Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5764

भाजपचा 'तो' विभाग अध्यक्ष बांगलादेशीच; गृहमंत्र्यांनी केले स्पष्ट

0

मुंबई: भारतीय जनता पक्षाचा (BJP) उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष हा असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आल्याचे राज्याचे गृहमंत्री (Anil Deshmukh) यांनी स्पष्ट केले आहे. शेख याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, असे अनिल देखमुख यांनी म्हटले आहे. (president of north mumbai minorities division is a bangladeshi says home minister )

या संदर्भात तक्रार आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान त्याच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतीत जावून चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.

नादिया येथील जिल्हाधीकारी कार्यालयामधील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असलेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य पश्चिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता या दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेले बोलगंडा आदर्श हायस्कूल ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोटया कागदपत्राच्या आधारावरच त्याने आधार कार्ड आणि पॅनकार्ड काढल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच भाजपचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भाजपचा हा संघजिहाद आहे का?,’ असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

दिशा रवीला जामीन नाहीच, २३ तारखेला कोर्ट देणार निकाल

0

नवी दिल्ली: पतियाळा हाऊस कोर्टात टूलकिट प्रकरणी ( ) दिशा रवीच्या ( ) जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सध्यातरी दिशा रवीचा जामीन मंजूर केला नाही. आता २३ फेब्रुवारीला पुढच्या आठवड्यात मंगळवारी कोर्ट निकाल देणार आहे.

टूलकिटमध्ये अशी सामग्री टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची तयारी केली गेली होती. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना सरकारविरोधात या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. भारत सरकारविरूद्ध एक मोठं षडयंत्र रचले जात होतं. या प्रकरणात काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जी आम्हाला सीलबंद लिफाफ्यात कोर्टाला द्यायची आहेत. दिशा रवीशी संबंधित पुरेसे साहित्य आमच्याकडे आहे. दिशाने टूलकिट संपादीत केलं आहे. तिचा सहकारी शंतनु हा दिल्लीत आला होता. तो २० ते २७ जानेवारीदरम्यान दिल्लीत होता. सर्व गोष्टींची अंमलबजावणी होतेय की नाही? हे तपासण्यासाठी तो आला होता, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांकडून कोर्टात करण्यात आला.

यांनी तयार केलेली योजना २६ जानेवारीला यशस्वी झाली नाही. असं झालं असतं तर भयंकर परिस्थिती राहिली असती. हिंसाचारादरम्यान पोलिसांचा संयम सुटून आणि आंदोलकांवर बळाचा अधिक उपयोग व्हावा. यात अनेक शेतकरी जखमी झाले असते आणि सोशल मीडियातून अफवा पसरवून वादळ निर्माण करून भारताविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कॅनडातील व्हँकुवर शहर हे खलिस्तानांनी फुटीरतावाद्यांचे प्रमुख केंद्र आहे. टूलकिट आणि व्हॉट्सअॅप ग्रुपबद्दल दिशा रवीला विचारण्यात आले. त्यावेळी याबद्दल आपल्याला काहीही माहित नसल्याचं तिने सांगितलं, असं पोलिस कोर्टात म्हणाले.

निकिताचा मोबाइल तपासण्यात आला. त्यात निकिता आणि दिशा हे कट रचणारे स्थानिक होते. ‘Ask India Why’ हे खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या प्रचार भारतात व्हावा, यासाठी बनवले गेले. शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतात आपला प्रचार करण्याचा खलिस्तानांच्या कट होता, असं पोलिस म्हणाले.

शीख जस्टिस फाउंडेशनने दिशाचा उपयोग आपल्या हालचालींची अंमलबजावणीसाठी केला. हे टूलकिट पीजेएफ (पोएटीक जस्टिस फाउंडेशन) च्या मदतीने विकसित केले गेले. दिशाने ग्रेटाला एक टूलकिट दिली आणि नंतर ते हटवण्यास सांगितलं, म्हणजेच दिशाला सर्व काही माहित होते. दिशाने मोबाइलवरून पीजेएफबरोबरची चॅट डिलीट केली होती. तिने संवेदनशील सामग्री काढून ग्रेटाला एक नवीन टूलकिट दिली. शंतनु आणि दिशा शेतकऱ्यांच्या मुद्यावर ग्रेटावर कसा प्रभाव पाडायचा यावर चॅटमधून चर्चा करायचे, असं पोलिस म्हणाले.

शिख फॉर जस्टीक आणि पीजेएफ यांचा हेतू एकच आहे. दोघांविरूद्ध देशद्रोही साहित्य आहे. यासह पोलिसांनी न्यायाधीशांना फाईलही दिली. दिल्ली पोलिसांच्या २ वकिलांनी युक्तिवाद केला. शंतूनने पीजेएफला टूलकिट शेअर केली. टूलकिटची अंमलबजावणी करण्यासाठी २० ते २७ जानेवारी दरम्यान शंतनू दिल्लीत शेतकऱ्यांमध्ये होता. ग्रेटा यांच्या ट्विटनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. एमओ धालीवाल, पीजेएफ, शीख फॉर जस्टिस हे मिळालेले आहेत, असं पोलिस म्हणाले.

न्यायाधीश दिल्ली पोलिसांनी केलेल्या युक्तिवादावर न्यायाधीश सहमत दिसून आले नाही. टूलकिट आणि २६ जानेवारी हिंसाचारामध्ये काही संबंध आहे का, याचा पुरावा काय आहे, असे न्यायाधीशांनी विचारले. पोलिस म्हणाले की टूलकिटमध्ये बर्‍याच गोष्टी आहेत ज्या हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. त्यावर न्यायाधीसांनी पुन्हा विचारले, थेट संबंध काय आहे? की फक्त अंदाज लावावा लागेल, असं न्यायाधीशांनी विचारलं. आपल्याला टूलकिटमध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि संपूर्ण परिस्थिती समजून घ्यावी लागेल, हे सोपे प्रकरण नाही. टूलकिट हॅशटॅग आणि लिंकसह वाचले पाहिजे. हा एक साधा संदेश नाही. यातील लिंक या चिथावणाऱ्या आहेत आणि त्यांना दिल्लीत मोर्चा काढण्यास सांगितलं जात आहे. काश्मीरमध्ये हत्याकांड झाल्याचं जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

दिशाचे वकील काय म्हणाले?

दिशाने त्यांच्याशी बातचीत केली. पण त्याचा काय संबंध आहे हे पोलिस सांगत नाहीए. एखाद्या देशद्रोही व्यक्तीशी बोललो तर आपण देशद्रोही होऊ शकतो का? नुकत्याच बनलेल्या पीजेएफ संस्थेबद्दल आम्हाला कसं माहिती असेल. चहा नापसंत करणं म्हणजे काय देशद्रोह आहे का? आपले मुद्दे कोणत्याही व्यासपीठावर ठेवणं हा गुन्हा नाह. टूलकिटमध्ये असं काय आहे ज्यामुळे देशद्रोह होऊ होतो? दिशाने बातचीत केले, असे आरोप आहेत. ४०-५० लोक होते. चर्चा टूलकिटवर झाली. मग टूलकिट गन्हेगारी स्वरुपाचे आहे का? हा प्रश्न आहे, असं दिशाचे वकील म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कल करे सो आज कर…! PM मोदींकडे CM ठाकरेंची आता 'ही' मागणी

0

मुंबई: ‘कल करे सो आज कर, आज करे सो अभी’, अशी राज्य शासनाची भूमिका असून काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. नीती आयोगाची सहावी बैठक आज पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ( )

वाचा:

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असा आग्रह यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे धरला.

वाचा:

आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचे जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

वाचा:

पंतप्रधान मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत बोलताना राज्य व केंद्र सरकारने एकजुटीने आणि समन्वयाने काम केले पाहिजे, असे नमूद केले. आर्थिक प्रगती साधायची असेल तर सरकारला खासगी क्षेत्राचाही तितकाच आदर करावा लागेल आणि त्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावं लागेल, असेही मोदी म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पाचे झालेले स्वागत म्हणजेच विकासाच्या मार्गावर देशाची वेगाने वाटचाल सुरू असल्याचे संकेत आहेत, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. देशाच्या उभारणीत प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, हेच आपल्या सरकारचे धोरण असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बिग बींनी केली 'झुंड' प्रदर्शनाची तारीख जाहीर; पटोलेंनी दिला 'हा' इशारा

0

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि () यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे () यांनी दिला आणि त्यानंतर दोनच दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ‘’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. अमिताभ बच्चन यांचे झुंडबाबतचे ट्विट आल्याबरोबर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आपले आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनात अमिताभ बच्चन यांचा काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार असल्याचं पटोले म्हणाले. (congress workers will protest against outside the theater by displaying black flags)

‘अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काळे झेंडे दाखवणार’

अमिताभ बच्चन यांनी झुंड चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने आंदोलन घोषित केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवतील, असे नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस लोकशाही पद्धतीने आधीपासूनच इंधन दरवाढीचा विरोध करत आले आहे. जिथे जेथे अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमारच्या सिनेमाचं शूटींग सुरु असेल, तिथे काळे दाखण्यात येतील. प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेमा थिएटरच्या बाहेर काळे झेंडे घेऊन विरोध दर्शवणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर झुंडच्या प्रदर्शनाची तारीख ट्विट करत जाहीर केली. झुंड चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत अमिताभ लिहितात, ‘करोनाने आपल्याला अनेक धक्के दिले, मात्र आता पुनरागमनाची वेळ आली आहे. आपण चित्रपटगृहात परतलो आहोत. ‘झुंड’ १८ जूनला प्रदर्शित होतोय.’

क्लिक करा आणि वाचा-

नाना पटोलेंनी का दिला इशारा?

केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सरकारवर टीका करत असत. आता मात्र ते गप्प आहेत असे पटोले यांचे म्हणणे आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली तरी देखील ते गप्प का असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

IND VS ENG: भारताचा महत्वाचा खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, उद्या होणार महत्वाचा निर्णय

0

अहमदाबाद, : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने चांगलीच कंबर कसली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना दिवस-रात्र होणार असून ते अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. पण या कसोटी सामन्यात भारताचा महत्वाचा खेळाडू खेळू शकणार की नाही, याचा निर्णय उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे.

भारतीय संघ सध्या अहमदाबादच्या मोटेरा मैदानात सराव करणार असला तरी वेगवान गोलंदाज उमेश यादव अजून फिट आहे की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी उमेशला संघात स्थान देण्यात आले आहे. पण हा सामना खेळण्यासाठी उमेशला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेशची फिटनेस टेस्ट रविवारी होणार आहे. या टेस्टमध्ये जर उमेश पास झाला तरच त्याला तिसरा कसोटी सामना खेळता येणार आहे. पण तो जर या टेस्टमध्ये नापास झाला तर त्याला हा सामना खेळता येणार नाही.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात उमेशला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो सावरला आहे. पण तो सामना खेळण्यासाठी फिट आहे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा असताना त्यांना एक मोठा धक्का बसला होता. भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला तिसऱ्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्याने मैदान सोडले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात उमेशने जो बर्न्सची विकेट घेत संघाला पहिले यश मिळून दिले होते. त्यांनतर उमेशला एकही सामना खेळता आलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला आता कोणत्याही खेळाडूबाबतीत जोखीम उचलायची नाही आहे. त्यामुळेच उमेश जर फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याचा विचार तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी करण्यात येऊ शकतो.

ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळत असताना उमेशला दुखापत झाल्याने वैद्यकीय पथक मैदानावर आले होते. पण थोड्यावेळातच उमेश लंगडत ड्रेसिंग रुममध्ये गेला होती. त्याची शिल्लक ओव्हर मोहम्मद सिराजने पूर्ण केली होती. मालिकेच्या आधी भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे बाहेर झाला होता. तर पहिल्या कसोटीत चेंडू लागल्याने जलद गोलंदाज मोहम्मद शमी उर्वरीत मालिकेतून बाहेर पडला होता. आता हे तिन्ही गोलंदाज दुखापतीमधून सावरलेले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

… तर भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक दुसरीकडे खेळवा, पीसीबीच्या अध्यक्षांनी साधला निशाणा

0

मुंबई : भारतामध्ये यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. पण हा विश्वचषक भारतामधून हलवावा लागेल, असे मत आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी व्यक्त केले होते. काही महिन्यांपूर्वी आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार होते. पण भारताने या स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताने माघार घेतल्यानंतर ही स्पर्धाच रद्द करावी लागली होती. त्यामुळे तो राग कुठेतरी पाकिस्तान क्रिकेट मंडळामध्ये खदखदत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मणी यावेळी म्हणाला की, ” जागतिक क्रिकेटमध्ये फक्त तीन शक्तीशाली देशांचीच सत्ता आहे, पण ही मानसीकता बदलणे आता गरजेचे आहे. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक आता भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे संघाबरोबर चाहते आणि पत्रकारांना भारताने व्हिसा द्यायला हवा. पण जर भारत व्हिसा देण्याचे लिखीत आश्वासन देत नसेल तर ही स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी खेळवायला हवी, असे मला वाटते. कारण व्हिसाची हमी आम्ही हवी आहे. ती जर मिळत नसेल तर या स्पर्धेत आम्ही कसे सहभागी होऊ शकतो. त्यामुळे भारताने आम्हाला व्हिसाची लिखीत हमी द्यावी नाहीतर ही स्पर्धा दुसऱ्या ठीकाणी खेळवण्यात यावी.”

मणी यांनी पुढे सांगितले की, ” आम्ही आयसीसीकडे याबाबत एक मागणी केली आहे. आम्हाला मार्च महिन्यापर्यंत व्हिसासाठी लिखीत आश्वासन मिळायला हवे. पण जर तसे होत नसेल तर काय करायचे, याचा विचार आम्हालाही करावा लागेल. जर आम्हाला व्हिसासाठी लिखीत हमी मिळाली नाही, तर हा विश्वचषक भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात यावा, ही आमची मागणी कायम राहणार आहे.”

भारतामध्ये एप्रिलमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. या विश्वचषकाच्यावेळी पाकिस्तानच्या संघाची पूर्ण सुरक्षेची हमी बीसीसीआयने घ्यायला हवी, त्याचबरोबर याबाबतचे लिखीत आश्वासन त्यांनी आम्हाला द्यायला हवे, असेही मणी यांनी यावेळी सांगितले आहे. पाकिस्तानच्या संघाला भारतामध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागणार आहे. केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्यावरच बीसीसीआय आपले मत व्यक्त करु शकते. त्यामुळे आता केंद्र सरकार या विषयावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भाजलेल्या चेहऱ्याने प्रियांकाने जिंकला 'मिस वर्ल्ड'चा किताब

0

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिच्या अभिनयाने तिने फक्त बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्येही वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या प्रियांका तिच्या प्रकशित पुस्तकामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उलगडा त्या पुस्तकात केला आहे. यावेळेस तिने २००० साली झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ या स्पर्धेतील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

ही स्पर्धा जिंकल्यावर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर तिने हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. हा प्रवास तिच्यासाठी किती खडतर होता याची कल्पना तिने तिच्या पुस्तकात लिहिलेल्या घटनांमधून दिली आहे. तिने ” च्या वेळेस घडलेली घटनादेखील यावेळी सांगितली. यात, ऐन कार्यक्रमावेळी तिचा चेहरा भाजला होता. ‘मिस वर्ल्ड २०००’ च्या शेवटच्या फेरीत मंचावर जाण्याआधी तिचा चेहरा भाजला होता पण तरीही ती हा किताब जिंकूनच परत आली.

प्रियांकाने सांगितल्याप्रमाणे, ती तिच्या केसांना रंग लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस तिथे जवळपास ९० मुली उपस्थित होत्या. ज्या तिच्या आसपास फिरत होत्या. सगळ्याचं मुली त्यांचा मेकअप आणि हेअर स्टाइल करण्यात मग्न होत्या. प्रियांकाही तिच्या केसांना रंग लावत होती. हे करत असताना एका मुलीने तिला धक्का दिला आणि तो रंग तिच्या चेहऱ्याला लागला. त्या रंगामुळे तिची त्वचा पोळली होती. शिवाय रंग काढण्याच्या प्रयत्नात चेहऱ्याची त्वचा नखांनी घासली होती त्यामुळे तिला आणखीनच त्रास झाला होता.

ही घटना घडल्यावर तिच्या चेहऱ्यावरील त्वचा वाईट पद्धतीने भाजली होती. तिने तो डाग कन्सीलर आणि केसांच्या मदतीने लपवला होता. अजूनही तो फोटो पाहिल्यावर प्रियांका विचार करते की, कशा पद्धतीने हेअर स्टाइलने तिने तो डाग लपवला होता. तो दिवस कधीही विसरू शकणार नसल्याची कबुली तिने पुस्तकात दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'महापालिका निवडणुकांत काँग्रेसला कसे सोबत घेता येईल?; शिवसेनेत चर्चा

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडीने () एकत्र लढाव्यात यासाठी आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे केल्यास मोठा विजय मिळवता येऊन भारतीय जनता पक्षाला () रोखता येऊ शकेल असे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना वाटते. यावर शिवसेनेचे नेते, खासदार (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी () निश्चितच सोबत असणार आहेत. काँग्रेसला (Congress) कसे एकत्र घेता येईल, याची चर्चा होईल, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. (we will discuss about taking the party along in the upcoming municipal elections says mp )

राऊत यांनी शनिवारी शहर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांनी माहिती दिली.

‘ज्यांची ताकद जास्त त्यांचे नेतृत्व’

महापालिकेत जास्त ताकद असलेल्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे सूत्र ठरले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद या महापालिकेत शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर, पिंपरी-चिंचवड अशा काही महापालिकांत राष्ट्रवादीची निश्चितच ताकद जास्त आहे.

क्लिक करा आणि वाचा-

दरम्यान, येत्या काळात निवडणुका एकत्र लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, तसेच इतर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करू, असेही राऊत यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

पुणे: कार पार्क करून ते गेले, परतल्यानंतर हादरलेच!

0

म. टा. प्रतिनिधी,

खराडी बायपास चौकात उभ्या केलेल्या कारमधून ५१ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोपट ढवळे (वय ५४, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी बायपास येथील प्रशांत टायर्स दुकानासमोर ढवळे यांनी गुरुवारी त्याची कार पार्क केली होती. ते मित्रासह शेजारीच असलेल्या गुरुदत्त व्हेज येथे बसले होते. ढवळे यांच्या मोटारीचा चालक आत होता; तरीही त्याची नजर चुकवून चोरट्यांनी ५० हजार रुपये रोख, जमिनीची कागदपत्रे, बँकेचे चेकबुक, पासबुक असा ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

विटकर टोळी तडीपार
चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विटकर टोळीच्या चार जणांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. झोन चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी हा आदेश दिला.

अजय चंद्रकांत विटकर (वय १९, रा. जुनी वडारवाडी), प्रथम उर्फ आकाश तुळशीदास विटकर (१९, रा. वडारवाडी), गणेस कोकणे (१९) आणि प्रफुल गायकवाड (१९, दोघेही रा. मंजाळकर चौक, जुनी वडारवाडी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. अजय विटकर हा टोळीप्रमुख असून, या टोळीतील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदा जमाव करणे, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरोधात चतुःश्रृंगी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला झोन चारच्या उपायुक्तांनी परवानगी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

माफ करा, असं म्हणत डॉक्टरने स्वत:सह संपूर्ण कुटुंबाला संपवले

0

अहमदनगर: पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून तालुक्यातील येथील प्रथितयश डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान द्यावी, अशी इच्छाही डॉ. थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे. या घटनेमुळे राशीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Doctor hangs self After Killing Wife and Children)

डॉ. थोरात यांचे राशीनमध्ये हॉस्पिटल आहे. आज त्यांचे कुटुंबीय घरात मृतावस्थेत आढळून आले. डॉ. महेंद्र वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय १६) व लहान मुलगा कैवल्य (वय ७) हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा:

थोरात यांच्या घरात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. त्यावरून मोठा मुलगा कृष्णा याच्या कर्णबधीर व्यंगाला कंटाळून हा प्रकार घडल्याचे दिसून येते. चिठ्ठीत म्हटले आहे की, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत. कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

वाचा:

कृष्णा हा क्रिकेट खेळाडू होता. त्याला पुण्यातील एका क्रीडा संस्थेत शिक्षणासाठी पाठविले होते. त्याला ऐकू यावे, यासाठी बरेच उपचार केले. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्याला श्रवणयंत्रही घेऊन देण्यात आले होते. त्याचाही उपयोग होत नव्हता. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र, आज अचानक त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts