Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7199

खाते बदलल्याने बंगलामधील मंत्र्याचा राजीनामा, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

0

कोलकाता: पश्चिम बंगालचे वनमंत्री ( ) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०२१ मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार सोडणारे ते तिसरे मंत्री आहेत. राजीनामा देण्याचं कारण राजीव यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. ते ढसाढसा रडू लागले. आपल्याला कोणतीही औपचारिक सूचना खातं बदलण्यात आलं. यामुळेच कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत, असं राजीव यांनी सांगितलं. टीएमसीचे अनेक नेते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राजीव यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजभवन येथे राज्यपाल धनखड यांची भेट घेतल्यानंतर राजीव बाहेर आले. सिंचन खातं बदलून वन खाते दिल्याची माहिती टीव्ही वाहिनीद्वारे आपल्याला कळली. खातं बदलल्याने आपल्याला कुठलीही समस्या नाही. पण ज्या पद्धतीने हे खाते बदल केले गेले त्यामुळे आपल्या खूप त्रास झाला. गेली अनेक वर्षे ममता बॅनर्जींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचा आभारी आहे. यापुढे आपण बंगालच्या जनतेसाठी काम करत राहू, असं राजीव यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

'आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आणि नोकरी'

0

चंदीगडः पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलनात ( ) मृत्यू झालेल्या ७६ जणांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या शेतकर्‍यांच्या ( ) कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई ( ) आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ( ) यांनी केली आहे.

फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारने राज्यांचा सल्ला घेतल्याशिवाय हे कायदे बनवले आहेत. तर शेती हा राज्यांचा विषय आहे आणि त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. यामुळे थंडी, ऊन, पाऊस याची पर्वा न करता शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढा देत आहेत, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

हे तीन लागू करून केंद्र सरकारला बाजार समित्या फोडायच्या आहेत, एमएसपी यंत्रणा बंद करायची आहे. आधीच दोन पिकांना एमएसपी मिळतो. जर ते देखील खुल्या बाजाराच्या हवाली करण्यात आले तर मक्यासह इतर पिकांची जी अवस्था आहे, तशी स्थिती होईल, असा आरोप त्यांनी केला.

‘पंतप्रधानांच्या समितीत पंजाबचा समावेश नव्हता’

पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे बनवण्यासाठी समिती स्थापन केली. पण त्यात पंजाबचा एकही सदस्य नव्हता. पहिल्या बैठकीत आम्हाला बोलवले नाही. ४० टक्के खाद्यान्य देणाऱ्या पंजाबचा समावेश समितीत का केला नाही? असे पत्र आपण पंतप्रधानांना लिहिले. त्यानंतर पंजाबला सदस्य केले गेले. दुसर्‍या बैठकीत आर्थिक मुद्दे होते ज्यात अर्थमंत्री मनप्रीत बादल हजेरी लावण्यासाठी उपस्थित होते, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील चर्चेवरही कॅप्टन अमरिंदर बोलले. केंद्र सरकार किती वेळा शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार? हे कायदे रद्द करण्यात काय अडचण आहे? घटनेत १३० ते १४० वेळा बदल केले गेले नाहीत का? सरकारला सुधारणांसाठी कायदा बनवायचा असेल तर हे तीन कायदे रद्द करावेत आणि एक समिती तयार करावी. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश असावा. त्यांच्या संमतीने कायदा तयार करून तो लागू केला जावा, असं सांगत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रावर निशाणा साधला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट, पकडलेल्या शूटरचा दावा

0

नवी दिल्लीः दिल्ली – हरयाणा सिंगू सीमेवर शुक्रवारी रात्री शेतकऱ्यांनी खळबळजनक दावा केला आहे. एका आहे, असा दावा आंदोलन करणाऱ्या सिंघूच्या सीमेवरील शेतकरी नेत्यांनी ( ) केला आहे. कथित शूटरच्या चेहरा झाकून या शूटरला माध्यमांसमोर ( alleges a plot to shoot four ) आणण्यात आलं होतं. हा शूटर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. पकडलेल्या शूटरने माध्यमांसमोर दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

शेतकऱ्यांच्या २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात गोळीबार करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता, असा दावा पकडण्यात आलेल्या शूटरने केला आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या आणि नागरिकांना भडकवण्याचं काम महिलांकडे होतं. जाट आंदोलनावेळीही परिस्थिती चिघळवण्यासाठी काम केल्याची कबुली शूटरने दिली.

येत्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनात व्यासपीठावरील चार जणांना गोळ्या घालून ठार करण्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. यासाठी चार जणांचे फोटो देण्यात आले होते. या मागे राय पोलिस स्टेशनचा एसएचओ प्रदीप सिंह हे असून ते नेहमीच आपला चेहरा झाकून आमच्या बोलत असतात, असा दावा शूटरने केला. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कथित कट उघड करणाऱ्या त्या शूटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राज्यात आतापर्यंत ७४ हजार जणांना लस; कोव्हॅक्सिनचं काय?

0

मुंबई : राज्यात शुक्रवारी २८२ केंद्रांवर २१ हजार ६१० (७६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना करण्यात आले. राज्यात सर्वात जास्त जिल्ह्यात १५१ टक्के लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून लसीकरणासाठी झालेल्या नोंदणीनुसार ही टक्केवारी आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. ( )

वाचा:

शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतची आकडेवारी सरकारने दिली असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि आज झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ७४ हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी दिली. राज्यात कोविशिल्ड सोबतच कोव्हॅक्सिन लसही दिली जात आहे. शुक्रवारी ३१८ जणांना देण्यात आली आहे, असेही व्यास यांनी सांगितले.

वाचा:

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंतची राज्यातील लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :

अकोला (२०५, ६८ टक्के), अमरावती (५५७, १११ टक्के), बुलडाणा (२५६, ४३ टक्के), वाशिम (२९८, ९९ टक्के), यवतमाळ (५००, ८३ टक्के), औरंगाबाद (७७२, ७७ टक्के), हिंगोली (२३४, ११७ टक्के), जालना (४३६, १०९ टक्के), परभणी (२४२, ६१ टक्के), कोल्हापूर (७६३, ६९ टक्के), रत्नागिरी (३०९, ६२ टक्के), सांगली (५४५, ६१ टक्के), सिंधुदुर्ग (१९५, ६५ टक्के), बीड (७५७, १५१ टक्के), लातूर (४३९, ७३ टक्के), नांदेड (२९६, ५९ टक्के), उस्मानाबाद (३०९, १०३ टक्के), मुंबई (१३६१, ९१ टक्के), मुंबई उपनगर (२०३०, ८५ टक्के), भंडारा (२६३, ८८ टक्के), चंद्रपूर ( ५३९, ९० टक्के), गडचिरोली (४३९, ९८ टक्के), गोंदिया (२५९, ८६ टक्के), नागपूर (१०२०, ८५ टक्के), वर्धा (६५७, ११० टक्के), अहमदनगर (८१०, ६८ टक्के), धुळे (३७०, ९३ टक्के), जळगाव (५४३, ७८ टक्के), नंदुरबार (३०४, ७६ टक्के), नाशिक (९१६, ७० टक्के), पुणे (१२७५, ४४ टक्के), सातारा (७३५, ८२ टक्के), सोलापूर (५८४, ५३ टक्के), पालघर (३४२, ८६ टक्के), ठाणे (१८०५, ७८ टक्के), रायगड (२४५, ६१ टक्के)

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कृषी कायदे; 'PM मोदींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावण्याचं औचित्य काय आहे?'

0

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी काद्यांविरोधात ( ) गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन ( ) सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात १० बैठका झाल्या. पण त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यावर संरक्षणमंत्री ( ) यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. नवीन हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात तीन पट वाढ होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

‘करोना व्हायरस एक वर्षापासून असेल तर या काळात कोणतंही विधेयक मंजूर होणार नाही का? सरकारने कोणताही अध्यादेश आणू नये का? सरकार आणि पंतप्रधानांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावण्याचं आचित्य काय आहे? संसदेत चर्चा झाली आहे आणि बहुधा अशी अनेक विधेयकं आहेत ज्यावर एकमत झालेलं नाही. विचारांमध्ये मतभेद असतात, असं राजनाथ सिंह म्हणाले.

कृषी कायद्यांवर राजनाथ सिंह म्हणाले…

शेतीबद्दल आपल्याला माहिती आहे. जे विधेयक आहेत आणि कायदे केले आहेत, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन पटीने अधिक वाढेल. तरीही शेतकऱ्यांना समस्या असल्यास कोणत्याही कलमात अडचण असेल तर ते मुद्दे सांगा, आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

चीनला स्पष्ट संदेश

एलओसीवरील पाकिस्तानच्या कुरापतींवर त्यांना प्रश्न विचारला गेला. पाकिस्तानचा विषय सोडून द्या. देशाचं नाव पाकिस्तान आहे पण नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया सुरू असतात. भारताला अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेतली जाते. हा सिलसिला थांबवला पाहिजे. आपले पंतप्रधान दबावापुढे झुकणारे नाहीत. मी संरक्षणमंत्री आहे. दबावापुढे झुकणार नाही. आपल्या प्रियजनांवर झुकलं जातं, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी चीन, पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

बीएचआर घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेची जळगावात खूप मोठी कारवाई

0

जळगाव: अर्थात पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात प्रमुख सूत्रधार महिनाभरापासून पोलिसांना हुलकावणी देत आहे. दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी सुनील झंवरचा मुलगा याला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता सुनील झंवरने नाशिकच्या मांडसांगवी येथील १०० कोटींची जमीन स्वस्तात घेतल्याच्या तक्रारीबात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अपर महसूल सचिवांनीही प्रकरणाची दखल घेतल्याने झंवरच्या अडचणी वाढल्या आहेत. ( Jalgaon )

वाचा:

जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुशंगाने नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करून कोट्यवधींचा अपहार केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताना दोघा चार्टर्ड अकाउंटंटसह चौघांना अटक केली तर गुन्हा दाखल झाल्यापासून अवसायक जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.

वाचा:

झंवर महिनाभरापासून पोलिसांना सापडत नाही. मध्यंतरी तो जळगावात येऊन गेल्याची तसेच अटक न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली होती. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जळगावात तपासासाठी आले होते. अखेरीस या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सनील झंवर याचा मुलगा सूरज झंवरला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले सीए यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अन्य संशयित सीए धरम सांखला, विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांच्या जामीन अर्जावर २७ जानेवारीस सुनावणी होणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

सारंग मटणाच्या दुकानात कामाला होता, जेवणावरून काकाशी झाला वाद आणि…

0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: जेवणावरून झालेल्या वादातून . ही घटना गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील कॉलनी परिसरात घडली.

अशोक संपत मेश्राम (वय ५०, रा. पंचशील कॉलनी) असे मृत व्यक्तीचे तर सारंग मेश्राम (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. अशोक हा आरोपीचा सख्खा काका आहे. ते शेजारी आहेत. अशोकला दारूचे व्यसन होते. तो चिकन व मटनाच्या दुकानात काम करायचा. सारंगही मटनाच्या दुकानात कामाला होता. दारुच्या व्यसनामुळे अशोकची पत्नी व मुले दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेले. तेव्हापासून तो एकटाच राहतो. अशोकने २०१२ मध्ये सारंगच्या वडिलांना कुऱ्हाडीने मारहाण केली होती. तरीही अशोक सारंगच्या घरीच जेवायचा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. तेव्हापासून सारंगने अशोकला जेवायला दिले नाही. त्यावरून गुरुवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून अशोक मटनाच्या दुकानात गेला. मला जेवायला का देत नाही, याचा जाब तो सारंगला विचारत होता. यावरून दोघांत भांडण झाले. दुकानातून रात्री घरी परतल्यानंतर अशोक त्याच्या झोपडीत झोपला होता. यावेळी सारंगने लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर मारून त्याचा खून केला. रात्रभर त्याचा मृतदेह तसाच पडला होता. सकाळी या परिसरातील कामगारांनी अशोकचा मृतदेह बघितला. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुण्याने मास्कसक्तीबाबत घेतला 'हा' धाडसी निर्णय; महापौरांनी दिली माहिती

0

पुणे: महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. तेव्हापासून करोनाच्या विळख्यात सापडलेलं पुणे शहर अजूनही या साथीतून पूर्णपणे सावरलेलं नाही. मात्र, नेहमीच निर्णयांच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहणाऱ्या पुण्याने आज बाबत खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याबाबत महापौर यांनी घोषणा केली आहे. ( )

वाचा:

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने घटताना दिसत आहे. त्यासोबतच पुण्यातील करोना मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. पुणे पालिका हद्दीत गेल्या २४ तासांत करोनाचे २३४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर करोनाने एक रुग्ण दगावला आहे. पालिका क्षेत्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ हजार ४६७ इतका खाली आला आहे. ही खूपच दिलासा देणारी बाब असून त्यातूनच पुणेकरांवरील निर्बंध एकेक करून सैल केले जात आहेत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुण्यातील अनेक व्यवहार आधीच सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे नवं वर्ष उजाडायच्या आधीच ३१ डिसेंबर रोजी पुणे शहर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त झालं होतं. या दिलाशानंतर आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आणखी एक सुखद धक्का पुणेकरांना दिला आहे.

वाचा:

पुणे पालिकेने मास्कसक्तीबाबत अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. शहरात एखादं कुटुंबं त्यांच्या स्वत:च्या कारमधून फिरत असेल तर त्यांना आता मास्कची सक्ती असणार नाही, असे महापौर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. मास्कसक्तीतून दिली जाणारी ही सवलत मर्यादित असेल. प्रवासी वाहतूक करणारी वाहने (ओला, उबर कॅब) तसेच दुचाकीवरून तुम्ही जात असाल तर मात्र तुम्हाला वापरणं बंधनकारक असेल, असेही मोहोळ यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, करोना साथ आल्यापासून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर मास्क आलेला आहे. आता करोनाचा जोर ओसरत असताना पुण्यात मास्कसक्तीतून मर्यादित स्वरूपात सवलत दिली गेल्याने या निर्णयाची बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. याची कशाप्रकारे अंमलबजावणी होणार, पुणे पालिका त्यावर कशाप्रकारे लक्ष ठेवणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

वाचा:

पुणे पालिकेचा आदेश नेमका काय आहे?

खासगी वाहनामध्ये वाहन चालकासह सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहनचालक अथवा अन्य व्यक्ती एकत्रित प्रवास करत असल्यास मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले असून क्षेत्रापुरताच हा आदेश लागू असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश महापौर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरही पोस्ट केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोनावरील लस घेतल्याच्या ६ दिवसांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

गुरुग्राम: हरयाणातील गुरुग्राममध्ये करोनावरील लस घेतल्यानंतर ( ) आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. पण या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू करोनावरील लस घेतल्याने झाला की इतर कुठल्या कारणाने हे स्पष्ट झालेलं नाही. पण या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी करोना लसीबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम अहवालातून काहीही स्पष्ट झालेले नाही, असं गुरुग्रामचे सीएमओ म्हणाले.

हरयाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील भांगरौला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ५५ वर्षीय राजवंती यांना १६ जानेवारीला लस देण्यात आली होती. राजवंतीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची माहिती शुक्रवारी दिली. पण मृत्यू करोनावरील लसीकरणामुळे झाल्याचा कुठलाही पुरावा नाहीए, असं सीएमओ वीरेंदर यादव म्हणाले.

कुटुंबीयांनी लसीला धरले जबाबदार

राजवंती यांचा मृत्यू कृष्णा नगर कॉलनी येथील त्यांच्या राहत्या झाला. राजवंती यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. चाचणीसाठी व्हिसेराचे नमुने पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच योग्य ते कारण स्पष्ट होईल, असं सीएमओ म्हणाले. पण मृत महिलेच्या कुटुंबीयांनी करोनावरील लसला जबाबदार धरलं आहे. मृताच्या कुटुंबीयांनी करोना लसीकरणविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. त्वरित थांबवावं, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांना १६ जानेवारीपासून देशभरात करोनावरील लस दिली जात आहे. लसीकरणानंतर काहींवर साइड इफेक्ट झाल्याचं समोर आलं आहे. पण बर्‍याच जणांना एलर्जी आणि भीतीची समस्या असल्याची नोंद झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

फडणवीसही रिकाम्या हाताने परतले!; अण्णांनी केंद्राला दिला 'हा' निरोप

0

नगर: ज्येष्ठ समाजसेवक यांनी ३० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पत्र घेऊन विरोधी पक्षनेते राळेगणसिद्धीत आले होते. तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, ठोस कारवाईशिवाय माघार नाही, असे सांगून अण्णा हजारे यांनी निर्णय बदलण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीसांसह चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हजारे यांचे मुद्दे केंद्र सरकारला कळवून पुन्हा चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ( )

वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांचे उपोषण थांबविण्यासाठी भाजपचे गेल्या काही दिवासांपासूनच प्रयत्न सुरू आहेत. काल हजारे यांनी तारीख आणि ठिकाणही जाहीर केले. त्यामुळे आज फडणवीस यांनी त्यांना भेटण्यासाठी येत असल्याचा निरोप पाठविला. ठोस उपाय असेल तरच या असे हजारे यांच्याकडून त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ज्येष्ठ नेते राळेगणसिद्धीत पोहचले. त्यांच्या पाठोपाठ फडणवीस आणि माजी मंत्री दाखल झाले. त्यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, यातून तोडगा निघू शकला नाही.

वाचा:

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘अण्णा हजारे यांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले. त्यांना सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनांवर चर्चा झाली. त्यातील काय काय पूर्तता झाली, भविष्यात काय निर्णय अपेक्षित आहेत, यावर चर्चा झाली. हे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविण्यात येणार आहेत. हजारे हे देशाचे भूषण आहेत. त्यांचे उपोषण होऊ नये, यासाठी अटोकाट प्रयत्न करणार आहोत. अण्णा हे मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांना केवळ तुमचे पत्र मिळाले, असे उत्तर देऊन चालत नाही. विचारपूर्वकच उत्तर द्यावे लागते, त्यामुळे त्यांच्या पत्राला उत्तर देताना उशीर होतो, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. चर्चा सकारात्नक झाली असून केंद्र सरकारचे मार्गदर्शन घेऊन पुढील फेरी होईल व उपोषणाची वेळ येणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

वाचा:

फडणवीस यांच्यानंतर अण्णा हजारे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पत्र घेऊन फडणवीस आणि त्यांचे सहकारी आले होते. त्या पत्रावर चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णयांबद्दल काहीही सांगता आले नाही. त्यामुळे ही चर्चा पुरेशी नाही. त्यामुळे आपण ३० जानेवारीपासून उपोषण करण्यावर ठाम आहोत. सुमारे दोन वर्षांपूर्वी हजारे यांनी लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राळेगणसिद्धीतच उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस मोठ्या लवाजम्यासह आले होते. त्यावेळी तब्बल सहा तास चर्चा झाली आणि तोडगा निघून उपोषण मिटले होते. यावेळी मात्र त्यांना यश आले असून चर्चेच्या फेऱ्या सुरूच राहणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts