काही कारणास्तव आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षीचे आयपीएल हे १९ सप्टेंबरलाच सुरु होणार आहे. पण आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते आहे. पण आयपीएलच्या मार्गातील एक समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.
आयसीसीने विश्वचषक आणि बीसीसीआयने आयपीएलसाठी आशिया चषक रद्द केला. त्यानंतर आयपीएल ही १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे ठरवले गेले. युएईमध्ये आबुधाबी, दुबई आणि शारजा येथे आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. युएईच्या क्रिकेट मंडळानेही आज आपल्याला बीसीसीआयचे पत्र आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आयपीएल युएईमध्येच खेळवले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण आयपीएलपुढे अजूनही एक समस्या कायम आहे. ही समस्या कधी सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही आयपीएलच्या आयोजनात एक महत्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे जोपर्यंत बीसीसीआयला भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. कारण भारत सरकारने जर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयचे कामकाज कोण पाहणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भारत सरकारची परवानगी घेण्याची प्रक्रीया बीसीसीआयला लवकरच सुरु करावी लागणार आहे. कारण ही परवानगी मिळाल्याशिवाय त्यांना युएईमध्ये जाऊन आयपीएलचे आयोजन करता येऊ शकत नाही. त्यामुळेच भारत सरकारची परवानगी महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times