Wednesday, September 27, 2023
Home Blog Page 7220

जगायचे कसे? रेल्वे नोकरीही मागू देईना… मुंबईकर तरुणांची व्यथा

0

म. टा. प्रतिनिधी,

अंधेरी एमआयडीसी येथे कामावर जाण्यासाठी चुनाभट्टी ते कुर्ला आणि कुर्ला ते घाटकोपर असा लोकलने प्रवास. घाटकोपरवरून मेट्रोमार्गे अंधेरी. अंधेरी मेट्रो स्थानकाहून चालत किंवा रिक्षाने एमआयडीसीमध्ये कामावर हजर असे पूर्वीचे चित्र. आता लोकल बंद आहेत. ३०२, १८१ या बेस्ट बस चूनाभट्टीहून अंधेरी गाठायची. बसमध्ये गर्दी असल्यास थांब्यावर न थांबताच गाड्या पुढे जातात. लोकल नसल्याने शोधायची कशी? जगायचे कसे याच चिंतेत दिवस ढकलत आहोत, अशी व्यथा नोकरी गमावलेल्या गुरुराज सपकाळ याने मांडली.

मुंबईत असे लाखो ‘गुरुराज’ आहेत. कामावर जाण्यासाठी लोकलव्यतिरिक्त अन्य पर्यायांचा महागडा प्रवास अनेकांना शक्य नसतो. आता सर्व क्षेत्रे सुरू झाली. लॉकडाउनमध्ये नोकरी गमावलेल्या अनेकांमध्ये गुरुराजही आहे. अनलॉकमध्ये नोकरी शोधण्यासाठी तरी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी गुरुराज आणि सामान्य मुंबईकरांची आहे. चुनाभट्टीहून बेस्टच्या दोनच बस अंधेरीसाठी धावतात. त्यांच्या फेऱ्याही कमी आहेत. एखाद्या थांब्यावर प्रवासी उतरणारा नसल्यास तो थांबा वगळला जातो. त्या थांब्यावरून प्रवासी गाडीत येईल, असा विचारही केला जात नाही, असे अनेक अनुभव मुंबईकरांना नवे नाहीत.

वाचा:

१० महिन्यांपासून सर्वांसाठी लोकल बंद आहेत. बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. ‘लोकलमधील गर्दीतच करोना होतो का’, असे प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना हास्यास्पद वाटत असले, तरी हेच वास्तवाशी निगडीत आहे. ‘करोना मारेल, त्याआधी बेरोजगारीच्या तणावातच जीव जातो की काय हीच भीती मनात असते. नोकरी नसल्याने घरात चिडचिड होते. कौटुंबिक आरोग्य बिघडते. याचा त्रास कुटुंबातील सर्वांनाच सहन करावा लागतो’, असे गुरुराज सांगतो. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’आहे. म्हणून त्यांचा सांभाळ करण्यासाठी, नोकरी शोधण्यासाठी लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, अशी सामान्य मुंबईकरांची मागणी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

मुंबईचे विमानतळ अखेर 'अदानी'कडे; मोदी सरकारचे शिक्कामोर्तब

0

म.टा. प्रतिनिधी, मुंबई

अखेर ”कडे सोपविण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या विमानतळात २६ टक्क्यांची भागीदारी असलेल्या केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्याला मंजुरी दिली आहे.

मुंबईचे विमानतळ याआधी जीव्हीके, एएआयसह अन्य दोन भागीदारांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीकडे होते. यांत जीव्हीकेची भागीदारी सर्वाधिक होती. पण जीव्हीके समूह आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच विमानतळात सुरुवातीपासून असलेले दोन महत्त्वाच्या भागीदारांनीही जीव्हीके समूहापासून फारकत घेतली. त्यावेळी जीव्हीकेने दुसरीकडून निधीचे उभारून विमानतळावरील स्वत:चा ताबा वाचवला. पण मागीलवर्षी या विमानतळाच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून जीव्हीकेला हे विमानतळ अदानी समूहाला विक्री करावेच लागले. या व्यवहारासंबंधीदेखील विविध स्तरावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. पण एएआयने अलिकडेच या व्यवहाराला हिरवा कंदिल दिला.

वाचा:

अदानी एअरपोर्ट्स ही कंपनीने विमानतळातील जीव्हीकेचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी केलेला आहे. त्यानंतरही जीव्हीके समूहाच्या विमानतळ उपकंपनीच्या डोक्यावर ३,७३९ कोटी रुपयांचे कर्ज असेल. तर मिआलच्या डोक्यावर ८,१०९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे दोन्ही कर्ज मिळून त्यातील ९५ टक्के रक्कमेचा भरणा अदानी एअरपोर्ट्स करणार आहे. त्याद्वारे या विमानतळाची ७४ टक्के भागीदारी ‘अदानी’कडे येईल. तर उर्वरित २६ टक्क्यांमध्ये एएआयची हिस्सेदारी कायम असेल. याच व्यवहाराला ‘एएआय’ने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

न्यू प्रायव्हसी पॉलिसीः व्हॉट्सअॅपचे 'हे' चार स्टेट्स पाहिले का?

0

नवी दिल्लीः WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध झाल्यानंतर कंपनीने थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे. युजर्संना या पॉलिसीसंबंधी अधिक माहिती मिळावी यासाठी कंपनीने चार स्टेट्स ठेवले आहे. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व युजर्संना हे व्हॉट्सअॅप आता दिसत आहे. व्हॉट्सअॅपने वृत्तमानपत्रात सुद्धा फुल पेज जाहिरात दिली आहे. कंपनी सर्व तऱ्हेने आपली पॉलिसी युजर्संना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

वाचाः

या स्टेट्समध्ये कंपनीने म्हटले आहे की, कंपनी तुमचे पर्सनल मेसेज वाचत नाही. किंवा ऐकत नाही. कारण, हे एंड टू एंड इनक्रिप्टेड आहे. ऑफिशल स्टेट्स पोस्ट असणे हे युजर्संसाठी आश्चर्यचकीत करण्यासारखे आहे. एकदा या पोस्टवर क्लिक केल्यानंतर युजर्सच्या स्टेट्स फीड हून हे गायब होतात. तसेच viewed Updates मध्ये सुद्धा हे स्टेट्स दिसत नाहीत. त्यामुळे असे वाटत आहे की, जगभरातील युजर्संसाठी हे स्टेट्स पोस्ट केले आहेत.

नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर जगभरातून कंपनीवर टीका केली जात आहे. नवीन पॉलिसी अपडेट न केल्यास युजर्संचे अकाउंट ८ फेब्रुवारी पासून डिलीट करणार असल्याचे कंपनीने आधी म्हटले होते. परंतु, लोकांचा संताप पाहिल्यानंतर कंपनीने थोडी नरमाईची भूमिका घेत तूर्तास ते मागे घेण्यात आले आहे.

वाचाः

नवीन पॉलिसीनंतर खूप साऱ्या युजर्संनी दुसऱ्या अॅप्सकडे सिग्नल आणि टेलिग्रामवर स्विच केले आहे. व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी आल्यानंतर या प्रायव्हेट प्रायव्हसी फोकस अॅप्सचे डाउनलोड मध्ये वेग आला होता. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग मध्ये म्हटले की, आम्ही त्या तारखेला पुढे करीत आहोत. कोणत्याही युजर्सचे अकाउंट ८ फेब्रुवारी रोजी डिलीट किंवा सस्पेंड होणार नाही. चुकीची माहिती पसरल्याने तिचे स्पष्टीकरण देण्याचा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करीत आहोत. आम्ही १५ मे ला नवीन बिजनेस ऑप्शन उपलब्ध करण्याआधी हळूहळू आपल्या पॉलिसीला रिव्ह्यू करण्यास सांगणार आहोत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

बापरे! करोना संदेशामुळे दररोज १० कोटी तास वाया

0

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : करोना संसर्गाचे संकट ओढवल्यापासून प्रत्येक करण्याआधी एक संदेश वाचला जातो. यासंदर्भात अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, या संदेशामुळे नागरिकांचे दररोज सुमारे साडेदहा कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास) वाया जातात. याचा नेमका त्रास कसा होतो, याबाबत मुंबईकरांनीही आपले अनुभव मांडले आहेत.

सरकारी कंपनीत नोकरीला असलेले अनिल गांगुर्डे यांनाही या संदेशाचा त्रास होतो. गांगुर्डे म्हणाले, ‘मी माझ्या कंपनीच्या महाव्यवस्थापकांचे काम बघतो. यासाठी त्यांचे फोन सतत मलाच घ्यावे लागतात. रोज अनेकांना त्यांच्या वतीने फोन करावे लागतात. यामध्ये संदेशामुळे अडथळे येतात. सातत्याने संदेश ऐकावे लागत असल्याने रोजच्या कामाचा वेळही वाया जातो. दिवसभरात तासाभराचा वेळ वाया जातो.’ अनंता निमस्कर हे तंत्रज्ञ आहेत. घरोघरी जाऊन ते फ्रिज, वॉशिंग मशिन दुरुस्तीचे काम करतात. प्रामुख्याने मध्य व उत्तर मुंबईत ते काम करतात. ते म्हणाले, ‘अनेकदा एखादा ग्राहक कॉल करतो. या संदेशामुळे कॉल लवकर लागत नाही. त्यामुळे तो अर्धवटच कॉल बंद करतो. अनेकदा या संदेशाच्या टेपमुळे समोरच्या ग्राहकाला लवकर कॉल करता येत नाही. मला रोज साधारण दहा जणांच्या घरी जावे लागते. त्या दहा जणांना किमान तीन वेळा कॉल करावा लागतो. प्रत्येक वेळी किमान ३० सेकंदाचा संदेश ऐकावा लागतो. यानुसार १५०० सेकंद तसेच वाया जातात. अन्य कॉल असतात ते वेगळेच.’

दीपक शिरस्ते हे एका राज्य सरकारी कंपनीत निविदा संदर्भातील विभागात आहेत. ‘मला निविदेसंदर्भात दररोज किमान ४० कॉल करावे लागतात. अनेकदा एखाद्या निविदादाराचा कॉल येतो. तो उचलला न गेल्यास त्यांना पुन्हा कॉल करावा लागतो. या प्रक्रियेत संदेश ऐकण्यात वेळ जातो. मग तो निविदादार विलंब झाल्याने कॉल घेत नाही. रोजच्या किमान ४० कॉलपोटी किमान अर्धा तास वाया जातो.’

भारतातील रोजचे कॉल : ३०० कोटी

एका फोनवरील रोजचे सरासरी कॉल : ३

ऐकण्यात जाणारा वेळ : ३ कोटी तास

एकूण रोजचे नुकसान : १० कोटी तास (१.३० कोटी मनुष्य तास)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणणार; CM ठाकरे यांनी दिला 'हा' शब्द

0

मुंबई : मुख्यमंत्री यांनी लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. ( Latest Update )

वाचा:

‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा..! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात नमूद केले आहे.

वाचा:

शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढायचंय!

उपमुख्यमंत्री यांनीही सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. , कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केल्या. ‘वर्ष १९५६ मध्ये आजच्याच दिवशी बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील’, असे अजित पवार यांनी नमूद केले.

वाचा:

यांना रोखले
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर रोखले. त्यामुळे बराच गोंधळ झाला. गेल्यावर्षी मंत्री यड्रावकर हे एसटीने बेळगावला पोहोचले होते. यामुळे यंदा त्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावला पोहोचू द्यायचे नाही म्हणून कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल करण्यात आला होता. सकाळी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करून पुढे सोडण्यात येत होते. कोगनोळी टोलनाक्यावर मंत्री यड्रावकर पोहोचताच त्यांना पोलिसांनी रोखण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. यड्रावकर आणि त्यांच्या समर्थकांनी यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मंत्री यड्रावकर यांनी निषेध केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Live: ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल; महाविकास आघाडीची कसोटी

0

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्ताधारी व भारतीय जनता पक्षामध्ये कोण सरस ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालाचे लाइव्ह अपडेट्स…

लाइव्ह अपडेट्स:

>> अहमदनगर: मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करण्यास आणि विजयी मिरवणूक काढण्यास बंदी

>> थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

>> राज्याच्या ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचे? सत्ताधारी महाविकास आघाडी की भाजप? आज ठरणार

>> १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक

>> राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १६ जानेवारी रोजी झाले होते मतदान

>> राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

AUS vs IND 4th Test day 4: वॉर्नर-हॅरिस यांची जोडी जमली, ऑस्ट्रेलियाची आघाडी १००च्या पुढे

0

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी एकूण ५४ धावांची आघाडी घेतली होती. सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

live अपडेट ( 4th Test day 4) >> वॉर्नर-हॅरिस यांची जोडी जमली, ऑस्ट्रेलियाची आघाडी १००च्या पुढे >> डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांची अर्धशतकी भागिदारी >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कोंबड्यांची बर्ड फ्लू चाचणी; नागपूरचे लक्ष भोपा‌ळच्या प्रयोगशाळेकडे

0

म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या सगळ्याच मृत कोंबड्यांचे अहवाल ‘बर्ड फ्ल्यू’च्या ( bird flu test ) दृष्टीकोनातून ‘निगेटिव्ह’ आलेत. पुण्यातील प्रयोगशाळेने या कोबंड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हेच नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथेही पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा भागातील शिवारातील शेतात दोनशे मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्याचे, तसेच मोहपा शिवारातून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या पात्रात मृत कोंबड्या फेकल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. नदीतील मृत कोंबड्या चार ते पाच दिवसांपूर्वी फेकल्या असाव्या, असा अंदाज पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे धापेवाडा येथील पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत १३० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच कळमेश्वर तालुक्यातील दोन पोल्ट्री फार्म आणि मौदा तालुक्यातील एका शेतातील काही कोंबड्या अचानक मरण पावल्या. मृत कोंबड्यांची संख्या तुलनेने अधिक होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने या मृत कोंबड्यांचे नमुने घेतले. ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या सगळ्याच कोंबड्यांचे नमुने ‘निगेटिव्ह’ आलेत, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. युवराज केने यांनी दिली. तसेच ते म्हणाले, ‘पुण्यातील प्रयोगशाळेनुसार हे नमुने निगेटिव्ह आहेत. मात्र, खबरदारी म्हणून हे सगळेच नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथेही पाठविले आहेत. ही प्रयोगशाळा केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येते. त्यामुळे येथील अहवाल अधिक विश्वसनीय व ग्राह्य धरला जातो. त्यामुळे आम्ही सध्या या प्रयोगशाळेतील अहवालांच्या प्रतीक्षेत आहोत.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्र्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

0

म. टा . प्रतिनिधी, कोल्हापूर: संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ( ) यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. यामुळे कोगनोळी टोल नाक्यावर सकाळी बराच गोंधळ झाला.

गेल्यावर्षी मंत्री यड्रावकर हे एसटीने बेळगावला पोहोचले होते. यामुळे यंदा त्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावला पोहोचू द्यायचे नाही म्हणून कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल झाला होता. सकाळी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करून पुढे सोडण्यात येत होते. कोगनोळी टोलनाक्यावर मंत्री यड्रावकर पोहोचताच त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

यड्रावकर आणि त्यांच्या समर्थकांनी यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मंत्री यड्रावकर यांनी निषेध केला. दरम्यान, देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी मराठी भाषिकांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

करोना लसीकरण; ४४७ जणांवर साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल

0

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशाला संबोधित केल्यानंतर संपूर्ण देशात लसीकरण ( ) सुरू झालं आहे. रविवारी लसीकरण मोहिमेच्या दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी काय झालं? याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोनावर आतापर्यंत २,२४, ३०१ जणांना लस देण्यात आली. यापैकी केवळ ४४७ जणांना साइड इफेक्ट झाल्याचं नोंदवले गेले आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झालं आहे. एका दिवसात २,०७, २२९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सपेक्षा ही संख्या जास्त आहे.

लसीकरणानंतर ४४७ जणांवर त्यांचे साइड इफेक्ट दिसून आलेत. पण यापैकी फक्त तिघांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. रविवार असल्याने केवळ सहा राज्यांनी करोना व्हायरस लसीकरण मोहीम हाती घेतली आणि ५५३ केंद्रांमध्ये एकूण १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. रविवारी लसीकरण मोहिमेत सहाभागी झालेल्या सहा राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि मणिपूर आणि तामिळनाडूचा समावेश आहे, अशी माहिती मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी दिली.

आठवड्यातून चार दिवस लसीकरण

देशात लसीकरण दररोज होणार नाही. कारण यामुळे इतर आरोग्य सेवांवर परिणाम होत होता. हे लक्षात घेता, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना (यूटी) नियमित आरोग्य सेवांमधील अडचणी कमी करण्यासाठी आठवड्यातून चार दिवस करोनावरील लसीकरण सत्र आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आला, असं डॉ. अग्नानी म्हणाले.

२,२४,३०१ लाभार्थ्यांना लस

१७ जानेवारी पर्यंत एकूण २,२४,३०१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) २,०७,२२९ जणांना लस देण्यात आली.’१६ आणि १७ जानेवारी या दोन दिवसांत लसीकरणाचे एकूण ४४७ जणांवर साइड इफेक्ट दिसून आले. पण त्यापैकी फक्त तिघांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. आतापर्यंत, इतर बहुतेकांमध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या यासारख्या आरोग्याशी संबंधित लहान समस्या दिसून आल्या, असं ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts