यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पण युएईमध्ये आयपीएल खेळवणे हे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले जात आहे. या गोष्टीचे नेमके कारण आहे तरी काय, जाणून घ्या…

यापूर्वीही युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयला भारतात आयपीएल खेळवणे योग्य न वाटल्याने त्यांनी युएईची निवड केली. त्यामुळे आता युएईमध्येच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. पण आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदं पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.

यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने कंबर कसलेली आहे. पण मुंबई इंडियन्सच्या संघात मात्र चिंतेचे वातावरण आहे. कारण यापूर्वी जेव्हा युएईमध्ये स्पर्धा झाली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झाली नव्हती. युएईमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पाच सामने खेळला होता आणि या चापही सामन्यांमध्ये मुंबईला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे युएईमध्ये आयपीएल होणे ही मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. पण दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने मात्र पाचही सामने जिंकल्याचे पाहायला मिळते आहे.

युएईमध्ये कोणत्या संघाने किती सामने जिंकले, पाहा…
युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकल्याचे पाहायला मिळते, त्यांची पाच पैकी पाच सामने जिंकले होते. त्याचबरोबर या यादीत दुसरा क्रमांक लागतो तो चेन्नई सुपर किंग्जचा कारण त्यांनी युएईमध्ये पाच पैकी चार सामने जिंकले होते. राजस्थान रॉयल्सने पाचपैकी तीन सामने जिंकले होते आणि दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैजराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी पाच पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मुंबई इंडियन्सला तर पाच पैकी एकही सामना युएईमध्ये जिंकता आला नव्हता. त्यामुळे या वर्षी मुंबई इंडियन्सचा संघ युएईमध्ये कशी कागिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here