दिल्ली: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची खूपच खराब सुरुवात झाली आणि अवघ्या दीड तासात कांगारूंचा संघ ऑल आऊट झाला. या एकाच सामन्यात भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फिरकीपटू आश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ ठरलेला जडेजाने आपल्या गोलंदाजीत एक जबरदस्त खेळी दाखवून दिली आहे.

दुसऱ्या दिवशी भारताने फलंदाजी करताना २६२ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १ धावेची लीड मिळाली. पण तिसऱ्या दिवशी सामना सुरु झाल्यानंतर मात्र त्यांची भारताने अवस्था बिकट केली. जडेजा आणि अश्विनच्या जोडीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांची चांगलीच शाळा घेतली. अश्विनने या डावात ३ विकेट्स तर जडेजाने एकट्याने तब्बल ७ विकेट्स घेतले. अश्विनने दुसऱ्या दिवशी भारताकडून विकेट्स घ्यायला सुरुवात केली आणि मग ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारू न देता पॅव्हेलियनमध्ये धाडले. आश्विनने मैदानात सेट झालेल्या ट्रेव्हिस हेडला श्रीकर भरतकडून झेलबाद केले तर स्मिथ आणि रेनेशॉला LBW आऊट केले.
IND vs AUS 2nd test LIVE:भारताच्या डावाला सुरुवात, दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला बसला पहिला धक्का
जडेजाने घेतलेल्या विकेट्स

लाबुशेनला क्लीन बोल्ड करत जडेजाने विकेट्सचा सिलसिला सुरु केला आणि मग त्यांनी एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. लाबुशेननंतर जडेजाने २ विकेट मेडेन ओव्हर टाकली, ज्यात त्याने पहिल्या चेंडूवर रेनेशॉला LBW आऊट केले तर हॅंड्सकोम्बला विराट कोहलीकरवी खाते उघडू ने देता झेलबाद केले. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेला पॅट कमिन्सला बेल्स उडवत भन्नाट क्लीन बोल्ड केले. तर नंतर कॅरी, नॅथन लायन आणि कुहेनमनला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले.


जडेजाची दमदार गोलंदाजी

रवींद्र जडेजाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त १२.१ षटकात ७ विकेट्स घेतल्या. यापूर्वी हा विक्रम आर अश्विनच्या नावावर होता, ज्याने २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १३.५ षटकात ७ किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. तर नरेंद्र हिरवाणीने १५.२ षटकांत ही कामगिरी केली. इरफान पठाणनेही तितक्याच षटकांत ही कामगिरी केली आहे.
IND vs AUS: विराट नॉट आउट होता? वादग्रस्त LBW देणारे अम्पायर नितीन मेनन आहेत तरी कोण
त्याचवेळी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने १२.१ षटकात ४२ धावा देत ७ विकेट्स घेतले. रवींद्र जडेजाची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे, कारण यापूर्वी त्याने २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ४८ धावांत ७ विकेट घेतले होते. विशेष म्हणजे रवींद्र जडेजाची ही कसोटी क्रिकेटमधली दुसरी ७ विकेटची स्पेल आहे, जी खूप वेगवान होती. एकदा तो हॅट्ट्रिकच्या अगदी जवळ होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here