१. टीम इंडियाचे संतुलन

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियाची विश्वचषकाची तयारीही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे, कारण सध्या टीम इंडियाकडे वनडे स्पर्धेची कोणतीही ब्ल्यू प्रिंट नाही. कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार केएल राहुलसह अनेक सिनियर खेळाडू एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेताना दिसतात, त्यांच्या जागी ज्यांना संधी मिळते ते प्लेइंग इलेव्हन किंवा संघाचा पूर्णवेळ भाग बनत नाहीत. सतत अशा परिस्थितीत टीम इंडिया ज्या फॉर्म्युल्यासह पुढे जात आहे, त्यामुळे चिंता खूप वाढली आहे. टीम इंडियाच्या कोअर ग्रुपवर नजर टाकली तर आजही अनेक प्रकारच्या उणिवा सर्वत्र दिसत आहेत. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म, रवींद्र जडेजा-जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंची दुखापत, यष्टिरक्षक-फलंदाजांची चिंता, सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाबाबत वाद, असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे शोधली जात आहेत. चला प्रत्येक मुद्द्यावर नजर टाकू..
२. ओपनिंग

टीम इंडियासाठी फक्त रोहित शर्मा आणि केएल राहुल ओपनिंग करताना दिसतात. गेल्या काही एकदिवसीय मालिकेत दोघे खेळताना दिसले नाहीत. तरी शिखर धवनसोबत कोणीतरी फलंदाज सलामीसाठी उतरतो. पण शिखर धवन वनडेमध्ये सातत्याने धावा करत आहे, अशा स्थितीत विश्वचषकात खेळण्यासाठी त्याचा दावा मजबूत आहे, त्यामुळेच तज्ञही रोहित-धवन जोडीवर भर देत आहेत, अशावेळी केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर किंवा मधल्या फळीत येऊ शकतो.
३. मधली फळी

विराट कोहलीनंतर संघाला वेगवान धावा करणारा आणि गरज पडेल तेव्हा डाव सांभाळणारा फलंदाज हवा आहे. श्रेयस अय्यरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करून दाखवली आहे, संधी मिळेल तेव्हा तो सतत धावा करताना दिसतो. मात्र, सूर्यकुमार यादव किंवा दीपक हुडा यांना वनडेत अजून बरेच काही सिद्ध करायचे आहे. सूर्याने टी-२० क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे, पण वनडेमध्ये तो अद्याप तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळेच मधल्या फळीबाबत अनेक प्रश्न पडत आहेत.
४. यष्टिरक्षक/फलंदाज

गेल्या काही दिवसांपासून या स्थानावर बरीच चर्चा झाली, टी-२० विश्वचषकादरम्यान ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिककडे लक्ष वेधले गेले. पण भविष्याकडे पाहता संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला प्रत्येक संधीवर पाठीशी घालत असल्याचे दिसते, परंतु पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये बराच काळ सुरू असलेला त्याचा खराब फॉर्म आता लक्ष्यावर आहे. ऋषभमुळे संजू सॅमसन, इशान किशन या खेळाडूंना संधी मिळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. संजू सॅमसनचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड (तो जितका खेळला आहे तितका) चांगला आहे आणि त्याच्यासाठी चाहत्यांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे.
५. अष्टपैलू आणि फिरकीपटू

हार्दिक पांड्याने जेव्हापासून पुनरागमन केले तेव्हापासून त्याच्यासारखा अष्टपैलू सारखा दुसरा पर्याय कोणी असूच शकत नाही. तो आता गोलंदाजीही करत आहे आणि वेगवान धावाही करू शकतो, अशा स्थितीत तो वनडे संघात कोणत्या भूमिकेत पुढे जातो, हा प्रश्न आहे. दुसरा पर्याय रवींद्र जडेजाचा आहे, जो सध्या मैदानाबाहेर आहे पण त्याची संघात जास्त गरज आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या प्रत्येक आघाडीवर जडेजा अगदी फिट आहे. पण दरम्यान वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, दीपक हुडा यांसारखे खेळाडू नवे पर्याय निर्माण करत आहेत. त्याचवेळी फिरकीपटूमध्ये युझवेंद्र चहलची निवड योग्य ठरेल.
६. गोलंदाजांची फौज सज्ज

जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर पुनरागमन करू शकतो, अशा परिस्थितीत तो गोलंदाजी युनिटचे नेतृत्व करेल. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांसारखे गोलंदाज आहेतच, मात्र त्यांना उमरान मलिकला वनडेत खेळवायचे आहे का, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. जर होय, तर विश्वचषकापर्यंत त्याला नक्कीच सतत संधी द्यावी लागेल.
७. हे १५ खेळाडू विश्वचषक जिंकवून देणार?

विश्वचषकाला जवळपास एक वर्ष शिल्लक आहे; पण पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरायचे असेल, तर आतापासूनच तयार राहावे लागेल. जेणेकरून प्रत्येक खेळाडू फॉर्मात राहील, उणिवा दूर करता येतील आणि कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही. अन्यथा, टी-२० विश्वचषक २०२१, टी-२० विश्वचषक २०२२ किंवा एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये झालेल्या चुकांची पुन्हा छाप पडू शकते. सध्याच्या परिस्थितीत, जर आपण एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची यादी तयार केली तर हे खेळाडू त्यात अगदी फिट बसू शकतात…
८. या १५ खेळाडूंचा संघ असावा

१. रोहित शर्मा (कर्णधार)
२. शिखर धवन
३. केएल राहुल/शुबमन गिल (उपकर्णधार)
४. विराट कोहली
५. श्रेयस अय्यर
६. सूर्यकुमार यादव
७. ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
८. हार्दिक पंड्या
९. रवींद्र जडेजा
१०. जसप्रीत बुमराह
११. अर्शदीप सिंग
१२. उमरान मलिक
१३. संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
१४. युझवेंद्र चहल
१५. मोहम्मद शमी
९. नवीन युवा खेळाडू

या १५ खेळाडूंशिवाय अशी काही नावे आहेत जी टीम इंडियामध्ये येण्यासाठी सतत तयार असतात. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक चहर, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करून दाखवतात. पुढच्या एका वर्षात या सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली तर, हे खेळाडू एकदिवसीय विश्वचषकासाठी आपले संघात स्थान निर्माण करू शकतात.
१०. आयसीसी ट्रॉफीसाठी प्रतीक्षा

टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ साली जिंकली होती, जेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याआधी २०११ एकदिवसीय विश्वचषक, २००७ टी-२० विश्वचषक देखील एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला होता. म्हणजेच आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा दशकभराची आहे. त्याआधी टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघ

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times