नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला काल ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा १७७ धावांवर ऑलआउट केला. दिवसाचा खेळ संपाल तेव्हा भारताने १ बाद ७७ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा ५६ धावांवर नाबाद तर आर अश्विन मैदानावर आहेत. भारताच्या डावाची सुरूवात शर्मा आणि केएल राहुल या कर्णधार उपकर्णधार जोडीने केली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही मिनिटे आधी केएल राहुल २० धावांवर बाद झाला. केएल राहुल संघात उपकर्णधार आहे. जेव्हा रोहित शर्मा संघाबाहेर असतो तेव्हा त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळते. भारतीय संघ ९१ वर्षापासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि फक्त ३६ खेळाडूंना कसोटीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, यावरून हे पद किती खास आहे हे लक्षात येते. पण राहुलची खेळी ही खरच खास आहे का ? ते उपकर्णधार आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये तर सोडाच १५ सदस्यीय संघात स्थान मिळवण्याच्या योग्य आहे का? जर रेकॉर्ड पाहिले तर याचे उत्तर नाही असेच येते.

पहिल्या कसोटीसाठी फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला बाहेर ठेवून राहुलला संधी दिली. राहुलला फक्त २० धावा करता आल्या. यासाठी त्याने ७१ चेंडू खेळले. दुसऱ्या बाजूला गिलने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक केले होते. गिल सोबत सलामीला आलेल्या राहुलने तेव्हा ४ डावात ५७ धावा केल्या होत्या.

क्रिकेटपटूच्या निधनानंतर ११ महिन्यानंतर समोर आली १२० कोटींची संपत्ती; कोणाला काय मिळणार?
राहुलने २०१४ साली भारतासाठी कसोटी पदार्पण केले. त्याने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. पण एकूणात त्याचे रेकॉर्ड देखील पाहावे लागेल. ४६ कसोटीतील ७९ डावात राहुलने ७ शतक आणि ३४.०७च्या सरासरीने २ हजार ६२४ धावा केल्या आहेत. भारतासाठी कसोटीत २६ खेळाडूंनी त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात फक्त कपिल देव, आर अश्विन आणि सैयद किरमानी यांची सरासरी राहुल पेक्षा खराब आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तिघेही मुख्य फलंदाज नाहीत.

२०१८ पासून खराब कामगिरी

राहुलने पदार्पणानंतर २०१७ पर्यंत २१ कसोटी ४४.६२च्या सरासरीने १ हजार ४२८ धावा केल्या होत्या, यात ४ शतक देखील होती. पण त्यानंतर त्याची कामगिरी घसरली. २५ कसोटीत राहुलने २६.५७च्या सरासरीने १ हजार १९६ धावा केल्या. एप्रिलमध्ये राहुल ३१ वर्षाचा होईल. संघ व्यवस्थापन त्याच्या भविष्याचा विचार करेल असे वाटत नाही.

फक्त शमीने घेतलेल्या बोल्डचा आवाज ऐका; धारधार चेंडूवर काही फुटांवर पडली विकेट, Video
गेल्या १० डावात…

केएल राहुलने कसोटीतील गेल्या १० डावात फक्त एकदा २५ हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने २३,८,१२,१०,२२,२३,१०,२ आणि २० अशा धावा केल्या आहेत. कसोटी करिअरच्या पहिल्या १० डावात राहुलने २ शतक केली होती. पण अन्य ८ पैकी ७ डावात १० धावा देखील त्याला करता आल्या नव्हत्या. राहुलच्या कामगिरीत सातत्य दिसत नाहीय.

घरच्या मैदानावर राहुलने १५ कसोटीत ४३.५च्या सरासरीने ९०५ धावा केल्या, यात एक शतकाचा समावेश आहे. परदेशातील ३१ कसोटीत ६ शतक केली आहेत. पण ३०.६९ च्या सरासरीने १ हजार ७१९ धावा केल्या आहेत. याचा अर्थ शतक वगळता इतर डावात तो लवकर बाद झालाय. यामुळेच त्याची सरासरी ३०ची आहे.

नागपूर कसोटी भावूक क्षण; क्रिकेटपटूच्या पदार्पणासाठी उपस्थित होती आई, टेस्ट कॅप मिळताच मुलाला…

अन्य खेळाडूवर अन्याय

अजिंक्य रहाणेची कसोटीतील सरासरी ३८.५२, मयांक अग्रवालची ४१.३३, शिखर धवनची ४०.६१ तर नुकतीच निवृत्ती घेणाऱ्या मुरली विजयची ३८.२८ इतकी आहे. हे सर्व संघाबाहेर आहेत. मुरलीला तर २०१८ नंतर संधीच मिळाली नाही. धवन आणि रहाणे यांच्यासाठी देखील संघाचे दरवाजे जवळ जवळ बंद झालेत. पण राहुल मात्र खेळतोय आणि माहिती नाही किती काळ खेळेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here