Sunday, June 4, 2023
Home Blog Page 5844

'या' गावात झाला पराभूत झालेल्या उमेदवारांचा नागरी सत्कार

0

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

निवडणूक कोणतीही असो, विजयी झालेल्यांची मिरवणूक काढतात, सत्कार केले जातात. पराभूत झालेल्यांवर तोंड लपून बसण्याची वेळ येते. मात्र, कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. आदर्शगाव पाटोद्याचे मुख्य प्रवर्तक भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते या पराभूत उमेदवारांना उमेद पुरस्कार देऊन पुन्हा लढ्याचे बळ देण्यात आले.

येथे अपना परिवार संस्थेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते व आपणा परिवार अध्यक्ष राजेंद्र गोरे यांची होती. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा पेरे पाटील यांच्या हस्ते उमेद हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पेरे पाटील यांच्या मुलीचाही त्यांच्या गावात पराभव झाला आहे. त्यांच्या या परभवाची मोठी चर्चा झाली होती. त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून संयोजकांनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले, ‘पराभुत उमेदवारांचा सत्कार करणारे मिरजगाव हे देशातील पहिलेच गाव असावे. मी आजपर्यंत खूप कार्यक्रमांना उपस्थिती लावली परंतु निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार करणे ही कल्पना आणि हा कार्यक्रम मी आजपर्यंत पाहिला नाही. यापुढे मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जाईल त्या ठिकाणी मिरजगावच्या उपक्रमाचे नाव निश्चितपणे घेईल. राजकारणात ठराविक वेळेनंतर निवृत्त होऊन तरुणांना संधी देणे काळाची गरज आहे. सध्या कोणाची जिरवायची किंवा प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढवायची अशी पद्धत पडली आहे. त्यासाठी मतं विकत घेतली जातात. अशी लोकशाही घातक आहे. या पार्श्वभूमिवर हा लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा आहे, असे मी मानतो,’ असेही पेरे पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण शिंगवी होते. मिरजगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील पराभूत उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

१२ वर्षीय मुलीसह दापम्त्याची सामूहिक आत्महत्या; अंभोऱ्यातील नदीत घेतली उडी

0

नागपूर: अंभोऱ्यातील वैनगंगानदीत ( in ) १२ वर्षीय मुलीसह दाम्पत्याने उडी घेऊन केली (). ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), त्यांच्या पत्नी सविता (वय ३५) व मुलगी समता (वय १२ तिन्ही रा. अनमोलनगर,वाठोडा), अशी मृतकांची नावे आहेत. श्याम हे संत जगनाडे कॉपरेटिव्ह सोसायटीत लेखापाल, तर समता ही सहाव्या वर्गात शिकत होती. तर, सविता या गृहिणी होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारनवरे यांचे अनेक नातेवाइक कुही भागात राहातात. शनिवारी सायंकाळी तिघे मोटरसायकलने अंभोऱ्यातील मंदिराजवळ आले. त्यानंतर त्यांनी वैनगंगा नदीत उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शीला मोटरसायकल तेथे उभी दिसली. त्याने वेलतूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

रात्र झाल्याने पोलिसांना मृतदेह शोधण्यात अडचणी येऊ लागल्या. रविवारी सकाळी पोलिसांनी नदीत मृतदेह शोधण्यास सुरू केली. दुपारच्या सुमारास पोलिसांना तिघांचे मृतदेह आढळले. मृतदेहांचीओळख देखील पटली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

तिघांनीही एकमेकांचे हात ओढणीने बांधले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत काही दिवसांपासून श्याम तणावात होते,अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव, प्रत्यक्ष बागेत जाऊन घ्या आस्वाद!

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्यटन संचालनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त () जुन्नर येथे द्राक्ष महोत्सवाचे (Grape Festival) आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष बागेत जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ()

करोनामुळे पर्यटन व्यवसायामध्ये अडचणी आल्या असताना, पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याबाबत पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या, ‘द्राक्ष बागायतदारांच्या सहकार्याने हा महोत्सव होणार असून, त्यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन द्राक्षांचा आस्वाद घेता येणार आहे; तसेच वाइन कशी तयार करतात, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल असणार असून, पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ आणि वस्तूंची खरेदी करता येणार आहे’

क्लिक करा आणि वाचा-

‘महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेज येथील निवासस्थान आणि स्थानिक हॉटेल येथे पर्यटकांना सवलतीच्या दरात निवासाची व्यवस्था असणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये पर्यटकांनी सहभागी व्हावे’ असे आवाहन करमरकर-दातार यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नवा महिना नवे बदल ; जाणून घ्या उद्यापासून होणारे हे बदल

0

मुंबई : उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होणार असून १ तारखेपासून काही बदल होणार आहेत. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तर रेलवे सेवा, विमान सेवा, एटीएम आणि घरगुती गॅस सिलिंडर याबाबत लागू होणार आहेत. एक फेब्रुवारीपासून सहा नियम बदलणार आहेत. ज्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होईल. नव्या बदलांनी दिलासा मिळणार असला तरी या बदलांनाअनुसरून निर्णय घेतले नाही तर आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते.

अर्थसंकल्प सादर होणार
दिल्लीत शुक्रवारपासून संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु झाले आहे. १ फेब्रुवारी म्हणजेच उद्या सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेपुढे सादर करतील. यंदा पहिल्यांदाच बजेटची छपाई करण्यात आलेली नाही. बजेट पेपरलेस असणार आहे. या बजेटमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षभर करोनाने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात सरकार नोकरदार वर्गाला कर सवलत देण्याची शक्यता आहे.

पीएनबी बँकेच्या ग्राहकांसाठी एटीएम बाबत महत्वाचा बदल होणार
पंजाब अँड नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी उद्या १ फेब्रुवारीपासून महत्वाचा बदल होणार आहे. आर्थिक फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. उद्यापासून पीएनबी ग्राहक नॉन ईएमव्ही एटीएममधून व्यवहार करू शकणार नाहीत. यापूर्वीच बँकेने याबाबत ग्राहकांना कळवले होते. नॉन ईएमव्ही एटीएममधून पीएनबीचे ग्राहक सोमवारपासून पैसे काढून शकणार नाहीत.

महागण्याची शक्यता पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याला एलपीजी सिलिंडरच्या दराचा आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील इंधन दर आणि आयात खर्च यानुसार देशांतर्गत इंधनाचा दर कंपन्या निश्चित करतात. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी इंधन दर वाढवले होते. त्यामुळे १ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

तब्बल १० महिन्यांनंतर रेल्वेकडून खानपान सेवा करोना संकट आणि त्यानंतर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे भारतीय रेल्वेने ई-कॅटरिंग अर्थात खानपान सेवा बंद केली होती. ती आता १० महिन्यांनंतर सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीपासून ई कॅटरिंग सेवा सुरु होणार असल्याचे रेल्वेने म्हटलं आहे. सुरुवातीला निवडक प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर ही सेवा सुरु केली जाणार आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या सेवांचा विस्तार सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सेवा विस्ताराची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते २७ मार्च या दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज उड्डाण घेणार आहे. त्याशिवाय कुवेत, विजयवाडा, हैद्राबाद, मंगलोर, कोझीकोड, कुन्नूर, कोची या सेवांचा समावेश केला जाणार आहे.

ओटीपी आणि आयरिसनुसार मिळणार रेशन रेशन घेणाऱ्यांसाठी आता आपला नोंदणीकृत मोबाइल सोबत ठेवावा लागणार आहे. कारण उद्यापासून अन्नपूर्णा आणि अंत्योदय कार्डधारकांना बायोमेट्रिकनुसार रेशन दिले जात होते. यात उद्यापासून बदल होणार आहे. नव्या नियमावलीनुसार मोबाइल ओटीपी आणि आयरिस कोड रेशन घेण्यासाठी आवश्यक असेल. तेलंगणा राज्यात ही नवीन पद्धत लागू केली जाणार आहे. सध्या करोना संकटामुळे सरकारने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बंद केले आहे. रेशन प्राप्त करण्यासाठी कार्डधारकांनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गुजरात फॉरेन्सिक टीम दिल्लीत, हिंसाचाराच्या ठिकाणाची केली पाहणी

0

नवी दिल्ली: गुजरातमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने रविवारी मध्य दिल्लीतील आयटीओ जंक्शनच्या आसपासच्या भागाला भेट दिली. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला त्या ठिकाणांपैकी आयटीओ एक आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL) पथक मंगळवारी ४०० वर्ष जुन्या मोगल काळातील लाल किल्ल्याला भेट देईल. ज्या ठिकाणी २६ जानेवारीला हिंसाचार झाला होता. शेतकऱ्यांचा एक गट ट्रॅक्टर रॅलीच्या नियोजित मार्गापासून दूर जात लाल किल्ल्याच्या आवारात पोहोचला होता. हिंसक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवला होता.

पोलिसांकडून आंदोलकांना सतत शांततेचं आवाहन करण्यात येतं होतं. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. आंदोलकांनी लाल किल्ल्यात तोडफोड केली. यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष दिसून आला. पोलिस, सीआरपीएफ आणि आरएएफचे जवान मोठ्या प्रमाणात जमलेल्या शेतकऱ्यांसमोर काहीही करू शकले नाहीत. आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह लाल किल्ल्यात प्रवेश केला.

आयटीओ जंक्शन हे दिल्लीच्या व्हीआयपी झोनपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी एका आंदोलकाचाही मृत्यू झाला. भरधाव ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली येऊ त्याचा मृत्यू झाला. हा शेतकरी उत्तर प्रदेशातील रामपूरचा होता.

ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३८ गुन्हे दाखल केले असून ८६ जणांना अटक केली. हिंसाचारात सामील असलेल्यांना ओळखण्यासाठी १७०० पेक्षा अधिक मोबाइल फोन व्हिडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. आयटीओ परिसरात शेतकऱ्याच्या मृत्यूवरून चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि काही पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Syed Mushtaq Ali Trophy Final : दिनेश कार्तिकच्या तामिळनाडूची जेतेपदला गवसणी, बडोद्यावर मिळवला विजय

0

अहमदाबाद : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडूच्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. तामिळनाडूने भेदक गोलंदाजी करत बडोद्याच्या संघाला १२० धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूने तीन विकेट्स गमावत हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आणि जेतेपद पटकावले.

तामिळनाडूने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार दिनेश कार्तिकचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण तामिळनाडूने यावेळी बडोद्याच्या संघाला २० षटकांत १२० धावाच करु दिल्या. खासकरून तामिळनाडूचा फिरकीपटू मनिमरम सिद्धार्थने यावेळी भेदक गोलंदाजी केली. सिद्धार्थने यावेळी आपल्या चार षटकांत २० धआवा देत चार विकेट्स मिळवले आणि बडोद्याच्या संघाचे कंबरडे मोडले.

बडोद्याच्या डावाची सुरुवात यावेळी चंगली झाली नाही. कारण दुसऱ्याच षटकात बाबा अपराजितने निनाद राथवाला बाद करत बडोद्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर बडोद्याचा कर्णधार केदार देवधरही बाद झाला आणि त्यानंतर बडोद्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सिद्धार्थने यावेळी केदारला बाद करत आपला पहिला बळी मिळवला.

बडोद्याची १ बाद २२ वरुन यावेळी ६ बाद ३६ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी बडोद्याचा संघ हा शंभर धावांचा टप्पा तरी ओलांडणार का, असा प्रश्न काही जणांनी पडला होता. पण त्यानंतर बडोद्याचा विष्णू सोळंकी हा संघासाठी धावून आला. सोळंकीला यावेळी अतित सेठची चांगली साथ मिळाली. सोळंकी आणि सेठ यांनी यावेळी सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच बडोद्याच्या संघाला १२० धावांपर्यंत मजल मारता आली.

सोनू यादवने यावेळी ही जोडी फोडली. सोनूने अतित सेठला बाद केले आणि ही स्थिरस्थावर झालेली जोडी फुटली. अतितने यावेळी ३० चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २९ धावा केल्या. सोळंकीचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. अखेरच्या षटकात मोठा फटका मारताना सोळंकी बाद झाला. सोळंकीने यावेळी ५५ चेंडूंत १ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४९ धावांची खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शिवजयंतीला शिवनेरी गडावर शिवभक्तांनी गर्दी करू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळला नसल्याने शिवजयंतीला (Shiv Jayanti) शिवनेरी गडावर (Shivneri Fort) शिवभक्तांनी गर्दी करू नये. सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि सुरक्षित वावर या त्रिसुत्रींचे पालन करून उत्सव साधेपणाने साजरा करावा’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. (devotees of should not crowd on on says district collector)

शिवनेरी गडावर होणाऱ्या शिवजयंती उत्सवाची जुन्नर नगरपालिका; तसेच बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग आणि पुरातत्त्व या विभागांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत गडावर करण्यात येणारी विद्युत व्यवस्था आणि रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था याबाबतचा आढावा घेण्यात आला. बैठकीला आमदार अतुल बेनके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘करोनाचा धोका टळलेला नसल्याने शिवजयंतीला शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांनी थर्मल स्कॅनिंग करावे; तसेच सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित वावर याबाबतच्या नियमांचे पालन करावे’

क्लि करा आणि वाचा-

‘शिवजयंतीला दरवर्षी गडावर शिवभक्त हे शिवज्योत घेऊन येत असतात. त्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी शिवज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांना बनकर फाटा आणि आळे फाटा या ठिकाणी शिवज्योत उपलब्ध करून दिल्यास एकाच वेळी गडावर होणारी गर्दी टाळता येईल’ अशी सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

नव्या कृषी कायद्यांवरून शरद पवारांना तोमर यांचे प्रत्युत्तर, म्हणाले….

0

नवी दिल्लीः नव्या कृषी कायद्यांवरून ( new ) केंद्रीय कृषीमंत्री ( ) यांनी माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( ) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तिन्ही नवीन कृषी कायद्यांबाबत शरद पवारांसमोर अतिशय चुकीची माहिती मांडली गेले आहेत. पण आता त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते आपली भूमिका बदलतील. तसंच या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत त्यांना सखोल माहिती दिली आहे, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी केंद्रीय कृषीमंत्रीही आहेत. शरद पवार यांना कृषी क्षेत्रातील समस्या आणि त्यातील प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांनीही असेच कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न केला होता, असं तोमर म्हणाले. शरद पवार यांच्यापर्यंत कायद्यांसंबधी चुकीच माहिती गेली आहे. पण आता त्यांना योग्य माहिती दिली गेली आहे. आता ते आपली भूमिका बदलतील आणि कायद्यांचे समर्थन करतील, अशी अपेक्षा आहे. या नवीन कृषी कायदांचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, हेही आपण सांगितलं आहे, असं तोमर म्हणाले.

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपले कृषी उत्पन्न विकण्यासाठी आणखी पर्याय निर्माण होतील. त्यांना आपलं उत्पन्न कुठल्याही अडचणींशिवाय कुठेही आणि कोणालाही विकता येऊ शकेल. राज्याबाहेरही ते उत्पन्न विकू शकतील. यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगला भाव मिळेल. नवीन कृषी कायद्यांचा सध्याचा किमान आधारभूत किंमतीवर (MSP) कुठलाही परिणाम होणार नाही. एमएसपी सुरूच राहील, असं नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं.

नव्या कृषी कायद्यांचा कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कुठलाही विपरित परिणाम होणार नाही. उलट बाजार समित्या अधिक स्पर्धात्मक होतील आणि चांगली सेवा आणि पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळतील. बाजार समित्या आणि त्यांच्या सर्व सेवा शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरूच राहतील, असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं.

नवीन कृषी कायद्यांवर काय म्हणाले शरद पवार?

नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपीवर विपरित परिणाम होईल. बाजार समित्या कमकुवत होतील. नवीन कायद्यांमुळे एमएसपीवर शेतमाल खरेदी करण्याच्या यंत्रणेवर विपरित परिणाम होईल. यामुळे एमएसपी निश्चित करणं आणि ही व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी शनिवारी ट्विट करत म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

corona latest updates: चिंतेत भर; करोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होण्याऱ्यांचा आकडा कमी

0

मुंबई: राज्यात आज दिवसभरात एकूण ४० () बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ५८५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १ हजार ६७० रुग्ण करोनावर मात करून आज घरी परतले आहेत. काल प्रमाणे आज देखील नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी असल्याने चिंतेत काहीशी भरच पडली आहे. (total of 40 corona infected patients died in the state today)

तर, दुसरीकडे दैनंदिन रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता ४४ हजारांवरून ४५ हजाराच्या पुढे गेला आहे.

राज्यात आज दिवसभरात एकूण ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ५८५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १ हजार ६७० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख २९ हजार ००५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९५.१९ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २६ हजार ३९९ (१३.९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला आहे. परवा ४३ हजार असलेली ही संख्या काल ४४ हजारांवर गेली होती. त्यात आज आणखी वाढ होऊन ही सख्या ४५,०७१ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक १३ हजार ८७२ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ७ हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५ हजार ८०० पर्यंत पोहोचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मागील सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला; डॉ. तात्याराव लहानेंचा गौप्यस्फोट

0

म.टा. प्रतिनिधी, नगर

‘सरकारी नोकरीत असताना मला चांगल्या कामाबद्दल पद्मश्री पुरकास्कार मिळाला. तरीही मागील सरकारच्या काळात खूप त्रास झाला. त्यावेळी विरोधीपक्ष नेते असलेल्या () यांचा मोठा आधार मिळाला, त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू शकलो,’ असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ (Dr. ) केला. ‘माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य आपण मुंडे यांना देऊ इच्छितो,’ असेही लहाने म्हणाले. (I suffered a lot during the previous government says . Tatyarao Lahane)

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वंजारवाडी येथील संत वामनभाऊ – संत यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. लहाने यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. लहाने बोलत होते.

मागील सरकारच्या काळात अधिष्ठाता असताना डॉ. लहाने यांना अनेक अडचणी आणि सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला होता. यावेळी झालेल्या त्रासाची आठवण त्यांनी भाषणातून सांगितली. तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी मुंडे यांचे मात्र कौतूक केले.

डॉ. लहाने म्हणाले, ‘गेल्या सरकारच्या काळात मला काही अडचणी आल्या. त्यावेळी मला मोठा त्रास सहन करावा लागला. मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मुंडे यांनी मोलाची मदत केली. सभागृहासह सर्व पातळ्यांवर माजी बाजू लावून धरली. त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू शकलो. निरपेक्ष प्रेम कसे करावे, आपल्या माणसांना कसे जपावे हे त्यांच्याकडून शकले पाहिजे. ते आता मंत्री झालेत. मी सरकारी नोकर आहे, तरीही ते माझी आशिर्वाद खाली वाकून घेतात, हे त्यांचे मोठी पण आहे. आम्ही दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळावे, अशी आपण प्रार्थना करतो.’

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले, ‘डॉ. लहाने यांच्यासारख्या जगविख्यात नेत्रतज्ज्ञाला माझ्या हस्ते पुरस्कार दिला जातो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. डॉ. लहाने आमचे नातेवाई आणि परळीचे जावई असल्याने आमच्यासाठी ते नेहमीच आदरस्थानी आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जातीवाचक नावे असलेल्या वाड्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंजारवाडीच्या लोकांनी एका थोर महापुरुषाचे नाव घेऊन तसा ठराव करावा,’ अशी सूचनाही मुंडे यांनी केली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts