Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5766

पिंपरी: वडापावच्या पैशांवरून तरूणाचा खून; भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक

5

म. टा. प्रतिनिधी, : वडापावचे पैसे देण्यावरून आणि रागाने बघितल्यामुळे तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाजप नगरसेविकेच्या मुलासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री काळेवाडीतील तापकीर चौकात ही घटना घडली.

शुभम जनार्धन नखाते (वय ३०, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप नगरसेविकेचा मुलगा राज तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३), प्रवीण ज्योतीराम धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारे (वय २३), अजय भारत वाकोडे (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१), प्रेम वाघमारे (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडापावच्या पैशांवरून १५ दिवसांपूर्वी शुभम आणि आरोपींमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्यांच्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) संध्याकाळी साडेचार वाजता पुन्हा भांडण झाले होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी शुभम याला तापकीर चौकातील धुंडिराज मंगल कार्यालय येथे बोलावले. तेथे आल्यावर बोलण्यापूर्वीच वाद सुरू झाले. त्यानंतर शुभमच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सातपैकी पाच जणांना अटक केली. शुभम याच्यावर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. तापकीर आणि नखाते हे नातेवाइक असून, त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुलाला मिळालेले कंत्राट नियमानुसारच; महापौरांनी फेटाळले मनसेचे आरोप

5

मुंबई: करोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोप मुंबईच्या महापौर यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. पदाचा गैरवापर करून मुलाला कंत्राट दिल्याच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले आहे.

मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोविड सेंटरच्या कामात व कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. महापौरांनी पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचं ते म्हणाले होते. तसंच, महापौरांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.

महापौर पेडणेकर यांनी तात्काळ या आरोपांचं खंडन केलं आहे. ‘मुंबईतील कोविड सेंटरला मनुष्यबळ पुरविण्याचे काम अनेक कंपन्यांनी केले आहे. त्यात माझ्या मुलाचीही एक कंपनी आहे. माझा मुलगा सज्ञान आहे. गेली दहा वर्षे तो व्यवसाय करत आहे. काम मिळविणे हा त्याचा हक्क आहे. कोणाला यात काही संशय येत असेल तर त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी करावी,’ असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

वाचा:

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर आरोप करणाऱ्या मनसेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. ‘ही कसली पोटदुखी आहे? करोनाकाळात बोंबा मारायला मिळाल्या नाहीत म्हणून आरोप करताहेत की कोरोना आटोक्यात येत आहे हे पाहवत नाही,’ असं त्या म्हणाल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धोनीच्या 'या' गोष्टी सर्वांनीच लक्षात ठेवा, सांगतायत उद्योगपती आनंद महिंद्रा

5

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मोदींनी जर धोनीला भारताकडून खेळायला सांगितले तर तो नक्कीच पुन्हा ब्ल्यू जर्सीमध्ये दिसू शकतो. आता तर भारतातले नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही धोनीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर धोनीच्या तीन गोष्टी नेहमीच लक्षात राहतील, असेही त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

धोनी हा एक महान कर्णधार आणि क्रिकेटपटू होता. त्याची छाप फक्त क्रिकेट विश्वावरच नव्हती तर उद्योग विश्वावरही त्याने आपली छाप पाडली होती. त्यामुळे आनंद महिंद्रा यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीलाही धोनीची दखल घ्यावी लागली आहे. धोनीला त्यांनी नेमके पहिल्यांदा कधी पाहिले आणि धोनीद्दल ते नेमकं काय म्हणाले, पाहा…

आनंद महिंद्रा यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे की, ” माझ्या आईने पहिल्यांदा धोनीला टिव्हीवर पाहिले आणि धोनीची हेअरस्टाईल मला दाखवली होती. आतापर्यंत धोनीबद्दल बरेच काही म्हटले गेले आहे. धोनीवर भाष्य करण्यासाठी मी काही क्रिकेटमधील तज्ञ नक्कीच नाही. पण धोनीच्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या अशाच आहे. पहिली गोष्ट म्हणजे धोनी हा अतिशय प्रमाणिक क्रिकेटपटू होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने बऱ्याचदा जोखीम पत्करली होती आणि तो बोल्ड राहायचा. तिसरी गोष्ट म्हणजे तो आपल्या निर्णयांवर ठाम असायचा.”

धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याचे करोडो चाहते आणि बऱ्याच आजी-माजी खेळाडूंना धोनीने पुन्हा एकदा भारताकडून खेळावे, त्याने अखेरचा सामना मैदानात खेळावा आणि निरोप घ्यावा, अशी भावना व्यक्त केली होती. काही जणांनी तर मोदी यांनी जर धोनीला पुन्हा भारताकडून खेळण्याची विनंती केली तर तो नक्कीच खेळेल, असेही म्हटले होते. त्यानंतर मोदी यांचे हे पत्र आले आहे. त्यामुळे मोदी यांनी नेमकं धोनीला काय म्हटलं आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मोदी यांनी पत्रामध्ये धोनीला म्हटले आहे की, ” धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Gmail आणि गूगल ड्राइव्हमध्ये समस्या, ई-मेल पाठवण्यास येतेय अडचण

5

नवी दिल्लीः Google ची ईमेल सर्विस डाउन सुरू आहे. जगभरात गुगल युजर्सकडून तक्रारी येत आहेत. जीमेल युज करताना काही तासांपासून समस्या येत आहे. युजर्संनी सांगितले की, जीमेल मध्ये आलेल्या या समस्यांमुळे युजर्संना ई-मेल पाठवण्यास तसेच फाईल अटॅच करण्यास समस्या येत आहे. डाउन डिटेक्टरच्या रिपोर्टनुसार, जीमेल मध्ये आलेल्या या समस्येमुळे जगभराप्रमाणे भारतीय युजर्संना सुद्धा या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

वाचाः

गुगल ड्राईव्हमध्ये ही अडचण
काही रिपोर्ट्समध्ये गुगल ड्राईव्ह सुद्धा डाऊन झाल्याचे म्हटले आहे. रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार काही युजर्संना गुगल ड्राईव्ह करताना फाइल शेयर करताना समस्या येत आहे. तसेच काही युजर्संनी गुगल ड्राईव्ह फाइल डाऊनलोड आणि गुगल ड्राईव्हमध्ये फाईल अपलोड करण्यास समस्या येत असल्याचे म्हटले आहे.

वाचाः

वाचाः

गुगलकडून तपास सुरू
गुगलच्या स्टेटज पेजच्या माहितीनुसार, याचा तपास सुरू आहे. तसेच लेटेस्ट अपडेटनुसार, गुगल मीट, गुगल व्हाइस आणि गुगल डॉक यासारख्या सर्विस युज केल्याने अडचण येत आहे. तसेच काही युजर्स यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करू शकत नाहीत. त्यांनाही अडचण येत आहे.

वाचाः

वाचाः

गेल्या महिन्यातही आली होती ही समस्या
गेल्या महिन्यात दोन वेळेस ही समस्या आली होती. गुगलच्या या प्रसिद्ध सर्विसमध्ये अडचण आली होती. गुगलच्या अकाउंटला लॉग इन करण्यास युजर्संना अडचण येत असल्याचे युजर्संनी म्हटले होते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण; CBI चं विशेष पथक मुंबईत येणार

5

नवी दिल्लीः अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर सीबीआय एसआयटीची बैठक सीबीआय मुख्यालयात सुरू आहे. दरम्यान, आता सीबीआय डीआयजी सुवेझ हक यांची सीबीआय आणि मुंबई पोलिसांमधील नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक आज संध्याकाळपर्यंत मुंबई दाखल होईल, असं सांगण्यात येतंय.

तपासणीचा एक भाग जवळजवळ पूर्ण झाला आहे. सीबीआयने बहुतेकांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये सुशांतच्या फायनान्सशी संबंधित स्टेटमेन्टचा समावेश आहे. याशिवाय सीबीआयने मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवरील आरोपांबाबतही जबाब नोंदवला आहे.

याशिवाय सीबीआय एसआयटीला मदत करण्यासाठी एक फॉरेन्सिक विज्ञान तज्ज्ञ आणि विश्लेषकांची एक टीम तयार केली गेली आहे. यासोबतच सीबीआयने या प्रकरणी मुंबई पोलिसांशी औपचारिक संपर्क साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआय सुशांत प्रकरणाची चौकशी करणार आहे. याशिवाय सीबीआयची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. यात सुशांतचा खटला कसा चालवायचा यावर चर्चा झाली आहे.

एसआयटी घोषणा

सीबीआयने सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी आधीच तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा करण्यात आली. एसआयटीचे अध्यक्ष सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर असतील. त्यांच्याशिवाय गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अतिरिक्त एसपी अनिल यादव हे या संघात सहभागी होतील. हे सर्व सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पंतप्रधान मोदी यांच्या पत्रावर धोनी नेमकं काय म्हणाला, पाहा….

3

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर जगभरातील चाहते, संघातील आजी-माजी खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)सर्व जण धोनीचे आभार व्यक्त करत आहेत आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. धोनीच्या शानदार करिअरचे कौतुक करणाऱ्यांमध्ये आता देशांचे यांचा देखील समावेश झाला आहे.

वाचा-

धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानावर पंतप्रधान मोदी यांनी एक पत्र लिहले आहे. या पत्रावर धोनीने मोदींचे आभार व्यक्त करणारी पोस्ट ट्विट केली. सोशल मीडियावर फार कमी सक्रीय असतो. पण निवृत्ती घेताना मात्र त्याने इस्टाग्रामचा आधार घेतला. आता देखील मोदींचे आभार व्यक्त करणारी पोस्ट करण्याआधीची धोनीची अखेरची पोस्ट फेब्रुवारी महिन्यातील होती.

वाचा- वाचा –

मोदींनी पाठवलेले पत्र धोनीने दोन फोटो मध्ये शेअर केले आहे. हे पत्र शेअर करताना तो म्हणतो की, प्रत्येक कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना कौतुकाची अपेक्षा असते. त्याना वाटत असते की त्यांची मेहनत आणि बलिदानाबद्दल सर्वांना माहित असावे. तुमच्याकडून देण्यात आलेल्या कौतुकासाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी!

काय म्हणाले मोदी पत्रात…
धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”

वाचा-
” धोनी, तुझ्या निवृत्तीमुळे १३० करोडो भारतीय निराश झालेले आहेत. पण गेल्या दीड दशकांमध्ये जे काही तु आम्हा सर्वाना दिले त्यासाठी देशवासीय तुझे आभारी आहेत. तुझ्या कारकिर्दीकडे जर आम्हाला पाहायचे असेल तर काही अंक किंवा आकड्यांचा चष्मा घालून आम्हाला पाहावे लागेल. तू भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सामील आहेस. देशाला जगभरात अव्वल स्थानावर नेण्याची भूमिका तू योग्यपणे वठवली आहेस. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझे नावं, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि कोणताही संकोच न करता सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये नक्कीच घेतले जाईल.”

वाचा-

मोदी यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ” कठीण परिस्थितीमध्ये आत्मनिर्भर कसे असावे, हे तू दाखवून दिले. त्याचबरोबर एखादा सामना संपवण्याची तुझी शैली खास होती. खासकरून तु २०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेली अविस्मरणीय खेळी. धोनी, तुला फक्त आकडेवारीमध्ये आम्ही लक्षात ठेवू शकत नाही, तर एकहाती सामना जिंकवण्यासाठी तू आमच्या मनात राहशील. एका लहान शहरामधून तू आलास आणि एवढं मोठं नाव कमावलं. आजच्या करोडो युवांसाठी तू नक्कीच एक प्रेरणा आहेस. स्वत:ला सर्वोच्च स्तरावर कसे घेऊन जायचे, याचा त्यांच्यापुढे तू नेहमीच आदर्श असशील.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

5

मुंबईः प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्यांनी सर्वेाच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. भाजप नेते यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुशांतसिंह प्रकरणावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. तसंच, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळं राज्य सरकार कोणालातरी वाचवण्यासाठी सीबीआयकडे हे प्रकरण सोपावण्यास तयार होत नसल्याचा टीका सातत्यानं विरोधकांकडून होत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपनं ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे,’ असं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. सुशांतच्या कुटुंबालाचा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. ठाकरे सरकारची दादागिरी आता संपेल. हे सरकार आतातरी धडा घेईल,’ असं सांगतानाच, ‘सुशांतसिंहच्या कुटुंबाला न्याय मिळेल,’ असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

११३ चेंडूंत ३१६ धावांची तुफानी खेळी साकारूनही क्रिकेटपटू ठरला टीकेचा धनी

4

आतापर्यंत बऱ्याच तुफानी खेळी तुम्ही पाहिल्या असाल, पण फक्त ११३ चेंडूंत ३१६ धावांची धडाकेबाज खेळी तुम्ही कदाचित पाहिली नसेल. पण अशी वादळी खेळी साकारल्यानंतरही क्रिकेटपटूवर जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले. नेमके प्रकरण आहे तरी काय, पाहा…

वाचा-

इंग्लंडचा क्रिकेटपटू ख्रिस हॉलिडेने फक्त ११३ चेंडूंत ३१६ धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीमध्ये ३४ षटकार आणि २१ चौकारांचा समावेश होता. ख्रिसच्या या दमदार खेळीमुळेच त्याच्या संघाला ३७८ धावांनी दणदणीत विजयही मिळवता आला. पण या सर्व गोष्टीनंतर ख्रिसवर जोरदार टीका झाल्याचेही पाहायला मिळाले.

वाचा-

ख्रिसची ३१६ धावांची खेळी ही अफलातून अशीच होती. यावेळी ख्रिसला हॉलेंडस्वाईन संघातील एस.पी. सिंहने ६२ धावांची खेळी साकारून चांगली साथ दिली. सिंहने आपल्या ६२ धावांच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार लगावले. ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती.

हा सामना एका लीगमध्ये खेळवला गेला होता. ज्यामध्ये सात संघांचा समावेश होता. ख्रिसने ३१६ धावांची खेळी साकारल्यावर बऱ्याच चाहत्यांनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. बऱ्याच चाहत्यांनी ख्रिसवर टीका करताना म्हटले की, ” ख्रिस आपल्या खेळीच्या सुरुवातीचा चांगल्या फॉर्मात होता. पण धडाकेबाज फलंदाजी केल्यावर त्याने निवृत्त व्हायला हवे होते.” यावर ख्रिसनेही चाहत्यांना उत्तर दिले आहे. ख्रिसने याबाबत खुलासा करताना सांगितले की, ” संघ व्यवस्थापनाकडूनच मला कायम खेळायला सांगितले होते. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मला घेता आला नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Airtel ची धमाका ऑफर, वर्षभर पाहा फ्री मध्ये टीव्ही

5

नवी दिल्लीः एअरटेल आपल्या निवडक एअरेटल टिजिटल टीव्ही सब्सक्रायबर्सला एक वर्षापर्यंत Xstream Premium प्लान फ्री ऑफर करीत आहे. कंपनी या फ्री ऑफरची माहिती आपल्या ग्राहकांना टेक्स मेसेज पाठवून देत आहे. ट्विटरवर अनेक युजर्संनी मेसेज मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच कस्टमर सपोर्टने याचे आणखी स्पष्टता देण्यास सांगितले आहे.

वाचाः

वाचाः

एअरटेलकडून पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजच्या माहितीनुसार, कंपनीने ३६५ दिवसांसाठी एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम प्लान अॅक्टिव केला आहे. या प्लानसोबत युजर्संना आपला एअरटेल एक्स्ट्रिम स्मार्ट स्टिक वर १००० हून अधिक मूव्हीज, टीव्ही शो आणि अन्य दुसरे कॉन्टेंटचा आनंद घेता येवू शकणार आहे. खास बाब म्हणजे काही नॉन एक्स्ट्रिम बॉक्स किंवा स्मार्ट स्टिक युजर्संना सुद्धा एअरटेल डिजिटल टीव्ही कडून मेसेज पाठवण्यात आले आहे.

वाचाः

वाचाः

ट्विटरवर आलेल्या काही बातमी शिवाय, OnlyTech फोरमने सांगितले की, एक्स्ट्रिम बॉक्स आणि नॉन एक्स्ट्रिम बॉक्स युजर्संना एअरटेलकडून हे मेसेज मिळत आहेत. काही युजर्संना हे मेसेज एकापेक्षा जास्त वेळा मिळाले आहेत. मेसेज मध्ये लिहिले आहे की, ‘Congratulations! Airtel offer for 365 has been successfully activated. Enjoy access to 10000+ movies, TV shows and more on Xstream Smart Stick.’

वाचाः

वाचाः

आता यासंबंधात काही स्पष्टता नाही की, १ वर्षापर्यंत मिळणाऱ्या या फायद्यात एअरटेल एक्स्ट्रिम स्मार्ट स्टिक युजर्ससाठी आहे की नाही. किंवा रेग्यूलर डीटीएच ग्राहकांना हा फायदा मिळणार आहे. DreamDTH ने सर्वात आधी याला प्रमोशनल संबंधी माहिती सार्वजनिक केली होती.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

आले रे आले! सांगलीतील चोर गणपतीचे चोरपावलांनी आगमन

5

म. टा. प्रतिनिधी ।

गणेश चतुर्थीपूर्वी तीन दिवस आधीच येणाऱ्या सांगली संस्थानच्या चोर गणपतीचे बुधवारी पहाटे आगमन झाले. करोना संसर्गामुळे भाविकांच्या गैरहजेरीत पुजाऱ्यांनी चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली. रात्रीच्या अंधारातच आगमन होत असल्याने याला असे म्हटले जाते. दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे यंदा करोना संसर्गामुळे चोरपावलांनी आगमन झाले.

दरवर्षी सांगलीत संस्थानच्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असतो. परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या चोर गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेशोत्सवाला सुरुवात होते. हा गणपती रात्रीच्या अंधारात येतो. रात्रीतच त्याची प्रतिष्ठापना होते. बहुतांश भाविकांना तो कधी आला याचा थांगपत्ताही लागत नाही. यामुळे त्याला चोर गणपती असे म्हटल्याची आख्यायिका सांगितली जाते. यंदा मात्र करोना संसर्गामुळे चोर पावलांनीच चोर गणपतीचे आगमन झाले.

वाचा:

मोजक्या पुजाऱ्यांनी पूजाअर्चा करून त्याची प्रतिष्ठापना केली. परंपरेनुसार साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या आहेत. तेव्हापासून या तशाच आहेत. दरवर्षी रंगरगोटीशिवाय त्यांना हात लावला जात नाही. दरबार हॉलमध्ये मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला या दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. ऋषीपंचमीच्या रात्री लळीत कीर्तनाने उत्सवाचा समारोप होतो. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवल्या जातात. दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन गणपती पंचायतन ट्रस्टने केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts