Saturday, June 3, 2023
Home Blog Page 6408

IPL 2020 Points Table फक्त एका विजयाने कोलकाताने चेन्नई, बेंगळुरूला मागे टाकले, पाहा गुणतक्ता

568

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात शनिवारी झालेल्या सामन्यात () ने ( ) चा ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने पहिल्या विजयाची नोंद केली आणि गुणतक्त्यात दिग्गज संघांना मागे टाकले.

वाचा-
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. त्यानंतर शुभमन गिलने नाबाद ७० धावा करून संघाला विजय मिळवून दिला. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात पराभव स्विकारला होता. त्यामुळे या सामन्यात दोघांना विजयाची सुरुवात करायची होती.

वाचा-
कोलकात्याच्या विजयानंतर त्यांनी गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स यांचा क्रमांक लागतो.

वाचा-
सलग दोन सामन्यात पराभव झालेला चेन्नई सुपर किंग्ज दोन गुण आणि -८४० सरासरीसह सहाव्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दोन गुणांसह पण -२.१७५ सरासरीसह सातव्या क्रमाकांवर आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत झालेले दोन्ही सामने गमवल्यामुळे ते अखेरच्या म्हणजे आठव्या क्रमाकांवर आहेत.

आज रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार आहे. या लढतीनंतर गुणतक्त्यात पुन्हा एकदा फेरबदल होणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

Marthi joke : करोना आणि पाटीची चर्चा

0

एका दुकानाच्या दरवाजावर सॅनिटायझर स्टँडजवळ पाटी लावली होती.

सॅनिटायझर फूटपंपाला गाडीचा अॅक्सिलेटर समजून पायानं वारंवार दाबत बसू नये…

एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यापुरतं चार थेंब सॅनिटायझर येतं… ते पुरेसं आहे.

आपल्याला हात साफ करायचे आहेत,

आंघोळ करायची नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Corona Vaccine : संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन!

0

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधताना भारताचे यांनी जगाला एक मोठं दिलंय. हे आश्वासन देताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय. महामारीच्या या संकटातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीनं १५० हून अधिक देशांना गरजेची औषधं पुरविली आहेत. ‘जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश’ म्हणून मी आज जगाला एक आश्वासन देऊ इच्छितो. ‘भारताची लस निर्मिती आणि लस पुरवठा क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल’ असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

भारताचा मार्ग… जनकल्याण ते जगकल्याण!

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रतिष्ठा आणि याचा अनुभव आम्ही विश्वहितासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्याण ते जगकल्याण असा आहे. भारत नेहमीच शांती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी आवाज उचलत राहील. भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवीय मूल्यांचे शत्रू असलेल्या – दहशतवाद, अवैध हत्यारांची तस्करी, ड्रग्ज, मनी लॉन्डरिंग यांच्याविरुद्ध उठेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

गेल्या चार – पाच वर्षांत ४०० दशलक्ष लोकांना बँकिंग सिस्टमशी जोडणं सोपं नव्हतं. परंतु, भारताना ही शक्य करून दाखवलं. आज भारतात गावांतील १५० दशलक्ष घरांत नळानं पाणी पोहचवण्याची मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भारतानं आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरनं जोडण्याच्या एका मोठ्या योजनेची सुरूवात केलीय. करोना संकटानंतर भारत ‘आत्मनिर्भर भारता’ची भूमिका घेत पुढे वाटचाल करतोय. आत्मनिर्भर भारत मोहीम, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक फोर्स मल्टिप्लायर सिद्ध होईल. सर्व योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचेल, हे भारत सुनिश्चित करत आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर दिलंय.

करोना महामारीला तोंड देताना आज सगळं विश्वच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जातंय. आज आपल्याला सर्वांनाच गंभीर आत्ममंथनाची गरज आहे, असं म्हणतानाच ‘या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारला.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कोल्हापुरात खळबळ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणींची हत्या

0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: बेळगाव जिल्ह्यातील मच्छी या गावात दोन युवतींचा खुरप्याने गळा कापून अज्ञात युवकांनी अमानुषपणे खून केला. सायंकाळी चार वाजता घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राजश्री रवी बंदुर व रोहिणी गंगाप्पा हूलमनी अशी या दोन मयत युवतींची नावे आहेत. प्रेमविवाहातून ही हत्या झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री व रोहिणी या दोघीही काळे नटी वाघवडे या गावच्या युवती होत्या. दोघींनीही काही महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला केला होता. त्या दोघी पतीसमवेत मच्छे या गावात राहत होत्या. दुपारी दोघी फिरायला बाहेर पडल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी भर रस्त्यावर त्यांचा खून केला.

दोन्ही युवतींचा खुरप्याने गळा कापल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हत्या केल्यानंतर ते हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. या दोघींनी प्रेम विवाह केल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती. पोलिस उपायुक्त विक्रम आपटे यांनी घटनास्थळी भेट देत अधिक चौकशी सुरू केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

'या' जिल्ह्यात रुग्णवाढीच्या संख्येत ५० टक्के घट

0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा रोज कमी होत असल्याने जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मृतांचा आकडाही कमी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ हजारांवर पोहोचला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाने हाहाकार उडवला. या दोन महिन्यात जवळजवळ तीस हजारांवर बाधित आढळले. मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला. यामुळे जिल्ह्यात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. आठ दिवस मात्र जिल्ह्यात करोनाचा आकडा कमी होत आहे. पूर्वी रोज एक हजारावर बाधित आढळत होते. हा आकडा ५० टक्क्यांनी घटला आहे.

आज दिवसभरात ५४६ बाधित आढळून आले. शुक्रवारी हा आकडा ३६१ होता. मृतांचा आकडा रोज ३० पेक्षा अधिक होता, तोही आता गेले चार दिवस कमी होत आहे. आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला.

प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई, जनजागृती, लोकांनीच घालून घेतलेली स्वयंशिस्त यामुळे हा आकडा कमी होत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत १३५४ जणांचा करोनाने बळी घेतला असून ३१ हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९६११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सं

दरम्यान, राज्यातील
रुग्णांचा आलेख वाढत असताना आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

IPL 2020: KKR vs SRH कोलकाताचा पहिला विजय, हैदराबादचा ७ विकेटनी केला पराभव

0

अबुधाबी: गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीनंतर शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा ७ विकेटनी पराभव केला. यासह कोलकाताने २०२०मधील पहिल्या विजयाची नोंद केली.

वाचा-

हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ११४ धावांचे आव्हान दिले होते. गिल आणि सुनिल नरेन यांनी कोलकाताच्या डावाची सुरूवात केली. पहिल्या षटकात गिलने चांगली सुरूवात करून दिली खरी पण नरेन दुसऱ्या षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर नितीश राणा १३ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. राणाच्या जागी आलेला कर्णधार दिनेश कार्तिकला राशिद खानने सुरेख चेंडूवर शून्यावर बाद केले.

वाचा- वाचा-
कार्तिकच्या विकेटमुळे कोलकाताची अवस्था ३ बाद ५३ अशी झाली होती. पण गिलने कोलकाताचा डाव सावरला. त्याने ६२ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्याने ५ चौकर आणि २ षटकार मारले. तर इयॉन मार्गनने नाबाद ४२ धावा केल्या.

वाचा-
त्याआधी नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना फार समाधानकारक सुरूवात करता आली नाही. जॉनी बेयरस्टो ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मनिष पांड्या यांनी धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण वॉर्नरला वरूण चक्रवर्तीने बाद केले. त्यानंतर वृद्धीमान सहाने पांड्या सोबत अर्धशतकी भागिदारी केली. सहा ३० धावांवर बाद झाला. दरम्यान पांड्याने अर्धशतक पूर्ण केले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

नागपुरात थरार! कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या

0

नागपूर: जुगार अड्डा चालक व कुख्यात बाल्या ऊर्फ किशोर बिनेकर याची धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास महाराजबाग रोडवरील बोले पेट्रोलपंपासमोर घडली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी बाल्या हा काळ्या रंगाच्या कारने जात होता. बोले पेट्रोल पंपाजवळ सिग्नल लागल्याने तो थांबवल्या याच वेळी मोपेड व बुलेटवर पाच जण आले. त्यांनी बाल्या याला कारमधून बाहेर काढले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात बाल्या खाली पडला. बाल्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताना मारेकरी मोपेड व बुलेटने वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी बाल्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून मोरकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. बाल्याच्या हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल; राउत- फडणवीसांच्या भेटीनंतर चंद्रकात पाटलांचं विधान

0

मुंबईः विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार अंर्तविरोधामुळेच पडेल असं सूचक विधान केलं आहे.

‘गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण फडणवीस, मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं, म्हटलं नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल, असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा वेबिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते, राजकीय क्षेत्रात भिन्न पक्षांचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांनी भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

वितरक-ग्राहकांना फटका; हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : दुचाकींसाठी जगप्रसिद्ध असलेली ही कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळणार आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) या महासंघाने शुक्रवारी दिली. यामुळे देशभरात कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या ३५ डीलरशीपमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना रोजगारास मुकावे लागणार आहे.

हर्ले डेव्हिडसनने आपण देशातील उत्पादन प्रकल्प तसेच विक्री केंद्रे बंद करत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे. या नोकऱ्या जाण्याबरोबरच या अमेरिकन बाइक उत्पादक कंपनीच्या जाण्यासह हर्ले डेव्हिडसनच्या वितरकांना १३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. या सर्व वितरकांनी हर्ले डेव्हिडसनच्या महागड्या बाईक विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली आहे, याकडे फाडाने लक्ष वेधले आहे.

फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, आपण भारतातील उत्पादन प्रकल्प बंद करत आहोत याविषयी हर्ले डेव्हिडसनने आपल्या वितरकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. या सर्व वितरकांना अद्याप कंपनीकडून तसे अधिकृतरीत्या कळायचे बाकी आहे. वितरकांबरोबरच हर्ले डेव्हिडसनच्या बाइक खरेदी केलेल्या ग्राहकांपुढे या बाइकचे सुटे भाग मिळण्याचा मोठाच प्रश्न निर्माण होणार आहे.

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पश्चिम रेल्वेचा दिलासा; महिलांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

0

मुंबईः पश्चिम रेल्वेनं मुंबई व उपनगरांतील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची मोठी संख्येमुळं लोकलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पश्चिम रेल्वेनं एक पाऊल टाकलं आहे. (
Latest Updates )

मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामांतील वेळेतील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरु करण्यात येणार आहेत. सोमवार २८ सप्टेंबरपासून या लोकल फेऱ्या सुरू होतील. विरार- चर्चगेटसाठी सकाळी ७. ३५ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी ६.१० वाजता चर्चगेट- विरार लोकल रवाना होणार आहे.

मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं त्यात वाढ केली आहे. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टनसिंग पाळले जावे व लोकलमध्ये गर्दी होऊ नये या होऊ नये या हेतूने विशेष लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेने केली आहे. लोकलबाबत काही अफवा पसरवल्या जात असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts