मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची होती आणि भारताने यासाठी उत्तम कामगिरी दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सलग दुसऱ्या विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पात्र होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे, तर भारताने दिल्ली कसोटीत विजय मिळवून स्वतःमधील आणि तिसऱ्या स्थानावरील संघातील अंतर वाढवले आहे.

दिल्लीतील दुसऱ्या कसोटीच्या निकालामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीतील संघ चारवरून आता तीनवर आले आहेत. दक्षिण आफ्रिका या शर्यतीतून बाहेर पडला आहे. टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या टक्केवारीपासून तो खूपच लांब गेला आहे. आता टॉप-२ मध्ये जागा मिळवण्यासाठी आव्हान देणारा एकमेव संघ लढतीत आहे. जो ५३.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेला पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि त्यांना जर टॉप-२ मध्ये यायचं असेल तर दोन्ही कसोटी जिंकणे आवश्यक आहे.

BCCIने केली टीम इंडियाची घोषणा! उर्वरित दोन कसोटीसाठी भारताचा दमदार गोलंदाज संघात परतला
ऑस्ट्रेलिया सध्या ६६.६७ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत आता ६४.०६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्या ५३.३३ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेला टॉप-२ मध्ये जर जागा मिळवायची असेल तर त्यांच्या आगामी दोन्ही कसोटी जिंकणे त्यांना अनिवार्य असेल. पण भारताचे अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत आणि आपले स्थान या फेरीत टीम इंडियाला कायम ठेवायचे असेल तर त्यांना इंदूर कसोटी जिंकावी लागेल. जर भारताने होळकर स्टेडियमवर विजय मिळवला तर ते जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.

ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीतून बाहेर पडू शकणार?

सध्याच्या घडीला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाचा आहे. पण त्यांचं अंतिम फेरीचं तिकीट निश्चित झालं आहे, असं म्हणता येणार नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत २-० अशी आघाडी मिळवली आहे, भारताने जर ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलियावर मोठं संकट नक्कीच येऊ शकतं. कारण गुणतालिकेत त्यांचे पॉईंट्स कमी होत ते खाली घसरू शकतात आणि त्यांना अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी श्रीलंका-न्यूझीलंड मधील कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकेने जर ही कसोटी एकतर्फी जिंकली तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीच्या रेसमधून बाहेर जाईल. तर सोबतच अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत होईल.

IND vs AUS: भारताने दिल्ली जिंकली, तिसऱ्याच दिवशी सामना संपवला! दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टॉप-५

ऑस्ट्रेलिया – ६६.६७%
भारत – ६४.०६%
श्रीलंका – ५५.३३%
दक्षिण आफ्रिका – ४८.७२%
इंग्लंड -४६.९७%

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here