले. त्यांच्या वारसांना तुम्ही चौकशीला बोलवत आहात. ज्यांच्या पूर्ण परिवाराने देशासाठी आयुष्य समर्पित केले आहे, त्यांच्या वारसदारांच्या चौकशा केल्या जाणे क्लेशदायक आहे, असेही ते म्हणाले.

devendra fadnavis: ‘विधानपरिषद निवडणुकीत मविआतील नाराज आमदार भाजपला मतदान करण्याच्या तयारीत’ – vidhanparishad election 2022 some mva mla’s may vote bjp due to devendra fadnavis

0

मुंबई: विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजपकडून महाविकास आघाडीच्या गोटातील आमदारांची फोडाफोडी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मविआच्या गोटातील अनेक नाराज आमदार विधानपरिषद निवडणुकीत भाजपला (BJP) मतदान करतील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता मविआच्या गोटातील धाकधुक वाढली आहे. (Vidhanparishad Election 2022)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस हे अधिक ‘रिचेबल’ आहेत. त्यामुळे मतदारासंघातील विकासकामे वेगाने मार्गी लावणे शक्य होते. याच कारणामुळे मविआतील काही आमदार विधानपरिषदेला भाजपच्या पारड्यात मत टाकतील, असे बावनुकळे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या सरकारवर जनतेचा आणि आमदारांचा अजूनही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला न्याय देऊ शकतात, अशी भावना सर्वपक्षीय आमदारांमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री होते की, ते सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत आमदारांच्या भेटीगाठी घ्यायचे. ते कोणालाही परत पाठवायचे नाहीत. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये अगदी उलटा अनुभव येत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याने आमदारांच्या मनात खदखद आहे. ते मतदारसंघात फिरू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये आमदारांना काहीही मिळाले नाही. विकासही झालेला नाही. त्यामुळे आमदारांना देवेंद्र फडणवीस आपलेसे वाटतात. देवेंद्र फडणवीस सगळ्यांना प्रेमाने सांभाळून घेत असल्यामुळे सर्वपक्षीय आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
‘मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाहीत; अजितदादांना पहाटे ५ वाजता फोन केल्यावर ७.४५ ला भेटायला बोलावलं’
विधान परिषद मतदानात शिवसेनेची पुन्हा कसोटी

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार २० जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत.

Maharashtra Rain Heavy Rainfall In Maharashtra, Happiness Among The Farmers

1

Maharashtra Rain : राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे.

राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.  

हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस

खरीप हंगाम सुरु होण्याअगोदर हिंगोली शहरासह ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. चातकाप्रमाणे या पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण आहे जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे मृग नक्षत्राच्या नंतर आजचा झालेला हा पहिला जोरदार पाऊस मानला जातोय या पावसाचा शेताच्या बांधावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी

सांगलीतही पावसाची बटिंग

पावसाच्या प्रतिक्षेत असमाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सांगली शहरासह परिसात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


  
यवतमाळमध्ये वीज पडून युवतीचा मृत्यू, पाच जण जखमी

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात इनापुर शेतशिवारात वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परिसरातील शेत शिवारात पडलेल्या जोरदार पावसामुळं शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. मात्र, पुसद तालुक्यातील एका 15 वर्षीय युवतीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पल्लवी दिलीप चव्हाण (15) (रा.इनापूर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. तर रविना अनिल चव्हाण (16), आरती सुनिल चव्हाण (16)( रा. इनापूर) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शांताबाई धर्मा चव्हाण (65), देवराव कनीराम चव्‍हाण (58), रेखा मधुकर राठोड हे तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

खरीप हंगामात आदिवासी बांधवांचे नुकसान, 2 बैलांचा मृत्यू 
 
मारेगाव तालुक्यातील सालईपोड (खंडणी) येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लक्ष्मण चंदकू टेकाम (53) या आदिवासी शेतकऱ्याचे हे दोन बैल होते. गावालगत असलेल्या गोठ्यावर वीज पडल्यानं बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांची बैलजोडी ठार  जाली. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी दगावल्याने शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.

चंद्रपूरमध्ये वीज कोसळून मुलीचा मृत्यू

कापूस पेरणीसाठी शेतात गेलेल्या मुलीचा वीज कोसळल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरी कोडापे (16), कोरपना तालुक्यातील बेलगाव येथे ही  घटना घडली आहे. ही मुलगी मामाच्या शेतात पेरणीसाठी गेली होती. त्यावेळी घटना घडली. या घटनेत इतर 5 लोक झाले जखमी झाले आहेत. 

गोंदियामध्ये पावसाचं आगमन

गोंदिया जिल्हामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सून जिल्हामध्ये हुलकावणी देत होता. मात्र, अचानक मान्सूनपूर्व पावसाच्या सरीचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगमन झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे शेतकरी जमिनीची मशागतीसाठी  पावसाची वाट पाहत असताना अचानक आलेल्या पावसानं काहीसा दिलासा मिळणार आहे. अद्यापही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा सरीच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे.

महत्वाच्या बातम्या:

Know all about 4G signal boosters in India

0

Explained: Know all about 4G signal boosters in India

Mobile signal boosters amplify the frequency signal of network carriers to provide strength to a weak signal. These devices help wireless network providers to improve coverage in areas where there is no signal or very poor signal due to the presence of numerous dead spots. Simply put, mobile signal boosters are used to amplify network reception in zones with weak signals. Telecom operators also use these types of equipment to improve the network reception in areas where placing a dedicated network tower is difficult. However, third-party boosters and repeaters that do not comply can cause severe interference in the licensed frequency bands assigned to telecom providers, which can eventually impact the overall quality of mobile services.

How do mobile signal boosters work?
Mobile Signal boosters, also known as amplifiers or repeaters, consist of three main parts– exterior antenna, amplifier and interior antenna. These components create a wireless system that helps in enhancing cellular reception. These devices are usually a repeater system that allows the amplifier to add gain or power to the reception in multiple directions. The outside antenna can both receive and transmit signals to a cellular tower with enhanced power and sensitivity. These devices are connected with a coaxial cable that can even cause transmission loss. After amplification, the signal is re-broadcasted to the area with no reception or weak signal.

Availability of 4G signal boosters in India
4G mobile signal boosters are available on all major e-commerce platforms, including Amazon and Flipkart. Users can purchase these devices at affordable prices that claim to offer wide-area coverage, easy installation and network support for the 4G network with data services and VoLTE connectivity. However, popular brands with expertise in network equipment such as Huawei and Netgear don’t have any such products listed on the e-commerce platforms.

Moreover, in 2019, the Cellular Operators Association of India (COAI) asked e-commerce portals to stop selling network signal boosters and repeaters as the sale of such devices is illegal and may attract fine and imprisonment. The regulator cited that these devices interfere with mobile signals leading to call drops and slower data speeds.

Are 4G signal boosters illegal in India?
4G signal boosters are illegal in India as these instruments use a spectrum for which they haven’t paid. Using these devices can cause network interference in the area and can also cause service deterioration for other customers in the vicinity. Moreover, most of these signal boosters available on e-tailer platforms are China-made and can cause signal issues for others. These devices can delay communication services, including emergency calls in the community, when designed or installed improperly.

According to the Indian Wireless Telegraph Act, the sale, purchase or possession of mobile signal boosters is illegal and a punishable offence. As per the law, the purchaser needs to obtain a ‘frequency authorisation/agreement in principle letter’ from the DoT before buying any such equipment in the licenced bands. Moreover, buyers will also need a wireless operating licence after submitting the required documents and spectrum charges.

FacebookTwitterLinkedin


राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णांचं कारण समोर, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ः राज्यात आढळून आलेले करोनारुग्ण ओमायक्रॉन उपप्रकाराने बाधित असून करोनाचा नवा प्रकार आढळलेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते करून घ्यावे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होत असली, तरी ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यांपर्यंत मर्यादित आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या जनता दरबारात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रांत रुग्णवाढ होत आहे. मुंबईचा संक्रमण दर बुधवारी ४० टक्क्यांवर गेल्यामुळे रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के आहे, असेही टोपे यांनी सांगितले. या रुग्णवाढीमुळे आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. ‘हर घर दस्तक’ या सूचनेप्रमाणे आशा सेविका आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचे प्रमाण वाढवत आहोत, असे ते म्हणाले.

Latest posts