वाचा-
बिहार आणि आसाम अशी दोन राज्ये आहेत जी करोना सोबत पुर परिस्थितीला देखील तोंड देत आहेत. अशा लोकांसाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी अभिनेत्री यांनी पुढाकार घेतला आहे.
वाचा-
पुर परिस्थितीला तोंड देणाऱ्या बिहार आणि आसामला मदत करण्याचे आवाहन या दोघांनी केले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये विराट म्हणतो, आपला देश करोना व्हायरसशी लढत आहे. यातच बिहार आणि आसाममधील नागरिक पुर परिस्थितीला तोंड देत आहेत. यामुळे अनेकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. आम्ही बिहार आणि आसाममधील लोकांसाठी प्रार्थना करतो. मी आणि अनुष्काने ठरवले आहे की या दोन्ही राज्यातील गरजू लोकांना मदत करायची. या तीन संस्था पुरग्रस्तांसाठी काम करत आहेत. आम्ही त्यांना मदत करतोय. तुम्हाला ही योग्य वाटले तर या संस्थांच्या माध्यमातून दोन राज्यातील लोकांना मदत करू शकता.
वाचा-
संकट काळात मदत करण्याची ही विराट आणि अनुष्का यांची पहिली वेळ नाही. याआधी मार्च-एप्रिलमध्ये करोना व्हायरसची सुरूवात झाली होती तेव्हा या दोघांनी गुप्तदान केले होते. तेव्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्का यांनी केंद्र सरकारला ३ कोटी रुपयांची मदत केल्याचे वृत्त होते.
वाचा-
करोनामुळे गेल्या ४ महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने स्थगित केले आहेत. अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे विराट देखील घरीच आहे. लॉकडाउनच्या काळात विराट सोशल मीडियावर सक्रीय असून तो फिटनेसपासून ते देशात घडणाऱ्या घटनांवर मत व्यक्त करत असतो.
विराटने टीम इंडियाकडून खेळताना आतापर्यंत ८६ कसोटीत ७ हजार २४०, तर २४८ वनडेत ११ हजार ८६७ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने ८२ सामन्यात २ हजार ७९४ धावा केल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.