IND vs  NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकावा लागेल. कारण हैदराबादमध्ये खेळली गेलेली पहिली वनडे जिंकून टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताला विजयाची नोंद करून मालिकेत विजयी आघाडी घ्यायची आहे. एकूणच, न्यूझीलंडसाठी हा करो किंवा मरोचा सामना आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रायपूरचे हवामान कसे असेल पाऊस व्यत्यय आणू शकतो का ते पाहूया…

हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी, म्हणजेच रविवारी 21 जानेवारी रोजी दुपारनंतर रायपूरमध्ये थोडीशी थंडी असेल. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री तापमानात घट होईल आणि पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी रायपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हवामानाशी संबंधित कोणताही अडथळा नसावा अशी अपेक्षा आहे.

खेळपट्टीबद्दल काय?

रायपूरची विकेट इतर भारतीय विकेट्सप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथील विकेट टी-20 सामन्यांसारखी असेल ज्याच्या सरासरीने 170 धावा केल्या होत्या. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी इथली खेळपट्टी स्लो होत जाईल. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील. रायपूरची विकेट पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिरकीपटूंच्या माध्यमातून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे ही कर्णधारांची रणनीती असणार यात शंका नाही. त्यामुळे पहिल्या वन-डेप्रमाणे एक हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान भारतीय संघ रायपूर येथे आधीच दाखल झाला असून सरावही टीम इंडियाने सुरु केला आहे. भारतीय संधाचं जंगी स्वागतही यावेळी करण्यात आलं…

news reels New Reels


 

हे देखील वाचा-



sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here