आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आयपीएलचा मार्ग मोकळा असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्यापुढे एक समस्या आहे. त्यामध्येच आता एका गोष्टीने डोके वर काढले आहे. युएईमध्ये आयपीएल खेळायला जाण्यासाठी आपल्याला बायकोही बरोबर हवी, अशी विनंती बीसीसीआयला करण्यात आली आहे. ही मागणी नेमकी केली तरी कोणी, पाहा…

करोनामुळे जेव्हा सामने नसतील तेव्हा क्रिकेटपटूंनी नेमकं काय करायचं, हा सवाल संघ मालकांच्या डोक्यात आला होता. कारण पूर्वी खेळाडू शॉपिंगला किंवा सिनेमा पाहायला जायचे. काही वेळा खेळाडू आपल्या नातेवाईकांच्या घरी जायचे किंवा एका क्रिकेटपटूच्या घरी जाऊन पार्टी करायचे. पण करोनामुळे आता खेळाडूंना या कोणत्याही गोष्टी करता येणार नाहीत.

वाचा-

ज्या दिवशी सामना असेल, त्यादिवशी खेळाडू व्यस्त असतील. पण दोन सामन्यांमध्ये जर काही दिवसांचा अवधी असेल, तर खेळाडूंसाठी काय करता येईल, याचा विचार सुरु आहे. कारण खेळाडू एकाच रुममध्ये किती काळ राहतील किंवा किती काळ सराव करतील. कारण या सर्व गोष्टींवरही मर्यादा आहेत. त्यामुळे खेळाडूंवर करोनामुळे झालेल्या घुसमटीचा त्रास होऊ नये, यासाठी संघ मालकांनी एक नवीन कल्पना शोधून काढली आहे. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या पत्नीसहीत कुटुंबियांना युएईमध्ये घेऊन जाण्याची विनंती संघ मालकांनी बीसीसीआयला केली आहे. करोनाच्या काळात जर खेळाडूंची पत्नीलाही जर युएईला पाठवायचे असेल तर खर्च दुप्पट होऊ शकतो, त्यासाठी आता बीसीसीआय काय निर्णय घेतेल, हे पाहणे महत्वाचे आहे.

वाचा-

आयपीएलच्या वेळपत्रकात आता बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आयपीएल हे १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार होते. आयपीएलचा अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार होता. पण आता आयपीएलच्या वेळापत्रकात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-

काही कारणास्तव आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षीचे आयपीएल हे १९ सप्टेंबरलाच सुरु होणार आहे. पण आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते आहे. पण आयपीएलच्या मार्गातील एक समस्या अजूनही सुटलेली दिसत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here