India vs Sri Lanka, Toss Update : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेक आज भारताने जिंकली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पांड्यानं घेतला आहे. दरम्यान दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर सामना गमावला होता, तसंच आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्यामुळे भारतानं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं मालिकेतील पहिला सामना 2 धावांच्या फरकाने जिंकला, तर दुसरा सामना श्रीलंकेनं 16 धावांनी जिंकला. ज्यामुळे आजचा सामना निर्णायक असून सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.
आज भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरत आहे. दुसऱ्या सामन्यात अर्शदीप, ईशान, शुभमन अशा बऱ्याच खेळाडूंनी निराशा केल्यावर देखील आज पांड्याने कोणताही बदल न करता उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आजच्या सामन्यातील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण ही सपाट खेळपट्टी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करते. फलंदाजांना येथे फलंदाजी करणे खूप सोपे जाईल. त्यामुळे टीम इंडियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
कशी आहे टीम इंडिया?
News Reels
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
कसा आहे श्रीलंकेचा संघ?
पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 28 पैकी 18 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 9 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय दोघांमधील एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. अशारितीने टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे.
हे देखील वाचा-
sports