पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी होणार तर फायनल मॅच ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाला अखेरचे स्वरुप देण्याचे काम वेगाने सुरु झाले असून यासंदर्भात सरकारकडून परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. इतक नव्हे तर बीसीसीआयकडून आयपीएलमधील संघांसोबत बोलणी सुरू आहे.
या वर्षी १९ सप्टेंबर रोजी (शनिवार) तर फायनल ८ नोव्हेंबर (रविवारी) रोजी होईल. याचा अर्थ यावर्षी आयपीएलचा हंगाम ५१ दिवस चालेल. आयसीसीने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केल्यामुळे आयपीएलच्या आयोजनाला वेग आला होता. दरम्यान, बीसीसीआयने मिशन आयपीएल सुरु केलं असून त्यासाठी बऱ्याच गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. बीसीसीआयसाठी खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी करायला घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. प्रत्येक संघात जवळपास ३०-४० खेळाडू असतात. त्याचबरोबर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफही असतो. त्याचबरोबर सामना पाहायला संघाचे मालक आणि त्यांची जवळची मंडळीही येत असतात. त्याचबरोबर पंच आणि अधिकारी असतात. या सर्व गोष्टींकडे पाहिले तर जवळपास एक हजार लोकांची व्यवस्था बीसीसीआयला करावी लागणार आहे.
खेळाडूंना युएईमध्ये जाण्यासाठी बीसीसीआयने विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याचे समजते. या वर्षी आयपीएल २० मार्ज रोजी सुरू होणार होती. पण करोना व्हायरसमुळे बीसीसीआयने प्रथम १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली. त्यानंतर देखील करोना रुग्णांची संख्या वाढल्याने बीसीसीआयने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. एक वेळ अशी आली होती की यावर्षी आयपीएल होणार नाही असे वाटत होते. पण प्रथम आशिया कप स्पर्धा आणि त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला.
जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलून IPLचे आयोजन करावे अशी मागणी केली होती. याउलट टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर टीका केली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times