Saturday, September 30, 2023
Home Blog Page 7227

'PM मोदींचा 'हा' प्रयत्न काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही!'

0

नागपूर: केंद्रातील सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री यांनी केली आहे. ( Latest Update )

वाचा:

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला. इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व ऊर्जामंत्री , महिला व बालकल्याण मंत्री तथा प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, खासदार बाळू धानोरकर, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा:

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. ‘मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. या कायद्यांमुळे साठेबाजी, महागाई वाढणार असून त्यातून उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे बनवले आहेत’, असा आरोप थोरात यांनी केला. गेल्या ५० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची थकित कर्जे आम्ही माफ केली. अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींचे पॅकेज दिले. आम्ही फक्त बोलत नाही तर शेतकऱ्यांना मदत करतो आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी शेतकरी विरोधी केंद्र सरकार विरोधात संघर्षही करतो. केंद्र सरकारने एकीकडे शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे उद्योग सुरु केले आहेत. तर दुसरीकडे इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही त्याचा भार जनतेवर टाकला नाही. भाजप सरकारच्या काळात मात्र कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले असतानाही देशात दररोज इंधनाच्या किंमती वाढवून केंद्र सरकार सर्वसामान्याची लूट करत आहे. केंद्र सरकार जोपर्यंत काळे कायदे व इंधनदरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला.

यावेळी बोलताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, मोदी सरकार सातत्याने संसद आणि संविधानाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्रातील सरकारला सर्वसामान्य जनतेची नाही तर फक्त निवडक उद्योगपतींची चिंता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ताकद उभी केली आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असून कायदे मागे घेतल्याशिवाय हा लढा थांबणार नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

कुठे धास्ती, कुठे स्वागत; करोना लसिकरणाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद

0

नागपूरः संपूर्ण देश ज्या लशीची आतुरतेने वाट पहात होता, त्या कोव्हिड लसिकरण राष्ट्रीय अभियानाला देशभरात शनिवारपासून सुरवात झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर एकाच वेळी सुरू झालेल्या या लसीकरणात २७९ केंद्रांवर ऑक्सफर्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोव्हिशिल्डचे तर सहा केंद्रांवर हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस करोना संक्रमण काळात फ्रंटवर लढलेल्या कोव्हिड वॉरियर्सना देण्यात आला.

मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४९, मेयोतील वॉर्ड क्रमांक ४० आणि डागातील जुनी बालरोग बाह्यरुग्ण विभागातील वॉर्डक्रमांक १५ येथे हे कोव्हिड लसिकरण अभियान राबविण्यात आले. राज्यातील ज्या सहा केंद्रांवर या कोव्हॅक्सिन लशीचा डोस देण्यात आला, त्यापैकी एक लसिकरण साईट उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होती. संपूर्ण देशी बनावटीच्या या लसीवरून मधल्या काळात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ही लस घेण्यासाठी काही डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करीत लस टोचून घेण्यास विरोध केला. त्यामुळे को विन अॅपवर नाव नोंदणी करूनही कोव्हिशिल्ड ऐवजी एनवेळी कोव्हॅक्सिन लशीचा डोस पुरविला गेल्याने या डॉक्टरांनी लसीकरणातून काढता पाय घेतला.

कोव्हॅक्सिनची लस अद्याप क्लिनिकल ट्रायलची शेवटची फेरी पूर्ण करून पुढे जाऊ शकलेली नाही. त्यामुळे हा लशीचा प्रयोग करण्यासाठी डॉक्टरांचा गिनपिग म्हणून वापर केला जात असल्याची नाराजीही मेडिकलमधील लसीकरण केंद्रावर ऐकायला मिळाली.

डॉ. रिना कौर रुपारॉय, डॉ. भालचंद्र मुरार कोव्हॅक्सिनचे पहिले दोन लाभार्थी

मात्र त्यावर मात करीत मेडिकलमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. रिनाकौर रुपारॉय आणि डॉ. भालचंद्र मुरार हे कोव्हॅक्सिनची लस टोचून घेण्यास स्वत:हून पुढे आले. मेयोतील केंद्रावर अधिष्ठाता डॉ. अजय केओलिया तर डागाच्या केंद्रावर डॉ. संध्या डांगे हे कोव्हिशिल्डचे पहिले लाभार्थी ठरले.

मेडिकलमध्ये सुरक्षित वावरचा फज्जा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४९ मध्ये कोव्हिड लसीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले होते. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून को विन अॅपवर नोंदणी केलेल्या लाभार्थींनाच आत सोडले जाणे अपेक्षित होते. मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झाली, त्यावेळी सगळा लोंढा लसिकरणासाठी केंद्रात पोचला. लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याने सुरक्षित वावरचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र होते.

फाटक्या आणि मळकट चादरी

मेडिकलच्या कोव्हिड लसीकरण केंद्रावर लस टोचली गेल्यानंतर कोणाला रिअॅक्शन आल्यास त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षण वॉर्ड तयार करण्यात आला. मात्र या निरीक्षण वॉर्डमधील गाद्यांवर अंथरलेल्या चादरी फाटक्या आणि जागोजागी डागाळलेल्या होत्या.

डागात टोकन, स्लॉट प्रणाली

प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित डागा स्मृती स्त्री रुग्णालयात ड्राय रन घेतला गेला होता. त्यावेळी डागा नियोजनात सपशेल फेल झाल्याचे निदर्शनास आले होते. या त्रूंटीमध्ये सुधारणा करीत डागा रुग्णालयाने प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी चोख नियोजन केल्याचे दिसून आले. लसीकरणाच्या वेळी गर्दीमुळे गोंधळ उडू नये यासाठी डागा रुग्णालयात टोकन सिस्टिम लावण्यात आली. यादीनुसार कोव्हिशिल्ड लशीसाठी लाभार्थी कोव्हिड वॉरियर केंद्रावर येताच, त्याचे नाव यादीत तपासून त्याच्या हाती टोकन देण्यात आले. या टोकन क्रमांकानुसारच एकेकाला लसीकरणासाठी आत पाठविले गेले. दुपारच्या वेळी अपेक्षित गर्दी लक्षात घेता रुग्णालयाने आणखी एक फेरबदल करीत २५-२५ जणांचा स्लॉट तयार करीत त्यांना जो वेळ देण्यात आला त्याच वेळी लसीकरणासाठी येण्यास सांगण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नवी मुंबई: सीवुड्स परिसरात मृत पक्षी आढळले, नागरिकांमध्ये चिंता

0

नवी मुंबई: देशातील विविध राज्यामध्ये बर्ड फ्लूने () टकटक दिलेली असताना नवी मुंबईतील सीवुड्स परिसरात कावळे आणि कबुतरे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत मृत कावळे आणि कबुतरांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही १४ पक्षी मृतावस्थेत आढळले होते. (birds found dead in the area of )

नेरुळ पश्चिम भागातील सीवुड्स येथील सेक्टर ४८ अमधील राजगड वसाहतीत आज सकाळी एक कबुतर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. राजगड वसाहतीच्या बाजूला असलेल्या निसर्ग वसाहतीत आणि नवे घरकुल या वसाहतीत देखील कावळे मरून पडलेले आढळले. माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत मृतावस्थेतील कबुतर आणि कावळे ताब्यात घेऊन ती तपासणीसाठी नेल्याचे राजगड वसाहतीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे शाखा अध्यक्ष यशवंत खिलारी यांनी माहिती देताना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यातही आढळले १५

गेल्या आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय गार्डन वसाहतीत १४ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांना हे पक्षी मृतावस्थेत दिसले. एकाचवेळी इतके पक्षी मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूची लागण झाल्याने झाला असावा का अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. दरम्यान या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

नवी मुंबई: सीवुड्स परिसरात मृत पक्षी आढळले, नागरिकांमध्ये चिंता

0

नवी मुंबई: देशातील विविध राज्यामध्ये बर्ड फ्लूने () टकटक दिलेली असताना नवी मुंबईतील सीवुड्स परिसरात कावळे आणि कबुतरे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत मृत कावळे आणि कबुतरांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही १४ पक्षी मृतावस्थेत आढळले होते. (birds found dead in the area of )

नेरुळ पश्चिम भागातील सीवुड्स येथील सेक्टर ४८ अमधील राजगड वसाहतीत आज सकाळी एक कबुतर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. राजगड वसाहतीच्या बाजूला असलेल्या निसर्ग वसाहतीत आणि नवे घरकुल या वसाहतीत देखील कावळे मरून पडलेले आढळले. माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत मृतावस्थेतील कबुतर आणि कावळे ताब्यात घेऊन ती तपासणीसाठी नेल्याचे राजगड वसाहतीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे शाखा अध्यक्ष यशवंत खिलारे यांनी माहिती देताना सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

ठाण्यातही आढळले १५

गेल्या आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय गार्डन वसाहतीत १४ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांना हे पक्षी मृतावस्थेत दिसले. एकाचवेळी इतके पक्षी मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूची लागण झाल्याने झाला असावा का अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. दरम्यान या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

धनंजय मुंडेंबाबत विरोधकांकडून राजकारण; शिवसेना नेत्याकडून पाठराखण

0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: महिला अत्याचाराच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील पुढे सरसावले आहेत. ‘धनंजय मुंडेंनी जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिल्यनातंरही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी मुंडे यांचे समर्थन केले आहे.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुंडेंच्या प्रकरणाबाबत आपले मत मांडताना विरोधकांना खडे बोल सुनावतच मुंडे यांचे समर्थन केले.

‘धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची स्वत: कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी उगाच राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते. ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील,’ असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

‘एखादा माणूस कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची ३० वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू,’ असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांनी सुनावले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Xiaomi च्या 'या' २७ स्मार्टफोन्सला मिळणार MIUI 12.5 अपडेट, पाहा संपूर्ण यादी

0

नवी दिल्लीः शाओमीने गेल्या महिन्यात Mi 11 स्मार्टफोन सीरीज सोबत लाँच केला होता. नवीन MIUI 12.5 मध्ये नवीन प्रायव्हसी इंम्प्रूव्हमेंट्स, जबरदस्त सिस्टम मॅनेजमेंट, अॅप ऑप्टिमायझेशन आदी करण्यात आले आहेत. शाओमीने आता त्या सर्व डिव्हाइसेजची यादी जारी केली आहे ज्यात MIUI 12.5 अपडेट रोलआउट करण्यात येणार आहे.

वाचाः

शाओमी या २७ स्मार्टफोन्स मध्ये सर्वात आधी MIUI 12.5 बीटा अपडेट चीनच्या युजर्ससाठी रिलीज करणार आहे. यानंतर हळू हळू ग्लोबल युनिट्ससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. MIUI 12.5 च्या स्टेबल व्हर्जनला एप्रिल २०२१ मध्ये रोलआउट करण्यात येणार आहे. नवीन मी यूआय १२.५ मध्ये फास्ट जेस्चर कंट्रोल, रेंडरिंग आणि स्पीड परफॉर्मन्स साठी कस्टम डिव्हाइस मॉडल अडजस्टमेंट सारखे खास वैशिष्ट्ये आहेत.

वाचाः

या सॉफ्टवेयर अपडेट सोबत नवीन फीचर MIUI+ सुद्धा मिळणार आहे. युजर्ससा विंडोज कम्प्यूटर आपल्या फोनवर मिरर करू शकतात. शाओमी ने iOS 14 प्रायवेसी फीचर सुद्धा MIUI 12.5 मध्ये जोडले आहे. हे फीचर तुमच्या टेक्स्ट ला कॉपी केल्यास एका अॅपद्वारे क्लिपबोर्ड अॅक्सेस केल्यास नोटिफिकेशन्स दाखवतो. तसेच यात मीयूआय १२.५ अॅप्सला तुमचे लोकेशन पाठवण्याऐवजी कोर्स लोकेशन पाठवतो.

वाचाः

पाहा कोणकोणत्या स्मार्टफोनला मिळणार अपडेट

Mi 11 (शाओमी मी 11)

Xiaomi Mi 10 (शाओमी मी 10)

Xiaomi Mi 10 Pro (शाओमी मी 10 प्रो)

Xiaomi Mi 10 Ultra (शाओमी मी 10 अल्ट्रा)

Xiaomi Mi 10 Youth (शाओमी मी 10 यूथ)

Xiaomi Mi 9 SE (शाओमी मी 9 एसई)

Xiaomi Mi 9 (शाओमी मी 9)

Xiaomi Mi 9 Explorer (शाओमी मी 9 एक्सप्लोर)

Xiaomi Mi 9 Pro 5G (शाओमी मी 9 प्रो 5G)

Xiaomi Mi CC9 (शाओमी मी सीसी9)

Xiaomi Mi CC9 Pro (शाओमी मी सीसी9 प्रो)

Xiaomi CC9e (शाओमी सीसी 9ई)

Xiaomi Redmi K30 Pro (शाओमी रेडमी के 30 प्रो)

Xiaomi Redmi K30 5G (शाओमी रेडमी के 30 5G)

Xiaomi Redmi K30S (शाओमी रेडमी के 30एस)

Xiaomi Redmi K30 Racing (शाओमी रेडमी के 30 रेसिंग)

Xiaomi Redmi K30i 5G (शाओमी रेडमी के 30आय 5G)

Xiaomi Redmi K30 (शाओमी रेडमी के 30)

Xiaomi Redmi K20 Pro (शाओमी रेडमी के20 प्रो)

Xiaomi Redmi K20 (शाओमी रेडमी के20)

Xiaomi Redmi 10X 5G (शाओमी रेडमी 10एक्स 5G)

Xiaomi Redmi 10X Pro (शाओमी रेडमी 10एक्स प्रो)

Xiaomi Redmi Note 9 (शाओमी रेडमी नोट 9)

Xiaomi Redmi Note 9 Pro (शाओमी रेडमी नोट 9 प्रो)

Xiaomi Redmi Note 8 (शाओमी रेडमी नोट 8)

Xiaomi Redmi Note 7 Pro (शाओमी रेडमी नोट 7 प्रो)

Xiaomi Redmi Note 7 (शाओमी रेडमी नोट 7)

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

IND vs AUS : सुनील गावस्कर यांच्या टीकेला रोहित शर्माचे प्रत्युत्तर, म्हणाला…

0

ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्यात बाद झाल्यावर रोहित शर्मावर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कडाडून टीका केली होती. पण आता गावस्कर यांच्या टीकेला रोहितने प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

गावस्कर यांनी रोहितवर काय टीका केली होती, पाहा…रोहितवर टीका करताना गावस्कर यावेळी म्हणाले होते की, ” रोहित शर्मा जो फटका मारुन बाद झाला त्यावर विश्वास बसत नाही. कारण रोहितने बेजबाबदारपणे हा फटका मारला. लॉंग ऑनला ऑस्ट्रेलियाचा खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, हे सर्वांनाच माहिती होते. पण तरीही रोहितने फटका मारला आणि तो बाद झाला. रोहितला हा फटका मारण्याची काहीच गरज नव्हती. रोहितने गरज नसताना हा फटका मारला आणि त्याने आपली विकेट गमावली.”

गावस्कर पुढे म्हणाले की, ” रोहित हा संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहे, त्यामुळे तो ज्यापद्धतीने बाद झाला हे त्याला शोभत नाही. दोन चेंडूंपूर्वीच रोहितने चौकार वसूल केला होता. त्यामुळे या चेंडूवर मोठा फटका मारण्याची रोहितला कोणतीच गरज नव्हती. माझ्यामते ही बेजबाबदारपणे केलेली फलंदाजी आहे. रोहितने आपली विकेट ऑस्ट्रेलियाला भेट म्हणून दिली. रोहितला हा फटका मारण्याची कोणतीही गरज नव्हती.”

रोहित शर्माने गावस्कर यांच्या टीकेनंतर नेमकं काय म्हटलं आहे, पाहा…
गावस्कर यांच्या टीकेनंतर रोहितने म्हटले की, ” जिथे फटका मारायला पोहोचायचे होते तिथे मी खेळपट्टीवर पोहोचलो होतो. पण त्यावेळी चेंडू आणि बॅट यांचा योग्य समन्वय झाला नाही. मला चेंडू लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये मारायचा होता. तो मारण्याचा प्रयत्न करायला मी गेलो होतो. पण त्यावेळी चेंडू बॅटवर योग्यरीतीने आला नाही. पण मी जी फलंदाजी केली ती चांगली होती. खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी चांगली आहे, चांगला बाऊन्सही आहे. त्यामुळे मी आजच्या फलंदाजीचा चांगलाच आनंद लुटला. मी जो फटका खेळून बाद झालो, त्याचे मला वाईट वाटत नाही.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Jio Phone युजर्संसाठी बॅड न्यूज, जास्त डेटाचा 'हा' प्रीपेड प्लान केला बंद

0

नवी दिल्लीः युजर्ससाठी कंपनीने १५३ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे. या प्लान अंतर्गत युजर्संना २८ दिवसांची वैधता आणि रोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता. १५३ रुपयांच्या या प्रीपेड प्लानला आता कंपनीने जुलै २०१७ मध्ये लाँच केले होते. तसेच फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्लानला अपडेट केले होते. यासोबत ४९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान कंपनीने आणला होता. जिओ फोन युजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस फ्री मिळत होते. जिओकडून नुकतीच फ्री कॉलिंग सुरू करण्यात आल्यानंतर काही दिवसांच्या आत हा प्लान बंद करण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

जिओ साइटवर १५३ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान हटवण्यात आला आहे. लेटेस्ट अपडेट नंतर जिओ फोन युजर्संसाठी आता चार रिचार्ज प्लान शिल्लक राहिले आहेत. यात १८५ रुपयांचा रिचार्ज प्लान, १५५ रुपयांचा प्लान, १२५ रुपयांचा रिचार्ज प्लान आणि ७५ रुपयांचा रिचार्ज प्लान यांचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

जिओकडे १५५ रुपयांचा रिचार्ज प्लनमध्ये अनेक बेनिफिट मिळतात. दरम्यान, १५३ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा मिळत होता. परंतु, १५५ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

IND vs AUS : दुखापतग्रस्त नवदीप सैनी मैदानात उतरणार की नाही, जाणून घ्या अपडेट्स

0

ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा यावेळी मांडीचे स्नायू दुखावले गेले. सैनीची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असून आता त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण आता सैनी मैदानात उतरू शकतो की नाही, याबाबतेच अपडेट्स आलेले आहेत.

सैनीच्या आठव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणेने मार्नस लाबुशेनचा कॅच सोडला. पण त्यानंतरचा सहावा चेंडू त्याला टाकता आला नाही. सैनीच्या मदतीसाठी फिजिओ मैदानात आले आणि त्याच्यावर उपचार केले. पण त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर सैनीला गोलंदाजी करता आली नाही. तो फिजिओसह मैदानाबाहेर गेला. सैनीवर भारतीय वैद्यकीय संघ उपचार करत होता. पण सैनीची ही दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याला आता वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.

सैनीबाबत आता एएनआय या वृत्तसंस्थेला संघातील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सैनीबाबत सूत्रांनी सांगितले की, ” भारताचा वैद्यकीय चमू सातत्याने नवदीप सैनीच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, त्याचबरोबर तो लवकर फिट कसा होईल, यासाठी प्रयत्न करत आहे. सैनीच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहेत. पण सैनीला फिट करून मैदानात पुन्हा उतरवण्यासाठी भारताचा वैद्यकीय चमू अथक परीश्रम घेत आहेत.” त्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी तरी सैनी मैदानात येईल, अशी आशा काही चाहत्यांना वाटत आहे.

तिसऱ्या सामन्यानंतर भारताच्या कोणत्या खेळाडूंना दुखापत झाली होती, पाहा…भारताचे गोलंदाजीमधील मुख्य अस्त्र असलेल्या जसप्री बुमराला आता गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते, बुमराच्या ओटीपोटीमध्ये दुखत आहे. आर. अश्विनच्या पाठीमध्ये उसण भरली आहे. तिसरा सामना खेळत असताना अश्विनला पाठीमध्ये दुखापत झाली होती, ही दुखापतही गंभीर असल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर बुमरा, अश्विन आणि रवींद्र जडेजाही चौथ्या कसोटीत खेळू शकले नाही.

तिसरा सामना वाचवणारा भारताचा फलंदाज हनुमा विहारीलाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते, त्याचे पायाचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळेला हनुमालाही चौथ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली नाही. हनुमाच्या जागी संघात मयांक अगरवालला स्थान मिळाले आहे. पण सराव करत असताना मयांकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला आता हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे समजत होते, पण आता तो या दुखापतीमधून सावरला असल्याचे दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Flipkart Big Saving Days Sale: 'या' स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी

0

नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर २० जानेवारी पासून ला सुरूवात होणार आहे. २०२१ मध्ये आयोजित होणारी ही फ्लिपकार्टवरील पहिली मोठी सेल आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळणार आहे. फ्लिपकार्टने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या अतंर्गत सर्व प्रोडक्ट्सवर एचडीएफसी बँक कार्ड्स द्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळणार आहे.

वाचाः

फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला सेलचे अॅक्सेस १९ जानेवारी पासून रात्री १२ पासून मिळणार आहे. फ्लिपकार्टने आपल्या साइटवर काही ऑफर्स आणि डिस्काउंटचा खुलासा केला आहे. स्मार्टफोन्सवर बिग सेविंग डेज सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स मिळणार आहे. या सेलमध्ये सॅमसंग, आसुस, मोटो फोन्सवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर्स संबंधी नुकतीच माहिती देण्यात आली होती. आता फ्लिपकार्टवर काही ऑफर्सचा खुलासा करण्यात आला आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी एफ४१ स्मार्टफोनला या सेलमध्ये १३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. तर गॅलेक्सी ए २१ एस स्मार्टफोनला १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

गॅलेक्सी ए३१ आणि गॅलेक्सी ए ७१ ला अनुक्रमे १६ हजार ९९९ रुपये आणि २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

सॅमसंगच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन्स गॅलेक्सी नोट १० प्लस आणि गॅलेक्सी एस २० प्लस ला ४९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

अॅपल आयफोनला सुद्धा या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. आयफोन एसईला २७ हजार ९९९ रुयपात तर आयफोन एक्सआर ला ३५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

पोको एक्स ३ स्मार्टफोनला या सेलमध्ये १४ हजार ९९९ रुपयात, पोको एम२ प्रोला ११ हजार ९९९ रुपयात तर पोको सी ३ ला ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते.

मोटो जी ५जी ला या सेलमध्ये १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते.

आसुस रोग ३ ला ४३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. LG G8X ला २५ हजार ९९० रुपयांत तर iQOO 3 5G ला ३४ हजार ९९० रुपयात फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

Latest posts