Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5847

पँगाँग सरोवरावर चीन आडून बसला, भारताने दिला हा ठोस संदेश

5

नवी दिल्लीः भारत आणि चीनमधील सीमा विवादावरील तणाव कायम आहे. पँगाँग लेकवरील चर्चेपासून चीन दूर पळतोय. या मुद्द्यावर चर्चेची मागणी भारताने केलीय. पण चीनने नकार दिला आहे. १४-१५ जूनला झालेल्या चौथ्या फेरीच्या चर्चेच्या वेळी ही बाब समोर आली. पँगाँग लेकवर बोलणी करण्यास चीन इच्छुक नसल्याचं दिसून आलं. आता दोन्ही देशांमध्ये पँगाँग लेक वादाचे केंद्र बनले आहे.

गलवान खोऱ्यात गोगरा पोस्ट येथील पेट्रोल पॉईंट 17 ए येथील चिनी सैनिकांची तैनाती कमी झाली आहे. पण पँगॉंग सरोवराच्या चिनी सैनिक अजूनही ठाण मांडून आहेत. आणि हेच भारतासाठी चिंतेचं कारण ठरलं आहे. चर्चेदरम्यान चीन पँगाँग सरोवरार बोलण्यास नकार देत असल्याने चीनचे मनसुबे स्पष्टपणे समोर आले आहेत.

गेल्या आठवड्यात दोन घडामोडी झाल्या. सीमेवरील तणावाच्या भागातून चिनी सैनिग मागे हटवण्याची प्रक्रिया पूर्ण केलीय. आणि चीन पँगाँग फिंगर कॉम्प्लेक्स येथे मार्गावर आहे, असं भारतातील चिनी राजदूत गेल्या आठवड्यात म्हणाले होते. चीनला यापुढे या विषयावर तणाव वाढवायचा नाही, हा चीनचा थेट संकेत आहे. हा झाला पहिला मुद्दा.

गेल्या तीन आठवड्यांत अक्साई चीन येथे चीनने अनेक ठिकाणं सक्रिय केली आहेत. म्हणजे, कुठल्याही कारवाईसाठी चिनी सैनिक तयारीत आहेत. तसंच पँगाँग सरोवराच्या मुद्द्यावर चीन चर्चेस इच्छुक नसल्याने भारतीय सैन्य ही पूर्णपणे सतर्क आहे. तसंच पँगाँगवर चर्चा केल्याशिवाय दोन्ही देशातील चर्चा पुढे सरकारणार नाही, असंही भारताने स्पष्ट केलं आहे. भारतीय सैन्याचे लेह कॉर्प्सचा कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनचे मेजर जनरल लिन लिऊ यांच्यात रविवारी चर्चेती पाचवी फेरी होणार असल्याची पुष्टी शनिवारी संध्याकाळी उशिरा करण्यात आली. पँगाँग सरोवराशिवाय दोन्ही देशांतील दुसऱ्या चर्चेचा मुद्दा डेपसांगचा आहे. डेपसांगमध्ये चीनने सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसंच त्यांच्या वाहनांची वाहतुकीह वाढली आहे.

भारत-चीन सैन्यात कटुता

गेल्या तीन महिन्यांत भारत-चीनच्या लष्करी संबंधात कटुता निर्माण झाली आहे. शनिवार १ ऑगस्ट हा पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) दिन होता. पण चुशुलमध्ये भारत-चीन सीमा कर्मचार्‍यांची बैठक (बीपीएम) शनिवारी झाली नाही. इस्टर्न कमांडकडून शुभेच्छा दिल्या गेल्या. परंतु कोरोना प्रोटोकॉलमुळे कोणतीही भेटवस्तू दिली गेली नाही, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

चिनी सैनिकांच्या जमावाची बातमी खोटी आहे

लिपुलेख आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक तैनात केल्याचं वृत्त खोटं आहे. तिथेही कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी जवानांची तैनाती केली जात आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं इंडिया टुडेने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना करोना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं ट्विट

5

नवी दिल्लीः देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. भारतात रुग्णसंख्येनं तब्बल १७ लाखांचा आकडा पार केला आहे. सर्वसामान्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनीही करोनानं गाठलं आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षण आढळल्यानंतर त्यांनी करोना टेस्ट केली होती. त्या करोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचं कळताच राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांनीच त्यांना लवकरच बरे वाटेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत अमित शहा लवकरच बरे होऊन येतील व तेवढ्याच जोमानं कामालाही लागतील, असे म्हटलं आहे.

अमित भाई, तुम्ही लवकर बरे होऊन याल व नेहमीप्रमाणे त्याच जोमानं या करोनाच्या परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन कराल, अशी आशा करतो, असं ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शहा तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे व्हाल, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं म्हटलं आहे.

तुम्ही लवकरच करोनावर मात कराल, यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करू, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमित शहा तुम्ही लवकरात लवकर स्वस्थ होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल, अशी इच्छा व्यक्त करतो. माझ्यासह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत, अशी कळकळ भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा कार्यरत व्हा, अशी इच्छा व्यक्त करतो. माझे श्रद्धास्थान रामेश्वराच्या चरणी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आयपीएलचा बिगुल वाजला; १९ सप्टेंबरपासून सामने, सरकारची मंजुरी

5

नवी दिल्लीः इंडियन प्रीमियर लीग (IPL) च अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेला अखेर भारत सरकारने मान्यता दिली आहे. ही स्पर्धा युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर १० नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. संघांमध्ये २४-२४ खेळाडूंचा समावेश असेल. दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीगच्या संचालन समितीने युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान कोविड -१९ रिप्लेसमेंटला मान्यता दिली. बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या स्पर्धेत १० दुहेरी म्हणजे दिवसातून दोन सामने खेळवले जाणार आहेत. संध्याकाळच्या सामन्यांची सुरुवात साडेसात वाजता (भारतीय वेळेनुसार) होईल. आयपीएल स्पर्धा आणखी एक आठवडा पुढे वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. म्हणूनच १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल होणार आहे. कठोर प्रोटोकॉल लक्षात घेता सामन्यांमध्ये चांगले अंतर असेल. यामुळे दिवसातून दोन सामने होतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

‘१० नोव्हेंबरपर्यंत आयपीएल होईल. म्हणूनच पहिल्यांदा विकएंड नाही तर विक डेमध्ये फायनल होत आहे. वाहतूक, बायो-सिक्योरीटी आणि अशा सर्व बाबी लक्षात घेता सामन्यांमध्ये बरेच अंतर ठेवण्यात आले आहे. या हंगामात १० डबल हेडर म्हणजे दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे सामने साडेसात वाजता सुरू होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

नाणे गिळल्याने मुलाचा मृत्यू, दाखल करून न घेतल्याचा रुग्णालयावर आरोप

5

कोची: एका तीन वर्षांच्या मुलाने एक गिळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केरळमझील अलुवा शहराजवळ असलेल्या कदुंगल्लूर परिसरात घडली. मुलाने नाणे गिळल्यानंतर त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. हा मुलगा कोविड -१९ प्रतिबंधित क्षेत्रातून आला असल्याने मुलाला प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आरोग्य मंतरी शैलजा यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

या प्रकरणात रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिसल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. हा मुलगा अलुवाजवळ असलेल्या कदुंगल्लुरचा रहिवासी आहे. आणि हा भाग कोविड -१९ प्रतिबंधित क्षेत्रात येतो. नाणे गिळण्याची घटना शनिवारी सकाळी घडली, त्यानंतर मुलाच्या पालकांनी त्याला अलुवा शासकीय रुग्णालयात नेले. तेथे एक्स रे काढण्यात आला.

या मुलाला दाखल करून न घेतल्याचा या सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे. भरती न केल्याचा आरोप आहे. मात्र, या रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्यामुळे मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही आणि त्याला एर्नाकुलम जनरल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असा दावा एका वरिष्ठ डॉक्टरने केला आहे. तेथील डॉक्टरांनी मुलाची तपासणी केली आणि त्याला उत्तम वैद्यकीय सेवेसाठी आलप्पुझा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, त्याला तेथेही दाखल करून घेण्यात आले नव्हते.

वाचा:
मुलाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. मात्र मुलाला फळ खाण्यास देण्याचा सल्ला डॉक्टरांनी पालकांना दिल्याचे समजते. असे केल्यास नाणे शौचावाटे बाहेर पडेल ही त्या मागील कल्पना होती. त्यानंतर पालकांनी मुलाला घरी परत नेले. मात्र, संध्याकाळपर्यंत मुलाची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्याला अलुवा शासकीय रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

वाचा:

शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. कोविड -१९ चाचणीसाठी बाळाच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

दूध उत्पादकांना राज्य सरकार मदत करणार; जयंत पाटील यांची ग्वाही

5

म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘करोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला. यातून दुधाचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतक-यांना मदत केली जात आहे. दूध संघांकडून दूध खरेदी सुरू असून, दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत,’ असे जलसंपदा मंत्री यांनी सांगितले. ते रविवारी सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दूध दर आंदोलनांबाबत विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. शेतक-यांचे प्रश्न निदर्शनास आणून देणे किंवा त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही चांगलीच बाब आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आंदोलनाची भूमिका अयोग्य नाही. करोना संसर्गाने उद्भवलेल्या प्रश्नांमुळे दूध दराचे संकट अधिक वाढले. केंद्र सरकारनेही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी राज्य सरकारने मागणी केली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने दूध उत्पादकांना मदत देणे सुरू केले आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देणा-या दूध संघांची दूध खरेदी सुरू केली आहे. याशिवाय दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू आहेत.’

वाचाः

दरम्यान, भाजपसह मित्र पक्षांनी शनिवारी केलेल्या दूध दरवाढ आंदोलनात दूध रस्त्यावर ओतल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल झाला. बंदी आदेशाचा भंग करून दुधाचे नुकसान केल्याबद्दल इस्लामपूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचाः

पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचा मोठा परिणाम

दुधाच्या खरेदी दर वाढवून मिळावा, त्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकरी संघटनांसह भाजप व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

भूमिपूजनावरून मुख्यमंत्री ठाकरेंवर असभ्य भाषेत टीका, संत समितीचा तोल सुटला

5

नवी दिल्लीः राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना आता अखिल भारतीय संत समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना असभ्या भाषेचा प्रयोग केला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री यांनी दिला होता. यावरून हिंदू साधू-संतांच्या अखिल भारतीय संत समितीने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य वारशावर उद्धव ठाकरे यांनी कब्जा केला आहे. उद्धव ठाकरे कॉन्व्हेंट शाळेत शिकलेत. त्यांना काय माहिती व्हर्च्युअल आणि वास्तविक पूजेतला फरक, अशी टीका करताना असभ्य भाषेचा वापर अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रनंद सरस्वती यांनी केलाय. वडिलांच्या वारशावर पात्रता नसलेला मुलगा बसला आहे. त्याना धर्म- आध्यात्माची भाषा ही राजकारणाचीच भाषा वाटतेय. हे अतिशय दुःखद आहे. इटालियन बटालियनच्या आश्रयाला गेल्याने या पेक्षा वेगळं काय होणार आहे. अपात्र असलेल्या मुलाने वडिलांच्या वारशावर ताबा मिळवला असून राजकीय आणि धर्मिक भाषेची तुलना केली जात आहे. इतरांच्या ( इटालियन बलटालियन ) आश्रयाला गेल्याने अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार, असं सरस्वती म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम राम मंदिराला पाठिंबा दिला, असं म्हणत जितेंद्रनंद सरस्वती यांनी बाळासाहेबांची स्तुती केली. उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे महान व्यक्ती होते. पण उद्धव ठाकरेंचे शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले. यामुळे त्यांना काय कळणार वास्तविक भूमिपूजन आणि व्हर्च्युअल भूमिपूजेतला फरक. भूमिपूजन मातृभूमीला स्पर्श न करता कसे काय पूर्ण होऊ शकते? असा सवाल सरस्वती यांनी केला.

राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला अनेक उद्योगपती ही येणार आहेत. राम मंदिर उभारण्यात त्यांचाही हातभार असणार आहे. आताची अयोध्य ही भविष्यातील भारताची अध्यात्मिक राजधानी असणार आहे. यामुळे भूमिपूजन बदल स्वीकारणं अशक्यच आहे. कार्यक्रमाला अनेक उद्योगपती येणार आहेत. त्यांनी अयोध्येचं रुपडं बदलावं. अयोध्येत राम राज्याची अनुभूती करून द्यावी. हेच या भूमिपूजनाचे उद्दीष्ट आहे, असं सरस्वती म्हणाले.

काशी आणि मथुरेतील मंदिरांबाबतही सरस्वतींनी मत मांडलं. राम जन्मभूमीनंतर कृष्ण जन्मभूमीचाही कायापलट होईल. अयोध्येचं स्वरुप बदलत असताना काशी आणि मथुरा काही वेगळे नाहीत. अयोध्या, काशी आणि मथुरा ही तीन मंदिरं आपल्या हवी आहेत. यासंदर्भात चर्चा होईलच, असं ते म्हणाले. सनातन हिंदू समाज आणि हिंदू समाजाच्या बळकटीसाठी शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने मंदिराची भूमिका काय असेल हे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट निश्चित करेल, असं सरस्वती म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

दिवसभरात तब्बल ९ हजार ९२६ रुग्ण करोनामुक्त; 'हा' टक्का दिलासादायक

5

मुंबईः राज्यात आज पुन्हा एकदा एकाच दिवशी ९ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात करण्यास यश मिळवले आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून ९ हजार ९२६ रुग्ण करोना विरुद्धची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७६ हजार ८०९ रुग्णांनी करोनाला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery rate) ६२.७४ % इतके झाले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

वाचाः

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९ हजार ५०९ रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २९० जणांचा करोनानं मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाचाः

राज्यात दिवसभरात २९० करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण करोना रुग्णांचा आकडा १५ हजार ५७६ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ९ हजार ५०९ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ९,२५,२६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,९४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. असंही ते म्हणाले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मोदींचा अयोध्या दौरा असेल पूर्णपणे धार्मिक; कोणतीही सरकारी घोषणा नाही

5

नवी दिल्ली: यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर सतत टीकास्त्र सोडण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा पूर्णपणे धार्मिक दौरा असेल हे स्पष्ट झाले आहे. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा कार्यक्रम आहे. या ट्रस्टने या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी स्वत: केवळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मर्यादित भाग घेतली. याचा अर्थ भूमिपूजनाव्यतिरिक्त ते कोणतीही सरकारची घोषणा करणार नाहीत. सर्व सरकारच्या घोषणा या नंतर केल्या जाणार आहेत.

५ ऑगस्टला अयोध्येत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम हनुमानगढी येथे भेट देत तेथे नतमस्तक होतील. हनुमानगढी येथे पंतप्रधान केवळ 7 मिनिटांचा अवधी देणार आहेत. यात पंतप्रधानांचे आगमन आणि निघून जाणे यांचा समावेश आहे. येथे पंतप्रधान पूजेसाठी सुमारे ३ मिनिटे इतकाच कालावधी घेतील.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ११.१५ वाजता अयोध्येत पोहोचतील. ते येथे सुमारे तीन तास मुक्काम करतील. दुपारी अडीच वाजता पंतप्रधान अयोध्याहून निघतील. दरम्यान, हनुमानगढीमध्ये पूजेची तयारी सुरू करण्यात आली आहे. एसपीजीची टीम आणि प्रशासकीय अधिकारी हनुमानगढी येथे पोहोचले आहेत. ते येथे सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.

वाचा:

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजन्मभूमीच्या भूमिपूजनामध्ये सर्व धर्म, पंथ, सनातन धर्माचे शंकराचार्यांव्यरिक्त सुफी पंथांचे प्रमुख यांनाही आमंत्रित केले गेले आहे. यामध्ये ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, बौद्ध यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांना फोनवरून आमंत्रित करण्यात आले आहे.

वाचा ही बातमी:
या कार्यक्रमात सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूखी, अयोध्येतील समाजसेवक पद्मश्री मोहम्मद शरीफ, बाबरी मस्जिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी या नेत्यांचा राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या यादीत समावेश आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

वर्ध्यात खासदाराकडून शेतकऱ्यावर दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

5

वर्धाः नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित जमीन आपल्या नावावर असल्याचा दाव करणाऱ्या शेतकऱ्याला खासदार यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देवळी येथील नागरी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही पाइपलाइन टाकण्यात येत असलेली जमीन आपली असल्याचा दावा करीत शेतकऱ्याने विरोध दर्शविला. यावरून वाद वाढल्याने खासदार रामदास तडस यांनी शेतकऱ्याला शिविगाळ करीत दगडफेक केली. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परस्परविरोधी तक्रारीही पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पण, खासदार तडस यांनी मात्र या घटनेचा विरोध करत असं काही घडलं नसल्याचा दावा केला असून लोकांच्या पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेतल्याचे म्हटले आहे.

वाचाः

संबंधित शेतकरी सरकारी कामात अडचणी आणत होता. म्हणूनच सरकारी कामात आडकाठी अणू नकोस असं सांगण्यासाठी मी तिथं गेलो होते. तिथं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकला नाही. त्यानं मला शिवीगाळही केली. मात्र, मी त्याच्यावर दगडफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण मी त्याच्यावर एकदाही दगड फेकला नसल्याचं खासदार रामदास तडस यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

माझ्या जागेच कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेकडून बांधकाम करण्यात आलं. त्यावेळी मी बांधकाम करण्यास विरोध केला व तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यावेळी संबंधित अधिकारी माझ्या जागेत भेट देण्यास आले होते. तेव्हा खासदार रामदास तडसही उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी हे काम थांबणार नाही असं म्हटल्यावर मी माझे जागेत जाऊन उभा राहिलो व तेव्हाच त्यांनी माझ्यावर दगडफेक केली असा आरोप शेतकऱ्यांनं केला आहे. यासंबंधीत तक्रार दाखल केली असून मला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

जेल स्फोटानं उडवून देईन, वडिलांच्या अटकेनंतर तरुणानं दिली धमकी

5

गुरुग्राम: तुरुंगातील कैद्यांना अंमली पदार्थ पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तुरुंग उपअधीक्षकाच्या मुलानं तुरुंग बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची दिली. मित्रांच्या मदतीनं त्यानं ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी तुरुंगात कैद्यांना मोबाइल, सिम कार्ड आणि अंमली पदार्थ पुरवत असल्याच्या आरोपाखाली २३ जुलै रोजी तुरुंग उपअधीक्षक धर्मवीर चौटाला याला अटक केली होती. या अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी करून ११ सिम कार्ड आणि अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुरुंगात झाडाझडती घेण्यात आली. त्यात १२ मोबाइल, ९ सिम कार्ड आणि ११ मोबाइलच्या बॅटरी हस्तगत केल्या होत्या. या प्रकरणात चौटालाला अटक झाल्यानंतर २४ जुलैलाच मुलाने मित्रांच्या मदतीनं ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली. तुरुंग अधीक्षकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी त्याच्या मित्रांनी क्लिप व्हायरल केली. त्यानंतर मोबाइलमधून ऑडिओ क्लिप डिलिट केली होती.

तुरुंग उपअधीक्षक जे रॅकेट चालवत होता, त्यातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच, या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. तुरुंग उपअधीक्षकाचा मुलगा रवी चौटाला यानं ही ऑडिओ क्लिप तयार केली होती. त्यात तुरुंग बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी दिली होती. व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर तुरुंगातील सहायक अधीक्षक संजय कुमार यांनी कारवाईसाठी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. रवी चौटाला हा तुरुंग परिसरातील क्वार्टर्समध्येच राहत होता. त्यामुळे रवीसोबत अनेकदा बोलणे व्हायचे. त्यामुळे त्याचा आवाज लगेच ओळखला, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.

तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हल्ल्यातून वाचण्यासाठी त्वरित आपली बदली करून घ्यावी. माझ्या वडिलांना जामीन मिळू दे, त्यानंतर तुरुंग अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना बघून घेतो, अशी धमकी रवी चौटालानं ऑडिओद्वारे दिली. हरयाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सर्व गँगस्टर आपल्या संपर्कात आहेत. गुरुग्रामच्या तुरुंगात आपल्या पित्याचा अपमान केला गेला. मी रवी चौटाला असून, तुरुंग उपअधीक्षक धर्मवीर चौटालाचा मुलगा आहे, असे या ऑडिओमध्ये ऐकायला मिळतं. ही गंभीर बाब असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून रवी चौटाला याला अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts