बारामती : मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हारतुरे आणि सत्काराचे कार्यक्रम टाळत प्रत्येक दिवस महत्त्वाचा या नियमानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे.

सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य या त्यांच्या स्वभावानुसार शपथविधीनंतर लगेचच मुंबईत मंत्रालयात त्यांनी मुख्य सचिवांसह प्रमुख अधिका-यांच्या बैठका घेत आढावा घेतला. सकाळी पहाटेपासून ते रात्री उशीरापर्यंत काम करत त्यांनी विविध प्रश्न समजून घेतले. शपथविधीनंतर लगेचच दुस-या दिवशी मंत्रालयात दालन घेत त्यांनी राज्याची स्थिती समजून घेतली. रात्री उशीरापर्यंत त्यांनी विविध प्रश्नांबाबत विविध अधिका-यांकडून माहिती घेत नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here