पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजा आणि शोएब अख्तर हे सोशल मीडियावरून भारताची बदनामी करण्याची किंवा टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंचे वक्तव्य ऐकल्यानंतर सुनिल गावस्कर प्रचंड संतापले. पाक खेळाडूंच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानचे खेळाडू हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतता. भारताने या क्रिकेटपटूंच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये. खास करून सोशल मीडियाला माझी विनंती आहे की, या पाकच्या क्रिकेटपटूंच्या वक्त्यांकडे दुर्लक्ष करावे. हे माजी खेळाडू फॉलोअर्स मिळवण्यासाठी करत आहेत. त्यांना प्रसिद्धी झोतात रहायचे आहे.
‘खेळाडूंमध्ये नेहमीच वाद सुरू असतात. पण राग आणि अश्लील वक्तव्ये करणे या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आज जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या अशा खेळाडूंच्या मध्ये होतात जे आयपीएलमध्ये खेळत नाहीत. त्यामुळेच जेव्हा ते लोक भारताविरुद्ध बोलतात तेव्हा भारतीय खेळाडूंबद्दल त्यांचा राग दिसून येतो. यातील काही खेळाडूंना असे वाटते की त्यांनी करिअरमध्ये इतकी मोठी कामगिरी केली आहे की त्यांना भारतीय खेळाडूंपेक्षा अधिक पैसे मिळाले पाहिजेत’, असे गावस्कर म्हणाले.
यापुढे जाऊन गावस्कर म्हणाले, तुम्ही कधी कोणत्याही भारतीय खेळाडूला सीमेपलीकडच्या खेळाडूबद्दल असं बोलताना ऐकले आहे का? अशा प्रकारच्या गोष्टींकडे कोणाचेही लक्ष जात नाही. कारण आपले खेळाडू कधीच असं करत नाहीत. ही आपली पद्धत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times