Wednesday, May 31, 2023
Home Blog Page 5784

Kolhapur crime: देवीच्या जागरासाठी आले होते कलाकार, जेवणात गुंगीचे औषध दिले अन्

0

म. टा. प्रतिनिधी, : देवीचा जागर घालण्यासाठी लातूरहून आलेल्या कलाकारांना जेवणात गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील रायतेवाडी या गावातील काही कलाकारांशी कोल्हापुरातील एका व्यक्तीने संपर्क साधून जागर करण्याचा कार्यक्रम निश्चित केला. त्यासाठी त्यांनी काही रक्कम ऑनलाइन अदा केली. ही रक्कम मिळाल्यानंतर नऊ कलाकार मंगळवारी कोल्हापुरात आले. ते गंजी गल्ली येथील एका खासगी यात्री निवासमध्ये उतरले. त्यांनी एका हॉटेलमधून जेवण मागवले. जेवल्यानंतर त्यांनी रात्री तेथेच मुक्काम केला.

या जेवणात अज्ञाताने गुंगीचे औषध घातल्याने सर्व जण बेशुद्ध पडले. रात्री त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटून अज्ञाताने पोबारा केल्याचे सकाळी उघडकीस आले. बराच वेळ रूमचा दरवाजा न उघडल्याने यात्री निवासचे मालक त्यांना जागे करण्यासाठी गेले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गुजर अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, करत असताना संबंधिताने त्यांचे मोबाइल फोडून तेथेच टाकल्याचे निदर्शनास आले आहे. कुंताबाई कवरे, द्रौपदी सूर्यवंशी यांच्यासह नऊ कलाकारांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

बिल्डरला धमकावले, छोटा राजन टोळीचा गुंड ६ वर्षांनी सापळ्यात

0

म. टा. प्रतिनिधी, : पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकाकडे २५ कोटी रूपयांची मागितल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या टोळीच्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात दिले आहे. फरार झाल्यानंतर तो कोंढव्यातील टिळेकर नगर परिसरात राहत असल्याचे समोर आले.

परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. टिळेकरनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एकूण २९ गुन्हे दाखल आहेत. त्याने पुण्यात अशा पद्धतीने कोणाला धमकाविले अथवा फसविले आहे का, याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांनी दिली. पनवेल येथील बांधकाम व्यवसायिक नंदू वाझेकर व आदित्य दाढे यांची पुण्यात मार्केटयार्ड परिसरात चार एकर जागा आहे. या जागेची आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून कुख्यात अश्विन नाईककडे गेला. त्यावेळी वाझेकर यांनी त्यांची कागदपत्रे दाखविली. त्यामुळे नाईकने त्याला हाकलून दिले. त्यानंतर आरोपी ठक्कर हा सुरेश शिंदे याच्याकडे गेला. शिंदेने छोटा राजनला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर वाझेकर यांना फोनवर छोटा राजनने २६ कोटी रूपयांची मागणी करून प्रकरण मिटवितो म्हणाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये ठक्कर, छोटा राजन, सुरेश शिंदे, अशोक निकम, सुमीत म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात आरोपींना कोर्टाने दोन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. ठक्कर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकला तो कोंढव्यातील थ्री ज्वेल्स कोलते पोटील येथे भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठक्कर याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्या ठिकाणी पत्नीसोबत तो राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन मुंबई सीबीआयच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे. देशात छोटा राजनच्या विरोधात दाखल असलेले सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयने त्यांच्याकडे घेतला होता. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे आहे. त्यामुळे आरोपी ठक्कर याला देखील मुंबईत सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

PM नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?, फोन नंबरपासून पत्त्यापर्यंत सर्वकाही जाणून घ्या

0

नवी दिल्लीः लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदारांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. परंतु, या हेल्पलाइनवर खासदारांपेक्षा सर्वसामान्यांकडून अधिक फोन येत आहेत. हेल्पलाइनवर फोन करताना अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोन नंबर मागत आहेत. अनेकांना मोदींना भेटायचे आहे. अनेकांना काही सूचना करायच्या आहेत. जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असल्यास या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.

वाचाः

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचण्याची साधी सोपी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आहे. तुम्ही मोदींच्या अधिकृत अकाउंटवरून तुम्ही तुमच्या भावना पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाउंट्स www.facebook.com/narendramodi
twitter.com/narendramodi
https://plus.google.com/+NarendraModi,
https://www.youtube.com/user/narendramodi
https://www.instagram.com/narendramodi हे आहेत. https://www.mygov.in/home/61/discuss/ या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार, शुभेच्छा आणि सूचना पाठवू शकतात. तसेच तुम्ही डिबेटमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच नरेंद मोदी अॅप (नमो अॅप) वरूनही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात.

वाचाः

ईमेल द्वारे तुम्ही पीएमपर्यंत पोहोचू शकतात. यासाठी पंतप्रधान कार्यालयाला connect@mygov.nic.in वर मेल करू शकता किंवा narendramodi1234@gmail.com वर ईमेल पाठवू शकता. जर तुम्हाला वरील सर्व प्रकारात काही अडचण येत असेल तर तुम्ही पीएम यांना पत्र लिहू शकता. वेब इनफॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011. या पत्त्यावर पत्र पाठवू शकता. जर तुम्हाला फोन नंबर किंवा फॅक्स करायचा असेल तर 011-23015603, 11-23018939, 011-23018668 वर फोन करु शकता किंवा
+91-11-23019545 या 23016857 वर फॅक्स करू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः



Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

BMCचा अर्थसंकल्प सादर; 'या' आहेत मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा

0

मुंबईः मुंबई महापालिकेचा २०२१- २०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर केला. यंदा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १६.७४ टक्के वाढ झाली आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. महापालिकेनं यंदा घरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्ष करोना संकटांशी दोन हात करण्यात गेलं त्यामुळं गतवर्षीच्या तुलनेत महसूल उत्पन्नात ६३६. ७३ कोटींनी घट झाली आहे.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांसाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
३९, ३८ ,८३ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी ३३, ४३४. ५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. दरम्यान, राज्य सरकारकडून पालिकेला ५२७४ कोटी १६ लाख रु. थकबाकी येणे बाकी असून त्यात शिक्षण खात्याकडून ३,६२८ कोटी ८३ लाख रुपयांचा समावेश आहे.

घरांना मालमत्ता कर नाही

पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता घरातील सर्वसाधारण करातून सूट देण्यात आलेली आहे. संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्यात आलेला नाही. त्यातील केवळ सर्वसाधारण कर माफ करण्यात आल्याचे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे.

वाचाः

आरोग्य बजेटमध्ये वाढ

वर्षाच्या सुरुवातीला करोनाचं संकट येऊन उभं राहिलं. या संकटाचा सामना करताना पालिकेला आरोग्य सुविधांवर सर्वाधिक खर्च करावा लागला होता. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा- सुविधांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढ करण्यात आली आहे. आरोग्य विभागासाठी ४ हजार ७६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०० कोटींची वाढ करण्यात आली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी ९६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, निधन झालेल्या कोविड योद्धांच्या कुटुंबीयांना ५० लाख सानुग्रह मदत देणार.

वाचाः

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

महत्त्वकांशी कोस्टल रोड प्रकल्पासाठी २ हजार कोटींची तरतूद

गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी

बेस्ट उपक्रमासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद

विविध सेवा शुल्क आणि छाननी शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

रखडलेल्या रुग्णालयाची दुरुस्ती करणार

नव्या रुग्णालयाची उभारणी

नर्सिंग स्कूलचे रुपांतर नर्सिंग कॉलेजमध्ये करणार

एमआरआयडीसीएल मार्फत १६७५ कोटी इतका अंदाजित खर्च असलेली १२ पुलांची कामे हाती

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Motorola Edge S चा जलवा. दोन मिनिटात विकले १० हजार फोन

0

नवी दिल्लीः मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ला युजर्संकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. ज्यात १० हजार फोनच्या विक्रीला फक्त दोन मिनिटांचा वेळ लागला. चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास २२ हजार ५०० रुपये आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन अमरल्ड ग्लेज आणि एमरल्ड लाइटमध्ये येते.

वाचाः

फोनची खास फीचर्स
फोनमध्ये 2520×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २१.९ आहे. हा ९० Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. जबरदस्त व्ह्यूइंग एक्सपिरियन्स साठी फोनमध्ये HDR 10 सपोर्ट मिळाला आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसर दिला आहे. या प्रोसेसर सोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये LPDDR5 रॅम दिली आहे जी LPDDR4 पेक्षा 72% फास्ट आहे. तसेच फोनमध्ये UFS 3.1 स्टोरेज दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा आणि एक टीओएफ कॅमेरा लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. अँड्रॉयड ११ वर चालणाऱ्या या फोनमध्ये पॉवर साठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

जिलेबी- फाफडानंतर मुंबईत 'रासगरबा'; शिवसेना भाजपला देणार धक्का?

0

मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरु केली आहे. गुजराती मतदारांना आकर्षक करण्यासाठी शिवसेनेनं काही दिवसांपूर्वी एक आयोजित केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे आणखी एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. तसंच, या सोहळ्यात २१ व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेया निवडणुकीसाठी भाजपनंही कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडत काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर, भाजपनं शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका हाती घेतली आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून असलेली शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपनंही मिशन मुंबई राबवलं आहे. तर, महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्याचा निर्धारही केला आहे. तर, एकीकडे शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी मोहिम आखण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेनं मुंबईतील गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी काही दिवसांवर मुंबई मा जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला गुजराती बांधवांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेकडून आणखी एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी ७ फेब्रुवारी रोजी मालाड येथे मेळावा आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात रासगरबाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच. याचवेळी २१ गुजराती उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करुन मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

या 'मेड इन इंडिया' टॅबवरून अर्थमंत्र्यांनी सादर केले बजेट

0

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचे बजेट २०२१ सादर केले. अर्थमंत्र्यांनी मेड इन इंडिया टॅबवरून बजेट सादर केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ट्विटरवर मेड इन इंडिया आणि आयपॅड ट्रेंड झाले आहे. अनेकांनी अंदाज बांधला होता की, अर्थमंत्र्यांनी अॅपलच्या मेड इन इंडिया टॅबलाइटवरून बजेट सादर केले. परंतु, आता दोन दिवसांनंतर याची माहिती उघड झाली आहे. बजेट २०२१ साठी भारतीय कंपनीचा टॅबलेटचा वापर करण्यात आला होता.

वाचाः

ज्या मेड इन इंडिया टॅबचा अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करण्यासाठी वापर केला आहे. तो टॅबलेट लावा (Lava) कंपनीचा आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. ज्या टॅबवरून बजेट सादर करण्यात आले आहे. तो टॅब लावा कंपनीचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी कटिंग सोबत ट्विट केले आहे. तो एक लावाचा टॅबलेट होता, असे सांगितले आहे. टॅबच्या फीचर्स संबंधी आणि किंमती संदर्भात अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. वृत्तमानपत्राचे कात्रण सोबत लावाच्या टॅबचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

वाचाः

लावाच्या अधिकृत वेबसाइटवर तीन टॅबलेटची यादी देण्यात आली आहे. ज्यात Lava T81N एक प्रीमियम टॅब आहे. याची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तसेच याची बॉडी मेटलची आहे. यात ५१०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE आहे. तसेच याशिवाय, Ivory Pop आणि Lava Magnum X1 टॅबला सुद्धा कंपनीच्या वेबसाइटवर पाहता येऊ शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

काय चाललंय काय? मृत कर्मचाऱ्याला तब्बल १२ वर्षे पगार

0

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महानगरपालिकेत मागील १२ वर्षांपासून एका मृत कर्मचाऱ्याच्या नावे वेतन काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी याच्या चौकशीचे निर्देश देत पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेत हिरामण फडके हे हनुमाननगर झोनमध्ये ऐवजदार म्हणून कार्यरत होते. १९९८मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण, २०२०पर्यंत फडके यांच्या नावे वेतन काढण्यात आले. महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश होले यांनी हा प्रकार महापौरांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकारासाठी एक अधिकारी जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यावर चौकशीअंती कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Jalgaon crime : पती-पत्नी, मुलगी गाढ झोपेत होते, पहाटे ६ दरोडेखोर बंगल्यात घुसले अन्…

0

प्रवीण चौधरी/ म. टा. प्रतिनिधी, : शहरातील रस्त्यावरील दौलतनगर परिसरात राहणाऱ्या एका स्टील व्यावसायिकाच्या घरी आज बुधवारी पहाटे ३ वाजता सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाच्या घरातून ३ लाखांची रोकड; तसेच २० लाख रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने लूटून पोबारा केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर दौलत नगरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हे लोखंडी सामान विक्री करणारे व्यापारी पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर पार्किंग आहे. वर दोन मजले आहेत. आज पहाटे तीन-सव्वातीनच्या सुमारास इटकरे कुटुंबीय गाढ झोपेत असताना, सहा दरोडेखोरांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. दरोडेखोरांनी चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांनी इटकरेंची पत्नी मनिषा यांचे तोंड दाबले. तर पिंटू इटकरे यांना चाकूचा धाक दाखवून घरातील किंमती वस्तू देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील ३ लाखांची रोकड आणि २० लाखांचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले. मुद्देमाल घेतल्यानंतर इटकरे यांना धमकावत हे सहाही दरोडेखोर पळून गेले.

या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी चेहरे कापडाने झाकले होते. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वातीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करताना त्यांनी बंगल्याच्या तळमजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाइल घेऊन तो खाली फेकून दिला.

या घटनेनंतर भेदरलेल्या इटकरे दाम्पत्याने दिवस उजडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर रामानंदनगर पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. इटकरे दाम्पत्याचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ३ तासाचा थरार CCTVमध्ये कैद

0

नाशिक: नाशिकमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दुकाने फोडून रोकड आणि मुद्देमाल लांबवल्याच्या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. मात्र, त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसते आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरट्यांनी मोबाइलचे दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नाशिकमध्ये चोरटे आणि घरफोड्यांना पोलिसांचे भय उरले नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. शहरातील दुकाने फोडून चोरी केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिक धास्तावले आहेत. काही दिवसांपूर्वीच चोरीची घटना घडली असताना, आता इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एक मोबाइल दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मोबाइल दुकान फोडून त्यातील लाखोंचा मुद्देमाल लांबवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास इंदिरानगर परिसरात कारमधून आले होते. त्यांनी गॅस कटरच्या साह्याने मोबाइलचे शटर तोडले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. चोरीचा हा प्रकार तब्बल अडीच ते तीन तास सुरू होता. या चोरीच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अवघ्या पाच दिवसांत याच परिसरात दुसऱ्यांदा अशा प्रकारे चोरी झाली आहे. मध्यरात्री चोरीच्या घटना घडत आहेत. हा प्रकार जवळपास तीन तास सुरू होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास येऊन चोरी करणाऱ्या टोळीने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. आता पोलीस चोरीच्या घटना रोखणार का? चोरट्यांच्या मुसक्या आवळणार का, हे पाहावं लागेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts