भारताचा कर्णधार रोहित शर्मा ज्या चेंडूवर बाद झाला ८ डिग्री इतका वळला होता. म्हणजे कसोटीच्या पहिल्या दिवशी चेंडू असा वळत होता. साधारण कसोटीत अखेरच्या दिवशी चेंडू असा वळत होता. फक्त रोहितच नाही तर अन्य फलंदाज देखील अशाच पद्धतीने बाद झाले.
कोणासाठी चेंडू किती वळला
रोहित शर्मा- ८.३ डिग्री
शुभमन गिल- ५.० डिग्री
चेतेश्वर पुजारा- ६.८ डिग्री
रविंद्र जडेजा- ५.८ डिग्री
श्रेयस अय्यर- ३.५ डिग्री
भारताचे हे सर्व फलंदाज लंच ब्रेकच्या आधी बाद झाले. मॅचच्या पहिल्या सेशनमध्ये चेंडू असा टर्न होत होता. या फलंदाजानंतर विराट कोहली आणि अन्य फलंदाजांना देखील असाच अनुभव आला.
इंदूर कसोटीच्या आधी अशी चर्चा होती की ही खेळपट्टी लाल मातीपासून तयार केली आहे, ज्यावर फलंदाज आणि जलद गोलंदाजांना मदत मिळेल. पण पहिल्या दिवशी जे काही झाले त्यावरून हा दावा चुकीचा ठरल्याचे दिसले.
पहिल्या डावातील भारतीय फलंदाजांची अवस्था
रोहित शर्मा- १२
शुभमन गिल- २१
चेतेश्वर पुजारा- ०१
विराट कोहली- २२
रविंद्र जडेजा- ०४
श्रेयस अय्यर- ००
श्रीकर भरत- १७
अक्षर पटेल- १७
अश्विन- ०३
उमेश यादव- १७
मोहम्मद सिराज-००
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने पहिल्या दोन कसोटीत दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या तिनही कसोटीत भारताने फक्त ३ दिवसात विजय मिळवाल होता. आता इंदूर कसोटीत मात्र पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला झटका दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५६ धावा करत ४७ धावांची आघाडी घेतली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times