ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने आज झालेल्या बैठकीमध्ये अखेर महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आयपीएलचे काय होणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

या वर्षी आयसीसीचा ट्वेन्टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. पण करोना व्हायरसमुळे हा विश्वचषक रद्द करण्यात येणार का, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. त्यासाठी आज आयसीसीने एक बैठक बोलावली होती. विश्वचषक रद्द झाल्याशिवाय आयपीएल खेळवता येणार नव्हती. त्यामुळे आयपीएलचे आयोजन हे विश्वचषकावर अवलंबून होते.

आयसीसीच्या आजच्या झालेल्या बैठकीमध्ये अखेर ऑस्ट्रेलियामध्ये होणारा विश्वचषक पुढे ढकलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएलबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पुढच्या वर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार होता. हा विश्वचषक होणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता हा विश्वचषक आयसीसी खेळवणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता यापुढील विश्वचषक भारतामध्येच होणार असल्याचे स्पष् झाले आहे.

ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आयसीसीने रद्द केला आहे. पण हा विश्वचषक कधी खेळवण्यात येणार, याबाबत मात्र आयसीसीने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली पाहायला मिळत नाही. कारण सध्याच्या घडीला करोनाचे वातावरण आहे. या वातावरणावर आयसीसी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ही परिस्थिती निवळल्यानंतरच आयसीसी योग्य तो निर्णय घेईल, असे म्हटले जात आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवणे हे जोखमीचे आहे, असे म्हटले होते. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण यजमान देश जर स्पर्धा भरवण्यात असमर्थ असेल तर ती कशी आयोजित करता येऊ शकते, हा प्रश्न आयसीसीला पडला होता. त्यानुसारच आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पण हा विश्वचषक आता पुढे कधी खेळवणार, याबाबत मात्र आयसीसीने काहीही सांगितलेले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here