भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चार सामन्यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात ४५० वा कसोटी बळी टिपला. अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकून आपल्या ८९व्या कसोटी सामन्यात ४५० वी विकेट घेऊन ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा अश्विन हा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.
विकेट्सचा विक्रम
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर ४५० वी कसोटी बळी टिपणारा अश्निन हा जगातील दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे, ज्याने आपल्या ८० व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केलीये. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अश्विनने अॅलेक्स कॅरीला 36 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून कसोटी सामन्यात आपला ४५० वा बळी मिळवला.
नागपूर कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी जादू केली. रवींद्र जडेजाने पुनरागमनाच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी रविचंद्रन अश्विननेही तीन विकेट घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांत ऑलआऊट झाला. तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आऊट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा वेगवान गोलंदाज ठरला.
अश्विनने देखील कसोटीत ४५० बळी पूर्ण केले आहेत. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो निर्णय त्याच्या अंगलट आलेला दिसून आला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times