एखाद्या क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर लहानपणापासून मेहनत घ्यावी लागते. क्रीडा क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर त्यासाठी अभ्यासाकडे फार लक्ष देता येत नाही. पण काही खेळाडू असे असतात जे फक्त मैदानावर नाही तर अभ्यासात देखील यशस्वी ठरतात. अशा खेळाडूंमध्ये काही क्रिकेटपटू आहेत. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्यात आलेले काही खेळाडू असे आहेत जे उच्च शिक्षित आहेत. त्यातील काही खेळाडूंनी जागतिक क्रिकेटमध्ये विक्रम केलेत. उच्च शिक्षण घेतलेल्या काही भारतीय खेळाडूंनी इंजिनिअरिंगची पदवी घेतील आहे. एका क्रिकेटपटूने तर देशातील सर्वात अवघड अशी UPSCची परीक्षा पास केली होती. सध्या भारताकडून खेळणाऱ्या एका खेळाडूकडे बीटेकची पदवी आहे. यात कुंबळे, द्रविड, श्रीनाथ, लक्ष्मण, अश्विन आदी खेळाडूंचा समावेश आहे. जाणून घ्या असा कोणता खेळाडू आहे ज्याने IAS परीक्षा पास केली होती.

भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज अनिल कुंबळेने अभ्यासात देखील अव्वल स्थान मिळवले आहे. क्रिकेटमध्ये नाव कमावण्याच्या आधी कुंबळेने राष्ट्रीय इंजिनिअरिंग कॉलेज बेंगळुरू येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. भारताकडून १९९० साली पदार्पण करणाऱ्या कुंबळेने कसोटी ६१९ विकेट, तर २७१ वनडेत ३३७ विकेट घेतल्या आहेत. कसोटीत एका डावा सर्वच्या सर्व दहा विकेट घेणारा तो जगातील केवळ दुसरा गोलंदाज आहे. कसोटीत सर्वात वेगाने ५०० विकेट घेणाऱ्यांच्या यादीत कुंबळे दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १०३ कसोटी ५०० विकेट घेतल्या आहेत.

क्रिकेटमध्ये द वॉल अशी ओळख असलेला भारताच्या राहुल द्रविडने अभ्यासात देखील अनेक विक्रम केलेत. द्रविडने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते जेव्हा एमबीएचे शिक्षण घेत होता तेव्हा त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याने बेंगळुरूच्या सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स येथून MBAचे शिक्षण पूर्ण केले. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम द्रविडच्या नावावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम द्रविडच्या नावावर असून त्याने ३१ हजार चेंडू खेळले आहेत.

भारताचा स्टार कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण देखील अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. त्याने MBBSपर्यंत शिक्षण घेतले आहे. लक्ष्मणला टेरी विद्यापीठाकडून डॉक्टरेट डिग्री मिळाली आहे. तो भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा नातू आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताकडून १३४ कसोटीत १७ शतकांसह ८ हजार ७८७ धावा, तर ८६ वनडेत २ हजार ३३८ धावा केल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर ६ शतक आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ साली लक्ष्मणने २८१ धावांची शानदार खेळी केली होती.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) ने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याने म्हैसूरमधील श्री जयचामाराजेंद्र कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून पदवी घेतली. जवागल श्रीनाथ हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आहे ज्याने वनडेत ३००हून अधिक विकेट घेतल्या. श्रीनाथने वनडेत ३१५ तर कसोटीत २३६ विकेट घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीत ५३३ तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४०७ विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथ सध्या सामनाधिकारी म्हणून काम करत आहे.

भारताचा क्रिकेटपटू मुरली विजयने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. विजयने एसआरएम विद्यापीठातून पदवी घेतली. त्याने २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केले. त्याने ६१ कसोटीत ३ हजार ९८२ धावा केल्या. यात १२ शतकांचा समावेश आहे. तर १७ वनडेत एक शतकी खेळी केली. सध्या तो भारतीय संघातन बाहेर आहे. यात प्रमाणे आर.अश्विनने देखील उच्च शिक्षण घेतले आहे. त्याने एसएसएन कॉलेजमधून बीटेकचे शिक्षण घेतले. अश्विनने ७१ कसोटीत ३६५ आणि ११ वनडेत १५० विकेट घेतल्या आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू अमेय खुरसिया याने भारतीय संघात निवड होण्याआधी देशातील सर्वात कठिण अशी UPSC परीक्षा पास केली होती. अर्थात अमेयचे आंतरराष्ट्रीय करिअर फार मोठे ठरले नाही. त्याने १२ वनडे सामन्यात एक अर्ध शतक केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमेयने ११९ सामन्यात ७ हजार ०४ धावा केल्या. यात २१ शतक आणि ३१ अर्धशतकांच समावेश आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये IAS परीक्षा पास झालेला तो एकमेवर क्रिकेटपटू असावा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here