Wednesday, May 31, 2023
Home Blog Page 5848

लसचे दोन डोस घेतल्यानंतर पुढे काय?; CM ठाकरेंनी दिली 'ही' खास माहिती

0

मुंबई: राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या लसीकरणाचा आढावा आज मुख्यमंत्री यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Latest Update )

वाचा:

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात मोहीम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.

वाचा:

लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲप बद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायू दुखी यासारखे प्रतिकुल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरुन समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा:

लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही करोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील लसीकरण केंद्रांवर दिवसभरात १०० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येईल. समजा तेवढे कर्मचारी आले नाही तरी दिवसाला १०० कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'ममता बॅनर्जींचा ५० हजारांवर मतांनी पराभव करेन, अन्यथा राजकारण सोडेन'

0

कोलकाताः पश्चिम बंगालच्या राजकारणात सोमवारचा दिवस हाय व्होल्टेज होता. बंगालच्या राजकारणातील दोन दिग्गजांनी एकमेकांच्या गडात मोर्चे आणि रोड शो आयोजित करून एकमेकांना आव्हान दिलं. मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ( ) यांनी नुकत्याच दाखल झालेल्या भाजप नेते ( ) यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये जाहीर सभा घेतली. तसंच विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवण्याची मोठी घोषणा केली. दुसरीकडे, दक्षिण कोलकातामधील ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी रोड शो घेत हुंकार भरला. त्यांनी थेट ममता बॅनर्डजींना आव्हान दिलं. नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना ५० हजाराहून अधिक मतांनी पराभूत करेन अन्यथा राजकारण सोडेल, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले.

ममता बॅनर्जींना नंदीग्रामची आठवण फक्त निवडणुकांच्या वेळीच होते. पाच वर्षांनंतर त्यांनी आज नंदीग्राम सभा घेतली. नंदीग्रामसाठी ममतांनी काय केलं? नंदीग्राममुळे ममता बॅनर्जी २०११ मध्ये सत्तेत आल्या. पण त्याच नंदीग्राममध्ये आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांवर गोळीबार करणारे पोलिस अधिकारी अरुण गुप्ता यांना राज्य सरकारने चार वेळा मुदतवाढ दिली. नंदीग्रामची जनता ममता बॅनर्जींना कधीही माफ करणार नाही. दुसरीकडे सुवेंदूच्या यांच्या रोड शो दरम्यान दगडफेकही करण्यात आली. तृणमूल कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आहे. यानंतर तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झडप झाली. या घटनेत अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाले.

विशेष म्हणजे, सुरक्षा व बुलेट प्रूफ वाहने केंद्राकडून मिळालेली असूनही भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बुधवारी कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जाहीर सभांवेळी राज्य सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी नंदीग्राममधील सुवेंदू अधिकारी यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप आहे. मात्र, यासाठी तृणमूलने भाजपला जबाबदार धरले. राज्य सरकारने जाहीर सभांदरम्यान आपल्याला पुरेसे पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी हायकोर्टात केली आहे. सुरक्षेबाबत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यपालांची भेट घेत सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. पश्चिम बंगालमध्ये झेड-कॅटेगरी सुरक्षा असलेल्या भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सर्वच पक्षांकडून वर्चस्वाचे दावे; जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला धक्का

0

जळगाव: (Jalgaon) जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालवरुन जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयासह वर्चस्वाचे दावे केले आहेत. दरम्यान यंदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने जोर घेतला आहे. तर, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा कमी झाल्याने भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. in despite getting most seats)

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण जागांमध्ये भाजप १८१, शिवसेना १५९, राष्ट्रवादी १७४, काँग्रेस १४ तर स्थानिक आघाड्यांनी १५९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित गावनेत्यांना पराभूत व्हावे लागले आहे. तर, अनेक नवीन व तरुण चेहरे ग्रामपंचायतीच्या कारभारात दाखल झाले आहेत. अनेक पॅनलना पराभव देखील पत्कारावा लागला आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे नेते व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आपल्या पक्षाचेच ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व असल्याचे दावे केले आहेत.

जळगाव तालुक्यात प्रस्थापितांना धक्के ; सेनेचे वर्चस्व

जळगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजपा तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव सहन करावा लागला आहे. तर विधानसभा निवडणूक लढविलेल्या आसोद्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे पती यांना देखील ग्रा.प निवडणूकीत पराभव पत्करावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव तालुक्यात ४३ पैकी २७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली. त्या खालोखाल राष्ट्रवादी ९ आणि भाजपाने ५ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत.

एरंडोल व धरणगावात शिवसेनेची सरशी

एरंडोल तालुक्यात तालुक्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत ३७ ग्रामपंचायती पैकी २० ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याचा दावा शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केला आहे. तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यावरही सेनेने दावा केला आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसेना नेते व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांच्या धरणगाव तालुक्यात देखील शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

बोदवडला माजी राष्ट्रपतींच्या भाचेसून पराभूत
बोदवड तालुक्यातील नाडगाव हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे गाव आहे. नाडगावमधील ग्रामपंचांयत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसुनेचा निवडणुकीत पराभव झाला आहे. समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. दरम्यान या गावात कॉंग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून, ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.

चाळीसगावात भाजपाचे वर्चस्व, पण आमदारांना धक्का

चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आमदार चव्हाण यांची सासुरवाडी असलेल्या डोण गावात भाजप पुरस्कृत पॅनलचा पराभव झाला आहे. तसेच भाजपचे किसान मोर्च्याचे उपाध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांना देखील मोठा धक्का बसला आहे. वाघळीत पोपट भोळे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. वाघळीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला ११ तर भोळे यांच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलला केवळ ४ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपसाठी हा चाळीसगाव तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे. बोरखेडा व भोरस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीत पुरस्कृत पॅनलने विजय मिळविला आहे. दडपिंपरीत भाजपाचे नाना पवार यांचे पॅनल विजयी झाले आहे. टाकळीत भाजपला विजय मिळाला आहे.

अमळनेरात तरुणांना संधी

अमळनेर तालुक्यातील १४ ग्रामपंचाय बिनविरोध झाल्यानंतर ५० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत तरुणांना अनेक ठिकाणी संधी मिळाली आहे. दिग्गज व प्रस्थापित म्हणविल्या जाणाऱ्या पॅनलचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारकचे कार्यकर्ते प्रा. सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले. ६ जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखांब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून त्यांना ९ जागा मिळाल्या आहेत. खवशी येथील काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले. त्यांना ६ जागा मिळाल्या आहेत.

चोपड्यात प्रस्थापितांना धक्का; नव्या चेहऱ्यांना संधी
चोपडा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. चोपडा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत १२ टेबलावर मतमोजणी झाली. १४ फेऱ्याद्वारे ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात प्रस्थापितांना दणका तर नवीन चेहऱ्यांना संधी मतदारांनी दिली आहे.

सुनेकडून सासू पराभूत
एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत सायली राजेंद्र पाटील (२०४) या सुनबाई नी त्यांच्या चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई चंद्रसिंग पाटील यांना पराभूत केले. तसेच युवा सेना तालुकाप्रमुख घनश्याम पाटील त्यांचा निवडणुकीत पराभव झाला तर त्यांच्या धर्मपत्नी वैशाली घनश्याम पाटील (१३२) या विजयी झाल्या.

क्लिक करा आणि वाचा-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र पाटलांचे पॅनल पराभूत

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे बोदवड तालुक्यातील मनोर बुद्रुक येथे असलेले पॅनल पराभूत झाले आहे. त्यांचा पुतण्या सम्राट पाटील हे पॅनल चे नेतृत्व करीत होते. या पॅनलला ९ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असताना देखील राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या पत्नी प्रमिला ईश्वर इंगळे या देखील पराभूत झाल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

gram panchayat election result: अशोक चव्हाणांनी गड राखला, मोठी ग्रामपंचायत मात्र गमावली

0

नांदेड: सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना आपला बालेकिल्ला असेलल्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात यश आले आहे. भोकर मतदारसंघातील एकूण १५१ ग्रामपंतायचींपैकी १२४ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. असे असले तरी भोकरमधील सर्वात मोठी ग्रामपंचायच असलेल्या बारडमध्ये मात्र शिवसेनेकडून चव्हाण यांना धक्का बसला आहे. तेथील १७ पैकी १६ जागांवर शिवसेनेने यश मिळवले आहे.

नांदेडमधील तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहायचे झाल्यास भोकरमध्ये एकूण ६३ ग्रामपंचायची आहेत. यांपैकी ५० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व ठेवले आहे. येथे काँग्रेसने १३ ग्रामपंचायती गमावल्या आहेत. तर मुदखेडमधील एकूण ४५ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. तसेच अर्धापूरमधील ४३ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायती काँग्रेसकडे आहेत. येथे काँग्रेसने ६ ग्रामपंचायची काँग्रेसच्या हातून निसटल्या आहेत. म्हणजेच भोकरमधील एकूण १५१ ग्रामपंचायतींपैकी १२४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. म्हणजेच भोकरमधील २७ ग्रामपंचायती काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत.

अशोक चव्हाण यांनी सर्वात मोठी ग्रामपंचायत गमावली

भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रमापंचायत असलेल्या बारडमध्ये मात्र शिवसेनेचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाले आहेत. नांदेडमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी बारडची ओळख आहे. या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले होते. अखेर शिवसेनेने बारडमध्ये बाजी मारत एकूण १७ सदस्य संख्या असलेल्या बारड ग्रामपंचायतीच्या १६ जागा पटकावल्या आहेत. मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेने एकहाती विजय मिळवत अशोक चव्हाण यांना धक्का दिल्याचे बारडमध्ये बोलले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-

तालुकानिहाय निकाल:
भोकर ५०/६३
मुदखेड ३७/४५
अर्धापूर ३७/४३
एकूण १२४/१५१

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; रिकव्हरी रेट ९४.८६%

0

मुंबईः आज राज्यात १ हजार ९२४ करोनाचे नवीन रुग्ण सापडले असून ३५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात करोना रुग्णवाढीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून वाढत असताना आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, आज करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार आज फक्त १ हजार ९२४ रुग्ण सापडले आहेत. इतक्या कमी संख्येनं रुग्ण आढळल्यानं काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या १९ लाख ९२ हजार ६८३ इतकी झाली आहे.

आज राज्यात ३ हजार ८५४ रुग्णांनी करोनावर मात केली असून आजपर्यंत राज्यात १८,९०,३२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण वाढीचा दर ९४.८६% टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात सध्या ५० हजार ६८० अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,४५,८९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९२,६८३ (१४.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आज करोना संसर्गाच्या साथीमुळं ३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात करोना मृतांचा एकूण आकडा ५० हजार ४७३ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. सध्या राज्यात २,२१,२८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

अर्णब गोस्वामींची अडचण वाढणार; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले मोठे वक्तव्य

0

नाशिक: रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक (Arnab Goswami) यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अर्णब यांना दोन वर्षांपूर्वी बालाकोट येथे करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची हल्ल्याच्या आधीपासूनच माहिती होती, अशी माहिती देतानाच इतक्या अतिसंवेदनशील गोष्टी अर्णब गोस्वामी यांना कशा काय माहिती झाल्या, असा सवाल राज्याचे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी उद्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत या संदर्भात काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. (how arnab knows sensitive things like balakot and pulwama says )

गृहमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिलचे (BARC) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले असून त्याबाबत आम्ही संपूर्ण माहिती घेतल्याचे देखमुख म्हणाले. या चॅटमध्ये अनेक संवेदनशील गोष्टींचा उल्लेख करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि टेलिव्हीजन रेटिंग एजन्सी बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील कथित चर्चेच्या तपासासाठी संयुक्त संसदीय समितीची (JPC) निर्मिती करावी अशी मागणी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी सरकारकडे केली आहे. अर्बण गोस्वामी यांना बालाकोट हवाई हल्ल्याबाबत अनेक प्रकारच्या गुप्त माहिती मिळालेल्या होत्या असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी कथित व्हायरल चर्चेचा संदर्भ घेत म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही मागणार स्पष्टीकरण’

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा वापर टीआरपी वाढवण्यासाठी गेला गेला ही गोष्ट चिंता वाढवणारी असल्याचे तपासे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपण राज्याचे गृहमंत्री यांची भेट घेत या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचेही तपासे म्हणाले. अर्णब यांना इतक्या संवेदनशील गोष्टींची कशी माहिती झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गृह मंत्रालयाने याच्या सूत्रांचा तत्काळ तपास करून तत्काळ कारवाई देखील केली पाहिजे, असेही तपासे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

गिरीश महाजनांनी गड राखला; ४५ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांचीच सरशी झाली आहे. तालुक्यातील ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यात पुन्हा आमदार गिरीश महाजन यांचेच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या, त्या पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरीत ६८ ग्रामपंचायतीत निवडणूकीसाठी मतदान घेण्यात आले होते. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते.

गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत. तालुक्यातल ६८ ग्रामपंचायतींपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल ४५ जागांवर विजय विजय मिळविला आहे. उर्वरीत जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, व शिवसेनेने विजय मिळविला आहे.

जामनेर तालुका भाजपाचा बालकिल्ला

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका हा भाजपाचा बालेकील्ला असल्याचे सिध्द झाले आहे. एकूण निकालापैकी ९० ते ९५ टक्के ग्रामपंचातींवर भाजपाने विजय मिळवला आहे. समोर तीन पक्ष असतांना देखील तालुक्यातील सर्व महत्वाच्या व लहान मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व राहीले असल्याची प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपालाच कौल मिळाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

सुशांतसिंह प्रकरणात मीडिया ट्रायल; हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे

0

मुंबईः सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून अतिरंजित व आक्षेपार्ह वार्तांकन होत असताना केंद्र सरकारने त्यावर वचक ठेवण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच, तपास सुरू असलेल्या प्रकरणाचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णयही न्यायलयानं सुनावला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली त्यावेळी हायकोर्टानं केंद्रसरकार बरोबरच रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या दोन वृत्तवाहिन्यांनाही फटाकारले आहे. रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या दोन वृत्तवाहिन्यांनी प्रथमदर्शनी न्यायालय अवमानकारक कृती केली आहे. मात्र, त्याविषयी कारवाई करण्याचे निर्देश देण्यास आम्ही तूर्त टाळत आहोत, असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

वृत्तवाहिन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतीही वैधानिक यंत्रणा नाही. वृत्तवाहिन्यांच्या संघटनेने केलेल्या प्राधिकरणाला वैधानिक अधिष्ठान नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले आहे. सध्या वृत्तवाहिन्यांनी प्रेस कौन्सिल इंडिया कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

आत्महत्यांच्या प्रकरणात वार्तांकन करताना वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमांसाठी आम्ही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यानुसार चर्चेचे कार्यक्रम आयोजित करताना त्यात कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य हनन करू नये, गुन्ह्यातील पीडित व्यक्ती, साक्षीदार यांच्या मुलाखती घेऊन गुन्ह्याच्या घटनेचे विश्लेषण करू नये, आरोपींचे फोटो प्रसिद्ध करू नये, गुन्ह्याच्या घटनेचे नाट्य रूपांतर मांडू नये, तपासातील संवेदनशील माहिती प्रसिद्ध करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

हर्षवर्धन जाधवांच्या मुलाचे आईविरोधात पॅनल; कोणी मारली बाजी?

0

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणूका माजी आमदार हर्षवधन जाधव यांच्या कौटुंबीक वादामुळे चर्चेत आल्या होती. या निवडणूकीसाठी माजी आमदार यांचा मुलगा आदित्य हर्षवर्धन जाधवने आई संजना जाधव यांच्या पॅनल विरोधात उमेदवार उभे केले होते. आज या निवडणुकांचा निकाल समोर आला आहे.

रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पॅनल उभं केलं होतं. त्याचवेळी आदित्य जाधव यानं आईविरोधात हर्षवर्धन जाधव यांचं पॅनल उभं केलं होतं. हर्षवर्धन जाधव यांच्या गैरहजेरीत आदित्य जाधवनं राजकारणाची सूत्र आपल्या हातात घेतल्यानं या निवडणुकांची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र, महाविकास आघाडीनं हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा पराभव केला आहे.

आदित्य हर्षवर्धन जाधवच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला असून संजना जाधव यांच्या पॅनलला २ जागेवर समाधान मानावं लागलं. पिशोर ग्रामपंचायतमध्ये पुंडलिक डहाके यांच्या पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. संजना जाधव यांच्यापेक्षा आदित्य जाधवला अधिक जागा मिळाल्यानं आई पेक्षा मुलगा या निवडणूकीत सरस ठरल्याची चर्चा पिशोरमध्ये सुरू आहे.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन हे मनसेचे माजी आमदार आहेत. मनसे ऐन भरात असताना विधानसभेवर निवडून गेलेल्या १३ आमदारांमध्ये जाधव यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळं मनसेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूकही जिंकली होती. मात्र, तिथंही त्यांचं जमलं नाही. त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ग्रामपंचायत निवडणुकः राम शिंदेंच्या पराभवानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0

मुंबईः जामखेड तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर आमदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता काबीज केली आहे. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकांवर रोहित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

‘ग्रामपंचायतीत कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथं कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर कोण व दुसऱ्या क्रमांकावर कोण या गोष्टी कळतील. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,’ अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

‘काही ठराविक लोकांकडे अनेक वर्ष सत्ता आहे मात्र, तरीही विकास झाला नाही तिथं लोकांनीच बदल केलेला दिसत आहे. लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको. ग्रामपंचायतींमध्ये कदाचित आमच्या विचारांचे सदस्य नसतील पण लोकं, मतदार आमचीच आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल,’ असंही रोहित पवारांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, जामखेड तालुक्यातील खर्डा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. खर्डा येथे पवार यांनी चांगला जनसंपर्क ठेवत किल्ला आणि इतर विकासाच्या योजना दिल्या. तसंच, राम शिंदे यांचं मुळ गाव असलेल्या चौंडी ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Latest posts