Tuesday, March 28, 2023
Home Blog Page 5853

रियलमीने भारतात लाँच केले स्वस्त वायरलेस चार्जर, किंमत पाहा

5

नवी दिल्लीः सध्या वायरलेस चार्जिंग सपोर्टच्या डिव्हाईसची मागणी खूप वाढली आहे. त्यामुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने भारतात आपले प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत कमी किंमतीतील नवीन १० वॉट लाँच केला आहे. कंपनीने याची किंमत ८९९ रुपये ठेवली आहे. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Realme.com वरून हे चार्जर खरेदी करता येवू शकते. युजर्संना या वायरलेस चार्जरला सिंगल ग्रे कलर व्हेरियंट मध्ये खरेदी करता येवू शकते.

वाचाः

चार्जरमध्ये काय आहे खास
या चार्जरमध्ये तुम्हाला वायरलेस इयरबड्स Realme Buds Air शिवाय, वायरलेस चार्जिंग सपोर्ट करणारे स्मार्टफोन व अन्य डिव्हाईस सुद्धा चार्ज करु शकते. यात फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सुद्धा देण्यात आली आहे. यात 5V/9V टाइप-सी इनपुट पोर्ट देण्यात आले आहे. अँड्रॉयड फोनसाठी यात १० वॉट आणि अॅपल आयफोनसाठी ७.५ वॉटचे अधिक आऊटपूट मिळते. यात ५० सेमीचे चार्जिंग केबल सुद्धा देण्यात आले आहे.

वाचाः

डिझाईनमध्ये याला गोल शेप दिला आहे. यात रियलमीने स्पेशल मॅट सॉफ्ट पेंटचा वापर केला आहे. त्यामुळे याला स्क्रॅच येत नाही. तसेच बरोबर मध्य भागी यात लोगो बसवला आहे. हा पॉकेट साईजचाआहे. केवळ ९एमएम स्लीम आहे. त्यामुळे ते कुठेही घेवून जाता येते.

वाचाः

चार्जरचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे हे चावी, क्रेडिट कार्ड किंवा अन्य धातूच्या वस्तूंवर ठेवल्यास आपोपाप बंद होते. याशिवाय, यात सिक्योरिटीची मल्टिपल लेअर देण्यात आली आहे. जी डिव्हाईसला फुल चार्ज झाल्यानंतर आऊटपूट पॉवरला ऑटोमॅटिकली बदलते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Breaking: नागपूरजवळ साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगार ठार

5

नागपूर: जवळच्या येथील प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले आहेत. ही भीषण दुर्घटना घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ( )

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय २१) , लीलाधर वामनराव शेंडे (वय ४७), वासुदेव विठ्ठल लडी (वय ३०), सचिन प्रकाश वाघमारे (वय २४) व प्रफुल्ल पांडुरंग मून (वय २५ ) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण कारखान्यात काम करीत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली व गोंधळ निर्माण झाला. स्फोटात पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट

5

नवी दिल्लीः ची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर जबरदस्त सेलचे पुनरागमन होत आहे. या सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मोबाइल्, इलेक्ट्रॉनिक्, फॅशन आणि अन्य कॅटेगरीच्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजची सुरुवात ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सेलचा अखेरचा दिवस १० ऑगस्ट असणार आहे. फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपमध्ये सेलचे बॅनर पाहिले जावू शकते.

वाचाः

फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी अर्ली अॅक्सेस
फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपासून अर्ली अॅक्सेस मिळणार आहे. या सेलमध्ये सिटी बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय कार्ड्स वरून शॉपिंग केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे. या सेलमध्ये प्रत्येक ६ तासाला ब्लॉक बस्टर डिल्स मिळणार आहे. ज्यात मोबाइल, टीव्ही लॅपटॉप आदीवर जबरदस्त ऑफर मिळतील. २ ते ४ ऑगस्ट दरम्यान आपली पसंतीचे प्रोडक्ट ३० रुपये देऊन बुक केले जावू शकते. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, हे प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करता येईल.

वाचाः

फ्लिपकार्ट या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर ५० टक्के सूट तसेच नो कॉस्ट ईएमआय ऑफर देणार आहे. मोबाइल फोन्सवर ३० ते ४० टक्के सूट देऊन एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. टीव्ही आणि अन्य दुसऱ्या होम अप्लायन्सेजवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणारआहे. लॅपटॉपवर ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची संधी आहे. फॅशन कॅटेगरीत टॉप ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

वाचाः

टॉप ब्रँड्सच्या मोबाइलवर बंपर ऑफर
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये बेस्ट सेलर स्मार्टफोनला आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट ७ प्रो, ऑनर १० लाइट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, अॅपल आयफोन्स, आसुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी ७ सीरीजवर बंपर ऑफर्स मिळणार आहेत. फोन्सवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबँक गँरटी सुद्धा मिळणार आहे. रियलमी एक्स २ प्रोचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन २८ हजार ९९९ रुपये, ऑनर ९ एस ५ हजार ९९९ रुपये, आयक्यू ३ चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन ३१ हजार ९९० रुपये, ओप्पो रेनो २ एफ चा ६ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोन १७ हजार ९९० रुपये, ओप्पो एफ११ प्रो चा ६जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजला १४ हजार ९९० रुपयांत खरेदी केले जावू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

5

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे (SP) माजी नेते आणि अमर सिंह () यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठलं होतं. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

राजकीय कारकीर्द

उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं. अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते.

मार्च महिन्यातच पसरली होती निधनाची अफवा

उल्लेखनीय म्हणजे, मार्च महिन्यात परदेशात उपचार सुरू असतानाच त्यांच्या निधनाची अफवा मीडियात पसरली होती. त्यावर त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असा व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. ‘आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवलीय. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत’, असं अमर सिंह यांनी या व्हिडिओत म्हटलं होतं.

अमिताभ बच्चन यांची मागितली होती माफी

तर त्याअगोदर आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सोशल मीडियावरून अमिताभ बच्चन आणि कुटुंबीयांची माफी मागितल्यानंही अमर सिंह चर्चेत आले होते. ‘आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि याच निमित्तानं मला अमिताभ बच्चन यांच्याकडून एक मॅसेज मिळाला. आज आयुष्याच्या या वळणावर जेव्हा मी जीवन आणि मृत्यूचा सामना करत आहे, मी अमितजी आणि त्यांच्या कुटुंबाकडे आपल्या टिप्पणीसाठी माफी मागतो. ईश्वर त्यांचं भलं करो’ असं ट्विट अमर सिंह यांनी केलं होतं.

अधिक वाचा : अधिक वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

दोनच काय, चार बायकाही सांभाळू शकतो; शिंदेंना सेना खासदाराचं उत्तर

5

अहमदनगर: ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार यांनी माजी मंत्री यांना दिलं आहे.

दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. ‘करोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना दिलासा देण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. शेतकरी, दूध उत्पादक रस्त्यावर आले आहेत. विजेची बिलं अव्वाच्या सव्वा येताहेत. खतं मिळेनासी झाली आहेत. कांद्याचा भाव कमी झालाय. या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही. ‘एका नवरा आणि दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. या तिघाडीचा खेळ आता आवरत आला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही,’ असं राम शिंदे म्हणाले होते.

वाचा:

वाचा:

खासदार लोखंडे हे एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असं लोखंडे म्हणाले.

दूध दराच्या प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘दूध उत्पादक व्याकूळ झाले आहेत ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळं केंद्र सरकारनं व राज्य सरकारनंही निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं पाहिजे, अशी खासदार म्हणून माझीही भूमिका असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

नेपाळची वळवळ वाढली! १९४७ चा 'तो' करार नव्यानं करण्याची मागणी

5

काठमांडू: सीमा प्रश्नावरून आगळीक करणाऱ्या नेपाळने आता भारतीय लष्करातील गोरखा सैन्याबाबतच्या करारावर प्रश्न उपस्थित केले आहे. भारतीय सैन्य दलात असणाऱ्या नेपाळच्या गोरखा सैनिकांबाबतचा करार आता जुना झाला असून निरुपयोगी असल्याचे वक्तव्य नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी केले आहे. गोरखा सैन्याच्या कराराच्या मुद्यावर नेपाळने आता भारतासह ब्रिटनवरही निशाणा साधला आहे.

भारत, ब्रिटन आणि नेपाळमध्ये भारतीय सैन्य दलात गोरखा सैन्याच्या समावेशाबाबत १९४७ मध्ये करार करण्यात आला होता. या करारानुसार, गोरखा सैनिकांचे वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर सुविधा ब्रिटन व भारतीय सैन्याइतकीच असणार आहे. मात्र, भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या माजी गोरखा सैन्यांनी हा करार भेदभाव करणार असल्याचा आरोप केला होता.

वाचा:

एका कार्यक्रमात बोलताना नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी म्हटले की, त्यावेळी करण्यात आलेल्या करारामुळे नेपाळी युवकांना रोजगार आणि प्रगतीचा मार्ग खुला झाला असला तरी आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे आता या करारावर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. भारत, नेपाळ आणि ब्रिटनने एकत्र येऊन वादग्रस्त मुद्यांवर चर्चा करायली हवी असे त्यांनी सांगितले.

वाचा:

गोरखा सैन्य कराराचा मुद्दा ब्रिटनसमोरही उपस्थित करण्यात आला असल्याचे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी म्हटले. मागील वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी या कराराबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय लष्करातील एप्रिल १८१५ मध्ये स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून गोरखा रेजिमेंटने अनेक महत्त्वाच्या मोहिमेत, युद्धात मोलाची कामगिरी पार पाडली आहे. नेपाळ, ब्रिटन आणि भारतीय लष्करात गोरखा रेजिमेंट आहे. भारतातील उंच ,डोंगराळ भागातील सीमा सुरक्षेची जबाबदारी गोरखा रेजिमेंटवर असते. गोरखा सैनिकांसाठी नेपाळमध्ये भारतात तीन केंद्र आहेत. सध्या जवळपास ३० हजार गोरखा सैन्य आहेत. माजी गोरखा सैनिकांच्या पेन्शनसाठी भारताकडून नेपाळला दरवर्षी ३००० कोटी रुपये दिले जातात.

वाचा:

दरम्यान, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञवली यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळ या चार देशांच्या गटाबाबतचा विचार धुडकावून लावला आहे. चीनसह झालेली बैठक ही करोना संसर्गाच्या मुद्यावर होती. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली. नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश ‘सार्क’चे सदस्य आहेत. तर, चीन निरीक्षक आहे. त्यामुळे इतर नवीन गट बनवण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

तरुणांनो, टिळकांचं साहित्य वाचलं तरी अनेक प्रश्न सुटतील : अमित शहा

5

नवी दिल्ली : लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्यांना आदरांजली अर्पण केली. ‘भारत यांना त्यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्तानं नमन करत आहे. त्यांच्या बुद्धीमत्ता, साहस, भावना आणि स्वराज्याचे विचार नेहमीच प्रेरणा देत राहतील’ असं ट्विट यांनी केलं.

वाचा :

‘ हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा लोकमान्यांनी दिला होता. १९ व्या शतकात त्यांनी सगळ्याचा त्याग करून संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलं. हे अनेक लोक करू शकत नाहीत. इतिहासात टिळकांचं नाव सुवर्णाक्षरांत लिहिलं जाईल’ असं यांनी म्हटलंय. ‘लोकमान्य टिळक : ‘ या वेबिनारमध्ये बोलत होते.

‘लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व देशवासियांच्यावतीने मी त्यांना नमन करतो. तरुणांना भारत आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी टिळकांचं साहित्य वाचायला हवं. देशातील तरुणांनी लोकमान्य टिळकांचे आत्मचरित्र वाचले तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतील. आज १०० वर्ष उलटल्यानंतरही लोकमान्यांचे विचार तितकेच कालसुसंगत आहेत. यावरुन लोकमान्य टिळक किती द्रष्टे नेते होते, याची कल्पना येते’ असंही अमित शहा यांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

अमित शहांच्या हस्ते परिचर्चेचे उद्घाटन

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित भारतीय सांस्कृतिक परिषदेच्या वतीनं आज (शनिवारी) एका आंतरराष्ट्रीय परिचर्चेचं वेबिनारच्या स्वरूपात आयोजन केलंय. या परिचर्चेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘लोकमान्य टिळक : स्वराज ते आत्मनिर्भर भारत’ हा या परिचर्चेचा विषय असून त्यात देशविदेशातल्या तज्ज्ञ मंडळींचा सहभाग आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती या परिचर्चेचा समारोप करणार आहेत. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्षस्थानी आहेत. शनिवारी, सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे पाचपर्यंत ही चर्चा सुरू आहे.

या परिचर्चेत लोकमान्यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या डेक्कन एजुकेशन सोसायटीसह भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर), इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् इत्यादी संघटनांचाही सहभाग आहे. मुख्य कार्यक्रम पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील अँफी थिएटरमधून व अन्य ठिकाणांहून वक्ते आपापले विचार मांडत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, लंडनमधील लेखक गॉर्डन जॉन्सन व संकेत कुलकर्णी, बिल्डर्स ऑफ मॉडर्न इंडिया या मालिके अंतर्गत एन. जी. जोग यांनी लिहिलेल्या टिळक चरित्राचे ब्रह्मदेशाच्या भाषेत भाषांतर केलेले लेखक मूआंग मूआंग, कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्राध्यापक राघवेंद्र तंवर, मुंबईचे विकास परांजपे, अहमदाबादचे इतिहास संशोधक प्राध्यापक रिझवान काद्री, छत्तीसगढमधील पत्रकार, लेखक डॉक्टर सुशील त्रिवेदी तसेच अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. मल्होत्रा हेदेखील या परिचर्चेत सहभागी झालेत.

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

विशाखापट्टनममध्ये क्रेन कोसळली, ११ जण ठार

5

: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम इथल्या ” परिसरात अचानक क्रेन कोसळल्यानं मोठा अपघात घडलाय. हजारो किलो वजनाची ही क्रेन अंगावर कोसळल्यानं या भागात काम करणाऱ्या ११ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अजूनही या क्रेनखाली काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेबद्दल माहिती देताना क्रेन अपघातात १० जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच मृत्यूचा आकडा ११ वर पोहचला. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सुशांतसिंग राजपूतबाबत एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केला मोठा खुलासा…

5

बॉलीवूडचा स्टार सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण सध्याच्या घडीला चांगलेच गाजते आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळी वळणं, येत असल्याचे आपण पाहत आहोत. पण या प्रकरणात आता एक सर्वात मोठा खुलासा सुशांतची एक्स एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केल्याचे पाहायला मिळत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच जणांची चौकशी सुरु आहे. पण सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही नेमकी कुठे आहे, हे कोणालाही माहिती नाही. सुशांतच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे रियाने एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण ती सध्या कुठे आहे, हे नेमके कोणालाही माहिती नाही. परिस्थिती अशी असताना आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड पुढे आली आहे. अंकिता आणि सुशांत यांच्यामध्ये बरेच वर्षे अफेअर होते. त्यामुळे सुशांतला अंकिता चांगली ओळखत होती. त्यामुळे सुशांतबाबत तिने एक खुलासा केला आहे. हा खुलासा करताना अंकिता नेमकं काय म्हणाली, पाहा..

सुशांतबद्दल अंकिता म्हणाली की, ” आत्महत्येपूर्वी सुशांत हा निराश होता. त्याला नैराश्येने ग्रासले होते, असे म्हटले जात आहे. पण सुशांत निराश होणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हता. तो एक साधा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा व्यक्ती होता. सुशांत कधीही निराश होऊ शकतो, असे मला वाटत नाही. कारण सुशांतची मानसीकता ही सकारात्मक होती. बॉलीवूडमध्ये काम मिळालं नाही, तर आपण काय करायचं, याची प्लॅनिंगही त्याने केलेली होती.”

अंकिता पुढे म्हणाली की, ” सुशांतसमोर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आदर्श होता. त्याने जेव्हा धोनीच्या जीवनावरील सिनेमा बनवला होता तेव्हा तो धोनीमध्ये गुंतला होता. त्याला धोनीसारखेच व्हायचे होते. धोनी आणि त्याचे विचारही जुळत होते. यश आणि अपयश यांच्यामध्ये एक अंधुकश रेषा असते, हे धोनीचे वाक्य सुशांतही बोलायचा. त्यामुळे कायम सकारात्मक राहणारा सुशांत नैराश्येच्या गर्तेत जाईल, असे मला तरी वाटत नाही.”

अभिनेता
मृत्यू प्रकरणाबाबत बिहारचे
यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, सुशांतच्या वडिलांनी मागणी केली तरच सीबीआय चौकशी शक्य असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी
पोलिसांना चौकशीत सहकार्य करायला हवं, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

BSNLचा नवीन प्लान, १४७ रुपयांत 10GB डेटा, फ्री अनलिमिटेड कॉलिंग

5

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ग्राहकांना एक भेट देत १४७ रुपयांचा नवीन व्हाउचर आणला आहे. चेन्नई सर्कलमध्ये आणलेल्या या व्हाउचरमध्ये अन्य सुविधेसोबत १० जीबी डेटा दिला जात आहे. कंपनीने नवीन प्लान शिवाय काही व्हाउचर्सवर अतिरिक्त वैधता सुद्धा ऑफर केली आहे. तसेच बीएसएनएलने काही व्हाऊचर्सला बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. यात पतंजली प्लानचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, युजर्सला नवीन प्लान आणि अतिरिक्त वैधतेचा फायदा १ ऑगस्ट २०२० पासून मिळणार आहे. हटवलेला प्लान ३१ जुलै पासून बंद केले आहेत.

वाचाः

१४७ रुपयांच्या प्लानमध्ये काय आहे
या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळते. तसेच ग्राहकांना १० जीबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. ज्यात बीएसएनएल ट्यून्सची सुविधा मिळते. सध्या हा प्लान केवळ चेन्नई सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

वाचाः

या प्लान्सची वैधता वाढवली
कंपनीने सांगितले की, १ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट या दरम्यान १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्जला ग्राहकांना ७४ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाणार आहे. प्लान मध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज ३ जीबी डेटा मिळतो. अतिरिक्त वैधता मिळाल्यानंतर ग्राहक आता ४३९ दिवसांचा वापर करु शकतात. तसेच कंपनीने २४७ रुपयांच्या प्लानची वैधता ६ दिवसांनी वाढवली आहे. यात ३० दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा मिळतो.

वाचाः

कंपनीने सांगितले की, २४७ रुपयांच्या प्लानमध्ये आता इरोस नाऊ सर्विसचे अॅक्सेस दिले जाईल. याप्रमाणे ८१ दिवसांची वैधताचे ४२९ रुपयांचा प्लानसोबत इरोस नाउ सर्विसचे अॅक्सेस मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts