Thursday, November 30, 2023
Home Blog Page 7192

ठाकरे सरकारने करून दाखवले!; 'या' यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप

0

मुंबई: नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘ ‘ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू प्रथम तर राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. राज्याने २०१९ मध्ये असलेल्या तिसऱ्या क्रमांकावरून २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री यांनी आज दिली. राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारसाठी हे खूप मोठे यश मानले जात आहे. ( )

वाचा:

कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्याचे काम केले जाते. हा अहवाल तयार करीत असताना नाविन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो. हा इंडेक्स तयार करण्यासाठी नवनिर्मितीची दोन परिमाणे ठरलेली आहेत. यात इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांचा अनुक्रमे समावेश होतो. शेवटचा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. राज्य व केंद्रशासित प्रदेशांची इनोव्हेशन कॅपबिलिटीजचे मूल्यांकन करणारा अशा प्रकारचा हा अहवाल गतवर्षी पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचा:

राज्यातील अनेक शासकीय विभागांच्या तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई फिनटेक हब इत्यादींच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरे आले आहे. राज्य सरकारने हे निश्चित केले आहे की, महाराष्ट्र राज्य यात अग्रेसर असेल. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह पॉलिसीच्या माध्यमातून शासन स्टार्टअप व इनोव्हेशनला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. द्वारे महाराष्ट्र स्टार्टअप वीकचे आयोजन, राज्यभर इन्क्युबेटरचे जाळे तयार करणे, स्टार्टअप यात्रा सारख्या उपक्रमाचे आयोजन, स्टार्टअपसाठी भरीव आर्थिक तरतूद इत्यादी उपक्रमांच्या साहाय्याने राज्याला एक महत्त्वपूर्ण इनोव्हेशन परिसंस्था बनविले जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुणे: कार पार्क करून टेकडीवर जात असाल तर सावधान!; हे काय घडलं पाहा

0

पुणे: टेकडीवर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पाषाण रस्त्यावरील ते दरम्यान उभ्या केलेल्या नऊ कारच्या काचा फोडून ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडीली आहे. ( )

वाचा:

याबाबत ४७ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी सहा ते सव्वा सात दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःश्रृंगी टेकडी येथे सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक त्यांच्या कार या येथे पार्क करतात. रविवारी सकाळी देखील या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पोलीस संशोधन केंद्र ते अभिमान श्री सोसायटी दरम्यान रस्त्यावर वाहने पार्क केली होती. सकाळी सहा ते सव्वा सातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या कारच्या काचा फोडल्या व किंमती ऐवज लांबवला.

वाचा:

तक्रारदार यांच्या कारची काच फोडून त्यातून सात हजार रुपये किंमतीचा मोबाइल, रोख रक्कम असा २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. तक्रारदार यांच्या प्रमाणेच इतर नऊ कारच्या काचा फोडून ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे पाहणीत समोर आले आहे. टेकडीवर फिरून आल्यानंतर नागरिकांना त्यांच्या कारच्या काचा फोडल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या कारमधील मोबाइल व इतर ऐवज चोरून नेला होता. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा शोध सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे; गृहमंत्री देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती

0

नागपूर : राज्यातील अधिकारी-कर्मचारी संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. त्यामुळे पोलीस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री यांनी आज नागपूर येथे केली. दरम्यान, अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच अशाप्रकारचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. ( )

वाचा:

नागपुरातील पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. होते. व्यासपीठावर पोलीस महासंचालक , विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, विनिता साहू, पोलीस अधीक्षक राकेश ओला व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

वाचा:

नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून राज्यात स्वातंत्र्यापूर्वी ४८ टक्के घरे होती. मात्र नंतरच्या काळात केवळ ४२ टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले. करोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे पोलीस विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलीस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प बांधताना पूर्णत: बाहेरुन निधी उभारण्यात येणार असून कंत्राटदाराला ४ एफएसआय देण्यात येणार आहे.

वाचा:

जेल पर्यटन सुरु करत असून, त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी येरवडा जेल येथून होणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांना जिथं ठेवलं होतं त्या खोल्या, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार, चाफेकर बंधू यांना फासावर चढवण्यात आलेला यॉर्डही पर्यटकांना पाहता येणार आहेत. पुण्यानंतर रत्नागिरी, नाशिक, धुळे आदी जेलमध्येही पर्यटन सुरु करण्यात येणार आहे. नागपुरातील पोलीस मुख्यालय आणि आयुक्त कार्यालय इमारतींचेही बांधकाम पूर्ण करत येथे घोडदळ सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगून, पोलिसांसाठी बॉडी वॉर्म कॅमेऱ्यांनंतर सेल्फ बॅलन्सिंग स्कूटरही पोलिसांच्या मदतीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य पोलीस दल सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांनी ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पात सायबर सिक्युरिटी, सेंटर फॉर एक्सलन्सचा समावेश असल्याचे सांगितले. ११२ ही आपत्कालीन सेवा लवकरच मुंबईत सुरू करणार असून, त्याची दुसरी कंट्रोल रूम नागपुरात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी लागणाऱ्या दुचाकी-चारचाकी गाड्यांची खरेदीही करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात पोलीस महासंचालक शिबीर कार्यालय सुरू राहायचे. इथे कायमस्वरूपी कार्यालयाची गरज होती. आता हे कार्यालय सुरू होत असल्यामुळे त्याचा आनंदही आहेच. शिवाय कायदा व सुव्यवस्थेसह प्रशासकीय कामामध्ये गतीशिलता येणार आहे. प्रत्येक कामासाठी मुंबई येथे जाण्याची गरज राहणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

अजित पवारांचा एक दिवस बारामतीसाठी; भेटीसाठी लागली भलीमोठी रांग

0

: बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा, तसेच विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज केल्या. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत बारामती तालुक्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं असून विजयी सदस्यांनी आज येथे अजित पवार यांची भेट घेतली. पवारांच्या भेटीसाठी सदस्य व स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी रांग लागली होती. ( Deputy CM )

वाचा:

बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून बारामती शहरात तसेच तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार करावीत, कामे वेळेत करावीत, कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात दुर्लक्ष करू नये, आवश्यक त्या ठिकाणी वन विभागाची परवानगी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वाचा:

बैठकीला नगराध्यक्षा , पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, संभाजी होळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

वाचा:

आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तालावास भेट दिली. सुशोभित केलेल्या पाझर तलावाचे काम पाहून अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावाच्या सभोवती ओपन जीम आणि प्ले ग्राउंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पदाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या ‘आयटीआय’ इमारतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली.

वाचा:

सुपे येथील नियोजित मार्केट, पोलीस स्टेशनच्या जागेची पाहणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिल्या, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी अजित पवार यांनी केली. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला…

0

नवी दिल्ली, : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि ते पुन्हा विराट कोहलीकडे देण्यात आले. यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत आपले मत नेमके काय आहे, याबाबत अजिंक्यने सांगितले आहे.

याबाबत अजिंक्य म्हणाला की, ” भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याबाबत माझ्यामध्ये आणि विराट कोहलीमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. कारण जेव्हा विराट कोहली कर्णधार असतो तेव्हा भारतीय संघाला कसा विजय मिळवून देता येईल, हेच त्याचे ध्येय असते. त्याचबरोबर जेव्हा मी भारताचे नेतृत्व सांभाळतो तेव्हा माझ्या मनामध्ये हीच भावना असते. कर्णधार कोणीही असला तरी भारतीय संघाला विजय मिळवून देणे हे सर्वात महत्वाचे आहे, असे मला तरी वाटते.”

अजिंक्य पुढे म्हणाला की, ” इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहली भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवणार आहे आणि माझ्याकडे उपकर्णधारपद असेल. यावेळीही आमच्यामध्ये कोणतीच स्पर्धा नसेल. आम्हा दोघांसाठीच भारतीय संघाने विजय मिळवणे हीच महत्वाची गोष्ट आहे. त्या एका ध्येयासाठीच आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे संघाचे नेतृत्व कोणाकडे आहे आणि त्यामध्ये काय बदल होत आहे, यापेक्षा संघभावना सर्वात महत्वाची आहे, असे मला तरी वाटते. त्यामुळे कर्णधारपदाबाबत माझ्यात आणि विराटमध्ये कोणतीच स्पर्धा नाही.”

रिषभ पंतच्या खेळीबाबत अजिंक्य नेमकं काय म्हणाला, पाहा…ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने अविस्मरणीय खेळी साकारली. पंतच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला विजयावर शिक्कामोर्तब करता आले. पंतच्या या खेळीबाबत अजिंक्य म्हणाला की, ” आम्ही पंतला फक्त एकच गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे तु नैसर्गीक खेळ करत राहा. बाकी कोणत्याही गोष्टींचा तु विचार करू नकोस. पंतने तिच गोष्ट केली आणि त्यामुळेच आम्हाला अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवता आला.” आज तक वाहिनीला अजिंक्यने आपली मुलाखत दिली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी 'या' नेत्याची काढली पिसं

0

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी जनतेनेचे त्यांना धडा शिकविला’, अशी तोफ डागतानाच तालुक्याच्या विकासातील शुक्राचार्यांना कायमचे हटवा, तुमच्या विकासाचे मार्ग खुले होतील, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केले. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. ( Latest News Update )

वाचा:

भंडादरा येथे अकोले तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री होते. संयोजक अशोक भांगरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर त्यांचे पुत्र अमित भांगरे यांची राजकारणातील प्रवेशाची घोषणाही यावेळी करण्यात आली.

वाचा:

राज्यात नवे सरकार आल्यानंतर पवार प्रथमच अकोले तालुक्यात आले होते. त्यामुळे शरद पवार त्यांचे जुने सहकारी मधुकर पिचड यांच्यासंबंधी काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. पवार यांनी पिचड यांचे नाव घेता आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘आता बोलताना काही वक्त्यांनी मधल्या काळात अकोले तालुक्यातील विकास कामे रखडली असा उल्लेख केला. ही गोष्ट मलाच मान खाली घालायला लावणारी आहे. कारण ‘त्या’ येथील नेतृत्वाला आम्हीच मंत्री केले, विरोधी पक्षनेतेपद दिले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. त्यांच्या पुढच्या पिढीलाही संधी दिली. तरीही मागील विधानसभेच्यावेळी अनेकांच्या अंगात आले होते. ते चमत्कारिक वागू लागले होते. पक्ष सोडून जाणाऱ्यांची रोज नवी यादी पाहायला मिळत होती. लोक म्हणू लागले आता कसे होणार? पण हा प्रकार आपल्याला नवा नव्हता. १९८० मध्ये माझ्या पक्षाचे ५६ आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता झालो. नंतर मी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलो असताना त्यातील ५० जण पक्ष सोडून गेले. माझे विरोधी पक्षनेतेपदही गेले होते. मात्र, त्यामुळे मी डगमगलो नाही. काम करीत राहिलो. पुढे आलेल्या निवडणुकीत आम्हाला सोडून गेलेल्यांपैकी ४८ जणांचा पराभव झाला. दिलेला शब्द न पाळणारे लोक जनतेलाच आवडत नाहीत. त्यामुळे अशांना लोकच धडा शिकवितात. अशीच भूमिका अकोले तालुक्यातील नेत्यांनीही घेतल्याचे दिसून आले. या तालुक्यातील साखर कारखाना कर्जबाजारी असल्याचे मला सांगण्यात आले. माझे येथील शेतकऱ्यांना आवाहन आहे की, कारखान्याच्या विकासाच्या आड येणारे शुक्राचार्य कायमचे तेथून हटवा, कारखाना पुढे उत्तम पद्धतीने चालविण्याची जबाबदारी आम्ही घेतो,’ असे सांगत पिचड यांना विधानसभेसोबतच तालुक्याच्या राजकारणाच्या अन्य क्षेत्रांतूनही हटविण्याची भूमिका पवार यांनी जाहीर केली.

वाचा:

सायकलवरून भंडारदरा

अकोले तालुक्याची जुनी आठवण सांगताना पवार म्हणाले, ‘मी नववीत असताना लोणी येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत होतो. त्यावेळी माझे बंधू प्रवरा कारखान्यात नोकरीला होते. तेव्हा एकदा मी सायकलवरून भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा पाहण्यासाठी आलो होतो. तेव्हापासून हा भाग मला खूप आवडतो. या भागाचा पर्यटनदृष्या नक्कीच विकास होऊ शकतो. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास आणि अन्य विभागांकडून येथे निधी आणावा.’

वाचा:

असा झाला पवनचक्की प्रकल्प

सातारा जिल्ह्यातील आणि त्यानंतर अकोले तालुक्यातही सुरू झालेल्या पवनऊर्जा प्रकल्पाच्या जन्माची गोष्टही पवार यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘एकदा मी हेलिकॉप्टरने सातारा जिल्ह्यात गेलो होतो. विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे जाताना पाटण तालुक्यातील डोंगराळ भागावरून गेलो. या डोंगरांचा काही तरी उपयोग झाला पाहिजे, असा विचार करून पाटणकर यांना घेऊन हेलिकॉप्टरनेच पुन्हा त्या डोंगरावर येत एका ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविले. तेथे प्रचंड वारा होता. आमचे हेलिकॉप्टरसुद्धा हलत होते. या वाऱ्याचाच काही तरी उपयोग करण्याची कल्पना सुचली. पूर्वी आपण जर्मनीत पवनऊर्जा प्रकल्प पाहिला होता. तोच येथे राबविण्याचे ठरले. त्यानुसार नंतर संबंधितांच्या बैठका घेऊन सूचना केल्या. आज त्या भागात ३ हजार पवनचक्क्या आहेत. अकोले भागात २५० पवनचक्क्या आहेत. यासाठी जागा देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मात्र मिळाली पाहिजे,’ अशी आपली भूमिका आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

स्टार कपल वरुण धवन आणि नताशा दलाल विवाहबंधानत; फोटो पाहण्यासाठी पाहावी लागणार वाट

0

मुंबई: अभिनेता यानं त्याची प्रदीर्घ काळाची मैत्रीण हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. आज म्हणजे २४ जानेवारी रोजी ही जोडी अलिबाग इथल्या अलिशान रिसॉर्टमध्ये विविहाबंधनात अडकली. करोनाच्या पाश्वभूमीवर लग्न सोहळ्याला कुटुंबिय आणि काही निवडक मित्रमंडळींनी उपस्थित लावली होती.

गेल्या काही दिवासांपासून बॉलिवूडमध्ये या लग्नाची चर्चा सुरू होती. सर्वातआधी संगीत सोहळा पार पडला. त्यानंतर हळदीचा सोहळा आणि आज लग्न पार पडलं.

बड्या सेलिब्रिटींना आमंत्रण नाहीबिग फॅट वेडिंग न करता लो- प्रोफाइल वेडिंग करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला. म्हणूनच या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं नव्हत. अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या कुटुंबियांना वरुणच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

वरुण आणि नताशा यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, दोघं एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत आहेत. शाळेत त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघांच्या कुटुंबियांमध्ये मैत्री झाली. हे स्टार कपल गेल्या वर्षी व्हिएतनाममध्ये लग्न करणार होते. पण कोविड- १९ मुळे त्यांनी लग्न पुढं ढकललं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

IND vs AUS : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर आली ही वाईट वेळ, जगासमोर लाज गेली…

0

नवी दिल्ली, : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेनवर वाईट वेळ आली आहे. या एका गोष्टीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर पेनची अब्रु गेल्याचे म्हटले जात आहे.

पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. हा पराभव पेनच्या जिव्हारी लागलाच, पण त्यानंतर अशी एक वेळ आली की, जगसमोर त्याची लाच गेली. कारण सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये पेनवर चक्क पाणी आणण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच पेन हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. पण या लीगमध्ये त्याला पाणक्याची भुमिका बजवावी लागली. त्यानंतर चाहत्यांनी पेनला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पनने जे भारतीय संघाबरोबर केले त्याचेच त्याला पळ मिळल्याची भावना यावेळी काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे

नेमकं घडलं तरी काय, पाहा…बिग बॅश लीगमध्ये पेन हा होबार्टच्या संघाकडून खेळतो. यावेळी होबार्ट आणि सिडनी यांच्यामध्ये सामना सुरु होता. त्यावेळी होबार्टच्या संघातील मऍथ्यू वेड आणि मोइसेस हेनरीक्स हे दोघे फलंदाजी करत होता. त्यावेळी झालेल्या ड्रींक्स ब्रेकमध्ये चक्क पेन पाण्याच्या बाटल्या घेऊन त्यांच्यासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. पेनची संघात निवड करण्यात आली नाही की त्याला विश्रांती देण्यात आली, हे अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. पण पेनवर मैदानात पाणी घेऊन जाण्याची वेळ आल्याचे मात्र यावेळी पाहायला मिळाले.

पेनने कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजांवर शाब्दिक शेरेबाजी केली होती. भारताच्या आर. अश्विनला तर पेनने ही तुझी अखेरची कसोटी मालिका असेल, असेदेखील म्हटले होते. त्यावर अश्विनने पेनला चोख उत्तर दिले होते. अश्विन यावेळी म्हणाला होता की, या मालिकेनंतर तुझे कर्णधारपद राहील की नाही, हे पहिल्यांदा बघ. त्यानंतर दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पण पेनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाला ब्रिस्बेनमधील सामना गमवावा लागला आणि त्यांच्या हातून मालिका निसटल्याचे पाहायला मिळाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

मुंबईत शेतकऱ्यांचा मोदी सरकारविरुद्ध एल्गार; ठाकरे सरकारने दिले बळ!

0

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी कडाक्याच्या थंडीतही ठाण मांडून बसलेले आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात एकवटू लागले आहेत. या आंदोलनात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री हेसुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. ( )

वाचा:

या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमायला सुरुवात झाली आहे. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी काही वेळापूर्वीच आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

वाचा:

आझाद मैदानात शेतकऱ्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेतकऱ्यांना कोणतीही आडकाठी येणार नाही, अशी काळजी घेण्यात येत आहे. आझाद मैदानात भव्य असा मंडपही उभारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहणही केलं जाणार आहे.

वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चाबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाला उद्या (२५ जानेवारी) संबोधित करणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते हे सुद्धा मोर्चात सहभागी होतील व मोर्चाला मार्गदर्शन करतील, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोर्चेकऱ्यांशी संवाद साधणार, असे सांगितले जात असले तरी ते नेमके केव्हा आझाद मैदानात येणार हे मात्र अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

आणखी एक आयपीओ : स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेडमध्ये आहे गुंतवणुकीची संधी

0

मुंबई : स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड (कंपनी) या प्रेशर कुकर्सच्या बाजारपेठेतील आघाडीच्या कंपनीची ४१२ कोटींची समभाग विक्री योजना सोमवारी भांडवली बाजारात दाखल होत आहे. या आयपीओसाठी प्रती शेअर ३८४ ते ३८५ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तीन आयपीओ बाजारात दाखल झाले होते.

कंपनीने आपल्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागांच्या विक्रीची इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) सोमवार २५ जानेवारी २०२१ रोजी खुली होईल तर गुरुवार २८ जानेवारी २०२१ रोजी बंद होईल.

या आयपीओमध्ये ९५ कोटींचे फ्रेश इश्यू आणि प्रमोटर राजेंद्र गांधी, सुनीता राजेंद्र गांधी, सिकोया कॅपिटल इंडिया ग्रोथ इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स आणि एससीआय ग्रोथ इन्व्हेस्टमेंटस यांच्याकडील ६०,०७,९२० पर्यंत समभाग असे मिळून ८२,५०,००० पर्यंत समभागांची या योजनेत विक्री केली जाणार आहे.

गुंतवणूकदारांना कमीत कमी ३८ समभाग आणि त्यापुढे ३८ च्या पटीत शेअर खरेदीसाठी बोली लावता येईल. या ऑफरमधील कमीत कमी ७५ टक्के भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील.

याशिवाय नेट इश्यूपेक्षा १५ टक्के पेक्षा कमी भाग १० टक्क्यापेक्षा कमी भाग रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल आणि यामध्ये सेबी आयसीडीआर नियमाचे पालन केले जाईल. यासाठी इश्यू किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त सर्व संभाव्य बोली लावणारे अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (एएसबीए) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या एएसबीए खात्यांची माहिती आणि लागू असेल तर आरआयबीच्या बाबतीत युपीआय आयडी देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे एससीएसबीकडून किंवा यूपीआय यंत्रणेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील, असे कंपनीने म्हटलं आहे.

फ्रेश इश्यूमधून उभी राहणारी निव्वळ रक्कम पुढील कामांसाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे. ७६ कोटी रुपये कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची परतफेड तसेच आगाऊ रक्कम भरण्याच्या कामी वापरण्यात येणार आहे. बीएसई आणि एनएसईवर शेअरची नोंदणी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts